बातम्या

डिजिटल सातबाराचे प्रणेते उपजिल्हाधिकारी रामदासजी जगताप यांचा सत्कार

पुणे :
राज्यातील डिजिटल सात बाराचे प्रणेते उपजिल्हाधिकारी रामदासजी जगताप यांना महात्मा गांधी जयंती निमित्त पारनेर,शिरुर, जुन्नर,आंबेगाव व पुणे येथील रहिवासी “आम्ही पुणेकर मित्र परिवार” तर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.


पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे संपन्न झालेल्या या यशवंत सन्मान सोहळ्यात पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांचे शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी शिरुर नगरपालिका नगराध्यक्षा मनिषाताई गावडे,सौ.अनिता रामदास जगताप,सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबाजी गावडे, जितेश सरडे,संतोष चव्हाण, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे,जनता सह बैकेचे संचालक बीरुशेठ खोमणे इत्यादी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

गरीबाला न्याय द्या,वंचितांचे अश्रू पुसा, माणसातला देव शोधा आणि पुण्याचं पारडं जड करा असा कळकळीचे आवाहन उपस्थितांना आमदार निलेश लंके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले
सत्काराला ऊत्तर देताना श्री. रामदास जगताप यांनी आपल्या आव्हानात्मक महसुली सेवाकालाचा आढावा घेत सहकार्य केलेल्यांची कृतज्ञता व्यक्त केली.
महसूल विभागाच्या डिजीटल क्रांती ठरलेल्या ई – फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून सलग ६ वर्षे कार्य करण्याची मिळालेली संधी माझ्या नोकरीच्या सेवा काळात निश्चितीच समाधान देणारी ठरली.


ई डिजिटल सातबारा या सेवेचा लाखो नागरिक दररोज लाभ होत आहे.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे गुरुजी यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात समाज रक्षक, पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच लोकसेवा आयोग परीक्षेत यश संपादन करुन निवड झालेले अधिकारी, उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर्स आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमास संजय पिंगट, संभाजी साबळे,महेंद्र लारे, नवनाथ निचित,तुकाराम डफळ,महेंद्र पवार,महेंद्र गुंजाळ,अभय नांगरे इत्यादि उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत संभाजी साबळे यांनी केले, सुनिल चोरे यांनी आभार मानले व राज शिनारे यांनी सूत्रसंचालन केले.

Source-http://manganga.in/?p=13937

Submit by Administrator | 02-10-2023

हिंगणघाटचा महसूल परिवार कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी आला धावून....


*आणि हिंगणघाट महसुल परीवारातील माझ्या मानस लेकी मदतीसाठी धाऊन आल्या*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*एरव्ही कोणत्याही शासकीय विभागात काम करणार्या व्यक्तिची पत प्रतिष्ठा ही त्याच्या सेवाकालावधी पर्यंत टिकुन असते. आणि एकदा कां ती व्यक्ति सेवानिवृत्त झाली की, दुसर्या दिवसापासुन त्या व्यक्तिची साधी आठवण कुणी काढत नाही. किंवा जर त्या व्यक्तिला त्या कार्यालयात काही काम असेल तर तेच कार्यालय त्याच्यासोबत अगंतुका सारखा व्यवहार करते पण हिंगणघाट महसुल परीवार याला अपवाद आहे. जरी महसुल मध्ये प्रत्येक कर्मचारी, अधिकारी त्यांना नेमुन दिलेले कर्तव्य चोखपणे बजावत असले तरी यासोबतच या विभागाने परस्परांत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. एकमेकांच्या सुखदु:खात तितक्याच आपुलकीने व तत्परतेने सहभागी होऊन हिंगणघाट महसुल परीवाराचे मुर्त स्वरुप प्राप्त झाले आहे. परिणामी हिंगणघाट महसुल हा प्रशासकिय कामकाजात राज्यातुन नेहमीच अव्वल स्थानी राहीलेला आहे. याचे सर्व श्रेय परीवाराचे कुटुंबप्रमुख आदरणिय शिल्पाताई सोनाले उपविभागिय अधिकारी आणि मा. सतिशजी मासाळ तहसिलदार यांचे व त्यांंच्या मार्गदर्शनात यशस्वी वाटचाल करणार्या हिंगणघाट महसुल परीवाराचे आहे.*
*मंडळी मी २०२२ ला जुलै महीण्याच्या अखेरीस मंडळ अधिकारी या पदावरुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो. माझ्या सेवानिवृति निमित्य हिंगणघाट महसुल परिवाराने बहारदार निरोप समारंभाचे आयोजन केले होते. आमचा सापत्निक सत्कार करण्यात आला. सेवानिवृति नंतर लगेच दोन महिण्यांनी माझ्यावर कर्करोगाचे आक्रमण झाले. माझी प्रकृती दिवसेंदिवस ढासळायला सुरुवात झाली. हि बाब जेव्हा माझ्या महसुल परिवाराला ज्ञात झाली. सर्व परिवार माझ्या निवासस्थानी भेटायला आला. माझ्या परिवारात उपविभागिय अधिकारी शिल्पाताई सोनाले मला बाबा म्हणुन आणि सौ. ला आई म्हणून आदराने संबोधित असल्याने आमच्यात मानस पिता पुत्री ह्या पवित्र नात्याचे ऋणानुबंध जुळल्या गेले. त्याचप्रमाणें महसुल परिवारातील सारीका आखाडे, सिमा चाफले, मंजुषा नागुलवार, पुनम कापकर, विनिता राठोड (मस्के), प्रिती झोड, आणी त्यांच्या समवयस्क मुली मला बाबा म्हणतात. सेवानिवृत्त नायब तहसिलदार लोमाताई पोहाणे, अस्माशेख, रिना गेडाम(भलावी), जयश्री सिंगर (नेरलवार) हयांनी मला भाऊ मानले. यातील रिना, जय श्री, लोमाताई मला दरवर्षी राखी बांधतात, भाऊबिजेला ओवाळतात. हा सर्व परिवार माझ्या व्याधीमुळे कमालीचा हळवा झाला. सारिका, अस्मा तर रोज नियमीतपणे मला सुप तयार करुन आणायचे. शिल्पाताई सोनाले आमच्या निवासस्थानी थोरल्या लेकीची भूमिका पार पाडत आपल्या व्यस्त वेळेतुन नियमित भेट देत आमच्या सौभाग्यवती ला ,मुलांना धिर देत आहेत*.
*कर्कव्याधी म्हटले की उपचारांचा अमर्याद खर्च आलाच. अशातच मी सेवानिवृत्त असल्याने भविष्याची जमापुंजी ही मर्यादीत. माझी आर्थिक ओढाताण व्हायला लागली ही बाब माझ्या महसुल परिवाराने हेरली, तहसिलदार आणि अधिकारी यांनी ५००००/-₹ जमा केले आमच्या मानस लेकीने शिल्पाताई सोनाले यांनी २५०००/-₹ दिले. सारिकाने आणि राजुभाऊधात्रक यांनी पुढाकार घेत तलाठी, मंडळ अधिकारी आणि कर्मचारी यांचेकडुन ७५०००/-₹ , कपुर, पाचखेडे यांचे पुढाकारात ५००००/-₹ माझे मार्गदर्शक, दिलीप कावळे , रविंद्र चकोले यांनी पटवारी पतसंस्थेच्या वतीने ५००००/-₹ मंडळ अधिकारी संघाचे जिल्हाध्यक्षाच्या राजुभाऊ झामरे यांच्या पुढाकाराने २००००/- ₹ अशा आर्थिक मदतीचा फार मोठा आधार व दिलासा मिळाला. माझ्यावरील किमोथेरपी व रेडीओ थेरपी चे उपचारास पाठबळ मिळाले. मदतीचे असंख्य हात बघुन माझी व माझ्या परीवाराची हिमंत वाढली . माझा जगण्याप्रतीचा आत्मविश्वास परत आला. या प्राणांतिक संकटकाळी मी एकटा नाहीच या भावनेमुळे मी व्याधीमुक्त होणारच हा ठाम आत्मविश्वास परत आला. माझ्या हिंगणघाट महसुल परिवारातील सकल जनांचे प्रेम, नात्यातील ऋणानुबंध हा अनमोल ठेवा माझ्याजवळ असल्याने मी मृत्युंजय होणार यात तिळमात्र शंका नाही. कल्यानमस्तु*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*संजय रामचंद्रराव भोंग*
*सेवानिवृत्त मंडळ अधिकारी*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*८६०५३४७६२४*

Submit by MCS Officer | उप जिल्हाधिकारी | 11-06-2023

अवैध वाळूउपसा केल्यास थेट मोक्का लागणार; महसूलमंत्री विखे पाटलांचा इशारा

Ahmednagar News: वाळूच्या अवैध वाहतुकीसह (Illegal Sand Transport) तस्कारीला आळा घालण्यासाठी सरकारने नव्या वाळू धोरणाची घोषणा करत, थेट 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू अधिकृत डेपोवरून विकण्याचा निर्णय घेतला आहे. याची आजपासून अमलबजावणी करण्यास सुरवात झाली असून, अहमदनगर जिल्ह्यात लोणी गावात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते पहिल्या डेपोचे उद्घाटन करण्यात आले. तर नवीन धोरणानुसारच राज्यभरात आता वाळू विक्री होणार असून, अवैध वाळूउपसा केल्यास थेट मोक्का लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचं विखे म्हणाले आहे. सोबतच अशा लोकांवर जी काही अंतिम कठोर कारवाई करण्यात येईल ती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं विखे पाटील म्हणाले आहे.
Ahmednagar News: वाळूच्या अवैध वाहतुकीसह (Illegal Sand Transport) तस्कारीला आळा घालण्यासाठी सरकारने नव्या वाळू धोरणाची घोषणा करत, थेट 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू अधिकृत डेपोवरून विकण्याचा निर्णय घेतला आहे. याची आजपासून अमलबजावणी करण्यास सुरवात झाली असून, अहमदनगर जिल्ह्यात लोणी गावात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते पहिल्या डेपोचे उद्घाटन करण्यात आले. तर नवीन धोरणानुसारच राज्यभरात आता वाळू विक्री होणार असून, अवैध वाळूउपसा केल्यास थेट मोक्का लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचं विखे म्हणाले आहे. सोबतच अशा लोकांवर जी काही अंतिम कठोर कारवाई करण्यात येईल ती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं विखे पाटील म्हणाले आहे.

Source-https://marathi.abplive.com/news/ahmednagar/illegal-sand-extraction-will-result-in-direct-punishment-revenue-minister-radhakrishna-vikhe-patal-warning-at-ahmednagar-maharashtra-1172376

Submit by Administrator | 01-05-2023

राज्यातून एनए टॅक्स पूर्णपणे हटवणार, महसूलमंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा

महाराष्ट्र राज्यातून लवकरच एन. ए. टॅक्स (अकृषी कर) हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळीच एकदाच 'एनए' भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार आहे. तर एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नसल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे. या निर्णयामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होईल, पण नागरिकांचा मोठा त्रास वाचणार असल्याचं देखील विखे पाटील यांनी म्हटले आहे. क्रेडाई महाराष्ट्रच्या 2023-25 च्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळा रविवारी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, दरवर्षी एनए करणे ही क्लिष्ट असते, लोकांना याचा मोठा त्रास होता. त्यामुळे आता खरेदीच्या वेळीसच एकदाच 'एनए' भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार असल्याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्यामुळे एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नाही. या नवीन निर्णयामुळे सरकारचा काही महसूल बुडेल, परंतु प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना याचा फायदा देता येईल. तसेच यासह भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीचे जे नकाशे दिले जातात ते आता 15 दिवसांत घरपोच देण्यात येईल, असेही विखे पाटील म्हणाले.

मालमत्ताची डिजिटल मॅपिंग करण्यात येणार:
दरम्यान पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, सरकारकडून अनेक चांगले आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहे. ज्यात आता मालमत्ताची डिजिटल मॅपिंग करण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मालमत्तांची मॅपिंग ड्रो- नद्वारे सर्वेक्षण करता यावे यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला ड्रोन पुरवण्यात येत आहे. आपले स्वतःच घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते, आणि त्या दृष्टीने सरकार पावले उचलत असल्याचं विखे पाटील म्हणाले.

Source-https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-chhatrapati-sambhaji-nagar-na-tax-will-be-completely-removed-from-the-state-big-announcement-by-revenue-minister-radhakrishna-vikhe-patil-1168427

Submit by Administrator | 17-04-2023

महसूल अर्ध न्यायिक निकाल QR Code द्वारे मिळणार

मंडळ अधिकारी श्री मोहसीन शेख यांचा उपक्रम

Submit by Administrator | 17-10-2022

PMRDA संबंधित श्री रामदास जगताप यांनी पाठविलेले वृत्त.

PMRDA च्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग.
श्री रामदास जगताप.

Submit by डॉ. विकास नाईक | उप जिल्हाधिकारी | 08-10-2022

श्री शेखर गायकवाड IAS यांचे लेख, सकाळ अग्रोवन

दारिद्र्यरेषे चे अखंड प्रेम

Submit by डॉ. विकास नाईक | उप जिल्हाधिकारी | 03-10-2022

This page was generated in 0.07 seconds.