जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर,
माझे आजोबा १९७० साली मयत झाले आहेत ,७/१२ वरती १९७० ते १९७९ पर्यंत माझ्या मोठ्या चुलत्याचे नाव ए.कु. में.म्हणून लागलेले होते परंतु १९८० पासून ए.कु. में नावाचा कुठेही उल्लेख नाही हे नाव कसे कमी झाले, कोणी केले याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती आम्ही याबाबत कोणाकडे अपील करावी ,तसेच नाव कमी करून जमीन विकलेली आहे ती आम्हला परत मिळेल का.आमची कोणाची समंती सही घेतलेली नाही.( फेर्फारला माझ्या वडिलांची व आत्यांची नावे वारसदार म्हणून लागलेली आहेत तेंवापासून ७/१२ वरती माझ्या मोठ्या चुलत्याचे नाव ए.कु. में.म्हणून लागलेले आहे चुलत्याने आमची कुणाची आणेवारी न लावता जमीन विकलेली आहे आमचे वाटप पत्र ,साम्म्न्ति पत्र ,हक्क सोड पत्र झालेले नाही .वडिलांच्या/ फेर्फारला माझ्या वडिलांची व आत्यांची नावे वारसदार म्हणून लागलेली आहेत )
आपले चुलत्याने जमीन विकलेली असल्याने , आपणास जमीन परत मिळणे थोडे कठीण आहे .
ज्या इसमाने जमीन खरेदी केली असेल , त्यास जमीन एकट्या चुलत्याच्या मालकीची होती कि एकत्र कुटुंबाची होती हे केवळ जमीन खरेदी करतेवेळी असलेल्या ७/१२ स्थितीवरून समजणे अश्यक्य होते . जर जमीन खरेदी करणाराने वर्तमानपत्रात जाहीत सूचना प्रसिद्ध केली असेल व आपण त्याचे खरेदीस हरकत घेतली नसेल , तर आपणास जमीन मिळण्याचा हक्क उरत नाही .
मात्र आपण आपले चुल्त्याकडून विल्क्लेल्या तुमच्या मिळकतीच्या जमिनीची किंमत दिवाणी न्यायालयाकडून वसूल करून घेऊ शकता . आपणास दिवाणी न्याय्यालाय्त दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी विचारलेल्या प्रश्नाचे क्रमांक ३८ हा रोजी ४/३/१५ यादिवशी होता .

सर आपण दिलेल्या प्रतिसाद बद्दल मनपूर्वक धन्यवाद , त्या उत्तर दाखवले आणि काम यशस्वी झाले.

Question by atul ambhore
04-03-2015
ambhorea@yahoo.com

मा.सर्वेाच्य न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकामाच्या वेळी पायाभरणी वा सपाटीकरणासाठी गौणखनिजा स्वामित्वण्धनाची रक्कम भरणेची आवश्यकता नाही माझा अशी शंका आहे की, केवळ रहीवाशी प्रयोजनार्थ असलेल्या इमारती बांधकामसाठी लागु आहे की सर्व प्रकारच्या इमारतीचे बांधकाम जसे की व्यापारी किंवा औदयोगिक प्रयोजनार्थसाठी
कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती
सर्व प्रकारचे बांधकामासाठी लागू आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तुकडे पद्धत म्हणजे नेमके काय ती कोण करतो त्यासाठी सह्या लागतात का
कृपया आपण तुकडे जोड व तुकडे बंदी कायदा वाचवा .

१. तुकडा म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र, वाटप, विक्री या मुले निर्माण करणे
२. क्षेती किफायतशीर होण्यासाठी , जमिनीचे वापराप्रमाणे ( बागायत/एकपिकी/वर्कस) प्रमाणभूत क्षेत्र निच्छित करण्यात येते ,
३. या कायद्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र जर , विक्री , वाटप या मुले होणार असेल , तर अशे वाटप , विक्री करता येत नाही.
४. सर्व्साध्राणपणे ,

बागायत -०-०५-० हे आर
एकपिकी- ०-१५-० हे आर
वर्कस- ०-२०-० हे आर

हे प्रमाणभूत क्षेत्राचे प्रमाण आहे .

जर एखादे जमिनीचे ऐकून सर्वेय नंबर क्षेत्र २९ गुंठे आहे . हि जमीन वर्कस स्वरूपाचे आहे . जर या पैकी , मालकाने १५ गुंठे क्षेत्र विकावयाचे ठरवले तर , १४ गुंठे क्षेत्र उरते . मुल मालकाकडे व घेनाराकडे , प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा क्षेत्र कमी राहत आहे , त्या मुले अश्या क्षेत्राची विक्री करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कार्यालयात सफाई कामगार पद मंजूर नसल्याने इतरत्र मजुरांना सफाई कामगार मानून तात्पुरत्या स्वरुपात घेत येईल का व त्याबाबत शसणाच्या काय सूचना आहे
पद मंजूत नसेल तर , घेत येणार नाही

काही पदना , उदा . data entry operator , यांना कंत्राटी पद्धतीने भरण्य बाबत शाषण विशेष शाषण निर्णयाने मान्यता देते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by अजय
03-03-2015
ajypsri@rediffmail.com

सर प्रतिसाद मिळत नाही
आपला प्रश्न पुन्हा मांडा?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by atul ambhore
02-03-2015
ambhorea@yahoo.com

समजा एखादया कंपनीने 20 किमी लाबुंन पाण्याची पाईपलाईन आणुन वापर करत असेल तर सदर जमनीचे बिनशेती वापर झाला आहे असे समजून बिनशेती रकमेची वसुली करता येईल काय? व कसे याचे मार्गदर्शन करा
१. pipeline कोणत्या जमिनीवरून जाते , त्या वर अवलंबून आहे .
२. जर सरकारी जमिनीवरून जात असेल तर , त्या बाबत अतिक्रमण ( विना परवाना असेल ) शुल्क वसूल करावे .

३. अन्य खाजगी मिळकती बाबत , बिन शेती दंड प्रथम वसूल करून . नंतर बिन शेती आकार वसूल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.सराना माझा नमस्‍कार ,
1. सर मी 23 फेब्रुवारी 2010 रोजी शासन सेवेत रूजू झाले आहे. तसेच मी विभागीय दुययम परिक्षा 2012 मध्‍ये उर्तीण झाले व म‍हसूल अर्हता जानेवारी 2014 मध्‍ये उर्तीण झाले माझया पूर्वी रूजू झालेले माझे सहकारी हे डिसेंबर 2014 मध्‍ये महसूल अर्हता उत्‍तीर्ण झाले आहेत. तर त्‍याची विभागीय पदोन्‍न्‍ाती समीती मध्‍ये कर्मचारी ज्‍याची जेष्‍ठता क्रंमाक हा माझे पूर्वीचा आहे तर त्‍यांची निवड अ.का. म्‍हणून माझे नंतर होईल की माझे अगोदर.
1. ज्‍यावेळी पदोन्‍नती समितीची बैठक होईल त्‍यात माझे नावाचा विचार अगोदर होइल की नंतर परिक्षा उर्तीण झालेली दिनांक अगोदर धरतात की जेष्‍ठता क्रमाका नुसार निवड करतात कृपया याबाबत स्‍वंयस्‍पष्‍ट मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती


महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकन यांचे नुकत्याच रायगड जिल्हा कर्मचारी प्रकरणात दिलेल्या निर्णय नुसार आपली , ज्येष्टाथा , आपले सहकाराच्या पेक्षा वर राहील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by prakash korade
28-02-2015
alkashivam@rediffmail.com

एका व्यक्तीने पुनर्वसनात मिळालेली जमीन विकायला काढली आहे.विकत घेता येते का ? कोणत्या बाबी तपासाव्यात ? ...धन्यवाद
आपला प्रश्न/सूचना ... कोतवाल लोकांचे मानधन वाढवा 5000 रु मधे भागत नाही
या बाबत शासन निर्णय घेऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर उपविभागीय अधिकारी 4 वर्ष पासून अकुष्क कर त नहीं 90 दिवसा च्या कायदे ने काय कारवाई करावीय
आपण त्या बाबत sdo यांना , तसे पत्र द्या

"आपण ९० दिवसात अकृषक परवानगी न दिल्याने , कायद्या प्रमाणे जमीन अकृषक झाली आहे असे समजून मी , जमिनीचा अकृषक वापर सुरु करत आहे "

मी आपणास हे हि सांगू इच्छ्तो कि , आता जमीन अकृषक करण्याची आवश्यकता नाही
आपणास विकास परवानगी घ्यावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by राकेश
27-02-2015
r.kakare@gmail.com

तुम्ही जर खालील कायद्याच्या कलम ६ नुसार
Hindu succession act Amendment २००५
६. Devolution of interest of The Hindu Succession (Amendment) Act, 2005-
6 (l). Devolution of interest in coparcenary property.

(1) On and from the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005, in a Joint Hindu family governed by the Mitakshara law, the daughter of a coparcener shall,--
(a) by birth become a coparcener in her own right the same manner as the son ;
|
|
मला प्रश्न आहे कि हि amendment - On and from the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005,

ह्याचा नक्की अर्थ कसा लावावा ??
amendment संमत झाले पासून , त्याची अंमलबजावणी पर्भावापासून

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir, patil watan asle tar najarana bharawa lagto ka
महाराष्ट्र गुंठेवारी २००१ प्रयोजन बदल करता येते का अाणि येत असेल तर कोणती कागद पञ लागतात
Mananiy Mahoday,

Namaskar,

Vishay : Saat Bara Madhil Naav Kami Karanya babat

Maze vadil ani tyanchya mitrachya family che balpanapasun mhanje 40 varshapasun jast sambanth hote. Ani te aamche hitchantak asalya mule 20 Varshapurvi mazya vadilani ani tyancha mitrane bagayatisathi jameen vikati ghetali. Mazya vadilani 10 Acre and tyancha mitrane 50 Acre. Mazya Vadlinani tyanchya mitrache naav aaplaya saat baara madhye takale jenekarun tyanche udyogvishwat sambandh changale aslyamule tyanchi and amachi jameen ekatra develop keli yeil ya uddeshane.

Jameen ghetalyanantar kahi varshani vadilanchya mitra ajari padle ani tyanche nidhan (dead) zale ani ghetaleli jameen kahihi develop na hota tashich padun rahili. Vadilanchya mitrachi mule sadhan alalyamule tyana aata bagayati madhy interest nahi. Aata aamhala vadilanchaya mitrache naav saat baara madhun kami karavayache aahe ani tyancha mulanchi kahich harkat nahi ani te sod partra dyayala tayar aahet.

Vadilanchaya mitrache naav saat baara madhun kami karanaya sathi kaay karave lagel ? Tasech kontya kagad patranchi purtata karavi lagel ? Tyanchi sampoorna family mumbait aahe ani vadilanchay mitrachi baiko ati vruddha aslyamule jasti hindu phiru shakat nahi.

Krupaya ya vishayavar salla dyava he vinanti.

Aapla Vishvasu

Krishnakant Pujare

E-mail : krishnakantpujare@outlook.com
Cell No. : 09867391555
आपले वडिलांचे मित्राचे जे कायदेशीर वारस आहेत व ज्यांची नावे आता ७/१२ आहेत ( लावली असतील तर ) त्या सर्वांनी , ४० एकर क्षेत्र आपणास नोंदणीकृत दास्ताने विकणे आवश्यक

नोंदणीकृत दस्त द्वारे आपले वडील मित्र /त्यांचे वारस यांची नावे ७/१२ वरून कमी होतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
एखादी जागा सुरवातीला सर्वे नंबर मध्ये ६ गुंठे असेल आणि सिटी सर्वे ला गावठाण मध्ये वाढून ७ ते ८ गुंठे लावली असेल तर चालेल का ?
जर सर्वे नंबर चा प्लॉट सिटी सर्वे ला गावठाण मध्ये घ्यायचा असेल तर काय करावे लागेल ? का एकदम सिटी सर्वे ला गावठाण चा नंबर मिळतो.
कोणतीही सर्वे नंबर स्वतंत्र रित्या एकटाच कधीच ज्यादा किंवा कमी होत नाही ..................थोडक्यात जमिनीचे क्षेत्र कमी - ज्यादा होण्यासाठी कमीत कमी दोन सर्वे नंबर लागतात ............उदा. जमीन एकत्रीकरण योजनेवेळी / जमीन सम्पदनवेलि तसे आदेश झाले असतील तर मग तो सर्वे नंबर दुसर्या सर्वे नुंबर बरोबर कमी ज्यास्त होतो .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
वाणी समाजाची स्मशान भूमीची जागा सुरवातीला सर्वे नंबर मध्ये ६ गुंठे असेल आणि सिटी सर्वे ला गावठाण मध्ये वाढून ७ ते ८ गुंठे लावली असेल तर चालेल का ?
जर सर्वे नंबर चा प्लॉट सिटी सर्वे ला गावठाण मध्ये घ्यायचा असेल तर काय करावे लागेल ? का एकदम सिटी सर्वे ला गावठाण चा नंबर मिळतो. त्या जागेचा वापर आता स्मशानभूमी म्हणून होत नाही आणि स्मशानभूमी गावठाणात येते का ?

Question by pranit bhapkar
27-02-2015
bhapkarpranit@gmail.com

सात बारा उताऱ्या साठी अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी मिळणे अपेक्षित आहे?
आपण जेथे ७/१२ मिळणे साठी अर्ज केला आहे ( तहसील/तलाठी ) तेथे नागरिकांची साहिन्ता , ज्या मध्ये , ७/१२ अर्ज केल्या नंतर किती दिवसात मिलेले याची माहिती नमूद असेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांना पुढील अधिकार असतात किंवा नाही याबाबत माहिती द्यावी
१. पोलिसांकडून कामे करून घेण्याचा अधिकार ?
२. पोलिसांना निलंबित करण्याचा अधिकार ?
३. जर पोलीस एखाद्या व्यक्तीला काही कारण नसताना त्रास देत असतील तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते का ?
४. जिल्हाधिकाऱ्यांना कोणकोणते अधिकार असतात ?
आपण मुंबई पोलिस कायदा वाचा

निलंबित करण्याचा अधिकार नाही

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने जे , कर्तव्य पार पडणे , आवश्यक , तेवढे काम पोलिस द्वारे करता येयील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
माझे शाळेच्या दाखल्यावर, मार्कशीटवर, पदवीच्या मार्कशीटवर नाव विद्या असे असून इतर सर्व कागदोपत्री म्हणजे आधारकार्डवर, मतदानकार्डवर, बँकेच्या पासबुकवर, प्यान कार्डवर ते विद्याकुमारी असे आहे. तरी मी कुठे नोकरीसाठी गेले असता ते मला ओळखपत्राची मागणी करतात आणि मी त्यांना विद्याकुमारी या नावाचे ओळखपत्र देते परंतु ते मला विद्या या नावाच्या ओळखपत्राची मागणी करतात तरी मी काय करावे ?
१. मला माझे नाव विद्याकुमारी हेच ठेवावयाचे असल्याने मी नोकरीसाठी जाताना काय पुरावा सोबत न्यायला हवा ?
२. नोकरीसाठी मी कोणत्या नावाने अर्ज करावा ?
आपण आपले जे नाव ठेऊ इच्छिता त्या बाबत , राजपत्रात सूचना प्रसिद्ध करा .
राजपत्र प्रत सदर करणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
औरंगाबाद मध्ये हर्सूल येथे गात नुम्बेर १६६ मध्ये इनामी जमिनी मध्ये प्लॉट घेनास मार्गदर्शन देणे बाबत मुल मालकाने कलेक्टर ऑफिस मधून परवानगी घेतली आहे तसेच आकृषक कर भरला आहे प्लॉट घेनास योग्य आहे का ७/१२ मध्ये भोगवटा २ आहे
कुल कायद्या अंतर्गत किमत निश्चित करून घ्या, म्हणजे नक्की काय ?
कुल किंमत निच्छित करणे म्हणजे , कुळाचे नाव मिल्कतीस लावण्यासाठी ,मालकास द्यावयाच्या किंमत निच्छित करणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी जमीन मोजणी केली मोजणी
केलि नतर क प्रत मिलते ती क प्रत टिपण प्रमाणे नाही आरज केला आसता भूमि आभिलेख उडवाउडवीची उत्तर दिली मी काय करावे

Question by ओमेश
25-02-2015
omeshbarapatre@yahoo.com

सर,
महसूल लिपीक संवर्गातून तलाठी संवर्गात प्रवेश करता येईल काय ? असल्यास त्याबाबतचा शासन निर्णय इत्यादी कळवावा, हि विनंती.
सरपंच पदाच्या निवडणुकी बाबत तारीख ठरून नोटीस देण्यात आली व सर्व सदस्यांना नोटीस तमिळ झाली. निवडणुकीची तारीख येण्यापुर्वीच सर्व सदस्यांनी राजीनामा दिला. अशावेळी निवडणूक घ्यावी किवा काय कार्यवाही करावी. (सरपंच पद हे नुसुचीत जमाती करिता राखीव आहे )
अशा प्रश्नावर महसूल व्यासपीठ येथे चर्चा अपेक्षित आहे. कारण हा महसूल अधिकाऱ्यांशी संबंधित असून तेथे चर्चात्मक मार्गदर्शन मिळू शकते ...

Reply by MCS Maharashtra | इतर

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3