जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by राहुल सावंत
16-06-2016
sawantrahul1974@gmail.com
सर नमस्कार माझा प्रश्न असा आहे कि सात बारा उतारा वाचत असताना जमिनीचे क्षेत्रफळ जे हेक्टर आर चो.मी मध्ये दिलेले असते ते हेक्टर आर म्हणजे किती गुंठे जमीन असते , तशेच ०. २०.०० असे जेव्हा लिहिलेले असते तेव्हा किती गुंठे जमीन असते याची आपण माहिती द्यावी हीच नम्र विनंती .
एक गुंठा = ३३ फूट X ३३ फूट किंवा १०८९ चौरस फूट
एक आर = १०७६ चौरस फूट किंवा १०० चौरस मीटर
एक एकर = ४० आर किंवा ४००० चौरस मीटर किंवा ४३०५६ चौरस फूट किंवा ०.४१ आर
एक हेक्टर = १०० आर किंवा २.४७ एकर किंवा १०,००० चौरस मीटर
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप सहाने
15-06-2016
sahanesa@gmail.com
माननीय महोदय,
एकाच सात बारावर दोन रस्त्याची नोंद असू शकते का?
आमच्या सात बारावर दोन रस्त्याची नोंद आहे. "सार्वजनिक रस्त्याचा हक़्क़" आणि "वहिवाटीच्या रस्त्याचा हक़्क़". सदर नोंद बरोबर आहे का? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
Question by प्रदीप नामदेव बोरले
15-06-2016
pradip.borle6226@gmail.com
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदार दारिद्र्यरेषेखाली नसल्यास १०/-रु चे अर्ज शुल्क भरले नाही तर माहिती चा अर्ज या कारणास्तव अपात्र ठरू शकतो काय ?
नाही. परंतु माहिती अधिकार्याने त्याबाबत कळविल्यास ते शुल्क भरावे लागेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by भिमराव साहेबराव वाघ
15-06-2016
wbhimrao100@gmail.com
माझे आजोबा नारायण लाहनुजी वाघ यांची कुळ जमीन सातबारा व गटनंबर रा. कोठा
Question by rohit patil
14-06-2016
rhtpatil168@gmail.com
सर माझे आजोबा त्यांना चार भाऊ होते ते असे भास्कर , बाबू, मोहन, भादू हे त्यांच्या नावावर एक घर होते त्या घरात आता एक म्हणजे भास्कर व त्यांचा परिवार राहत आहे व ते बाकी लोकांना तेथे राहू देत नाही त्या घरात सर्वांचे नाव आहे तरी त्यावर काही उपाय सांगावा हि विनंती
Question by rohit patil
14-06-2016
rhtpatil168@gmail.com
सर मला १९२१ सालची एक फेरफार नोंद हवी आहे ४६३ पण ती नोंद रेकॉर्ड रूम ला नाही त्या आधीचे सर्व नोंद आहे पण ते रजिस्टर मिळत नाही आहे तरी ती नोंद पहायची आहे तर ती कशी मिळेल ते सांगू शकता का .....
रजिस्टर मिळत नाही तर रेकॉर्ड रूम कडून तसे पत्र घ्या. इतर संबंधित लोकांकडे विचारणा करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by किरण kale
14-06-2016
kkale40@gmail.com
शर्तभंग नियमित करावा म्हणून अर्ज करा कोठे करावा आणि तसे होईल का ?सात /बारा उतार्यावर राखीव वन अशी नोंद आहे परंतु आता तेथे वन नाहीत मग ते कमी होवून मिळेन का?
शर्तभंग नियमित होउ शकतो. संबंधित तहसील कार्यालयात विचारणा करा. राखीव वन नोंद कमी होणे अवघड आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sandeep s patkar
14-06-2016
sandip.s.patkar@gmail.com
Dear Sir,
Kindly guide us on below points as we are planning to purchase agricultural land in Kudal, sindhudurg
Land is Class 2 land with " Avibhajya niyantrit satta Prakar " and " Sarkari Akari Pad "
1. Is it possible to purchase such kind of land?
2. If yes then what will be the procedure for the same?
3. Is it possible to convert this land in Class 1?
Your help is highly appreciated.
Thanks,
Sandeep S Patkar
1. It is possible to purchase such kind of land with prior permission of Collector
2.For the procedure, enquire in concern Collector office.
3. It possible to convert this land in Class 1, after paying the appropriate amount in Government Treasury.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Pankaj patil
14-06-2016
drpankajrpatil3@gmail.com
Which posts comes under state civil services and which1 unders non-state civil services in maharashtra?
it is better to enquire on site of Maharashtra Public Service Commission.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by भागवत गणेश
14-06-2016
bhgwat36@gmail.com
१) एकाच शेती शेत्रावर दोन राष्ट्रीयकृतबँकेचे पीककर्ज घेता येते काय ? २) किंवा एकाच शेत्रावर जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक असे दोन्ही एकाच वेळी पीककर्ज घेता येते काय? ३) शेत्रावर बँकेचा कर्जाचा बोझा असताना त्याची वाटणीपत्र करून फोड करता येते का? सर हे प्रश्न मी पाठवले होते त्याचे उत्तर आपल्याकडून आले आहे. धन्यवाद पण असे गैरप्रकार आमच्या भागात मोठ्या प्रमाणात होत आहेत या बाबत तक्रार कोणाकडे करावी ? व यास जबाबदार कोणाला धरता येईल. व यासाठी काही दंडाची तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती कळवावी.
१) एकाच शेती शेत्रावर, बँकेचा ना हरकत दाखला असल्याशिवाय , दोन राष्ट्रीयकृतबँकेचे पीककर्ज घेता येत नाही. २) एकाच शेत्रावर बँकेचा ना हरकत दाखला असल्याशिवाय , जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक असे दोन्ही एकाच वेळी पीककर्ज घेता येत नाही. ३) शेत्रावर बँकेचा कर्जाचा बोझा असताना, बँकेचा ना हरकत दाखला घेऊन वाटणीपत्र करून फोड करता येते . या बाबत तक्रार बँकेकडे, तहसीलदारकडे करावी यासाठी बँकेचा ना हरकत दाखला घेतल्याशिवाय , दुबार कर्ज घेणार्यास जबाबदार धरता येईल. व यासाठी फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रामनाथ कदम
13-06-2016
ramkadam1278@gmail.com
आदरणीय सर शेतीसाठी रस्ता नसल्यास काय करावे ?
१ रस्ता आपल्या गटातूनच मिळतो कि जेथून सोय असेल तेथून
जर शेजारील माणूस रस्ता देत नसेल तर काय करावे मी शेत नागरु शकत नाही
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यास , जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलाम 143 अन्वये बांधावरून रस्ता देण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे. अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
शेतीसाठी रस्ता नसल्यास तहसीलदारकडे रस्ता मागणी अर्ज करावा, जेथून सोय असेल तेथून तहसीलदार रस्ता देऊ शकतात.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
13-06-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या व्यक्तीचे वडील ५० वर्षापूर्वी मयत आहेत .आज रोजी मुलांकडे ते मयत असलेबाबत कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नाहीत व सरकार दप्तरी आढळ होत नाहीत.त्यामुळे वारस नोंद होत नाही.तसेच मुलांचे चुलतेहि त्यांना विरोध करत आहेत.तरी वारस नोंद करणेकामी कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
इतर पुरावे सदर करून, दिवाणी न्यायालयातून वारस दाखला मिळवावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by jathar
12-06-2016
www.roraj8@gmail.com
१९३५ साली आम्हाला आमच्या स्वताच्या विहिरीच्या कायम स्वरूपी पाण्याच्या बदल्यात घर बांधण्यास तोंडी जागा दिली. त्यावर आम्ही घर बांधले. त्यानंतर आमच्या ५ पिढ्या आम्ही ती जागा आम्ही वापर करतोय जागेचा कोणताही कागद आमच्या कडे नाही घर बांधताना आम्ही आमच्या घराभोवती तीन बाजूने आंगण काढले व आता आम्हा विहिरीचे पाणी नको आम्हला आमची जागा द्या म्हणतात
घर नोंद करताना जुन्या काळात फक्त घरातील मोजमाप होत होते अंगणाचे नाही तर आमची १९३५ साला पासून वहिवाट आहे आज पर्यंत आम्हाला कोणीही आडविले नाही
मार्गदर्शन करावे
80 वर्षे आपण जागेचा वापर करत आहेत. आपली वहिवाट /ताबा त्यांना माहित आहे . आपल्याला जागेतून निष्कासित करणेसाठी त्यांनी कोणतेही प्रायांतही केलेले नाही. त्यामुळे आपण Adverse Possession च्या तत्वाने मालक झालेला आहेत .आपली मालकी The Specificc Relief Act खाली या पूर्वीच्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे दिवाणी न्यायालयाकडून जाहीर करून घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rohit
12-06-2016
www.roraj8@gmail.com
दोन भावाच्या नावे वडिलोपार्जित जमीन असताना, यात कोणतेही वाटप अथवा खातेफोड नसताना एका भावाने स्वतचे मुत्युपत्र तयार केले आहे या मुत्युपात्रास आम्हा वारसांचा विरोध आहे तसेच दुसर्या भावाचाही विरोध आहे. तर हे मुत्युपत्र तलाठी साहेबांनी नोंद न करण्यास काय करावे.
आम्हा सर्व वारसांची वारस नोंद लागावी व सर्वाना समान हिस्सा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे
कृपया मदत करावी
कोणत्याही सीमा किव्हा चातुर्सिमा ठरलेल्या नाहीत किवा कोणतीही मोजणी झालेली नाही
वडिलोपार्जित जमिनीतील स्वतःचा हिस्सा मृत्यू पत्राने दिला जाऊ शकतो. नोंदीबाबत तक्रार असेल तर तक्रार अर्ज तालाठीकडे दाखल करा. मंडलाधिकारी त्यावर तक्रार केस चालवून निकाल देतील
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by vijay dinkar mohite
11-06-2016
mohitevijay786@gmai.com
आपला प्रश्न/सूचना... sir...saprem namskar ...mi khed Ratnagiri madhe rahat asun..mi 3 gunta jamin vikat ghetali aahe ..tachi notary sudha keleli aahe jagechya nakasha nusar malkane aamhala Jo jageparyant janyasathi rasta dila aahe...tyach rastya var dusryane ghar bandhale aahe mag ya sandarbhat mi grampanchayat javal takrar hi keli .matra 3 mahine zale tari ajun tya takrarikade konihi laksha det nahi...mag ashavile mala jage paryant jayala rasta kasa milavata yeyel....jamin malak sadhya hayat nahit....krupaya marg darshan karave
आपण जमीनखरेदी करताना , त्याची नोंदणी कायद्या अंतर्गत नोंदी दाटस केलेला नाही . त्या मुले आपल्याला मलिकी हक्क प्राप्त होत नाही .
तथापि आपण The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात आपली मालकी सिद्ध करून मिळण्यासाठी दावा करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
तुम्ही जर तुमचा व्यवहार दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केला नसेल तर त्या व्यवहाराची नोंद शासकीय दप्तरात होणार नाही. तुमचा व्यवहार जर कायदेशीर असेल तर तुम्ही तहसीलदारकडे दाद किंवा रस्ता मागू शकाल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by हेमंत मोरे
11-06-2016
hemantanilmore@gmail.com
सर नमस्कार
आम्ही तीन भाऊ व एक बहिण आहोत यात वडील हयात असताना सर्वाना घरे करून दिली आज त्यात मी राहत असलेले घर माझ्या वाट्याला आले होते पण ते घर मी त्या वेळी माझ्या नावावर केले नाही ते घर अजूनही वडिलाच्या नावावर आहे आता ते घर मला माझ्या नावावर करायचे आहे या प्रक्रियेत माझी आई , मोठा भाऊ व बहिण माझ्या बाजूने आहेत मी राहत असलेल्या घरावर सर्वानु मते माझा अधिकार आहे यात माझा एक भाऊ सही देत नाही तरी मला घर नावावर करण्या विषयी मार्गदर्शन करावे हि विनंती
घर कोणाच्या हद्दीत आहे ? वाट्याला आले होते म्हणजे नेमके कसे? या बाबत खुलासा आवश्यक. अन्यथा हा वाद दिवाणी न्यायालात सोडवला जाऊ शकतो
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रवि
11-06-2016
ravindra171282@gmail.com
आदरनिय सर , आमच्या शेजारील शेताच्या उतारा क्रमांक हा आमच्या उतार्याच्या अनुक्रमानिकेने आहे सदर चे शेत एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावे आहे आणि त्या उताऱ्या मध्ये इतर अधिकारी सदरा मध्ये आमच्या आजोबाचे नाव ता.ग.दे सदरी आहे आणि त्या पुडे कंस मध्ये १ नंबर आहे सर सदर च्या नोंदी चा अर्थ आणि उद्देश काय होता जर स्पष्ट करावे हि विनंती सर जो उतारा आमचा आहे ती शेती आमच्या आजोबांनी विकत घेतलेली होती.
Question by रवि
11-06-2016
ravindra171282@gmail.com
आदरणीय सर कायदेशीर रित्या हक्क सोड पत्र तयार केले आहे आणि तलाठी कार्यालयात नोंदी साठी दिले असता आम्हाला ओंन लाईन फेरफार निघेल असे सांगितले आणि tehsil कार्यालातून नोंद ओंन लाईन होईल असे सांगितले सर सदर च्या बाबतीत प्रश्न असा आहे कि तहसील कार्यालात आम्हाला कोणाकडे भेटावे लागेल किवा ओंन लाईन फेर्फार्र त्यांचा channel कसे असेल त्या बद्दल सांगावे कि जेणे Karun भविष्य मध्ये दस्त नोंदवले बरोबर तहसील कार्यालात भेट देवून सदर च्या नोंदी चा पाठ पुरावा करता येईल किवा ओंन लाईन फेरफार इंटर नेठ वर बघता येईल का किवा त्याचा पाठ पुरावा कसा करावा e फेरफार कश्या प्रकारे कार्य करेल त्या संबंधी अधिक ची माहि द्यावी
Question by girish shinde
10-06-2016
girishinde12@gmail.com
आदरणीय सर वादिलोपार्जित जमिनीचे वाटपपत्र तयार करताना एखादा सहहिस्सेदार वगळले गेला असेल तर अश्या बाबतीत मंडलाधिकारी नोंद प्रमाणित करतात का?
वाटप पत्र नोंदणीकृत असेल तर नोंद प्रमाणित करतात ...तक्रार हरकत आलेस पुरावे पाहून निर्णय घेतला जातो.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by प्रदीप बोरले
10-06-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
एका शेतजमिनीचे वारस नोंद करणेबाबत हरकत आहे.यामध्ये वारस ठरविण्याचे अधिकार महसूल विभागास आहे काय ? किंवा वारस नोंद करणेबाबत काय कार्यवाही करावी ? कृपया मार्गदर्शन करावे.हि विनंती.
वारस नोंद करताना तलाठी व मंडळअधिकारी हे चौकशी अधिकारी असून ते स्थानिक चौकशी करून वारस ठरवतात.यासाठी तलाठी दप्तरातील गाव नमुना ६ क वारस प्रकरणांची नोंदवही हा नमुना आहे.काही प्रसंगी वारस बाबत तपास लागत नसलेस मंडळ अधिकारी दिवाणी न्यायालायातून वारस प्रमाणपत्र मागणी करू शकतात.वारस नोंदी बाबत महसूल मित्र मोहसिन शेख ब्लोग वरील ७-१२ वरील वारस नोंदी हे डॉ.संजय कुंडेटकर सर लिखित पुस्तक वाचावे अधिक संकल्पना स्पष्ट होतील.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by chandrakant wankhede
10-06-2016
mr.chandrakant_wankhede@rediffmail.com
आदरणीय सर, माझ्या लहान भावाला आई आणी वडिलांनी सन २००५ मध्ये नोकरीसाठी ४ लाख रुपये भरले. सन २००५ ते २००८ पर्यंत तो शिक्षण सेवक असल्याने तीन वर्ष त्याला खर्च करण्यासाठी वरून ५००० रु. महिना द्यायचे. सन २००१ मध्ये त्याच्या नावावर LIC ची २ लाखाची POLICY काढली. त्याचे हप्ते आतापर्यंत वडिलांनी भरले. सन २००७ मध्ये वडील सेवानिवृत्त झाल्यावर त्याला घराशेजारी १५०० स्के.फुटचे ४ रूम चे घर ८ लाखाला घेऊन दिले. तो आई वडिलांमध्ये राहून त्याचे घर भाड्याने देऊन भाडे कमाई करून, ते व पगाराचे पैसे शिल्लक टाकायचा. त्याच्या पत्नीला डी. एड. करण्यासाठी २ लाख रुपये भरले. आतापर्यंत मला काहीच दिलेले नाही. मी भाड्याच्या घरात राहतो. ४ रूम मधील २ रूम माझ्यासाठी तात्पुरते राहायला मागितले असता, तेही देत नाहीत. मला न सांगता लहान भावाचे ऐकून घर विक्रीला काढले आहे. वडील माझ्या नावावर घर करायचे म्हणतात तर आई व भाऊ त्यांना धमकावून त्यातले हि २ रूम लहान भावाला द्या म्हणतात. तरी मला योग्य मार्गदर्शन करा हि विंनती.
तुमच्या प्रश्नावरून असे वाटते कि वरील सर्व खर्च तुमच्या वडलांनी त्यांच्या स्वकष्टार्जित उत्पन्नातून केला आहे. त्यांच्या हयातीत त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीत तुमचा अधिकार नाही. वडिलांना विनंती करून बघा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by shekhar agivale
09-06-2016
s.agivale23@gmail.com
आदरणीय सर माझा आईचे वडील 1991 ला मयत झाले तेव्हा बहिणींची नावे इतर अधिकार सदरी आले व् भाऊ व् आईचे नाव कब्जेदार सदरी दाखल झाले , आता आई मयत झाली तर तिचे वारस लागताना बहिणींची नावे कोठे येतील?
१)ते इतर अधिकार सदरिच राहतील की दोन्ही ठिकाणी ( कब्जेदार व् इतर अधिकार सदरी )
Question by prakash mansaram patil
08-06-2016
pmpatil69@gmil.com
Adaraniy sir आम्हा 4 भावंडमधे जमिनीचे वाटप करायचे आहे ,, तर इतर अधिकार सदरी काही जुन्या सावकार नावे लागलेली आहे , त्यांची सम्मती आवश्यक आहे का ?
Question by भागवत गणेश
08-06-2016
bhagwat36@gmail.com
१) एकाच शेती शेत्रावर दोन राष्ट्रीयकृतबँकेचे पीककर्ज घेता येते काय ? २) किंवा एकाच शेत्रावर जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक असे दोन्ही एकाच वेळी पीककर्ज घेता येते काय? ३) शेत्रावर बँकेचा कर्जाचा बोझा असताना त्याची वाटणीपत्र करून फोड करता येते का?
Question by रोहिदास सखाराम पाबळे
08-06-2016
rohidaspable@yahoo.in
एखाद्या धरणासाठी अधिसूचना प्रसिद्ध होवून १५ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे ७/१२ वर इतर अधिकारात पुर्नवसनासाठी राखीव शेरे पडले आहे परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही पुनर्वसन कार्यालयाने केली नाही त्याबाबतचे मोबदले मिळाले नाही तरी शेरे कमी करण्यासाठी काय करावे लागेल
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
