जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Ashwin kamble
11-03-2025
ashwin.kamble2011@gmail.com
प्रश्न_ सर माझा प्रश्न असा आहे.की 7/12 वर पणजोबांचे नावे स कुळ म्हणुन नोंद ईतर हक्का मध्ये आहे जमिन माझ्या वडीलांच्या नावावर होती ती जमीन माझ्या वडीलांनी विकली आहे जमीन विकताणी खरेदीखतावर घरातील एकही व्यक्ती साक्षीदार नाही ती जमिन मी परत घेउ शकतो का ?
Question by कवडू दौलत गेडाम
08-03-2025
kdgedam721@gmail.com
सदाशिव यांची शेतजमीन माझे आजोबा मक्त्याने कसत होते. माझ्या आजोबा सन 1957 ला कूळ लागले पण सदाशिव अज्ञान ( अ.पा.क.) होते. आजरोजी ती शेतजमीन माझ्या आजोबांना मिळेल काय.
Question by पंकज कागणे
06-03-2025
pankajkagane@gmail.com
महसूल विभागातील सहाय्यक महसुल अधिकारी पदाची जेष्ठता विभाग स्तरावर असते त्यांच्या बदल्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात होतात बदली जिल्हाधिकारी साहेब करतात हे योग्य आहे का पुरवठा निरीक्षक यांची बदली कोण करतात व जेष्ठता कोणत्या स्तरावर असते या संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by Sourabh Kesti
06-03-2025
rocckkey.sourabh@gmail.com
मला एक GR हवा होता
दगडाने तयार झालेल्या वस्तूचे (बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू) ट्रांसपोर्टेशन करत असणाऱ्या ट्रक वर दंड आकारता येणार नाही
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
या संकेत स्थळाला भेट द्या . आपणाला आवश्यक शासन निर्णय मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jagdish Dhangar
04-03-2025
jagdishdhangar8531@gmail.com
Maza kishan kard nighat nahi aahe
Question by कवडू दौलत गेडाम
27-02-2025
kdgedam721@gmail.com
नमस्कार सर, माझ्या आजोबांना सन 1957 ला कुळ लागले होते पण इतर शे-यात अ.पा.क. असे होते ती शेत जमीन आज रोजी आम्हाला मिळेल काय.
आपल्या आजोबांच्या मालमत्तेला कृषक दिनी अथवा त्यापूर्वी कुल म्हणून एखाद्या व्यक्तीचे नाव असेल व अशी व्यक्ती अ.पा.क. . असेल तर अशी व्यक्ती कृषक दिनी हि मालक झाली आहे . कलम ३२ फ (१) (अ ) नुसार कुल अज्ञान आहे त्याला किंमत ठरवण्यासाठी मुदतीचे बंधन नाही . आपणाला अशी मालमत्ता परत मिळू शकणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आयुब रमजान शेख
26-02-2025
mohammadayubshaikh413@gmail.com
शेतजमीनीचा बांध फोडणेबाबत कुठल्या नियमावली नुसार कारवाई होते
शेतजमिनीच्या बांधाबाबत/ हद्दी बाबत , वाद असेल तर जिल्हाधिकारी / भूमापन अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याच्या प्रकरण 9 नुसार बांधाबाबत कलम १३४ अन्वये अधिकार आभिलेखानुसार हद्द निच्छित होणे आवश्यक आहे . हद्दी निच्छित होऊनही जर शेजारी धारकाने जर बांध फोडला तर , जिल्हाधिकारी महसूल संहितेच्या कलम , १३८ अन्वये कारवाई करू शकतात . तसेच आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता . कायदा- विशिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ अंतर्गत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil tathe
23-02-2025
suniltathe1020@gmail.com
नमस्कार सर
मी छत्रपती संभाजीनगर हून बोलतोय
माझ्या आजोबांच्या नावे 1984 मध्ये पाझर तलावात 19 r जमीन संपादित झाली आहे तर मला प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र मिळेल का?
Question by Ankush Nandwalkar
22-02-2025
nandwalkar10@gmail.com
सर मला दिनांक 4 किंवा 5/02/25 la मंत्रिमंडळात वन व जमीन महसूल विभागाचा भोगवटादार 2 मधून भोगवटादार 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी नजराणा रक्कम 5% असणार आहे. याचा मंजूर GR मेळावा धन्यवाद
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
या संकेत् स्थळाला भेट द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jagadevi
20-02-2025
jagadevi6758@gmail.com
अपर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या रिव्हिजन (पुर्ननिरिक्षण) निकालाच्या अमंलबजावणी आदेशाची फेरफार नोंद घेताना सदर नोंदवर हरकत साठी 15 दिवसांचा कालावधी तलाठी ठेवू शकतात का? जर प्रतिवादीनी पुढे अपिलच केली नसल्यास / अपिल कालावधी संपल्यावर आदेशाची नोंद (आदेशाने दुरुस्ती या फेरफार प्रकारे) एका दिवसात घेता येते का? नसेल तर का नाही?
तसेच, वरील नोंद घेण्यासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागते असे तलाठी म्हणत आहेत, खरच परवानगी घ्यावी लागते का? फेरफार नोंद होण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे
संबप्पा सो. बाबप्पा टेळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य , या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 (MLRC) च्या कलम 257 अंतर्गत , उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे या कलमांतर्गत घेतलेल्या निर्णयांची अंतिमता अधोरेखित होते.
कलम 257 अंतर्गत विभागीय आयुक्ताने दिलेला निर्णय राज्य सरकार जो पर्यंत स्थगित करत नाही तोपर्यंत तो अंमलात राहतो. जर कोणत्याही पक्षाला असा निर्णय आव्हान द्यायचा असेल, तर त्यांना त्वरित संबंधित प्राधिकरणाकडे स्थगिती आदेश (stay order) किंवा पुनरावलोकनासाठी (revision) अर्ज करावा लागेल. अन्यथा, तो निर्णय अंमलबजावणीस पात्र राहतो आणि लागू केला जातो.त्यासाठी १५ दिवस वाट पाहणे आवश्यक नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
16-02-2025
pankajkagane@gmail.com
बदल्यांचे अधिकार दुय्यम प्राधिकाऱ्यास सोपविण्याबाबत महसूल व वन विभाग शासन आदेश दिनांक -12/08/2024 अन्वये मा. विभागीय आयुक्त साहेब सहाय्यक महसुल अधिकारी यांची बदली त्यांच्या विभागातील कोणत्याही जिल्ह्यात करू शकतात का? व त्यांची जेष्ठता पण जात नाही किंवा कसे याबाबत मार्गदर्शन करावे.
जर सहाय्यक महसुल अधिकारी यांनी मा. विभागीय आयुक्त साहेब यांना त्यांच्याच विभागातील दुसऱ्या जिल्ह्यात बदलीसाठी अर्ज केला तर ते बदली करू शकतील का व बदली झाल्यावर जेष्ठता जाते का या बाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by Sayyad Akhtar
15-02-2025
sayyedakhtar53130@gmail.com
सर, माझा प्रश्न असा आहे की, माझी जमीन एमआयडीसी च्या सर्व्हे नंबर लगत आहे माझ्या जमिनीला येण्या जाण्या साठी रस्ता नाही तरी मला एमआयडीसी मधून रस्ता मागणी करता येईल का? माझ्या सारख्या इतर शेतकऱ्यांनाही रस्ता नाही तरी आम्हाला एमआयडीसी तून रस्ता मिळेल का? कोणाकडे मागणी करता येईल.plz मार्गदर्शन करा सर
महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र यांचे अखत्यारीतील क्षेत्रामध्ये संपूर्ण अभिन्यास / layout तयार केला जातो . त्यामध्ये रस्ते हि तयार केलेले असतात . त्याचा वापर सर्वांसाठी खुळा असतो . आपण त्याचा वापर करावा . या उप्रोक्षा रस्ता वापर करण्यासाठी कोणी हरकत / आक्षेप घेत असेल तर , MIDC यांच्या प्रादेशिक अधिकारी यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pranav Chavan
12-02-2025
pranav.chavan1984@gmail.com
सर आमच्या कुटुंबाची काही जमीन पाझर तलावासाठी संपादित झालेली आहे आज आम्ही त्या तलावात विहीर घेऊ इच्छितात तर आमचा अधिकार राहतो का
संपादित झालेली जागा ही काही आपल्या मालकीची नाही . त्यामुळे त्या तलावामध्ये आपणाला विहीर घेण्याचा अधिकार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jagadevi
11-02-2025
jagadevi6758@gmail.com
अपर विभागीय आयुक्तानी पुर्ननिरिक्षण प्रकरणात स्वत: दिलेल्या आदेशाला, पुर्नविलोकनात बदलण्यासाठी राज्य शासनाच्या परवानगीची घेण्याची आवश्यकता असते का नाही याबाबत माहिती द्यावी. जर गरज असेल तर किती दिवसात मंजुरी मिळते.
होय . अप्पर विभागीय आयुक्त यांना स्वताचा निर्णय पुनर्विलोकन करायचा असेल तर त्यास शासनाची परवानगी आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Priti Garade
10-02-2025
pritigarade786@gmail.com
जुन्या कोर्ट case मध्ये जर चार -पाच लोक एकत्रित होते आणि कोर्टानी त्यांची निर्दोष (acquitted) मुक्तता केली आहे.परंतु एकाची ऑर्डर कोर्ट मध्ये मिळाली आहे बाकी सर्वांची ऑर्डर कोर्टात (कार्यालयात) शोधले असता मिळाली नाही. मला शासकीय नोकरी उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य करीता नमुना Attestation फॉर्म भरायचे आहे तर मी ऑर्डर कॉपी ज्याच्या नावाने मिळाली आहे ती जोडू शकतो काय ?
आमची ऑर्डर कॉपी मिळाली नाही त्यासाटी काय करावा लागेल. कृपया मार्ग दर्शन करण्यात यावे.
निर्दोष मुक्तता चे आणखी काय काय पुरावे द्यावे लागेल.
कृपया कोर्ट कैसे acquitted चा शासकीय जी.आर. असेल तर एक जी.आर.कॉपी पाठवावे.
आपला खूप खूप धन्यवाद सर
जी व्यक्ती शासन सेवेत रुजू होणार आहे केवळ त्याविरुध्द कोणतीही फौजदारी केस असता कामा नये . त्याच्या नातेवैकांविरुध्ह असली तरी हि काही फरक पडत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil Garade
10-02-2025
sunilgarade786@gmail.com
आमचे वडील, काका, मोठे वडील यांची मुक्काम पोस्ट पांढराबोडी तालुका गोंदिया डिस्ट्रिक्ट गोंदिया इथे एकत्रित शेती आहे. सदर शेती जवळून शेती मध्ये येणे जाणे करीता पांदण रस्ता आहे पण सदर पांदण रस्ता वर गावाचे ABC यांनी सण २०१४ मध्ये अतिक्रमण करून पक्के घराचे विट्याचे बांधकाम केले आहे. त्यांची तक्रार आम्ही जिलाधिकारी व तहसीलदार कडे केली होती पण त्यांनी त्याच्याविरुद्ध कोणतीही कार्यवाही केली नाही. नाईलाजाने आम्हाला सण २०१५ मध्ये कोर्टात स्वतः शासकीय रस्ता ची याचिका दखल करावी लागली. जेव्हा कोर्ट मध्ये याचिका केली होती तेव्न्हा तिथे फक्त एकच पक्के घराचे बान्धकाम होते पण आत्ता त्या ठिकाणी भरपूर दुकाने व घराचे बांधकाम पांदण रस्ता वर झाले आहे व पांदण रस्ता पूर्णच बंद झालेले आहे. यांची तक्रार आम्ही तलाठी व ग्राम पंचायत कडे केली असता ते काहीही कार्यवाही करता नाही आहे उलट ते त्यांना घर टॅक्स व दुकान टॅक्स चे पावती बनवून देत आहे.
कोर्ट मध्ये ही पेशी वर पेशी देत आहे पण निकाल काही लागत नाही आहे आणि इकडे लोकांचे बांधकाम सुरु आहे. काय करावे काय नाही हे आम्हाला आत्ता कळतच नाही आहे सर .आमचे वडील, काका, मोठे वडील आता या म्हतारपणात भरपूर थकलं आहे आणि कोर्टात वकील भरपूर फी हि घेत आहे पण निकाल काही लागत नाही आहे.
कृपया आम्हाला मार्गदर्शन करा सर आपली खूप कृपा होईल सर
धन्यवाद आपल्या आशेवर असलेले एक शेतकरी मुलगा
पानंद रस्ते दूर करणे यासाठी आपण आपल्या तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Roshan Babarao Kale
07-02-2025
roshankale330@gmail.com
सरकारी गावठाणातील जागा आहे ती कब्जेहक्काने किंवा भाडेतत्त्वावर कशी घ्यायची .
गावठाणात सरकारी जागा आहे का ? बहुतेक गावठाणातील जागा ह्या ग्रामपंचायत कडे वर्ग झालेल्या आहेत . असो . जर जागा सरकारी असेल तर , जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करावा लागेल . अथवा ग्रामपंचायत यांचेकडे अर्ज करावा लागेल . ग्रामपंचायत स्वत निर्णय घेऊ शकत नाही . अंतिम जमीन देण्याचा निर्णय , जिल्हा परिषद घेते . स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा हि भाडे पट्ट्याने दिली जाते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
05-02-2025
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर मी पंकज गोरख कागणे माझा प्रश्न असा आहे कि वर्ग 3 चे पदावरून वर्ग 2 चे पदावर पदोन्नती हवी असल्यास किती वर्षाची नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल. ही नम्र विनंती.
Question by VIJAY
05-02-2025
GOMASEVIJAY@GMAIL.COM
सर, माझ्या आजोबाकडे 35 एकर शेतजमींन होती. त्याना 3 मूल आनी 2 मुली होता. 35 एकर पैकी 5 एकर ही पणजोबाकडून आलेली जमीन होती. 8 एकर आजोबांच्या बहिणी स्वता दिलेली होती आजोबाना, आनी बाकीची 22 एकर स्वता विकत घेतली होती. 1975 साली 3 मुलाना वाटणी करुन देताना ती 5 एकर जमीन ही माझ्या वडिलांच्या वाट्याला आली. आनी ४ - ४ एकर 2 काकाच्या वाट्याला गेली. 22 एकर आजोबांच्या नावी ठेवली होती. ती 5 एकर जमीन माझ्या वडीलानी मला विक्री पत्रद्वारे विकली आहे, म्हंजे मी ती खरेदी केली आहे. सर्व व्यवहार हा नगदी झालाय. माझे आजोबा, माझे वडिल आणि दोन्ही काका यांच्या मृत्यू झाला आहे. आता वडिलांच्या बहिणीने म्हंजेच माझ्या एका आत्याने त्या वाटनीस विरोध केला आहे. माझ्या नावे असलेल्या त्या 5 एकरवर दावा ठोकला आला. तिला त्या 35 एकरात्त समान वाटा हवाय. तो तिला मिलू शकतो का? दिवाणी न्यायालयात ते विक्री पत्र रद्ध करावे या साठी केस टाकली आहे. ते विक्री पत्र रड्ड होइल का?
पणजोबा यांच्या जमिनीचे वाटप झाले आहे . त्यामुळे पणजोबा यांच्याकडून आलेली जमीन हि , हिंदू सह्दायकी मिळकत/ वडिलोपार्जित , न राहता ती मिळकत आजोबांची मिळकत झाली . आजोबानानंतर ती मिळकत आपल्याकडे आली आहे . माझ्या मते आत्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
05-02-2025
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर मी पंकज गोरख कागणे रा. घर क्रमांक 22 साई नगर किनवट ता. किनवट जि. नांदेड येथील रहिवासी आहे.
माझा प्रश्न असा आहे कि शेतजमीनी मध्ये विहीर तयार करायची आहे विहीर तयार करण्याची परवानगी कोणत्या ऑफिस मधून मिळते मी कोणत्या ऑफिस मध्ये अर्ज करू कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
महारष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन ) कायदा २००९ नुसार जर एखाद्या क्षेत्र अधिसूचित केलेले असेल तरच अश्या क्षेत्रात विहीर खांद्ण्यासाठी परवानगी , तहसीलदार यांची लागते . अन्यथा नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुनील इंगळे
04-02-2025
001sunil001@gmail.com
मुंबईचा तुकडेजोड तुकडीबंदी कायदा महानगर पालिका हद्दीत लागू आहे का आणि नसेल तर ते कुठे नमूद आहे ते सांगा
Maharashtra Prevention of Fragmentation and Consolidation Act is applicable for the land situated with Municipal Corporation.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nikhil Kashid
30-01-2025
nikhil888088@gmail.com
Dear Sir,
My Question – My father purchased land in 1985 year. That time he didn’t submit agricultural certificate. So that mention in 7/12 with 84k. Before that he purchased land in 1982 year. In that 7/12 not mention as 84k. I have both 7/12 and ferfar. What is the procesdure for remove 84k in 7/12 which is purchase in 1985 year and can I show proof of 1982 7/12 and ferfar?
Please guide me on that.
Thanks
Nikhil Kashid
You may apply under section 155 of MLRC to remove clerical error of -land subject to 84-C proceedings . IN the alternative you may file appeal before Sub-Divisional Officer under Maharashtra Land Revenue Code 1966.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वाल्मिक सुरसे
29-01-2025
sursevalmik@gmail.com
सर, तुकडा नियमित करण्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी किती नजराणा भरावा लागतो.
आपणाला जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करावा लागेल . प्रचलित बाजार मूल्याच्या ५ % दराने शुल्क शासनास द्यावे लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SUHAS JUVEKAR
29-01-2025
Suhasjuvekar856@gmail.com
आमची जमीन कुळ कायदयात संपादित झाली आहे कुळाने पूर्ण किंमत भरून आमचा बोझा उतरवला आहे ३२ग चा आणि त्यांना ३२ म च certifiacate देखील मिळालं आहे. अशी नोंद फेरफार वर दिसत आहे तर भूसंपादन मुले कुळाला १२.५% प्रणाम प्लॉट मिळाले पण आम्हाला काही मिळाले नाही.
यात मालकाला कायही फायदा आहे का ?
महाराष्ट्र कुलवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या उप्बंधानुसार , कुल हा कृषक दिनी मालक झालेला आहे . जमीन संपादन वेळी , आला कोणताही हक्क जमिनीत उरलेलेल न्हवता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad Akhtar
27-01-2025
sayyedakhtar53130@gmail.com
आदरनीय सर ,
माझा प्रश्न असा आहे
1990 मध्ये एक व्यक्तीने भोगवटादर वर्ग -2 ची जमीन खरेदीखत करुन विक्री केली आहे. परंतू जो घेणार व्यक्तीने आज पर्यंत 7/12 वर नाव लावून घेतले नाही. आणि जो देणार होता तो व्यक्ती मरण पावला आहे.
आज घेणार यांच्या नावे 7/12 वर नाव येण्यासाठी नजराणा रक्कम कोणाच्या नावे भरावे लागेल व कोठे भरावे लागेल plz सर मार्गदर्शन करा.
भोगवटादार वर्ग २ जमीन खरेदी करण्यासाठी शासन परवानगी आवश्यक आहे . आपण अशी शासनाची परवानगी न घेता , जमिनीची खरेदी केलेली दिसते . आपणाला हा झालेला व्यवहार नियामानुकुल करून घ्यावा लागेल . जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3326 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
राजेश जे वझीरे | 10 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
MCS Officer | 3 |