जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by NANDADEEP PANDURANG PARAB
24-10-2023
parabnandadeep@gmail.com
Government central employees buy land Do they need the department's permission to buy agricultural land?
As far as I know, permission is not required to buy agricultural land. But you'll need to report property acquisition to the Central Government according to the mandate of Civil Service Rules.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by NANDADEEP PANDURANG PARAB
24-10-2023
parabnandadeep@gmail.com
महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याची लष्कराच्या जवानाला नियम व कायदे काय आहेत
असा जवान मुळात शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजे त्याचेकडे पूर्वीची त्याच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे अथवा तो शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Name
21-10-2023
ravip123@gmail.com
नमस्कार पाणबुडे साहेब,
तालुका देवगड, गाव पोय रे येथील आकार फोड झाल्यानंतर सातबाऱ्यावर परत जुनी नावे आलेली आहेत ( जी सरकारी नोंदणीकृत आणि स्टॅम्प ड्युटी भरून हक्कसोड पत्र केलेली नावे ). ती नावे परत सातबारा वरून वगळण्या संदर्भात चौकशी केली असता असे समजले की 155 चा फॉर्म भरून तहसीलदार साहेबांकडे द्यावा लागेल.
प्रश्न असा आहे की 155 चा फॉर्म सात बारावरील नाव असलेल्या खातेदाराने भरून द्यावा का ?? की तलाठी साहेब तहसीलदार साहेबांकडे परपर संपर्क करून 155 चा फॉर्म भरतील आणि सातबाऱ्यावरील नावे वगळतील.
खातेदाराने 155 चा फॉर्म भरावयाचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतील.
कृपया माहिती द्यावी.
आपला हक्कावर बाधा निर्माण झाली असेल तर आपण हि अर्ज करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh
14-10-2023
maheshsarode383@gmail.com
नमस्कार साहेब
आमचा कोर्टात दावा सुरू होता त्यात निकाल सामनेवाले जिंकले आम्ही तारखेला न गेल्यामुळे, ती मिळकत त्यांनी परस्पर विकली आम्ही त्यांच्या जुन्या निकालाला कोर्टात अपील केलेय, विक्री झाल्याने,आता ती मिळकत तिसऱ्या व्यक्तीच्या नावे आहे तर तर अपील केलेल्या केस मध्ये निकाल आपल्या बाजूने लागल्या नंतर विक्री झालेले खरेदी दस्त आपोआप रद्द होईल की वेगळा दावा करून रद्द करून घ्यावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे.
खरेदीदार जर , प्रामाणिक अथवा सद्भावपूर्ण खरेदीदार असेल तर , विक्री केलेली जमीन आपणास परत मिळणार नाही . आपणास , जमिंनिमधील , आपल्या हिस्स्याचे मोबदला रक्कम व्याजासह परत मिळेल . जर खरेदीदार प्रामाणिक खरेदीदार नसेल तर आपणास जमीन परत मिळेल .
प्रामाणिक खरेदीदार - ज्याने जमीन खरेदी करण्यापूर्वी , जमिनीवर कोणाचा दावा , हक्क / हितसंबंध आहे का याची नोटीस वृत्तपत्रात दिली आहे व कोणतीही हरकत आलेली नसेल तसेच मिळकतीचे मालकी -हक्क बाबत शोध प्रमाणपत्र घेतले आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Trupti
11-10-2023
truptimulmule190@gmail.com
जमीनेचे मुळ मालक वा त्यांचे कोणीही वारस हयात नाही. जमिनीचा ताबा 100 वर्षापासून दुसर्यांकडे आहे, घराची सर्व बिले ताबा असणार्यांच्या नावे आहे मात्र ज्यांचा ताबा आहे त्यांची नावे आखीव पत्रिकेवर नाही. आखीव पत्रिकेवर नाव घेण्यासाठी काय करावे.
आखीव पत्रिका म्हणजे मिळकत पत्रिका आहे . याचा अर्थ म मिळकत ज्या गावात आहे त्या गावाचे , नगराचे भूमापन झाले आहे . नगर भूमापन चौकशी वेळी , ताबा धारकाने त्याच्याकडे असलेले पुरावा सादर का केले नाहीत ? नगर भूमापन चौकशी विरुध्द , जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल संहिते अंतर्गत अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by GANESH Sanjay patil
09-10-2023
st46548@gmail.com
सर नमस्कार ... माझा एक अडचींविषयी प्रश्न पडला आहे.. मी खूप दिवसापासून प्रश्न कायदेशीर उत्तर हवं आहे जेणकरून काही अडचण येणार नाही. माझ्याकडे महाराष्ट्र domicile certificate आहे तर मला दुसऱ्या प्रातचं domicile certificate काढायचं आहे परंतू महाराष्ट्र domicile certificate राहू देऊ का? काय करू ? मला कायदएशिर मदत करावी अशी नम्र विनंती करत आहे..
Question by Sangram
30-09-2023
sangramgarud@gmail.com
कोर्ट ने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी
वडिलोपार्जित जमीन वाटप त्या विषयी सविस्तर माहिती हवी 1985 चा निकाल पण
अंमलबजावणी नाही
Question by Sangram
30-09-2023
sangramgarud@gmail.com
न्यायालयाकडील न्याय निर्णय , वेळोवेळी झालेले नोंदणीकृत दस्त ,फेरफार , ह्याच्या आधारे मालमत्ता पत्रका मधे कोणाचे किती क्षेत्र आहे हे ठरविण्याचे अधिकार नगर भु मापन अधिकारी ह्यांना आहेत का बहिणे वासर नोंद अर्ज केल्या नंतर भावा कडून इतर दस्त नगर भु मापन अधिकारी याना सादर करण्यात आले.
Question by सुभाष गणपत जाधव
30-09-2023
jadhavsubhash146@gmail.com
माझ्या आजोबाच्या नावावर 54/55 आहे पण फॉरेस्ट कडे वर्ग झाली आहै जूने फेरफार आजोबांचा नावाने आहेत, तर आमी अर्ज कुठे करू
Question by Sarang Sharma
26-09-2023
sarang.sharma@gmail.com
आमच्या वडिलांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या स्वकष्टार्जित जागेचे वाटप करून 3 मुलांना 7-12 नवे करून दिले. त्यानंतर 3 भावांनी मिळून त्या जागेचे एकत्रितपणे NA Layout केले. त्यामुळे सर्व प्लॉट ला 3 भावांनी सामायिक नाव 7-12 ला लागले. आता 3 भावांना सर्व प्लॉट चे वाटप करायचे आहे. यासाठी तहसीलदार कडे 100 रुपयांच्या स्टॅम्प वर अर्ज करून वाटप करता येईल का? यासंदर्भात कोणते GR पाहावे?
आणि जर या पद्धतीने होत नसेल तर दुसरा कोणता मार्ग अवलंबता येईल ज्यामध्ये खर्च कमीत कमी येईल?
नगर विकास विभागाने मान्यता दिलेल्या प्रादेशिक योजना व त्या खालील बांधकाम नियमावली अंतर्गत , अभिन्यासास ( lay-out) मंजुरी दिली , तर त्याचे विभाजन अथवा वाटप नियोजन प्राधिकारी ( ग्रामीण भाग - जिल्हाधिकारी ) यांचे परवानगी शिवाय करता येत नाही . बांधकाम नियमावली याच्या अनुषगाने , विभाजन अनुद्नेय होत असेल तरच जिल्हाधिकारी परवानगी देतात . अन्यथा नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Navnath g dharpale
23-09-2023
navnathdharpale85@gmail.com
नमस्कार सर सर्वे क्रमांकाचे फाळणी होऊन दोन गट नंबर तयार झाले 1965 ला त्यानंतर 1970 71 मध्ये दोन्ही गटातील अर्धी अर्धी जमीन एकमेकांना जोडण्यात आली परंतु गट नकाशे 1965 चे तसेच ठेवून त्याखाली विनास स्केलचे नकाशा काढण्यात आला गट बुक ची नक्कल काढले असता त्यामध्ये भू नकाशा पूर्वीप्रमाणे आहे व त्याच्या खाली कच्चा नकाशा हा जागेवरील वहिवाटीनुसार आहे व तो अपडेट नाही तो विनाशकेलचा काढण्यात आलेला आहे दोन्ही गटांच्या आजपर्यंत कोणतीही मोजणी झालेली नाही कृपया मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे अधिनियम अंतर्गत जी एकत्रीकरण योजना झाली आहे , त्यामध्ये कोणताही दोष नाही . मात्र केवळ मंजूर एकत्रीकरण योजनेनुसार , नकाशा तयार करण्यात आलेला नाही . तसेच क्षेत्रामध्ये कोणताही बदल नाही . एकत्रीकरण योजनेनुसार गट नकाशा नाही हि चूक आहे . सदरची चूक हि लेखन प्रमाद चूक आहे . उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३१ अ अन्वये, जिल्हा अधीक्षक भूमिलेख यांचेकडे अर्ज करा .
WRIT PETITION NO. 13506 OF 2018 , Shri Namdeo Narayan Kadam and others Vs State of Maharshtra , ( https://indiankanoon.org/doc/6973320/?type=print) या प्रकरणात मा उच्च न्यायालयाने , न्यायतत्व प्रस्थापित केले आहे , कि गट बुक नकाशातील चूक हि , लेखन प्रमाद चूक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Navnath g dharpale
23-09-2023
navnathdharpale85@gmail.com
नमस्कार सर सर्वे क्रमांकाचे फाळणी होऊन दोन गट नंबर तयार झाले 1965 ला त्यानंतर 1970 71 मध्ये दोन्ही गटातील अर्धी अर्धी जमीन एकमेकांना जोडण्यात आली परंतु गट नकाशे 1965 चे तसेच ठेवून त्याखाली विनास स्केलचे नकाशा काढण्यात आला गट बुक ची नक्कल काढले असता त्यामध्ये भू नकाशा पूर्वीप्रमाणे आहे व त्याच्या खाली कच्चा नकाशा हा जागेवरील वहिवाटीनुसार आहे व तो अपडेट नाही तो विनाशकेलचा काढण्यात आलेला आहे दोन्ही गटांच्या आजपर्यंत कोणतीही मोजणी झालेली नाही कृपया मार्गदर्शन करावे
Question by सागर
20-09-2023
sagarkandekar1990@gmail.com
गावठाण मध्ये 7 CTS प्लॉट असून सर्व गटात माझ्या आजोबांचे मोठे भाऊ यांचे मूळ मालक म्हणून ए.कु.क म्हूणन नाव लावले आहे.आज दोन्ही आजोबा मयत आहे तर आमचे वारस नोंद होऊ शकते का ?
Question by महेश
20-09-2023
maheshsarode383@gmail.com
मा. पाणबुडे साहेब
फेरफार नोंद ही हितसंबंध असलेल्या जमीन धार काला नोटीस न देता प्रमाणित केले असल्यास ती नोंद बेकायदेशीर असते ह्या विषयी उच्च न्यायालयाचा निकाल असेल तर त्याबद्दल सांगावे नम्र विनंती
महसूल संहितेच्या कलम १५०(२) अन्वये , हक्क संपादनाची वर्दी नोटीस सर्व हित्साबंधीतांना देणे बंधनकारक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by amrut shashikantrao advant
19-09-2023
amrutadvant@gmail.com
mazya sheta lagat shiv asun shivechi lambi rundi mala kuthe milu shakel. ki nahi milnar
Question by Siddeshwar langhi
19-09-2023
Siddeshwarlanghi1@gmail.com
महसूल अधिकारी जसे की,प्रांत अधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी न्यायनिर्णय करतांना निकालपत्रात प्रतिवादी हजर असून(तसा रोजनम्यत हजर असल्याची सही आहे) पण जर चुकीच्या पद्धतीने आदेशात प्रतिवादी यांना गैरहजर दाखविले असेल व प्रतिवादी यांचे म्हणने निकालात घेतले नसेल तर सबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्या स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येते?
अशा चुका ह्या शासकीय कामकाजात अनावधानाने व कामाच्या व्यापात होत असतात. जर एखाद्या आदेशामध्ये अथवा निकाल पत्रामध्ये जर संबंधित जाबदार हजर असतानाही तो गैरहजर दाखवलेला असेल व त्याने दाखल केलेले म्हणणे विचारात घेतलेले नसेल तर अशा आदेशाविरुद्ध आपण त्यांच्या लगतम वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील दाखल करा किंवा अशा आदेशाची फेर तपासणी करण्याबाबत पुनरीक्षण अर्ज दाखल करा.
कोणतीही कृती ही सदभावपूर्वक हेतूने केल्यास त्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करता येत नाही. मात्र जर अशी कृती असदभावपूर्वक हेतूने केल्याची निदर्शनास आल्यास असा अधिकारी कारवाईस पात्र होऊ शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Navnath g dharpale
17-09-2023
navnathdharpale85@gmail.com
नमस्कार सर दोन गट नंबर मधील हद्दरेषा पूर्व पश्चिम आहे परंतु भू नकाशा मध्ये दक्षिण उत्तर दाखवत आहे कृपया योग्य मार्गदर्शन करावे धन्यवाद
महसूल संहितेच्या कलम १३५ अन्वये मा जिल्हाधिकारी यांचेकडे नकाशा दुरुस्ठीसाठी अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेश सरोदे
17-09-2023
maheshsarode383@gmail.com
मा. साहेब
1) जर शेतजमिनीचा ताबा कायदेशीर नसेल तर तो बेकायदेशीर ताबा घेऊन कुळ होऊ शकतो का?
2 ) मूळ जमीन मालकाला नोटीस न देता कुळ नोंद घेणे हे कायददेशिर आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 च्या कलम चार अन्वये मानवी कुळ म्हणजे जी व्यक्ती दुसऱ्याची जमीन कायदेशीर रित्या कसते असा होय. कायदेशीर रित्या कसणे म्हणजे, संबंधित जमिनीच्या मालकाने असणाऱ्या व्यक्तीस लिखित स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात जमीन कसण्यास परवानगी दिलेली असणे. दुसऱ्याची जमीन अशी लिखित परवानगी किंवा तोंडी परवानगी न देता जर कोणी कसत असेल तर तो अनाधिकारक जमीन कसं आहे असे मानले जाते व अशी व्यक्ती ही मानवी कुळ ही होऊ शकत नाही. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार, एखाद्याच्या कृतीमुळे दुसऱ्याच्या हक्कांवर अथवा हितसंबंधांवर जर परिणाम होणार असेल तर अशा व्यक्तींना नोटीस देणे बंधनकारक आहे. उपरोक्त आपल्या कथनाप्रमाणे जर कुळाने अनाधिकृतपणे जमिनीचा ताबा घेऊन तो कसत असेल व कुळ म्हणून लागलेली नोंद आपणाला नैसर्गिक न्याय तत्त्वाप्रमाणे नोटीस न देता मंजूर करण्यात आलेली असेल, तर अशी ही नोंद सदोष असल्याच्या कारणास्तव रद बादल होण्यास पात्र आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहास आबासाहेब दुधाळे
17-09-2023
suhasdudhale123@gmail.com
उत्पन्न दाखल्यासाठी निकष काय आहेत?
Question by Azharuddin babu momin
16-09-2023
azharuddin.momin10@gmail.com
तुळशी धरणाचे आम्ही धरणग्रस्त आहे व पुनर्वसन मिळालेल्या शेत जमिनीतून प्रारूप विकास योजना कागल नगर परिषद कागल या योजने अंतर्गत १५ मीटर चे २ रस्ते आरक्षण टाकले आहे ते रद्द करणे कायदा कारण शेजारील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग करत आहेत आणि रास्त मात्र आमच्या शेत जमिनीतून टाकला आहे साहेब सरळ रस्ता न जात वळवलेला आहे काय करावे आमच्यावर अन्याय होत आहे
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1965 च्या उपबंधानुसार ज्यावेळी कागल नगर परिषदेचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला होता त्यावेळी आपण त्याला हरकत घेणे अथवा त्यावर आक्षेप नोंदवणे आवश्यक होते. प्रारूप विकास आराखडा जर आता अंतिम विकास आराखडा म्हणून शासनमान्य झाला असेल तर आता काहीही करता येणार नाही. एखादा विकास आराखडा कसा असावा अथवा त्यामधील रस्ता कसा असावा कोणत्या दिशेने असावा याबाबत संबंधित नगरपालिकेचा निर्णय हा अंतिम असतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अकलाक रशिद शेख
14-09-2023
aklakshaikh004@gmail.com
भोगवटादर वर्ग 2 च्या जमीन हस्तांतरण संबंधीत माहिती हवी आहे तसेच सक्षम " " प्राधिकर्याच्या पूर्व परवानगीशिवाय जमीन हस्तांतरण बंदी " विषयी माहिती
Question by Saurbh zalte
14-09-2023
saurbhzalte@gmail.com
2002 चा आधी पासून गायरान जमीन कसत आहे आणि ग्रामपंचायती चे ठराव पण आहे तर जमीन नावावर कशी करावी
गायरान अथवा गुरुचरण जमीन ही आपण कितीही दिवस कसत असला तरी ती आपल्या नावावर होऊ शकत नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे याबाबतीतील निर्णय व त्या अनुषंगाने महसूल संहितेमध्ये झालेली सुधारणा याचा विचार करता, आपणास अशा गुरुचरण जागेची आवश्यकता असल्यास आपणाला त्याचा मोबदला शासनास द्यावा लागतो व दुप्पट आकारमानाची शेतजमीन शासनाकडे जमा करावी लागते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश देसाई
12-09-2023
ganeshca05@gmail.com
नमस्कार,
आमची कुळकायदयनावये प्राप्त जमीन कराड सातारा येथे १९४२ पासून आहे, एकत्रित जमीन ५ एकर १५ गुंठे आहे. त्या मध्ये ५० आणे फक्त आमचे आहे. सदर जमिनीचा आकार २ रुपये आहे. सदर जमिनीचा आजून पर्यन्त आमच्या वडिलांनी ३२ग केलेला नाही. सध्या आमच्या हिसस्याचा, म्हणजेच माझ्या वडिलांचा अर्ध्या हिस्साचा आम्ही ३२ ग करू शकतो का? करू शकतो तर साधारण किती खर्च यातो? ३२ ग करण्या साथी आणि किती वेळ लागतो? अर्ध्या जमिनीची ३२ ग करून मालकी सिद्ध करू शकतो का? आणि त्यावर काही अतिक्रमण असेल तर ते काढू शकतो का? ३२ ग झाल्यावर किती दिवसात नोदणी करणे आपेक्षित असते. आणि त्यावर इतर हिस्से दारांचे हक्क सोड पत्रक आपल्या नावावर कधी पर्यन्त करू शकतो.
भूखंडाच्या एकूण क्षेत्रापेक्षा निम्म्या क्षेत्राची ३२ ग किंमत निच्छित करता येते . ३२ ग किंमत हि कलम ३२ ह प्रमाणे , आकारच्या ४०- २०० पट आहे . अन्य खातेदारांचे हक्क आपण , मिल्कातीला कब्जेदार सादरी नाव दाखल झाल्यावर करू शकता अथवा त्यापूर्वी हि करू शकता . आपण अतिक्रमण काढी शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kulkarni krushna shamrao
10-09-2023
kulkarnikrushna584@gmail.com
आमच्या शेतात पाझर तलाव आहे.१९७९ साली दुश्काळी कामासाठी हस्तांतरीत केलेल्या जमीनीचा मोबदला मिळण्यासाठी काय करावे.मार्गदर्शन करावे.
संपादन संस्थेला आपण जमीन संपादन भरपाई ( मुआवजा ) देणे बाबत नोटीस द्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vikas sanap
10-09-2023
vikassanap1993@gmail.com
Namaskar sir
Maza Question Asa ahe ki bhumi abhilekh kadhe pot hissa zala ahe hissa from no 4 and 11 tayar ahe pan 7/12 var pot hissa zalychi ferfar nond hahi tar aplyala pot hissa La chalange Karycha hai tar Kay karave? Ferfar nond kashi milel mahiti milavi?
एकत्रीकरण योजनेसाठी भूमापन होऊन पोट-हिस्सा तयार करण्यात आला आहे कि क्षेत्र विक्रीमुळे , धारकांच्या अर्जावरून आकारची / महसुलाची विभागणी करण्यासाठी व स्वतंत्र ७/१२ तयार करण्यासाठी केला आहे ? एकत्रीकरण योजनेच्या अनुषगाने , पोट-हिस्सा मोजणी झाली असेल तर त्याचा फेरफार जरी अभिलीखीत करून , भूमापन अधिकार्याने प्रमाणित केला असला तर , त्याचा अंमल एकत्रीकरण योजनेत झाला असेल तर , अश्या फेरफारास आह्वणीत करता येत नाही . त्याचे कारण असे आहे कि , पोट-हिस्सा फेरफार आह्वणीत करणे म्हणजे , एक्त्रीलारण योजनेस आह्वान देणे . अश्या वेळी एकत्रीकरण योजनेस मुदतीत आह्वान देणे आवश्यक आहे . उपरोक्त दुसर्या कारणाकरिता , विना फेरफार , त्याचा अंमल दिला असेल तर , उपविभागीय अधिकारी यांचे कडे आह्वान देणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3326 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
राजेश जे वझीरे | 10 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
MCS Officer | 3 |