जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by mnm
26-03-2014
madhavnmule@gmail.com

सर विदर्भातील काही जील्‍हामधील 7/12 अभीलेखातील ईतर अधीकारात "नैमीतीक सत्‍ता प्रकाराने शर्तीवर धारण केलेले शेत" या नावाचा बोजा आहे वरील बोजाचा अर्थ काय याबाबत कुठला gr आहे का
सेवा पुस्तिकेतील मंजूर नोंद रद्द करता येईल काय? असल्यास, कोणत्या सेवा नियमांनी करता येईल.
पोलिंग personals ट्रेनिंग साठी PPT , video असल्यास plz share करावे
audio visual फिल्म youtube वर हि आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भारत निवडणूक आयोग यांचे संकेत स्थळावर निवडणूक प्रक्रिया व EVM यांचे बाबत dhvani चित्रफित आहे . सर्व बाबी समाविष्ट केलेल्या आहेत.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कृपया निवडणूक २०१४ विभागास भेट द्या , उपलब्ध करण्यात आले आहे.

Reply by MCS Maharashtra | इतर

मंडळ अधिकारी याचे कडून अहवाल आला असता, महारष्ट्र सरकार गुरचरण जमिनीच्या ७/१२ इतर हक्क सदरी तलाठी सजा ०-०५-० व पोलिस स्टेशन ०-०३-१ राखीव शेरा देनेस विनंती केली आहे. तर तहसीलदार यांना तसा आदेश तलाठी यांना देत येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.
नायब तहसीलदार विभाग बदली बाबत शासन निर्णय पलोड करावा.

Question by mohan
22-03-2014
mohanmsutar@gmail.com

साहेब
आपण संगेतले प्रमाणे शासनाकडून ३हे .१५आर साठी १७०००० रुपये मंजूर झालेले आहे . त्या पैसे मदे ४०आर शेत जमीन सुद्धा मिळत नाही .आमचे पर्स्तीती गरीब आहे .दरोरोज कामाला गेल्या शिवाय पोट भारत नाही सद्याचे भोगावत किमत भाराने अवगड आहे .१९९७ मदे शेत जमीन गेले आहे. कोर्टात गेल्याने १९९७ पासून २००० पर्यंत आमचे व्याज देनेत आलेले आहे . सदर आमचे शेत जमीन असेल तर १७ वर्षाचे उत्पन्न विचारे करून भोगावत किमत न भरत शेत जमीन
मिळण्याचे माहिती द्यावे करण आमचे वर शासना ने कृपा करून जमीन देण्याचे मार्ग सांगावे.कारण शेत जमीन गेले नंतर मला खूप पास्च्यातर झालेले आहे. पैसे नसलेने मी फार अडचणीत आलेले आहे.मोबदला एवजी भोगावत किमत न भरता जमीन मिळण्याचे माहिती द्यावे.
सर आमची गावी सामाईक जमीन आहे त्या जमिनीचे ६ मुख्य वारसदार व त्यांचे सह्हीसेदार यांची सातबारावर नावे आहेत तर या जमनीतील ३ गुंठे जमीन आम्ही सार्वजनिक मंदिर बांधण्यासाठी गिफ्ट डीड तयार करणार आहोत तर या गिफ्ट डिडवर सही ६ मुख्य वारसदार यांच्याच चालतील कि सातबारावरील सर्वांची सही लागेल काय गिफ्ट डिड रजी .करणार आहोत तर याची माहिती द्यावी .
मुख्य ६ वारसदार व त्यांचे सह हिस्सेदार ?
ज्या सर्वांचा मिळकतीमध्ये हक्क आहे , ते सर्व जन जर एकत्रितरीत्या ३ गुंठे जागा दान करत असतील , त्या सर्वांची दान पत्रावर सही आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mahadeo dane
21-03-2014
mahadeodane444@gmail.com

सर
कुळाला कुळ कायद्यांतर्गत जमीन मिळाली कुळाची नोंद कब्जेदार सदरी झाली परंतु काही वर्षानंतर तहसिलदार यांनी मुळ जमीन मालकाचे नावे जमीन करण्याचे आदेश दिले परंतु आजही जमीन कुळाच्या ताब्यात आहे तर जमीनीला कुळाचे नाव लावण्यासाठी काय करावे लागेल ?
एकदा कुळाचे नावे जमीन झालेवर , पुन्हा जमीन मालकाचे नाव अगदी काही प्रसंगी लागते. जर कुल कायदा तरतुदींचा भंग झाला असेल तर कलम ८४ क अन्वये जमीन शाषण जमा होते. कलम ३२ प खाली वाटप करताना , पुन्हा मालकास जमीन मिळू शकते .
अश्या अपवादात्मक परीस्थिशिवाय मालकाचे नाव परत लागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. वास्थुस्थिती तपासून पहा व त्या प्रमाणे आपण प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करू शकता.
अन्यथा पुन्हा ७० ब कलमाप्रमाणे कुल म्हणून नाव लागण्यासाठी , मालकाने जमीन आपणास कसण्यासाठी दिली पाहिजे व आपण व जमीन मालक यांचेत कुल वहिवाट संभंध प्रस्थापित होणे आवश्यक. मालक सध्या स्थिथित आपणास जमीनकसण्यास देणे दुरापास्त आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर पोलिस स्टेशन कडून १०७, ११६ (3) मध्ये तहसीलदार कडे इस्तेगाषा प्राप्त होते त्यानुसार जाब देणार यास समन्स काढतो परंतु पो स्टे कडून समन्स बजावणी करून परत येत नाही किंवा जाब देणार हजर होत नाही तेव्हा काय कारवाई करावी
पोलिस समन्स बजावणी करत नसतील तर सदर बाब पोलिस अधीक्षकांना कळवावी .
आपण warrant हि काढू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

समन्स बजावणी करण्याची कार्यवाही आपल्या स्तरवरून करावी. जाब देणार याचे समाजातील प्रतिमा पाहून कलम १११ खाली आदेश काढण्याची कार्यवाही करावी. नाही तर ११६ (६) नुसार प्रकरण नास्तीब्ध करावे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

एका माणसाचे नावाने स न ५/१ शेत्र ०.९८ व ५/२ शेत्र १.२१ हेक्टर जमीन आहे परंतु ७/१२ वेग वेगळा आहे दोनि जमिनीचा एकत्रीकरण होवून ७/१२ एक होतो काय व तसे आदेश करण्याच अधिकार कोणास आहे
मुंबईचा जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे आंणी त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ व नियम १९५९ नुसार जमाबंधी आयुक्त असे आदेश पारित करू शकतात.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सर १०७, ११६(3) मध्ये समन्स कडून सुधा जाब देणार हजर होत नाही तेव्हा सदर केस किती महिने ठेवावी व कोणती आदेश पास करावा अशा परिस्तितित केसेस चालविणे बंधनकारक आहे काय
सी. आर. पी .सी . १९७३ कलम ११६ (६) नुसार अपवाद वगळता ६ महिन्यात दंडाधिकारी यांनी प्रकरण निकाली काढणे अपेक्षित आहे

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by mn
19-03-2014
madhavnmule@gmail.com

कुळाने मुळ मालकाकडुन महसुल वीभागाव्‍दारे purchase certificate व्‍दारे जमीन खरेदी केल्‍यानंतर भोगवटदार 1 जमीन भोगवटदार वर्ग 2 होते का
कुल कायद्या अंतर्गत जमीन खरेदी करून १० वर्ष झाले असतील तर नवीन सुधारणेनुसार भोग्वातदार वर्ग १ होते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मनं
18-03-2014
madhavnmule@mail.com

पुनरवसन अंतर्गत प्राप्‍त झालेली जमीन भो वर्ग 2 आहे सदर जमीनीचे आपसात वाटणी करण्‍यासाठी सहहिसेदारांनी तलाठी यांचेकडे 100 रु चे स्‍टॅपवर अर्ज सादर कंला आहे सदर जमीन भो वर्ग 2 असल्‍यामुळे सहहिसेदाराची वाटणी करता येईल का याबाबत कुठला gr आहे का
सह हिस्से दार यांनी नोंदणी krut दस्त द्वारे वाटप करणे आवश्यक .अथवा tahsildar यांचे कडे अर्ज करून कलम म.ज.म. आ. १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप करून घ्यावे.
अन्य परवानगीची गरज नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by बडवणे
17-03-2014
ppbadwane333@gmail.com

एखादया कर्मचा-यावर फौजदारी झाली असल्‍यास त्‍यास पदोन्‍न्‍तीसाठी काही कायदेशिर अडचण येते का
येऊ शकते . मात्र काही वेळी (very rare ) फौजदारी कारवाई अधीन पदोन्नती दिली जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ च्या कलम ४४अ (२) यानुसार अदोगिक वापरासाठी बांधकाम मंजुरी आधीच विनापरवाना बंध्काम्केले असल्यास दंड भरावा लागतो का.तसा अर्ज आम्ही पूर्वी बांधकाम चालू करण्या आधी मा जीलाह्धिकारी यांच्कडे केला होता त्याची पोच पावती आहे आता आम्ही नगर रचना संचालक यांचेकडून बांधकाम मंजुरी परवानगी घेतली आहे. कृपया आम्हास दंड भरावा लागेल का.
प्रश्नावरून दंड भरण्याची गरज नाही.
औद्योगिक वापर सुरु झाले बाबत तहसीलदार यांना कळवणे आवश्यक असते. आपण पूर्वीच जिल्हाधिकारी यांना कळवले आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by V.M.Tamboli
15-03-2014
vsmaner@gmail.com

आदरणीय महोदय,
महसूलली कोर्टामध्‍ाील अपिलांचे निर्णयामध्‍ये मुस्लिम कायदयाचा विचार करणे आवश्‍यक आहे काय ?
होय. मुस्लिम व्यक्तिगत ( personal ) कायद्याचा विचार करणे आवश्यक आहे.
उ.दा. वारस.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री, किरण पाणबुडे साहेब, नमस्कार माझा प्रश्न असा आहे कि, ग्रामपंच्यायतिने आमची मोकळी जागा होती त्यावर ग्राम पान्च्यायतीचे नाव लावले आहे त्यावेळी ग्राम पंचायत आमच्या विरोधात होती व आमची भांडणे होती त्यावेळी आम्ही तसा अर्ज दिला कि ती जागा आमची आहे परंतु त्यांनी भांडणामुळे आमच्या अर्जावर कोणतीच करवाई केली नाही व आमच्या गावचा पहिला १९७० ला सिटी सर्वे झाला त्या वेळी सुद्धा आम्ही सिटी सर्वेला आमचा अर्ज दिला कि ग्रामपंचायतीचे लागलेले नाव चुकीचे आहे ती जागा आमची आहे त्यावेळी त्यांनी तसा उल्लेख केला त्या जागेवर आम्ही objection घेतले व त्या जागेवर आम्ही claim केला आहे म्हणून दुसरा १९९५ ला सिटी सर्वे झाला त्या वेळी सिटी सर्वे ने आम्हाला त्या बाबत नोटीस दिली नाही व ग्रामपंचायतीचे नाव लावले परंतु आता ग्राम पंचायत आमची आहे व आम्ही आता अर्ज करून आमचे नाव त्या जागेला लावले व आता आम्हाला सिटी सर्वे ला आमचे नाव लावावयाचे आहे तर आम्ही काय केले पाहिजे
राजे ,
१९९५ ला सर्वे झाले नंतर हि आपले नाव मिळकत पत्रिकेला लागले नाही . आपण tyach वेळी अपील करणे आवश्यक होते.
आता आपण अपील दाखल करा.
नाही तर दिवाणी न्यायालयात आपले title जाहीर करून मिळणे साठी दावा दाखल करावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by swami S.G.
14-03-2014
swati.swami@yahoo.com

जर कर्मचारी / अधिकारी pratiniuktivar इतर कार्यालयात कार्यरत असतील तर त्यांचे मुळ सेवापुस्तक कोणत्या कार्यालयात असावे ? या बाबत शासन निर्णय आहे का ?
त्या कर्मचार्‍याचे सेवापुस्तक मुळ कार्यालयातच असले पाहीजे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by Swami S.G.
14-03-2014
swati.swami@yahoo.com

जर एखादा कर्मचारी यांचा निलंबन कालावधीचा निर्णय झाला नसेल अथवा मुळ सेवापुस्तकात त्रुटी असतील तर त्या कर्मचारी यांना तात्पुरते पेन्शन मंजूर करता येते का तसेच रजा रोखीकरण प्रस्ताव सादर करता येतो का ?
कृपया लोकसभा निवडणूक २०१४ साठी निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण बाबत काही साहित्य (PPT व video ) तयार केले असतील तर कृपया Upload करावेत हि विनंती ....
बहुतेक अधिकारी तयार करतातच,त्यामुळे मागणी करण्यात येत आहे ,प्राप्त होताच उपलब्ध करून देण्यात येयील.

Reply by MCS Maharashtra | इतर

तहसीलदार संवर्गातील अधिकारी यांचे मुळ सेवापुस्तक कोणत्या कार्यालयात असते.
जिल्हाधिकारी कार्यालय.
जर प्रतिनियुक्तीवर असेल तर , प्रतिनियुक्ती कार्यालयात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
मी माझ्या धाकट्या भावाला त्याच्या ईच्छेनूसार शेतकीय पूरक व्यवसायाकरीता (शेळीपालन व ईमूपाळन) आर्थिक सहाय्य करावयाचे ठरविले असून त्याकरीता ५ एकर जागादेखील पाहून झाली आहे. पण ती जागा एका आदीवासी व्यक्तीची ३२ग वर्गातील आहे. ही जमिन खरेदी केली तरीही ती बिगर आदीवासी असलेल्या व्यक्तीच्या नावावर होत नाही व लीज वर जरी घेतली तरीही ५ वर्षांपेक्षा जास्त काळ स्वतःकडे ठेवता येत नाही अशी माहीती मला माझ्या मित्राने सांगितली. सदरहू जागा आम्हांस खरेदी करता येईल का? नसेल तर किती वर्षंाकरीता लीजवर घेता येईल. अश्या जागेत व्यवसाय सुरू करताना सरकारी कागदपत्रांची काही पुर्तता करावी लागेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
आपले प्रश्नातच आपण उत्तर दिले आहे.
आपण शाश्नाचे परवानगीशिवाय जमीन खरेदी करू शकत नाही. ५ वर्षापेक्षा जादा काळ भाडेपट्ट्याने घेऊ शकत नाही.
शाश्नाची परवानगी घ्यावी.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

निवडणुकीत लागणारे विविध नमूने,आदेश पाठवा...उदा.वाहन परवाना आदेश,रूट प्लान..वारंट इ.
बरेचशे नमुने श्री भागवत सरांनी निवडणूक २०१४ मध्ये अपलोड केलेले आहेत.

Reply by MCS Maharashtra | इतर

Question by tarte sonal
12-03-2014
tartesonal@gmail.com

सर ,जमिनीचा भाग नकाशा म्हणजे काय ?त्याचा उपयोग कशासाठी होतो?
आपणास गट बुक नकाशा म्हणावयाचे आहे का?
गट बुक नकाशामुळे चातुर्सिमालक्षात येतात.
आराखडा ( lay out ) तयार करणेस आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Tamboli Vahida Musa
12-03-2014
vsmaner@gmail.com

आदरणीय महोदय,
आचारसंहिता कालावधीमध्‍ये सरपंच निवड घेता येईल काय ?
घेण्यास हरकत नाही.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

This page was generated in 0.44 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3