जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

shet jaminisathi rasta nahi .navin rasta magnisambandhi mahiti dyavi.
म ज म अ १९६६ च्या कलम १४३ अन्वये आपण बांधावरून रस्ता मिल्नेकारिता तहसीलदार यांचे कडे अर्ज करा

आपले मिळकतीत जाण्याचा पूर्वांपार वहिवाटीचा रस्ता असल्यास आपणास त्याचा वापर करता येयील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सूची क्र. २ मध्ये शेरा मध्ये नोंदणी कालावधीत कबुली जबाबासाठी उपस्थित न झाल्याने त्यांच्या पुरता दस्त नोंदणीस नाकारला असा श्‍ोरा नोंदणीकृत दस्तावर आहे. तर सदर दस्तानुसार फेरफार मंजुर करावा अगर कसे या बाबत कृपया मार्गदर्शन करावे.
१९९० पूर्वीचे ई क्लास अतिक्रमण नावावर करून देण्याबाबत काय प्रक्रिया आहे .
मा. किरण पाणबुडेसाहेब
उप जिल्हाधिकारी

सर
मला वैयक्तिक जीवनाबाबत आपल्याकडून सल्याची आवश्यकता आहे, तरी आपण मला आपला ई-मेल आयडी देऊ शकाल का ?

माझा प्रश्न महसूलच्या माहितीच्या व्यतिरिक्त असल्याकारणाने त्याबाबत आपणच फक्त योग्य ती माहिती देऊ शकता.

आशा करतो की आपण माझे म्हणणे एकूण घेण्याची संधी मला द्याल.

आपला विश्वासू
प्रमोद शिर्के
सर...मला ग्रामपंचायत ची आबादी (सव्हे क्र.नाहि) जागेची मोजणी करुन अतिक्रमण काढायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत ने काय केले पाहिजे कोण मोजणी करेल।
ग्रामपंचायत ची जागा आहे . त्यामुळे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्राम पंचायत ची आहे .
आपण कश्याला अतिक्रमण काढत आहात ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदिवासी जमीन हस्तांतरण बंदी असलेल्या जमीनीच्या खरेदी विक्री बाबत सल्ला द्यावा
म ज म आ १९६६ ची कलम ३६ , ३६ अ वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by yogesh
20-04-2015
yogeshpatil373@gmail.com

सर,
ठाणे जिल्हा पासुन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाले आहे महसुल कर्मचारी अव्वल कारकुन व लिपिक यांची विक्लप ठाणे आहे तर काही कर्मचारीच्या पालघर आहेत.तर कर्मचारीच्या बदली बाबत कोणती निकर्ष नुसार कर्मचा-याची बदली होतील जेष्ठयादी नुसार की विकल्प नुसार की बिदुनामली प्रमाणे कृपया मार्गदर्शन होणेस नम्र विनंती

Question by Girish
20-04-2015
yewategirish553@gmail.com

मुंबई वगळून उर्वरित महाराष्‍ट्रातील लिजवर दिलेल्‍या जमीनीचे नुतनीकरण करण्‍याचे अधिकार कोणास आहेत. तसेच्र भाडेपटयाचा दर निश्‍चित करण्‍याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन व शासन निर्णय कोणते आहे
Namaskar,

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कमीत कमी किती गुंठे जमिनीची सरकारी मोजणी करता येते तसेच त्याची procedure काय आहे, खर्च किती आणि किती वेळ लागतो.
प्रश्न क्रमांक १६ ला उत्तर दिले आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमचे गावी घर असून त्याची घरपट्टी आम्ही भरत असून त्याचा ताबा हा चुलत भावंडाकडे असून आम्हाला तेथे येऊ दिले जात नाही,वाद घातला जातो तर काय केले, कुठे अर्ज केलावर आम्हाला ताबा मिळेल
राहुल जगताप
दिवाणी न्यायालाय्त दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by dipti rane
18-04-2015
diptirane13@gmail.com

amchi gavi jamin aahe ti adhi majha panjobacha navavar hoti nantar aajobancha jhali ani mag vadilancha jhali
majhe vadil aata nahi aahet. majha ajobana 2 bhau hote aata tyanchi mulanchi nav pan add jhali aahe. amhala jaminichi vatap karaychi aahe pan ardhi family tar ardi gavi. tar te kasa शक्य आहे
Jamabandhi mahanje kay?
जमाबंदी म्हणजे , तलाठी याचे कडील दप्तराचे लेखे परीक्षण

तलाठी जी मागणी निचीत करतात ( १ औगास्त ) , त्याप्रमाणे झालेली वसुली , अभिलेखात नोंदवली आहे का ? हिशोभ तपासणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर ....
शेतकरी कोण ? शेतकरी असल्याबद्दल दाखला / प्रमाणपत्र देण्यासाठी कोणाला अधिकार आहेत. याबाबतीत शासन निर्णय किंवा कायदेशीर तरतुदी यांची माहिती मिळण्यास विनंती आहे.
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम २(२) अन्वये व्यक्तिश जमीन कास्णारी व्यक्ती .
याचं कायद्याच्या कलम ७० (अ) अन्वये , शेतकरी दाखला देण्याचा अधिकार माम्लेतदार/तहसीलदार यांना आहे
कायद्याचे पुस्तक अवलोकन करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vinod
17-04-2015
vinodkumarchandnani@gmail.com

sir
मला शेत खरीदी करायची होती पण ती इनामी तर नाही हे तपासायची होती ते कसे तपास करू कृपया करून कडवा

७/१२ पहा
गाव नमुना नंबर ३ पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vinod
17-04-2015
vinodkumarchandnani@gmail.com

dear sir
जमीन कायदा ३६' ३६अ ३६ब म्हणजे काय ?
कलम ३६- जमिनीचा भोगवटा ( मालकी) हस्तांतरणीय व वंश परंपरागत आहे .
थोडक्यात जमिनीची विक्री करता येते ( शर्ती लागू नसतील तर )
जमीन भोगावातादाराचे निधन झाल्यावर , जमीन त्याचे वारसाचे नावावावर होते

३६ अ- आदिवासी मालकीच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तीस हस्तांतरित ( विक्री , गहन ए ) करता येत नाही . बिगर आदिवाशीस हस्तांतरित करावयाची असल्यास शासनाची परवानगी आवश्यक

३६ ब- बिगर अदिवशी व्यक्तीकडे हस्तांतरित केलेली मिळकत , आदिवाशीस प्रत्यावार्तीत ( परत ) करण्यात आल्या ननतर हि , सदर जमीन बिगर अदिवशी व्यक्तीकडे भोग्वात्याखाली असल्यास , अश्या वापर बद्दल , नुकसान भरपाई देणे , अश्या बिगर आदिवासी व्यक्तीवर बंधनकारक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, MLRC च्या कलम १५७ चा अन्वेय वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अधिकार अभिलेख ( ७/१२ इ ) व फेरफार अभिलेख , यामधील नोंदी सत्य आहेत असे मानणे , अशी तरतूद आहे

यात कोणतेही अधिकार दिलेले नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

res. Sir,
is there any G.R. regarding to paternity leave?
सर, माझे आजोबा आणि चुलत आजोबा हे दोन सख्खे भाऊ होते. ते एकत्र शेती करायचे . पण जेव्हा कुळकायदा झाला तेव्हा ती जमीन चुलत आजोबांच्या नावे झाली. चुलत आजोबाना चार मुले होती, पण नंतर ती जमीन फक्त मोठ्या मुलाच्या नावे झाली. त्या जमिनीला त्यांनी वारस म्हणून इतर कोणाची नावे लावली नाहीत. आता माझ्या वडिलांचे व इतर तीन चुलत भावांची नावे लावली आहेत. पण फेरफार मध्ये माझ्या आजोबांचे नाव सापडत नाही. परंतु मोठ्या काकांनी त्या जमिनीला इतर वारस लावण्यास समती दिली होती. पण आता त्यांचा मुलगा एकट्याला अखंड हिस्सा मागतो, तर आम्ही काय करावे , आणि जर फेरफार मध्ये आजोबांचे नाव नसेल तर आम्ही हिस्सेदार होऊ शकत नाही का?असे झाले तर आम्ही काय करावे?
कुल म्हणून आपले आजोबा व चुलत आजोबांचे नाव लागले असेल तर , त्या दोघांचे सर्व वारसांची नावे आत्ता लागू शकतात /लावणे आवश्यक

मात्र कुल म्हणून फक्त आजोबांचे नाव लागले असेल तर , आत्ता काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी एक NA प्लाॉट घेतलेला अाहे.सर्हे नं १२४/१ मध्ये एकून क्षेत्र ६८४ आर आहे.२०० चौरस मीटर क्षत्र खरेदी केले आहे. परंतू आणेवारी शून्य प्वाईंट चव्वेचाळीस पै अशी आहे.परंतू अ नावाची व्यक्ती म्हणते की आणेवारीनुसार क्षत्र जुळत नाही.२०० चौरस मीटरला आणेवारी शून्य प्वाईंट छप्पन्न असायला पाहीजे.खरेदीपत्रातील आणेवारीनूसार क्षत्र घ्यावे लागेल.सदर प्लाॉट घेणारी मी चौथी व्यक्ती आहे.आणेवारीची दुरूस्ती कशी करावी.याबाबत मार्गद्रशऩ करावे.
६८४ र म्हणजे ६-८४-० हे र

बिनशेती आदेश झालेवर , प्लॉट चे क्षेत्र नौद केले जाते
७/१२ प्लॉट नंबर नमूद करून असतो

सदर जागा बोन्षेत आहे का पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ganesh pingale
15-04-2015
gpingale8181@gmail.com

धुळे येथे देश बंधू आणि मंजू गुप्ता faundation या नावाने trust आहे. सदर trust ला शेतजमीन विकत घ्यावयाची असल्यास परवानगीची आवशकता आहे का. परवानगीची आवशकता असल्यास कोणत्या नियम खाली परवानगी मागावी व कोणा कडे.
होय
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३ व या कायद्या खालील नियम अन्वये हि परवानगी घ्यावी लागेक्ल
जिल्हाधिकारी/अपर जिल्हाधिकारी हि परवानगी देण्यास सक्षम आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमची ग्रामपंचायत मधील घर मिळकत माझ्या चुलत भावाने तो स्वतः सरपंच असताना ग्रामसेवकला हाताशी धरून ती मिलकत दुसरया व्यक्तीच्या नावे करुण नंतर ती खरेदी खताने स्वताच्या एकट्याच्या नावावर केली व् नंतर ती जागा एका मोबाइल टावर कंपनी ला २००७ साली दिलली दिलीदिली . आता मला ती मिलकत परत मिलाव्न्यासाठी कोर्टात जावे लागेल का गट विकास अधिकारी कड़े तकरार देऊ???
आणि मोबाइल टावर वर स्थगिती आणून त्याचा मोबदला मागता येइल का??
जमिनीची शासकीय मोजणी पूर्ण होऊन त्यानूसार मिळालेल्या क प्रतीस एक वर्ष पूर्ण झालेले आहे. तर मिळालेली क प्रत तक्रारीवरून रद्द करता येते का? असल्यास तसे अधिकार कोणाला आहेत?
आपण फेरमोजणी करू शकता. संबंदित उपाधिक्षक भूमी अभिलेख , पहिली मोजणी रद्द करतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by kiran
12-04-2015
kirant.lote94@gmail.com

8/4/2015 roji act chi mahiti apn mala dili sir mi apla abhari ahe Kiran sir aapn mala tumcha phone number dila tr kup br holi kiwa mala .SMS 9637574810 ya number vr kra plz sir......
सर धरना ची जमींन पडित आहे ती जमींन शासन पिका करीता लिज वर देते काय कोना कड़े अर्ज करावे लागेल त्या बाबत शासन निर्णय आहे काय असेल तर mail करावा हि विनंती
लाभ क्षेत्रातील जमीन भाडे पत्त्याने देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना जमीन बाधित व्यक्तीस देई पर्यंत. आहेत तर
बुडीत क्षेत्रातील जमीन घळ भरणी पर्यंत देण्याचा अधिकार प्रकल्प प्राधिकर यास आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर जमीन खरेदी आणी नोंदणीची प्रक्रिया काय आहे आणि कमीतकमी किती गुंठे जमिनीची खरेदी आणि नोंदणी होऊ शकते .
तुकडे बंदी कायद्यान्वये , प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र निच्छित करण्यात आले आहे

सर्वसाधारण पाने
बागायत क्षेत्र-०५ गुंठे

एकपिक उत्पन्न देणारी जमीन - १५ गुंठे

वर्कस क्षेत्र- २० गुंठेक्षेत
या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री करता येत नाही
आपली जमीन, कोणत्या प्रवर्गात बसते त्या वरून , निच्छितकरा .

जमिंची नोंदणी म्हणजे , दुय्यम निबंधक यांचे कडे विक्रीबाबत , जमीन देणार व घेणार यांनी मुन्द्रंक शुल्क व नोंदणी फी भरून नोंदणी करणे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3