जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माननीय महोदय ,
माझी भडगाव(जि: जळगाव) तालुक्यात सात एकर शेती आहे, सदर शेती माझ्या आजोबांनी (विठ्ठल शिवराम पाटील ) २८ वर्षापूर्वी शेतकरी खंडा वना माळी यांच्याकडून विकत घेतली. सदर जमीन शेतकरी खंडा वना माळी यांनी शेतकरी सुपडू मालजी पाटील यांच्याकडून विकत घेतली होती. त्या पूर्वी शेतकरी सुपडू मालजी पाटील यांनी खालील तीन सावकारान कडून अनुक्रमे ३० रुपये ४० रुपये आणि ६० रुपये कर्ज घेतले होते आणि त्याची परत फेडहि केलेली होती.
१)शंकर दयाराम मोराणकर
२)मांगो शामराव पाटील
३)इंदरचंद बछाराम

परंतु वरील तिघेही सावकारांचे नाव आणि कर्जाच्या नोंदी ७/१२ उताऱ्यात इतर हक्कात तसेच राहिले आहे. वरील तिघेही सावकार मयत झाले आहेत आणि त्यांच्या वारस बद्दल पूर्ण माहिती नाही तसेच काही वारसदार मयत झालेत आणि मयत वारसदाराचे वारस कामानिमित्त परगावी विखुरलेले आहेत(त्यांच्या बाबत पूर्ण माहितीउपल्ब्ध नाही) आणि तिघेही सावकारांच्या सर्व(२० - २५) वारसांना हक्कसोड पत्र बनवण्यासाठी बोलावणे शक्य नाही. तथापि सदर प्रकार च्या प्रकरणा साठी सोयीस्कर अशी प्रक्रिया सुचवावी.

धन्यवाद ,
दिपक पाटील
अश्या प्रकारचे बोजे हि मोठी समस्या आहे. आपण प्रश्न मध्ये नमूद केलेला मार्ग कायदेशीर आहे परंतु सध्या स्थितीत तो व्यहर्य नाही. सर्व वारस असले तरी , कर्जाची खरच फेड करण्याची तयारी दर्शवली तरी ते स्वीकार्तीलच हे सांगता येणार नाही.
तगाई कर्जाचे बाबतीत असे जुने बोजे काढून टाकणे बाबत शाषण निर्णय आहे. तसाच अशे काळबाह्य बोजे काढून टाकणे बाबत निर्णय आहे का हे पहा.
अन्यथा redemption suit दाखल करावा. अथवा कर्जदार हे कालबाह्य कर्ज वसूल करू शकत नाहीत , तसेच बोजा काल बाह्य झाला हे ठरवून मिळणे साठी दिवाणी दावा दाखल करावा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
माझ्या नातेवाईकाची शेती हि महारी म्हणून मिळाली आहे परंतु त्यावर तलाठ्याने बोझा चाडविला आहे तसे चालते काय ७/१२ ओज वर फेरफार करता येते काय
व सदर शेती विकता येते काय
गहाण खता शिवाय बोजा चढवता येत नाही.
७/१२ वर बोजा आहे म्हणून विक्रीवर निर्बंध नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vinod
10-03-2014
thorvevinod80@gmail.com

ई. डी. सी. व पोस्टल बालेट पेपर चा नमुना असल्यास कुर्पया अपलोड करावा

Question by mnm
10-03-2014
madhavnmule@gmail.com

हींदु एकत्र कुटुंबातील वाटणीपत्रामध्‍ये मुलाच्‍या नावावर असलेली जमीन वडीलांचे नाववार घेता येर्इ्रल काय
प्रश्न विस्ताराने मांडा.
वाटप पत्र केव्हा झाले ? मिळकत कोणाचे नावावर होती.
जर मिळकत मुलाचे नावावर असेल , व तो सज्ञान असेल तर वडिलाचे नावावर दान पत्र करू शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mnm
10-03-2014
madhavnmule@gmail.com

तुकडेबंदी कायदयानुसार कीती क्षेत्रफळाला तुकडा असे म्‍हणता येईल
२० गुंठे - जिरायत शेती
१५ गुंठे- एक पिकी , भात शेती
०५ गुंठे- बागायत शेती
प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे प्रमाण शेत्र आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

धन्यवाद सर

Question by amol chavhan
09-03-2014
amolchavhan234@gmail.com

thank you sir
धरणग्रस्थ बाधित व्यक्तीस मिळालेल्या जमिनीत तेथील खाजगी व्यक्तीने अतिक्रमण केले असल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कोणत्या कलमान्वये तहसीलदारांना काढण्याचा अधिकार आहे.किंवा ते कसे काढून मिळेल याचे कृपया सविस्तर मार्गदर्शन मिळावे.धरणग्रस्थाबाबत कोणते कायदे व शासन आदेश आहेत.
जमीन प्रदान करताना जर त्या जागे वर अतिक्रमण असेल तर , तहसीलदार म.ज.म.अ १९६६ चे कलम ५३ व २४२ अन्वये अतिक्रमण काढू शकतात.
मात्र जमिनीचाताबा धारण ग्रस्त व्यक्तीस दिल्यानंतर अतिक्रमण झाले असेल तर, तहसीलदार असे अतिक्रमण काढू शकत नाही. धरन ग्रस्त व्यक्तीने दिवाणी न्यायालयात जाने आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ च्या इतर हक्क सदरी मा. दिवाणी न्यायालयात दावा दाखल असल्याने लीज पेंदासी शेरा नमूद आहे . परंतु सदर जमिनि चे नोदनिकृत खरेदी खत फेरफार टाकणे करिता आलेले आहे. तर लीज पेंदासी शेरा आसताना फेरफार टाकता येईल अगर कसे? कृपया मार्गदशन करावे.
lis pendens म्हणजे मिळकती संदर्भात दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. जमीन खरेदी करणार्यासाठी हि notice आहे. असा शेरा आहे म्हणून फेरफार टाकण्यास मनाई नाही.
मात्र दिवाणी न्यायालयाचा निर्णय विकनाराचे विरुद्ध गेल्यास , खरेदीदारास अश्या परिणामांना बांधील असतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sonal tarte
08-03-2014
tartesonal@gmail.com

सर, जर एखाद्या बिगरशेती जमिनीचे ९९ वर्षाचे लीज असेल तर नंतर त्याचे मालक व बादेकारुला त्याचे खरेदीखता करता येते का?व खरेदीखता वर पुन्हा स्टंप ड्युटी भरावी लागते का?
भाडेपट्टा रद्द करून , खरेदी खत करू शकता.
मुन्द्रंक शुल्क , नोंदणी फी भरावी लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाशय,
माझे गाव कोल्हापूर जिल्हात राधानगरी तालुक्यात नवे करंजे आहे. गावाची अभयारण्य करिता पुनर्वसनाची प्रक्रिया प्रगति पथावर आहे. सदर करिता सर्व्हे सन १९८४ मध्ये पूर्ण करण्यात आलेला असून सन २०१२ मध्ये अध्यादेश निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु प्रक्रिये बाबत ग्रामस्थ साशंक आहेत. अध्यादेशानुसार काही भागांचे पुनर्वसन असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे व शासन निर्णयानुसार सन १९८४ च्या सर्व्हे नुसार फक्त ७९ प्रकल्पग्रस्त आहेत व त्यानुसारच ७.९० कोटी तरतूद आहे. या बाबत मी व्यक्तिशा आपली भेट घेऊन माहिती प्राप्त करावयाची आहे तरी कृपया मला माझ्या ईमेल वर माहिती कळवण्यास कळकळीची विनंती आहे. सर्व कागदपत्रे माझ्या कडे उपलब्ध आहेत
आपण जिल्हा पुनर्वसन अधिकारी , कोल्हापूर यांना भेटा . आपले शंका निरसन होईल. अथवा पुनर्वसन उपयुक्त , पुणे यांचे कडून हीआपणास सविस्तर माहिती मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भूसंपादना विषयक माहिती कोठून मिळू शकते
आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभाग

Reply by MCS Maharashtra | इतर

सर एक व्यक्ति कर्जत तालुक्यातील आहे सदर व्यक्ति उल्हासनगर येथील सरकारी दवाखान्यामध्ये burning केस मध्ये admit आहे तर daing declaration कोणी घ्यायचे
(विकास पवार ), निवासी नायब तहसीलदार , उल्हासनगर यांनी मृत्य पूर्व जबाब घेणे आवश्यक आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दवाखाना ज्यांच्या कार्यक्षेत्रात आहेत ते !

Reply by MCS Maharashtra | इतर

किरण पाणबुडे सर ,आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबादाल धन्यवाद .पण मला असा विचाराय्च होता की ,हे सगळ्या प्रकारच्या शेतीसाठी जे सिलीग लिमिट(१८,२७,५४ एकर वैगरे ) आहे तो कायदा अजूनही applicable आहे का?
लागू आहे. नागरी जमीन धारणा कायदा रद्द झाला आहे. महाराष्ट्र शेत जमिन कमाल मर्यादा धारण कायदा अस्तित्वात आहे. तो रद्द झालेला नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
दिवेआगार येथे CRZ (coastal zone) आहे का?
तिथे समुद्राकीनाय्रापासून किती अंतरावर घर अथवा फार्म हाउस बांधता येते ?
जिथे समुद्र , खाडी तिथे crz च्या तरतुदी लागू होतात .
उच्चतम भारती रेषेपासून ५०० मी. च्या आत बांधकाम करता येत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sonal tarte
05-03-2014
tartesonal@gmail.com

सर,
नदीपात्रालगत शेती प्लोट असेल अथवा जर नदीला लागून असेल तर त्या प्लोट्वर बांधकाम करता येते का?
नदीपात्रा पासून ३० मी. अंतराचा आत बांधकाम करता येत नाही.
जलसंपदा विभागाचे अभिप्राय घेतले जातात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by योगेश
05-03-2014
jyogesh84@yahoo.com

सर,मी महाराष्ट्र शासनात कार्यरत असून मला पितृत्व रजा कीती दिवस मिळते ह्या समधी gr आहे का ? तर तो कृपया ह्या एमैल वर पटवा . jyogesh84 @yahoo.com
पितृत्व राजा ८ दिवस मिळते.
आपण आपले कार्यलयात अर्ज करा.
आपले कार्यालय प्रमुख निर्णय घेतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sonal tarte
04-03-2014
tartesonal@gmail.com

सर ,
सिलिंग लिमिट काय आहे?जिरायत -१८ एकर ५४ बारामाही साठी ५४ एकर हे अजूनही अप्लिकेबल आहे का?
बारमाही पाणीपुरवठा असलेलीज्यामधून वर्षातून दोन पिके घेत येतात -१८ एकर
खात्रीशीर हंगामी पाणी पुरवठा असलेली ज्यामधून वर्षातूनएक पिक घेत येते - २७ एकर
खात्री नसलेली परंतु ज्यामधून वर्षातून एक पिक घेतां येते - ३६ एकर
भातशेती - ३६ एकर
जिरायत -५४ एकर

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by महेश joshi
03-03-2014
jaymahesh61@gmail.com

शासकीय पडीक जमीन कसण्यासाठी मिळू शकते काय मिळत असल्यस पत्रव्यवहार कोणाच्या नावे करावा कृपया माहिती द्यावी.
मिळू शकते
[* शर्थी व अटींवर ]
अर्ज जिल्हाधिकारी यांचेकडे करू शकता. मात्र मंजूर करण्याचे अधिकार शाशानाचे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बदली पत्र कार्माचार्यान्साधी किती वर्ष १क टेबलाला काम करणे बंधनकारक आहे?
एका कार्यालयात / टेबल ला ६ वर्षे
तालुक्यात १० वर्षे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकाच कार्यालयात किती वर्ष असावा या बाबत तरतूद आहे .परंतु एकाच टेबल वर किती काळ काम करावे या बाबत तरतूद नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

एकाच कार्यालयात किती वर्ष असावा या बाबत तरतूद आहे .परंतु एकाच टेबल वर किती काळ काम करावे या बाबत तरतूद नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सर ,
एखाद्या गता नं. असलेल्या जमिनीला सामायिक सातबारा असेल तर त्यावरील एका जमीनमालकाला त्याच्या हिश्याची जमीन विकावयाची असेल तर दुसर्याची परवानगी घेणे आवश्यक आहे का?किवा जरा त्याच्या नावापुढे सात बार्यावर क्षेत्र लिहलेले असेल तरीही कन्सेंट घेणे गरजेचे आहे का?
सह्धारांकांकडे मिळकत वारसाने आली असेल तर , हिंदू वारसा कायदा १९५६ कलम २२ अन्वये अस्य सह्धार्कास जमीन खरेदी करण्याचा प्रथम हक्क असतो. जर सह्धार्कानी जमीन खरेदी केलेली असेल तर , असे बंधन नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कोर्टाचा निर्णय नुसार फेरफार टाकणे योग्य आहे . परंतु मुद्रांक शुल्क भरने आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे
न्यायालयाचा निर्णय काय आहे त्यावर अवलंबून आहे. न्यायालय कायदेशीर प्रक्रिया पार पडूनच पुढील कार्यवाही करणे बाबत निर्देश देते.
कृपया न्यायालय निर्णय वाचा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५(२) अन्‍वये उपअधिक्षक भूमी अभिलेख यांना जमीन मोजणी आदेश देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत काय असल्‍यास त्‍याचा शासन निर्णय कोणता आहे / नसल्‍यास त्‍याचा शासन निर्णय दिनांक दयावा हि विनंती.
कृपया कायद्या खालील नियम पहा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by yogesh
24-02-2014
jyogesh84@yahoo.com

i want know about paternity leave for maharashtra gov servent .any Gr for this type leave plz sent on my email id

Question by mohan
23-02-2014
mohanmsutar@gmail.com

महोदय सर ,
ग्रंथपाल रिक्त पदांचे बारती साठी जाहिरात देनेत आले असून त्यामदे एक पद ंशकालीन कर्मचारी साठी एक पद रिक्त पदांचे उपलब्द आहे . ती पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ंशकालीन आरक्षन पदासाठी कोठे काम केल्याचे अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.आणि शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय मदेकाम करणारे कर्मचार्यासाठी अंशकालीन कर्मचारी आरक्षन अंतर्गत कोणते कोणते इवबागत अर्जकट yeil

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3