जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर,बांधकाम व्यावसायिकाने सोसायटीस रजिस्टर Convence Deed करून दिले आहे.त्याची नोंद गावदप्तरी घेतली असता नोंद घेता येत नाही या कारणास्तव नोंद रद्द केली आहे.तरी अशी नोंद गावदप्तरी घेता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
कोणत्या कारणामुळे नोंद घेता येत नाही याचे कारण दिले आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
09-11-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर , पि.आर बॉण्ड म्हणजे काय ?त्याला काही मुद्दत असते का ? एखादा आरोपी त्या नुसार सुटला आसेल तर त्याला पुन्हा कस्टडी होऊ शकते का ?त्याला जामीन लावावा लागेल का ?

Question by RAM PHADATARE
09-11-2016
ram.p.phadatare@gmail.com

सन १९९७ साली तोंडी वाटप झाले आहे. वाटपानतर सन १९९७ साली फेरफार नोंदी केलेल्या आहेत. नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी यानी stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी मुळ कागदपत्रे पाहुन संबधिताचे जाब जबाब घेहुन फेरफार नोंदी मंजूर केलेल्या आहेत. व तसा उल्हेखही फेरफारला आहे. व वाटपाप्रमाणे सन १९९७ सालीपासन माझ्या हिस्स्याच्या जमीनीवर माझा व भावाचा त्याच्या हिस्स्याच्या जमिनीवर ताबा व मालकी आहे.

त्याच मालकी हक्काने भावाने सन 2000 साली त्याचे हिस्स्याची जमीन रजिस्टर दस्ताने विकली आहे व आता वाटप झाले नाही, अन १९९७ साली केलेल्या नोंदी केवळ अर्ज व stamp पेपरवरून झाल्‍या असल्याने बेकायदेशिर असल्यामुळे
रद्द करणेकरीता उपविभागीय अधिकारी याचेकडे अर्ज केला.

सदर प्रकरणात उपविभागीय अधिकारी यानी वाटप रजिस्टर दस्ताशिवाय झाले
असल्‍याचे कारणावरून माझ्या हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द करून भावाच्या बहिणीच्या नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत केली आहे.

सन १९९७ साली फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी याना stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी कागदपत्रे असलेली आरटीएस Faayil कागदपत्रे जतन करण्याचा कालावधी संपल्‍याने नष्‍ट केली आहेत त्यामुळे माझ्याकडे पुरावा नाहीत.
आपले हिस्स्यांचे जमिनीस आपले बहिणीचे नाव लावणे बाबत उपविभागीय अधिकारी यांनी निर्णय दिला आहे . भावाने त्याचे हिस्स्याची जमीन विकली आहे . त्यामुळे एकत्रित जमिनीत आपले सर्वांचा हिस्सा किती आहे /होता हे निश्चित करणे आवश्यक आहे . मात्र एकत्रित जमिनीतील काही हिस्सा भावाने विकला आहे . तो हिस्सा आता वाटप करण्याचे दृष्टीने विचार करता येणार नाही.
आपले एकत्रित क्षेत्र किती आहे ? आपले वडिलांना वारस क्ती आहेत ? हि माहिती द्यावी .
हिस्से निश्चित करण्यासाठी , हि माहिती आवश्यक आहे
आपले भावाने जमीन विकली आहे ते आता परत मिळणार नाही . जमीन विक्रीतून प्राप्त पैसे , हिस्स्याप्रमाणे अन्य वारसांना मिळण्यासाठी व उर्वरित जमीनीचे वाटप करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जुना फेरफार फाळणी 12 आलेवरून नोंद केली असे .त्यामध्ये क्षेत्र कमी झाले आहे पूर्वी 4 एकर क्षेत्र होते आता 3 एकर झाले आहे काय करावे लागेल
नमस्कार आम्ही साधार २० ते २५ वर्षा पूर्वी एक ०२.०२ हे.गट नं.४५५/१ हि जमीन घेतली होती. व आम्हाला आज तिची विक्री करायची आहे.परंतु त्या मध्ये एक अडचण अशी आली आहे कि त्या जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये पुनर्वसनासाठी राखीव ०३.७० हे(गट नं.४५५/१ व ४५५/२ ) असा फेर पडलेला आहे. व नंतर २००४ मध्ये पुनर्वसनासाठी राखीव ०३.७० हे(गट नं.४५५/१ व ४५५/२ ) बोजा कमी असा एक फेर पडलेला आहे.
माझा प्रश्न असा आहे कि मला आता ती जमीन विक्री करावयाची आहे. तरी त्या मध्ये काही अडचण येईल का किंवा त्या संबधी काही GR आहे का.
धन्यवाद
महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा १९९९ चे कलम १२ (२) खाली मा विभागीय आयुक्त महसूल यांची परवानगी घ्यावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमाबंदी वेळेस नकाशावर असणारा पांदण रस्ता पुनर्मोजनिच्या नकाशा मधे दाखवलेला नाही.सदर रस्ता सध्या अस्तित्वात आहे. तरी आता तो रस्ता पुन्हा नकाश्यावर घेण्यासाठी काय करावे लागेल?
जमाबंदी पासून रास्ता होता हे आपणास कशे माहित . जमाबंदी १९३० चे आसपास झालेली आहे .
रास्ता गाव नकाशावर घेणे अश्यक्य

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. श्री. किरण पाणबुडे सर,
खालील मुद्द्यावर मला मार्गदर्शन हवे आहे.

२००५ साली खरेदीखत क्र.२८४४ आधारे तलाठी यांच्या कडे फेरफार नोंद करण्यात आली. क्षेत्र शिल्लक नसल्या मुले आम्ही त्या पोकालीस्त फेरफारीस आक्षेप घेतला. प्रकरण प्रथम तहसील मध्ये चालले,तहसीलदार साहेबांनी कोर्टाचा निकाल येई पर्यंत प्रकरणास स्थगिती दिली. त्या नाराजी ने आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपील केली.अपील मंजूर करण्यात आली. फेरेफार नामंजूर करण्यात आल.

१)२०१४ साली पुन्हा त्याच २८४४ खरेदिखता आधारे नव्याने फेरफार नोंदविण्यात आला, हे पुन्हा त्याच खरेदीखताची नोंद होऊ शकते का?

२) तलाठी, मंडळ अधिकारी , तहसीलदार यांनी कोणीच हितसाबंधीतास नोटीस बजावली नाहि. आणि नोंद ७/१२ उताऱ्या वर घेण्यात आली.
३)तलाठी यांनी दि. १/९/२०१४ रोजी त्यांची नोंद ७/१२ उताऱ्या वर गेतली. परंतु मंडलाधिकारी यांनी फेरफार नोंद ६/९/२०१४ रोजी केली तर ५ दिवसा आधी ७/१२ उताऱ्या वर नाव घेण्यात येऊ शकते का?
४)दि. १/९/२०१४ रोजी नाव असलेल्या उताऱ्या आधारे तो प्लॉट दुसऱ्या व्यक्ती विकण्यात येतो, परंतु फेरफार मजूर ५ दिवसा नंतर होत आहे, तर टी खरेदी आणि ७/१२ वैध आहे का?

मुदतीत उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रार करण्यात आली आहे,परंतु नामंजूर जालेला फेरफार आणि हे हेतुपूर्वकभर,भ्रष्ट मार्गाने करण्यात आलेल्या फेरफार नोंदी ह्याचा अध्याप काहीच निकाल लागत नाही.
कोणा कडे न्याय मागवा?
नवीन सुधारणे नुसार अपील ६ महिन्याच्या आत निर्णयीर करणे महसूल अधिकारी यांच्यावर बंधन कारक आहे .
आपण झालेले विल्माब बाबत जिल्हाधिकारी यांना अवगत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजीच्या आईची शेतजमीन आहे शेतजमीन ताब्यात आहे आजी 1981 ला वारली तर तिची आईच 1990 निधन आजपावेतो वारस नोंद झालेली नाही आता तलाठी नोंद करून घेत नाही आता आम्ही वारसा नोंदीसाठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे .वारसा हक्काचा फॉर्म आहे काय ? असल्यास तो कोठे सादर करावा .आपला आभारी
तलाठी यांनी नोंद करणे आवश्यक . कदाचित वारस नोंद खूप उशिरा करण्यात असल्याने त्यांनी , वारस दाखला मागितला असेल .
मला गाव व तहसील सांगा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची गावठाणात जमीन आहे 1983 पर्यंत गावठाण मोजणी झालेली नव्हती 1983 ला चुलत्यांचे आमचे एकत्रित सिटी सर्वे नंबर दिला आहे .आता आम्हाला स्वतंत्र हिस्सा कररयाचा आहे परंतु चुलते मोजणीसाठी सही करीत नाही माझे घर पडावयास आले आहे .आम्ही आता काय करू शकतो .कृपया मार्गदर्शन करणे
आपण न्यायालयात आपला हिस्सा निश्चित करून मिळण्यासाठी दावा दाखल करा . सर्व प्रश्न आपोआप सूटतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या आईच्या नावे 2 एकर क्षेत्र आहे.
लेखी 7/12 हा 2 एकर निघतो. पण सध्या ऑनलाईन 7/12 उतारा तलाठी कार्यालयाने देणे चालू केले आहे.
आणि आमचा उतारा हा ऑनलाईन 1 एकरच निघतो.
तलाठी यांचेकडे याबाबत विचारणा केली असता ते दखल घेत नाहीत.
म्हणून तहसीलदार यांचेकडे तक्रार अर्ज केला असता त्यांनी असे सांगितले आहे की, आपण म. ज.म. अधिनियम कलम 155 नुसार दुरुस्ती बाबत अर्ज सादर करा.
परंतु आमचे सर्व कागदपत्रे बरोबर आहेत व आम्ही 1 एकर क्षेत्राची विक्री वगैरे केलेली नाही.
तरी सध्या आम्ही काय करावे.
तलाठी यांनी उत्तर दिल्या प्रमाणे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,महा ज मह.अधिनियम 1966 चे कलम 85 खाली शेतजमिनीचे वाटप करताना सरस निरस जमीन ठरविण्याचे अधिकार कोणास आहे.कृपया शासनाचे निर्णय /परिपत्रक असल्यास माहिती द्यावी.

Question by amoldhamke
05-11-2016
amoldhamke67@gmail.com

क्ष इसम शासकीय बाकी न भरल्यामुळे सदर जमिनीचा लिलाव केला असता लिलाव कोणी न घेतल्यामुळे नॉमिनल बीड वर शासनाने जमीन खरेदी केली त्यानुसार कब्जेदार सादरी सरकार नाव दाखल केले व जमीन मालकाचे नाव इतर अधिकारात दाखल केले आज रोजी जमीन मालकाचे नाव कब्जेदार सादरी दाखल होण्याची विनंती करीत आहे सरकार नाव कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून कमी केली जात व त्याची काय कार्यपद्धती आहे याबाबत कृपया मार्गदर्शन होण्यास विनंती आहे
शासनाने जमीन जप्त केली असल्यास , तीन वर्षात मूळ जमीन मालक शासकीय बाकी व जमीन आकाराचे तिप्पट रक्कम भरून जमीन परत करणे बाबत किल्ह्याधिकारी यांचेकडे अर्ज करू शकतो . ( कलम ७२ म. ज.म. अ. १९६६ )
अन्यथा ३ वर्षे होऊन गेले असल्यास खालील रक्कम भरून थकबाकीदार जमीन नावावर करू शकतो ( कलम २२०)
१. जमीन थकबाकी रक्कम
२.थकबाकीची रक्कमेच्या १/४ दंड
३.जमिनीचा शासनाकडे जमीन असलेल्या कालावधीचा आकार

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ने 100 हेक्टर जमीन खाजगी शेतकऱ्याकडून खरेदी केली.सदर शेतजमीन वहिवाट करण्यासाठी पांधणरस्ते होते.ती जमीन शिल्लक आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ला त्या शिल्लक जमिनीचा कायदेशीर ताबा घेता येईल काय ? किंवा शासनाकडे त्या शिल्लक जमिनीचा मोबदला भरून जमिनीची मागणी करता येईल काय ? कृपया मार्गदर्शन करावे.याबाबत जी आर असल्यास सांगावे.
पांधण रस्ते जमीन विल्लेवाट नियम अंतर्गत शासनाकडे मागणी करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,झुडूपी जंगलाचे निर्वनीकरण म्हणजे काय ? कलम 4 ची अधिसूचना बाबत माहिती द्यावी.
निर्वनीकरण याचा dictionary अर्थ -to cut down and clear away the trees or forests from.
निर्वनीकरण म्हणजे जमिनीचा वन हा दर्जा बदलणे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
नमस्कार
माझे आजोबा व त्यांचे बंधु यांचे नावे 1970 ला वाटपद्वारे 15-15 एकर एवढी शेतजमीन त्यांचे वडिलांकडून आली आहे.

आज आम्ही आमची ताब्यातील जमीन मोजली असता ती फक्त 10 एकर भरत आहे व सात-बारा वरती तर 15 एकराचा उल्लेख आहे.

म्हणून आम्ही चुलत आजोबा यांच्या ताब्यातील जमीन मोजली असता त्यांची 20 एकर भरत आहे व सात-बारा वर तर 15 एकर आहे.

यावरुन मला असे समजले की, आमची 5 एकर एवढी जमीन चुलत आजोबांचं वहिवाटत आहेत.

मी याबाबत माझे आजोबा, वडील तसेच चुलते यांच्याशी बोललो असता त्यांना याबाबत काहीच माहित नाही, ते म्हणतात की, आपल्या ताब्यातील जमीन हि 15 एकर असेल कारण त्यांनी आजपर्यंत कधीच मोजणी केली नाही.

माझे आजोबा, वडील, चुलते हे सर्व अशिक्षित आहेत, म्हणूनच त्यांनी 1970 पासून आपली जमीन 10 एकर आहे की 15 एकर हे सुद्धा समजले नाही.

मी आमच्या 5 एकर जमिनीबाबत चुलत आजोबा व त्यांची मुले यांच्याशी बोललो असता, त्यांनी डायरेक्ट आमच्याशी वाद घालण्यास चालू केला आहे व आमची जमीन आम्हांला देणारच नाहीत असे सांगत आहेत. व माझ्या आजोबांच्या नावावरील 5 एकर जमीन त्यांचे नावावर करण्यासाठी दमदाटी करत आहेत.

आज मी व माझे चुलते आम्ही सर्व एकत्रच राहतो व त्यामुळे आमच्या जमिनीचे आम्ही वाटप केले नाही, व ती अजून आजोबांच्याच नावे आहे, सर्व जमीन एकाच गट नम्बरमधील असल्याने आम्हांस ती 10 एकर आहे कि 15 हे सुद्धा समजले नाही, तरी,...

1. 1970 ला वाटप झाले, तेव्हापासून आजपर्यंत 45 वर्ष झाले, चुलत आजोबा आमची जमीन वहिवाटत आहेत, तरी तिचा ताबा आम्हांस मिळू शकतो का ?

2. न्यायालयात आमची केस टिकेल का ?

3. आम्ही दावा काय म्हणून दाखल करावा.

4. चुलत आजोबा व त्यांची मुले आमच्या नावावरील 5 एकर जमीन त्यांचे नावावर करण्यासाठी दमदाटी करत आहेत, व त्रास देत आहेत तरी आम्ही कोणती कायदेशीर मदत घ्यावी.

5. आज 45 वर्षांनंतर आम्हांस माहित झाले आमची जमीन किती आहे ते, व जरी न्यायालयात गेलो तरी आमची बाजु कमकुवत आहे, म्हणून विलंब माफी बाबत न्यायालयात आम्ही काय म्हणणे मांडावे.

6. माझे आजोबा, वडील व चुलते हे सर्व अशिक्षित असल्याने न्यायालयात मी माझे नावे केस दाखल केली तर चालेल का ?

7. हा दावा वकील न देता मी स्वतः चालवू शकतो का, कारण असे झाले तर न्यायालयात आमचे म्हणणे आम्हांला व्यवस्थित सांगता येईल.

8. म.ज.म. अधिनियमाच्या कोणकोणत्या कलमानुसार मला दावा दाखल करता येईल.
१. आपली बाजू कमकुवत आहे . मात्र म्हणून ५ एकर जमीन सोडून देणे योग्य नाही . आपण आपले जागेत अतिक्रमण केले आहे व ती जागा वहिवाट करण्यास चुलत आजोबा यांना मनाई हुकूम करणे बाबत दावा दाखल करा .
२.प्रयत्न करण्यास हरकत नाही
३.१ मध्ये नमूद केल्या प्रमाणे The Specific Relief Act खाली दावा दाखल करा
४.या बाबत आपण पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे विरुद्ध तक्रार दाखल करा . हे आपणास दिवाणी दाव्यास हि उपयुक्त ठरेल.
५.न्यायालयास convince करणे आवश्यक . Limitation bars remedy but not right हे लक्षात ठेवा .
६.जमीन सध्या ज्यांचे नावावर दाखल आहे त्यांनी दावा दाखल करणे आवश्यक
७. होय . मात्र आपण विधी पदवीधर असाल तर बिलकुल हरकत नाही . मात्र अश्या दाव्यात वकील असणे हितावह ( आपले आर्थिक कुवती प्रमाणे निर्णय घ्यावा )
. २ मध्ये नमूद केले आहे . म.ज .म.अ १९६६ चे कलाम १३५ हद्दी वाद बाबत आहे . मात्र त्याचा किती उपयोग होईल ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
नमस्कारआम्ही चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहतो.

आम्ही वस्तीवरती राहतो आणि आमची वस्ती हि जवळ-जवळ 200 लोकसंख्येची वस्ती आहे.

आमची वस्ती हि चांदे खुर्द या
गावच्या हद्दीत आहे परंतु आमच्या घराच्या नोंदी ह्या चांदे बुद्रुक या गावच्या ग्रामपंचायत मध्ये आहेत. चांदे खुर्दच्या ग्रामपंचायत मध्ये नाहीत.

आमच्या जमिनी सुद्धा चांदे खुर्द च्याच हद्दीत आहे.

आमचे मतदान, रेशनकार्ड हे सर्व चांदे बुद्रुक या गावचे आहे.

दोन्ही गावामधील अंतर अवघे 2 km आहे.

आमच्या वस्तीवरील 10 लोकांनी व मी आपापल्या जमिनीमध्ये शासकीय योजनेमधून शेततळे बनविण्यासाठी अर्ज केला आहे.

शेततळ्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक असतो म्हणून आम्ही आमच्या रहिवाशी म्हणजे चांदे बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता त्यांनी आम्हांस असे सांगितले कि आपली जमीन हि चांदे खुर्द या गावच्या हद्दीत आहे तरी आपण चांदे खुर्द या ग्रामपंचायत मधून ठराव घ्यावा.

आम्ही चांदे खुर्द मध्ये गेलो असता तेथे आम्हांस असे सांगितले की, आपणांस ठराव मिळणार नाही कारण आपण आमच्या गावचे रहिवाशी नाहीत तसेच आपले मतदान व रेशनकार्ड हे सुद्धा आमच्या गावचे नाही.

तसेच चांदे खुर्द या गावच्या सरपंच यांनी आम्हा वस्तीवरील सर्व लोकांची बैठक घेऊन असे सांगितले आहे की, आपण सर्वांनी लवकरात लवकर आपले मतदान व रेशनकार्ड हे चांदे खुर्द या ग्रामपंचायतीत स्थानांतरण करावे तसेच आपल्या घराच्या नोंदी आमच्या हद्दीत राहता म्हणून आमच्या ग्रामपंचायत मध्ये लावून घ्याव्यात. अन्यथा आम्ही आपल्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करणार आहोत.

त्यांनी असे संगीतल्यानंतर आम्ही आमच्या सध्या रहिवाशी असणाऱ्या चांदे बुद्रुक या गावच्या सरपंचांची भेट घेतली व त्यांना सदर सर्व घटना कथित केली, परंतु त्यांनीही आमची मदत करण्यास नकार दिला व असे सांगितले की, आपण ज्या गावच्या हद्दीत राहता त्याच गावचे रहिवास स्वीकारा, आणि आपले मतदान, रेशनकार्ड व घरांच्या नोंदी आमच्या येथून चांदे खुर्द येथे स्थानांतर करा. कारण आपण चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहता.

1. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असल्याने घराच्या नोंदी सुद्धा चांदे खुर्द मधेच घ्याव्यात का

2. आम्ही चांदे बुद्रुक मधील मतदार यादीतील नाव व रेशनकार्ड हे चांदे खुर्द मध्ये स्थानांतरित करावे का

3. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असून चांदे बुद्रुकच्या ग्रामपंचायत मध्ये आमच्या घराच्या नोंदी आहेत तरी हे बेकायदेशिर आहे का व तसे असल्यास आमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का

4. आमच्या घरांच्या नोंदी चांदे खुर्द मध्ये नसल्याने त्यांना आम्हांस ठराव न देण्याचा अधिकार बनतो का

प्लिज सर आपण लवकरात लवकर माझ्या समस्येचे निराकरण करावे हि विनंती

आपला आभारी
अमित शिर्के

Question by राजू
04-11-2016
raju_juo@yahoo.co.in

महोदय

मला माझ्या जमिनीवर घर बांधायचे आहे , परंतु ती जमीन हि ग्रीन झोन मध्ये असल्यामुळे ठाणे महानगर पालिकेकडून पाहिजे तितका fsi नाही मिळत .तर ग्रीन झोन चे R झोन कसे करायचे .

सदर जमीन ठाणे महानगर पालिकेच्या सेक्टर ११ मध्ये आहे .

Question by KP
02-11-2016
krrishnakant@gmail.com

माननीय साहेब,

हक्कसोड पत्र करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रिंटाऊट विथ डिजिटल साइन सातबारा उतारा ची मागणी करत आहेत. पण तलाठी कार्यालयात कॉम्पुटर नसल्यामुळे तसेच तहसील दार ऑफिस मधेय डेटा फिडींग साठी मुले नसल्यामुळे इलेक्ट्रिक प्रिंटाऊट विथ डिजिटल साइन सात बारा मिळू शकत नाही. तर दुसरा काही पर्याय आहे का ?

डिजिटल सात बारा नसेल तर दुसरा कोणती कागदपरे सादर करावी लागतील कृपया माहिती द्यावी


गट 252 मध्ये एकूण जमीन 10 एकर वाटप नाही सर्वानी जमीन विकली आहे फक्त 1 मूळ मालक राहिला आहे त्याच्या जमिनीपेक्षा त्यांनी जास्त जमीन विकली आहे काय करावे लागेल
नवीन गावठाण विस्तार अंतर्गत 20 वर्षांपूर्वी मिळालेले प्लॉट विकता येतात का विकण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल त्यासाठी किती नजराणा भरावा लागेल
नमस्कार सर,
मी १ ऑक्टोबर २०१४ रोजी सोनाबाई व चांगाबाई यांच्या कडून प्रत्येकी १हेक्तर या प्रमाणे २हेक्तर क्षेत्र कायम खुष खरेदी केले.७/१२ पाहीला असता मिळकत विना जोखीम दिसत होती.
मंडल अधिकारी यांच्याकडे नोदिसाठी गेले असता त्यांनी जमीन वर्ग २ची असल्याचे सांगितले . अधिक चौकशी करता सदर जमीन मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन नियम १९५६ चे नियम २१(२)अन्वये कुळकायदा कलम ३२ (पी)पोटकलम (२)अन्वये विक्रीच्या आदेशाने संबंधीताना मिळाल्या आहेत.त्यामुळे फेरफार रद्द करण्यात आला .माझे प्रश्न
१.वर्ग २ जमीन असताना खुष खरेदी दस्त होऊ शकतो का?
२.देणार इसमावर आपण फसवणुकीचा दावा दाखल करू शकतो का?
३.या प्रकरणामध्ये शर्थ भंग झाल्याने सरकारी दंड भरण्याचा मार्ग असतो का?
४.मिळकत मी अजूनही कसत आहे मी काय करावे जमीन कसावी कि कसु नये
५.या प्रकरणाचा कोणाकडे पाठपुरावा करावा.
६.सदर घटनेने जीवनात नैराश्य आलेले .
तरी मला कृपया मार्गदशन करावे
सर,
पदोन्नती साठी कोणकोणते निकर्ष लागतात.
कोतवालाना 25 टक्के शिपाई होण्याकरता जागा राखीव आहेत.या जागा जाती नुसार भरण्यात येतील कि आपली सेवा किती वर्ष झाली, आपले शैक्षणिक पात्रता किती उच्च, किंवा शिपाई संवागातील एख्यादया जातिच्याची पदोन्नती झाली,तर ती जागा कोतवालामधून त्याच जातीच्या उमेदवाराणे भरली जाईल का?
नमस्कार सर
एकत्रीकरना पूर्वीच्या 9(3) हक्क नोंदीच्या पत्रकात सर्व्हे नंबर 85/3 चे क्षेत्र 5 एकर 35 गुंठे व सर्व्हे नंबर 85/2 चे क्षेत्र 5 एकर 10 गुंठे अशी आहे. पत्रकात इतर हक्क, अदलाबदल दर्शविणारा उल्लेख नाही आहे. एकत्रीकरण पूर्वीच्या 7/12 उताऱ्यात सर्वे नंबर 85/3 चे क्षेत्र 5 एकर 12 गुंठे व सर्वे नंबर 85/2 चे क्षेत्र 5 एकर 33 गुंठे अशी आहे.एकत्रीकरण योजना पत्रक 9(3)(4) मध्ये क्षेत्र कमी जास्त झाल्याने गटाचे क्षेत्र हि चुकीचे झाले. पत्रकात कबुली जबाब किंवा इतर कोणत्याही सर्वे नंबर चे क्षेत्र समाविष्ट झाले असे नमूद नाही. सर्वे नंबर चे आकार फोड पत्रकात क्षेत्र एकत्रीकरण पूर्वीच्या 7/12 उतारा नुसार आहे.कमी जास्त झालेले क्षेत्र दोन्ही गटाच्या खातेदार यांना मान्य असून जमीन हि सर्व्हे नंबर चे क्षेत्र प्रमाणे ताब्यात आहे. गट नंबर चे क्षेत्र यात बदल कसा करता येईल.कृपया मार्गदर्शन व्हावे.
माझ्या जमिनीची मोजणी होऊन 4 वर्षे झाली तरी लगतदार कब्जा सोडत नाहीत. मोजणीची 'क' प्रत नकाशा हि मिळाला आहे. काय करावे? माहिती मिळावी हि विनंती.
नैसर्गिक आपत्ती मध्ये एक व्यक्ती पुरात वाहून मयत होतो. परंतु त्या भागात किंवा गावात पाऊस पडलाच नाही तर त्या मयत व्यक्तीच्या वारसांना आर्थिक सहाय्य्य नैसर्गिक आपत्ती मधून देता येईल का

This page was generated in 0.28 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3460
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3