जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

प्रिय सर,
नमस्कार!
पूर्वी सरनिखर पद्धतीने शेत जमिनीचे वाटप वडीलधारी मंडळी हलकी व भारी जमीन हा एकमेव निकष लावून कमी जास्त जमीन मुलांना वाटप केली जात होती. वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीवर २ ते ३ पिढ्यांपासून हमिनी कसत आहेत. त्यांच्यामध्ये आजतागायत कोणताही वाद नाही. परंतु ७/१२ नुसार सर्वांचे क्षेत्र कमी जास्त प्रमाणात व प्रत्यक्ष वाहिवाटीतील जमिनीनुसार न लागता सारख्याच पद्धतीने लागलेले आहे. अजूनही जमिनीच्या गटाची मोजणी झालेली नाही. परंतु मोजणी झाल्यावर मोठे वाद निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी व प्रत्यक्ष कसत असलेली जशी आहे तशी जमीन प्रत्येकाच्या नावे लागण्यासाठी/ ७/१२ दुरुस्त होण्यासाठी मार्गदर्शन व कायदे व नियम काय आहेत याची माहिती मिळावी,
आपण कसत असलेले क्षेत्र भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी होणे आवश्यक . मोजणी प्रमाणे वाहिवातीखालील क्षेत्राचा ७/१२ , आकार्फोड पत्रक प्राप्त झाल्यावर होईल .
बिगर मोजणी , कसत असलेलेक्षेत्र कसे समजून येणार ?

आपण कसतअसलेले क्षेत्र मोजणीकरून घ्या . हा एकाच उपाय आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
मी आपणास दिनांक १२/०६/२०१५ रोजी वाढीव गावठाणातील शिल्लक प्लॉटबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले त्याबद्दल मी आपला आभारी आहे .
सदर वाढीव गावठाणातील शिल्लक प्लॉट घेणे साठी मा. प्रांताधिकारी यांचेकडे अर्ज करताना त्या सोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतील या विषयी माहिती मिळावी .
तसेच सदर प्लॉट मिळताना काही प्राधान्यक्रम आसतो असतो का ? सदर प्लॉट कोणाला मिळू शकतो ? या विषयी माहिती मिळावी . ही नम्र विनंती.
आपण त्या गावाचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक
प्रथ्य्मया क्रम nahi

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by nilesh furade
18-06-2015
nileshfurade@gmail.com

Amchya ajobani x ya vktila 3.5 Gunte jamin vikli ti vkti 6 gunte vaprte 4 Gunte var ghar janvarasati gota ahe 2Gunte khule ahe magitle tar det nahi kay mi kay karave manje ti jamin mala milel

Question by nilesh furade
18-06-2015
nileshfurade@gmail.com

Amchya ajobani x ya vktila 3.5 Gunte jamin vikli ti vkti 6 gunte vaprte 4 Gunte var ghar janvarasati gota ahe 2Gunte khule ahe magitle tar det nahi kay mi kay karave manje ti jamin mala milel
सर
माझे गाव सावंतवाडी येथे आमची वादिलोन्पार्जीत जमीन आहे परंतु त्यात माझ्या आजोबांचे व वडिलांचे नाव नाही आहे ती जमीन आमच्या पंजोबाच्या नावावर पहिली होती नंतर त्यांच्या दोन मुलांचं नावावर झली पाहिझे होती परंतु माझे आजोबा हे कामानिमित मुंबईला आलेहोते त्यामुळे त्यांचा मोठा भाउ त्यांचे नाव ७\१२ मध्ये टाकणार नाही यांची त्यांना माहिती देखील न्हाव्ह्ती तर साहेब माझ्या आजोबांचे नाव त्यांनी ७\१२ मध्ये टाकले नाही तर माझ्या चुलत आजोबांच्या मृतुनंतर हि जमीन व त्यांचं मोठ्या मुलाचं नावर झालेली आहे तर आम्हाला देखील आमचे नाव ७\१२ मध्ये नोंदवायचे आहेपरंतु माझे चुलत काका प्रतिज्ञा पत्र detnahi तर साहेब आम्हाला काय करावे लागेल याचे उत्तर मलू शकेल का
आपण प्रांताधिकारी सावंतवाडी यांचेकडे ज्या फेर्फाराने केवळ चुलत आजोबांचे नाव दाखल करण्यात आले आहे त्या फेरफार नोंदिविरुद्ध अपील करा .
आपणास पणजोबांचे कोण कोण वारस होते हे दाखवून द्यावे लागेल


Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vipulnaik
17-06-2015
mailvipulnaik@gmail.com

सर
मला आमच्या खाते क्रमंक २७६ च्या दोन पिद्धायंचा फेरफार व ६ क ची माहिती कोणाकडे मागता येईल तलाठ्या कडे मागितली तर त्यांनी असे उत्तर दिले कि २००९ ला गावल पूर आलेला तर त्यात रेकॉर्ड सगळे वाहून गेल माघ मला कोणाकडे माहिती मिळेल .......साहेब आपण मला सहकार्य करा
सर..सात बारा त देवस्थान सस्थेच नाव असुन ईतर आधिकारात कुळाच्या नाव असुन त्याचे नावे खरेदीची किमत होइल का?
जर देवस्थान मुंबई सार्वजनिक न्यास कायद्याखाली नोंदणीकृत नसेल व न्यासाचे सर्व उत्तपन्न धर्मादाय कामासाठी वापरले जात नसावे
जिल्हाधिकारी यांनी अश्या न्यायासास , ३२ कलम व त्या खालील उप कलम या असून सूट , अशे प्रमाणपत्र दिलेले नसावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, मी सुनील मारुती वडघुले राहणार मौजे टाकळी भीमा ता. दौंड जिल्हा पुणे येथील माझे पंजोबा श्री.नामदेव तुळशीराम वडघुले यांना २४ एकर शेतजमीन वडिलोपार्जित होती. त्यांना तीन मुले होती त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत श्री. केरु नामदेव वडघुले , श्री.बाजीराव नामदेव वडघुले , श्री. आनंदराव नामदेव वडघुले . त्यांना वारसा हक्का प्रमाणे प्रत्येकी आठ एकर जमीन वाट्याला यायला पाहिजे होती परंतु त्यांचे शेतजमिनीचे वाटप चुकीच्या पद्धतीने झाले आहे . श्री. केरु नामदेव वडघुले यांना ७.५० एकर, श्री. बाजीराव नामदेव वडघुले यांना ७.५० एकर, श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांना ९ एकर असे वाटप १९८५ साली झाले. माझे वडील श्री. मारुती बाजीराव वडघुले नौकरी मुळे बाहेरगावी होते. वडिलांचे चुलते श्री.केरु नामदेव वडघुले आणि आजोबा श्री.बाजीराव नामदेव वडघुले याचे शेतजमिनीचे वाटप होण्याअगोदर निधन झाले. वडिलांचे चुलतभाऊ श्री. नानासाहेब केरु वडघुले हे श्री. केरु नामदेव वडघुले यांचा मुलगा हे पुणे येथे सर्वीसला होते हुशार होते त्यांनी त्यांच्या अक्कल हुशारीने जमिनीचे तिघा भावांना चुकीचे वाटप केले आहे . श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांना स्वताचे कोणीही वारसदार नाही. श्री.आनंदराव नामदेव वडघुले हे वयस्कर अडाणी होते जमिनीचे वाटप झाल्यानंतर एक महिन्याच्या थोड्याच कालावधी मध्ये वडिलांचे चुलतभाऊ श्री.नानासाहेब केरु वडघुले यांनी, श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांची ९ एकर शेतजमीन स्वतःच्या बायकोच्या सौ.सरस्वती नानासाहेब वडघुले हिच्या नावावर १५०००/- रुपयाचे खरेदी खत करून १९८५ साली विकत घेतली ही जमीन ही एकत्र कुटुंबातील होती. ही जमीन वडिलोपार्जित होती. आणि हे खरेदी खत करताना कोणत्याही भावांची ही समंती घेतली नाही तलाठ्याने फेरफार ची नोंद करताना कोणाही नातेवाईकाला कळवले नाही त्यामुळे आमची फसवणूक केली आहे . व परस्पर सह्या /अंगठे घेतले आहे . ही वडिलोपार्जित जमीन आहे आणि त्यांनी स्वकमाईतून घेतली नाही. त्यामुळे श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांना ती जमीन परस्पर सौ.सरस्वती नानासाहेब वडघुले खरेदी खत करून विकली. जमिनीचे समान वाटप झाले नसल्यामुळे श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांना खरेदी खत करण्याचा आधिकार राहत नाही . व त्या जमिनीवर आमचा श्री.बाजीराव नामदेव वडघुले यांच्या वारसदारांचा ही समान अधिकार आहे. त्यामुळे ९ एकरांचे समान वाटप प्रत्येकी ४.५० एकर श्री. केरु नामदेव वडघुले आणि श्री.बाजीराव नामदेव वडघुले यांच्या वारसदारा मध्ये होयाला पाहिजे. ही बाब आम्हाला सातबारा आणि फेरफार उतारे पाहिल्यानंतर लक्षात आली आहे . आमच्या शेतजमिनीचे वाटप चुकीचे झाले आहे आणि हे वाटप रजिस्टर्ड पद्धतीने झाले नाही साध्या अर्जावर तहसीलदार कडे अर्ज करून १९८५ मध्ये झाले आहे . यासाठी मला काय करावे लागेल यासाठी आपण चांगला सल्ला द्यावा ही विनंती .
तहसीलदार यांनी कलम ८५ अन्वय वाटप केले असल्यास , त्या विरुद्ध प्रांताधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी तालुका सावंतवाडी,गाव माडखोल मेटवाडी येथे खाते क्रमांक २७६ येथे माझ्या सासऱ्यांची वेडिलोनपार्जीत शेत जमीन आहे .शिवराम दाजी नाईक ,त्यांची दोन मुले नारायण शिवराम नाईक व अर्जुन शिवराम नाईक .शिवराम दाजी नाईक याचं मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे वारसदार महणून त्यांची दोन मुले होती नारायण शिवराम नाईक व अर्जुन शिवराम नाईक तर नारयण नाईक ह्यांनी अर्जुन नाईक हे कामानिमित मुंबईला जात येत राहिल्याने अर्जुन नाईक यांच्या शेत जमिनीवरील नाव नसल्याचे त्यांच्या ध्यानात नाही आले ,नारायण हा मोठा भाव असल्यामुळे तो शेत जमिनीत अर्जुन नाईक याचं नाव नोंदवणार नाही यांची त्यांना जाणीव न्हवती अर्जुन नाईक हे वेळोवेळी गावाला घरासाठी व शेती साठी पैसे पाठवत होते कालांतरान नारायण नाईक हे मृत्यू झाले त्या नंतर त्यांचा मोठा मुलगा शिवराम नारायण नाईक व परशुराम नारायण नाईक याचे नाव खाते क्रमांक २७६ या मध्ये त्यांनी आपली नाव नोंदवली. शिवराम नारयण नाईक यांचे देखील दोन मुले आहेत व अर्जुन शिवराम नाईक यांची देखील दोन मुले आहेत विजय अर्जुन नाईक व अंकुश अर्जुन नाईक परंतु शिवराम नारयण नाईक यांनीही देखील आपल्या चुलत भावांची नाव टाकली नाहीत ,अर्जुन नाईक यांचा देखील मृत्यू झाला आहे , तर अर्जुन शिवराम नाईक हे माझे सासरे त्यांच्या वेडिलोनपार्जीत शेत जमिनीत नाव नोंदवायचे आहे माझे पती विजय अर्जुन नाईक हे देखील ५ डिसेम्बर २०१५ रोजी मृत्यू पावले आहे तर माझ्या पाश्च्यात मला माझ्या मुलांच्या भवितव्याचा व त्यांच्या भविष्य साठी नाव नोंदवायचे आहे .आमच्या गावचा कुटूब प्रमुख म्हणून माझ्या चुलत मोठ्या दिराचे ,व त्याच्या भावाचे व बहिणीची नाव लागली आहेत तर मला माझे नाव नोंदवण्यास आपण सहकार्य कराल अशी अशा बाळगते .
शिवराम नाईक मयत झाल्यावर , केवळ नारायण नाईक यांचे नाव ज्या फेर फाराने दाखल झाले त्या विरुद्ध , प्रांताधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शिवराम नाईक मयत झाल्यावर , केवळ नारायण नाईक यांचे नाव ज्या फेर फाराने दाखल झाले त्या विरुद्ध , प्रांताधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ankush mane
15-06-2015
ankush098@hotmail.com

वाटणी पत्र न होता ७ / १२ वरील नाव असलेला व्यक्ती इतर नाव असलेल्या लोकांचे परवानगी शिवाय जमीन विकू शकतो ?

जर दस्त केला असेल तर त्यास हरकत घेता काय? कोणाकडे.घ्यावी?
ज्या व्यक्तीने जमीन विकली आहे त्याने त्याचे मालकीचे क्षेत्र विकले असल्यास , हरकत घेण्याचा रशना उद्भवत नाही

उ. दा
७/१२ वर तीन लोन्कांची नावे आहेत .प्रत्येकाचे क्षेत्र विभागणी झाली आहे . त्या एकी एकाने विकल्यास , अन्य दोघांना हरकत घेण्याचा रशना उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय,
एका जमिनीच्या ७/१२ वर कायम कुळाचे हक्क आहेत व त्यांचे वारस नोदले आहेत. जमीन धारक / जमीन मालक हयात नाही व त्याचेही वारस ७/१२ वर नोंदले आहेत. जमीन धारकाच्या काही वारसांनी अन्यत्र दूरच्या शहरात राहणारे इतर वारस मयत झाल्यावर २०१३ साली खोटे प्रतिज्ञा पत्र देऊन ७/१२ चे फेर-फार केले. सदर प्रतिज्ञा पत्रात त्यांनी असे लिहून दिले की मयत वारसदारांना मुले नव्हती. त्यामुळे मयत वारसांच्या मुलांची नावे ७/१२ मधे आली नाहीत. त्या नंतर ७/१२ वरील कुळाचे ४ पैकी ३ वारस व जमीन धारकाचे ७/१२ वरील दाखवलेले असलेले वारस यांनी एकत्रितपणे खरेदी खत करून जमीन एका त्रस्थास विकली जो शेतकरी असल्याचे त्याच्या स्वतःच्या अन्य जमिनीच्या ७/१२ नोंदी नुसार दिसून येते. कूळ व जमीन धारक यांच्या सही करणारया संबंधित वारसांना म्हणजे एकूण १०-१२ लोकांना प्रत्येकी दीड लाख रुपये चेकने व सुमारे तितकेच रोखीने दिले गेले असे खरेदी खतात नोंदले आहे. सदर व्यवहार सप्टेंबर २०१४ मधे झाला आहे. दिलेले चेक वटले आहेत. जमिनीचा सदर व्यवहार सरकारी दराच्या अर्ध्या दरात झाला.
त्या नंतर त्या दोन त्रयस्थ खरेदीदारानी २ महिन्यात सदर जमीन अन्य शेतकरी नसलेल्या विकासकास दुप्पट भावा पेक्षा जास्त भावाने विकली. मात्र एका कुळाच्या वारसदाराची प्रथम खरेदी खतात लेखी सहमती / अनुमती घेण्याची राहिली असल्याने त्याला पुढील म्हणजे दुसर्‍या खरेदी खतात १०,०००/- रुपये देऊन विक्रेता म्हणून सदर दोन त्रयस्थां सोबत सामिल केले गेले. सदर दुसर्या खरेदी खताचा व्यवहार नोव्हेंबर २०१४ मधे झाला आहे.
अशा प्रकारे पहिल्या व दुसर्‍या अशा दोन्ही खरेदी खतात कुळासाठी अनेक किंवा १ वारसदार विक्रेते म्ह्णून नोंदणीत आले.
दोन्ही खरेदी खते सर्व स्पोस्कार जसे - स्टॅंप ड्यूटी रजिस्ट्रेशन फी इत्यादी पार पाडून नोंदविली आहेत.
कूळ कायद्यतील सदर जमीन ग्राम पंचयत हद्दीत आहे व ते गाव नगर पालिका / परिषदेच्या हदीत जाणार आहे असे कळले आहे पण अद्याप तसे झालेले नाही.
कुळ कायदा अथावा BOMBAY TENANCY AND AGRICULTURAL LANDS ACT मधील कलम ३२-ग नुसार एकतर कूळ जमीन धारकाची जमीन खरेदी करते व मालक बनते. किंवा कलम १५ नुसार कूळ आपले अधिकार सोडून देते व जमीन पुन्हा जमीन धारकास परत मिळते. म्हणजे कूळ कायद्यातील जमीन जमीन धारक व कूळ यांना एकत्रितपणे खरेदी खतेने विकताच येणार नाही हे सदर कायद्या नुसार दिसते.
मात्र सदर जमीन विकण्या पुर्वी BOMBAY TENANCY AND AGRICULTURAL LANDS ACT कलम १५ अथवा ३२-ग नुसार प्रक्रिया झालेली नाही, पण त्यातील एक प्रक्रिया तरी होणे गरजेचे होते काय ?
किंवा सदर जमीन विकण्या आधी मा. जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेणे आवश्यक होते काय ?
सदर कायद्यातील कलम ८४-क नुसार कलम ६४ सह दोन्ही खरेदी खत रद्द होतील काय ? होत असल्यास त्याला किती काळ जातो?

कपया मार्गदर्शन करावे.

आपला कृपाभिलाषी
अभिमन्यू यशवंत अळतेकर
मुंबई कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ हा , कसेल त्याची जमीन या तत्वावर आधारित आहे . कुळाचे सौरक्षण करणे , कुळाचे हित या कायद्याने पहिले जाते

मात्र या प्रकरणात , कुल व मालक यांनी संमतीने त्रयस्त व्यक्तीस जमीन विकली आहे . कुल व मालक यांना , मोबदला मिळालेला आहे .
कुल व मालक यांनी , ३२ ग किंमत निच्छित होण्याचे अगोदर , जमीन एकत्रित विकण्यावर , उपरोक्त कायद्या अंतर्गत बंधन नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१. जर एखादा महसूली कर्मचारी (लिपीक)एस.एस.डी परीक्षा तीन वर्षात व तीन संधीत उत्‍तीर्ण झाला नाही तर त्‍याची ज्‍येष्‍टता खाली जाते का ?
२. जर एखादा महसूली कर्मचारी (लिपीक) याने एस.एस.डी. परीक्षा तीन वर्षात पण चौथ्‍या किंवा पाचव्‍या संधीत उत्‍तीर्ण झालेस त्‍याच्‍या ज्‍येष्‍टतेवर काय परिणाम होतो ? कृपया माहिती मिळावी हि विनंती
प्रथम माझी ओळख करून देतो . माझे नाव अनंत जयराम झेपले . माझ्या वडलांनी असुर्डे - kutare , चिपळूण या गावी सन २००७ मध्ये श्रीमती भारती बळीराम महाडिक यांच्याकडून 18 गुंते जमीन विकत घेतली , पण वडिलांनी त्यावेळी 7/12 वर "तुकड्या विरुद्ध व्यवहार " हे पेन्सिलीन लिहिलेले बघितले नाही आणि श्रीमती. बळीराम महाडिक ह्यांनीही कडी सांगितले नाही . वडिलांनी त्यांच्याबरोबर व्यवहार पूर्ण केला . वडील जेव्ह्या जेव्ह्या जमीन नावावर करायला चिपळूण ला गेले ठेव्हा तेतील अधिकार्याने त्यांना हा मुधा सांगितला कि जो पर्यंत हे तुमच्या 7/12 वरून काडला जात नाही तो पर्यंत तुमच्या नावावर जमीन होऊ शकणार नाही . त्यानंतर ते kadnyasati भरपूर खेपा घातल्या परंतु योग्य margadarshan milal nahi. vadlana 5 varshyapurvi lakava marlyamule te gavi jau shakale nahi aani aamhala gavchya ya gosti badal jast mahiti naslyamule aamhi chokashi karunahi aamhala pan tech uttar milal je vadlana milal.

Tyamadhe jamin malak mahnto ti jamin tumhi tumchya navavar kara mi tumachya kharedi khatavar sahi karto. Pan khardi khat karnyasathi aadhi 7/12 navavar karayala lagato. Tyamadhe to kahihi madat karnar nahi ase mahnato.

Tyamule mazi aapnas vinatee aahe ka aapan mala yavar kahitari todga sangava jene karun yevadya varshya pasun pending aslel kam purn hoiel aani ti jamin aamchya navavar hoiel.

Applyala aankhi mahiti havi aslyas tase sangave.
खरेदी केलेली जमीन , भातशेती / बागायत / जिरायत या कोणत्या सदराखाली येते ?
७/१२ वरील पिक पाहणी पाहून सांगा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
12-06-2015
aaryatandel82@gmail.com

सर
सर्वे ४५ हिस्सा २ चे १९३२ साली २ ए ११गु व खराब ३ गु आहे त्यातील १ए भात व १एक ११गु केली . १९५६ साली आकार्फोड झाल्याचा उलेख ७/१२ वर आहे परंतु आज ७/१२ वरील क्षेत्र ९३.८ गु व खराब ३ गु आहे परंतु आकारबंद मात्र ५२.२ गु व खराब ३ गु आहे सदर जमिनीचा नकाशा ५२.२ गु असून गाव नकाशात सदर जमिनीच्या बाजूला असलेले क्षेत्रास कोणताही सर्वे नंबर नाही तेव्हा माझा प्रश्न आहे कि ७/१२ वरील क्षेत्र व आकार बंद यातील कोणते क्षेत्र ग्राह्य धरावे
जमिनीचे वाटप झाले असून ७/१२ प्रमाणे जमिनी ताब्यात नसून, एक गटाच्या लागवडीच्या जमिनी ताब्यात आहेत व वर्कसाची वाटणी झालेली नाही फक्त ताब्यात आहे, सर्व जमिनीचे ताब्या प्रमाणे ७/१२ बनवायचे असल्यास काय करता येईल? स्टम्प डूटी, रजिस्ट्रशेन लागू होईल का? जमीन वडलोपर्जित आहे , हक्कासोड पत्रक केल्यास चालू शकेल का त्यास काय खर्च येतो?
नमस्‍कार सर
पतीच्‍या नावाने 4 एकर व पत्‍नीच्‍या नावाने 4 एकर जमीन असल्‍यास पती (अर्जदार) यांना अप्‍लभूधारक प्रमाणपत्र देता येईल का ?
नवीन भू संपादन कायद्यानुसार
१. अल्पभूधारक - ज्याचे नावे / कुटुंबाचे नावे, जिरायत ५ एकर जिरायत अथवा २.५एकर बागायत आहे
२ . अत्यल्पभूधारक म्हणजे - ज्याचे/ कुटुंबाचे नावे १.२५ एकर बागायत शेती अथवा २.५ एकर शेती जिरायत आहे

शेती स्वरूपावरून ठरवा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
12-06-2015
aaryatandel82@gmail.com

सर
एखाद्या जमिनीस १९३२ साला पासून फळ पिक घेत असल्यास सदर जमिनीस कुल १९५७ सालापासून कुल नोड असल्यास आता जमीन मालक कुल कमी करण्यासाठी अर्ज करू शकतो काय
कलम ३१ खाली , ( कलम ३१ अ ला अधीन ) स्वत कसण्यासाठी अथवा बिन शेती साठी , मालक अर्ज करू शकतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आईच्या वडलोंपर्जी जमीन आहे. माझ्याआईच्या हिस्सेची जमीन विकने आहे पन बाकीचे ४ जनांसोबत वाद आहेत तर मी आमच्या हिस्सेची जमीन विकू शकतोका ? आणि ते सुधा विकू शकतील का त्यानच्या हिस्सेची कारन आमचे वाद आहे तर त्यांच्या शीवाय कशी विकु शकतो आमच्या हिस्सेची जमीन ?
बाकीचे ४ लोक कोण आहेत ?
वादाचे स्वरू काय आहे
वाद न्यायालयात प्रलंबित आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांनी १९८३ ला खोपोली येथे घर बांधणी साठी जागा विकत घेतली.आणि १९८६ ला घर बांधून पूर्ण झाले.ते अडाणी होते त्यांना माहित नव्हते कि ती जागा ग्रीन झोन मध्ये येते.तर आता आम्ही अलिबागला सदर केस हरलो.कारण आमच्या वकिलांनी आम्हाला फसवल.ते केस ला हजारच झाले नाहीत आणि आम्हालाही काही हजार राहायला सांगितले नाही.पण आमची केस आता मुंबईला कोकण आयुक्तांकडे चालू आहे.तसेच सदर व्यक्तीने हायकोर्ट मध्ये नगरपालिके विरुद्ध केस लावली व तो ती केस जिंकला आहे.पण नगरपालिकेने आमच्या घराविरुद्ध नो ओबजेक्षण घेतले आहे.तर सदर बाबतीत मला मार्गदर्शन करावे.व ग्रीन झोन विषयी माहिती द्यावी हि विनंती.
हरित क्षेत्रात , घर बाधले म्हणून , अलिबाग येथे कोणत्या न्यायालयात दावा चालू होता ?

सदर व्यक्ती कोण ? त्याने नगरपालिके विरुद्ध दावा दाखल करण्याचे कारण काय ?

विस्तृतप्रश्न मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या गावांमध्ये मा .जिल्हाधिकारी सॊ .यांनी सन १९८१ मध्ये गावठाण विस्तार योजने अंतर्गत प्लॉट पाडून कबजेपट्टी करुन दिली आहें .
सदर योजनेमधील काही प्लॉट शिल्लक आहेत. सदर प्लॉट घेणेसाठी काय करावे लागेल. या विषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आपण प्रांत अधिकारी यांचे अर्ज करा
आपणास , भू खंडाची कब्जे हक्काची रक्कम भरावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
आमच्या गावांमध्ये मा .जिल्हाधिकारी सॊ .यांनी सन १९८१ मध्ये गावठाण विस्तार योजने अंतर्गत प्लॉट पाडून कबजेपट्टी करुन दिली आहें .
सदर योजनेमधील काही प्लॉट शिल्लक आहेत. सदर प्लॉट घेणेसाठी काय करावे लागेल. या विषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
प्रांताधिकारी यांचे कडे अर्ज करा
प्लॉट ची बाजार मुल्य किंमत भरावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांनी 1987ला 42गुंठे जमिनी खरेदी केली होती. त्यात21 गुंठे बागायत व 21गुंठे खराबा.परंतु आताच्या 7/12 मध्ये फक्त 21गुंठे येते.21गुंठे खराबा नोंद नाही.त्या नोंदी साठी काय करावे लागले?
पूर्वीचे फेरफार पहा
जमीन घेतानाचा , ७/१२ आपले संग्रही असल्यास तपासून पहा

आपण कथन केल्याप्रमाणे वस्तू स्थिती असेल तर जुन्या फेरफारावरून , कमी झालेले क्षेत्र तफावत दिसून येयील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांनी आजोबांच्या नावावरील जमीन
१९५५ साली विकली. नंतर १९६० साली दुसरी जमीन घेतली . तर १९६० साली घेतलेली जमीन
स्वकस्तर्जित आहे की वडिलोपार्जित ?
स्वकस्तर्जित व वडिलोपार्जित म्हणजे काय सविस्तर उत्तर द्या plz.
आपले प्रश्नात उत्तर आहे .
स्वकष्टार्जित म्हणजे , स्वताचे पैस्याने , स्वतासाठी खरेदी केलेली जमीन
मात्र आपले वडिला shivay , आजोबांना अन्य वारस कोण होते / आहेत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी या अगोदर प्रश्न विचारला आहे कि माझे पती यांना वडील नसल्या कारणाने वारसा हक्काने जमीन मिळाल होती सदर जमिनीमध्ये त्यांच्या बहिणीची वारस म्हणून नवे नाहीत व जमीन विकली आहे मंझे त्यांच्या चुलत भावाने ती फशवून घेतली आहे व त्यामध्ये बहिणी यांच्या सह्या नाहीत तर त्यामध्ये बहिणीच्या सह्या लागतील का आणि त्या हक्क मागू शक्ताल का कृपा करून सर मला याचवर उपाय सांगा माझ्या अगोधारच्या प्रश्नाची उत्तर दिले मी आपली आभारी आहे
नमस्कार सर
मी एका सहकारी पतपेढी मध्ये नोकरीस आहे. आमच्या संस्थेत तारणी कर्ज वितरित करीत असतात त्या कर्जासाठी तारण मुल्याकन कर्ज रकमेच्या दुप्पट असणे आवश्यक असते. त्यामध्ये मुख्य तारण महणून बांधीव अथवा एन अ प्लॉट कि ज्याचे मुल्याकन कर्ज रक्कम इतके असावे व उर्वरित तारण शेतजमीन असावी अशी कार्यप्रणाली आहे. परुंतु ग्रामीण भागामध्ये मुख्य तारण बांधीव अथवा प्लॉट याचे मुल्याकन कर्ज रक्कम इतके मिळत नाही परंतु शेतजमिनीचे मुल्याकन मिळते. त्यामुळे सहकारी पतसंस्था यांना तारणी कर्जासाठी फक्त शेतजमीन तारण घेता येतील का व भविष्यात सदर कर्ज थकित घेल्यास कर्ज वसुली करिता काही अडचणी निर्माण होतील का व पतसंस्था यांना शेतजमीन तारण घेनेस जिल्लाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे का याबाबत कृपया याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती
जी जमीन तारण म्हणून दिलेली असेल व ती शाश्नाने कर्जदारास दिलेली नसेल तर , जिल्हाधिकारी यांचे परवानगीची गरज नाही
मात्र तारणम्हणूनदिलेली जमीन जर शासनाने दिलेलीअसेल , तरत्यास जिल्हाधिकारी/ आयुक्त/ शासन यांची पूर्व परवानगी लागेल
शासनाकडून , माजी सैनिक , स्वातंत्र सैनिकयांना वइतर यांना शेती करण्यासाठी , गृह बांधकामासाठी जागा दिली जाते . अशी जागा तारण, गहन ठेवण्य पूर्वी परवानगीघेणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.44 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3