जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर
पटटे वाटप करुन दिलेल्‍या गायराण जमीनीची मा.न्‍यायालयाने भावाभावात वाटणी केली आहे, पटटे वाटप गायरान जमीनीचे फक्‍त वारसा फेरफार घेता येते परंतु एक भावाच्‍या नावाने वाटप झालेल्‍या जमीनीची वाटणी मा.न्‍यायालयाने भावाभावात वाटणी केली आहे.
तरी खालील प्रमाणे मार्गदर्शन करावे.

1) सदर न्‍यायालयीन आदेशान्‍वये फेरफार घेता येतो का
2) त्‍यासाठी सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्‍यक आहे का
3) सदर आदेशाचे पालन न करता सक्षम अधिकारी यांची परवानगी घेण्‍यास कळविल्‍यास न्‍यायालयाचे आदेशाचा अवमान केल्‍यासारखे होईल का
म ज म ८५ प्रमाणे तहसीलदार यांचे आदेशानंतर फेरफार घेत yeyil

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

नमस्‍कार सर

तहसिल कार्यालयात 7/12 वरील इतर अधिकारातील कुळ, साधा कुळ, स.कुळ, सं कुळ अशा नोंदी असलेल्‍या उडवण्‍यासाठी अर्ज येत आहेत. अशा असलेल्‍या नोंदी उडवण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का
महाराष्ट्र कुल्वहिवत व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ , १५ व ३१ अन्वये कुलाची वहिवाट संपुष्ट करण्याचे अधिकार मामालेतदार यांना आहेत .
तथापि , कलम १४ खाली मालकाने तीन महिन्याची आगाऊ सूचना कुलास देणे आवश्यक आहे . या कालावधीत जर , ज्या तृती साठी सूचना देण्यात आली आहे , त्याची दुरुस्ती कुळाने केली नाही तर , कुल्वहिवत संपुष्टात अंत येते .
कलम १५ अन्वये , कलम ३१ चे अधीन , मालक कुलाची वहिवाट
१. स्वतः स कसण्यासाठी
२. बिनशेती उपयोगासाठी
संपुष्टात अनु शकतो . तथापि मालकाने अशी सूचना , ३१ डिसेंबर १९५७ पूर्वी दिलेली असली पाहिजे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब, आमचे सामाईक घर तसेच घराच्या भोवती काही जमीन आहे.. त्या घराच्या जागेमध्ये अनेक हीस्सेदारांची नावे आहेत. त्या मोकळ्या जागेमध्ये आम्हांला शौचालय बांधावयाचा आहे. मी ग्रामपंचायतीकडून अधिकृत परवानागी घेतली.त्यांनी मला परवनगी दिली. परंतु इतर नातेवाईक वारंवार हरकत घेत आहेत.तसेच त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. तर मला शौचालय बांधवयाचे आहे...तर मी काय करू..शौैचालय बांधणे योग्य की गटविकास अधिकारी यांच्या उत्तराची वाट पाहणे योग्य आहे. मला ग्रामपंचायत सहकार्य करत आहे. परंतु सह हिस्सेदार अटकाव आणत आहे. तर मी काय करू...
गटविकास अधिकारी यांच्या उत्तराची वाट पाहणे योग्य. स्मरण पत्र द्या

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर माझे मोठे भाऊ इंन्डियन आर्मी मध्ये आहे आमचे गाव पुर्नरवसीत आहे गावामध्ये घराचे प्लॉट शिल्लक आहेत माझा मोठ्या भाऊला गावामध्ये प्लॉट मिळवन्यासाठी काय करावे लागेल कारण शिल्लक रिटायर आर्मीसाठी राखीव आहेत असे ग्रामपंचायत मध्ये सांगण्यात आले आहे योग्य ऊत्तर मिळावे न्रम विनंती
जिल्हाधिकारी कडे अर्ज करा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माननिय महोदय,
मला माझ्या पणजोबांच्या पासून वंशावळ काढायची आहे.

माझ्या सख्या आजोबांपासून पुढे कोणाच्याआमच्यापर्यंत कोणाच्याही नावे शेत जमीन नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी नाही. आम्ही आमच्या जमिनीचा हक्कसोड, किंव्हा जमीन विकलेली नाही.


आता मला शेतजमीन घ्यायची आहे. तर वंशावळ काढून मला शेतकरी दाखला मिळू शकतो का?
वंशावळ काढायची काय प्रोसिजर आहे?
कोणाकडून मिळते व किती दिवसात मिळते?
आदरणीय सर,रक्तनातेसंबंधात खरेदीखत/बक्षिसपत्र करताना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.अशी घोषणा मा.महसूलमंत्री यांनी केली होती.त्यासंदर्भात शासन निर्णय असल्यास मार्गदर्शन होणेस विनंती.
In pursuance of clause (3) of article 348 of the Constitution of India, the following translation
in English of the Maharashtra Stamp (Amendment) Act, 2015 (Mah. Act No. XX of 2015), is hereby
published under the authority of the Governor.

(18) in Article 34, in column 2, after the existing proviso, the following proviso
shall be added, namely:-
“Provided further that, if the residential and agricultural property is gifted to
husband, wife, son, daughter, grandson, grand-daughter, wife of decesed son, the
amount of duty chargeable shall be rupees two hundred.”;
(19) in Article 35, in column 2, for the words “Two hundred rupees” the words
“Five hundred rupees” shall be substituted;

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

एखाद्या वाकातीस फसवून मुर्तुपत्र करून घेतले असल्यास ते रद्द होवू शकते का त्याबाबत कायद्यातील तरतुदी कोणत्या याची कृपया माहिती मिळावी ही विनंती
व्यक्ती मृत्युपत्र केल्यानंतर मयत झाली दिवाणी न्यायालयात ते सिद्ध karave लागेल त्यानंतर न्यायालय ते रद्द करेल .
मृत्युपत्र करणारी व्यक्ती जिवंत असल्यास व स्वत दुसरे मृत्युपत्र केल्यास apoaap पहिले रद्द होईल

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by rajaram
31-12-2015
rajaram4021@gmail.com

सर, माझे आजोबा १९७० साली मयत झालेले आहेत,मयत झालेनंतर ६ क फेरफारला आमची सर्वांची म्हणजे माझ्या वडिलाची,आत्याची , चुलत्यांची नावें लागलेली होती .परंतु ७/१२ वरती माझे आजोबा मयत झालेवार फक्त माझ्या चुलत्याचे ए.कु .म. म्हणून नाव लागलेले होते.इतर हकाम्ध्ये कुणाची नावें लागलेली नव्हती .१९८५ सालापासून चुलत्याने ए.कु म.नाव कमी करून आमच्या आजोबांची जमीन विकलेली आहे त्यावरती माझ्या वडिलाची,आत्याची सही , सोढपत्र ,वाटणीपत्र ,वाटप झालेले नसताना चुलत्याने जमीन विकलेलीआहे . आता ५.३० मधील ३.०० एकर विकलेली आहे व जी २.०० एकर आहे ती मुदत खरेदी दिलेली आहे. आणि ३० गुंठे जमीन आपल्या पत्नीच्या नावें केलीली आहे.तरी सर आम्हला आमची सगळी जमीन परत मिळेल का ,त्यासाठी काय करावे लागेल.कृपया उपाय सांगा.
न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननिय महोदय,
मी तांत्रिक दृष्ट्या शेतकरी नसून प्रत्यक्ष भात शेती करतो मी महाराष्ट्र शासनाचे
ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजि,
शेळीपालन,
टर्कीपालन,
दुग्धव्यसाय प्रशिक्षण,
याचे प्रशिक्षण घेतले असून त्याचे सरकारी सर्टिफिकेट्स आहेत.

श्री सुभाषजी पाळेकर सरांचे नैसर्गिक शेतीचे शिबीर केले आहे

मी दरवर्षी 4 ते 5 कृषी प्रदर्शन निरनिराळ्या दूरवरच्या जिल्ह्यात जाऊन पाहतो.

माझ्या कडे गेली 8 वर्षापासून 5 ते 7 शेतीविषयक मासिकं येतात ज्या मध्ये महाराष्ट्र शासनाचे "शेतकरी" या मासिकाचा सुद्धा समावेश आहे.
तरी सुद्धा मला शेतकरी नसताना शेतीसाठी जमीन मिळू शकत नाही का?

मी महाड, माणगाव तालुल्यात जिल्हा रायगड येथे जमीन पहिली आहे खरेदी करण्या साठी. मला तेथे शेती व शेती संबधित व्यवसाय करायचा आहे.
तर मला शेतकरी दाखला मिळू शकतो का?

शेतकरी दाखल्या साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

चुलत चुलते शेतकरी आहेत.
महाराष्ट्र कुलवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ प्रमाणे बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खरेदी करता येत नाही.मात्र याच कलमाचे पोटकलम २ अन्वये बिगर शेतकरी व्यक्ती शेती प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन शेती जमीन खरेदी करू शकते . मात्र अश्या व्यक्तीचे अन्य सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न दहा हजारापेक्षा कमी असणे आवश्यक . दहा हजारापेक्षा कमी उत्पन्न , आजचे काळात अश्यक गोष्ट आहे . त्यामुळे आपणास शेत जमीन खरेदी करता येणार नाही . मात्र आपणास बिन शेती प्रयोजांसाठी शेत जमीन खरेदी करता येयील . त्यासाठी उत्पन्नाची अट नाही

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

बक्षीस पत्राने घेतलेली जमीन विकता येते का
इतर काही अटी नसतील तर विकता येयील

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय सर,
मला माझ्या जिरायत (माळरान) जमिनीचे सपाटीकरण करून (जमीन खूप उंच सखोल,दगड धोंडे ,व मुरुमाची आहे) व गाळ भरायचा आहे,तरी मला कोणत्या विभागाची परवानगी घ्यावी लागेल,व त्याची माहिती कोठे मिळेल ,मला मार्गदर्शन करावे,अशी नम्र विनंती..
सपाटी कारण करण्यासाठी कोणाची परवानगी गरज नाही
मात्र गौण खनिज स्वामित्व धन वसुली बाबत , आपण साठनिक तहसीलदार यांना अवगत करा .
जमीन सपाटी कारणासाठी स्वामित्व धन भरण्याची आवश्यकता नाही . या बाबत Bombay Minor Mineral Rules मध्ये हि दुरुस्ती करण्यात आलेली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,
मी माझ्या जमिनीत विहीर खोदली असून तिची नोंदणी ७/१२ होणे कामी मा तलाठी यांच्याकडे तसा अर्ज,७/१२ उतारा,विहिरीचे स्थान नकाशा,१०० रु च्या स्टंप पेपर वर प्रतिज्ञापत्र दिलेले आहे
,व पोहोच घेतलेली आहे परंतु अजून तलाठी साहेबांनी नोंद केलेली नाही,दीड महिना झलेला आहे ,तरी मला कोणाकडे अपील करावे लागेल,कृपया मार्गदर्शन करावे.
संबंधित तहसीलदार यांच्याकडे दाद maga

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

नमस्कार
अ ब क हे एकञित कुटुंबा आहेत व त्याचे एकञित घर आहे ब ह्यास एकच मुलगी आहे तर तिला घरच्या मालमत्तेत अधिकार आहे का?
अ ब क चे निधन जुलै २००५ पुवीॅ झालेत
महानगर पालिका क्षेत्रात पिक पाहणी नोंद करता येते का
फेर्फाराने केवळ पहिल्या पतीनीच्या वारसांची नोंद केली आहे व दुस-या पत्नीची वारस नोंद केली नाही त्या फेर्फार्विरुद्ध तक्रार करायची आहे.
कोणाकडे तक्रार किंवा अपील करावी लागेल मार्गदर्शन करावे.

उपविभागीय अधिकारी

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

नमस्कार सर,
मी मुंबई ला सरकारी नाेकरीत आहे. मला गावी आदीवासी जमिन घ्यायची आहे आमच्या नावे काेठेही जमीन नाही मी आदीवासी जमीन घेउ शकताे का? ती जमीन माझ्या नावावर हाेऊ शकते का?
कृपया मागदर्शन करावे.
सक्षम अधिकाऱ्यांच्या पुर्वपरवaनगीने घेतां yeyil

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सक्षम अधिकाऱ्यांच्या पुर्वपरवaनगीने घेतां yeyil

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

मी शेत जमीन खरेदी करत आहे. विक्रीसाठी जागा आली आहे त्याचा ७/१२ वर (भोगवटादार वर्ग -२ विविध कायद्या खालील नवीन शर्तीने, वतन खालसा कायद्या नुसार शर्तीस पात्र ) असे लिहलेले आहे. व पाटील इनाम आहे असे सांगण्यात आले. मी ही जमीन खरेदी करुशकतो का? त्यासाठी माला काय करावे लागेल.
आदरणीय सर,चालू सालातील संगणकीकृत ७/१२ उतारा घेतला असता कब्जेदार सदरी असलेल्या नावांच्या समोर असलेला फेरफार त्या व्यक्तींची मालकी दर्शवित नाही.सर्वांच्या नावासमोर सारखाच फेरफाराचा उल्लेख आढळतो.त्यामुळे हस्तलिखित ७/१२ चा आधार घ्यावा लागतो.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.

Question by samadhan
23-12-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
माझ्या वडिलांच्या मृतुनंतर आपापसात वाटप होऊन हिस्से /गट पडले व सावत्र बहिणीच्या (सौ अ.) हिश्याची जमीन त्या आम्हा दोन भावांना देऊ इच्छितात. त्या गटामध्ये आमचे नाव नाही.इतर हक्कामध्ये शासनाकडील परिपत्रक अन्वये सौ अ. यांनी साऱ्याच्या ४० पट नजराणा रक्कम दि १८/२/२०१४ रोजी भरणा केली असे श्री ब. व सौ ब. यांना विक्रीसाठी. असा फेरफार शेरा आहे. परंतु सौ अ. आणि श्री व सौ ब. यामध्ये व्यवहार झाला नाही. सौ अ. या माझ्या सावत्र बहिण असून त्या त्यांचा हिस्सा मी व माझा भाऊ यांना देऊ इच्छितात. त्या श्री व सौ ब. यांच्याशी व्यवहार करू इच्छित नाहीत.
१) हक्कसोड पत्र करावे कि खरेदी करून घ्यावे अथवा बक्षीस पत्र करून घ्यावे?
२) इतर हक्कात असलेल्या फेरफार शेरयाची काही अडचण असू शकते का?
३) त्यांचे मिस्टरांची(श्री अ.) परवानगी आवश्यक आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे.
आपला कृपाभिलाषी.
scan ७/१२ upload करा . इतर हक्कात शेर काय आहे हे नक्की कळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकाच घरातील ४ व्यक्तींचे मृत्यू अनुक्रमे १९७६, १९७८, १९८६, १९९४ साली झालेले आहेत. परंतु, त्यांच्या मृत्युची नोंद अद्याप स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलेली नाही. तरी, सदरची नोंद आता करता येईल का ? तसेच सदर बाबतीत विलंब झाल्याबाबतची कार्यवाही कोणती याबाबत मार्गदर्शन मिळावे.
दिवाणी न्यायालयातून आदेश ghyavet

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर नमस्कार मी पहिल्यांदाच प्लॉट खरेदीचा व्यवहार करत आहे तरी प्लॉट खरेदी करताना एजंट कडून किंवा ज्या व्यक्ती कडून प्लॉट घेत आहे त्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्यामुळे त्यांचाकडून कुठलीही फसवणूक होऊ नये म्हणून कोण कोणती कागद पत्रे पहावी
१. प्लॉट आपण बिनशेती कारणासाठी खरेदी करत असाल तर , बिनशेती परवानगी घेतली आहे का ?
२. title search
3. paper notice dene

आपण वकील यांचा सल्ला घेऊन , त्यांना खरेदी प्रक्रिया करण्यासाठी मदत घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तलाठी या पदाकरिता कालबध्द पदोन्नति बाबतीत आवश्यक अटी व नियम या बाबत पूर्णमाहिती द्यावी. सलग १२ वषॆ सेवा दिल्या नंतर कालबध्द. देतात. की ज्या दिनांकास महसूल अहताः परीक्षा उत्तीर्ण होतो त्या ता. पासून कालबध्द ची वेतन. निश्चित. करतात सविस्तर. माहिती द्यावी.
३५-४० वर्षापासून आमच्या स्वतःच्या जमिनीवर वहिवाट कब्जा व ताबा होता व आहे पण त्याच्या शेजारील भू धारकाने ३०-३५ वर्षांनी आत्ता २०१५ ला त्याच्या जमिनिची मोजणी आणली आहे व त्यामध्ये त्याची जमीन आमच्या प्लॉट मध्ये १० फुट सरकते.. म्हणजे आमचे व शेजारील पूर्ण राहते घरे जातात असे या मोजणीत निष्पन्न झाले आणि त्या जागेवर तर आमचे घर बांधून ३५-४० वर्षे झालेत. आणि आता तो भू धारक.... आम्हाला टोर्चर करत आहे...पण आमची घरे पक्की आहेत व ती बांधून ३०-४० वर्षे झाली शिवाय ग्रामपंचायतीचा कर सुद्धा आम्ही भरतो व असीसमेंट ला सुद्धा नोंद आहेत आणि जर का त्या व्यक्तीची जागा आमच्या प्लॉट मध्ये १० फुट सरकते मग आमची जागा आमच्या शेजारील प्लॉट धारका मध्ये तेवढीच सरकते असे ४ प्लॉट धारक एक-मेका मध्ये सरकतात, मग चारही घरे आम्हाला पडून द्यावी लागतील आणि आता बांधलेली घरे पडून जागा मोकळी करून देणे म्हणजे आमच्या सारख्या वर खूपच मोठा अन्याया होईल... कारण आता बांधलेली ४-५ घरे पडणे म्हणजे शक्य नाही तरी कृपया यावर काही उपाय सुचवावा। जेणे करून कोणाचे काही नुकसान होणार नाही.
आईच्या नावे सहा घुन्ठा प्लॉट आहे सदर प्लॉट एने असून आईकडून बकक्षिस पत्राने घ्यावा कि खरेदी करून घ्यावा कोणत्या व्यवहाराने सोयीस्कर होईल.
बक्षीस पत्र करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर!
आमच्या वडिलांनी स्वतः च्या शेत-जागेवर ३०-३५ वर्ष पूर्वी घर बांधले आहे... त्यावेळी फक्त त्या परिसरात ५-६ घरे होती... त्या नंतर आता ३०-३५ वर्षांनी आमच्या शेजारील भू- धारकाने शासकीय मोजणी आणली व त्यामध्ये असे निष्पन्न झाले कि त्यांचा प्लॉट आमच्या प्लॉट मध्ये १० फुट सरकतो …. आता या परिसरात एवढी घरे झाली आहेत कि कोणाची जागा किती व कुठे सरकली हे कळणे अशक्य आहे. आमचे घर बांधून तर ३०-३५ वर्ष झाली पण आता तो म्हणतो तुमचे अतिक्रमण काढून घ्या... कृपया यावर उपाय सुचवा.
भूमी अभिलेख खाते यांची मोजणी अंतिम असते . त्या मोजणी प्रमाणे कारवाही करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3