जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by abhijeet Barawkar
21-11-2013
abhi1always@gmail.com
What are the latest provisions for e-mutation?
Question by सुनील कावरखे
20-11-2013
sunil.kawarkhe@gmail.com
उस्मानाबाद जिल्ह्यात कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या नोंदीचा फेरफार घेताना एखादी जमीन कंपनी ला विकत घ्यावयाची असेल तर त्यासाठी मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८कलम ६३ अ नुसार अथवा हैदराबाद कुळ वहिवाट अधिनियम नुसार परवानगी आवश्यक असते काय? कंपनी ने सदरील कलमाखाली परवानगी घेऊन पुन्हा फेरफार घेण्यासाठी अर्ज दिला .तर आता या परवानगी आधारे परंतु जुन्या रजिस्टर दस्त आधारे फेरफार घेत येईल का ?अथवा परवानगी नंतर पुन्हा रजिस्टर दस्त करावा लागेल ? का या व्यवहारामुळे शर्तभंग होईल व त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल का ?
परवानगी चे अगोदर खरेदी खत करण्यात आलेले आहे. ८४ क खाली कारवाई आवश्यक.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद नार्हर्राव जोशी
17-11-2013
vinodjoshi71@gmail.com
मराठवाड्यातील १५/१०/१९९४ पूर्वीचे मंडळ निरीक्षकाना पदोनति अवल्कार्कून म्हणून मिळत होती त्यांना १५-१०-१९९४ नंतर अपग्रेड झालेल्या मानल अधिकारी याच्या जागेवर समावेश करता येईल काय
Question by devendra
17-11-2013
jyotitandel82@gmail.com
सर
सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा वरील क्षेत्र ९३.२ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे परंतु त्या हे.आर.चे आकारबंद कागदोपत्री क्षेत्र ५२ .१ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे ओ व तहसील कार्यालायातील सातबारा वरील क्षेत्र ५२ .१ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे मुल सातबारात एकूण ४० हे.आर.चे अतिरिक्त दाखविण्यात येते तरी
प्रश्न १ तरी सदर सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा वरील क्षेत्र दुरुस्ती साठी कोणाकडे अर्ज करावा लागेल
प्रश्न २सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा १/३ क्षेत्र क्षेत्र १७ .८ हे.आर.चे व खराब १ हे.आर.चे मुल मालकांनी सन १९५६ साली कुळ राघो यांना विकून नंतर सन १९५६ साली कुळ राघो यांनी सुरेश व अन्य व्यक्तीला विकली परंतु १९५७ साली सदर जमिनीस कुल म्हणून राघो व गोविंद यांचे कुल म्हणून नोंद झाली
सन १९५६ साली कुळ राघो यांनी सुरेश व अन्य व्यक्तीला विकली असल्यामुळे सातबारा मध्ये मुल मालक २/३ व सुरेश व अन्य व्यक्तीला १/३ असे येते व कुल म्हणून गोविंद यांचे नाव आहे त्यामुळे सदर जमिनीचा सातबारा ची विभागणी करावयाची आहे
व सातबारा अ सुरेश व अन्य व्यक्तीला १/३ आणि सातबारा ब
मुल मालक व कुल गोविंद २/३ करता येणे शक्य आहे का व अर्ज कोणाकडे करावा लागेल व कोणती कागदपत्र जोडावी लागतील
Question by चेतन पाटील
17-11-2013
chetankop67@gmail.com
१-म ज म स च्या कलम १४३ नुसार तहसिलदारांनी नवीन रस्ता किती दिवसात द्यावा असे बंधन आहे.?
२-जर असा रस्ता द्यावयाच्या जागेवर वनविभागाची परवानगी आवश्यक असणारी झाडे असतील तर ती परवानगी मिळण्यास लागणारा कालावधी वरील मुदतीपेक्षा जास्त होत असेल तर काय करावे?
Question by Swati Guruling Swami
16-11-2013
swati.swami@yahoo.com
varisht karyalyane ne karmchari yana stand relive kele asel tar kanishta karyalyane ne relive karave lagte ka ?
Question by चंदर मानवानी
16-11-2013
chandar.manwani@gmail.com
कल्याण काटेमानिवली येथील सर्व्हेनंबर सहित नकाशा पाहिजे.
कृपया उपाधीक्षक भूमी अभिलेख कल्याण यांचे कडे अर्ज करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शे.व.अंभोरे तलाठी वडवली ता.पैठण
16-11-2013
amaranbhore1@yahoo.com
सर
श्री काकडे यांचे नावावर 0 -२१आर
जमीन आहे shri kakde यांनी sunela
०-28 aar chi खरेदी karun दिली आहे punha don महिन्यानंतर देशमुख यांना ०-२१आर खरेदी दिली आहे दोघांनी फेरफार साठी दस्त sadr kele आहे फेरफार konachya navane ghyava
Shri
आक्षेप पणजीत नोंद घ्यावी.
मूळ मालक यांनी ०.२१ आर ऐवजी ०.२८ आर क्षेत्राची विक्री करून दिल्याचे विक्री दस्तावरून दिसून येते. क्षेत्रात जरी तफावत आहे, परंतु एकदा विक्री करून दिल्यानंतर सदर शेती वरून मूळ मालकाचा हक्क संपलेला आहे. ०.28 आर ची विक्री पहिले झालेली असल्याने ०.२८ आर क्षेत्राच्या विक्री दस्तातील ०.२१ आर क्षेत्राची नोंद मंजूर करण्यात येत आहे. उर्वतीत ०.०७ आर क्षेत्रासाठी खरेदीदार यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागावी. असा मंजूर आदेश नमूद कुरुण नोंद मंजूर करण्यात हरकत नाही.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
प्रथम खरेदीखताला महत्व आहे
परंतु फक्त ७/१२ वर जेवडे क्षेत्र आहे त्याचीच विक्री होणे अपेक्षित होते. त्यामुळे तितक्याच क्षेत्राची नोंद होणे अपेक्षित आहे
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by अतिश बनसोडे
13-11-2013
atishnbansode@gmail.com
आदरणीय सर मी आपल्या वेब साईटचा नोंदणीकृत सदस्य आहे, परंतु मला आपल्या साईटवरील महसूल व्यासपीठ या सदरातील प्रश्नोत्तर पहाणेसाठी वारंवार लॉग इन करावे लागत आहे. तसेच लॉग इन झाल्यानंतरही मला सदरचे सदर वाचणेसाठी उपलब्ध होत नाही. कृपया यावर उपाय सुचवावा. धन्यवाद.
महसूल व्यासपीठ हे फक्त महसूल अधिकाऱ्यांसाठी आहे, महसूल कर्मचाऱ्यांसाठी "कर्मचारी व्यासपीठ" सुरु करण्यत येत आहे . तो पर्यंत दिलगिरी!
हा मेसेज आपणाला नोंदणी वेळी सुद्धा पाठविण्यात आलेला आहे. धन्यवाद!
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by Shriram Sonawane
13-11-2013
shriram.sonawane@yahoo.com
इतर विभागाच्या स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी किवा परवानगी देण्यासाठी कोणता नियम आहे.
अन्य विभागाच्या परीक्षेस बसण्यास परवानगी देनेबाबत नियम नाही. तथापि विभाग प्रमुखांना कळवणे आवश्यक आहे.
नोकरीत असताना शिक्षण घेण्यासाठी हि महसूल विभागाचे बंधन अथवा नियम नाहीत/ नसावेत. मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाने या बाबत परिपत्रक फार पूर्वी निर्गमित केलेले आहे
शिक्षण घेताना कर्तव्यात कसूर घडून नये अथवा कामावर त्याचा परिणाम होऊ नये हा उद्देश आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वृषभ चावागोंडा patil
12-11-2013
vrushabh_patil23@yahoo.com
प्लॉट न करायचं असेल तर कay करावलागेल .आणि ते कुठ करायचं असत .त्यासाटी किती खर्च अतो.आणि कागद पत्रे की लागतात.सांगली मध्ये चालू आहे की नाही .मिरज मधील ग्रामीण भागात आहे.
आपला प्रश्न बिन शेती करण्या सम्भांदातील आहे असे मला वाटते. बिन शेती परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदार/ प्रांताधिकारी यांना आहेत.
१ आपणास तहसील/ प्रांत कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल.
२. अर्जासमवेत ७/१२ , नकाशा व इतर कागदपत्र जोडावी लागतील.
३. नगर रचना , जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अभिप्राय घेतले जातात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prakash band
11-11-2013
aslpsb@gmail.com
Potkharab jar kharedi dwara malki , vahiti madhe aala tar tyala kami karnyache aadesh konakadun ghyave ?
पोट खराब एकत्रीकरन झालेल्या वेळी ठरविण्यात आले असेल व त्या नंतर पोट खराब वहीती खाली आणले असेल तर आकारणीत बदल होणे अपेक्षित आहे. आकारणीत बदल करण्यास ६४ नुसार जिल्हाधिकारी सक्षम आहे. त्यामुळे त्या बाबतचा दुरुस्तीचा आदेश १०६ खाली जिल्हाधिकारी यांनी करणे अपेक्षित आहे
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
आपण अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयाकडे अर्ज करावा . परवानगी देण्याचे अधिकार अधिषक/ उप संचालक भूमी अभिलेख यांना असावेत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अतिश बनसोडे
11-11-2013
atishnbansode@gmail.com
बोम्बे इंफेरिअर व्हिलेजेस वतन ऍबोलिशन ऍक्ट 1958 चे कलम 1(2) नुसार उस्मानाबाद जिल्हा सदर कायद्याचे अंतर्गत येतो का?
The act extends to the 1[ Bombay area of the state of Maharashtra] and to the Hyderabad area state of Bombay.Read section 3(23) of Bombay General Clauses Act with section 8 of State Reorganisation Act 1960 .
Osmanabad district is Hyderabad Area of State of Bombay.
So act is applicable. Read section 46AA of Bombay General clauses Act with section 3 of Bombay Reorganisation Act 1960 for better understanding of state of Maharashtra , state of Bombay and Hyderabad Area of State of Bombay .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by devendra tandel
10-11-2013
jyotitandel82@gmail.com
१. फेरफार न २४४६ नुसार तारीख ०१/०९/१९४० रोजी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या नावे सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व अन्य जमीन रिलीज घेतली
२. फेरफार न ४५३६ नुसार तारीख १६/०१/१९५१ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील हे संरक्षित कुल सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ४ दाखल होते
३. फेरफार न ५४२१ नुसार तारीख ३१/१२/१९५६ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील यांचे नाव कमी करून प्रत्यक्श्य वहिवाट म्हणून श्री पांडू माधव यांचे नाव दाखल
४. फेरफार न ११६३६ नुसार तारीख ११/०८/१९६७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत आहेत म्हनुन्ब नाव दाखल आहे ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६
५. फेरफार न ११६६७ नुसार तारीख १६/०८/१९६७ रोजी फारोख्त खताने श्री कमल्या खंडू पाटील यांनी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्यापासून सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ८ खरेदी केली परंतु सदर फेरफार रद्द करण्यात आला आहे
६. फेरफार न १२८५९ नुसार तारीख ११/०१/१९७७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व ६७६ हिस्सा न २ व ६७६ हिस्सा न ६ यांना कुल कायदा कलम ३२ ग ते ३२ र लागू नाही ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३
७. फेरफार न ३२४ नुसार तारीख १२/१२/२००९ रोजी श्री कमल्या खंडू पाटील हे ४० वर्षापूर्वी मयत असून त्यांचे वारस म्हणून श्री पद्माकर कमल्या पाटील व अन्य १० नावे दाखल
महोदय
वरील
फेरफार न ५४२१ नुसार माझे आई चे वडील श्री पांडू माधव हे सर्वे न ६७७ हिस्सा न ८ संरक्षित कुल म्हणून दाखल होते परंतु
१. फेरफार न ४५३६ नुसार तारीख १६/०१/१९५१ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील हे संरक्षित कुल सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ४ दाखल होते त्याचा सर्वे न ६७७ हिस्सा न ८ या जमिनीशी कोणताही संबंध नाही
२. फेरफार न ११६३६ नुसार तारीख ११/०८/१९६७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत आहेत म्हणून नाव दाखल आहे ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६ परंतु सदर ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६ तहसील कार्यालयात उपलब्ध नाही व तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत त्याचा उलेख नाही व फेरफार न ५४२१ नुसार संरक्षित कुल श्री पांडू माधव यांचे नाव कमी करण्याचा उल्लेख नाही
३. फेरफार न ११६६७ नुसार तारीख १६/०८/१९६७ रोजी फारोख्त खताने श्री कमल्या खंडू पाटील यांनी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्यापासून सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ८ खरेदी केली परंतु सदर फेरफार खोट्या फारोख्त खतामुळे रद्द करण्यात आला आहे
४. फेरफार न ११६३६ व फेरफार न ११६६७ हे अनुक्रमे तारीख ११/०८/१९६७ व तारीख १६/०८/१९६७ रोजी ५ दिवसांच्या अंतराने झाले असून दोन्ही फेर्फारात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न होत आहे
५. फेरफार न १२८५९ नुसार तारीख ११/०१/१९७७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व ६७६ हिस्सा न २ व ६७६ हिस्सा न ६ यांना कुल कायदा कलम ३२ ग ते ३२ र लागू नाही ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३ सदर ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३ हि तहसील कार्यालयात उपलब्ध नाही सदर न ता हु न फेरफार दिनांक पासू १४ वर्ष पूर्वीचा आहे तसेच सर्वे न ६७६ हिस्सा न ६ अस्तिवात नाही व सर्वे न ६७७ हिस्सा न ८ वर १९५४ च्या पिकपाहणी नुसार २०१३ पर्यंत वांगी हे पिक दाखल आहे
तरी फेरफार ११६३६ रद्द होऊ शकतो काय व होत असल्यास कोणाकडे अर्ज करावा लागेल
व फेरफार १२८५९ रद्द करण्या साठी कोणाकडे अर्ज करावा लागेल
गालवणकर यांचे नावे जमीन रिलीज झाली म्हणजे काय? गालवणकर हे हि कुल होते का?
फेरफार ११६३६ १९६६ अन्वये कमला खान्दूचे नाव कुल म्हणून नाव दाखल झालेवर , आपण/ वडिलांनी अपील का दाखल केले नाही.
सध्या जमीन कोण कसत आहे?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by देवेंद्र tandel
08-11-2013
jyotitandel@82gmail.com
कलम ४३ नुसार ३२ ते ३२ र केव्हा लागू होत नाही
Question by देवेंद्र tandel
08-11-2013
jyotitandel@82gmail.com
कलम ७० ब नुसार साव्रक्षित कुल असलेल्याचे कुल नोद कमी करता येते काय
Question by देवेंद्र tandel
08-11-2013
jyotitandel@82gmail.com
पिक म्हणून केळी किवा वांगी यांना कुल कायदा ३२ ग का लागू होत नाही
वांगी फळ नाही. ज्या जमिनीतून वांगी उत्पादन घेतले जाते व जी भाडेपट्ट्याने दिली असेल त्यास ३२ ग लागू होईल. मात्र केली पिकास लागू होणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by देवेंद्र tandel
08-11-2013
jyotitandel82@gmail.com
सातबारावरील फेरफार नुसार कलम ४३ नुसार कलम ३२ ते ३२ र लागू नाही सदर नियम केव्हा लागू होतो
व त्या वेळी फळ पिक अथवा उस उत्पादन घेतले जाते आहे. जर पूर्वी फळ पिक अथवा उस यैवजी अन्य पिक घेतले जात असेल तर , ३२ ग व अन्य तरतुदी लागू होतील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
प्रश्न समजून येत नाही. तथापि जमीन ज्या दिवसापासून कसण्यास दिली त्या दिवसापासून लागू होतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by देवेंद्र tandel
08-11-2013
jyotitandel82@gmail.com
माझ्या आजोबाच्या मामाचे सामान्य कुल म्हणून १९८८ पर्यंत होते परंतु कलम ७० ब नुसार त्यांचे नाव कमी करण्यात आले आहे तरी कलम ७० ब नुसार कुळाचे नाव कमी करिता येते काय
Question by देवेंद्र तांडेल
08-11-2013
jyotitandel82@gmail.com
केळी व वांगी ह्या पिकांना कलम ३२ ग का लागू होत नाही
कलम ४३ अ नुसार उस , व फळांसाठी जमीन कसण्यास दिली असेल तर ३२ ग लागू नाही. वांगी हे फळ नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती पाटील
07-11-2013
patilsm9@gmail.com
या संकेत स्थलावर्ती "अधिकाऱ्यांचे ब्लॉग" या सदरात उल्लेखित कोणत्याही ब्लॉग वरती क्लिक केल्यावर एकच-सातबारा.को..इन हाच ब्लॉग उघडतो.
Question by vijay Kadam
02-11-2013
vijay.kadam66@gmail.com
mi jaga binsheti kharedi keleli ahe.
parntu smorche jamindarani majha rasta advila ahe. ata kay keke pahije
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २४२ चा वापर करूनही आपला प्रश्न सुटू शकेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
जागेत जाण्यासाठी रस्ता असल्याशिवाय बिन शेती परवानगी दिली जात नाही. आपली बिन शेती आदेश प्रत पहा. नकाशा पहा. मंजूर नकाशात रस्ता दर्शवलेला असेल तर आपण दिवाणी न्यायालयात साम्भांधीताविरूढ विरुद्ध दावा दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pardeshi Madansing Suppadsing
29-10-2013
madanpardeshi261987@gmail.com
सर , मी महसूल व्यासपीठ मधील लेख उघडण्यकारिता प्रयन्त करीत आहे पण ते उघडत नाही आहे.
Sir, Mahsul Vyaspith is only accessible for Registered Revenue Officers & Revenue Employees on this website.Only,If you are a revenue officer or revenue employee, then you should first register yourself as member on this homepage and can then have access to the articles, once your membership is approved.
Reply by श्रीधर गालीपेल्ली | नायब तहसीलदार
Question by मेघा वारे
28-10-2013
meghaware81@gmail.com
१९९९ ला राम या व्यक्ती चा मूत्यू झाल्यानंतर २ मुले १ मुलगी व पत्नी अशी वरसानाचे नावे ७/१२ वर दर्ज झाली. २००३ ला मुलीने नोंदणीकृत दस्ताद्वारे सबंधित शेती वरून हक्कसोड लेख केला त्यानुसार ७/१२ वरून मुलीचे नाव होऊन ७/१२ वर २ मुले व १ आई चे नाव राहिले. ७/१२ कायम असलेल्या नावापैकी २०१० ला त्या मुलीची आई मूत्यू पावली. आई चा मूत्यू नंतर वारस म्हणून माझे नाव ७/१२ वर दर्ज करावे या करिता मुलीचे अर्ज सदर केलेला आहे. अशावेळी आई चे वारस म्हणून मुलीचे नाव पुन्हा ७/१२ वर लावता येईल काय ?
वडील मयत झाल्यावर मुलीचा हिस्सा येतो व तीने त्या वरून हिस्सा सोडला तर मुलीचा वारस हक्क संपतो. नंतर आई मय्यत झाल्यावर आईचा हिस्सावर मुलीचे पुन्हा वारस म्हणून दर्ज होऊ शकते.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
1) E(RAM) IS THE OWNER , WHO DIED LEAVING BEHIND A-B-C-D
2)A(SON)- B(SON)- C(DAUGHTER)- D (WIFE) ARE OWNER
3) C EXECUTED RELEASE DEED IN FAVOR OF A-B-D
tHEREFORE NOW .OWNERSHIP IS .....
A-3.33%, B-33.33%, D-33.33%
4) D- DIED, LEAVING BEHIND A-B-C
THEREFORE NOW OWNERSHIP IS..............
A-33.33%, B-33.33%, D 's SHARE DIVIDED IN THREE PARTS AS (A-11.11%,B-11.11% AND C-11.11%)
THAT MEANS SHARE IS..............
A- 44.44%, B-44.44%, C-11.11%
THAT MEANS GIRLS NAME CAN BE REGISTERED IN 7/12 EXTRACT.(UNLESS BARRED BY ANY LAW LIKE PREVENTION OF FRAGMENTATION ETC.)
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by vijay ingole
28-10-2013
vv_rt@rediffmail.com
konkontya dakhalyasathi self decalration gheyache ani kontya dakhlysathi affidivit
exa. income certificate jar karj ghenesathi kiwa sarakari yojnecha labh ghensathi affidivit ghene ki self declaration mahiti milavi
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
