जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माजे आई आणि वडील हे दोनीही ह्यात नसून मला चार बहिणी असून त्या पेकी जर एक मयत असेल तर शेत जमीन आणि इतर मालमता नावावर करताना मयत बहिणीच्या वारसांचा कायी संबंध येतो काय का फक्त मृतूचा धाकला जोडला तर चालतोय
मयत बहिणीस मुलगा / मुलगी असल्यास ते वारस म्हणून त्यांची नावे मिल्कतीस लागतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मयत बहिणीच्या वारसांना मिळकती मध्ये हिस्सा आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, महसूल विभागातील कामाचा वाढता ताण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या वर काय तोडगा काढावा तसेच महसूल विभागातील वाढत चाललेल्या कामाचे व्यवस्थापन कसे करावे, बाबत मार्गदर्शन मिळावे.
मी कुळ आहे मी बांधकाम केले आहे मला परवागी घेणेआहे
कुल कायद्याखालील milaleli जमीन कुळाने कसणे आवश्यक आहे . कुलास jaminicha बिनशेती वापर करावयाचा असल्यास , जमीन कुळाचे नवे होणे आवश्यक. ३२ ग किंमत होणे, आवश्यक
जर ३२ ग किंमतया पूर्वी निच्छित झाली असल्यास, त्यास १० वर्षाहून जादा कालावधी झाले
आ असल्यास , आपण , नियोजन अधिकारी ( जिल्हाधिकारी - प्रादेशिक योजना जेथे आहेथेथे , मुख्याधिकारी - नगरपालिका क्षेत्र ) यांची परवानगी घेणे आवश्यक.
३२गकिंमत निच्छितझालेला कालावधी १० वर्षापेक्षा कमी असल्यास, बिनशेती वापरनिर्बंध दूर करण्यासाठी प्रथम प्रांत अधिकारीयांचीपरवानगी घेणे आवश्यक. नंतर बांधकाम परवानगीघ्यावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या मामाने माझ्या आई चे सात वर्षे पुर्वी फसवणूक करून हक्क सोड पञ केले वआता जमिन विकली आईला मोबदला दिला नाही आम्ही काय हरकत घेऊ
मामा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक . फौजदारी दाव्यात मोबदला मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पानबुडेसाहेब
उपजिल्हाधिकारी

मी प्रांत अधिकाऱ्यांकडे हिंदू- कुणबीचा दाखला मिळणेबाबत अर्ज सदर केलेला आहे. आणि त्यांनी त्यामध्ये खालील क्युरी काढली आहे.
१. आपण वडिलांचा शाळेचा दाखला जोडावा.
२. आपण आजोबांचा शाळेचा दाखला जोडावा. किंवा त्यांचे वाटपपत्र जोडावे.

परंतु वरीलप्रमाणे कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे व आजोबांनी जमिनीचे वाटपपत्र करून न दिल्यामुळे मी अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडली आहेत.
१. वडिलांचा शाळेचा दाखला नाही म्हणून त्यांचे रेशनकार्ड, मतदानकार्ड आणि आधारकार्ड.
२. आजोबांचा शाळेचा दाखला व वाटपपत्र नाही म्हणून त्यांचे रेशनकार्ड, मतदानकार्ड आणि आधारकार्ड.

तरी सदर कागदपत्रानुसार मला कुणबीचा दाखला मिळेल का ? जर मिळत नसेल तर योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती.
आजोबांचे शाळेचे दाखल्यावर जातीचा , " kunbi " असा उलॆख असणे आवश्यक .
अन्य नातेवायिक काका , यांचा दाखला जोड .
या पैकी कागद पत्र नसल्यास तश्या आशयाचे प्रतिज्ञा पत्रदाखल करा .
मात्र सक्षम अधिकारी ( उपजिल्हाधिकारी ) अस्य प्रकरणात ( जेथे उपरोक्त कागदपत्र दाखलकेलेली नाहीत ) , chaukashi karun गुणवत्तेनुसार निर्णय घेतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by kiran
08-04-2015
kirant.lote94@gmail.com

Specific rilip act 22, 34, 37 plz sir ya act chi mahiti sanga...
आपण सदर कायदा वाचवा

त्यामध्ये नक्की कोणती अडचण आहे ती सांगा
कलम ३७ अन्वये , तात्पुरता व कायमचा मनाई हुकुम देण्याचा न्यायालयास अधिकार आहे

कलम२२ अन्वये - कराची अंमल बजावणी दुसरे पक्षाने करण्यासाठी , तसेच करार स्थावर मिळकती संदर्भातील असल्यास , अश्या मिळकतीचा ताबा मागण्याचा अधिकार या कलमाद्वारे आहे

कलम ३४ अन्वयेएखादे मिळकतीत मालकी हक्क मागण्याचा/ दुसर्याचा मालकीहक्कनाकारण्याचा दावा करण्याचा अधिकारदिलेला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rameshdthat
08-04-2015
ambhorea@yahoo.com

एखादया आदीवासी खातेधारकाकडे 30 गुंठे कुळाची 36 अ ला पात्र अशी जमिन आहे तर त्यापैकी २ गुंठे जमिन दुसऱ्या आदीवासी खातेधारकास विकत घेता येईल काय व असल्यास कसे या बाबत मार्गदर्शन करा
प्रथम आदिवाशी kulache नवे किंमत झालेली असावी .
किंमत निछिती कालावधी १० वर्षापेक्षा कमी असल्यास प्रथम, जिल्हाधिकारी यांची ३६ अ व त्या खालील नियाम्नांतर्गत परवानगी घ्यावी लागेल . नंतर प्रांताधिकारी यांची परवानगीघ्यावी. लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
एक प्रकरणात 7/12 वर अ, ब, क,ड, इ यांच्या नावे समाईक क्षेत्र आहे

प्रकरणात तहसिल कार्यालयात समान हिस्याने वाटणी करीता अर्ज आलेला आहे.

अ ही आई असुन इतर भावंडे आहेत

अशा प्रकरणात समान हिस्सा देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का ?

तुकडे बंदिचा भंग होत असल्यास काय करावे.?
जमिनीचे मालकी हक्क बाबत वाद नसल्यास , तहसीलदार म.ज.म.अ १९६६ चे कलम ८५ , म.ज मअ नियम अन्वये वाटप करू शकतात
मात्र तुकडे बंदीचा भंग होत असल्यास , तुक्देबंदी कायदा कलम८ अअ प्रमाणे , अश्या वाटपावर निर्बंध आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकत्रित आणेवारीत असणार्‍या गटातील ७/१२ वरील सर्व लोकांची मिळून आणेवारी १९२ पै ऐवजी ११० पै भरत आहे. एकत्रितकरणापुर्वी ती १९२ पै होती. परंतू एकत्रिकरणानंतर काही लोकांची नावे विनाफेरफार नवीन ७/१२ वरून काढून टाकण्यात आली व काही नावीन घालण्यात आली. काही लोकांच्या नावांना कंस करण्यात आलेला आहे. परंतू आजपर्यंत कोणाच्याही ते लक्षात आलेले नाही व त्याच्याबद्दल तक्रारही नाही. ७/१२ वरील बर्‍याच लोकांचा अथवा त्यांच्या वारसांचा आजतागायत तपास नाही. वहीवाट फक्त आमचीच आहे. बाकी जमीन पड आहे. पण आणेवारीपेक्षा जास्त क्षेत्र गेली ५० वर्षे आमच्या ताब्यात व वहिवाटीत आहे. तर भविष्यात त्याची नोंद ७/१२ सदरी लावण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन व्हावे.
एकत्रीकरण योजना या बाबत काही , मालकी हक्क बाबत, अभिलेखाबाबत वादअसल्यास त्याचे निरसन करण्याचा अधिकार तुक्देबंदी व तुक्देजोड कायद्याने , जमाबंदी आयुक्त यांना आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

देवस्थान इनाम जमिनीस कुळ कायदा लागु शकतो का?
नविन शर्तीने कुळ कायदा कलम ४३ अन्वये हस्तांतरीत होऊ शकते का?
कुल लागू शकतो
मात्र कलम ८८ k अ नुसार , किंमत निच्छित होऊ शकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by arun tambile
07-04-2015
aruntambile789@gmail.com

Amchya आजोबा पासून dदेव्स्तांचीजमीन कसत आहोत tya मध्ये वाटेकरी mhanun jam इन मालकाचे नाव आणि माझ्या वडिलांचे व चुलत्याचे नाव उतार्यावर लागले आता ती jam इन वाटेकरी खाते फोडून magto अशे करता येदिअल का
जमीन देव्स्तःन इनाम आहे
आपला या जमिनीत कोणत्या कारणामुळे सम्भंद आहे?
देवस्थान जमिनीस मालक कसा असू शकतो .
देवस्थानजमीन देवासाठी दिलेली असते . त्यामुळे कायद्याने अश्या जमिनीचा मालकदेव आहे.
आपलाप्रश्न विस्ताराने मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

देव्स्तान जमीन हक्कसोड़ पत्र होते का?
हक्क कोण सोडत आहे ?

स्वत देव हक्क सोडत नाहीत न ?????

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मला महाराष्ट्र गौणखनीज उत्खनन नीयम 2013 अन्वये गौण खनीजांचा ( रेती )साठा आणी वीक्री करण्यासाठी परवाना मीळू शकतोका
if any one govt. contractor excaation of soil more than 13000 brass whithout permission of the collector then what section are applicable for the action against the said contractor.
कलम ४८(७) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

अन्य विभागाच्या आस्थापनेवरील पद भरतीसाठी कर्मचा-याने अर्ज केल्यास कार्यालय प्रमुखाने सदर कर्मचा-याला अन्य विभागाच्या परीक्षेला बसण्यासाठी परवानगी देण्याबाबत तरतुदी काय आहेत
mazakade 1.41 r sheti hoti taya paiki 1h20r sheti maharashatra shasanala sampadit keli ahe ticha mobadala mila ahe parantu maze urawarit asamapadit shetra 21r madhe 2006 pasun aja parayant pani sachun nuksan hot ale ahe taya mule me 1varsha pasun 21r samapadit karanyasathi path purava karit ahe sambandit sanstha jamin ghenyas tayar ahe jamin mojani zali ahe sambandit sanstha saral kharedi karanayas tayar ahe tari maza prashana ahe saral kharedi madhe mala bhubhade ani mobadala milel ka kiwaa navin adhi niyamanusar bhubhade jaminichi wajawi kimat kiti pat punarwasan ani punar sthapana nokari aiwaji 5lakh gharasathi 1.61lakh ani stalantar *20 years parayant 2000 pe manth milanayas mee patra aheka please mala utar mail war kalwa thanks
नवीन कायद्यानुसार संपादन झाले तर , आपण अनुसूची २ मधील सर्व लाभ मिळण्यास पात्र असाल . अनुसूची २मध्ये , पुनर्वसन लाभ आहेत
तसेच अनुसूची१ प्रमाणे जमीन मुअवाजा मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,६ब जमिनीबाबत ५० टक्के नजराणा भरणेकामी किती दिवसाची मुदत असते त्याबाबतचा शासन निर्णयाची माहिती हवी आहे.
सर,
आमच्या वडिलांनी आमच्या अजोबांच्या नावे असलेली जमीन आम्हा नातवंडाना न
विचारता परस्पर खरेदी खतणे चुलत आजोबांच्या वारसाना दिली आहे .पण आता ते आमची राहिलेली जमीन आमच्या नावे देत नाहीत .तरी त्यांच्यावर आम्ही दावा करू शकतो का.असल्यास कुठे.करावा हे जरा नमूद करावे..
आपले आजोबांनी जमीन चुलत अजबांचे वारसांचे नवे कधी हस्तांतरित केली आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

न नं 4वरसाहाक्काची फेरफार नोंदवही कोणाकडे
मिळेल
फेरफार नोंदवही क्रमाक ६ आहे तर वारस नोंद वही नमुना क्रमांक ६ क आहे . या मधील नोंदी तलाठी यांचेकडे पाहण्यास मिळतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादी व्यक्ती किती वर्ष एकाच ठिकाणी स्थाईक झाल्यावर व जागेवर कोणी किती वर्ष अक्षेप न घेतल्यास त्या जागेचा मालकी हक्क त्या व्यक्तीस मिळतो. तसेच त्या जागेचे कागद पत्र कसे बनउन घेता येतील.
प्रकल्प बाधित
पतीने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पत्नीला नामनिर्देशित केले आहे आता पत्नी बहिणीला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतर करू शकते का
सर, मला ब सत्ताप्रकार असलेला प्लॉट विक्री करायचा आहे. परवानगी कोठून घ्यावी तसेच फी किती भरावी लागेल. कृपया Govt GR कोणता आहे. माहिती देण्यात यावी. हि विनन्ती .
ब सत्ता प्रकार म्हणजे शासनाकडून भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी .आपली मिळकत कोठे आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by nandkumar pawar
29-03-2015
nmpawar03@gmail.com

R. SIR,
KULDHARAK SHETJAMIN WIKU SHAKTO KAY.
JR WIKU SHAKATA YET ASEL TAR KAY NIYAM AAHET.?
कुल्धारक ?

आपणास कुल म्हणावयाचे आहे का ? कुल जमिनीचा कलम ३२ प्रमाणे मालक झाले वर , त्यास जमीन विकण्याचा हक्क आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by GADEKAR P G
29-03-2015
pradeep.gadekar86@gmail.com

सर,
माझा प्रश्न असा आहे कि आम्ही दोघे भाऊ आहोत आणि आमच्या आईच्या नावावर दोन गुंठे जमीन आहे. भावाच्या हिस्स्याची एक गुंठे जमीन भाऊ मला विकत घेण्यास सांगत आहे. तर मी ती जमीन विकत घेतल्यास पुन्हा माझा भाऊ किवा त्याची मुले भविष्यात वारसा हक्क सांगून ती जमीन मला परत मागू शकतात का ??? आणि जर जमीन विकत घ्यायची असेल तर कुठल्या अठी टाकून घेतल्या पाहिजेत
अद्यापही जमीन आईचे नावावर आहे , त्यामुळे जमीन आई ने दोघा भावांचे नावावर करणे आवश्यक . त्यासाठी आई ने जमीन दान पत्राने जमीन दोन भावांचे नावावर करून देणे . त्यानंतर भावाने , तुमचे नावावर दान पत्राने देणे .
अथवा आई ने तुच्या एकट्याचे नावाने २ गुंठे करून द्यावी .
आई ची मिळकत , आई ने काश्यारीतीने त्याची विल्हेवाट लावावी हि तिचा प्रश्न आहे . भावाची मुले हक्क सांगू शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,माझा असा प्रश्र आहे कि माझ्या आजोबांनी 1980 साली जमीन विकत घेतली होती ती जमीन आजोबांची 3मुले अ ब क यांच्या नावि क रुन दिली आहे व 7/12 त्याच्याच मुलाच्या मालकिच्या नावी आहे व ति जमीन तारण सुध्दा आहे. तसेच कर्ज पण आहे परंतू आता तो मुळ मालक व त्याची मुले जमिनी वरति हक्क सांगताय आणि ती जमीन परत मागंता परतु फेर्फार नुसार 7।12 वरति त्याची नावे कमि केलेली आहेत व ते आता35 वर्षा नंतर हक्क सागत आहेत तर त्या जमीनी वरती त्याचा हक्क शक्य आहे का? मार्गदर्शन करावे सर
मुल मालकास आता कोणताही हक्क नाही .
मात्र जमीन तारण आहे असा हि आपण उल्लेख केला आहे. जमीन कोणास तारणदिली आहे?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.48 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3