जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Eknath patil
19-12-2025
eknath.pt8l.65@gmail.com

फक्त सातबारा ला आणेवारी लावली किंवा हिस्सेवारी लावली म्हणून मिळकतीचे वाटप झाले असे कायदा मानत नाही.1] माझा प्रश्न असा आहे की आणेवारी, हिस्सेवारी आणि जमिनीचे वाटप करणे यात काय फरक आहे ? 2] समजा ' अ ' या व्यक्तीकडे स्वकष्टार्जित जमीन आहे ( वर्ग 2 ). ' अ ' या व्यक्तीला दोन मुले आणि एक नातू आहे. ' अ ' ही व्यक्ती जमिनीचे मृत्युपत्र आणि वाटणी न करता वारले त्यामूळे जमिनीवर त्यांच्या दोन मुलांची नावे लागली.माझा असा प्रश्न आहे का ' अ ' या व्यक्तीच्या जमिनीवर नातूचा हक्क वडिलोपार्जित जमिन म्हणून आहे का ? आणि ' अ ' ची मुले ही ' अ ' च्या नातूची परवानगीशिवाय जमिन विकू शकतात का ? आणि ' अ ' च्या मुलांनी वाटप करायचे ठरवल्यास 'अ' यांच्या नातूला जमिन हक्क भेटल का ? [ 'अ' यांचे नातू समजा विवाहीत आणि जर अविवाहित असतील तर काय फरक पडेल का ?

Question by Kiran yadav
18-12-2025
kiranyada9asl@yahoo.com

माझ्या वडिलांचे वडिल म्हणजे माझे आजोबा यांच्या नावावर काही एकर भोगवटादार वर्ग 2 जमिन होती. ही जमिन आजोबांना सरकारकडून नवीन अविभाज्य शर्तीने मिळाली होती. आजोबा 25 ते 30 वर्षपूर्वी वारले आहेत. आजोबांना 2 मुले आहेत माझे वडील आणि काका दोन्ही ह्यात आहेत.आजोबा जेव्हा वारले तेव्हा त्यांना मुले आणि नातू होते. आजोबा वारल्यानंतर त्यांच्या मोठा मुलगा नाव 7/12 वर एकुमॅ म्हणून नोंद झाली. काही वर्षानी एकुमँ वगळून फक्त आजोबांचे दोन्ही मुलांचे 7/12 वर नाव लागले. माझा असा प्रश्न आहे की जेव्हा माझे आजोबा वारल्यानंतर त्यांची शेतजमीन माझे वडिलांचे नावावर झाल्यावर ती जमिन वडिलोपार्जित म्हणून माझा लगेच जमिनीवर हक्क तयार झाला होता काय ? साहेब मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

Question by Vikas sanap
18-12-2025
vikassanap1993@gmail.com

1 सर महसूल मंत्री यांनी रिव्हिजन मध्ये दिलेला निर्णय कोणत्या कलमानुसार रिव्ह्यू मध्ये चॅलेंज देऊ शकतो माहिती मिळावी
तलाठी, मंडल अधिकारी, लिपिक एकत्रितपणे जाणीवपूर्वक चुकीची अर्धवट कार्यवाही करत आहेत. त्यामुळे ७/१२ मध्ये 2 आदेश व 3 नवीन फेरफार नोंदी होऊन 7/12 आता 2पानी झाला आहे. तरी सुद्धा प्रकरण व प्रश्न जानेवारी 2025 मध्ये होते तसेच प्रलंबित आहे. तहसीलदार दखल घेत नाही. दप्तर दिरंगाई कायदा किंवा अन्य कायदा आहे का जेणेकरून माझे प्रकरण योग्य रित्या मार्गी लागेल व संबंधितांनावर कार्यवाही होईल.

Question by vaishnavi deepak labdhe
16-12-2025
labdhe@gmail.com

mala mazya jagechi mojani karayachi ahe
वारसा व्यतिरिक्त इतर व्यक्तींना बक्षीसपत्र करून दिल्यास शेतकरी पुरावा आवश्यक आहे का??

Question by Kavindra
16-12-2025
kavindrakdm@gmail.com

पोलीस पाटील यांचे भटकी टोळीचे रजिस्टर ची नमुना पाठवा
सर , माझा प्रश्न आहे की , आपले सरकार ( Mahaonline ) केंद्र कशाप्रकारे स्थापन करता येते व मान्यता देण्यात येईल ?

Question by Swaraj
14-12-2025
sagar06731@gmail.com

गट ४१ व ४२ ही प्रत्येकी ९६- ९६ गुंठे असून ४ खातेदारांना प्रत्येकी २४ गुंठे समान वाटप आहे.ह्या ४ खातेदारामध्ये माझी आई १ असून तिचे नावे २४ गुंठे ४१ गटात व २४ गुंठे ४२ गटात आहे तर ह्या हिस्सा चा आम्ही स्वातंत्र्य सातबारा करू शकतो का?

Question by Sagar
13-12-2025
sagar06731@gmail.com

एक गट ९४ गुंठे इतका आहे त्या पैकी आमच्या आजोबांनी १९४८ साली १/२ म्हणजे ४७ गुंठे जमीन मालक कडून रजिस्टर खरेदी केली व नंतर मार्च १९६४ साली आजोबांनी उरलेल्या ४७ गुंठे जमिनीचे जमीन मालकाकडून कब्जे चे आनोनंदिकृत साठेखत केले होते तसेच त्या काळातील एक नोंद महसूल दप्तरी नोंद अशीआहे की जमीनची (भोगवटदार वर्ग १) व्यवहारासाठी खरेदी विक्री ची परवानगी मिळणे पुर्वी जमिनीचा कब्जा घेतल्याने गट स्कीम विरूद्ध साठेखताचा बेकायदेशिर व्यवहार असा इ हक्कात दाखल ठेवला असे मे तहसीलदार यांचा कडील हुकूम आले वरून नोंद केली तसेच साठेखात नोंदविले नाही मात्र ते स्टॅम्प पेपर आहे असे नोंद आहे मात्र ही नोंद रद्द झाली आहे.
तसेच त्याच काळात जमीन मालक ह्या जून १९६४ साली मयत झाल्याने खरेदीखत होवू शकले नाही मात्र पीक पाहणी सदरी आजोबा यांचे नाव पूर्ण ९४ गुंठे वर दिसते आहे १९६४ पासून १९९४ पर्यंत .१९७० साली मुळ मालकाच्या नातू व पत्नी यांचे नाव मुख्य उताऱ्यावर आणि दोन मुलींची नावं इतर हक्कात लागली होती.१९९४ साली माझ्या वडिलांनी उर्वरित ४७ गुंठे हे मूळ जमीन मालकाच्या एकमेव नातवा कडून खरेदी केले मात्र मुळ जमीन मालकाच्या दोन मुलींची नावे इतर हक्कात राहिले तसेच आज पर्यंत सर्व जमीन वर कब्जा वडिलांचाआहे.आज मुळ मालकाच्या दोन मुली मयत असून एका मुलीच्या वारसांनी हक्कसोड करून दिले आहे मात्र दुसऱ्या एक मुलीचे वारस हक्क्सोड देत नाही आहे व खूप जास्त मोबदला मागत आहे त्याच्या ४७ गुंठ्या पैकी १/३ हिस्यासाठी.
वरील माहिती का अनुसरून
१.आजोबांनी जे १९६४ साली जे साठेखत केलं त्या आधारे वारसाची नावे कमी करू शकतो का? त्याला पुरावा म्हणून कोर्ट ग्राह्य धरेल का?
२.राहिलेल्या वारसाच्या हिस्स्याचा तुकडा पडत आहे तर आम्ही तर न्यायालय किंवा जिल्हाधिकरी यांच्या कडे खरेदी चा दावा करू शकतो का?
३.अजून काही मार्ग असेल तर सुचवावे.

Question by Shankar pawar
27-11-2025
shankarp454@yahoo.com

साहेब, 7 oct 2025 मंत्री मंडल निर्णय बैठक क्रमांक 40. तुकडे बंदी कायदा नगरपंचायत क्षेत्र मधील सर्व जमिनी साठी लागू होणार आहे असे दिसत आहे. म्हणजे याअगोदर झालेले 1 ते 13 गुंठे जिरायत शेतजमीन व्यवहार नियमित होणार आहे काय ? मार्गदर्शन करावे ही विनंती
तहसीलदार कार्यालयातील अभिलेखाची नक्कल प्रत पुरविताना आकारण्यात येणारी लिहिणावळ फी बाबतचा शासन निर्णय कोणता आहे, प्रतिपृष्ठ आकारण्यात येणारी फी बाबत शासन निर्णय कृपया मिळणेस विनंती आहे.
श्री पानबुडे साहेब, धन्यवाद, माझ्या दि २८.१०.२०२५ च्या प्रश्नाबाबत आपण मला तहसीलदार यांना लेखन प्रमाद दुरुस्ती अर्ज करायला सांगितले आहे. साहेब मी तसा अर्ज केला आणि त्यांनी मला तरीही उप विभागीय अधिकारी यांना अपील करावे असे पत्र दिले आहे. अपील करणे त्रासदायक व खर्चिक आहे. आम्ही वरिष्ठ नागरिक असून हतबल झालो आहोत.

Question by Milind
09-11-2025
milind.kshirsagar94@gmail.com

नमस्कार सर,माझा प्रश्न खालील प्रमाणे

आजोबा १९८० साली वारलेत.

ते वारले तेव्हा एक जमीन त्यांनी गहाण ठेवली होती.त्यांनी
माझ्या वडिलासह तीन मुले आहेत.

ती गहाण जमीन नंतर सोडवून घेतली पण चुलत्यांनी फक्त स्वतः च नाव लावलं.वडिलांच व अजून एका चुलत्यांच नाव ते बाहेरगावी असल्याने लावलं नाही.

आजोबांच्या बाकी सर्व जमिनीवर तिघांची नावे आहेत.पण गहाण जमीन सोडवली त्यावर फक्त एकाच नाव आहे.पैसे तिघांनी दिले होते.

ती जमीन आता त्यांनी परत मुदत गहाण ठेवली आहे.

जर माझ्या वडिलांच व अजून एका चुलत्याच नाव लावायची असेल तर काय प्रोसेस असेल??
जर आता त्यावर
नमस्कार सर दोन भूमापन क्रमांक आहे 115व 116 भुनकशा नुसार दोन्ही भूमापन क्रमांक मधील हादद रेषा दक्षिण उत्तर आहे व जागेवर पुर्व पछीम आहे आज पर्यंत दोन्ही भूमापन क्रमांक ची कोणतीही सरकारी मोजणी झालेली नाही गटबुकाची प्रमाणित नक्कल काढली आसता त्यामधे भुनकशा स्केल प्रमाणे आहे दोन्ही गटनंमबर त्या खाली दोन्ही गटनंबर चा कच्चा विनासकेल चा नकाशा आहे त्यावर भगवान व नारायण नावे लिहलेली आहे तो जागेवरील वहीवाटीशी जुळतो पण तो विनासकेल चा आहे सध्या आपडेट आसलेला भुनकशा 1965 साली झालेल्या सर्वे नंबर च्या वाटनीपञाचा आहे नंतर 1970ते 1971 एकत्रीकरण योजनेंतर्गत दोन्ही गटातील आरधी आरधी जमीन एकमेकांना जोडण्यात आली परंतु 1965 bhunksha तसाच ठेवून नकाशावर विनासकेल नकाशा काढण्यात आला योग मार्गदर्शन आपेकशा
.
मुल जमाबंदी / बंदोबस्त मोजणीच्या आधारे , हद्द/ सीमा निछिती करून , नवीन भूमापन नकाशा मिळणेबाबत आपण उप-अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SOHAM
01-11-2025
sohamzambre20@gmail.com

सातबारा वरील अज्ञान पालक फेर कमी करण्यासाठी काय करावे लागेल.
हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम , १९५६ नुसार - अज्ञान व्यक्तीची जमीन मा . न्यायालयाच्या परवानगीशिवाय विक्री करता येत नाही . १८ वर्ष पूर्ण झाल्यावर जन्म दाखला व अर्ज सादर करून अशी अज्ञान व्यक्तीची नोंद कमी होईल .व्यक्ती अज्ञान असेपर्यंत केवळ न्यायालयाच्या परवानगीने अश्या जमिनीची विल्हेवाट अज्ञान व्यक्तीच्या कल्याणासाठी लावता येते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर , माझा प्रश्न असा आहे की , उत्पन्नाचा दाखला ( Income certificate) (तहसिलदार) हे फक्त वडिलांच्याच नावाने तयार होते का ?
आपले वय १८ वर्षे पूर्ण झाले असेल व आपले काही उतपन्न असेल तर आपणालाही असा उत्पन्न दाखला मिळू शकतो . मात्र उन्नत व प्रगत गटात मोडत नाही यासाठी आपल्या वडिलांच्या उप्त्पन दाखल्याची आवश्यकता आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या जन्म प्रमाणपत्रावर ( Birth certificate) वर माझे व माझ्या आई -वडीलांचे फक्त आडनाव चुकविलेले आहे , तर मला जन्म प्रमाणपत्रातील आडनाव दुरूस्तीसाठी काय करावे लागेल ?
आपणाला राजपत्रात आपले बरोबरचे नाव प्रसिध्द करावे लागेल. व त्याआधारे आपल्या सरकारी अभिलेखात बदल करता येतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

धन्यवाद श्री पानबुडे साहेब , माझ्या दि १३-१०-२०२५ च्या खालील प्रश्नाचा खुलासा केला . माझ्या प्राशन मध्ये नमूद केल्या प्रमाणे साहेब मी सदर लेखन प्रमाद चूक कलम १५५ अन्वये रद्द करण्यासाठी अर्ज केला असता तहसिलदार यांनी मंडल अधिकारी यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन मला उप विभागीय अधिकारी यांना अपील करावे असे पत्र दिले आहे. मी वरिष्ठ नागरिक मुंबई येथे रहात असून या बाबत काय करावे. मंडल अधिकारी यांनी त्या प्रमाणे अहवाल दिला आहे. अपील करणे म्हणूजे वकील करणे, कार्यालयाच्या फेर्‍या मारणे, तहसिलदार कार्यालयाच्या चुकीची शिक्षा आम्हाला होत आहे. काय करावे?
आपण तहसीलदार यांचे कडे लेखन प्रमाद दुरुस्ती अर्ज करा . आणि त्यांचेकडून लेखी उत्तर मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Chetan Shinde
22-10-2025
chetanbshinde@gmail.com

वासोळे तालुका वाई येथील सातबारा नोंद करायची आहे तर कुठे करावी
जर वारस नोंद असेल तर आपणाला आपल्या गावच्या तलाठी यांचेकडे जावे लागेल . मात्र जमीन खरेदीची नोंद असेल तर , दस्त नोंदणी झाल्यावर सबंधित तलाठी यांचे दुय्यम निबंधक यांचेकडून online पद्धतीने जातो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत ला शासकीय योजनेसाठी महसूल विभागाची जमीन मागणी करावयाची असल्यास मोजणी फी भरावी लागेल काय?

Question by saga patil
15-10-2025
sp109391@gmail.com

माझा प्रश्न असा होता की तहसीलदार यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे मंडळ अधिकाऱ्यांनी व तलाठ्यांनी स्वतः येऊन अगोदर नोटीस काढून करून दिलेला रस्त्याची नोंद सातबारा वरती इतर हक्कात किंवा ग्रामपंचायतीकडे किती दिवसात तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे
आणि तो अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार किंवा प्रांतांच्याकडे किती दिवसात सादर करणे आवश्यक आहे
२०१७ मध्ये मंडल अधिकारी यांनी संगणकीकृत आणि हस्तलिखित ७/१२ तंतोतंत जुळण्यासाठी शासन परीपत्रक चा संदर्भ देऊन ४५ पानांचा फेरफार अन्वये गावातील ७९ गटांच्या ७/१२ मधील भिन्न प्रकारचे चुका दुरुस्ती केल्या. त्या अन्वये माझ्या ७/१२ मध्ये इनाम व वतन चा शेरा मारला जो पहिला कधीच नव्हता. मला लक्षात आले नाही. आता मी जून हस्तलिखित ७/१२ जोडून कलम १५५ किंवा तहसीलदार स्तरावर त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या चुकीची दुरुस्ती करावी व शेरा कमी करावा ही विनंती केली असता मंडल अधिकारी यांच्या अहवालानुसार तहसीलदार यांनी प्रांत कार्यालयाकडे अपील करावे असे सुचविले . आमची चूक नसताना मनस्ताप दिला. वकील करावा लागेल. काही मार्ग आहे का?
आपण अर्ज केला आहे का ? अर्ज केला असल्यास , तहसीलदार यांनी आपण अपील दाखल करावे असे लेखी उत्तर दिले आहे का ?
निर्देशित केलेली चूक हि लेखन प्रमाद चूक आहे . तहसीलदार कलम १५५ खाली ती दुरूस्त करू शकतात . त्यांनी दुरूस्त करणे त्यांचे कर्तव्य / जबाबदारी आहे . या शिवाय तहसीलदार महसूल संहितेच्या कलम २५८ खाली , पुनर्विलोकन कार्यवाही चालवून ही , आढळून / निदर्शनास आणून दिलेली चूक दुरूस्त करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अपील करण्यासाठी 20 वर्ष झाले आहे तरी अपील करता येते का व त्यासाठी वीस वर्षाचा विलंब माप होतो का
महसूल संहितेच्या कलम २५१ अन्वये, आपली दाखल करण्यास जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये जर अपील दाखल करता आले नाही व त्याबाबत अपील करणारा या कडे सबळ कारण असेल व त्याबाबतची खात्री, अपील प्राधिकार्‍याची झाली तर असे अपील विहित मुदतीनंतरही दाखल करून घेता येते .
विलंब माफीच्या मुद्द्यावरती विविध उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे विविध निर्णय आहे. या निर्णयांमध्ये मुख्यतः दोन प्रवाह दिसून येतात.
१. पहिल्या प्रकारात- प्रत्येक दिवसाचा विलंब अपील करणाऱ्या व्यक्तीने कारणांसह स्पष्ट केला पाहिजे.
२. दुसरा प्रवाह म्हणजे, प्रकरणात गुणवत्ता असे तर विलंब माफीचा मुद्दा गौण ठरतो.

विलंब माफ करणे ही थोडीशी व्यक्तीसापेक्ष बाब आहे. आपणाला ज्या अपील प्राधिकार्‍याकडे अपील दाखल करावयाचे आहे त्यांना झालेल्या विलंबाबाबत योग्य ते स्पष्टीकरण द्यावे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikas sanap
13-10-2025
vikassanap1993@gmail.com

सर नमस्कार
1. माझा प्रश्न असा आहे की 1981 ला पाझर तलाव साठी क्षेत्र भूसंपादन झाले पण भूसंपादन नकाशा बघितल असता त्यामध्ये हद्दीच्या खुणा चुकलेल्या आहेत तर त्या भूसंपादन नकाशा मधे दुरुस्ती होऊ शकते का?
2. भूसंपादन पुढच्या बाजूने झाला आणि पाझर तलावाची भिंत शेवटच्या टोकाला बांधलेली आहे त्यामुळे पाणी सगळा मालकीच्या क्षेत्रात जमा होत काय करावे लागेल
3. काही क्षेत्रात भूसंपादन झाले नाही तरी त्यात पाझर तलाव ची भिंत आणि पाणी जाण्याची सांड काढलेली आहे त्यामुळे आमच शेतीच नुकसान होत आहे तर त्यामध्ये काय करावे लागेल
4. ग्रामपंच्यांत ने पाझर तलाव क्षेत्र समजून कोणती ही मोजणी न करता माझ्या क्षेत्रातून माती आणि मुरूम उत्खनन करून माझे नुकसान केले आहे
मार्गदर्शन करावे
ही विनंती
१. भू संपादन नकाशा यात आता दुरुस्ती करता येणार नाही .
२. मात्र आपण जलसंपदा विभागाकडे अर्ज करून , होणार्या नुकसानीबाबत , मोबदला मागणी करावा .
३. जमीन संपादन न करता , आपल्या जमिनीतून पाण्याचा सांडवा काढला असेल तर , जमीन संपादन करणे बाबत जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करावा .
४. जलसंपदा विभागाने याबाबत आपणास , दाद न दिल्यास आपणास , न्यायालयात जाता येईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3380
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3