जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर,
माझ्या आजोबांची कसबा पेठ, पुणे येथे एका वाड्यामध्ये ७० ते ८० वर्षे पूर्वीची किंवा त्या पेक्षाही जास्त अशी ५०० SQFT ची जागा भाड्याने आहे. त्या जागेमध्ये त्यांचा "बी. बी. घाडगे & सन्स " या नावाने मोल्डिंग & कास्टिंग चा व्यवसाय चालू होता. व भाडे पावतीही त्याच नावाने होती. परंतु आजोबांच्या मूळ चार वारसदार (मुलांपैकी) मोठ्या मुलाच्या मुलाने (नातवाने ) ती भाडे पावती बदलून स्वताच्या टर्निंग व्यवसायाच्या "प्रशांत इंजिनीरिंग वर्क्स " नावाने फसवून मूळ मालकाकडून आम्हाला न सांगता १० वर्षापूर्वी बदलून घेतली. व ते एकटेच या जागेचे मालक व्हायला बघत आहेत. कालांतराने हा वाडा एका बिल्डर ने विकत घेतला आहे. व तो विकसित करणार आहे. (हा वाडा CPG आरक्षित आहे ).तेथील रहिवासी व आम्हाला तो जागेला जागा देऊन आमचे पुनर्वसन करणार आहे व जागा महापालिकेला सुपूर्द करणार आहे.
पण काकांची मुले बिल्डर बरोबर परस्पर काय व्यवहार केला आहे याची आम्हाला जर सुद्धा कल्पना देत नाहीत व समान (चार शेअर होल्डर) असताना आम्हाला तुटपुंजी रक्कम देऊन या व्यवहारातून मुक्त करायला बघत आहेत. आम्ही या व्यवहारात आमच्या हिस्शाचे पैसे घेवून सेटलमेंट करायला तयार आहोत. पण बिल्डर हि आम्हाला योग्य मोबदला देत नाहीये असे दिसते आहे. या व्यवहारात आमची फसवणूक होत आहे असे आम्हाला वाटते.
या केस मध्ये काकांच्या मुलांनी आमचा मोल्डिंग & कास्टिंग चा धंदा बंद करून, जागेची मूळ भाडेपावती बदलून दुसऱ्या नावाने बदलून फसवणूक केली. व बिल्डर हि त्यांना साथ देत आहे. त्यांच्या विरोधात कुठला कायदा आहे ? अशा परिस्थितीत आम्ही काय करावे. आम्हाला न्याय हवा आहे.
एवढे जुने भाडेकरी असताना , त्या जागेचा FSI वगैरे गोष्टी , त्या जागेची योग्य ती किंमत आम्हाला कोण काढून देऊ शकेल ? व कशी कळू शकेल ? कृपया मार्गदर्शन करावे. खूप मदत होईल.

रुपाली घाडगे
९८२२०१३५०८
आपली भाड्याने घेतलेली मिळकत पुणे शहरात आहे . पुणे शहरास महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा लागू आहे . ( Maharashtra Rent Control Act 1999) लागू आहे . या कायद्यातील कलम ७ (१५) मध्ये कुल म्हणजे काय आहे याची व्याख्या दिली आहे .
या व्याख्यानुसार कुल म्हणजे - जर मुल कुल मयत असेल तर , कुळाचे मृत्य पूर्वी जी व्यक्ती मुल कुलाबाब्रोबर राहत असेल / त्याचे बरोबर व्यवसाय करत असेल , तर ती व्यक्ती कुल होते ( भाडेकरू) .
जात अशी कोणतीही व्यक्ती मुल कुलाबरोबर राहत नसेल तर , मुल कुळाचे वारस संमतीने वारस कुल ( भाडेकरू) म्हणून निच्छित होऊ शकतात . जर मुल कुळाचे वारस यांचे मध्ये संमती होत नसेल तर , न्यायालय ठरवेल ते वारस मुल कुळाचे जागी कुल निच्छित केले जातात .
आपण नमूद केल्याप्रमाणे , मुल मालकास असे कुल बदलून ( भाडेकरू ) देण्याचा अधिकार नाही . आपण आपली फास्वनुल झाली आहे असे नमूद केले आहे .
आपण मुल मालकाचे या कृतीबाबत ( आजोबांचे जागी -बी बी घाडगे अन्ड सन्स ऐवजी प्रशांत इंजिनीरिंग बदल करण्याची ) दिवाणी न्यायालयात आव्हानित करा .
त्या जागेस FSI किती मिळेल याची माहिती पुणे महानगर पालिका येथे मिलेले . जागेच्या किंमती बाबत , आपणास स्थानिक चौकशी करूनही माहिती मिलेले .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

R/Sir, आम्ही 3 भाऊ आहे.
वाडीलोपर्जीत जमिन वैयक्तीक नांवे वाटप करायला काय कार्यवाही करावी लागेल. कृपया ईमेल वर माहिती मिळणेस विनंती.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ (२) अन्वये तहसिलदार यांचेकडून आदेश घ्यावा किंवा दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत वाटपपत्र करावे.

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

मा.सर, एखाद्याने आपल्या जमिनीवर दंडेल शाहीने कब्जा केला असेल तर त्यास कसे घालवून देता येते. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ मध्ये काय तरतुदी आहे. सदर व्यक्तीशी दंडेलशाही न करता आपली जमीन त्याच्या कब्जातून कशी सोडवावी याबद्दल मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५९ वाचावे
.

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

दिवाणी न्यायालय दाद मागावी.
फोजदारी तक्रार करावी

Reply by अजित नथू शेलार | नायब तहसीलदार

Question by अमन
24-04-2016
ymm6339@gmail.com

सर
मी सांगलीचा राहवशी आहे. काही दिवसपूर्वी माझ्या ओळखीचा एक एजेंट आला व म्हणाला की हमीद (जागा मालकाचे नाव) या मालकास 1 गुंठा जमीन विकायची आहे व त्यास पैशाची फार गरज आहे. मी संगितले की कागदपत्रे असल्याशिवाय मी काही घेणार नाही. फारच हाता-पाया पडल्यावर कागदपत्रे देवून काहीही करा पण माझा गुंठा घेवून माला पैसे द्या असे सांगून हमीद निघून गेला. मुलीचे लग्न कार्य आहे मदत करा.
कागदपत्रे तपासल्यावर लक्षात आले की जमीन गुंठेवरी मध्ये आहे व महानगर्पालिके कडून बिगर शेती परवाना घेतलेला आहे. परंतु अजून कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही व 7/12 वर नावही नाही. म्हणून जागेची खरेदी होत नाही. फारच जबरदस्ती केल्यानंनातर मी त्याला नोटरी करून 1) कबजेपट्टी 2) खरेदीपूर्व करार व 3) वतमुखत्यार पत्र नोटरी करून 2 लाख दिले व 7/12 वर नाव लावलेनंतर उरलेले 2 लाख देवून जागा खरेदी करन्याचे ठरले. मी सावध राहून 2 लाख रूपयांचा बँकेचा चेक दिला त्याने बँकेतून पैसे काढून घेतले. मी त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर लावून घेतले. व नंतर मी त्याला ठरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी रेजिस्टर कार्यालयात येवून सही करण्यास संगितले. आता तो साफ नकार देत आहे. म्हणतो तुम्ही देत असलेला दर फार कमी आहे. पैसे वाढवून द्या. व फारच जास्त पैसे मागत आहे.
त्याचे जागेची मूल कागदपत्रे व नोटरी केलेले कागदपत्रे, बँकेतून पैसे काढलेला पुरावा माझ्याकडे आहे. कृपया मार्गदर्शन करावे
आपण खरेदी पूर्व करार केलेला आहे . या करारात जर जमिनीचा दर नमूद केलेला असेल तर , आपण The Specific Relief Act खाली दावा दाखल करू शकता . या दाव्यामध्ये आपण हमीद ने आपले कराराप्रमाणे खरेदी करून देण्याबाबत हमीदला आदेशित करणे बाबत न्यायाय्लायास मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या पतींनी ३५ वर्षापूर्वी १ जागा त्यांच्या ३ चुलत भावांकडून विकत घेतली, परंतू ती नावावर करणे राहून गेले. आता ते तिन्ही भाऊ हयात नाहीत पण जागा माझ्या दिरांच्या पर्यायाने आमच्याच ताब्यात आहे कारण आमच्या वडिलोपार्जित जागेच्या वाटण्या झालेल्या नाहीत. वडिलोपार्जित जमिनी ३ भावांच्या नावावर आहेत. या विकत घेतलेल्या जागेच्या 7/१२ वर अजूनही त्या मयत भावांचे नाव आहे. आत्ता आमच्याकडे खरेदीची कुठलीच कागदपत्रे नाहीत. त्या ३ भावांच्या सगळ्या वारसांबद्दल माहिती मिळत नाही. जे भेटले, त्याना त्या जागेत स्वारस्य नसल्याचे सांगतात. तर ती जागा माझ्या पतींच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल.
खरेदी चे कोणतेही कागदपत्रे नसतील तर , जमीन आपले नावावावर होण्यास अडचणी आहेत .
मात्र जर कमिन गेले ३५ वर्षाहून अधिक काळ , ताब्यात असेल तर आपण Adverse Possession या तत्वाचा आधार घेऊन दिवाणी न्यायायालयात आपली मागणी जाहीर करून मिळणे बाबत दावा दाखल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM YADAV
23-04-2016
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर ,माझा प्रश्न असा आहे कि माझे दत्तक पत्र झाले आहे माझे वडील मयत आहे ,आई व वडिलांचा संमतीने दत्तक पत्र झाले ,खी दिवसनी वडिलांनी एकूण जमिनीतले स्वत खरेदी केलेली जामीन वाटणी पत्र द्वॉर्य ती जामीन माझा नवे केली व राहिलेली जामीन स्वताचा नवे तेवली पुडे वडील मृत झाल्यावर आई व २ बहिणीने talathi कडे वारस नोड अर्ज दिला कि मला मुलगा नाही व वडिलांचा नावे असलेली जमीन ताल्याठी ने ३ चा नवे केली ताय्नी माझे नाव वगळून ती जमीन विकून टाकली पुन त्याविरुद्ध दिवाणी न्यालयात मी अपील करून मी मुलगा आहे हे सिद्ध केले .त्या नंतर दिवाणी नायालयात तडजोड हुकुम नामा झाला .व आई व २ बहिणीने विक्लाले जमिनीचे रुपय मी समोरच्या पार्टीला परत केले कोर्टात व तो दस्त रद केला पुन त्या बदल्यात मी ३ कडून हक्क सोड पत्र कोर्टातच लिहून घेतले त्या मध्ये असा उलेख केला समोरचा वकिलाने कि आईला मी पोद्गी रुपात दर महिना रुप्पय द्य्वेअत पुन ती माझाकडे राहत होती .हा हुकूमनामा तलाठी उपलब्ध नाही व कामचुकार पण मुले सातबारा वर माझे नाव न लागता त्या ३ चे नवा कायम राहिले व फुडे जावई मंडळी आले व आईला ग्घेउन गेले व त्या सर्वांनी मिळून ती जमीन पुन विकली .व नवीन दस्त नोंदणीला आलाय्वर मी तक्रार अराज देवून दिवाणी नाय्लायात झालेला हुकूमनामा दाखून माझे नवे ७/१२ नोद करून घेतली .आत्ता जावी मंडळी माझाकडे रक्कम मागत आहेत .आमची वाटणी अम्मल दे तू फसवून हक्कासोड पत्र केले अह्हेस .त्यावर टायनी प्रांत यांचाकडे नोद रद्द वाहावी म्हणून अप्पील केले अह्हे .मला आईला पोद्गी दायची नाही कारण ती माझाकडे न राहता जावई यांच्कडे राहून माझी बदनामी करते अह्हे
१) आईला मला पोद्गी द्याची नाही .(मी तिला सबळ करण्या साठी तयार अह्हे कोणत्या पण आठीवर)
२) ३- घीचा हिसा मी अद्धिच कोर्टात दिला आहे .
मी पुढे काय करू ती जमीन कासताना मला दम देण्यात यतो .ह्यावर उपाय काय ? काय मला आईला पोद्गी न देनाय्साठी काय्कार्वे लागेल ?
(सदरचा प्रश्न हा या संकेत स्थळाचे उत्तर देण्याचे कार्य क्षेत्रातील नाही . या संकेत स्थळावरून जमीन , त्या साम्भांडीचे कायदे व अनुषंगिक प्रश्नांना उत्तरे दिली जातात . तथापि उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे )
Consent -Decree होताना आपण , आपले आइस पोटगी देण्याचे मान्य केले आहे . त्यामुळे आपणास पोटगी देणे क्रमप्राप्त आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गैरअदिवासीची जमिन अदिवासी व्यतक्तीिने खरेदी केली तर त्याी जमिनीचा मालक अदिवासी झाल्या मुळे पुढे हस्तांीतरण होऊ नये यासाठी त्याक जमिनीवर अदिवासी म्ह णून नोंद घेणे गरजेचे आहे काय.


सात बारावर ३६ अ च्या तरतुदी लागू असा शेरा पूर्वीचा ठेवलेला असेल . त्यामुळे आता नवीन खरेदीदाराचे नावे जमीन दाखल असल्यास , पुन्हा नोंद ठेवण्याची आवश्यकता नाही .
हे लक्षात ठेवणे आहे कि - आदिवासी कडून आदिवासी खातेदार जमीनखरेदी करत असला तर त्यास , जिल्हाधिकारी यांचीन परवानगी आवश्यक आहे
या हस्तांतार्नास परवानगी आहे का पहा ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rameshwar
22-04-2016
rameshwarkarpe@gmail.com

नमस्कार
सर मी जामखेड तहसील ऑफिस मधे लिपिक आहे
सर
मला गावठाण विस्थार kase केले जाते याबाबत माहिती मिळावी हि विनंती
For Information:
Revenue Staff Karmachari vargasathi, tyanche prashna, Shanka ani Charcha yasathi " Karmchari Vyaspith " chi vyavstha keleli ahe.
Mohsin Shaikh te monitor kartat.

Reply by MCS Maharashtra | इतर

Question by anand salve
22-04-2016
salveanand@gmail.com

निरंतर ताकीत मनाई हुकुम म्हणजे काय ? कनिष्ठ न्यायालय तो property matter मध्ये देऊ शकतो का
निरंतर मनाई हुकुम ( Permanent Injunction ) म्हणजे एखादी गोष्ट कायमची करण्यापासून प्रतिबंध करणे .
The Specific Relief Act च्या कलम ३७ (२) अन्वये निरंतर मनाई हुकुम आदेश काढला जातो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by रवि
22-04-2016
ravindra171282@gmail.com

मोहसीन सर धन्यवाद माझा प्रश्न हा दिनांक 08.04.२०१६ तथा 21.04.२०१६ च्या प्रश्नाला अनुसरून आहे . प्रश्न असा आहे कि जर वरील प्रश्ना प्रमाणे जर परिस्थिती असेल तर आणि आज त्यांच्या सात बारा उतारा मध्ये जर सर्व वारसांचे सम समान क्षेत्र असेल तर आपण सत बारा दुरुस्ती साठी दिवाणी न्यालयात चा मार्ग सांगितला आहे , सदर बाबतीत माझा प्रश्न असा आहे कि , जर सात बारा मधील सर्वाना सम समान क्षेत्र हे कश्या प्रकारे किवा कुठल्या नियमानुसार लावले जाण्याची शक्यता आहे ती सांगावी कारण या मध्ये संबधित व्यक्तींनी कुठल्याही प्रकारचे वाटप पत्र किवा इतर कुठलाही दस्त केला नसेल तरी ह्या प्रकरच्या नोंदी कश्या लागू शकतात या व्यतिरिक्त जर वरील नोंदी किवा क्षेत्र दाखवण्यात जर काही तांत्रिक चूक किवा नजर चूक असू शकते का आणि अशी नजर चूक जर तलाठी कार्यालयातून झाली असेल तरी आम्हास दिवाणी न्यायालयात जावे लागेल kaa.किवा ती नजर ,तांत्रिक चूक तलाठी किवा इतर कुठल्या कार्यालयातून दुरुस्त होवू शकते
पूर्वी सर्व वारसांना सामाईक रित्या महुरूपी कंस द्वारा क्षेत्र दाखवले जात होते परंतु कालांतराने तेच क्षेत्र विभागून दाखवू लागले ते कसे त्या बद्दल आम्हास काही माहिती तलाठी कार्यालयातून मिळू शकेल का ......आणि ती माहिती आम्ही कशी मिळवावी ...

Question by रवी
21-04-2016
ravindra171282@gmail.com

आदरणीय मोहसीन सर धन्यवाद आपले प्रतिसादाबद्द्ल दिनांक 08.04.२०१६ ला विचार् लेले प्रश्नआला आपण जे मत व्यक्त केले ते असे आहे कि, प्रश्न अतिशय योग्य आहे वडील जर १९९४ पूर्वी मयत असतील हिंदू वारस कायद्यातील १९९४ व २००५ च्या सुधारणा व तरतुदी त्या वारसांना आजरोजी लागू होणार नाहीत.या बाबत मा.सुप्रीम कोर्टाचा मागील वर्षीचा निकाल आहे.तो निकाल आपण प्राप्त करून घ्यावा. सर मग आज रोजी त्यांच्या मध्ये जमिनिचे वाटप कसे होईल आणि आज रोजी जर सर्व जन सम समान जमीन धारण करीत असेल तर ते त्या सात बारा मध्ये आज रोजी कश्या प्रकारे दुरुस्ती करावी आणि सर त्या सर्व जन मध्ये जमिनीचे वाटप कश्या प्रकारे होईल कृपया मार्गदर्शन
मा.सुप्रीम कोर्टात झालेले निकालाचा आपणाला न्यायालयात हिस्सा ठरवताना हवाला देणेस उपयोग होईल .

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

सातबारा मध्ये दुरुस्ती करणेसाठी सर्वांची संमती असेल तर तहसिलदार अगर दुय्यम निबंधक यांचे कार्लायातून जमिनीचे वाटपपत्र करता येईल परंतु संमती नसेल तर आपण दिवाणी न्यायालयातून प्रत्येकाचा हिस्सा ठरवून घ्यावा व त्यानंतर ७/१२ वर दुरुस्ती होईल.यासाठी आपणास दिवाणी न्यायालयात जावे लागेल.

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

Question by bhaurav kekan
19-04-2016
bhaukkd84@gmail.com

Adaraniy panbude sir ......krupaya majhya shankeche samadhan karave ......नमस्कार सर , माझ्या आईचे वडील १९९१ ला मयत झाले त्यापाच्यात ३ मुले व २ मुली होत्या . त्यापैकी एका बहिणीने हक्कसोड केले . भवानी आपापसात वाटप पत्र करताना एका बहिणीचे नाव सर्व ३ गटांवर कायम ठेऊन वाटप पत्र दुय्यम नि . समोर केले त्यास आईची परवानगी नव्हती ? त्यावर आक्षेप आईने घेतला आहे .
१) सदर नोंद होऊ शकते का ?
२)नोंद न होण्यासाठी काय करावे ?
३)सदर वाटप पत्र रद्द करण्यासाठी काय करावे ?
४)दिवाणी दावा टाकावा कि नाही ?
कृपया मार्ग दर्शन करावे
आपले प्रश्नावरून
वारस म्हणून , आपले आजोबांचे खालील वारस असावेत
१. आपले मामा १ २. आपले मामा २ ३. आपले मामा ३ ४. आपली मावशी ५. आपली आई
एका बहिणीने हक्क सोडला म्हणजे , आपले आई ने हक्क सोडला कि मावशीने हक्क सोडला ?
हक्क सोड नोंदणीकृत पत्रकाने सोडला कि केवळ तलाठी यान्हेकडील नोंदीमध्ये , वर्दी हक्क सोडला असा उल्लेख आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझ्या वडिलांनी गरजेपोटी एक जमीन सन १९९१ ला श्री विश्वास शंकर शिर्के या व्यक्तीस मुदत खरेदी दिली होती, तसे रिकन्वेंस बनविले होते परंतु सातबारावर श्री विश्वास शंकर झांजुर्णे असे नाव लागले होते , नमूद नोंदीच्या फेरफार मध्ये सुद्धा सातबारावरील नावाप्रमाणे नोंद होती, कालांतराने त्यामध्ये तलाठी साहेबांनी दुरुस्ती करून विश्वास शंकर शिर्के अशी नोंद केली आणि माझ्या वडिलांचे नाव मूळ अधिकारातून काढून इतर अधिकारात दाखविले . आता ती जमीन माझ्या वडिलांनी सन २००५ ला मुदतीनंतर मा सब रजिस्टर यांचे समक्ष रिकन्वेनस पत्र करून सोडवली आहे, नमूद जमिनीच्या सातबारा उतार्यावरून मुदत खरेदीदार श्री विश्वास शंकर शिर्के यांचे नाव कमी करून माझे वडिलांचे नाव दाखविण्यासाठी त्यावेळी कार्यरत तलाठी यांचेकडे रिकन्वेनस पत्राची फोटो कॉपी दिली होती परंतु त्यांनी विश्वास शंकर शिर्के यांचे नाव कमी न करता इतर अधिकारात असलेल्या माझ्या वडिलांच्या नावाला चौकट केली याचा अर्थ माझ्या वडिलांचे नाव कमी केले. आता ती जमीन माझ्याकडेच आहे परंतु सातबारावर नाव नाही. याबाबत मी पुन्हा नवीन तलाठी साहेबांना नाव लावण्याबाबत विचारणा केली तर त्यांनी हे खूपच जुने प्रकरण आहे मला यामध्ये बदल करण्याचे अधिकार नाहीत ते फक्त मा . तहसीलदार यांना आहेत असे सांगितल्यावरून मी वडिलांच्या नावे मा. तहसीलदार यांना उशिराचे रिकन्वेनस पत्राची नोंद सातबारावर होनेकारिता विनंती अर्ज दि. ०८/०५/२०११ ला केला होता. नमूद अर्ज पुढील कार्यवाहीकरिता मंडल अधिकार्याकडे पाठविला तेव्हा कार्यरत मंडल अधिकारी यांनी नमूद अर्जाच्या कार्यवही मध्ये काही त्रुटी दाखविल्या त्यानुसार मुदत खरेदी दिल्या पासून ते २०१२ पर्यंतचे सातबारा उतारे , सातबारा उतार्यामध्ये नोंद सर्व फेरफार उतारे मुदत खरेदी दिलेल्या रिकन्वेनस पत्राची प्रत इ. सर्व कागद पात्रांची पूर्तता केली दरम्यान दोन तहसीलदार व दोन मंडल अधिकारी आणि तीन तलाठी यांची बदली होऊन नवीन अधिकार आले , प्रत्येकाकडे मला हे प्रकरण वारंवार निदर्शनास आणून द्यावे लागत आहे तरी आजपर्यंत नमूद अर्जावर कार्यवाही पूर्ण झालेली नाही. मी सरकारी नोकरी निमित्त बाहेगावी असतो , माझे वडिलांना यामधील ज्ञान नाही त्यामुळे मलाच वेळ काढावा लागतो. सरकारी नोकरी करीत असल्यामुळे ५ वर्षामधील माझ्या बर्याच रजा फक्त या कारणासाठीच खर्च झाल्या आहेत तसेच वित्तहानी झाली ती वेगळीच.
महोदय मी सरकारी कर्मचारी असल्यामुळे वेळोवेळी विनंतीच्या मार्गाने प्रयत्न करीत असून सुद्धा अद्याप मला न्याय मिळाला नाही. फेरफार व सातबारावरील नोंदी या तलाठी यांनी केलेल्या असून चुकीच्या नोंदी दुरुस्ती साठी मूळ जमीन मालकाला होणारा त्रास हा खूप लाजीरवाणा आहे.
सर याबाबत आता माझा सय्यम सुटत चालला आहे तरी कृपया आपण मला मार्गदर्शन करून या प्रकरणाची मी आता कोणाकडे दाद मागावी हे सांगावे.
शक्य असल्यास श्री कुंडेटकर आपण आपला संपर्क नं द्यावा
प्रश्नाचे स्वरूपावरून -
आपले वडिलांनी English Mortgage -इंग्लिश गहाण- श्री शिर्के यांना करून दिल्लेले होते . या गाहाण प्रकारानुसार , कर्जाची परत फेड केल्यानंतर , शिर्के यांनी जमीन पुन्हा आपले वडिलांना हस्तांतरित करून दिली आहे .
उपरोक्त कथन केल्याप्रमाणे वस्तुस्थिती असल्यास , आपले वडिलांचे नाव अधिकार अभिलेख सादरी लागणे आवश्यक आहे . तहसीलदार प्रकरणाची दाखल घेत नसल्यास , त्यांना अर्जाचे अनुषगाने लेखी उत्तर देनेबाबत सांगा . अथवा सदर आपण , लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर, मी व चार भाऊ यांची ७/१२ वर वारस म्हणून नोंद आहे परंतु आणेवारी नाही. त्यासाठी काय करावे म्हणजे आणेवारी लागेल. आणेवारी नसल्याने सरकारी योजनाचा लाभ मिळत नाही.
आपण दुय्यम निबंधक कार्यालय येथे किंवा तहसिल कार्यालय येथे घरगुती जमिनीचे वाटप पत्र करून क्षेत्र वाटणी करून घेऊ शकता.

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

Question by Sagar
18-04-2016
kamblesagar041@gmail.com

इनाम वर्ग 2 जमिनिबाबत माहिती मिळनेस विनंती
आपणस नेमक्या कोणत्या प्रकारची वर्ग २ जमिनीची माहिती हवी आहे? .ज्या जमिनी शासनाकडून काही विशिष्ट अटी व शर्तीवर दिल्या जातात त्या जमिनींना आपण वर्ग २ जमिनी म्हणतो.अशा जमिनिच्या ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात शर्तीचा उल्लेख जसे नवीन शर्त,कुळकायदा ४३ शर्त,सिलिंग act इत्यादी.असतो तसेच त्या जमिनीचा भोगवटादार वर्ग २ असा असतो.आपणाला अधिक माहिती हवी असलेस महसूल मित्र मोहसिन शेख या ब्लॉग ला देऊन महसूल मधील विविध वर्ग २ जमिनीचे हस्तातरण तरतुदी नियम लेख वाचावा.ब्लॉग ची लिंक खाली दिली आहे.

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

सर
एखादी जमीन १९९२ साली माती कामा साठी संपादन झाली व तीचे प्रायोजन संपुष्टात येउन अंदाजे १८ वर्ष झाले असतील ती जमीनीला "तात्पुरती संपादित" असा निकष लागेल का?
सध्या जमीन विना वापर पडुन आहे.
नविन भूसंपादन कायदा क. १०१ ने परत मागता येईल
की
"भू.सं.कायदा १८९४,प्रकरण ६-भूमीचा तात्पुरता ताबा: नुसार सार्वजनिक प्रायोजना साठी संपादित केली व प्रायोजन संपुष्टात आले तर ती जमीन , महाराष्ट्र सुधारणा, क.३६(१) व(२) नुसार हित संबंधीत व्यक्तींनी मागणी केलेली असेल तर शासन त्यांना परत देईल." अशी तरतुद आहे.
( नविन भू.सं.कायदा २०१३, प्रकरण ११, क.८२(१) व(२) मधे पण तशी तरतुद केलेली आहे)
वरील कोणत्या नियमा नुसार परत मागता येईल.
धन्यवाद!
संपादन हे कायम स्वरूपाचे असते . संपादन तात्पुरते स्वरूपाचे नसते .
संपादन प्रयोजनासाठी जमिनीचा वापर होत नसेल तर , ( जर जमीन जुन्या कायद्यानुसार संपादित झालीअसेल ) २००३ चे शासन निर्णयानुसार ( सदरचा शासन निर्णय माझ्याकडे नाही )जमिनीची विल्हेवाट लावण्याची आहे .
संपादन संस्थेस जमिनीचा वापर संपादन प्रयोजनासाठी केला नसले बाबत करणे दाखवा नोटीस देनेत येते . संपादन संस्थेचे म्हणणे ऐकून , वस्तुस्थिती पाहून , जमीन शासन जमा केली जाते .
शासन जमा जमीन केल्या ननतर , लिलाव पद्धतीने जमिनीची विल्हेवाट लावली जाते . त्या मुळे, ज्याची जमीन संपादित झाली आहे त्यास ती जमीन परत मिलेलेच असे नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
एखादी जमीन १९९२ साली माती कामा साठी संपादन झाली व तीचे प्रायोजन संपुष्टात येउन अंदाजे १८ वर्ष झाले असतील ती जमीनीला "तात्पुरती संपादित" असा निकष लागेल का?
सध्या जमीन विना वापर पडुन आहे.
नविन भूसंपादन कायदा क. १०१ ने परत मागता येईल
की
"भू.सं.कायदा १८९४,प्रकरण ६-भूमीचा तात्पुरता ताबा: नुसार सार्वजनिक प्रायोजना साठी संपादित केली व प्रायोजन संपुष्टात आले तर ती जमीन , महाराष्ट्र सुधारणा, क.३६(१) व(२) नुसार हित संबंधीत व्यक्तींनी मागणी केलेली असेल तर शासन त्यांना परत देईल." अशी तरतुद आहे.
( नविन भू.सं.कायदा २०१३, प्रकरण ११, क.८२(१) व(२) मधे पण तशी तरतुद केलेली आहे)
वरील कोणत्या नियमा नुसार परत मागता येईल.
धन्यवाद!
नवीन कायद्यानुसार जमीन संपादित झाली असेल व ताबा घेऊन ५ वर्ष किव्न्हा अधिक काळ जमीनच वापर संपादन प्रयोजनासाठी झाला नाही तर मुल मालकास जमीन परत ( प्रत्यावार्तीत ) करण्याची तरतूद आहे .
आपली जमीन भू संपादन कायदा १८९४ प्रमाणे संपादित झाली आहे . नवीन कायद्यातील कलम ८१ प्रमाणे तात्पुरती जमीन भोगवत्यासाठी ३ वर्षापर्यंत घेत येते . आपली जमीन तात्पुरते संपादन या निकषात बसणार नाही .
भास्कर पिल्लेय विरुद्ध केरला राज्य या याचिकेत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेलेया निर्देशानिसार , महाराष्ट्र शासनाने , जुन्या कायद्या खालील संपादित झालेलेया जमिनीची विल्हेवाट कशी लावावी या बाबत परिपत्रक निर्गमित केलेले आहे . त्या नुसार , जमिनीचा वापर संपादन प्रयोजनासाठी होत नसेल तर अशी जमीन प्रथम Land -Bank मध्ये जमा केली जाते . नंतर जाहीर लिलावाद्वारे अश्या जमिनीची विक्री केली जाते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by अजित
18-04-2016
ajitpatil0225@gmail.com

आदरणीय सर वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप आभार. सर जर एखाद्या अपिलावर की जे महसुल मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या समोर चालू होते ( उपसंचालक भूमी अभिलेख आणि जिल्हा भूमी अभिलेख यांच्या निर्णय विरुद्ध) अश्या अपिलावर , माननीय महाराष्ट्र शासनाने अपील मंजूर करून चुकीच्या लावल्या गेलेल्या नोंदी तत्काळ रद्द कराव्यात अश्या पद्धतीचे आदेश दिलेले असताना साधारण पने स्थानिक पातळी वरून ( तालुका भूमी अभिलेख) किती दिवसात या नोंदी रद्द होणे अपेक्षित आहे किंवा त्या केल्या जाव्यात या बाबत कृपया माहिती मिळावी हि विनंती, आणि या मध्ये जर मुद्दामहून टाळाटाळ केली जात असेल तर काय करावे.
मा महसूल मंत्री यांनी दिलेलेया आदेशाची तसेच कोणत्याही प्रकरणाची सुनावणी घेऊन देलेल्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करणे आवश्यक आहे . त्यासाठी पुन्हा वर्दी देणे आवश्यक नाही .
ज्या प्रकरणात Ex-parte निर्णय असेल तर , वर्दी नोटीस १५ दिवस लांबीची देणे हितावह
आपण सदर बाबा , अधीक्षक भूमी अभिलेख /जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून देऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,का.तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदीवर दिवाणी न्यायालय स्थगिती आदेश देऊ शकते का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
सर माझा प्रश्न हींदु वारसा अधिनियम 1956 वत्यातील सूधारना 2005 शी संबंधित आहे माझ्या आईचा जन्म 1960चा असुन लग्न 1977साली झाले तिला 3भाऊ व 3 बहीणी आहेत. सद्या तीचे आई व वडील जिवंत आहेत त्यांना 60 एकर जमीन असुन ती त्यांनी 1990च्या आसपास वरील पैकी तीच्या 3भावांचे नावें साध्या पद्धतिने केली असून 7/12 त्यांच्या नावें निघतो .वाटप करते वेळी मुलींचा वीचार केला नाही किंवा कसलेही सही अंगठा घेतलेला नाही अशा स्थितीत माझ्या आईस तीच्या वडीलांच्या शेतीत हीस्सा मीळू शकतो का? त्या वीषयी मार्गदर्शन हवे.
बालाजी ,
आपण आपले प्रश्नात , आई चे वडिलांकडे हि मिळकत त्यांचे वादिलाकडून म्हणजे आई चे आजोबांकडून प्राप्त झाली आहे का ? याचा उल्लेख केलेला नाही
जर आपले आजोबांना , त्यांचे वादिलाकडून म्हणजे आपले पंजोबाकडून मिळकत प्राप्त झाली असल्यास , आपले आजोबा सध्या हयात असताना सुद्धा मालकी हक्क आहे . या हक्क चे आधारे आपली आई , मिळकतीची वाटणी करून मागू शकते . जर आपले आजोबांनी वाटणी करून दिली नाही तर , श्री .मोहसीन शेख यांनी उत्तर दिल्याप्रमाणे आपणास , दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल .
जर मिळकत आपले आजोबांची स्व कष्टार्जित असेल , तर सध्या या मिळकतीत आपले आइस , वडील हयात असे पर्यंत कोणताही हक्क नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपणाला दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल करावे लागेल.

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

नमस्कार सर , माझ्या आईचे वडील १९९१ ला मयत झाले त्यापाच्यात ३ मुले व २ मुली होत्या . त्यापैकी एका बहिणीने हक्कसोड केले . भवानी आपापसात वाटप पत्र करताना एका बहिणीचे नाव सर्व ३ गटांवर कायम ठेऊन वाटप पत्र दुय्यम नि . समोर केले त्यास आईची परवानगी नव्हती ? त्यावर आक्षेप आईने घेतला आहे .
१) सदर नोंद होऊ शकते का ?
२)नोंद न होण्यासाठी काय करावे ?
३)सदर वाटप पत्र रद्द करण्यासाठी काय करावे ?
४)दिवाणी दावा टाकावा कि नाही ?
कृपया मार्ग दर्शन करावे
वडील मयत झाल्यावर , तीन भाऊ व दोन बहिनांना समान हक्क मिळकतीत मिळणे आवश्यक आहे .
जर एक बहिणीने हक्क सोडला आहे तर , तिचा कोणताही हक्क मिळकतीत उरलेला नाही . ज्या बहिणीने हक्क सोडलेला नाही , तिचे नाव ७/१२ सादरी दाखल असले बाबत आपले प्रश्वरून दिसून येते .
आपल्या आई चा आक्षेप कोणत्या कारणासाठी आहे .
या दोन बहिणी शिवाय आपली आई , हि वारस आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नोंदीस आक्षेप असलेबाबत तक्रार अर्ज तलाठी कार्यालय येथे द्यावा..

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

सर एकाच स.न.चे रजि अखत्यार पत्र एका व्यक्तीला आगोदर केले व त्याच स.न चे दुसर्‍या एका व्यक्तीला करून दिले व दोन्ही घेणारे नोंदणी साठी आग्रही आहेत .अखत्यार पत्र घेणारा ची नोंद घेत येत नाही मग खरेदी खताने घेणाऱ्याची नोंद करताना अखत्यार पत्रावाला तक्रार करतो आहे त्याला नोटीस दिलेली नाही मग त्याची तक्रार घेऊन चालेल का /अशी हरकत घेणे कायदेशीर योग्य आहे का? किवा अखत्यार पत्र घेणार्याने काय केले पाहिजे ?
अखत्यार पत्र घेणाराला कोणताही अधिकार नाही.तक्रार घेता येणार नाही.

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

सर,
मागास व इतर मागास प्रवर्ग व्यक्ती जमीन ( वर्ग १) विकत असेल व त्या मुळे ती व्यक्ती भूमीहीन म्हणुन बाधीत होत असेल तर त्या व्यक्तीला जमीन विकता येउ शकते का?
त़्या बाबतीत काही नियम , कायदे आहेत का?
असा नियम /कायदा नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सदर मागास व इतर मागास प्रवर्ग व्यक्ती यांना जमीन विकता येऊ शकते त्यास कोणतेही अडचण नाही परंतु अशी व्यक्ती भूमिहीन होत असेल तर

"मी श्री.---------------------------- आज दिनांक ---------रोजी खरेदीखताने ----अशी जमीन श्री.--------------यांना विकली असून यामुळे मी भूमिहीन होत असून यापुढे मी शासनाला कोणत्याही प्रकारची जमीन मागणी करणार नाही तसेच भूमिहीन योजनेचा लाभ घेणार नाही "

या आशयाचे कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र सदर खरेदीखत दस्तास जोडून द्यावे लागते.

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

Question by रवि
16-04-2016
ravindra171282@gmail.com

किरण सर दिलेले प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद सर मी दिनांक ०८.०४.२०१६ ला विचारलेल्या तसेच अन्य एक प्रश्न साठी आपणास आपले मोबाईल नंबर (उपरोक्त एका प्रश्नांच्या दरम्यान उपलब्ध केलेला आहे
) त्यावर संपर्क करू शकतो का..विनंती आहे सर आपण फोन कधी करावा या बद्दल सांगावे...किवा आपला इमेल द्यावा ज्यावर सविस्तर शंका पाटवली जावू शकते . आपले सर्वांचे चालवलेले उपक्रमा बद्दल मनपूर्वक आभार
kiranpanbude@ग्मैल.काम
९९२१७११९९९
kiranpanbude@gmail.com

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

विविध योजनेकरिता हयातीचे प्रमाणपत्र ग्रामीण भागात कोणाकडून घ्यावे.प्रमाणपत्र देण्यास सक्षम अधिकारी कोण.
गाव स्तरावर सरपंच आणि पोलीस पाटील हे ह्यात प्रमाणपत्र देऊ शकतात..... आणि ते ग्राह्य धरले जाते.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

This page was generated in 0.47 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3