जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by D LANDAGE
10-04-2025
dvlandage@gmail.com
नमस्कार सर
माझ्या आजोबांनी 1948 साली 10 एकर जमीन खरेदी केली खरेदी खतामध्ये विहिरीचा पण उल्लेख केला.त्यानंतर वडिलांनी माझ्या मोठ्या भावाला 5 एकर आणि मला 5 एकर जमीन वाटणी करून दिली. पण वाटणी पत्रात विहिरीचा उल्लेख केला नाही.विहीर ही आम्हा दोघांच्या मधील बांधावर आहे.त्यानंतर मी 5 एकर पैकी 3 एकर क्षेत्र विकले आणि विहीर विकलेल्या क्षेत्रात गेली पण मी त्याला विहिरी मध्ये हिस्सा लिहून दिला नाही.पण
आता मला माझा भाऊ आणि विकलेल्या जमिनीचा मालक विहिरीतले पाणी वापरू देत नाही.तर मी आता काय करावे...
आपणास दोघेही विरोध करू शकत नाही . आपण माम्लेतदार कोर्ट अधिनियमाच्या कलम ५ (१) ( ब) खाली दावा तहसीलदार यांचेकडे करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jayesh Nair
04-04-2025
jayeshkumarnair29@gmail.com
नमस्कार सर, आम्ही सरकारी मोजणी केली असता त्यामध्ये असे समजले कि लगतच्या शेतकऱ्याने आमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण काढून आमच्या जमिनीचा ताबा कसा मिळवावा याबाबत मार्गदर्शन करावे, ही विनंती.
आपण आपल्या मिळकतीची मोजणी केलेली आहे . त्यानुसार असे दिसून आले आहे कि, शेजार्याने आपल्या मिळकतीत अतिक्रमण केले आहे. आपण, मा. जिल्हाधिकारी यांचेकडे, महसूल संहितेच्या कलम १३८(२) अन्वये अर्ज करावा. जिल्हाधिकारी चौकशी करून अश्या अतिक्रमनदारास संक्षिप्तरित्या काढून टाकतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Swaraj
27-03-2025
sagarkandekar@hotmail.com
नवीन शर्त जमीन चे नोंदणीकृत बिन कब्जाचे साठेखत करून जमीन किमित हि २० लाख ठरली त्यापैकी १४ लाख आम्ही विकणाऱ्याला चेक द्वारे आम्ही साठेखताच्या दिवशी दिली मात्र त्याने सदर चेक लोकल सहकारी बँक मध्ये क्लिअर केला जी बँक राष्ट्रीयकृत नाही आहे.सदर साठेखता नंतर आम्हाला ३ महिन्यांनी जिलाधिकारी याची खरेदी साठी ऑर्डर दिली मात्र त्यात त्यांनी असे नमूद केली आहे की विकणाऱ्याचा राष्ट्रीयकृत खात्या वर च पैसे जमा झाल्याचे प्रमाणपत्र जोडून च सब रजिस्टर ने दस्त नोंदवावा मात्र सब रजिस्टर दस्त नोंदवत नाही आहे कारण पैसे राष्ट्रियकृत बँक मध्ये पैसे जमा नाही केला. कृपया मार्गदर्शन करावे.
सदर जमीन विकणारा व्यक्ती आत्ता आम्हाला दिलेले पैसे परत नाही देवू शकता.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आपण खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत जमा केली की सहकारी बँकेत जमा केली हे तपासण्याचा अधिकार सहनिबंधक यांना नाही. भारतीय नोंदणी कायदा 1908 च्या कलम 35 अन्वये, जर विक्रेता मयत असेल, दस्त निष्पादित केल्याचा तो नाकारत असेल तरच केवळ सहनिबंधक दस्ताची नोंदणी करणे नाकारू शकतात. अन्य कारणासाठी दुय्यम निबंधक दस्त नोंदणी नाकारू शकत नाहीत. दुय्यम निबंधक यांना दस्त नोंदणी नाकारल्याबाबतचे पत्र देणे बाबत सांगा. जर दुय्यम निबंधक दस्त नोंदणी नाकारल्या बाबतचे पत्रही देत नाही व दस्त ही नोंदवत नाहीत तर आपण, नोंदणी महानिरीक्षक यांच्या संकेतस्थळावर तक्रार दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jagadevi
27-03-2025
jagadevi6758@gmail.com
वर्ग 2 शेतजमीनवर (खिदमत ईनाम) मयत वडीलांचे नाव आहे. सदर जमीनीवर वारसाचे नाव लावण्यासाठी तहसीलदार यांना अर्ज केला होता त्यानंतर 2021 मध्ये तलाठी यांनी वारसाचे नाव 7/12 ला लावले. तदनंतर आमच्या बहिणीनी हक्क सोडून पत्र दिले त्याची नोंद घेण्यासाठी फेरफार तलाठी यांनी तयार केला. परंतु नंतर काही दिवसांनी अचानक तलाठी यांनी पूर्वी वारसाचा घेतलेला फेरफार रद्द करून परत मयत वडिलांचे नाव 7/12 वर आणले. व आम्हाला तूमच्या कडे विरासत आहे असे विचारले व ती आणा असे म्हटले. मुळात तहसीलदार यांनी आम्ही कागदपत्रे सोबत दिलेला अर्ज नीट न वाचता तलाठी यांना दिला व तलाठी यांनी फेरफार घेतला व मंडळ अधिकारी यांनी मंजूर केला व नंतर फेरफार रद्द केला. हे सर्व अनाकलनीय आहे. आपणास विनंती करण्यात येते कि विरासत काय असते व ती कशाप्रकारे मिळवावी लागते. जमीन मौजे वझुर ता. पुर्णा जि. परभणी सर्व्हे न. 387
एकदा फेरफार मंजूर झाल्यानंतर तलाठी काय किंवा मंडळ अधिकारी काय यांना तो रद्द करता येत नाही. केवळ आणि केवळ उपविभागीय अधिकारी यांना मंजूर फेरफार रद्द करण्याचा अधिकार आहे. याबाबत आपण आपल्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे महसूल संहितेच्या कलम २४७ अन्वये अपील दाखल करा.
विरासत म्हणजे , वारसा -हक्क होय .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pravin Halkare
26-03-2025
pravinhalkare@gmail.com
अपर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या रिव्हिजन (पुर्ननिरिक्षण) निकालास पूर्नविलोकनात ते स्वतः दिलेल्या आदेशाला अंतरिम स्थगिती देऊ शकतात का? त्यासाठी त्यांना राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते का? याबाबत कृपया खुलासा करावा.
महसूल संहितेच्या कलम२५६ अन्वय ज्या महसूल अधिकाऱ्याने कोणताही आदेश दिला असेल त्या अधिकाऱ्यास किंवा त्या पदावर येणाऱ्या उत्तराधिकाऱ्यास अपिलासाठी विहित करण्यात आलेल्या मुदतीच्या आत कोणत्याही वेळी, त्यास योग्य वाटेल त्या मुदतीपर्यंत, अशा आदेशाची अंमलबजावणी स्थगित करण्याबद्दल निर्देश देता येतात. मात्र मुक्त आदेशाविरुद्ध कोणतीही अपील केलेले असता कामा नये.
तसेच महसूल संहितेच्या कलम२५६ (३) अन्वय, पुनरिक्षण करणाऱ्या धिकारांचा वापर करणाऱ्या प्राधिकार्यास, यथास्थिती पुनरिक्षण करण्यात येणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी त्याला योग्य वाटेल अशा मुदतीपर्यंत स्थगिती करण्याबाबत निर्देश देता येऊ शकतात.
त्यामुळे आपल्या प्रकरणांमध्ये अप्पर आयुक्तांचे आदेश योग्य आहेत . त्यासाठी शासन परवानगीची आवश्यकता नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by navanath
26-03-2025
navanathpatil23@yahoo.com
महार वतन जमिनीचा कलेक्टर ची परवानगी घेतली नाही म्हणून शर्ट भंग झाला आहे पण त्या जागी आम्हाला तहसीलदार यांनी सादर गटाला परवानगीची आवश्यकता नाही म्हणून पत्र दिले आहे त्याआधारे आम्ही खरेदी केली आहे तर आता काय करू शकतो
Question by D LANDAGE
23-03-2025
dvlandage@gmail.com
नमस्कार सर
मी मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील म.ज.म.अ.1966 कलम 247 अन्वये उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय कडे केले असून मला 6 महिन्याचा विलंब झाला होता.
तर मी अपील मेमो मध्येच विलंबाचे कारण नमूद केले आहे.वेगळा विलंब माफीचा अर्ज दिला नाही. उपविभागीय अधिकारी यांनी माझा विलंब माफ केला प्रकरण चालू असूनही प्रतिवादी यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले की मी विलंब माफीचा वेगळा अर्ज दिला नाही म्हणून तर आता मी काय करावे.
आपणास झालेल्या विलंबाचे सबल कारण अप्पर जिल्हाधिकारी यांना द्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोशनसिंह ठाकूर
23-03-2025
rtgranthi@gmail.com
एक देवस्थान इनाम ची जमीन कालव्याच्या कामासाठी भुसंपादीत झालेली असुन निवाडयासोबतच्या ई स्टेटमेंट मध्ये सदर देवस्थान नाव टाकून नोंद आहे.
अधिकार अभिलेख 7/12 वर वर्ग 2 असा जमिनीचा उल्लेख आहे. 7/12 च्या मुख्य रकान्यात *** देवस्थान असा उल्लेख आहे. तर इतर अधिकार मध्ये अर्चक म्हणून ******* व्यक्तीचे असे नाव आहे. सदरील देवस्थान बाबत अधिक्षक, न्यास नोंदणी कार्यालय धर्मादाय यांचे कार्यालयास नोंद असले बाबत विचारणा केली असता सदरील देवस्थानाची नोंद त्यांचे कार्यालयाच्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये नोंद नसले बाबत माहिती या कार्यालयास दिलेली आहे.
अर्जदार यांनी उपजिल्हाधिकारी (अतियात) ***** यांचेकडील 1972 ची अतियात ची प्रत जोडलेली आहे परंतू त्यावर उपजिल्हाधिकारी (अतियात) यांची स्वाक्षरी दिसुन येत नाही.
सदरील भोगवटदार वर्ग 2 ची जमीन देवस्थान इनाम असल्याचे 7/12 वरुन दिसुन येते अशा परिस्थितीत उपरोक्त अर्जदाराकडून भूसंपादन झालेल्या जमीनीचा मावेजा वाटप करणे बाबत विनंती जात आहे.
अशा परिस्थितीत
1. अधिक्षक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी न झालेली 7/12 व ई स्टेटमेंट मध्ये **** देवस्थान असा उल्लेख असल्यामुळे सदरील मावेजा रक्कम अर्चक ***** यांना दिली जाऊ शकते काय ?
2. दिली जाऊ शकत असेल तर त्याबाबतचे शासन निर्णय किंवा देवस्थान इनाम जमीनीच्या कायद्यातील तरतूदी काय ?
3. मावेजा वाटप केला जाऊ शकत असेल तर अर्चकास मावेजा किती देण्यात येऊ शकतो व शासनास किती जमा करण्यात येऊ शकतो.
याबाबत अद्ययावत तरतूदीसह माहिती देण्यात यावी हि विनंती.
आपण आपल्या प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे संपादित झालेली जमीन ही देवस्थान इनाम जमीन आहे. जे देवस्थान आहे ते भोगवतादार सदरी आहे व इतर हक्कात आर्चक म्हणजे पुजारी यांचे नाव आहे. वास्तविक पुजारी हे केवळ त्या मंदिराची देखभाल करतात. इतर हक्कात नाव आहे म्हणून त्यांना कोणताही मिळकतीमध्ये हक्क अधिकार अथवा हितसंबंध नाही. मावेजाची पूर्ण रक्कम जे देवस्थान न्यास म्हणून नोंदणी कृत केलेले आहे त्या न्यासाच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक. पुजारी यांना कोणतीही रक्कम देता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रसिक संघवी
21-03-2025
sanghvirasik@gmail.com
शेजारी माझ्या जागेला कंपाउंड करून देत नाही काय करावे
तुमच्यात आणि शेजारी यांचे दरम्यान सीमा-हद्दी बाबत वाद आहे का ? जो पर्यंत सीमा-हद्द सोडवला जात नाही तो पर्यंत शेजारी जागेला कुंपण करू देणार नाही . शेजारी कुंपण बांधून देत नाही त्याला प्रशासकीय स्तरावर कोणताही उपाय नाही . आपणाला दिवाणी न्यायालयात जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar
21-03-2025
sagarkandekar@hotmail.com
नवीन शर्त जमिंनीची विक्रीची जिल्हाधिकारी परवानगी मिळाली असून ३१ मार्च पर्यंत खरेदी करा असे आदेश मध्ये नमूद आहे मात्र जेव्हा सब रजस्टर कडे गेलो तेव्हा खरेदी खत नोंदणी साठी गेलो तेव्हा ते बोलले सदर गट आपणास ओपन करावा लागेल Data एन्ट्री साठी.त्यासाठी परत तहसीलदार अर्ज दिला आहे मात्र ७ दिवस जावून न ही गट ओपन झाला नाही तर ३१ मार्च पर्यंत गट ओपन झाला नाही तर आदेश मुदत वाढवून मिळेल का? तसेच गट बंद करण्याचे कारण काय?
कदाचित आपली नोंदणी झाली असेल . मात्र तरीही आपणास उत्तर देतो . गट ओपन झाला नाही तर आपली चूक नाही . ३१ मार्च नंतर झाला असेल तरीही , दुय्यम निबंधक यांनी नोंदणी करणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sandip nathaji patil
21-03-2025
sandippatil5981@gmail.com
मी 24 R जमिनीचे क्षेञ खरेदी करून 3 महिने झाले ,तरी farmar id बनवतांना जुने नांवे येत आहेत.नवीन खरेदी केलेले नाव show करत नाही,त्याकारणाने farmar id मिळत नाही.तरी काय करावे.
या मध्ये ऑक्टोबर २०२४ नंतरचा data उपलब्ध झालेला नाही . थोड्याच अवधीत EDIT Option दिल्यावर होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुधीर महाजन
19-03-2025
sudhirmmahajan@gmail.com
सर, माझ्याकडे एकूण शेतजमीन ०.६५ आर आहे, माझ्या शेतातून शेतमागील शेतकऱ्यांना गाळ रस्ता गेलेला आहे, त्यामुळे मला ०.५४ आर जमीन कसावयास मिळते, असे असतांना माझ्या शेता मागील शेतकऱ्यांनी १२ फुटी शेत रस्ता ची मागणी कलम 143 अंतर्गत मा. तहशीलदार यांचे कडे केली आहे , असे झाले तर माझे फार नुकसान होइल, व माझी कासावयाची जमीन कमी होइल. तसेच शेत रस्ता मागणी करणारे शेतकरी जास्त बहु भू धारक आहेत, कृपया माग्रदर्शन करावे.
जिल्हाधिकारी यांना कलम १४३ खाली केवळ शेताच्या हद्दीवरून रस्ता देण्याचा अधिकार आहे . सर्च रस्ता गाडी जाईल एवढा असू शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कवडू दौलत गेडाम
18-03-2025
kdgedam721@gmail.com
माझे आजोबा सदाशिव यांची शेतजमीन मक्त्याने कसत होते सदाशिवच्या शेतजमिनीला माझ्या आजोबांच्या नावाने १९५७ ला कूळ लागले पण सदाशिव हा अज्ञान अ.पा.क. होता तर आजरोजी माझ्या माझ्या आजोबांना ती शेतजमीन मिळेल काय.
अपाक हा सज्ञान झाल्यापासून एक वर्षाच्या आत कुळाच्या नावे किंमत ठरवणे आवश्यक होते.१९५७ साली असलेला कुळ जो अज्ञान होता तो सज्ञान केव्हाच झाला असेल. त्यामुळे या मिळकतीची किंमत निश्चित होऊ शकत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad Akhtar
13-03-2025
sayyedakhtar53130@gmail.com
भोगवटदार वर्ग -2 ची जमीन वर्ग -1 मध्ये रूपांतरित करायची असेल तर शासनाला नजराणा किती टक्के भरावे लागतील.
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
या संकेत स्थळावर ते सबंधित नियम मिळतील . त्या नवीन नियमांचे अवलोकन केल्यास आपणास नाझ्राना रक्कम किती भरावी लागेल याचे उत्तर मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad Akhtar
12-03-2025
sayyedakhtar53130@gmail.com
सर, माझा प्रश्न असा आहे
ग्रामीण भागातील 43 आर yellow zone जमीनीचे एन. ए. लेआऊट करायची असेल तर ओपन स्पेस ,रोड किती फुटाचे सोडावे लागतील. किंवा ओपन स्पेस नाही सोडले तर चालेल का? 33 फूट,30 फूट,20 फूट चे रोड टाकलेत तर चालेल का? व एन.ए.लेआऊट साठी कोठे अर्ज करावे लागेल.कृपया सर मागदर्शन करावे.
सदरचा प्रश्न हा बांधकाम नियंत्रण नियमावलीशी निगडित आहे. त्यामुळे आपण एखाद्या वास्तुविशारदाला विचारून माहिती घ्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ashwin kamble
11-03-2025
ashwin.kamble2011@gmail.com
प्रश्न_ सर माझा प्रश्न असा आहे.की 7/12 वर पणजोबांचे नावे स कुळ म्हणुन नोंद ईतर हक्का मध्ये आहे जमिन माझ्या वडीलांच्या नावावर होती ती जमीन माझ्या वडीलांनी विकली आहे जमीन विकताणी खरेदीखतावर घरातील एकही व्यक्ती साक्षीदार नाही ती जमिन मी परत घेउ शकतो का ?
Question by कवडू दौलत गेडाम
08-03-2025
kdgedam721@gmail.com
सदाशिव यांची शेतजमीन माझे आजोबा मक्त्याने कसत होते. माझ्या आजोबा सन 1957 ला कूळ लागले पण सदाशिव अज्ञान ( अ.पा.क.) होते. आजरोजी ती शेतजमीन माझ्या आजोबांना मिळेल काय.
Question by पंकज कागणे
06-03-2025
pankajkagane@gmail.com
महसूल विभागातील सहाय्यक महसुल अधिकारी पदाची जेष्ठता विभाग स्तरावर असते त्यांच्या बदल्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात होतात बदली जिल्हाधिकारी साहेब करतात हे योग्य आहे का पुरवठा निरीक्षक यांची बदली कोण करतात व जेष्ठता कोणत्या स्तरावर असते या संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by Sourabh Kesti
06-03-2025
rocckkey.sourabh@gmail.com
मला एक GR हवा होता
दगडाने तयार झालेल्या वस्तूचे (बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू) ट्रांसपोर्टेशन करत असणाऱ्या ट्रक वर दंड आकारता येणार नाही
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
या संकेत स्थळाला भेट द्या . आपणाला आवश्यक शासन निर्णय मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jagdish Dhangar
04-03-2025
jagdishdhangar8531@gmail.com
Maza kishan kard nighat nahi aahe
Question by कवडू दौलत गेडाम
27-02-2025
kdgedam721@gmail.com
नमस्कार सर, माझ्या आजोबांना सन 1957 ला कुळ लागले होते पण इतर शे-यात अ.पा.क. असे होते ती शेत जमीन आज रोजी आम्हाला मिळेल काय.
आपल्या आजोबांच्या मालमत्तेला कृषक दिनी अथवा त्यापूर्वी कुल म्हणून एखाद्या व्यक्तीचे नाव असेल व अशी व्यक्ती अ.पा.क. . असेल तर अशी व्यक्ती कृषक दिनी हि मालक झाली आहे . कलम ३२ फ (१) (अ ) नुसार कुल अज्ञान आहे त्याला किंमत ठरवण्यासाठी मुदतीचे बंधन नाही . आपणाला अशी मालमत्ता परत मिळू शकणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आयुब रमजान शेख
26-02-2025
mohammadayubshaikh413@gmail.com
शेतजमीनीचा बांध फोडणेबाबत कुठल्या नियमावली नुसार कारवाई होते
शेतजमिनीच्या बांधाबाबत/ हद्दी बाबत , वाद असेल तर जिल्हाधिकारी / भूमापन अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याच्या प्रकरण 9 नुसार बांधाबाबत कलम १३४ अन्वये अधिकार आभिलेखानुसार हद्द निच्छित होणे आवश्यक आहे . हद्दी निच्छित होऊनही जर शेजारी धारकाने जर बांध फोडला तर , जिल्हाधिकारी महसूल संहितेच्या कलम , १३८ अन्वये कारवाई करू शकतात . तसेच आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता . कायदा- विशिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ अंतर्गत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil tathe
23-02-2025
suniltathe1020@gmail.com
नमस्कार सर
मी छत्रपती संभाजीनगर हून बोलतोय
माझ्या आजोबांच्या नावे 1984 मध्ये पाझर तलावात 19 r जमीन संपादित झाली आहे तर मला प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र मिळेल का?
Question by Ankush Nandwalkar
22-02-2025
nandwalkar10@gmail.com
सर मला दिनांक 4 किंवा 5/02/25 la मंत्रिमंडळात वन व जमीन महसूल विभागाचा भोगवटादार 2 मधून भोगवटादार 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी नजराणा रक्कम 5% असणार आहे. याचा मंजूर GR मेळावा धन्यवाद
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
या संकेत् स्थळाला भेट द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jagadevi
20-02-2025
jagadevi6758@gmail.com
अपर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या रिव्हिजन (पुर्ननिरिक्षण) निकालाच्या अमंलबजावणी आदेशाची फेरफार नोंद घेताना सदर नोंदवर हरकत साठी 15 दिवसांचा कालावधी तलाठी ठेवू शकतात का? जर प्रतिवादीनी पुढे अपिलच केली नसल्यास / अपिल कालावधी संपल्यावर आदेशाची नोंद (आदेशाने दुरुस्ती या फेरफार प्रकारे) एका दिवसात घेता येते का? नसेल तर का नाही?
तसेच, वरील नोंद घेण्यासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागते असे तलाठी म्हणत आहेत, खरच परवानगी घ्यावी लागते का? फेरफार नोंद होण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे
संबप्पा सो. बाबप्पा टेळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य , या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 (MLRC) च्या कलम 257 अंतर्गत , उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे या कलमांतर्गत घेतलेल्या निर्णयांची अंतिमता अधोरेखित होते.
कलम 257 अंतर्गत विभागीय आयुक्ताने दिलेला निर्णय राज्य सरकार जो पर्यंत स्थगित करत नाही तोपर्यंत तो अंमलात राहतो. जर कोणत्याही पक्षाला असा निर्णय आव्हान द्यायचा असेल, तर त्यांना त्वरित संबंधित प्राधिकरणाकडे स्थगिती आदेश (stay order) किंवा पुनरावलोकनासाठी (revision) अर्ज करावा लागेल. अन्यथा, तो निर्णय अंमलबजावणीस पात्र राहतो आणि लागू केला जातो.त्यासाठी १५ दिवस वाट पाहणे आवश्यक नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3316 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
राजेश जे वझीरे | 10 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
MCS Officer | 3 |