जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माझे वडील जिवंत असून vadilanchya मालमत्तेची वाटणी झालेली नसून मी नौकरी लागल्यानंतर मिळवलेल्या मालमत्तेत दुसरा भाऊ वाटणी मागू shakato का? (स्वत:ची milkat)
माननीय सर,
मला विहीर मालकी हक्क संबधी माहिती हवी,
सविस्तर खालील प्रमाणे.
सर आमच्या वडिलांनी आमच्या शेताच्या बांधला लावून २० ते २५ वर्ष्या आगोदर दोराच्या सहायाने जमीन मोजून विहीर खोदली देवाच्या कृपेने विहिरीला फुल पाणी लागले,लगेच वडिलांनी ती विहिरीची विदुयत मोटरची ५ ह प डिमांड कडून आत्ता प्रेयंत चालू आहे. परंतु शेजार च्या शेत मालकाने शेत १५ वर्ष आगोदर शेताची नवीन मोजणी केली असता ती विहीर त्याच्या शेतात गेली,तशी त्याने तलाठ्या च्या मदतीने त्याच्या शेतात तिची नोदनि करून घेतली.त्या विहिरीची नोदनि आमच्या ७/१२ उतार्यावर पण आहे. नंतर त्या मालकाने त्या विरीवर ३ ह प चा मोटार डिमांड न काढता चालवत आहे जवड १२ ते १३ वर्ष पासून.परंतु ह्या वर्षी कमी पावसाडा झाल्या मुळे त्या विहिरीची खोदाई व बांधणी करावी लागणार आहे. या साठी आम्ही त्या मालकाला निमे निमे पैश टाकू आसे सांगितले तर तो म्हणतो मी पैसे देणार नाही.मग त्याला आम्ही सांगितले कि तू ह्या विहिरी मध्ये मोटार ठेउ नको, जर तुला मोटार ठेवाचीच असेल तर तू कैदेशीर ३ह प ची डिमांड काढ.
तर सर मला ह्या वरून एवढीच माहिती हवी आहे कि ह्या वीरची खोदाई व बांधणी आम्ही करू शेकतो का थोडक्यात म्हणजे मालकी हक्क आमचा कि त्या शेती मालकाचा .जर समजा मालकी हक्क त्या शेती मालकाला दिला तर मग आम्ही २० वर्ष पासून जे विदूत बिल भरतो आहे ती विहीर चोरीला गेली का. कृपया आम्हाला मदत करा या विषयी, आणि आजून एक तो मालक आमच्या जातीचा आहे पण कुटुंबातला नाही. तसेच आमच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा वाद विवाद नाही..
नमस्कार किरण सर प्रथम तुम्हाला धन्यवाद . माझा प्रश्न असा होता कि माझी मौजे नागाव तालुका अलिबाग रायगड येथे गट नंबर १३१ ची मोजणी २००७ साली झाली होती तेव्हा सरव लगतदाराना ती मान्य होती . माझ्या घराच्या उत्तर कडील हद्द घराच्या आगदी लगत जात असल्याने २०१० साली मी घराची दुरुस्ती केली व साधारण दोन फुट जागा सोडली . २००७ साली दाखविण्यात आलेल्या हद्दी प्रमाणे लोखंडी पोल कंपाऊंड आहे. उत्तरेकडील कबजेदारान १8 जून २०१५ साली मोजणी केली ती अडीच फूट माझ्या हद्दीत आली . मी तुमच्या सल्लाया प्रमाणे जीलहा आधीक्षक भूमी अभिलेख यथे तक्रार केली त्यानुसार २७ ऑगस्ट २०१५
रोजी फेर मोजणी झाली व ती २००७ प्रमाणे आली. व १८ जून ची मोजणी रद्द करण्यात आलेली आहे असे लेखी पत्र ही आहे. तरीदेखील उत्तरेकडील कबजेदार सरकारी करमचारी असून हे मान्य करायलाच तयार नाही त्यांच्या मानसीक त्रासाला कंटाळून कसेबसे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून तारकंपाऊड केले. व शेडनेट लावले . त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तारकंपाऊडची उंची सात फुट ठेवली. सध्या तो मला ऊंची व शेडनेट कढणयासाठी धमकी देत आहे. तसेच मी माझ्या बागायती क्षेत्राला उत्तरेकडील कंपाऊंड करूशकत नाही आसा नीयम सांगत आहे. तर मी फुढे काय करावे जर सरकारी कर्मचारी कायदयाचे पालन करत नाही तर सामान्य माणसाने काय करावे? मी आता पुढे काय करावे ? कृपया मला मार्गदर्शन करावे. ही वीनंती.
साहेब, सात-बारा मध्ये नोंद करण्यासाठी दुस-या एका नातेवाईकाचे वारस तपास करणे राहीले आहे तरी ते पहीले वारस तपास करणे आवश्यक आहे का...त्यानंतर आमचे होत..करावे लागेल का...
एकाच वेळी तपास करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
हिंदु एकञित कुंटुबा मध्ये मुलिंना हक्क मिळतो का
आणि एकञित कुंटुबात एखाद्द्याला एकच मुलगी असेल तर तिला मालमत्तेत हिस्सा मिळु शकतो का
तिचे वडील २००५ आधी मयत झालेत
सर,माझ्या आईला इतर तीन बहीणी व तीन भाऊ (माझे मामा) असून माझे आजी आजोबा(आईचे आई वडील) जिवंत आहेत.आजोबांना साठ एकर जमीन होती जी त्यांनी१९९२ साली मुलींचा विचार न करता व हकसोडपत्र न घेता मुलांच्या (माझ्या मामांच्या ) नावे केली व नंतर त्यांनी त्यांच्या मुलांच्या.
आता माझ्या आईला त्यात वाटा पाहीजे आहे मिळू शकतो का?
मी असे वाचले आहे की डिसेंबर 2005पुर्वी कायदेशीर झालेले वाटप त्याला कायद्याने बाधा होणार नाही मग येथे कोणते वाटप कायदेशीर व कोणते बेकायदेशीर असेल
आपले प्रश्नात नमूद केले प्रमाणे , २० डिसेंबर २००४ पूर्वी वाटप झाले असेल तर , बहिणींना हक्क सांगता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पन्नास वर्षापासून आम्ही ज्या घरात राहतो घर पट्टी माझ्या आजोबाच्या नावावर आहे घर पट्टी पण आम्ही च भरतो त्या घरात आज़ोबाच्या भावाचे नाव आहे ते हिस्सा मागता आहे काय करावे ते कधी या घरी रायले पण नाही घर पट्टी पण कधी त्यानी भरली नाही काय करावे कृपया सल्ला दया
घरात राहिले नाही अथवा घरपट्टी भरली नाही म्हणून , चुलत आजोबांचा हक्क संपुष्टात येत नाही
त्यांचा घरावर हक्क आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

'काबुलायात' म्हणजे काय?
शासकीय गृहकर्ज घेऊन खाजगी जागेवर स्वतःचे घर बांधणार्‍या शासकीय कर्मचार्‍याने तो रहात असलेले शासकीय निवासस्थान रिक्त करणेबाबत शासनाचे काय आदेश आहेत ?
मा.तहसीलदारसो यांचे न्यायालयात मामलेदार कोर्ट act १९०६ अन्वये मालकी हक्काचे जमिनीतील अतिक्रमण काडनेसाठी बी.एन.डी. case दाखल करण्यासाठी अर्ज कसा करावा?त्याचा format कसा असावा?
आपण माम्लेतदार कोर्ट अक्त चे कलम ५ वाचावे .
अतिक्रमण काढणे या कायद्यात अभिप्रेत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,माझ्या मालकी हक्काच्या जमिनीमध्ये त्रयस्थ व्यक्तीने अतिक्रमण केले आहे.सदर जमिनीची शासकीय मोजणी करून भूमी अभिलेख कार्यालयाने सदरचे प्रकरण 'क'प्रत देऊन निकाली काढण्यात आले आहे.तरी गटा शेजारील व्यक्ती सोडून त्रयस्थ व्यक्ती अतिक्रमण करीत आहेत .तरी मोजणी झालेनंतर सदरचे अतिक्रमण काद्नेसती काय करावे?
मार्गदर्शन करावे,हि विनंती.
१. आपण त्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४४१ खाली Criminal Tresspass अंतर्गत फौजदारी दाखल करू शकता .
२. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध , Specific Relief Act खाली , अतिक्रमण करण्यास मनाई करणे बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५०,५९ व परिपत्रक दि.२३/८/१९८२ ची सविस्तर माहिती मिळावी
हि विनंती.
आपण हि कलमे व परिपत्रक वाचा . अडचण असल्यास प्रश्न विचारा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या मालकीच्या जमिनीतून नवीन कालवा (सन २०१० साली) गेला आहे. प्रत्यक्षात तो २०१४ ला पूर्ण झाला व २०१५ साली पाणी आले.परंतू कलम ४(१) नोटीस भुसंपादन विभागाकडून व्यपगत झालेली आहे. तर या भुसंपादनाला नवीन भुसंपादन कायदा लागू होऊ शकतो का? तसेच याच जमीनीतीतून आधीच्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे रस्ताही गेलेला आहे. तर कायद्यानुसार वेगळ्या दोन प्रकल्पांसाठी एकाच शेतकर्‍याची जमीन भुसंपादित करता येते का? येत असेल तर तो माझ्यावर अन्याय नाही का? कृपया मार्गदर्शन व्हावे.
एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जमीन संपादन होऊ शकते
४(१) ची अधिसूचना व्यपगत झाले वर , नवीन अधिसूचना काढली आहे का?
निवडा जाहीर झाला आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दिवाणी न्यायालयात मनाई साठी व मामलेदार यांचे न्यायालयात बी.एन.डी खाली एकाच case साठी दावा दाखल करता येऊ शकतो का?
माझे वडील वन विभागाकडे असणारी ३०० एकर क्षेत्रापैकी २० एकर क्षेत्र १९५०ते१०७५ पर्यंत खंडाने वाहिवाठीत होते.तरी १९७५ सालानंतर ७/१२ सदरी पुन्हा forest लागले आहे.परंतु त्रयस्त व्यक्ती ती जमीन आनाधीकृतपणे वाहिवाठ्तात.तरी ती जमिन आम्ही पूर्वी खंडाने करीत असल्याने आम्हाला वाहिवात्न्यासती मिळू शकेल का?त्यासाठी काय करावे ?
मार्गदर्शन करावे,हि विनंती.
सर नमस्कार शैक्षणीक कारणाने बिनशेती करायचं आहे जी जमिन बिनशेती करायची आहे ती भूमिअभिलेख कार्यालयाकडून रितसर मोजणी करून हद्द निच्चित केली आहे व त्या जमिनी भोवती तार कूंपन केले आहे व सर्व कागदपत्राची पुर्तता करून प्रांत अधिकारी यांचेकडे रितसर प्रस्ताव सादर केला आहे शेजारच्या शेतकर्याचे संमतीपत्र तहसिलदार यांचेसमोर करून दिले आहे परंतु एका शेतकर्याने त्याच्या शेतावर अतिक्रमण केल्याची बाब रेटून धरत प्रांत अधिकारी यांचेकडे बिनशेती करण्यास हरकत घेतली आहे वास्तव असे आहे की अतिक्रमण त्या शेतकर्याच्या शेतावर झालेले नाही त्याची जमीन त्याने 20 वर्षामध्ये एकदाही मोजून घेतली नाही तरीही तो चांगल्या कामात अडथळा करत आहे काय करावे सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती
श्री. किरण पाणबुडे साहेब

नमस्कार,

खालील दिलेल्या प्रश्नास उत्तर दिल्यापाद्दल धन्यवाद.

प्रश्न असा आहे कि मयत व्यक्तीची पत्नी वृद्धापकाळामुळे हिंडूफिरू शकत नाही आणि त्यांची दोन्ही मुले त्यांच्या काम धंद्यामुळे आमच्या सोयीनुसार हक्कसोड पत्र करण्यासाठी तालुक्याला दुय्यम निबंडक कार्यालयात येउ शकत नाहीत पण ते इतर सहकार्य करण्यास तयार आहेत.

सदर काम मार्गी लागण्यास मार्गदर्शन करावे.


नमस्कार,

प्रश्न : सात बारामधून कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे नाव कमी करावयाचे आहे. माहिती खालील प्रमाणे आहे.

सात बारा मधील कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे निधन झालेले आहे तसेच वारस तपास पूर्ण झालेला आहे आणि ज्याचे नाव कमी करावयाचे आहे त्यांच्या कुटुंबाची काही हरकत नाही आहे. तसेच मयत व्यक्तीची पत्नी , त्यांची मुले आणि त्यांच्या पत्नी जमिनीवरील हक्क सोडण्यास तयार आहेत. तर काय करणे उचित ठरेल. हक्क सोड पत्र का बक्षीस पत्र ? त्याची प्रक्रिया काय आहे ? का अजून काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल काय ? हक्क सोड पत्र किंवा बक्षीस पत्र कुठे व कसे करावे ? त्याचे मुद्रांक शुल्क किंवा अजून कुठले शुल्क असेते का ? जर ती जमीन अविकसित किंवा पड जमीन असेल तर एकरी काय शुल्क असेल. कृपया मार्गदर्शन करावे.

हक्क सोड पत्र करावे
जमीन ज्या ठिकाणी आहे , त्या तालुक्याचे दुय्यम निबंडक कार्यालयात , आपणास हक्क सोडपत्रकरता येयील
नोंदणी व मुंद्रंक शुल्क माहिती तेथे मिळेल.
सात/बारा मध्ये नाव लावण्यास तलाठी साहेब वेळकाढूपणा करत आहेत. वारस तपास व इतर अधिकृत योग्य मार्गाने नाव लावण्यास कार्यालयामध्ये गेलो असता, तलाठी साहेब सांगतात की, अगोदर मयत व्यक्तींचा वारस करून घ्या नंतर नावे लावतो. परंतु मयत इसमाचा मुलगा वापस तपास करण्यास वेळपणा काढत आहे. ते तलाठी साहेबांना तोंडी सांगतात की, आमची कोणतीही हरकत नाही आपण यांची नावे नोंद करून घ्या परंतु तलाठी साहेब अगोदर इतर नातेवाईकांच्या वारस करण्यास प्रथम सांगत आहे. हे योग्य आहे का...योग्या नसल्यास आम्ही काय करावे.
आदरणीय सर,विश्वस्त संस्थेच्या नावे पूर्वी जमीन आहे.पुन्हा जमीन घेताना ६३ ची परवानगी घ्यावी लागेल का?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....

Question by SACHIN
27-11-2015
sachin.tetgure1992@gmail.com

नमस्कार सर,

अमक्या वडीलनाची गावी जमीन आहे , त्यावर चुलत भावकी व सकखी भावकीची नावे लागली आहेत.. तर 7/12 वरुण त्यांची नावे कशा प्रकारे कमी करता येतील? कायदेशीर खटला न चालवता? काही वायक्तिक वादामुळे खातेफोड करण्यास अडथळा तयार करत आहेत ...कृपया याबद्दल मार्ग द्यावे ही विनंती?
आदरणीय सर,
तलाठी संवर्गातुन मं अ संवर्गात दि.14/12/2010 रोजी झालेल्या बैठकीत माझी निवड झाली .मी फेब्रुवारी 2011मध्ये माझे जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले.निवड समितीच्या बैठकीच्या 1 वर्षाच्या मुदतीत पदोन्नतीकरीता पद रिक्त असतानाही अस्थापना लिपीक/अका यांनी जाणिवपुर्वक वरीष्ठांकडे टिप्पणी सादर न केल्याने मला पदोन्नती मिळाली नाही.माझ्या पुढे निवड यादीत नाव असणा-या तलाठी यांनी 1वर्षाची मुदत संपल्यानंतर वाढीव 6महिन्याच्या कालावधीत त्याचे जातवैधता प्रमाणपत्र दाखल केल्यानंतर व त्यावेळी नवीन जागा रिक्त झाल्यावर त्याला पदोन्नती देण्यात आली .मधील 6महिन्याचा कालावधी जाणिवपुर्वक (15.11.2011 ते26.05.2712)वाया घालविला.व मुदत संपली म्हणून मला डावलले.मला कळविण्यात आले नाही.
नंतर परीक्षा पास झालेप्रमाणे निवड यादी केली.त्याप्रमाणे मला 21.11.2014 रोजी पदोन्नती दिली.त्यानंतर 05.04 2015रोजी नव्याने आदेश काढला की,जरी पदोन्नती दिली असली तरी आपणास ज्या जागेवर पदोन्नती दिली ती जागा 28 फेब्रुवारी रोजी रिक्त झाल्याने पदोन्नतीचा लाभ 1मार्च 2015पासुन मिळेल.
माझा प्रश्न
प्रशासनाची ही क्रुती योग्य आहे काय ?
हिंदु एकञित कुटुंबा मध्ये एखाद्द्याला एकच मुलगी असेल तर तिला वारसा हक्क मिळु शकतो का?
तिचे वडील २००५ च्या आधी वारले
आदरणीय सर, बिनशेती सनद म्हणजे काय?याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती....
मा. सर सन २००३ मध्ये वडिलोपार्जित मिळकतीची वाटणी मृतुपत्र द्वारे झालेली आहे. परंतु नवीन हिंदू वारसा सुधारणा कायदा २००५ नुसार मुली वडिलांची वडिलोपार्जित मिळकत मागू शकतील काय ?
मिळकतीची वाटणी मृत्य पत्र द्वारे २००३ मध्ये झाली आहे . त्या मुले हिंदू वारसा कायदा २००५ च्या कलम ६ (५) अन्वये , मुलीना आता हिस्सा मागता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आई वडील हयात असताना वडिल व इतर तीन mulanchyaइच्छेविरुद्ध ek मुलगा वाटणीसाठी जबरदस्ती करू शकतो का? असे केल्यास कायद्यानुसार उपाय suchava
वडिलोपार्जित ( ancestral ) मिळकत असेल तर ,
होय .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.42 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3