जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर ,

नवीन घर घेताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि कुठले कागदपत्रे पहावी किवा बिल्डरकडून आपल्याला कोणती कागदपत्रे घर घेताना आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपली कुठे फसगत होऊ नये . या वर कृपया मार्गदर्शन करावे .
नमस्कार सर ,

एखाद्याचे नाव सर्वप्रथम सातबारा मध्ये कसे आले हे कसे शोधून काढावे
सर्व जुने सातबारा व फेरफार paha

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर माझ्या वडिलांच्या नावावर २० आर जमीन क्षेत्र आहे मला अल्प भुधारक म्हणुन विहीरीचा लाभ घेता येईल का
नवीन भू संपादन कायद्या नुसार ,
अल्प भू धारक म्हणजे , ५ एकर बिगर बागायती जमीन व २.५ एकर बागायती जमीन .
आपण ज्या योजनेखाली विहीर घेत आहात ती योजना कोणती ?
त्या योजनेत अल्पभू धारक काय हे पाहणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

respected sir,
recently i have come to notice that there is a tax exemption on property for army and paramilitary forces.
therefore it is requested to you that kindly send me the copy of the said govt order to my mail id so that i alongwith my friends can facilated.
your kind co-operation in this regard will be highly appreciated.
yours
Dnyaneshwar Patil

A local body es-specially in states other than Maharashtra have given tax exemption to residential properties .
however such tax exemption is not given for agricultural properties in Maharashtra

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वनशेती जमीनीवरील नविन शर्तीची अट काढून,वारसांचे नावे खातेवाटप करून प्रत्येकाच्या नावे 7/12 उतारे मिळतील का?
वनशेत जमीन , शासन प्रदान करत नाही
त्या मुले त्या द्वारे अतो घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही
७/१२ स्कॅन करून पाठवा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,गावठाणा मधील जमिनीचा ७/१२ असतो का?एखाद्या गावातील काही भाग गावठाण हद्दीत समाविष्ट झाल्यास त्या जमिनीचा ७/१२ बंद होतो का?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
गावठाणातील जमिनीस मिळकत पत्रिका असते
७/१२ बंद करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदिवासीची जमीन आदिवासीला घेण्यासाठी विकणा-या आदिवासीला सर्व जमीन विकता येते काय ?
मात्र त्याचे एकूण धारण क्षेत्र , शेत जमीन कमाल मर्यादा धारण कायद्या नुसार, कमाल मर्याद्या पेक्षा जादा होता कामा नये

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाची आहे.८ अ च्या उताऱ्यावर क्षेत्राचा उल्लेख आहे.परंतु ७/१२ सदरी क्षेत्राचा उल्लेख नाही .तरी ७/१२ सदर क्षेत्राचा अंमल देणेकामी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
अशी वस्तुस्थिती असणे अनाकलनीय आहे
८ अ ला जमिनीचे क्षेत्र आहे परंतु ७/१२ सादरी नाव नाही
आपण तहसीलदार यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by yogeshpatil
23-11-2015
yogeshpatil373@gmail.com

आतरजिल्हा बदली मध्ये लिपिक/तलाठी सवर्गच्या बदली होत त्याप्रमाणे अव्वल कारकुन/मंडळ अधिकारी यांची आंतरजिल्हा बदली होते का . जर होते असेल मी अव्वल कारकुन या पदवर कार्यरत असून पालघर जिल्हायातुन जळगाव जिल्हाबदली बाबत पर‍िपुर्ण प्रस्ताव शासनाला सादर केले आहे तर मा.जिल्हाधिकारी जळगाव यांनी अव्वल कारकुन/मंडळ अधिकारी हे जागा ही आंतरजिल्हा/ आंतरविभाग बदलीने भरली गेल्यास सध्या कार्यरत लिपिक/तलाठी कर्मचाऱ्यांची ज्येष्ठतेवर परिमाण होणारे आहे अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातील पदे पदोत्रतीचे असल्याने सदरची पदे हे आंतरजिल्हा/ आंतरविभाग बदलीने भरण्यात येऊ नये असे या कार्यालयाचे मत आहे असे शासनाल पत्र सादर केले आहे.
तसेच अव्वल कारकुून सवर्गतील एकुण १७ पदे जळगाव आस्थपनेवर रिक्त आहे तसेच इतर १ अव्वल कारकुन यांनी आंतरजिल्हा बदली जळगाव जिल्हामध्ये अव्वल कारकून संवर्गात सामावुन घेण्यात हरकत नसलेल्या पत्र दिली आहे. या प्रकरण आपले मागदर्शन मिळवो
१९८९ साली वडिलोपार्जित जमीन वाटणी पत्राने भाव बहिणींना वेग वेगळी मिळाली होती ...२०१० साली तहसीलदारांनी सक्ख्या भावाला बहिणीच्या जमिनीवर कुळ असल्याचा निर्णय देऊन आदेश दिला होता. ३/८/२०१५ रोजी उपविभागीय अधिकार्यांनी बहिणीचे अपील मान्य करून तहसीलदारांचा निर्णय आणि त्यानंतर झालेले सर्व फेरफार रद्द करण्याचे आदेश पारित केले . मात्र या आदेशात अपिलासाठी किंवा अंमलबजावणी साठी किती दिवसाची मुदत वैगेरे नमूद केले नाही .
या आदेशानंतर तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांनी 23/९/२०१५ रोजी फेरफार करून ७/१२ दप्तरी पुन्हा बहिणींची नवे दाखल केली . त्यानंतर भावाने एम आर टी मध्ये अपील दाखल करून २९/९/२०१५ रोजी या आदेशाविरोधात स्थागिती आदेश आणला आणि तो तलाठी यांनी त्याच दिवशी नोंदवला.

त्यानंतर परवा त्या भावाने आत्महत्या केली. आणि आता त्याचे कुटुंबीय आरोप करतात कि तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांनी नोटीस देऊन ६० दिवस थांबून फेरफार करायला हवा होता.

तलाठी मंडळ निरीक्षक दोषी आहेत का ???
नाही
स्थगती आदेश असल्याशिवाय , नोंद मंजूर करणे थाबवता येणे , उचित नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडील ह्यात असताना मुलगी तिचा हिस्सा मागू शकते का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
नाही
हिंदू वारसा सुधारणा कायदा २००५ नंतर , वडिलांचे मर्त्य ननतर , त्यांना हिस्सा मिलेले

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.सर मि आदिवासी समाजाचा आहे माजी शेती ही माजी सैनिकाची असून माननीय तहसीलदार सा यांनी माझ्या बाजूनि निर्णय दिला ७/ १२ माझ्या नवानी करुण दिला पण माला आज रोजपर्यन्त शेतीचा ताबा मिळवुन दिला नहीं तरी मला ताबा कोणच्या पदतींनी मिळेल याचे उपचार सूचवा।।

ही विनंती
तहसीलदार आपले जमिनीचा ताबा देतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदिवासी व्यक्ती ची शेत जमीन बिगर आदिवासी व्यक्ती विकत घेऊ शकतो का? त्याबाबत चे शासन निर्णय / परिपत्रक मिळावे
अधिवासीची जमीन बिगर अधिवासी सक्षम प्रधीकार्याची / शासनाची परवानगी घेवून विकत घेऊ शकतो ..............कृपया आपण जवळच्या तहसील/प्रांत कार्यालयात संपर्क साधा आपल्याला शासन निर्णय मिळेल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by प्रदिप
19-11-2015
pradipmore@gmail.com

सर नमस्कार , हे सकेंत स्थळ अतिशय उत्कृष्ट आणि उपयोगी आहे, त्याबद्दल मी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो.

मी माझा प्रश्न खाली लिहित आहे.

सर, आम्ही एकत्र कुटुंबामध्ये वाढलो. माझ्या दोन्ही भावांच्या आणि वडिलांच्या नावानावर सर्व जमीन आणि घर होते. सर्व संपत्तीची आणेवारी आधीच झालेली होति. माझ्या नावावर जी जमीन होती ती एकत्र कुटुंबामध्ये विकली गेली. आता आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला . माझ्या नावावर समान हक्क मिळण्यासाठी आम्ही न्ण्यायालायातून हुकूमनामा करून घेतला आणि सर्व संपत्तीचे तिघा भावामध्ये समान वाटप केले . त्या साठी कुणाचाही विरोध नव्ह्ता. तो हुकूमनामा घेऊन आम्ही गाव तलाठी यांच्याकाढे अर्ज केला . त्यांनी नकार दिला आणि आम्हाला सांगितले कि तो तो अर्ज तहसीलदार यांना करा . आम्ही तो अर्ज हुकुमनाम्यासाहित आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज केला . त्यांनी आम्हाला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सांगितले .

प्रश्न क्रमांक १⇒ येथे मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे आहे का?

जमिनीचे मुल्यांकन आणि मुद्रांक शुल्क किती भरावें लागते यासाठी जिल्ह्यामध्ये अर्ज केला. मुद्रांक शुल्क प्रचंड झाले. त्यामध्ये आमची चुक झाली. जमिनीमध्ये काही वर्ष्यापुर्वी डाळिंब होते, ते दुष्काळामुळे जळून गेले, परंतु सात बारा वरून ते कमी केलेले नव्हते. त्यामुळे जमिनीची किंमत प्रचंड झाली .

प्रश्न क्रमांक २⇒ यामध्ये आता आम्ही दुरुस्ती करू शकतो का?

हुकूमनामा करून एक वर्ष झाले आणि मुल्याकन आणि मुद्रांक शुलाकासाठी अर्ज करून सहा महिने झाले. मुद्रांक शुल्क विभागामध्ये आम्हाला सांगितले कि, ४% मुद्रांक आणि २% प्रत्येक महिन्याला दंड भरावा लागेल.

प्रश्न क्रमांक ३⇒दंडाची रक्कम हि हुकूमनामा झाला तिथून धरतात कि मुद्रांक किती असावे यासाठी अर्ज केला तिथून?

प्रश्न क्रमांक ४⇒ मुद्रांक शुल्क भरून नोंदणीसाठी अर्ज तहसीलदार यांना करावा कि सहाय्यक निभंधक यांना करावा?

प्रश्न क्रमांक ५⇒ जर आम्ही मुद्रांक शुल्क भरले तर, आम्हाला नोंदणी फी भरावी लागेल का?

प्रश्न क्रमांक ६⇒ मुद्रांक शुल्कामध्ये बचत करण्यासाठी आता आम्ही बक्षीस पत्र करू शकतो का?

प्रश्न क्रमांक ७⇒ मुद्रांक शुल्क भरून आम्ही काय करायला हवे?

कृपया मार्गदर्शन करा . धन्यवाद.
हुकूमनामा झाला तेव्हापासून मुद्रांक शुल्क भरावे लागेल. उशीर केल्यास प्रती महिना दोन टक्के दराने ज्यास्तीत ज्यास्त ४०० टक्के इतका दंड भरावा लागेल.............एकदा कोर्टाचा हुकूमनामा झाल्यावर परत दुसरा दस्त करणे रीतसर नाही. मुद्रांक शुल्क भरल्यावर आपण नोंदणी फी भरून नोंदणी करून घ्यावी.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,इनामवर्ग ६ब बाबत ५०%नजराणा रक्कम भरणेकामी ग्रास चलनाद्वारे ७ दिवसाची मुदत मिळते.त्यामुळे फक्त पत्र घेऊन २ महिन्याने चलन घेतले तर चालेल का?त्यासाठी किती दिवसाची मुदत असते.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
आदरणीय सर ,एखादी व्यक्ती परागंदा असल्यास तिच्या वारसांना जमिनीमध्ये किती वर्षांनी हक्क प्राप्त होतो?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
हरवल्याची नोंद केल्यानंतर सात वर्षांनी .............दिवाणी न्यायालयात केस केल्यावर ते निर्णय घेते

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

पोलिस स्टेशनला हरव्लेची नोंद केलेवर .................व्यक्ती न सापडल्यास ............दिवाणी कोर्टालात्याबाबत अधिकार आहेत

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Grampanchat hadditil shetrachi bigar sheti karnyche adhikar kona kade ahet (national banka n.a plot aslyshivay housing loan det nahit)
ग्राम पंचायत हद्दीतील बिन शेती करण्याचे अधिकार , जिल्हाधिकारी यांना आहेत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री पाणबुडे साहेबांचे आभार, (प्रश्न ०३.११.१५ ,०७.११.१५) ला अनुसरून माझे प्रश्न असे आहेत
माझ्या आजोबांची व वडिलांची शेतजमीन १४.६५ हे होती, परंतु २.४.१९९० मध्ये आजोबांनी व वडिलांनी तलाठी दफ्तरी अर्ज केला कि आमच्या वयो मानानुसार आमची जमिनीची देखभाल होत नाही म्हणून जमीन आमच्या मुले,सून ,नातू यांचे नावें करण्यात यावी नंतर तलाठी साहेबांनी खाते फोड केली (फेरफार नोंद-अर्जावरून व जंगल वहिवाटवरून नोंद केली)
१.सावत्र (मोठा)भाऊ २.० हे +पो ख १.१४ हे
२. सावत्र (मोठा)भावाची बायको २.० हे +पो ख १.१४ हे
३.मी स्वत(अ प क माझीआई):२.० हे +पो ख १.१४ हे
४.माझी आई १.० हे
५.आमचे वडील १.९९ हे +पो ख१.१६ हे
६. आमची आत्या १.०८ हे
असे विभागले असून नंतर आजोबा २.११.१९९० ला वारले नंतर वडिलांनी २००४ ला तलाठी दफ्तरी अर्ज केला कि माझ्या नावावर असलेले क्षेत्र पत्नीच्या नावें करण्यात यावे(फेरफार नोंद- तहसीलदार वाटप रजिस्टर २४८/२००४ प्रमाणे नोंद मंजूर) आता आईच्या नावावर २.९९+१.१६,माझ्या २.०+१.१४,भाऊ २.०+१.१४,वाहिनी २.०+१.१४,आत्या १.०८,असे क्षेत्र होते/आहे कब्जे वहिवाट प्रमाणे भावाकडे त्याचे व वहिनीचे क्षेत्र(जमीन)त्याच्याकडे आहे व आईचे,आत्याचे व माझे क्षेत्र (जमीन)माझ्याकडे(आई,वडील व मी एकत्र राहतो)आहे,भाऊ विभक्त राहतो १९९० पासून,माझ्या वडिलांना पहिल्या पत्नीपासून
१ मुलगा
३ मुली आहेत
(पत्नी वारली आहे ~१९७०)नंतर माझ्या आई शी विवाह झालेला आहे ,एक मुलगा(मी) व २ बहिणी आहेत .
माझे प्रश्न असे आहेत
१)भावाने आत्याची जमीन (त्याच्या बहिणीला आत्या धाख्वून तिचे सर्वे पुरावे तसे बनवून मंजे ओळखपत्र
आधार कार्ड,रहिवासी धाख्ला)माघील १५ दिवसात बनवले आहे व त्या जमिनीचे खरेदी करण्यासाठी
प्रयत्नशील आहे,तरी मला यावर कायदेशीर रित्या काही करता येईल का? आत्याला कोणीही वारस नाही(माझे वडील मंझे तिचा भाऊ आहे)
२)भावाला आता ६.२८+१.०८ हे जमीन होत आहेव मला ३.१४ हे व आईची ४.१५ हे पण मला आई कडची जमीन माझ्या नावावर करायची आहे(आई तयार आहे)परंतु मला भावाची संमती लागेल का?तो कायदेशीर रित्या वारसा हक्क सांगू शकेल का?मला माझ्या हिस्स्यात बहिणीचे(माझ्या सक्ख्या बहिणी २)हक्क सोड पत्र करायचे आहे
(त्या तयार आहेत) परंतु मला सावत्र बहिणीचे हक्क सोड पत्र करावे लागेल का?त्या देणार नाहीत काही कायदेशीर मार्ग आहे का?
३)आपण DUAL OWNERSHIP हि संकल्पना आहे असे सांगितले आहे,परंतु याला काय
करावे लागेल मार्ग सांगावा.
४)जंगल वाहिवती वरून नोंद म्हणजे काय?याचा अर्थ काय होतो.

आदरणीय सर
अ व्यक्तीस क व ख ही दोन मुले होती.अ व्यक्ती १९/११/१३ रोजी व क व्यक्ती १९२० ला मयत झाली.क व्यक्तीस मुले नव्हती.३मुली होत्या.क व्यक्तीची पत्नीही पूर्वीच मयत झाली होती.सन १९३५ रोजी फाळणी मोजणी होऊन क च्या एका मुलीचे नाव (श)७/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल होऊन अपाक.म्हणून ख व्यक्तीच्या मुलाचे म्हणजेच चुलत भावाचे नाव दाखल झाले.सदर मुलगी (श) १९४६ रोजी मयत झाली.तिला मुले होती.
परंतु सन १९७९ साली ख व्यक्तीच्या मुलांच्या मुलांनी (नातवांनी) श व्यक्ती १९७५ साली मयत झाली (४ वर्षापूर्वी )असा अर्ज का.त.यांचेकडे देऊन स्वतःची नावे लावून घेतली.(जबाबामध्ये शासनाची दिशाभूल करुन श व्यक्ती ख च्या मुलाची मुलगी आहे,(म्हणजेच स्वतःची बहिण) असे दाखवले आहे.)त्यानुसार गावदप्तरी ७/१२ उताऱ्यास नोंदी करुन घेतल्या.
सदर जमिनीची चुलत भावांच्या मुलांनी सन १९९४ रोजी करारनामा करुन सदर जमीन इनामवर्ग ६ ब ची असल्याने शासनाची बिनशेती प्रयोजनार्थ जुनी शर्त विक्री परवानगी घेऊन सन २००८ मध्ये तिऱ्हाईत व्यक्तीस विक्री केली .आज रोजी ७/१२ सदरी तिऱ्हाईत व्यक्तींची नावे आहेतव्यक्तीचे नाव आहे.
तरी श व्यक्तीच्या मुलांना /बहिणीच्या तरी ‘श’व्यक्तीच्या मुलांना,बहिणीच्या मुलांना,नातवांना सन२००५ च्या वारसा अधिनियमानुसार प्रस्तुत जमिनीत हक्क मागता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
सर computer किंवा information technology मध्ये engineering केलेल्या मुलांना सूद्धा mpsc exam साठी Ms -IT certificate गरजेचे आहेका?
आदरणीय सर,एलिनेशन रजिस्टर ,वंशावळ ,कैफियत,विविध इनाम इ.मोडी लिपीतील कागदपत्रे किती सालापर्यंत उपलब्ध होऊ शकतात?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
शिंदेसाहेब हे त्या त्या ठिकाणी रेकॉर्ड चे जतन कसे केले आहे यावर अवलंबून आहे .............सर्वसाधारणपणे सर्व कायम रेकॉर्ड संबंधित निश्चित केलेल्या रेकॉरड रूम मध्ये असणे अपेक्षित आहे ..........परंतु असे जरी असले तरी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची परिस्थिती ...तत्कालीन जागेची उपलब्दता....इत्यादी बाबीवर आजची वास्तविकता अवलंबून आहे .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आमचे चार भावांचे सात बा-या मध्ये नाव नाही आहे. चुलत भाउ नाव लावण्यास तयार नाही.. तलाठी त्यांना नावे लावण्यासाठी नोटीस पाठवितो. पण ते काही न करता नाव न लावण्याबाबत हरकत घेतात. जमीन वडिलोपार्जित आहे. पण कागदोपत्री सिध्द करण्यासाठी आम्हांला कोणता नमुन नं कींवा सातबारा वा फेरफार तलाठी कार्यलायामधून घ्यावे लागतील.
वाडवडिलांचे ७/१२, ८अ, वारस नोंदी , व सर्व फेरफार .....................मिळावा . ते पाहिल्यावर वस्तुस्थिती समजेल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... महोदय
7/12 एकञित आनेवारीत आहे,एकूण 84 लोक आहेत, इतर हक्कात संरक्षित कुळाची नोंद आहे, सदर क्षेञ 25 वर्ष पडीक आहे, तर नवीन पिक पाण्याची नोंद स्वताच्या हिस्सा पुरती होऊ शकते
सर नमस्कार शैक्षणीक कारणाने बिनशेती करावया ची आहे तसा प्रस्ताव प्रांत अधिकारी यांचेकडे सादर केला आहे पण बाजुच्या शेतकर्याने आमच्या जागेवर अतिक्रमण केल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशन व प्रांत अधिकारी यांचेकडे दाखल केली आहे बिनशेती करण्यास हरकत घेतली आहे आता आम्हाला काय करावे लागेल या विषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
मोजणी करून आपले क्षेत्र व हद्दी कायम /निश्चित करून घ्या .....................

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबा च्या नावे असलेल्या जमिनीतून सन १९८२-८३ साली सर्वे नंबर मधून गट नंबर होत असताना ८ आर जमीन क्षेत्र कमी झाले आहे.
या नुसार आपण सांगितल्या प्रमाणे जुने १९७४ सालचे ७/१२ हि काढले आहेत यात सर्व जमीन व्यवस्तीत आहे
परंतु सन १९८२-८३ साली सर्वे नंबर मधून गट नंबर होत असताना ८ आर जमीन क्षेत्र कमी झाले आहे.
तरी याबाबतची सर्व कागदपत्रे मी तहसील मधून सर्व ७/१२ व फेरफार घेतली आहे . तरी आता हि कागदपत्रे कोठे द्यायची व कोणता अर्ज करायचा या बाबत संपूर्ण माहिती मिळावी
धन्यवाद
जमीन एकत्रि कारण योजनेवेली जर क्षेत्र..कमी /ज्यादा झाले असेल तर त्याबाबत उप संचालक भूमी अभिलेख यांचेकडे दाद मागता येते

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3