जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अतुल अंभोरे
13-11-2014
ambhore.79@gmail.com
गौण खनिज उतखानन विषये अपिल मध्ये असा निर्णय दिला कि केलेले उत्खनन हे जमीन सपाटीकरण करून शेती लागवड केली आहे व उत्खनन मध्ये निघालेले दगड व माती सभोवती जमा करून ठेवली आहे व त्याची कुठेही वाहतूक केलीली नाही त्यामुळे दंडाचा आदेश रद्द करून नवीन नियम महाराष्ट गौन्खानीज उत्खनन नियम २०१३ मधील तरतुदीचा विचार करून फेर चौकशी करून निर्णय घ्यावा
आता प्रश्न असे आहेत
१ तालुका ecz मध्ये येतो त्यामुळे दगड उत्खनन बंदी आहे .
२ सबब झालेले उत्खनन हे शेतीकरिता आहे परंतु जवळपास ५०० ब्रास पेक्षा जास्त उत्खनन दगड माती चे झाले आहे
३ सबब उत्खन करिता कुठेलेही पूर्वपरवानगी घेतलीलि नाही
४ तसेच एखादा माणूस शेती करिता किती विनामूल्य ब्रास माती उत्खनन करू शकतो
वरील सर्व मुद्द्याचे माहिती मिलाल्वी
Pune Builders Association Vs Tahsildar Haveli , या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने , जमीन सपाटीकरण केले असले तरी , स्वामित्व शुल्क वसूल करणे आवश्यक असले बाबत निर्वाळा दिलेला आहे .
मोजमापाप्रमाणे दंड वसूल करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by तुषार गोकुळ चौधरी
13-11-2014
tahtushar@gmail.com
जर बिनशेती परवानगी ग्र्मापंचायत हद्दीत तहसीलदार यांच्याकडून घेतली असेल त्यानुसार बांधकाम परवानगी देखील घेतली असेल (१९८८ मध्ये) तर अशा जागेवर खातेदारास सुधारित बांधकाम परवानगी हवी असल्यास कोण देऊ शकतो ?
ज्या planning authority च्या अखत्यारीत मिळकत येत असेल , ती planning authority
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सुभाष माजरेकर
13-11-2014
mjrkrganesh@gmail.com
वारस तपास एखाद्याच्या मुत्यूनंतर कीती दिवसातं वा कीती महीन्यात करणे अशी अट आहे का... असेल तर कीती कालावधी. त्याच प्रमाणे वारस तपास प्रकरण गावा मधील असेतर तर आपण तलाठी, तहसिलदार यांच्यापैकी कोणाकडे करावे... तहसिलदारांकडे चालेल का. त्याच प्रमाणे वारस तपास प्रकरण दाखल झाल्यानंतर कीती दिवसांत पुर्ण झाले पाहीजे वा सात बारा मध्ये नांव लावले गेले पाहीजी याचा कालावधी सांगणे
तीन महिन्यात करणे आवश्यक . मात्र विलंब झाला तर , १ रुपया दंड घेऊन , केव्हाही वारस नोंद करता येते.
मयत व्यक्तीबाबत , त्याचे वारसाने तलाठी यांचे कडे वर्दी द्यावी.
वारस नोंद १५ दिवसात पूर्ण करणे आवश्यक .( वाद नसेल तर )
जर वाद असेल तर , तलाठी , उताराधिकारी प्रमाणपत्र न्यायालयाकडून आन ने बाबत आपणास असण्गु शकतात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्निल गायकवाड
13-11-2014
swapnilcp@gmail.com
किरण पाणबुडे साहेब,
नमस्कार.
प्रांत साहेबांच्या म्हणण्यानुसार, 2001-2002 दरम्यान इतर हक्कातील वारस नोंद कब्जेदार सदरी दाखल करण्यासंदर्भात शासन निर्णय झाला. परंतु तो कुठेही आढळत नाही. कृपया मार्गदर्शन असावे.
स्वप्निलजी,
आपण रीतसर लोकशाही दिनात अर्ज करा . तत्काळ दाखल घेतली जायील . यासाठी शःसन निर्णयाची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by AMBHORE ATUL VISHRAM
12-11-2014
ambhore.79@gmail.com
१ पडदा चित्रपत गृह multiplex करण्यासाठी बंद असेल तर बंद असल्याच्या कालावधीत करमणूक कर भरावा लागतो का असेल तर शासन निर्णय
नाही . बंद असले बाबत तहसील कार्यालय/ कार्मुणूक कर विभाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे कळवणे आवशयक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sandeep
11-11-2014
mechmaster7@gmail.com
नमस्कार सर
अत्यंत स्तुत्य असा हा आपला उपक्रम आहे
विषय -विवाहोत्तर जात प्रमाणपत्र
लग्न झालेल्या 'X' स्त्रीला मराठा जातीचे प्रमाणपत्र काढायचे आहे
सदर प्रमाणपत्रासाठी
१)१९६७ पूर्वीचा वडिलांचा शाळेचा दाखला उपलब्ध आहे .
२)तसेच दिराचा शाळा सोडल्याचा दाखला पण आहे.
(तहसील कार्यालयात स्त्री च्या लग्नापूर्वीच्या नावावर प्रमाणपत्र मिळेल असे कळले )
सदर प्रमाणपत्र "X" स्त्री च्या लग्नानंतरच्या नावावर मिळण्यासाठी काय करावे लागेल.
विवाहोत्तर मराठा जात प्रमाणपत्रे शासनाची मार्गदर्शक तत्वे काय आहेत त्याविषयीचा GR मिळावा
कृपया मार्गदर्शन करावे
हि विनंती
विवाहानंतर नाव बदल झाले बाबत शाषण राजपत्रात प्रसिद्धी देणे आवश्यक .
GR महाराष्ट्र शाश्नाचे संकेत स्थळावर मिळेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दौलत तुकाराम मेणसे
08-11-2014
www.doulat@gmail.com
7/12 आनेवारी करण्यासाठी काय प्रोसेस आहे?
आणेवारी म्हणजे मिळकतीतील सह्धारकांचे हिस्से निच्छित करणे.
हिस्स्याबाबत वाद नसेल तर , परस्पर समितीने हिस्से निचित करता येतील.
मात्र वाद असेल तर , न्यायालय हिस्से निछिती करून देते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pradip Namdeo Borle
07-11-2014
pradip.borle6226@gmail.com
मा.महोदय, मुस्लिम शेतकरी मयत झाला.त्याचे वारसान नोंद मुस्लिम वारस कायदानुसार करावी असा अर्ज तलाठ्याला प्राप्त झाला. मुस्लिम वारस कायदानुसार नोंद मजूर करता येईल काय ? तसेच मयत शेतकरी ह्याचे वारस कोणते होईल.कृपया माहिती द्यावी.
वारस नोंद व्यक्तीचे व्यक्तीक कायद्याप्रमाणे करणे आवश्यक .
प्रशांधीन वारस नोंद मुस्लिम वारस कायद्याप्रमाणे करणे आवश्यक
मुस्लिम कायद्यात , शिया व सुन्नी असे दोन शाखा आहेत . त्या प्रंमाणे वारस नोंद करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र
07-11-2014
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर आमचे वडिलांचे २००८ मध्ये निधन झाले वडिलाचे नावे स्वकष्टित व वडिलोपार्जित जमीन आहे वडिलांनी मृतू पत्र तयार करून ठेवले आहे त्यानुसार मोठाभाऊ वाटणी करून देण्यास तयार नाही कारण त्यास खराब जमीन वडिलांनी दिली आहे त्याचे म्हणणे आहे कि मृतू पत्र रागीस्तेर नाही त्यमुळे काही होणार नाही वडिलांनी मृतू पत्र नोटरी केले आहे गावाकडील शेती करणाऱ्या भावच्या मुलाने आमच्या वडिलांचे मृतू पत्र असताना वारस नोंद केली व आमच्यावर वाटपाचा दावा कोर्टात केला आणि संपूर्ण जमिनीवर कब्जा सेल कृपया खालील माहिती द्या
१ लवकर वाटणी होण्यासाठी मृतुपत्र कोर्टाला दिले तर वाटपाचा दावा निकाली निघेल का
२ मृतुपत्र रेगीस्तेर पाहिजे का
३ मृतुपत्र होऊन ७ वर्ष झाली आत्ता मृतुपत्र वाटणीसाठी ग्राह्य धरले जाईल का
४ वडिलांनी मृतुपत्रात वडिलोपार्जित जमिनी मध्ये आईस हिस्सा दिला नाही त्यासाठी आईस भांडता येईलका
५ गावाकडील भावाने शेतीची वाटणी नसताना जमिनी मध्ये घर बांधले आहे त्याची तक्रार कुठे करता यईल
६ भावाच्या मुलास वारस नोंद करण्याचा व कोर्टात दावा दाखल करण्याचा अधिकार आहेका
१. होय
२.आवश्यक नाही
३.होय.
४.नाही
५.घर विनापरवानगी बांधले असेल तर स्थानिक महसूल अधिकारी -Tahsildar
६. दावा कोणीही दाखल करू शकतो. आपण मृत्युपत्राची प्रत न्यायालयात सादर kara.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by santosh jaware
06-11-2014
jaware_sb@rediffmail.com
एखाद्या खातेदाराने शासकीय जमिनीतून ( महसुल खाते) उपलब्ध कच्चा रस्ता डांबरीकरण करणे करिता मागणी केली आहे. आशा वेळी रस्ता परवानगी देता येत नाही. परंतु खातेदारास लेखी उत्तर की द्यावे?
उत्तर देऊन टाका. त्यांना कळवा , शाश्नाकडून जमीन प्रदान करून घ्या. मग dambarikaran kara
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandeep Sutar
06-11-2014
sandeepms30@gmail.com
Sir majhi zamin (0-03-00) Modified Draft development plan 2008-2028 for bhiwandi surrounding notified area prepared for MMRDA ya madhye rural areat aahe.NA karnesathi konachi permission & kiti period lagel? Mage asa vachle hota ki Na sathi collector chi permission not required plz help I want loan for construction of house.thanks in advance
Question by कुणाल अंकुश जाधव
05-11-2014
mr.k1387@gmail.com
एका लिपीक कर्मचाऱ्याची सेवेत रुजू होताना शाळेतील दाखल्यावर असलेली जन्मतारीख कार्यालयीन अभिलेख व नियुक्ती अधिकारी यांचे कार्यालयात नोंद करण्यात आलेली आहे. परंतु, सदर कर्मचाऱ्याची जन्मतारखेच्या दाखल्यावरील जन्मतारीख 1 वर्ष 5 महिने कमी असून ती कार्यालयीन अभिलेखात नोंद करणेसाठी कोणती प्रक्रिया आहे व त्याबाबतचे शासन निर्णय मिळणेस विनंती आहे.
Question by santosh jaware
05-11-2014
jaware_sb@rediffmail.com
एखाद्या खातेदाराने शासकीय जमिनीतून ( महसुल खाते) उपलब्ध कच्चा रस्ता डांबरीकरण करणे करिता मागणी केली आहे. आशा वेळी रस्ता परवानगी देता येतो का?
Question by संतोष जवरे
04-11-2014
jaware_sb@rediffmail.com
कोर्ट वाटप प्रकरणी दिवाणी न्यायालयाचा आदेश्नुसार राहत्या घर च्या खोली वाटणी बाबत आदेश असेल तर त्याची कारवाई करता कोणाकडे पाठविणे योग्य राहील. कृपया मार्गदर्शन करावे.
Question by संतोष जवरे
04-11-2014
jaware_sb@rediffmail.com
७/१२ विभक्त करण्या करिता कोणाच्या परवानगी असणे गरजे आहे. तसेच कोणते अहवाल अपेक्षित आहेत.
तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्या नुसार , विभाक्तीकारनामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र तयार होता कामा नये
जर मिळकत वारसा हक्काने असल्यास , प्रत्येकाचा हक्क निच्छित करणे आवश्यक
जर प्रत्येकाचा hissa निच्छित kelela असल्यास , TILR yanche kade आकार्फोड करून मिळण्यासाठी अर्ज करा
akatphod zalenantar talathinyanchekadun 7/12 vibhakata kela jael.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
02-11-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
सर मी तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ८५ प्रमाणे जमिनीचे वाटप करून मिळणेबाबत अर्ज सादर केलेला आहे, अर्ज सादर करून जवळ-जवळ ६ महिने झाले आहेत परंतु तहसीलदार अर्जावर काहीच कार्यवाही करत नाहीत म्हणून मी त्यांना याचे कारण विचारले असता ते मला असे सांगतात कि कलम ८५ प्रमाणे जमिनीचे वाटप करावे असा नियमच नाही म्हणून मी वाटप करू शकत नाही, या कारणामुळे मी प्रांतसाहेबांना भेटलो असता त्यांनी मला असे सांगितले कि, मीसुद्धा काहीच करू शकत नाही.
तरी सर आपण मला योग्य तो सल्ला द्यावा हि विनंती.
आपण लोकशाही दिनी म. जिल्हाधिकारी यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दया .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahendra
01-11-2014
mahendraj165@gmail.com
सर
कुल कायदा ४३ ची जमीन आहे .३२ ग झाले आहे व ती कुलाकडून खरीदी करून २५ ते ३० वर्ष झाली आहे तर ७/१२ वरील कुल कायदा कलम ४३ लागू आहे हा शेरा कमी होऊ शकेल का?३२ म साठी काय करावे लागेल ?
कुल कायदा सुधारणा कायद्यानुसार १० वर्षापेक्षा खरेदी किंमत निच्छित झालेच कालावधी houn गेला असल्यास , शर्थ काढून taknechi आहे . जमीन धार्याच्या २०० पात नजराणा तहसीलदार यांचे कडे जमा करणे avshyak
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कुल कायदा सुधारणा कायद्यानुसार १० वर्षापेक्षा खरेदी किंमत निच्छित झालेच कालावधी houn गेला असल्यास , शर्थ काढून taknechi आहे . जमीन धार्याच्या २०० पात नजराणा तहसीलदार यांचे कडे जमा करणे avshyak
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सु. माजरेकर
29-10-2014
mjrkrganesh@gmail.com
कुल कायद्याच्या जमीनिची सात बा-यावरती नावे असलेल्यांच्या प्रत्येकी seperate वाटणी करु शकतो का... कींवा सदर जमीन विकता येवू शकते का...
१. कुल कायद्याच्या जमिनीची ३२ ग किंमत ठरली असेल तर , परवानगीने जमीन विक्री/वाटप करता येऊ शकेल.
२.जर ३२ ग किंमत ठरलेली नसल्यास , केवळ कुलास त्याचा कुल वहिवाट हक्क (Interest ) विकत येणार नाही . मात्र कुल व मालक एकत्रित( संमतीने ) जमीन विकू शकतात .
३. अद्याप कुळाचे नावे किंमत ठरलेली नसल्यास , व अश्या जमिनीस एका पेक्षा जादा कुले असल्यास , त्यांचे वाहिवातीबाबत क्षेत्र स्पष्ट नमूद असते . जर क्षेत्र नमूद नसेल तर , वाहिवातीप्रमाणे कुल जमीन कसतात . मात्र अश्या क्षेत्राची भूमी अभिलेख खात्य मार्फत मोजणीसाठी तांत्रिक अडचणी येतील . मोजणी वेळी , जमीन मालकास हि notice द्यावी लागेल , त्यावेळी मालक हरकत घेयील व आपली निस्च्छित वहिवाट मोजानिदारास सागणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहासकुमार दुधे
29-10-2014
s.dudhe12@gmail.com
सर, माझे ७/१२ च्या इतर अधिकार सदरी बोजा सहकारी सोसायटी इकरार कारी सो न ग घेणार असा शेरा आहे. त्याचा अर्थ काय आहे. तसेच तो शेरा काढून टाकण्याकरिता काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.
Question by Ganesh Pingale
29-10-2014
gpingale8181@gmail.com
अव्वल कारकून संवर्गात मी आक्टोंबर २००६ मध्ये उत्तीर्ण झालो आहे. व ६/१२/१९९३ मध्ये सेवेत रुजू झालो आहे. व माझी जन्मतारीख १६/७/१९६८ आहे. माझ्या बरोबर असलेले अ व ब हे अनुकमे आक्टोंबर २००६ मध्ये उत्तीर्ण झाले मात्र त्यांचा सेवेत रुजू झाल्याचे वर्ष हे जून १९९४ आहे. त्यांचा जन्मतारीख अनुकमे १९६७ आहेत. सेवाजेष्टाता यादीत अ, ब व त्यानंतर माझे नाव दिले आहे हे बरोबर आहे किवा कसे. वर्ष निहाय जेष्ठता करता सेवेत रुजू झाल्याचा १९९३ चा मी एकच कर्मचारी आहे त्यामुळे अव्वल कारकून संवर्गात जरी आम्ही आक्टोबर २००६ पास असलो तरी रुजू होण्याचा दिनक व वर्ष हे १९९३ नंतरचे आहे. तरी याबाबत माझे नाव अ व ब च्या पहिले यावयास पाहिजे हे बरोबर आहे किवा कसे असल्यास कृपया परिपत्रक सह कळवावे हि विनंती.
महाराष्ट्र नागरी सेवा ( ज्येष्टतेचे विनियमन ) नियमावली १९८२ च्या ४ (३) अन्वये ,
जेथे कोणत्याही दोन किंवा अधिक व्यक्तींच्या नवे एखादे पद , सवर्ग किव्न्हा सेवा यातील नेमणुकीच्या तारखा , आवश्यक तर , मानीव तारीख नेमून दिल्यानंतर निर्धारित केलेल्या तारखा एकाच असतील तर , वयाने ज्येष्ट असलेली व्यक्ती ज्येष्टाक्रम निर्धारित करण्याच्या प्रयोजनार्थ ज्येष्ट म्हणून मानली जायील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल अशोकराव शिंदे , लिपिक जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर
27-10-2014
rahulshinde700@yahoo.com
नमस्कार सर, मी महसुल खात्यामध्ये सन २००९ पासून कार्यरत आहे. मी वि.जा. अ. या प्रवर्गातील असून पदोन्नतीसाठी पात्र आहे. तथापि अव्वल कारकून पदासाठी आमच्या संवर्गासाठी एकूण ६ पदे मंजूर असून त्यापैकी ३ पदे हि आमच्या संवर्गातून भरनेत आली आहेत व उर्वरित ३ पदे हि अंतर्गत परिवर्तनीय पद्धत्तीने भ.ज.ब. या प्रवर्गातून भरनेत आली आहेत. भ, ज,ब, संवर्गासाठी एकूण ५ पदे मंजूर असताना एकूण ८ पदे (५ पदे नियमित व ३ पदे अंतर्गत परिवर्तनीय पद्धतीमुळे) भरनेत आली आहेत. जेव्हा अंतर्गत परिवर्तनीय पद्धतीने वि.जा.अ, या संवर्गासाठी राखीव जागा उपलब्ध असताना पात्र उमेदवार नसलेने भ.ज.ब या प्रवर्गातील उमेदवारांना पदोन्नती देनेत आली. सध्या वि.जा.अ. संवर्गातील पात्र उमेदवार असून रिक्त पद नसलेमुळे पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत आहे.(कारण वि जा अ व भ ज ब या दोन्ही संवर्गातील पदोन्नती मिळालेले कर्मचारी हे सर्व तरुण वयाचे असलेमुळे नजीकच्या काळात सेवानिवृत्त होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.) त्यामुळे भ,ज,ब संवर्गातील शेवटी पदोन्नत झालेल्या कर्मचार्यास खुल्या संवर्गात वर्ग करून त्याजागी मला पदोन्नती मिळू शकेल काय ? तरी याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळनेस विनंती आहे.
अन्तागत परिवर्तनीय पद्धतीने पदे भरत येत नाहीत.
आता जर भ. ज. ब मध्ये पदे रिक्त असतील तर त्या प्रवर्गातील पदे जी परावर्तीत केली आहेत ती भ. ज .ब मध्ये पुन्हा दाखवणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by TUSHAR PATIL
26-10-2014
patiltushar9009@gmail.com
सर आम्ही एका गट क्रमांकावरअसणारी जमीन घेतली आहे टोटल २८ गुंठे पैकी मी १/३ म्हणजे ९.३३ घेतली आहे तर हद्द कशी फ़िक्ष करावी
हद्द निछिती करण्यासाठी खरेदी खतात , खरेदी केलेल्या जमिनीचे वर्णन केलेले असते . त्या आधारे हद्दी निछिती करता येतात. अथवा प्रत्यक्श्य वाहिवाती प्रमाणे हद्द निछितिं होते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदिनाथ मुंगसे
25-10-2014
adinath5@yahoo.co.in
आमच्या आजोबांची ५ एकर जमिन आहे. माझे वडील एमएसईबी मध्ये नोकरी करुन रिटायर्ड झाले. माझ्या वडीलांना दोन बायका. माझी आई मोठी. माझ्या आईला आम्ही दोन भाऊ व एक बहीण. माझ्या दुसऱ्या आईला एक मुलगा व एक मुलगी. सर्वांचे लग्न झालेले. आता वडील आम्हाला जमीन वाटुन देत नाही. ती जमीन सध्या वडील व माझा सावत्र भाऊ जो पेशाने डॉक्टर आहे ते दोघे करतात. तरी आता मला व माझ्या भावास जमीन मिळवण्यासाठी काय करता येईल व संपुर्ण जमीनीत किती हिस्से होतील.
हिंदू सुधारणा कायदा २००५ प्रमाणे , वडील हयात असेपर्यंत , आपले नावावर जमीन होणार नाही . वडिलाचे मृत्य पश्चात , व जर त्यांनी मृत्य पत्र द्वारे अन्य वारसांना जमीन न दिल्यास आपले नावावर होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
23-10-2014
ravindra.golesar@rediffmail.com
वारस नोंद मंजूर करताना मृत्यू पत्र जर मयताने केले असल्यास ते बघून वारस नोंद मंजूर करतात किंव्हा नाही या बाबत सविस्तर माहिती द्या
म्रुत्यपत्र पाहून legatee ची नावे मिल्कातीस लावली जातात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vilasM
21-10-2014
vilasmhetre1977@gmail.com
तहसिलदार यांची ०१/०१/२०१४ ची जेष्ठता यादी मिळावी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
