जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मी महसुल कर्मचारीमध्‍ये रजीस्‍टर मेंबर असुन password व username टाकले असता महसुल व्‍यासपीठवरील माहीती open होत नाही
it is for revenue officers,we are starting karmachari vyaspith soon,that will be available to revenue staff.

Reply by MCS Maharashtra | इतर

सास-यांनी 2000 साली 7/12 ला सहहिस्सेदार म्हणून नाव लावले.तेव्हा चुलत सास-यांच्या नावे नोंद असलेल्या वडिलोपार्जित घराला सहहिस्सेदार म्हणून नाव लावायचे राहिले...ते नाव लावण्यासाठी काय करावे लागेल.?
वडिलोपार्जित घर असेल तर , गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा .मात्र आपला घरामध्ये हिस्सा आहे हे सिद्ध करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब, माहीतीचा अधिकारान्वये माहीत मागवली असता साधारण मागील ८ ते१० वर्षांची कींवा त्यापेक्षा मागील कीती वर्षांपर्यंतची माहीत सरकारी कर्यालयामध्ये उपलब्ध होवू शकते आणि माहीती अधिकाराचा अर्ज करताना ठराविक शब्द संख्याची मर्यादा असते का. ( महसूल विषयक प्रश्न नाही आहे तरी कृपया माहीती सांगावी ही विनंती )
We are thankful to Dr Chandrakant Pulkundwar, Yashda's National level Master Trainer for RTI for replying query in detail.

Reply by MCS Maharashtra | इतर

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधे कालमर्यादेची अशी कोणतीही अट नाही. जे अभिलेख आपल्या विभागास लागू असलेल्या कोणत्याही नियम/अधिनियमातील तरतुदी नुसार,जेवढा काळ जपणुक करणे आवश्यक आहेत, अशा कालावधीची जुनी माहीती देखील मागता येते. उदा. ABCD वर्गीकरणानुसार A वर्गाचे अभिलेख कायम जतन करुन ठेवायचे आहेत. याचा अर्थ अशी कायमस्वरुपी कागदपत्रे कीतीही जुनी असली तरीही ती मागता येतात. अर्थात उपलब्ध असतील तरच.

या बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या CBSE प्रकरणातील दि.०९-०८-२०११ च्या निर्णयात पॅरा ३५ मधे "The RTI Act provides access to all information that is available and existing " असे आॅब्जरवेशन आहे. अाता इथे ABCD नुसार माहीती उपलब्ध असणे आवश्क आहे परंतु प्रत्यक्षात उपलब्ध नसेल तर ही बाब उचित प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून जबाबदारी निश्चित करणे क्रमप्राप्त ठरते.

कलम ८(३) मधे २० वर्षाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने आहे. त्याचाही अर्थ सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त निर्णयातील पॅरा ३० मधे स्पष्ट केला आहे तो असा -
Section 8(3) provides that information relating to any occurrence, event or matters which has taken place and occurred or happened twenty years before the date on which any request is made under section 6, shall be provided to any person making a request. This means that where any information required to be maintained and preserved for a period beyond twenty years under the rules of the public authority, is exempted from disclosure under any of the provisions of section 8(1) of RTI Act, then, notwithstanding such exemption, access to such information shall have to be provided by disclosure thereof, after a period of twenty years except where they relate to information falling under clauses (a), (c) and (i) of section 8(1).
In other words, section 8(3) provides that any protection against disclosure that may be available, under clauses (b), (d) to (h) and (j) of section 8(1) will cease to be available after twenty years in regard to records which are required to be preserved for more than twenty years

राज्य शासनाने दि.१६-०१-२०१२ च्या अधिसुचनेद्वारे नियमात बदल केले असुन त्यानुसार अर्जदार एका अर्जात एकाच विषयाची माहिती मागू शकतो,तसेच माहितीचे वर्णन १५० शब्दात लिहावे अशीही मर्यादा घालण्यात आली आहे.

Still,if anybody has any doubt or need copies of judgements,please sms me on 07588930743

Reply by श्री.चंद्रकांत पुलकुंडवार | अपर जिल्हाधिकारी

आपल्याला कोणती माहिती हवी आहे,त्यावर कालावधी अवलंबुन आहे. माहितीचा अर्ज करताना साधारणता १५० शब्द असणे आणि एकच विषय असावे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सार्वजनिक अगर खाजगी नळयोजनेसाठी पाईप लाईन टाकण्यासाठी मध्ये येणा-या शेत जमिनीमध्ये सदर शेतक-याची वा जमीन मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे का.
होय सम्भंधित शेतकर्याची परवानगी आवश्यक.
मात्र जर असा शेतकरी परवानगी देत नसेल तर म.ज.म.अ. १९६६ मध्ये नल पाणीपुरवठा योजना साठी pipe line टाकण्यासाठी परवानगी देण्याची तरतूद नाही.
शेती साठी पाणी पुरवठा करण्याकरता कलम ४९ अन्वये परवानगी देण्याची तरतूद आहे. तहसीलदार यांना परवानगी देण्याचे अधिकार आहेत.

(1)If any person (hereinafter called "the applicant") desires to construct a water course to take water to irrigate his land for the purpose of agriculture from a source of water to which is he entitled ...........

sarkari jagetun pipeline टाकण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकार यांना आहेत.

मात्र right of way अथवा right to lay pipe line ( पाणी पुरवठा line ) मिळवण्या बाबत kayda नसावा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सार्वजनिक अगर खाजगी नळयोजनेसाठी पाईप लाईन टाकण्यासाठी मध्ये येणा-या शेत जमिनीमध्ये सदर शेतक-याची वा जमीन मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे का.
सर्वसाधारणपणे शेतकरी एकमेकांला अडवत नाही.............. परंतु तशी परिस्थिति असल्यास परवानगीची तरतूद आहे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

चुलत भावाच्या नावे नोंद असलेल्या वडिलोपार्जित घराला सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्यासाठी काय करावे लागेल.?
चुलत भावाचे नावावर घर असेल तर , तुम्हास चुलत भावाने घरातील अर्धा हिस्सा नोदानिकृत दस्ताद्वारे बक्षीस पत्र अथवा विक्री पत्र करणे आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद-

एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
--------------------------------------------------
अधिक माहिती:-
त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-

कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोस्तावन म्हणून देण्यात आलेली होती.
पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.

काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.
सर, पाणी पुरवठयाच्‍या साधनासाठी,विहिरीसाठी...इत्‍यादी करीता एक, दोन ...दहा गुंठे जमीन विक्री करीता परवानगी मागण्‍यासाठी अर्ज प्राप्‍त होत आहेत .सदर परवानगी देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत काय असल्‍यास कोणत्‍या अधिनियमान्‍वये / शासन निर्णयान्‍वये आहेत, नसल्‍यास कोणत्‍या अधिनियमान्‍वये / शासन निर्णयान्‍वये आहेत या बाबत कृपया लवकरात लवकर माहिती दयावी ही विनंती.
सदर परवानगी देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना नाही. सदर विहारीच्या पाण्याचा उपयोग सार्वजनिक लोकांना होत असेल तर जिल्हाधिकारी तुकडे जोड तुकडे बंदी क्याद्याखालील नियम १९५९ मधील नियम ६ ला अधीन राहून परवानगी देण्यास सक्षम आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by ganesh
25-04-2014
ganeshpingale2014@redifmail.com

अ या काब्जेदाराने त्याच्या नावें असलेली जमीन ब या व्यक्तीस रजिस्टर खरेदीने विकली परंतु त्या जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कात क,ख, म, र या व्यक्तीचे नावें आहे त्यातील ख व म या व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांचे वारस लागले नाहीत तरी रजिस्टर खरीदी, रजिस्टर कार्यालयाने इतर हकाकात नावें असताना केली आहे. तरी सदर गटावर ब या खरेदीने घेतलेल्या व्यक्तीचे नाव लागेल किवा कसे याबाबत मार्गदर्शन मिल्नेस विनंती आहे.
खरेदीदाराचे नाव लागेल. जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कात क,ख, म, र या व्यक्ती व त्यांचे वारस यांना नोटीस देऊन प्रकरण निकाली काढावे. आक्षेप आल्यास विवादित प्रकरण नोंदवून निकाली काढावे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सर, मुखत्यारपत्र कीती ( नावे ) प्रकारचे असतात. विशेषतः तसेच जमीनीसाठी, घरासाठी कोणते मुखत्यारपत्र असते. जर मुखत्यारपत्रामधे सही करणारे ७ पैकी ३ हिस्सेदार मयत असतीस तर मुख्यातर पत्र आपोआप रद्द होते का. जर होत नसेल तरते रद्द करता येते का.
मुखत्यार अधिनियम १८८२ नुसार सर्वसाधारण मुखत्यार पत्राचे ८ प्रकार आहे. क्रमांक २ चा नमुना मालमत्ते करिता वापरतात. मुखत्यार करून देणार जिवंत असेल तरच मुखत्यार पत्राचा अंमल होतो. जो पर्यंत मुखत्यारनाम रद्द करत नाही तो पर्यंत ते कायम असते.मुखत्यारनाम रद्द करत करता येते.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

आमच्या् राहत्या घरांची विभागणी म्हणजे अ,ब करावयाची आहे. तसेच जमीनीची सुध्दा वाटणी करावयाची आहे. जर सामोपचाराने होत नसेल तर लोकन्यायालयामध्ये अर्ज केला तर चालेल का. लोक न्यायालयामध्ये अशा केसेेस स्वीकरतात का.
माझ्या मते प्रलंबित असलेल्या केसेसवर सामोपचाराने निकाली काढण्याबाबत लोकन्यायालयामध्ये कार्यवाही केली जाते. आपणास मालकीहक्क करिता नव्याने दावा दाखल करावा लागेल.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

महसुल विभागातील नायब तहसिलदार (म १) व नायब तहसिलदार (म२) च्‍या कामाची विभागणी बाबत कोणता शासन निर्णय आहे त्‍याबाबत माहीती दयावी.
महसूल व वन विभागाचे आदेश क्र संकीर्ण2006/प्रक्र275/ई-9 दिनांक 20 सप्‍टेंबर 2010 अन्‍वये निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार महसूल यांचे कामांची विभागणी केलेली आहे

Reply by रामदास के कोळगने | नायब तहसीलदार

नायब तहसिलदार सावर्गाच्या कामाची विभागणी बाबत शासकीय आदेश नाही. तहसील स्तरावर नायब तहसिलदार यांनी त्यांचे कडे सोपविलेल्या सर्कलचे काम काज पाहणे अपेक्षित आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by Sandeep
22-04-2014
patilsandeep737@gmail.com

सर,
एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
पदानवत कुठल्या कारणांने केले कुपया नमूद करावे .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

जमीन महसूल कायदा १९६६ कलम २४७ आणि २५८ विषयी माहित
सांगा
जमीन महसूल कायदा १९६६ कलम २४७ नुसार वरिष्ठ (सक्षम) अधिकारी यांचे कडे अपील करण्यासंबंधी आहे. तर २५८ पुर्विलोकना बाबत तरतुदी करिता आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by किरण
21-04-2014
kiranpwr10@gmail.com

महोदय, मला माझ्या आस्थापनेने पितृत्व रजा नाकारली असून, कारण दिले आहे कि महाराष्ट्र नागरी सेवेत तसा नियम नाही. मला तसा जी आर पण मिळला नाही आहे. कृपया मला मदत करावी. मला महाराष्ट्र शासनाचा पितृत्व रजेचा जी आर मिळवा किवा लिंक द्यावी जेणेकरून मी तिचा लाभ घेऊ शकेन हि विनंती. धन्यवाद.
महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमात या बाबत तरतूद नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by ravi
20-04-2014
virravi@3gmail.com

सर, तलाठी, कोतवाल यांचा कार्यालयीन वेळ कोणता ? आणि जर ठरलेल्या वेळात तलाठी कार्यालयात हजर नसेल तर ते कोणत्या कामासाठी गेले त्या बाबत लेखी नोंद कार्यालयात ठेवली जाते काय ?
तलाठी यांचे कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सांय ५.०० अशी आहे. जर तलाठी बाहेर जाणार असतील तर त्यांच्या सजातील हालचाल नोंदवहीत याची नोंद घेतली जाते.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

मी नांदूर शिंगोट येथील रहिवासी आहे .आमचे सी टी सर्वे न ४३७ असून तो वर्ग अ आहे आम्हाला कर्ज घ्य्याचे आहे त्यासाठी बांधकाम आर आर सी आहे त्यासाठी कोणाची परवानगी लागेल व त्यासाठी काय काय दस्तावेज लागतील व कोणाची परवानगी लागेल कर्ज बँक ऑफ महारास्त्र सविस्तर माहिती द्यावी हि नम्र विंनती
ज्या बँके कडून कर्ज घ्यायचे आहे. त्यांचे कडे संपर्क करावा.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सर, पण अजूनही मला समजले नाही कृपया जरा सर्विस्तरपणे सांगा.

एकत्रीकरण केलेल्या म्हणजेच गट नंबर पडलेल्या जमिनीतील हिस्सा / क्षेत्र लगतच्या धारकाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस विकता येतो का ? अशा व्यवहारास तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यामधील कलम ३१ प्रमाणे जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते का ?

कृपया १९४७ चा अधिनियम पाहावा

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

एकत्रीकरनाच्या वेळी तुकडा म्हणून नोंद झालेली असेल तर परवानगीची गरज नाही.इतर वेळी मात्र परवानगी आवशक आहे

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

१. एकत्रीकरण केलेल्या म्हणजेच गट नंबर पडलेल्या जमिनीतील हिस्सा / क्षेत्र लगतच्या धारकाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस विकता येतो का ? अशा व्यवहारास तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यामधील कलम ३१ प्रमाणे जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते का ?
महोदय, माझ्या चार पैकी लहान भावाने आमच्या वडिलांच्या मुत्यूनंतर आमचे रहाते घर ग्रामपंचायतीच्या (८ अ )असेंसमेंन्टला लावून घेतले आहे. परंतु मी माहीतीच्या आधार माहीती मागविली असता, ते घर कुठच्याही ठरावाद्वारे ,बाँन्ड द्वारे, वा मुत्यूपत्राद्वारे नोंदविलेले नाही. तरी हे घर पुन्हा सर्व चार भावांच्या नावे होण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करावे. ही विनंती. धन्यवाद
आपण गट विकास अधिकार यांचे कडे अपील दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१९८८ साली माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी जमीन खरेदी केली मोठा भाऊ म्हणून चुलत्यांचे नाव लावले माहे वडील हयात नाहीत , सध्या चुलते वारस म्हणून सुद्धा आमचे नाव लावण्याला तयार नाहीत वारस म्हणून नाव कसे लावता येईल .७/१२ मध्ये फक्त चुलत्यांचे नाव आहे .आमचा सुद्धा हक्क आहे अशी नोटरी चुलत्यांनी ५ वर्षापूर्वी करून दिली आहे त्याची एक प्रत आमच्याकडे आहे .पण ७/१२ मध्ये ते आमची नावे लावत नाहीत काय करावे
कृपया १९८८ सालचे खरेदी खतात खरेदी घेणार या सदरी आपले वादिलाचेही नाव असणे आवश्यक आहे.
जर जमीन खरेदी करताना आपले वडिलांनीही काही रक्कम दिली असल्यास व त्या बाबत आपणाकडे पुरावा असल्यास आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून आपले वडिलांचा व पर्यायाने आपला हक्क सिद्ध करू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
सवरक्षित कुळ चे इतर हक्कात नाव असतांना अन्दंजे २५,३० वर्ष नंतर कुळाने मालकी हक्काची तहसीलदार सर यांचे कडे मागणी केली, त्या नंतर त्यांना मालकी हक्क प्रदान करण्यात आले . सदर जमीन मूळ मालकाने दोघांना खरेदी खत आधारे विक्री केली व आज त्या दोघांचे नाव मालकी हक्कात आहे ,तहसीलदार सर यांनी दिलेल्या निर्णयात वरील दोघांचे खरेदी खत अवैदय ठरवून कुळास मालकी हक्क प्रदान केले व तसेच कुळाचे प्रमाणपत्र वितरीत केले व आदेशित केले कि प्रमाणपत्र च्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करण्यात यावी . प्रश्न असा आहे कि वरील खरेदी घेणार दोघांची नावे कमी करणे बाबत आदेश नाही तरी निर्णया आधारे व प्रमाणपत्र आधारे खरेदीदाराचे नावे कमी करता येतील का या बाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे

सौरीक्षित कुल असेल तर , अन्य व्यक्तीचे कुल म्हणून नाव लागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सौरीक्षित कुल कृषक दिनी मालक झालेला आहे.
जर मिल्कातीला कुल असेल तर , मालक व कुल यांनी संयुक्त रित्या विकणे आवशयक आहे. एकट्या मालकाला विकत येणार नाही. त्याही पेक्षा सौरीक्षित कुल कृषक दिनी मालक झालेला आहे. त्यामुळे मालकाला जमीन विकण्याचा अधिकार नाही.
कृपया आपण अपील करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन महसुल कायदा १९६६ कलम २४७ आणि कलम २५८ विषयी माहिती

Question by kishor jadhav
07-04-2014
kishorjadhav151@gmail.com

महोदय, शासनाच्या कोणत्या परिपत्रकाद्वारे तहसिलदार हे अवलंबुन प्रमाणपत्र निर्गमित करतात. कृपया कळवा.

Question by kishor jadhav
07-04-2014
kishorjadhav151@gmail.com

Purgrasta sathi aarakshit jamini war aslele atikraman kadhnya sathi shaskiya nirdharit pranali dware karawahi babat kalwine

This page was generated in 0.30 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3460
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3