जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर,वनीकरण विभागातील जमीन रहिवास विभागात समाविष्ट झाल्यास त्यास चटई निर्देशांक किती मिळेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
संबंधित सिटी सर्वे कार्यालयात संपर्क साधावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by rohit patil
29-03-2016
rhtpatil168@gmail.com

सर माझे पणजोबा हरी पाटील हे खूप दारू पीत होते म्हणून गावातील लोकांनी त्यांचा मुलगा भादू हरी पाटील याला १९२१ साली बशीस पत्र करून मग त्यांना १९२३ साली एक मुलगा झाला व १९३३ साली तिसरा मुलगा झाला न १९३५ साली चोथा मुलगा झाला हे सर्व ती शेती करीत होते पण भादू हरी पाटील मरण पावला तर त्या शेतीला त्यांचे मुले वारस लागली राजाराम व एकनाथ पाटील तरी यांनी ती शेती माझ्या वडिलांची आहे असे सांगून सर्व शेती हेच करू लागले मग त्या शेतीवर बाकी काही मुलाचं काही अधिकार नाही का बक्षीस पत्र हे नोंदणी केलेले नाही आहे पण १९२१ सालची फेरफार नोंद मिळत नाही आहे तरी ती शेती बाकी मुलांना कशी मिळणार या विषयी माहिती हवी आहे
बक्षीस पत्र नोंदणीकृत नसेल तर नोंद होणे योग्य नाही. तथापि १९२१ सालचा फेरफार मिळत नाही असे पत्र अभिलेख कक्षातून घ्यावे. प्रांत अधिकार्याशी संपर्क करावा. नोंद बरीच जुनी असल्याने दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल. वकीलांचाही सल्ला घ्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by rohit patil
29-03-2016
rhtpatil168@gmail.com

मला १९२१ सालचे बशीस पत्र हे नोंदणी झाली आहे किवा नाही हे कुठे पाहायला मिळेल
सब रजिस्ट्रार कार्यालय

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा. श्री. किरण पाणबुडे सर,
आमच्या गावी( देवस्थान इनाम ) वाहिवातदार या जागेत दरवर्षी दत्तजयंती सप्ताह होत असे नंतर त्या जागेवर सर्व गावकरी लोकांनी असे ठरवले कि त्या जागेवर आपण कायम स्वरूपी सभागृह बांधावे त्या साठी मुंबई मंडळ रजिस्टर केले बांधकाम पण पूर्ण झाले आता त्या जागेवर ज्या चार भोगवाटदार आहेत ती जागा संस्थेच्या नावावर करण्यास राजी नाही पहिले तोंडी परवानगी दिली होती आता देत नाही तर ती नावावर कशी करावी सर्व ग्रामस्थ संस्थेच्या नावावर करण्यास राजी आहेत तसेच सातबारा मध्ये देवस्थान मालक सरकारी आहे तर काय पर्याय आहे नावावर करण्यास ते सांगा
Exemption To Land Revenue Act नुसार , देवस्थान इनाम जमिनीची विक्री होत नाही . त्या मुले ती जागा मुंबई मंडळाचे नावावर होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
१९८० साली एकञिकरणामध्ये आमची जमिन लबाडीने दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली
७/१२, ९(३),९(४),च्या नोंदीत दुसऱ्याची नावे असुन
आता २००५ व२०१५ रोजी त्यावर फेरफार होऊन त्याच्या वारसांची नावे लावली गेलीत त्याविरुध्द आम्हाला कोणा कडे अपिल करून दाद मागावि लागेल
भूमी अभिलेख कार्यालय

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर । माझा एक प्रश्न आहे ।की वडिलोपार्जित 70 एकर जमींन ही रायभन् कदम याच्या नावावर होती ती त्या नंतर ती त्यांची 6 मुले यांच्या नावावर गेली पैन खाते फोड़ कही करनस्तव केली नाही , आता ती 6 मुले मयत आहे आणि आम्ही त्यांचे 12 मुले आणि 5 मूल आहोत । त्या 12 पैकि मी रमेश । आमची खातेफोड झाली नसून जो तो आपले हिस्सा ची जमींन करात आहे । परंतु आमची रोड च्या कडेची जमींन भुसंपदित झाली आहे । अजुन मोबादला मिळाला नाही कारण सर्व 12 भावंपैकी त्यांच्या 4 बहिनिनि हककसोड पत्र दिले पण 1 बहिन भुसंपदन कडून आलेली कही रक्कम मागत आहे । म्हणून आम्ही 12 चुलत भावांनी मिळूने वाटपपत्र केले । एका चुलतभावने त्या बहिनीचे नाव वगळून आम्हाला 4 बहिनीव्यतिरिक्त अन्य कोणतेही कायदेशीर वारस नसून असे खोटे प्रतिद्यापत्र बनवून हककसोड त्याच्या हिस्स्यात् केले । 1 त्याच्या बहिनीला वगळून केले (दुय्यम नि बंधककडे नोंद केली ) व् आमचे आपपसत वाटप केले । तलाठी कड़े नोंद टाकतान त्याच्या बहिनीने हरकत घेतली आहे । वाटपपत्र आम्ही भावांनी सहमतीने केले व् त्या बहिनीचे सर्व गटवारील इतर अधिकारतले नाव तसेच ठेवले आहे । तरि ती बहिन वाटपपत्र वर आक्षेप घेत आहे ।
1आमचे वाटपपत्र नोद होण्यासाठी काही अड़चन येईल का?
२ हक्कासोड पत्र तिच्या भावांनी केले आहे तरी ती फौजदारी गुन्हा सर्ववर कराते असे म्हणत आहे । अमच्यावर गुन्हा दखल होउ शकतो का?
3 वाटप नोंद होऊं ती बहिन फ़क्त तिच्या भावच्या हिस्सयावर जाण्यासाठी काय करावे
4 आमच्या वाटपपात्र नोंद होण्यास अड़चन आहे का? कारण आम्ही आपापसत नोंदिव वाटप पात्र केले आहे आणि हरकत फ़क्त हक्कासोड वर असल्याने आम्ही नाहक यात बली जात आहे । काय करावे ? कृपया मार्गदर्शन करा ?
बहिनीने हरकत घेतली असल्यास त्या प्रकरणाचा निकाल होईपर्यंत नोंद प्रमाणित होणार नाही,
हक्कसोड पत्र तिच्या भावांनी केले असले तरी सर्व हक्कसोड पत्र करणार्यांची त्याला संमती असल्याने IPC १२० ब / ३४ खाली सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल होउ शकतो ,
बहिणीला तिचा कायदेशीर हक्क द्यावा हेच चांगले

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा. श्री. किरण पाणबुडे सर,
भूसंपादन विषयी सविस्तर विचारायचे आहे
सर
गांव हदगांव, जी. नांदेड
"१९९२ साली कयाधु शाखा कालवा कि.मी. ३६च्या माती कामासाठी" या शिर्षका खाली जमीन संपादन करण्या साठी
प्रस्तावित गट/ सर्वे न. ७/१,७/२, ४८/४ व ४८/६/१ असे होते.
(जर वरील गट/ सर्वे न.४८/४ व ४८/६/१ संपादन केले तर भूमीहीन होणार )
नंतर राजपत्र , वर्तमान पत्र यात क.४ व ६ ची अधिसुचना, संयुक्त मोजणी यांत ७/१, ७/२ ,४८/३ व ४८/५ या गट/ सर्वे न. चे संपादन पुर्ण होउन निवाडा झाला
४८/३ -३.५७ हे. पैकी १.३८ हे.
४८/५ - २.१० हे. पैकी ०.५६ हे
पण प्रत्यक्षात
४८/४ - १.२२ हे. पैकी १.२२ हे
४८/६/१ - ०.७० हे पैकी ०.७० हे
या जमीनीतुन माती नेली व ह्यांना पैसे दिले
नंतर २००४ साली फेरफार घेउन ४८/४ व ४८/६/१
हे क्षेत्र कमी केले व ती अणपड अडाणी विधवा वय ७५ आता भूमीहीन झाली
हे संपादन पुर्ण पणे चुकीचे आहे?
खालील जी.आर 'भूमीहीन न होउ देण्याबद्दल '
१) महसुल व वन विभाग क्र.एलक्युएन-३०८०-(२११३)अ-२, दि.२४ नोव्हेंबर, १९८०
२) महसुल व वन विभाग क्र.एलक्युएन-३०८०-(२१८४)अ-२, दि.२९ जानेवारी , १९८१
३) महसुल व वन विभाग क्र.एलक्युएन-१८३२-(२११४)अ-२, दि.२० एप्रिल ,१९८३

** शासन निर्णय (English):

Revenue and forest dept. Mantralaya, resolution no.LQN-3080-(2113)A-2,Dated 24th Nov.1980.
सर मार्गदर्शन करावे हि विनंती
कृपया ई मेल एसएमएस करावा जेणे करून सर्व अभिलेख आपल्याला पाठवता येतील.
स्नेहांकीत
संतोष शिंदे,
९८६००५००५६
सर नमस्कार
माझ्या आजोबा ने एका शेतकर्यास २० गुंठे जमीन विकली परंतु त्या शेतकर्याने दोन एकरचा फेर घेऊन सातबारा वर नोंद घेतली आहे मी खरेदीखत तपासले असता त्यावर पुर्ण गटाचे म्हणजे २० एकर १३ गुंठे चे क्षेत्र आहे मी प्रांत अधिकारी यांचेकडे सदर फेर रद्द करण्यासाठी अपिल केले होते पण ते विलंब झाल्यामुळे फेटाळले असा निर्णय दिला आहे माझा प्रश्न आहे सातबारा व खरेदीखत यावरील क्षेत्र जुळत नसताना व आम्हाला गावात एक गुंठा सुद्धा जमीन शिल्लक राहिलेली नसताना फेर मंजूर केला आहे आता मला सदर खरेदीखत व फेर रद्द करने साठी काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
प्रांत अधिकारी यांचे आदेशाविरुद्ध अपर जिल्हधिअक्रि यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझा प्रश्न असा आहे कि, ग्रामपंचायत ग्रामसभे नुसार eka ग्रामसेवकाने घेतलेला निर्णय दुसर्या ग्रामसभेने दुसर्या ग्रामसेवकाला बदलता येतो ka ?
ग्रामसभा निर्णय बदलु शकते......... ग्रामसेवक नही

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by rohit patil
26-03-2016
rhtpatil168@gmail.com

१९२१ चे बक्षीस पत्र नोंदणी कृत असणे अनिवार्य आहे का तेवा असा कायदा होता का

Question by rohit patil
26-03-2016
rhtpatil168@gmail.com

सर मी फोन लावून तुमच्या शी बोलू शकतो का मला तुमचा फोन नु द्या
आपणास कोणाशी बोलायचे आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर
मी एक सिटी सर्वे प्लॉट (कुलमुखत्यार म्हणून )घेतला आहे.परंतु। मूळ मालकाचे नाव सिटी सर्वे उतरा वरुन जात नाही .कारण असेकी सदर जागा(प्लॉट) वर्ग ब आहे .आणि सादर जागेच्या उतारा वर "दूसऱ्यास भाड्याने वा कराने अथवा वीकता येणार नाही या शर्थिवर "असा उल्लेख आहे.
प्रश्न
१)सदर जागेवरील शर्थ शिथिल करता येईल का व शर्थ शिथिल करण्यासाठी काय करावे?
2)सदर जागा बिगर शेती करता येईल का?
३) अ वर्ग करण्यासाठी काय करावे लागेल?
कृपया मार्ग दर्शन व्हावे
सदर सेरा कोणत्या आदेसानुसार आला या करिता फेरफार व मुल आदेश पहावे नंतर आदेसानुसार सक्षम अधिकारी यांच्या परवानगीने सर्तीबाबत कार्यवाही करता येयील

Reply by श्री.ओ.आर. अग्रवाल | उप जिल्हाधिकारी

Maje pati yani jamin vikli ahe to tyancha kakachya mulane fhasawanuk karun getli ahe tari mala majhi jamin parat havi ahe tar mala kes karnyasathi sarkari vakil hava ahe karan amhi sadhya bhadyacha gharat rahto aani majuri karun pot bharti tyamule sarkari vakil mala milel ka aani tyanchi fee kiti asete aani tyasathi mala kai karave lagel mala margadarshan kara
आपणास गुन्हा दाखल करावयाचा असल्यास , आपण स्वत( आपले पती ) नजिकचे पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करू शकता . त्या साठी वकिलाची गरज नाही
मात्र आपणास फौजदारी तक्रार , न्यायिक दंडाधिकारी यांचे कडे करावयाची असल्यास , आपण वकील मिळण्यासाठी तालुका विधी प्राधिकरण यांचे कडे संपर्क साधा . गट विकास अधिकारी , तालुका विधी प्राधिकरणाचे सदस्य सचिव आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा, सर आपनास सविनय पूर्वक विषय सादर करतो
माझी वडिलोपारजीत शेती, ही नगरपरिषद हद्दित ग्रिन झोन मधे आहे . आणी आजुबाजुला निवासी प्लॉट पाडलेले आहे ,
मला हि निवासी प्लॉट पाडण्यासाठी सविस्तर माहिती द्या हि नम्र विनंती. आपला नम्र
सदरचा प्रश्न नगर रचना विभागाशी सबंधित आहे
तथापि , नगर पालिका हदीत ग्रीन झोन मध्ये , जागा असल्यास , निवासी वापर अनुद्नेया नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना...sir dharangrastas punarvasan mhanun milaleli jamin vikata yete Ka? tyache niyam Kay aahe
अशी जमीन विकत येते
आपण पुनर्वसन कायदा ( संबंधित लागू ) वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कर्ज पुनर्गतन बाबत goverment resoulation कधी येणार आहे ?
महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटच्या शासन निर्णय या सदराला भेट देत राहा

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

आदरणीय किरम पाणबुडे सर दिनांक १०.०३.२०१६ ला केलेल्या प्रश्नला दिलेले उत्तरा बद्दल धन्यवाद परंतु सर रीतसर केलेल्या बहिणीच्या हक्कसोड पत्र बाबत तिच्या मुलाने गावातील तलाठी कडे आक्षेप घेतला आहे आणि तलाठी त्या बाबत सांगत आहेत कि आम्ही हे आक्षेप पत्र वरती पाठवू असे सांगतायत मंजे नेमके त्या पत्रच पुडे काय होईल त्या बाबत कृपया माहिती सांगावी .



अधिकार अभिलेख सदरी नोंद टाकले नंतर , १५ दिवसाची नोटीस सर्व हित्साबंधीतांना देण्यात येते
त्यानुसार तलाठी , आपणास पत्र पाठवू असे म्हणत असतील
मात्र त्यासाठी ते विलंब लावत असतील तर , तहसीलदार महोदयांना समक्ष भेटून आपले गाऱ्हाणे मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ मध्ये दिनांक १२ मे २०१५ चे शासन निर्णय नुसार प्रकल्पासाठी शेतजमीन आपसी वाताघातीने थेट खरेदी ची तरतूद आहे.यामध्ये जे शेतकरी भूमिहीन होतात त्यांना भूमिहीन होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ची गरज आहे काय ?
प्रश्न समजलेला नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

टुरिंग सिनेमा म्हणजे काय त्याबाबत तहसीलदार यांना परवानगी देत येईल काय ! टुरिंग सिनेमा कोणते सिनेमा येतात किती दिवसाकरता परवानगी देत येईल कोणकोणते कागदपत्र लागतील

Question by VIKRAM YADAV
23-03-2016
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर ,
आपण माझ्या प्रश्नाचे उतर दिले त्यासाठी धन्यवाद , माझा प्रश्न असा आहे. कोर्टात केलेले हक्कासोड पत्र रद्ध करता येते का ,माझा बहिणीने कोर्टात हक्क सोड पत्र करून दिले आत्ता त्यांचे पती ते पत्र फसवून केले आहे असे सागून कोर्टात केअस करेन अशी धमकी देत्तात नाहीतर आमचा हिसा दे .बहिणीचा हिसा मी कोर्टात देवुनच पत्र हुकूमनामा झाला आहे .तर मी आत्ता काय करू कृपया मार्ग्दर्स्न करा . आपपल्या उतराने मला अनेक वेळा योग्य मार्ग मिळाला आहे.
बहिणीचा हक्कसोड दबावाखाली केला आहे हे सिद्ध होत नाही तर तो कायदेशीर आहे

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

देवस्थान इनाम वर्ग ३ या प्रकारतील जमिनिमधे आमची ५५ वर्षांपासुन वीना अडथळा वहिवाट चालू आहे तर त्या जमिनिचि मलकी आम्हाला मिळु शकते का ?

Question by Sunil Kale
22-03-2016
sunilste@gmail.com

जर गट विकास अधिकारी यांच्याकडे वडलोपार्जित (आजोबां च्या) घराच्या नावाच्या फेरफारा संबंधित केलेल्या अपिला वर निर्णय देत नसेल तर पुढील दाद कोणाकडे मागता येईल, कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती. धन्यवाद!
मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्या वडिलांचे निधन फेब्रुवारी २०१६ मध्ये झाले आहे. वडिलोपार्जित जमिनीवर ७/१२ ला त्यांचे नाव आहे. आम्ही २ भाऊ व १ बहिण आहोत. आमची वारस म्हणून नोंद घेण्यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती.
तलाठी यांचे कडे , आपले नाव( सर्व ) वारस म्हणून दाखल करण्यासाठी अर्ज करा
वडिलांचा मृत्य दाखला दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
७-१२, ८अ सारखे उतारे, इतर कागदपत्रे विशिष्ट काळावधित मिळावी असा शासकीय निर्णय आहे का?
सेवा हमी अधिनियमात तरतुद आहे

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

आदरणीय सर.एखाद्या प्रकरणात अपील दाखल करताना किती वर्षाचा विलंब कालावधी माफ केला जातो.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
महाराष्ट्र महसुल अधिनियम १९६६ कलम २५१ अन्वये विलंबाबाबत अधिकार्याची खात्री पटवून दिल्यास मुदत संपल्यावरही अपील दाखल करता येते. विलंब कालावधी माफ करणे हा अधिकार्याचा स्वेच्छाधिकार आहे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.37 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3