जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्‍कार सर,
उत्‍पंन्‍न प्रमाणपत्र व रहिवाशी प्रमाणपत्र देण्‍याबाबत निकष काय आहेत. त्‍या बाबत शासन निर्णय आहेत काय ?

Question by shantiram
08-06-2015
sgksdm123@gmail.com

I want the recruitment rules of revenue department.
भरती नियम महसुल विभागाचे असे नसते ......महसुल विभागातील वेगवेगळ्या प्रवर्गाचे /पदाचे ( उदा . तलाठी , तहसीलदार )वेगवेगळे भरती नियम असतात

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या आईचे मामाने हक्कसोड पत्र फासुवून घेतले आहे, आई निरक्षर आहे, तर हक्कसोड पत्र बाद करता येते का ?
दिवाणी न्यायालयात दावा करणे योग्य होईल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

भोर तालुका वर्वे (खुर्द) गट नं.१८मधे २५गुंटे जमीन आहे. त्यामधे ६हिस्से माझया आईचे २भाउ व २बहीन व माझी आज्जी. माझया आईच्या(अंजना अशोक शेलार) वडलोंपर्जी जमीन २००१ साली विकली आहेअसे आत्ता मला समजले असता मी तो दस्त काढला दस्तामधे मुखत्यार पत्र दिले आहे असे दुय्यम निंबधक भोर या कचेरितून सांगितले पण अशा कोणत्याच पत्रावर सही अथवा अंगठा दिलेला नाही आणि मी त्या मुखत्यार पत्राची प्रत मागितल्यावर देत नाही. कारण जे मुखत्यार पत्र आहे ते अनरजिस्टर आहे असे दुय्यम निंबधक भोर येथील कर्मचारी सांगतात म्हणून मुखत्यार पत्राची प्रत दस्तासोबत जोडली नाही. याचा अर्थ जो दस्त झाला आहे तो रद्द होऊ शकतो का ? आणि यासाठी मी काय केले पाहिजे ? कृपया मार्गदर्शन करावे.

प्रफूल्ल अशोक शेलार
दुय्यम निबंधक भोर , यांचे कार्यालाय्त , आपण , नमूद विक्री दस्त , त्याचे सोबतचे सर्व कागदपत्राचे प्रमाणित प्रती , अर्ज व अथवा माहिती अधिकार खाली मागवा
आपण कथन केल्याप्रमाणे , मुखत्यार पत्रावर , आपले आई ने , सही अथवा अगन्था केलेला नसल्यास , आपण फास्वनुकीबाबत फौजदारी कारवाई हि करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दिवाणी दावा हाच पर्याय दिसतो

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

2001 साली भोर तालुक्यात वर्वे खुर्द येथील गट न.18 ही जमीन माझया आईच्या सहमती शिवाय विकली आहे. परंतु 7/12 मधे 6 जनाची नावे आहेत. त्या दस्त मधे 3 जणांचा अंगठा व सही आहे व 3 जणांचा मुखत्यार पत्र आहे. परंतु त्या पत्राचा पुरावा तलाटी कार्यालयात नाहीये ते पत्र नसल्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की ते मुखत्यार पत्र रजिस्टर नसल्याने त्याची प्रत कार्यालयात नाहीये. तर त्या मुखत्यार पत्रावर झालेली जमिनीची विक्री कायदेशीर आहे का आणि नसेल तर ती रद्द होउ शकेल का क्रुपया मार्गदर्शन करावे
मुखत्यार आहे का नाही , खरे का खोटे?

आता जवळ जवळ १४ वर्षे झालेली आहेत....................त्यामुळे आता . दिवाणी दावा हाच उत्तम पर्याय दिसतो .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर, पिक पाहणी चा आदेश देताना जर जमीन नि.स.प्र. / trust ची जमीन / संस्था ची जमीन / कुळ असलेले / न्याय प्रविष्ट / सरकारी जमीन / वन खात्याचा शेरा असलेल्या ७/१२ च्या जमिनी मध्ये इतर व्यक्ती चे नाव दाखल करण्या बाबत आदेश देता येतो का? जर नाही, तर त्या बाबत शासन निर्णय अथवा कुठे तरतुत नमूद आहे का?
महा . जमीन महसूल ( अधिकार अभिलेख ) नियम ३१ अन्वये , चौकशी प्रक्रिया पार पडून , व प्रकरण निकषात बसत असेल तर लावता येयील
मात्र , जमीन नि.स.प्र. असल्यास , कुल झालेले मालक स्वत कसत नाही , या कारणावरून , कुलवहिवाट कायद्या खाली , ३२ र अन्वये, कार्यवाही / कारवाई सुरु करणे अपेक्षित

सरकारी जमिनीवर पिक पाहणी आदेश देत येणार नाही, अतिक्रमण समजून , काढून टाकावे लागणार

न्याय प्रविष्ट प्रकरणात - न्यायालयाचा जैसे थे ठेवण्याचा आदेश असल्यास , पिकपाहणीआदेश देतयेणार नाही
वन खात्याचे जागे वर , शेती करता येत नाही, ते अतिक्रमण होए . काढून टाकणे आवश्यक ( वन विभागामार्फत )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे नाव अनुपमा महेन्द्र माळी माझे लग्न झालेले आहे व एक मुलगा आहे माझया वडिलांची खोपडी या गावी जमीनआहे माझे वडील बौध भिक्षुक असल्याने ते घर सोडून २००९ साला पासून निघून गेलेले आहेत त्यांचे वय ६५ वर्ष होते ते परत आलेले नाही ते परत येतील असे वाटल्याने पोलिस तक्रार केली नाही. व पोलिस आता हरवले म्हणून तक्रार घेत नाहीए माझया वडिलाना मी एकुलती एक मुलगी आहे पण ते कुठे आहेत जिवंत आहेत की वारले ते काहीच माहीत नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू दाखला व मृत्युपत्र काहीच नाही त्यामुळे माझे नाव ७/१२ वर वारस म्हणून लावण्यासाठी काय करावे कृपया या साठी मार्गदर्शन करावे .
पोलिस तक्रार देवून सात वर्षे झाली...................तरच दिवाणी न्यायालय एखादी व्यक्ती असेल किंवा नसेल याबाबत निर्णय घेतात.

म्हणजे हरवल्याचे तक्रारीपासून ७ वर्षानंतर माणूस सापडला नाहीतरच ............तसा पोलिचे दखल घेवून पुढील कारवाही करता येईल असे वाटते .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Maza prashna asa ahe ki hyrabad kul kayda kay asto
Karan mazq prashna tya hydrabad kul vahivat kaydya varcha ahe
Prashna asa ahe
Maze ajoba san 1952-58 paryant sheti krit hote ti jamin vadilo parjit novhati tyancya navache khasara patrakavar vahitidar lagandar v kul mhanun lagle ahejune lok mhanatat tyana ti jamin ceiling madhe midali tyacha vivah anjana bai hichyashi zala tyana 2 mule hoti va maze ajoba 1959 madhe varle v tyavedes ti mul 6 varshacha motha mulga va 1 varshacha lahan mulga hota mag ajine dirashe lagn kel va ti 2 lahan mule chulat ajoba kde raht hoti tyanche palan poshan tya chulat ajobanich kele tya lahan mulanche shadet nav takaychya vedes chulat ajobani aplech nav vadil mhanun takayla lavle nant te shet 1960-61 madhe chulat ajobachya navani ferfar zale v 38 e pramane ti jamin chulat ajobachya navane decleare zali te chulat ajoda san 2001 madhe varle tyana 7 mule v 2 muli hotya tyancya mrutunantr chulat ajobanchya mulanchi nave san 2003 madhe adhikar abhilekh patrakavr chadvli ahe pan mazya vadilache v motya vadilache nav nai chadhvle amhi prashna kela ki mazya ajobachya 2 mulanchi nave nai chadavli amhi tyana vicharl amche nav ka nai chadavli tar te mhnanale ki tumchya vadilanchi shetich navhe tar tumche nav kashe chadel ata sir tumhich sanga amcha tya shetivar kahi adhikar nai ka jr adhikar asel tar ksa midel mhn konta nirnay lagel jas
1 ) ti jamin mazya vadilanchya navachi houn fakt amhi doghe bhau varasdar bananar ka
2) mazya chulat ajonachya mulanche nav jase varsan mhnun ahe tasch ani tewadhach hissa amhala pan midel ka
3)tya jaminiche do hisse hota 1 mhanje mazya ajonacha hissa 2 mhnje mazya chulat ajobancha hissa. Ha prashan ata mahtvacha ahesaheb plz mala yacha ani khalil prashnache answer lavker hi mazi agrahachi tumchya samor vinanti ahe
Ani hydarabad kul kaydya nusar 38 e pramane sheti decleare hone mhnje kay aste ani san 1952 -58 paryant sheti karnaryana konate kul mhnun mhanatat
hyadrabad kul kaydyanusar kulachi vyakhya kay ahe
Pl
१९६० ६१ रोजी , ज्या फेर फाराने , चुलत आजोबाचे / सावत्र आजोबाचे नाव लागले , त्या फेरफाराविरुद्ध आपण अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,लीज पेंडन्सी नोंदी बाबत मंडलाधिकारी यांचेकडे तक्रार केस चालू होती.दिवाणी न्यायालयाचा स्थगिती आदेश (हस्तांतरास बंदी)असा असल्याने त्यांनी सदर नोंद मंजूर केली.वास्तविक इतर लीज पेंडन्सी नोंदीबाबत उच्च न्यायालय मुंबई येथे दावा चालू आहे.याची कल्पना व इतर निकालांबाबत पुरावा देऊनही त्यांनी सदरचा निकाल दिला आहे.अपिलात गेल्यास सदर नोंदीबाबत स्थगिती आदेश होऊन नोंद रद्द होऊ शकेल का?सदर लीज पेंडन्सी नोंद गावदप्तरी घेणेबाबत शासन निर्णय /परिपत्रक असल्यास bkganesh.shinde10@gmail.काम यावर कृपया ईमेल वर पाठवू शकाल का?महसूल व्यतिरिक्त इतर न्यालायास फेरफार नोंदीवर स्थगिती देण्याचा अधिकार आहे का? तसेच महसूल व्यतिरिक्त इतर न्यायालयास फेरफार नोंद घेणेकामी आदेश देण्याचे अधिकार आहेत का?कृपया मार्गदर्शन करावे..
आम्ही 5 भावंडे जमीन सामाईक वडीलोपार्जित,बहीणींना मिळकतींमधील जमीनीतील ठराविकच हिस्सा हवा आहे.तो मला मान्य नाही.काय करावे ?
प्रत्येकाला समान हिस्सा मिल्नेचा हक्क आहे . समजुतीने सरस निरस पद्धतीने वाटणी करावी लागेल . अन्यथा कोर्ट कचेरीचा वेळखाऊ व खर्चाऊ मार्ग ..................

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by sonal Tarte
06-06-2015
tartesonal@gmail.com

सर ,
महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबाकरॆता शेतजमीन सिलिंग होल्डिंग किती आहे ?
व individual साठी किती लिमिट आहे ?
ढोबळ मानाने ................

वैक्तिक (बागायत) १६ एकर
वैक्तिक ( एक पाणी बागायत ) ३६ एकर
वैक्तिक (दोन पाणी बागायत ) २७ एकर

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

वैक्तिक (जिरायत) ५४ एकर . अधिक माहितीसाठी कृपया १९६१ हा सिलिंग कायदा वाचवा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर मी अादिवाशी जमाती मध्ये मोडत असून अामचे जमिनी लगत वन जमिन अाहे. सदर जमिन अाम्ही पूर्वी पासून कसत होतो. त्या जमिनीतूनच अामची वहीवाट होती. काही वर्षांनी एका जनरल संवर्गातील व्यक्तीने दबावाने जबरदस्तीने वन जमिनीवर क्षतिक्रमन करणेचा प्रयत्न केला व काही वर्षांपूर्वी वन जमिन अतिक्रमन कायम करणेसाठी शासनाकडून अर्ज मागविणेत अाले. अाम्ही या वनजमिनीवर अतिक्रमण कायम करणेसाठी अर्ज केला होता व संबंधित इसमाने देखिल अर्ज केला. प्लाॅट वितरण करुन मोजणी करतेवेळी दबावाने अामचा अर्ज गहाल करुन अामच्या मालकीच्या जमिनी लगत अाम्ही दावा केलेली वन जमिन अाम्हाला कुठल्याही प्रकारे न कळवता जनरल संवर्गातील व्यक्तीस अधिकार्यांकडून मोजणी करुन घेतली. व अामच्या मालकीच्या जमिनीत जाण्याचा मार्ग बंद केला त्यामुळे पुढे अामची जमिन कसणे कठीण झाले. सदर व्यक्तीने दावा केलेल्या जमिनीलगत फक्त अामची जमिन अाहे. त्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची जमिन तिथे नाही व सदर इसम जनरल संवर्गातील असून त्याचे अतिक्रमण मंजूर झाले नसून सुद्धा तहसीलदार तथा वन अधिकारी यांचे परवानगी विना झाडे तोडून डोंगर फोडूनप्लाॅट पाडले असून सुद्धा त्यांवर कूठल्याही प्रकारे कार्रवाही झाली नाही. तरी या विरुद्ध काही कारवाही करता येईल का? व अाम्हाला संबंधित प्लाॅटवर अामचा दावा दाखल करताा येईल का? असल्यास कसे करावे
१९९६ साली जमीन बस स्थानकासाठी संपादित करण्यात आली होती पण तेव्हापासून आज पर्यंत त्या जमिनीवर बस स्थानक झालेले नाही. तेव्हापासून जमीन मालक त्यावर जमिनीवर शेतीचे उत्पन घेत आहे. ती जमीन पूर्ण पाने बागायत आहे.त्या जमिनीचे पैसे पण जमा आहेत पण मालकांनी घेतलेले नाहीत. इतर हक्का मध्ये बस स्थानका साठी संपादित शेत्र असे दाखवते पण मालकी हक्का मध्ये मालकाचे नाव आहे. असा नियम नाही का एवढ्या वेळा मध्ये झ्या कामासाठी संपादन झाले होते ते जर झाले नाही तर संपादन रद्द व्हावे?
सध्या तरी असा ठोस कायदा नाही

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

मी राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे या गावातील रहिवाशी असून या गावास पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील कलम ११(१) नुसार पुनर्वसना करिता अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. गावात माझ्या वडिलांच्या नावे वडीलोपार्जित घर असून चुलत काकांच्या नावे जमीन आहे. मी नोकरी निमित्त बाहेर गावी असल्याने माझा गावात कोणताही पुरावा नाही परंतु मी कामाच्या जागी स्थायिक नाही तरी मी पुनर्वसनास पात्र होतो का? पुनर्वसानाचा लाभ मला कशा प्रकारे मिळेल. या बाबत शासन निर्णय असल्यास त्याचा संदर्भ मिळावा.
आपली स्वताची जमीन प्रकल्पात गेली तरच आपल्या कुटुंबातील एकाला पुनर्वसनाचा लाभ मिळेल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

महोदय,
पुनर्वसना संदर्भात माहिती तसेच प्रक्रिये करिता करिता संदर्भ, फुस्तक सुचवावे
१. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन कायदा १९९९
२. भू संपादन व पुनर्वसनकायदा -2013

हे दोन कायदे वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांचे 23-04-2015 रोजी निधन झाले आहे. माझ्या लहान भावाने माझ्या वडिलांकडून 15-11-2014 रोजी ते अडाणी असल्याचा फायदा घेऊन रजिस्टर मृत्यूपत्र करून घेऊन त्यांचे(माझ्या वडिलांचे ) नावावरील सर्व जमीन माझी व माझ्या बहीणींची सहमति न घेता स्वताच्या मुलाच्या एकट्याच्या (माझ्या पुतण्याच्या) नावावर, करून घेतली आहे. तर मला माझा हिस्सा कोणाच्या सहिने किवा न्यायालयात कोणत्या आधारे मिळवावा लागेल.
मिळकत स्वकस्तर्जित त आहे का वडिलोपार्जित ..............वडिलोपार्जित असेल तर आपल्याला केस चालवता येईल . वडिलांची जमीन स्वकास्तार्जीत असेल तर ते कोणालाही देवू शकतात

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

maze sakhye chulat bhau &vadil ya madhye jaminiche vatni patra karayche ahe tyasathi mudrank shulk lagel ka ? Mudrank shulk Total bajar mulyachya kiti percent bharave lagte ?
आपण तहसीलदार यांचेकडून म ज मअ १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप करण्यासाठी तहसीलदारयांचे कडे अर्ज करा .
मात्र आपले वडील व चुलत भाऊ यांचेत , हिस्स्याबाबत वाद नसावा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir I am serving in Indian Army and residing in Motala, Distt Buldhana. I will apply many time for waste land for cultivation but not any reply till date : My name is Vijay Eknath Narwade Vill : Motala Dist Buldhana
A serving member of armed forces can get a agricultural land to the extent of 2 Ha of Jirayat or 1 Ha of seasonally irrigated land or 0.5 Ha of perenially irrigated land. Despite your application , you did not get any response , you may approach the concerned Collector and put your grievainces before him

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एक व्यक्तीचा स्मरणपत्र आधारे फेर झालेला आहे. त्यात वहिवाटी साठी सोयीचे व्हावे म्हणून स्मरण पत्र करून तेवले आहे. आसा उलेख आहे. तरी आता त्या व्यक्ती ला त्या वहिवाट शब्दा ऐवजी मलिकी हक्क आसा उलेख हवा आहे...तरी असा बदल करता येयील का.?.त्या व्यक्तीची ७/१२ वर मालकी हक्कातच नोंद आहे....
स्मरणपत्र नावाचा दस्त ऐकिवात नाही ....

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर मी काळ दोन प्रश्न विचारले आहेत त्याचे उत्तर मला हवे आहे परंतु माझ्या नवर्याला जमीन हि वारसाहक्काने मिळाली आहे त्यामधे त्यांच्या तीन बहिणीची नावे लावली नाहीत कारण त्या हिस्सा मागतील पण जेव्हा माझ्या नवर्याने जमीन विकली तेव्हा त्यांची सही घेतली नाही तर त्या हक्क मागता येईल का आणि त्या तक्रार दाखल करू शकतात का त्यांच्या भावाने फसवले आहे आणि बहिणीच्या सह्या घेतल्या नाहीत मग मला कोर्टामध्ये दावा लावता येईल का कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
maje lagna 2008 sali jale majhya navryane lagna aghodar 1.5 ekar sheti tyancha mothya chulta tyanchya mulala vikli aani lagna jhalyawar 1.25 ekar vikali parantu maje mister he thode bolsat aani garib vrutivhe ahet yacha fayda gheun tyani kami paishamadhe jamin ghetali parantu majhya he aatta lakshyat alayane mi kahi karu shakte ka krupaya mala upay sangawa
आता आपण काही करू शकत nahi

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी प्रश्न केल्याप्रमाणे माझ्या नवर्याचे वडील हे ते लहान असताना वारले आणि आई हि आता साथ आठ वर्षापूर्वी वारली आहे आणि ह्याचा फायदा घेत त्यांचा चलत भावाने त्यांना फसून जमीन घेतली आणि जमीन दे मी तुला घर घेऊन देतो असे देखील सांगितले आणि माझ्या नवर्याला ते खरे वाटले परंतु त्याने घर घेऊन दिले नाही व २ लाख रुपैऎ फक्त दिले जमिनीला भाव नाही असे सांगितले तर मी यासाठी की करावे याची मला माहिती ध्यावी व उपाय सांगावा
फस्वनुकीबाबत आपण न्यायालयात जा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by gaphar shaikh
03-06-2015
shaikhgaphar26@gmail.com

माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. माझ्या लहान भावाने माझ्या वडिलांकडून मृत्यूपत्र करून घेऊन त्यांचे(माझ्या वडिलांचे ) नावावरील सर्व जमीन माझी व माझ्या बहीणींची सहमति न घेता स्वताच्या मुलाच्या एकट्याच्या (माझ्या पुतण्याच्या) नावावर, करून घेतली आहे. तर मला माझा हिस्सा कोणाच्या सहिने किवा कसा मिळवावा लागेल.
वडिलांचे निधन केव्ह्ना झाले ?

वडिलांना त्यांची मिळकत मृत्यापत्र द्वारे देण्याचा पूर्ण अधिकार आहे
आपणास शंका असल्यास , मृत्यापत्राचे वैधतेबाबत न्यायालयात आव्हान द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दिवाणी न्यायालय च्या preciept अनुसार वाटणी करताना जमिनीचा तुकडा पडत असल्यास व पक्षकारा पैकी कोणीही पैश च्या स्वरूपात मोबदला घ्यायला तयार नसल्यास कोणत्या पद्धतीने विभाजन करावे या बाबत मार्गदर्शन करावे
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सासपडे या गावी आमची वडिलोपार्जित जमीन आहे. यापैकी सुरवे न. २४३ मध्ये ७१ गुंठे जमीन असून ती दोन्ही भावाच्या नावे प्रत्येकी ८ आणे अशी असून आमच्या ८ आणे हिश्यामध्ये आम्ही विहीर पडली आहे. मात्र दुसरा भावू विहीर नोंद करणेसाठी अर्जावर सही देत नाही त्यामुळे तलाठी विहीर नोंद करीत नाही व नोंद नसल्यामुळे वीज कने शन मिळत नाही तरी आम्ही नक्की काय करावे म्हणजे आमची विहीर नोंद होईल.
जमीन दोन भावांचे नावावर आहे . क्षेत्रानुसार भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी करून घ्या
आकार्फोड पत्रकानुसार , स्वतंत्र 7/12 तयार होतील . भावाच्या संमतीची गरज भासणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3