जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सतीश मासाळ
10-03-2016
satish_masal@yahoo.com
गावठाण विस्तार बाबत माहिती हवी आहे
महसूल व वन विभागाचा दिनानक १० फेबुर्वारी १९८३ चा शाषण निर्णय वाचा . ( तो माझ्याकडे नाही ) .
गावठाण विस्तार हा खालील कारणासाठी होतो
१. लोकसंख्या वाढ
२. भटक्या व मागास जातींचे पुनर्वसन
३.पूरग्रस्तांचे पुनर्वसन
ग्राम पंच्यातीने लोकसंख्या वाढी मुले गावठाण विस्त्राची गरज आहे याची तपासणी करून त्या प्रमाणे ठराव करणे आवश्यक आहे . सदरचा ठराव तहसीलदार यांचेज्कडे द्यावा .
कमीतकमी १५ सदस्यांनी ( २००० किव्न्हा कामीं लोकसंक्या) अथवा २५ लोन्कांनी , २००० पेक्षा जड लोक्सन्ह्य्क़ असल्यास , अर्ज करणे आवश्यक आहे .
शेतकरी कुटुंबास ३००० चौरस फूट तर बिन शेतकरी कुटुंबास १५०० चौरस फूट क्षेत्र जमीन दिली जाते .
सरकारी जागा उपलब्ध असल्यास , ती गावठाण विस्तारास्ठी उपयोगात आणली जाते . सरकारी जागा उपलब्ध नसल्यास , खाजगी जागा संपादित करावी लागते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राम गवाणे
10-03-2016
ram.gavhane@gmail.com
सर आम्ही आमचे बहिणीच्या पूर्ण समंती ने रीतसर मार्गाने हक्क सोड पत्र तहसीलदार कार्यालयात जावून नोंदणी Karun घेतले परंतु बहिनीच्या मुलाने हक्क सोड पत्र नोंदणी झाल्या नंतर आमचे गावाच्या तळाठी कार्यालयात जावून त्या बाबत पत्र तेवून आक्षेप नोंदवला आहे तरी माझा प्रश्न असा आहे कि तो मुलगा हक्क सोड पत्र बाबत आक्षेप नोंदवू शकतो का आणि नसेल तर काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
बहिणीच्या मुलास बहिणीने केलेय हक्क सोड पत्रकावर हरकत घेण्याचा अधिकार नाही . केवळ आपली बहिणच असी हरकत घेऊ शकते . मात्र असि हरकत तलाठी यांचे कडे घेऊन उपयोग नाही . त्या साठी हक्क सोड पत्र दिवाणी न्यायालयात आव्हानित करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रवींद्र गव्हाणे
10-03-2016
ravindra171282@gmail.com
Sanjay Kundetakar सर आपले धन्यवाद मी दिनांक 10.01.२०१६ एक प्रश्न विचारला होता त्या मध्ये ३ मुली आणि ३ मुलां मध्ये जमिनीचे वाटप कसे होयील त्या मध्ये आपण मुलां प्रमाणे मुला इतकाच हक्क असेल सांगितले होते परंतु सर मी त्या मध्ये हा उल्लेख केला नवता कि कि आमचे आत्या चे लग्न हे आजोबा १९८९ साली वारले त्या अगोदर झाले आहे परंतु सर मी तुमचा हिंदू उतराधिकार अधिनियम -१९५६ बाबत आपला ब्लोग वरती भागात वाचला त्यामध्ये आपण जमिनीच्या वाटपा बाबत उदाहरण क्रमांक १ मध्ये असे सांगितले आहे कि दिनांक 22.06.१९९४ च्या पूर्वी मयत व्यक्तीची मिळकत वाटप त्या मध्ये मृत व्यक्तीस दोन मुलगे अ आणि ब आणि दोन मुली क आणि घ आहेत आणि मयताचे मरतु दिनांक १९९४ पूर्वी झाला आहे तर त्या मध्ये मयत व्यक्ती मिळकतीत तीन भाग करता येतील एक मयताचा दुसरा भाग अ चा आणि तिसरा भाग ब चा असेल , अ आणि ब ला मयताच्या मिलकतीत तीन भाग पैकी एक एक भाग मिळेल आणि उर्वरित मयताच्या भागाचे पुन्हा चार भाग होतील असे दिले आहे तर असा काही प्रकार आहे का असेल तर त्या बद्दल मार्गदर्शन करावे कश्या प्रमाणे हे वाटप घडून येते त्या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे त्या बाबत काय नियम असतील तर सांगावे मार्गदर्शन मिल
आपली कागदपत्रे पाहिल्याशिवाय आपले समाधान करणे शक्य होणार नाही. आपण एखाद्या वकिलाचा सल्ला घेणे योग्य ठरेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
09-03-2016
ravindra.golesar@rediffmail.com
नमस्कार सर, दुष्काळ निधी वाटप बाबत शासनाचे कसे नियोजन असते ७/१२ वरील व्यक्तींना स्वतंत्र निधी दिला जातो का. किंव्हा ७/१२ वरील एकाच प्रमुख व्यक्तीला निधी दिला जातो ७/१२ वरील इतर व्यक्तीने हरकत घेतल्यास निधी दिला जात नाही तो निधी परत शासनाकडे जातो का या बाबत काही नियम असल्यास कृपया कळविण्यात येउन उचित मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
७/१२ वर एकापेक्षा अधिक व्यक्तींची नवे असल्यास , ती मिळकत सह्धाराकांची /सामायिक असते . ७/१२ वरील सर्व व्यक्तींना अशी मिळण्याचा हक्क असतो .
आपण आपला बँक खाते क्रमांक / आधार क्रमांक तलाठी यांचे द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित पाटील
09-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर माझे पणजोबा नाव हरी पाटील हे सर्व जमीन विकत होते म्हणून गावातील लोकांनी त्यांची जमीन १९२१ साली एक मुलगा भादू पाटील हा दोन महीन्याच असताना याचा नाव वर बक्षीस पत्र केले व या नंतर त्याला तीन मुले झाली ते सर्व ती जमीन कसत होते पण १९५५ साली भादू पाटील मरण पावले व ती जमीन त्यांचा मुलगा राजाराम पाटील व एकनाथ पाटील अ पा का म्हणून आए यांची नवे लागली व १९८५ पर्यंत याने कासू दिली व त्या नंतर भादू पाटील चा मुलगा राजाराम पाटील याने त्याकार हक्क गाजवला व ती सर्व जमीन घेऊन टाकली तर उर्वरित तीन मुलांचा त्यावर हक्क राहील का
Question by रोहित पाटील
09-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर १९२१ सालची नोंद तहसील मध्ये मिळाली नाही ते म्हणतात ती जीर्ण झाली मंग त्यावर उपाय काय
Question by abhijit
09-03-2016
abhijitkadam55@gmail.com
महोदय,
इनाम वतन जमीन नोंदवही ११८७ नुसार माझ्या गावात देवस्थान इनाम एकूण १११ एकर होता. आता तो ६० एकरच आहे. याबाबतीत बेकायदेशीररित्या जमिनींचे हस्तांतरण झाल्याचे दिसून येते. एकूण २५ एकर जमिनीस कुळ लागले आहे. तसेच कुळानेही जमिनी विकल्या आहेत. काही जमिनींचे ७-१२ खालसा केलेले आहेत. तर ती जमीन मुळ देवस्थानचे नाव करण्यासाठी शासन निर्णय किंवा न्यायालयीन निर्णय आहेत काय? त्याची कार्यपद्धती सांगा
देवस्थान जमिनीस कुल कसे लागले ?
कुळाचे नवे विक्री किंमत कसी निच्छित करण्यात आली ? याचा शोध घेऊन या सर्व घटना विरुद्ध अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
08-03-2016
www.roraj8@gmail.com
आमच्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीचे मुत्युपत्र तयार केले आहे. तर तालाठीने मुत्युपत्र नोंद करण्यासाठी सर्व वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र/ प्रतिज्ञापत्र जोडण्यास सांगितले आहे
तर हे सर्व वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र/ प्रतिज्ञापत्र जोडावे लागते का?
तलाठी म्हणतांत हि सर्व जमीन वडिलोपार्जीत आहे . स्व:कास्ताची नाही
जमीन वडिलोपार्जित असली व तिचे वाटप अथवा वारसाने वडिलांचे हिस्स्यास आली असल्यास , इतर वारसांचे प्रतिज्ञा पत्र आवश्यक नाही .
तलाठी यांना म्हणा , वर्दी नोटीस इतर नातेवाईकांना द्या . कोणाची हरकत असल्यास , नोटीस दिल्याने लक्षात येयील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भाऊराव काकड
08-03-2016
bhaujyoti@gmail.com
आदरणीय सर
माझ्या आईचे वडील १९९० ला मयत झाले . तरी माझा आईला १ भाऊ आहे आणि ३ बहिणी आहे . ३ बहिणींचे नाव इतर अधिकार या सदरात आहे . तर नवीन कायद्यानुसार वाटप कसे केले जाईल . एक बहिण संपत्तीत वाटा मागते आहे . तर तो मिळेल का ? जमीन वडिलोपार्जित आहे तसेच अजून आईच्या चुल्त्यांचीच खातेफोड झालेली नाही .नवीन कायद्यानुसार योग्य ते मार्गदर्शन कराव्वे
वडिलांचा /आई चा मृत्य झाला असेल तर त्यांचे हिस्स्याची जमीन , बहिणीस देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्योती काकड
08-03-2016
jkakad7@gmail.com
आदरणीय सर माझासाठी हे खूप मह्वाचे आहे माझा आईचे वय ७० वर्ष आहे म्हणजे जन्म १९५६ पूर्वीचा .. आईचे वडील १९९० साली मयत झाले . तसे आईचे आणि भावाचे वाद झाले . भावाने वेलीवेली जवळ जवळ ५ लाख रुपये आई जवळून उकळले . आईचे नाव इतर हक्कात आहे . तर नवीन कायद्या नुसार आईला वडिलोपार्जित जमिनीत काही वाटा मिळू सकतो का. ? मामा सांगतोय १ लाख घे आणिसही दे ... नाहीतरी कायद्याने तुझा (बहिणीचा ) काहीही हक्क नाही .. तुला काहीही मिळणार नाही .. मला सुप्रीम करताच निकाल कळलेलाच नाही .आईचे नाव इतर हक्कात असल्याने पण जन्म १९५६ पूर्वीचा असल्याने काहीउपयोग होईल का .. प्ल्झ सर लवकरात लवकर उत्तर द्यावे मी आपली आभारी असेल
सन 2005 च्या कायद्यान्वये 17 जुन 1956 ते 8 सप्टेंबर 2005 या दरम्यान जन्मलेल्या मुलींनाही, हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्मजात हक्क असेल अशी तरतुद केली आहे. परंतू अशी मुलगी दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असावी अशी तरतूद होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 16/10/2015 रोजी दिवाणी अपिल क‘. 7217/2013 (प्रकाश आणि इतर विरुध्द फुलवती आणि इतर या प्रकरणात निकाल देऊन ‘ वडिलोपार्जित हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्मजात हक्क मिळणारी मुलगी आणि त्या मिळकतीत हक्क असणारा सहदायक (कोपार्सनर) हे दोन्ही दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असावेत, मग ती मुलगी कधीही जन्मली असो.‘ असे म्हटले आहे.
तथापी, 20 डिसेंबर 2004 पूर्वी ज्या वाटण्या घडून आल्या त्यांना यामुळे बाधा येणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
सुप्रीम कोर्टाचे निकालाचा गैर अर्थ लोक काढत आहेत
आपण दिलेलेया माहितीनुसार , आई जमिनीत /मिळकतीत हिस्सा आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयेश हरेश्वर पाटील
08-03-2016
jayeshpatil0999@gmail.com
नमस्कार साहेब
मला आपण्याकडू शेतजमीन खरेदी बाबत माहिती पाहिजे आहे.
साहेब मी एक बंगला विकत घेतला आहे. सदरच्या बंगला व जागा मिळून एकूण ५गुठ्ठे जमिन आहे.त्यामधे २७५चौ.मी जागे वर बंगला आहे बाकी जागा मोकळी आहे. सदर च्या ७/१२ हा बिनशेती नाही आहे. आणि माझा नावावर कुठली जमिन नाही आहे व शेतकरी दाखला देखील नाही आहे. तरी मी घेतलेला बंगला व जमिन कायदेशीर मार्गाने ७/१२ बरोबरा माझा नावे कशी करता येईल यांची माहिती पाहिजे होती. तरी आपण्या कडून मार्गदर्शन व सहकार्याची अपेक्षा.
आपण परवानगी घेणे आवश्यक होते
१ जानेवारी २०१५ पासून महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम कायदा १९४८ चे , कलम ६३ मध्ये दुरुर्स्ती झाली आहेत .
या दुरुर्स्ती प्रमाणे , बिनशेती वापरासाठी जमीन खरेदी करण्यासाठी , जर जमीन रहिवास क्षेत्रात असेल तर परवानगीची गरज नाही .
आपण जर हि मिळकत १ जानेवारी नंतर खरेदी केलेली असेल तर , परवानगीची गरज नाही
मात्र त्या पूर्वी केलेली असेल , तर सदर व्यवहार बेकाय्देषित आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
08-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,सन २०१४ रोजी बिनशेती आदेश झालेला आहे.परंतु ७/१२ सदरील इतर हक्कात बिनशेती आदेशाची नोंद घेतली गेली नाही.सदर नोंद घेण्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
बिन शेती आदेशाची प्रत तहसीलदार कार्यालय व तलाठी यांचे कडे जमा करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन गव्हाणे
08-03-2016
ravindra171282@gmail.com
सर आपण दिलेले उत्तरा बद्दल धन्यवाद सर आमचे आजोबा सन १९८९ साली वारले त्या नंतर आजोबांची जमीन हि ३ काका आणि ३ आत्या च्या नावे सामुहिक रित्या लागली होती आणि सातबारा मध्ये सामाईक क्षेत्र होते परंतु काही अवधी नंतर सातबारे चे क्षेत्र वेग वेगळे धक्वले जावू लागले तथा त्यास खाते नंबर देखील वेगल्के पडले आहे . तर हक्क सोड करताना खाते क्रमांक वेगळे वेगळे किंवा क्षेत्र सामुहिक न दाखवता वेगळे वेगळे दाखवले आहे तर त्यास हक्क सोड करताना काही अडचण म्हणजे खरेदी खद करवा लागेल कि हक्क सोड पत्र होईल आणि त्यास कमी खर्च येईल . आम्ही पूर्वी अधिकृत नोंदणी दस्त बनवणारे आहेत त्यांना विचारले असता त्यांनी खरेदी खद करावे लागेल असे सांगितले होते तर कृपया सर आम्हास मार्गदर्शन करावे कि बहिण आणि भाऊ यांचे खाते क्रमांक आणि क्षेत्र जर वेगले वेगळे असतील तर हक्क सोड पत्र होईल कि खरेदी खात आणि खर्च किती येईल .धन्यवाद
सामुहिक क्षेत्राची वाटणी झालेली आहे . त्यामुळे आपणास खरेदी खत करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
07-03-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, वडिलांनी त्यांचे मृतुपत्र मध्ये एका भावास चुकीने दोनदा हिस्सा एका गटात दिल्याचे दाखवले आहे. त्यास इतर भावानी आक्षेप घेतला आहे. वडील मयत असून त्यात बदल करता येणे शक्य आहे काय ? बदल करणे शक्य नसेल तर त्या भावास दोन हिस्से त्या गटात द्यावे लागतील का.
Question by गणेश शिंदे
05-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,जिल्ह्यातील रींग रोड बाबतचा नकाशा मिळणेकामी कोठे चौकशी करावी लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
Question by abhijit kadam
04-03-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... आपला प्रश्न/सूचना... महोदय रजिस्टर मृत्युपत्र तयार करत असताना माझ्या आजोबांनी त्यांचा ४० वर्षापासुन व ते हयात असेपर्यतच्या ८अ चा उतार्यावरील सर्व क्षेत्राचे वाटप केले त्याची रितसर नोंद झाली त्याला १ वर्ष पुर्ण झालेले आहे परंतु गावकामगार तलाठी यांनी आजोबांचा तत्कालीन उतारा सर्व रेकाॅड बरोबर नवीन तयार केलेले आहे त्या मध्ये क्षेत्र कमी जास्त भरत आहे तर तलाठी रेकाॅड दुरूस्त करून घ्या असे सांगत आहे परंतू रजिस्टर मृत्यु पत्राप्रमाने झालेली नोंद बदलता येते का आणि ते अधिकार कोणाला आहेत .
आजोबांनी हयात असताना , मिळकतीचे वाटप केले आहे . त्या मुले मृत्य पत्रात जरी त्या मिळकतींचा समावेश असला तरी , त्या प्रमाणे आता बदल करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय जगन्नाथ मदने
04-03-2016
sanjaymadanepatil@gmail.com
नमस्कार
ओन ला इन ७/१२ मध्ये ' जमीन करणार्याचे नाव' हा रकाना आता ठेवलाच नाही , मग तलाठी दप्तरी ह्या रकान्यात असणारी नावे ओंन ला इन उतार्यात 'इतर अधिकार ' किंवा कोठे लिहिली जाऊ शकतात का?
कृपया माहिती मिळावी .
धन्यवाद.
Question by कुणाल अंकुश जाधव
04-03-2016
mr.k1387@gmail.com
शेतकरी दाखला मिळणेसाठी एका महिला अर्जदारानी अर्ज केला असून त्यांचे 7/12 सदरी वडिलांचे नाव असून भोगवटदार व इतर हक्कात अर्जदार यांचे नाव नाही.
तसेच, अर्जासोबत तिच्या वडिलांनी प्रतिज्ञापत्र केलेले आहे.
अर्जदार विवाहित महिला आहे.
तरी, त्यांना वडिलांच्या 7/12 वरुन व पतीच्या नावाने जमीन व्यवहारासाठी शेतकरी दाखला देता येतो का ?
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम चे कलम २(२) अन्वये ,
शेतकरी म्हणजे , व्यक्तिश; जमीन कस्नारी व्यक्ती
जमीन व्यक्तिश कसणे म्हणजे -
कलम २(६) -स्वतासाठी
स्वताचे मेहनतीने अथवा स्वताचे कुटुंबातील व्यक्तीच्या मेह्नितीने अथवा स्वतचे देख्रीखाली मजुरान करवी
जमीन कसणे म्हणजे स्वताची /मालकीची जमीन कसणे असा आहे .
अर्जदार यांचे वडिलांची स्व कष्टार्जित मिळकत असेल तर , अर्जदार यांचे वडिलांचे हयाती पर्यंत त्या मिळकतीच्या मालक होऊ शकत नाही .
जर वडिलांची वडिलोपार्जित(अर्जदार यांचे आजोबान पासून मिळालेली ) मिळकत असेल तर अर्जदार यांचा मिळकतीत हक्क आहे .
आपणास मिळकत कोणत्या स्वरुपाची आहे हे तपासून घ्यावे लागेल . त्या नुसार निर्णय घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
03-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर, दि.२२/१/१६ च्या शासन निर्णयानुसार अकृषिक परवानगी मिळणेकामी मा.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाकडून साधारणपणे अंमलबजावणी केव्हा होईल ?संबंधित कार्यालयात चौकशी केली असता निश्चितपणे उत्तर मिळत नाही.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by गणेश शिंदे
03-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,गटवारी होणेपुर्वी अंदाजे ४० वर्षापूर्वी रजि.खरेदीखताने शेतजमीन खरेदी घेतली असून ताबाही आहे,परंतु गटवारीचा फायदा घेऊन आज रोजी तिर्हाईत व्यक्तीस मूळ मालकाने जमिनीची विक्री केल्यास काय करावे ? कृपया मार्गदर्शन होनेस विनंती
उप संचालक भूमी अभिलेख यांचे कडे अपील करून प्रथम , गात स्कीम मध्ये आपले नाव समाविष्ट करा
तसेच अधिकारी अभिलेख सदरी , गात स्कीम मध्ये नाव समाविष्ट झाल्यास , त्या प्रमाणे नाव येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय जगन्नाथ मदने
03-03-2016
sanjaymadanepatil@gmail.com
सर्व अधिकारी वर्गाला नमस्कार
भूधाराना प्रकार - .भोगवटादार -२ [देवस्थान इनाम ]मध्ये माझे आजोबा वहिवाट दार होते ते आता मयत झाले आहेत . तसेच माझी आज्जीही मयत आहे. त्यांच्या पश्च्यात त्यांचे वारस माझे वडील , ३ काका व ३ आत्या असे एकून ७ जन वारस आहेत. ७ पैकी ३ आत्या व २ काका ,असे ५ जन माझे वडील व दुसरे १ काका यांचे नावाने नोंदणीकृत हक्कसोड पत्र करण्यास तयार आहेत .तरी ७/१२ वरती ७ पैकी ५ नावे कमी करत येतील का ? किवा त्यांची नावे कमी करण्याची दुसरी कोणती पद्धत आहे. आणि तसे होत असेल तर भविष्यात हि जमीन कोणत्याही प्रकारे भोगवटादार वर्ग -१ या प्रकारात आली . तर या ५ जनाकडून परत या जमिनीवरती हक्क सांगितला जाऊ शकतो का ?
योग्य मार्गदर्शन व्हावे हि अपेक्षा .
संजय
जमीन हि देवस्थान जमीन आहे
आपले पूर्वजांना केवळ जमीन कसण्याचा हक्क होता . त्या मध्ये आपला मालकी हक्क नाही . त्या मुले हक्क सोडून दिली तरी इतर इसमांना , मालकी हक्क प्राप्त होणार नाही . जयंचे लाभत हक्क सोडून दिला आहे त्यांना केवळ जमीन कसण्याचा हाक मिळेल
देवस्थान जमीन हि वर्ग १ होत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय जगन्नाथ मदने
03-03-2016
sanjaymadanepatil@gmail.com
कुन्देटकर सर माझ्या प्रश्नाचे ऊतर दिल्याबद्दल धन्यवाद
पण .हक्कासोड पत्राने [भोगवटादार -२ ,इनाम जमीन ] प्रकारातील ७/१२ वर वारस म्हणून लागलेल्या भाऊ -बहिण यांची काही नावे कमी करता येतील का ?
Question by virangana salve
03-03-2016
sangita112001@yahoo.com
Sir mazha ek prashna ahe Ki konti vyakti shet jamin vikat gheu shekte,jar tya vyakticha Janna gavcha asel pan lagna zhalyawar Mumbai madhe gele 40 varshyapasun rahat asel tar to vyakti shet jamin vikat gheu shkte ka?
मुंबई कुल्वहिवत व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ प्रमाणे केवळ शेतकरी व्यक्तीच शेत जमीन खरेदी करू शकते
बिन शेती जमीन करण्यासाठी कोणतीही अट नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
02-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,नोटरी असलेले कुलमुखत्यार मोबदला देऊन १५ वर्षापूर्वी घेतलेले आहे परंतु त्यातील ३ पैकी १ व्यक्ती मयत झाली असल्यास सदरचे कुल्मुख्यार रद्द होईल का?किंवा त्याआधारे रजि.खरेदीखत केल्यास जिवंत असणारया व्यक्तीच्या क्षेत्रापुरती गावी नोंद मंजूर करता येईल का?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती...
आपले कुल मुखत्यार पत्र १५ वर्ष जुने आहे . व ते नोटरी समोर केलेले आहे .
कुल अखत्यारपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक आहे
त्यामुळे नोंद मंजूर करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by म न khule
01-03-2016
madhavnkhule@gmail.com
क्ष गावातील एका ७ १२ उतारामध्ये ७ १२ चे मालकी हक्कामध्ये एका व्यक्तीचे नाव,कुळ कॉलमध्ये दुस-या व्यक्तीचे नाव तसेच तिस-या व्यक्तीला मालकी हक्कामध्ये नाव असलेल्या व्यक्तीने १०० वर्षाचे भाडेपटे करून दिलेले आहे व सदर जमीनीचा ताबा भाडेपटा करून घेणा-या व्यक्तीकडे आहे. सदर जमीनीतील ७ १२ चे मालकी हक्कातील व्यक्ती तसेच कुळामध्ये नाव असलेली व्यक्ती तसेच भाडेपटा करुन घेणा-या दोन सामाईक व्यक्तीपैकी एक व्यक्ती मरण पावली आहे सदर जमीनीच्या ७ १२ अभीलेखात कोनाची वारस नोंद म्हणुन घेता येईल
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
