जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Devendra Tak
08-01-2026
devendratak123@gmail.com
नियमात असलेले दस्तावेजा आधारे रीतसर मोजणी फीस भरून गुंठेवारी मोजणी झाल्यानंतर लागतधारक याने दिवाणी दावा दाखल केल्यास प्रकरण न्याय प्रविष्ट सबब कारण सांगून परंतु मा. न्यायालयाचा कोणताही मनाई हुकुम अथवा Satausquo आदेश नसेल तर क प्रत अडविण्याचा अधिकार भूमिअभिलेख यांना आहे का ? नसेल तर त्या संधार्बात असलेले शासन आदेश अथवा परिपत्रक यांची प्रत देण्यात यावी .
Question by Pankaj shinde
03-01-2026
pankajsh765sh@yahoo.com
मी सरकारी नोकरीत आहे.मी विवाहीत आहे. माझ्या नावावर कोणतीच शेतजमीन नाही. माझ्या जन्माअगोदर आजोबांनी वाटणी केल्याने माझ्या वडिलांच्या नावावर त्यांची स्वकष्टार्जित शेतजमीन आहे. माझा असा प्रश्न आहे की मला शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला भेटू शकतो का ? ( वडिलांच्या संयुक्त कुटुंबाचा सदस्य दाखवून ) जमिन फक्त वडिलांच्या नावावर आहे,संयुक्त कुटुंबाच्या नाही.
मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
Question by Kiran deshmukh
01-01-2026
kirande85yk@yahoo.com
नमस्कार साहेब माझा असा प्रश्न आहे की
1] जर आजोबांना ते ह्यात असताना मुलगा आणि नातू दोन्ही आहेत. आजोबांची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि त्यांनी कोणतेही मृत्युपत्र न करता वारले असतील तर हिंदू वारस कायद्यानुसार 7 12 वर मुलाचे नाव येते तेव्हाच आजोबा वारल्यानंतर वडिलांच्या बरोबर नातूचा हक्क तयार होतो काय ?
2] नातू याचा हक्क प्रस्थापित होण्यासाठी आजोबांकडे असलेली मालमत्ता ही वडिलाजिॅत किंवा वडिलोपार्जित असावी लागते ?
अलीकडे मुंबई highcourt नागपूर बेंच ने रोहित जोशी judge यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by Kiran yadav
01-01-2026
kiranyada9asl@yahoo.com
नमस्ते panbude साहेब, माझा असा प्रश्न आहे की 1] महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियमातील ' संयुक्त कुटुंब ' ( अविभक्त हिंदू कुटुंब)या संज्ञेचा नेमका अर्थ काय आहे ?
2] संयुक्त कुटुंब अस्तित्वात आहे हे दाखवण्याचे कोणते कोणते कायदेशीर पुरावे आहेत ?
3] वडिलांचे संयुक्त कुटुंब आणि त्यांच्या विवाहीत मुलाचे संयुक्त कुटुंब एकच असते की वेगवेगळे असते ? आणि जर दोन्हींचे संयुक्त कुटुंब वेगळे असेल तर त्यासाठी कोणती कारणे कारणीभूत असतात ?
Question by Dilawer Vajir Shaikh
31-12-2025
dhelklwadi@gmail.com
गाव नकाशा वरील शेत रस्ता अतिक्रमण काढण्याबाबत जीआर
Question by Kiran Shinde
25-12-2025
kiranshi9al@yahoo.com
साहेब , माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांच्या शेतजमीन वर्ग 2 शेतजमिनीवर महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे कर्ज काढले होते. कर्ज काढल्यानंतर सातबारावरील भोगवटादाराचे नाव असा जो option असतो त्या खाली वडिलांच्या नावाला [ ] असा चौकोन करुन त्या खाली महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे नाव लिहले. व वडिलांचे नाव व कर्ज माहिती इतर हक्कात लिहले होते. भोगवटादार नावामध्ये बॅक नाव लिहणे हे कधी कायदेशीर आहे का होते का ? असे केल्याने त्या काळात वडिलांच्या आणि वारसांमध्ये मालकी हक्कात काही फरक पडला असेल का ?
Question by Bhagyashri Devidas Kumbhalkar
25-12-2025
bhagyashrikum@gmail.com
7/12 वर दुकानाच्या नोंदी दुकान क्रमांक टाकून घेता येते का
Question by Kiran Shinde
25-12-2025
kiranshi9al@yahoo.com
साहेब , माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांच्या शेतजमीन वर्ग 2 शेतजमिनीवर महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे कर्ज काढले होते. कर्ज काढल्यानंतर सातबारावरील भोगवटादाराचे नाव असा जो option असतो त्या खाली वडिलांच्या नावाला [ ] असा चौकोन करुन त्या खाली महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे नाव लिहले. व वडिलांचे नाव व कर्ज माहिती इतर हक्कात लिहले होते. भोगवटादार नावामध्ये बॅक नाव लिहणे हे कधी कायदेशीर आहे का होते का ? असे केल्याने त्या काळात वडिलांच्या आणि वारसांमध्ये मालकी हक्कात काही फरक पडला असेल का ? वडिलांनी नंतर कर्ज फेडल्यानंतर भोगवटादार मध्ये वडिलांचे नाव व्यवस्थित आले. पण भोगवटादार मध्ये मालकाचे नाव [] कंसात लिहून त्याखाली बॅकचे नाव लिहणे कायदेशीर आहे का ? माझ्या माहितीनुसार बैंक चे नाव इतर हक्कात लिहायचे असते. कृपया मार्गदर्शन करावे.
Question by Eknath patil
19-12-2025
eknath.pt8l.65@gmail.com
फक्त सातबारा ला आणेवारी लावली किंवा हिस्सेवारी लावली म्हणून मिळकतीचे वाटप झाले असे कायदा मानत नाही.1] माझा प्रश्न असा आहे की आणेवारी, हिस्सेवारी आणि जमिनीचे वाटप करणे यात काय फरक आहे ? 2] समजा ' अ ' या व्यक्तीकडे स्वकष्टार्जित जमीन आहे ( वर्ग 2 ). ' अ ' या व्यक्तीला दोन मुले आणि एक नातू आहे. ' अ ' ही व्यक्ती जमिनीचे मृत्युपत्र आणि वाटणी न करता वारले त्यामूळे जमिनीवर त्यांच्या दोन मुलांची नावे लागली.माझा असा प्रश्न आहे का ' अ ' या व्यक्तीच्या जमिनीवर नातूचा हक्क वडिलोपार्जित जमिन म्हणून आहे का ? आणि ' अ ' ची मुले ही ' अ ' च्या नातूची परवानगीशिवाय जमिन विकू शकतात का ? आणि ' अ ' च्या मुलांनी वाटप करायचे ठरवल्यास 'अ' यांच्या नातूला जमिन हक्क भेटल का ? [ 'अ' यांचे नातू समजा विवाहीत आणि जर अविवाहित असतील तर काय फरक पडेल का ?
Question by Kiran yadav
18-12-2025
kiranyada9asl@yahoo.com
माझ्या वडिलांचे वडिल म्हणजे माझे आजोबा यांच्या नावावर काही एकर भोगवटादार वर्ग 2 जमिन होती. ही जमिन आजोबांना सरकारकडून नवीन अविभाज्य शर्तीने मिळाली होती. आजोबा 25 ते 30 वर्षपूर्वी वारले आहेत. आजोबांना 2 मुले आहेत माझे वडील आणि काका दोन्ही ह्यात आहेत.आजोबा जेव्हा वारले तेव्हा त्यांना मुले आणि नातू होते. आजोबा वारल्यानंतर त्यांच्या मोठा मुलगा नाव 7/12 वर एकुमॅ म्हणून नोंद झाली. काही वर्षानी एकुमँ वगळून फक्त आजोबांचे दोन्ही मुलांचे 7/12 वर नाव लागले. माझा असा प्रश्न आहे की जेव्हा माझे आजोबा वारल्यानंतर त्यांची शेतजमीन माझे वडिलांचे नावावर झाल्यावर ती जमिन वडिलोपार्जित म्हणून माझा लगेच जमिनीवर हक्क तयार झाला होता काय ? साहेब मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
Question by Vikas sanap
18-12-2025
vikassanap1993@gmail.com
1 सर महसूल मंत्री यांनी रिव्हिजन मध्ये दिलेला निर्णय कोणत्या कलमानुसार रिव्ह्यू मध्ये चॅलेंज देऊ शकतो माहिती मिळावी
Question by अजय जयसिंग चव्हाण
17-12-2025
ajayjchavan@yahoo.com
तलाठी, मंडल अधिकारी, लिपिक एकत्रितपणे जाणीवपूर्वक चुकीची अर्धवट कार्यवाही करत आहेत. त्यामुळे ७/१२ मध्ये 2 आदेश व 3 नवीन फेरफार नोंदी होऊन 7/12 आता 2पानी झाला आहे. तरी सुद्धा प्रकरण व प्रश्न जानेवारी 2025 मध्ये होते तसेच प्रलंबित आहे. तहसीलदार दखल घेत नाही. दप्तर दिरंगाई कायदा किंवा अन्य कायदा आहे का जेणेकरून माझे प्रकरण योग्य रित्या मार्गी लागेल व संबंधितांनावर कार्यवाही होईल.
Question by vaishnavi deepak labdhe
16-12-2025
labdhe@gmail.com
mala mazya jagechi mojani karayachi ahe
Question by Gaurav shirsath
16-12-2025
gauravshirsath95@gmail.com
वारसा व्यतिरिक्त इतर व्यक्तींना बक्षीसपत्र करून दिल्यास शेतकरी पुरावा आवश्यक आहे का??
Question by Kavindra
16-12-2025
kavindrakdm@gmail.com
पोलीस पाटील यांचे भटकी टोळीचे रजिस्टर ची नमुना पाठवा
Question by Abhishek Keshav Masurkar
16-12-2025
abhishekmasurkar219@gmail.com
सर , माझा प्रश्न आहे की , आपले सरकार ( Mahaonline ) केंद्र कशाप्रकारे स्थापन करता येते व मान्यता देण्यात येईल ?
Question by Swaraj
14-12-2025
sagar06731@gmail.com
गट ४१ व ४२ ही प्रत्येकी ९६- ९६ गुंठे असून ४ खातेदारांना प्रत्येकी २४ गुंठे समान वाटप आहे.ह्या ४ खातेदारामध्ये माझी आई १ असून तिचे नावे २४ गुंठे ४१ गटात व २४ गुंठे ४२ गटात आहे तर ह्या हिस्सा चा आम्ही स्वातंत्र्य सातबारा करू शकतो का?
Question by Sagar
13-12-2025
sagar06731@gmail.com
एक गट ९४ गुंठे इतका आहे त्या पैकी आमच्या आजोबांनी १९४८ साली १/२ म्हणजे ४७ गुंठे जमीन मालक कडून रजिस्टर खरेदी केली व नंतर मार्च १९६४ साली आजोबांनी उरलेल्या ४७ गुंठे जमिनीचे जमीन मालकाकडून कब्जे चे आनोनंदिकृत साठेखत केले होते तसेच त्या काळातील एक नोंद महसूल दप्तरी नोंद अशीआहे की जमीनची (भोगवटदार वर्ग १) व्यवहारासाठी खरेदी विक्री ची परवानगी मिळणे पुर्वी जमिनीचा कब्जा घेतल्याने गट स्कीम विरूद्ध साठेखताचा बेकायदेशिर व्यवहार असा इ हक्कात दाखल ठेवला असे मे तहसीलदार यांचा कडील हुकूम आले वरून नोंद केली तसेच साठेखात नोंदविले नाही मात्र ते स्टॅम्प पेपर आहे असे नोंद आहे मात्र ही नोंद रद्द झाली आहे.
तसेच त्याच काळात जमीन मालक ह्या जून १९६४ साली मयत झाल्याने खरेदीखत होवू शकले नाही मात्र पीक पाहणी सदरी आजोबा यांचे नाव पूर्ण ९४ गुंठे वर दिसते आहे १९६४ पासून १९९४ पर्यंत .१९७० साली मुळ मालकाच्या नातू व पत्नी यांचे नाव मुख्य उताऱ्यावर आणि दोन मुलींची नावं इतर हक्कात लागली होती.१९९४ साली माझ्या वडिलांनी उर्वरित ४७ गुंठे हे मूळ जमीन मालकाच्या एकमेव नातवा कडून खरेदी केले मात्र मुळ जमीन मालकाच्या दोन मुलींची नावे इतर हक्कात राहिले तसेच आज पर्यंत सर्व जमीन वर कब्जा वडिलांचाआहे.आज मुळ मालकाच्या दोन मुली मयत असून एका मुलीच्या वारसांनी हक्कसोड करून दिले आहे मात्र दुसऱ्या एक मुलीचे वारस हक्क्सोड देत नाही आहे व खूप जास्त मोबदला मागत आहे त्याच्या ४७ गुंठ्या पैकी १/३ हिस्यासाठी.
वरील माहिती का अनुसरून
१.आजोबांनी जे १९६४ साली जे साठेखत केलं त्या आधारे वारसाची नावे कमी करू शकतो का? त्याला पुरावा म्हणून कोर्ट ग्राह्य धरेल का?
२.राहिलेल्या वारसाच्या हिस्स्याचा तुकडा पडत आहे तर आम्ही तर न्यायालय किंवा जिल्हाधिकरी यांच्या कडे खरेदी चा दावा करू शकतो का?
३.अजून काही मार्ग असेल तर सुचवावे.
Question by Shankar pawar
27-11-2025
shankarp454@yahoo.com
साहेब, 7 oct 2025 मंत्री मंडल निर्णय बैठक क्रमांक 40. तुकडे बंदी कायदा नगरपंचायत क्षेत्र मधील सर्व जमिनी साठी लागू होणार आहे असे दिसत आहे. म्हणजे याअगोदर झालेले 1 ते 13 गुंठे जिरायत शेतजमीन व्यवहार नियमित होणार आहे काय ? मार्गदर्शन करावे ही विनंती
Question by Siddhesh Kudtarkar
18-11-2025
kudtarkar.sid.siddhesh@gmail.com
तहसीलदार कार्यालयातील अभिलेखाची नक्कल प्रत पुरविताना आकारण्यात येणारी लिहिणावळ फी बाबतचा शासन निर्णय कोणता आहे, प्रतिपृष्ठ आकारण्यात येणारी फी बाबत शासन निर्णय कृपया मिळणेस विनंती आहे.
Question by अजय जयसिंग चव्हाण
13-11-2025
ajayjchavan@yahoo.com
श्री पानबुडे साहेब, धन्यवाद, माझ्या दि २८.१०.२०२५ च्या प्रश्नाबाबत आपण मला तहसीलदार यांना लेखन प्रमाद दुरुस्ती अर्ज करायला सांगितले आहे. साहेब मी तसा अर्ज केला आणि त्यांनी मला तरीही उप विभागीय अधिकारी यांना अपील करावे असे पत्र दिले आहे. अपील करणे त्रासदायक व खर्चिक आहे. आम्ही वरिष्ठ नागरिक असून हतबल झालो आहोत.
Question by Milind
09-11-2025
milind.kshirsagar94@gmail.com
नमस्कार सर,माझा प्रश्न खालील प्रमाणे
आजोबा १९८० साली वारलेत.
ते वारले तेव्हा एक जमीन त्यांनी गहाण ठेवली होती.त्यांनी
माझ्या वडिलासह तीन मुले आहेत.
ती गहाण जमीन नंतर सोडवून घेतली पण चुलत्यांनी फक्त स्वतः च नाव लावलं.वडिलांच व अजून एका चुलत्यांच नाव ते बाहेरगावी असल्याने लावलं नाही.
आजोबांच्या बाकी सर्व जमिनीवर तिघांची नावे आहेत.पण गहाण जमीन सोडवली त्यावर फक्त एकाच नाव आहे.पैसे तिघांनी दिले होते.
ती जमीन आता त्यांनी परत मुदत गहाण ठेवली आहे.
जर माझ्या वडिलांच व अजून एका चुलत्याच नाव लावायची असेल तर काय प्रोसेस असेल??
जर आता त्यावर
Question by N g dharpale
09-11-2025
navnathdharpale@gmail.com
नमस्कार सर दोन भूमापन क्रमांक आहे 115व 116 भुनकशा नुसार दोन्ही भूमापन क्रमांक मधील हादद रेषा दक्षिण उत्तर आहे व जागेवर पुर्व पछीम आहे आज पर्यंत दोन्ही भूमापन क्रमांक ची कोणतीही सरकारी मोजणी झालेली नाही गटबुकाची प्रमाणित नक्कल काढली आसता त्यामधे भुनकशा स्केल प्रमाणे आहे दोन्ही गटनंमबर त्या खाली दोन्ही गटनंबर चा कच्चा विनासकेल चा नकाशा आहे त्यावर भगवान व नारायण नावे लिहलेली आहे तो जागेवरील वहीवाटीशी जुळतो पण तो विनासकेल चा आहे सध्या आपडेट आसलेला भुनकशा 1965 साली झालेल्या सर्वे नंबर च्या वाटनीपञाचा आहे नंतर 1970ते 1971 एकत्रीकरण योजनेंतर्गत दोन्ही गटातील आरधी आरधी जमीन एकमेकांना जोडण्यात आली परंतु 1965 bhunksha तसाच ठेवून नकाशावर विनासकेल नकाशा काढण्यात आला योग मार्गदर्शन आपेकशा
.
मुल जमाबंदी / बंदोबस्त मोजणीच्या आधारे , हद्द/ सीमा निछिती करून , नवीन भूमापन नकाशा मिळणेबाबत आपण उप-अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SOHAM
01-11-2025
sohamzambre20@gmail.com
सातबारा वरील अज्ञान पालक फेर कमी करण्यासाठी काय करावे लागेल.
हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम , १९५६ नुसार - अज्ञान व्यक्तीची जमीन मा . न्यायालयाच्या परवानगीशिवाय विक्री करता येत नाही . १८ वर्ष पूर्ण झाल्यावर जन्म दाखला व अर्ज सादर करून अशी अज्ञान व्यक्तीची नोंद कमी होईल .व्यक्ती अज्ञान असेपर्यंत केवळ न्यायालयाच्या परवानगीने अश्या जमिनीची विल्हेवाट अज्ञान व्यक्तीच्या कल्याणासाठी लावता येते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhishek Keshav Masurkar
29-10-2025
abhishekmasurkar219@gmail.com
सर , माझा प्रश्न असा आहे की , उत्पन्नाचा दाखला ( Income certificate) (तहसिलदार) हे फक्त वडिलांच्याच नावाने तयार होते का ?
आपले वय १८ वर्षे पूर्ण झाले असेल व आपले काही उतपन्न असेल तर आपणालाही असा उत्पन्न दाखला मिळू शकतो . मात्र उन्नत व प्रगत गटात मोडत नाही यासाठी आपल्या वडिलांच्या उप्त्पन दाखल्याची आवश्यकता आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
