जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by राहुल
06-08-2015
Rahul Shinde.shinde962@gmail.com
सर आमची वादिलोपरजीत जमीन आहे पण ती आमच्या नावावर नाही ती जमीन गट वारी मधे कोणच्या तरी दुसऱ्या वयकतीच्या नावी गेली आहे पण त्या जमिनीचा नंबर माहित नहीं तो कसा मिळू शकतो
वडिलोपार्जित जमिनीचा नंबर शोधा. त्याला नवीन अभिलेखात कोणता नंबर दिला ते तपासा. तसेच दिलेल्या नवीन नंबरची जुनी व नवीन आराजी तपासा. त्यावरून अंदाज येईंल.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
तुम्हाला जमिनीचे स्थान व आजूबाजूला असलेले शेतकरी माहित असतील . जमीन ज्या गावातील आहे त्या गावातील तुमच्या जमिनीच्या आजू बाजूचे सर्वे क्र तपासा . त्या वरून तुमचा क्र कोणता असेल याचा दिशेवरून अंदाज येईल . बंदोबस्त मिसल,जमाबंदी , रेसर्वे चा रेकॉर्ड शोधा.
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by Krunal Saupure
06-08-2015
ksaupure23@gmail.com
सर नमस्कार,
सर्वप्रथम आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
जिल्हाधिकारी यांनी कबुलायात नवीन अविभाज्य शर्तीवर एका व्यक्तीस जमीन (भोह्वातदार वर्ग २ ) प्रदान केली.
सदर व्यक्तीने ही जमीन त्यांचा नात्यातीलच मावस मुलाला ज्याने त्याची म्हातारपणात काळजी घेतली त्याला दुयम निबंधक यांचेकडील नोंदणीकृत मृत्यू पत्रानुसार मध्ये दिली.
१.सदर प्रकरणामध्ये शर्त भंगहोतो काय?? २.जर शर्त भंग होत असेल तर शर्त भंग नियमित करून जमिनीची विक्री करण्यासाठी काय करावे लागेल?
३.सदर जमिनीची विक्री करताना किती % नजराणा शासनास भरावा लागेल
Question by संजय रा. कोकरे
06-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडील्यांनी माझी वडीलोपार्जीत जमीन विकुन नविन जमिन खरेदी हक्काने विकत घेतली त्यामुळे मला जमीनवर माझा हक्क माझे वडील देण्यास नकार देत आहे
न्यायालयात दाद मागावी. वडिलोपार्जित जमीन विकून नवीन जमीन खरेदी केल्याचे सिद्ध करावे.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by संतोष जवरे
06-08-2015
jaware_sb@rediffmail.com
एका गट नंबरच्या जमिनीमध्ये कब्जेदार सदरी नाव असलेल्या व्यक्तीने त्याच्या पत्नी चे नांव सहहिस्सेदार (पती जिवंत आहे) म्हणून दाखल करण्याबाबत नमुद केले आहे.तरी पत्नीचे नांव सहहिस्सेदार म्हणून दाखल करता येईल का? जर करता येईल तर, त्याबाबत शासन निर्णय कळवावा ही विनंती.
संतोष जवरेजी आपण लक्ष्मि मुक्ती शा. परिपत्रक क्र.१४/२१६/१६/प्र.क्र.४५८/ल६ सन १९९२ अन्वये पतीचे नावाखाली सह हिस्सेदार म्हणून नाव दर्ज करण्या करिता अर्ज करू शकता.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
गृह लक्ष्मी योजने अंतर्गत पतीचे नावासोबत पत्नीचे नाव दर्ज करता येते. तसा अर्ज तालुक्याला करावा. जी आर लवकरच कळविण्यात येईल .
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by संतोष जवरे
06-08-2015
jaware_sb@rediffmail.com
नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीमध्ये मृत्युपत्रान्वये नांवे दाखल करता येतील का?
होय. गोत्रजा वेतिरिक्त मूत्यूपत्र केले असेल तर. हस्तांतरण होईल.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by कुणाल अं. जाधव, लिपीक
06-08-2015
mr.k1387@gmail.com
एखाद्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखण्याचे अधिकार कोणास आहेत ?
तहसीलदार यांना वेतनवाढ रोखण्याचे अधिकार आहेत का ?
एखाद्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केव्हा रोखावी याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती.
1 कार्यालय प्रमुखास
२ होय .
३ कृपया महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम १९७९ वाचवा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by विनायक पाटील
06-08-2015
rachnavinay123@gmail.com
माझ्या आजोबांची १०० गुंठे जमीन आहे. चार मुलांमध्ये सर्वसंमत्तीने खालील प्रमाणे वाटप झाले. वाटप रजिस्टर झाले आहे व सर्व भावंडांना मान्य आहे. सर्वांनी रजिश्टर ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या आहेत.
अ (भाऊ) - २५ गुंठे + "५ गुंठे (घराची जागा )"
ब (भाऊ)- ३० गुंठे
क (बहिण) - २० गुंठे
ड (बहिण) - २० गुंठे
आता प्रश्न असा आहे कि दस्त नोंद करताना असे लक्ष्यात आले कि "अ" च्या वाट्याला आलेली "५ गुंठे (घराची जागा )" हीच उल्लेख वाटप पत्रात झाला नाही. सर्व भावंडे खूप दूर दूर अंतरावर राहत असल्यामुळे आम्ही तलाठी तसेच प्रांत अधिकारी यांस कडे उपाय मागितला त्यांनी सुचवलेला उपाय खालील प्रमाणे.
१) सदर वाटप पत्राची नोंद "५ गुंठे (घराची जागा )" सोडून वरील प्रमाणे होऊ शकते व ५ गुंठे जागा सामायिक चारही भावंडाच्या नावावर राहील.
२) ५ गुंठे (घराची जागा) :- हिस्सेदार "अ" ह्यांच्या नावावर करण्यासाठी वेगळे रजिश्टर (हक्कासोड पत्र ) करून, त्यावर सर्व भावंडांची सही घेता येऊ शकते.
माननीय साहेब,
वरील बाब लक्ष्यात घेता १ व २ हे समाधान बरोबर आहे का ?
भविष्यात हे वाटप कायद्यानुसार वैध मानले जाईल का ?
कृपया मार्गदर्शन करावे.
आपला विश्वासू,
१ व २ हे बरोबर आहे अथवा नोंदणीकृत वाटप पत्रातील चुकीच्या दुरुस्तीचा नोंदणीकृत दस्त तयार करावा.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by संजय रा. कोकरे
05-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
माझ्याजवळ राहायला घर नाही. पण माझ्या गावठाण जमिनमधील जमिन शिल्लक आहे. पण गावातील काही व्यक्तीने तेथे शेणखत व कचरा टाकुन आपला ताबा केला आहे त्यामुळे ती जागा तशीच पडलेली आहे. त्यामुळे मला तेथे घर बांधायचे असेल तर बांधता येईल का? व त्या लोकांनी काही उपद्रव करु नाही म्हणुन काय बंदोबस्त करावा. त्याकडे कुणाकडे अर्ज करावा
Question by संजय रा. कोकरे
05-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
माझ्याजवळ राहायला घर नाही. पण माझ्या गावठाण जमिनमधील जमिन शिल्लक आहे. पण गावातील काही व्यक्तीने तेथे शेणखत व कचरा टाकुन आपला ताबा केला आहे त्यामुळे ती जागा तशीच पडलेली आहे. त्यामुळे मला तेथे घर बांधायचे असेल तर बांधता येईल का? व त्या लोकांनी काही उपद्रव करु नाही म्हणुन काय बंदोबस्त करावा. त्याकडे कुणाकडे अर्ज करावा
गावठाणा मधील
जमीन जर शिल्लक असली तरी ती तुमच्या मालकीची आहे का ? जर ती तुमच्या मालकीची नसेल तर तुम्ही घर बांधू शकणार नाही . ती ग्राम पंचायत च्या मालकीची असेल व काही कारणासाठी राखीव असेल . जर तुमच्या मालकीची जमीन असेल आणि इतर लोक उपद्रव करीत असेल तर पोलिसांची मदत घ्यावी .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by गणेश नवले
05-08-2015
g9le@rediffmail.com
नमस्कार सर मी २०१० साली एक घर विकत घेतले ,ज्या व्यक्तीकडून घर घेतले त्याने तेच २००३ साली खरेदी केले होते त्याने मला घर विकताना त्याचे खरेदी खात देऊ केले होते पण ते माझ्या कडून गहाळ झाले आहे तरी त्या खरेदी खताची नक्कल प्रत मिळेल काय त्यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by कृणाल सौपुरे
05-08-2015
ksaupure23@gmail.com
सर नमस्कार आपल्या या मुक्त व्यासपीठा बद्दल सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद,
जिल्हाधिकारी यांनी कबुलायात ने एका व्यक्तीस नवीन अविभाज्य शर्तीवर जमीन प्रदान केली. पुढे त्या व्यक्तीने ही स्व अर्जित जमीन त्यांचा नात्यातीलच मावस मुलाला ज्याने त्याची म्हातारपणात काळजी घेतली त्याला दुयम निबंधक यांचेकडील नोंदणीकृत मृत्यू पत्रानुसार मध्ये दिली.त्यावेळी नजराणा भरलेला नाही. STAMP DUTY नियमानुसार भरलेली आहे तर १.या प्रकरणामध्ये शर्त भंग होतो काय??
२.जर शर्त भंग होत असेल व आत्ता शर्त भंग नियमित करून जमिनीची विक्री करण्यासाठी काय करावे लागेल.
३.सदरच्या जमीन खरेदी करण्यासाठी सध्या किती % नजराणा रक्कम म्हणून शासनास भरावी लागेल?
hoy , jilhadhikari yanchi parvangi ghyavi lagel . chalu bajarbhavachya 50 %
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by ganesh
04-08-2015
g9le@rediffmail.com
नमस्कार सर मी २०१० साली एक घर विकत घेतले असून परंतु ज्या व्यक्तीकडून घर घेतले त्या व्यक्तीचे खरेदी खात माझ्याकडून गहाळ झाले असून त्याची नक्कल प्रत मिळण्यासाठी काय करावे या बाबत मार्गदर्शन करावे हि विनंती
नोंदणीकृत केले असल्यास संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात milel
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by samadhan
04-08-2015
iamsamg19@gmail.com
नमस्कार सर,
जुने (४० ते ५० वर्षे ) दत्तक विषयीचे दस्त रेकॉर्ड शोधायचे असतील तर शासनाच्या कोणत्या विभाग अथवा कार्यालयाकडे मिळतील.
दत्तक घेतलेल्या कुटुंबाच्या जमिनीचे वारस फेरफार नोंदीवरून काही माहिती मिळू शकेल का?
एका इसमाने आमच्या शेत जमिनीवर १/७ हिस्सा नोंद करून घेतला आहे.हा इसम माझे आजोबांचे अपत्यापैकी (४ मुले पैकी १ मुलगा दत्तक दिला गेला + ३ मुली) दत्तक दिला गेलेल्या मुलाचा मुलगा आहे.ज्या कुटुंबात दत्तक दिले गेले त्या कुटुंबाचे जमीन विकून टाकली आहे व आता आमच्या जमिनीवरपण हिस्सा लावला आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
Question by संजय रा. कोकरे
04-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडील्यांनी माझी वडीलोपार्जीत जमीन विकुन नविन जमिन खरेदी हक्काने विकत घेतली त्यामुळे मला जमीनवर माझा हक्क माझे वडील देण्यास नकार देत आहे तरी ती मी काय त्या जमीनीचा कायदेशीर हक्क मागु शकतो का? व कसा?
Question by Khushboo Sonar
04-08-2015
khushboo.bharadwaj05@gmail.com
एख्याद्या जुन्या मृत्यू पत्रा मध्ये जर जमिनीशी संबंधित "सरकार मुदतीची" असा शब्द वापरला आहे तर त्याचे अर्थ काय आहे ते सांगावे?
Question by शिवाजी बनसोडे
04-08-2015
mpspkordgaon@gmail.com
सर नमस्कार माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद । भूसंपादन करताना जर क जा प झाले नसेल तर। काय कराव लागेल माहिती मिळावी हि विनंती
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व संबंधित विशेष भूसंपादन अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करावा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by TUSHAR BHANDWALKAR
02-08-2015
tussh87bhand@gmail.com
सर, नमस्कार आमचे आडनाव भांडवलकर आहे पण पहिल्यापासून माजा आजोबांचे आडनाव सुतार आसे लागले गेले त्या नंतर माजा वडिलांचे पण तेच आडनाव लागले आहे परंतु वडिलांनी मला शाळेत घातले तेंवा भांडवलकर असे आडनाव दिले आता माजे कागत पत्र भांडवलकर नावाने आहेत यामुळे मला काही कागत पत्र देत असताना आडचन येते मला माग्रदर्शन करावे
Question by Sachin Tyambak Javale
02-08-2015
sachin19121981@gmail.com
माननीय सर, आपण 11-07-2015 च्या प्रश्नाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले धन्यवाद. मी दिलेल्या माहीती प्रमाणे आमच्या प्रकरणमध्ये तडजोड करणे शक्य नाही. सदर शेतजमीन 17 गुठे टुकड़ा आहे. त्यामुळे खातेफोड करता येनार नाही.मला त्यांच्याशी व्यवहार करायचा झाल्यास योग्य तो मोबादला मिळणार नाही. तसेच ते पण मला शेत् घेऊ देणार नाही. सदर शेत् जमीन टुकड़ा असल्याने कायद्याने वाटनी करण्यास प्रतिबंध आहे. परंतु वारसास वारस हक्क मिलने हा कयदेशिर प्रश्न असल्याने मी प्रयत्न करीत आहे. मला त्यांचा स्वभाव चांगला असता तर तडजोड करायला हरकत नव्हती. आता मला हे प्रकरण कसे हाताळावे ,त्याबद्दल योग्य मार्गदर्शन हवे आहे.
Question by vikram yadav
02-08-2015
vikram.vru@gmail.com
नमस्कार सर,
मी हाय पूर्वी सुधा प्रश्न विचारला आहे .कि माझे वादिल्पर्जीत मिल्काठीत वाटपपत्र माझी नावें झाले आहे ,बाकी जमीन आई व बहिणी चं नावें करण्यात आली ,एका खारेधी वाह्वःरात ती जमीन विकली गेय्ले .काही करणा मुले ती जमिनीचा वाहहार कुरतात जावून तय्चावर तडजोड झाली व त्या ३ नि माझी नावें हक्कसोड पत्र चोउर्ततच लिहून दिले ,तरी ७/१२ वर माझे नाव अझून आले नाही तय्साठी काय कार्ये लागेल तय साधी प्ल्झ मार्ग दर्शन करा .
court madhe ya आदेशावर अपील प्रलंबित आहे का ? final order झाली असल्यास फेरफार ची प्रक्रिया करावी . सर्व कागदपत्र ,तलाठी यांना देऊन फेरफारासाठी अर्ज करावा . त्यावर तलाठी ९,१२ च्या नोटीस काढतात . १५ दिवसाच्या कालावधी नंतर आक्षेप नसल्यास मंडळ अधिकारी फेरफार पारित करतात .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by vishal wankhede
02-08-2015
vishalwankhede645@gmail.com
namaskar sir,,
majhya vadilanchya nave 2hectar jamin asun majhya kakachya nave pan 2hectar jamin ahe pan kharab jamin majhya vadilanchya navavar ani bagayti jamin majhya kakanchya navavar zala ahe tari te barobar karnyasathi Kay karave
Question by राजेंद्र हरी सोनवने
02-08-2015
mrsona71@gmail.com
आमचे चुलते यांनी सन १९७३ साली १.२५ पैसे च्या कोरा स्टम्प पेपर वर सही घेवुन मालमत्ता हडप करुन वर्ष १९९० नंतर त्याचे नाव ७/१२ ला लावले .रु.१.२५/-पैसे चा मुद्रांक कायदेशीर गृहीत धरला जातो का?
१०० रु पेक्षा अधिकची मालमत्ता नोंदणीकृत दस्तेवज प्रमाणे नोंदवली पाहिजे . सक्षम न्यायालयात दाद मागावी . मात्र प्रकरण जुने असल्याने मालकी व कब्जा संबंधित व्यक्तीचा असल्यास इतर कायदे हि लागू होतील .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by sheikh abrar gafor
01-08-2015
sheikh.mahemud@gmail.com
Sir darridry card astanna suddha . va bhumin asun dekhi gharkul milat nahi. At - malkapur pangra , ta - sindkhed raja ,dist - buldana 443202
हा प्रश्न महसूल विभागाशी संबंधित नाही . आपण संबंधित गट विकास अधिकारी यांचेकडे तक्रार देऊ शकता . सर्व ग्राम पंचायत कार्यालयात घर कुला संबंधित प्रतीक्षा यादी लावली असते . ग्राम पंचायत , होणाऱ्या ग्राम सभा यात तत्परतेने भाग घेऊन आपला प्रश्न सोडवा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by शिवाजी बनसोडे
31-07-2015
mpspkordgaon@gmail.com
नमस्कार सर मी वीस वर्षा पुर्वी दोन एकर जमीन खरीदी केली त्या जमीनीमधुन एक रस्ता गेलेला आहे मी खरीदी करताना रस्ता वगळून क्षेत्र असा उल्लेख आहे सातबारा वरून रस्ता वजा झालेला नाही मुळ मालकाने सर्व जमीन विकलेली आहे व तो मयत आहे शेवटी जमीन घेणायाने जमीन मोजून घेतली नाही आता तो जमीन मोजा म्हणतोय रस्ता सोडून त्याची जमीन भरत नाही रस्ता संपादन झालेला आहे त्याचा मावेजा मूळ मालकांने उचलला आहे मुऴ मालकाने रस्त्यासह खरेदी देऊन त्याची फसवणूक केली आहे मला आता रस्त्याचे क्षेत्र सातबारा वरून कमी करायचे आहे काय करावे लागेल सविस्तर सांगावे हि विनंती
रस्ता ची जमीन जर संपादित झाली असेल तर , त्याचे कमी जास्त पत्रक बनले असेल . उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून ते बनत . याला क जप ( kjp )म्हणतात . याची नोंद तलाठी घेऊन क्षेत्र व सातबारा दुरुस्त करतात .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by yogesh suresh madhavi
31-07-2015
yogeshmadhavi14@gmail.com
mazhya vadilanchya sakhya kakanchi jamin ahe te mayat zhale asun tyanna 2 bhav va 3 bahini ahet sadar zamin mazhe vadilanche nave karnyasathi sarvanchi sahamati ahe parantu vadilanche vadil va itar 2 kaka va vadilanchya attya yancha dekhil mrutyu zala ahe tari sadar zaminis kon kon varis lagel va ti zamin mazhe vadilanche nave karne sathi kay prakriya karavi lagel krupaya margadarshan milave hi vinanti
Question by माधव नाईक
31-07-2015
madhkolmetwadi@gmail.com
सर
माझे वडील शासकीय कर्मचारी होते ते मरण पावले आहेत परंतु माझ्या आईला अजून पॆन्सिन अजून चालू झली नाही आहे माझ्या वड्लन मारून आता ९ महिने झले आहेत आम्ही ऑफिस मध्ये विचारण केली असता अजून वेळ लागेल असे उत्तर तेथील क्लार्क देत आहे तर आम्ही काय करावे साहेब?
निवृत्ती वेतन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे व तो अदा करणे कार्यालय प्रमुखास बंधन कारक आहे . कागदपत्राच्या अपूर्णते मुले निवृत्ती वेतनाची गणना करणे शक्य नसेल तर तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर करता येईल
सर्वसाधारण पणे निवृत्ती वेतन मंजूर करतांना ,सेवापुस्ताकाच्या सर्व नोंदी पडताळल्या जातात . ना मागणी प्रमाणपत्र मागवले जातात , व त्या प्रमाणे विहित नमुने , अद्यावत सेवापुस्तक , आवश्यक कागदपत्रे , शासनाला कर्मचार्याकडून येणे असलेल्या रकमेचा तपशील हि माहिती लेखा परीक्षकाकडे पाठवले जाते .
कुटुंब निवृत्ती वेतन व उपदान या साठी , मृत व्यक्तीचे नामनिर्देशन कुणाला केले आहे हे तपासतो . नमुना १० , नमुना १२ ,नमुना १५ मागणी करण्यासाठी कळवतो . नमुना १६ ची परिपूर्ती करतो .
नमुना १६ मधील बाब क्र २२ ते २६ पूर्ण करून , नमुना १७ सह अद्यावत सेवा पुस्तक व आवश्यक कागदपत्रे लेखा अधिकाऱ्याकडे पाठवतो .
क १२९ अ व ब प्रमाणे विलंबाने दिलेल्या उपदान व निवृत्ती वेतन वर व्याज अनुदेय आहे जर विलंब कार्यालयाकडून झाला असेल तर . मात्र निवृत्त कर्मचार्याने कसूर केली असल्यास विलंब देय नाही .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
