जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

देव. इनाम वर्ग 3 भोगवटादार vrg2 वही त्राटी जमीन या पुजार्यांना तय हयात कायम स्वरूपी दिलेल्या आहेत.खरेदी घेता येतात का?
अतिक्रमण वहीत करणाऱ्या नाव येणार किंवा वहीत न करणाऱ्या चे नाव येणार
ज्या जमिनीत वहीत करणाऱ्या व्यक्ती ऐवजी दुसरी व्यक्ती नाव आले याचा काही होणार का? या बद्दल माहिती हवा होता
अतिक्रमण शेत जमीनीचे पट्टे 1991-2016 पर्यंत चे पट्टे मिळणार का?

Question by Guru parbat
05-03-2026
gururajkp19@gmail.com

खरेदी दस्तापप्रमाणे क्षेत्राचा अंमल मेळ घेऊन करा सबब ही नोंद नामंजूर (रद्द)असे असा शेरा आहे याचा अर्थ काय

Question by Pratik Thorve
03-03-2026
pratikthorve007@gmail.com

वडिलोपार्जित जमिनीवर सावत्र भावाचा हक्क
कोर्टाच्या हुकुमनाम्यानुसार वाटणी करत असताना कोणकोणते कागदपत्रे लागतात तसेच त्याची कार्यवाही कश्या पद्धीतीने करतात सविस्तर माहिती हवी आहे

Question by DEVENDRA TANDEL
26-02-2026
aaryatandel82@gmail.com

सर माझा प्रश्न आहे की
जमिन मिळकतीस संरक्षित कुळ असताना जमिन मालकाने सदर जमीन त्रयस्त व्यक्तीस विकली होती. याबाबतचा जमिन खरेदीची फेरफार रद्द झाला आहे. परंतू त्रयस्त व्यक्तीने कुळाचे फेरफार रद्द होणे बाबत दिवानी न्यायालयत दावा दाखल केला आहे. तर कुळच्या वारसानी मुंबई कुळ वहिवाट व शेतजतीन अधिनियम १९४८ कलम ८४ क अन्वये अर्ज दाखल केला आहे.
तरी मुंबई कुळ वहिवाट व शेतजतीन अधिनियम १९४८ कलम ८४ क अन्वये याबाबत काय कारवाई होते याबाबत संपुर्ण माहिती मिळावी

Question by jaya munde
21-02-2026
jmunde34@gmail.com

namaskar sir, mala sat bara varil sosayticha boja ettr hkkatun kadhaych aahe ty sathi mala diret talthi bhetun karav lagel ka.
आदरणीय सर माझे नाव कैलास दगडू पिसे माझे पुणे जिल्हा, ता.हवेली,गाव शिंदवणे येथील गट क्रमांक 141 मध्ये माझे खाते क्रमांक 3415 असून माझी सामायिक खरेदी मध्ये 2 गुंठे जागा असून सदर जागेचा सामाईक फेरफार क्रमांक 8752 आहे परंतु फक्त माझ्या नावपुढील फेरफार क्रमांक बदलला आहे व नवीन फेरफार क्रमांक 10551 अस ऑनलाइन सातबारा वर दिसत आहे. सदरील गट नंबर 141 मधून पुणे रिंगरोड साठी जागा संपादित केलेली असून त्यात माझी जागा गेलेली नाही तरी माझ्या सामाईक क्षेत्रातील फक्त माझाच फेरफार क्रमांक बदललेला आहे तो असा की पूर्वी चा 8752 होता तो आता बदलून 10511 असा दिसत आहे . सदरील चूक ही दुरुस्त मिळणेस नम्र विनंती आहे.
आपला विश्वासू कैलास दगडू पिसे . मोबाईल क्रमांक- 7721982543
साहेब, सातबारा वर आणेवारी किंवा हिस्सेवारी लावली म्हणजे जमिनीचे वाटणी झाली असे कायद्याने मानले जाते काय ?

Question by sagar yedage
15-02-2026
yedagesagar@gmail.com

नमस्ते सर,
माझा प्रश्न असा आहे की.... आमची जमीन वडिलोपार्जित आहे... आमचे आजोबा मयत नंतर वारसाने माझे वडील व माझे चुलते यांची एकूण सात गटा वर्ती नावे दाखल झाली...काही दिवसांनी माझे वडील व माझे चुलते यांनी एकूण चार गटातील कमी(कमी जमीन माझे वडील यांनी घेतली)जादा (जादा जमिन चुलते यांनी घेतली)जमिनीने वाटप केले...आता राहिले तीन गट .त्या तीन गटामध्ये समान समान वाटप व्हावे असे चुलते म्हणतात.... मग आम्हाला सर्वच म्हणजे एकूण सात गटा वरती समान समान वाटप होऊन मिळेल का.....त्या साठी काय करायचे......त्या चार गटाचे वाटणी पत्र रद्द होऊन सर्वच गटावर्ती समान समान वाटप होऊन मिळेल का...
file no.23/१९/५६ बाबत स्थगिती आदेश नं.RB/CW/CVI-199 दि.06 june 1957 हा कोठे मिळेल? लेटर हेड Government Of Bombay असे आहे.
मी १९९८ मध्ये तलाठी या पदावर नियुक्त झालो परंतु मला पहिला लाभ बारा वर्षानी देय असताना दिला नाही व संगणक परिक्षा पास नाही असे कारण दाखविले जात आहे तरी २०१० मध्ये अशी अट व तरतुद होती का मला आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती
वारसा हक्काने असलेल्या जमिनीची बेकायदेशीर विक्री करून विकत घेणाऱ्याने त्या जमिनीत बदल अथवा विक्री करू नये म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कोणत्या कलमान्वये मनाई हुकुम घेता येई
मला हा प्रश्न विचारायचा होता की, फेरफार मध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास जसे की भाडेकरार केलेली तारीख चुकली असल्यास दुरुस्ती करण्यासाठी त्यासाठी काय करावे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९५५ च्या कलम १५५ खाली दुरुस्ती करू शकता . तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी शेत रस्ता मिळण्याबाबत तहसील आफीस ला अर्ज केला होता, त्या वर बाजुच्या शेतकरी यांना सुनावणी नोटीस बजावली आहे, आता त्या नंतर काय होईल या बद्दल माहीती हवी आहे
सर माझ्या गावात गावठाण जमिनीवर गावातील जसे पाटील,सदस्य (गामपचायत)व इतर सधन लोकांनी गावाच्या उपयोगाची जमिनीवर अतिक्रमण करून शेतीसाठी वापर करतात परंतु गोरगरीबांना घरकुल बांधायला देत नाही तर ही जागा भटक्या विमुक्त जाती जमातींना कशी घर बांधायला उपलब्ध होईल कृपया मार्गदर्शन करा, सधन्यवाद ।
गावठाणातील खुली जागा जर ग्राम पंचायतीस दिली असेल तर , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ५५ व ५६ खाली मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिकांना देण्याचे अधिकार आहेत . मात्र अशी खुली जागा ग्राम पंचायतीस दिली नसेल तर , त्या जागेवर शासनाची मालकी असते . आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अश्या जागेची मागणी करू शकता . या शिवाय ग्रामपंच्यातीस गावामध्ये , गावठाण विस्तार योजना राबवण्यात बाबत , जिल्हाधिकारी / प्रांताधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यास सांगा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vilas Sawant
14-01-2026
vilassawant123@gmail.com

नमस्कार साहेब,

तालुका देवगड मधे सातबारा मध्ये चुक दुरुस्त करण्या १५५ च्या आदेशाखली आवश्यक ते कागदपत्रे दिली होती pan सहा महीन पूर्ण झाल्यानंतरसुधा प्रकरण पूर्ण केले नाही.

कृपाया मार्गदर्शन करावे
आपले सरकार या संकेत स्थळावर आपली तक्रार मांडा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इनाम पत्रक मध्ये 1956 च्या फेरफार अन्वये 1.8.1955 पासून इनाम खालसा केल्याची नोंद आहे. याचा अर्थ इनाम शेरा कमी करून ७/१२ वर्ग 2 चा वर्ग 1 होऊ शकतो का?
प्रत्येक इनाम कायद्यामध्ये, देण्यात आलेले इनाम खालसा करण्यात येऊन जो अधिकृत धारक आहे त्याला शुल्क जमा करून धारण केलेली जागा परत देण्याची तरतूद आहे. सन 1955 मध्ये जर इनाम खालसा केलेले होते, तर त्याच वेळेस आपल्या पूर्वजांना/ ूर्वधिकार्‍यांना ही जमीन देणे अभिप्रेत होते. कदाचित इनाम खालसा करून आपणाला नुकसान भरपाई रक्कम दिलेली असेल . आता या गोष्टीला खूप दिवस झाल्यामुळे विलंबाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र आपण जिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास कोणतीही हरकत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Devendra Tak
08-01-2026
devendratak123@gmail.com

नियमात असलेले दस्तावेजा आधारे रीतसर मोजणी फीस भरून गुंठेवारी मोजणी झाल्यानंतर लागतधारक याने दिवाणी दावा दाखल केल्यास प्रकरण न्याय प्रविष्ट सबब कारण सांगून परंतु मा. न्यायालयाचा कोणताही मनाई हुकुम अथवा Satausquo आदेश नसेल तर क प्रत अडविण्याचा अधिकार भूमिअभिलेख यांना आहे का ? नसेल तर त्या संधार्बात असलेले शासन आदेश अथवा परिपत्रक यांची प्रत देण्यात यावी .

Question by Pankaj shinde
03-01-2026
pankajsh765sh@yahoo.com

मी सरकारी नोकरीत आहे.मी विवाहीत आहे. माझ्या नावावर कोणतीच शेतजमीन नाही. माझ्या जन्माअगोदर आजोबांनी वाटणी केल्याने माझ्या वडिलांच्या नावावर त्यांची स्वकष्टार्जित शेतजमीन आहे. माझा असा प्रश्न आहे की मला शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला भेटू शकतो का ? ( वडिलांच्या संयुक्त कुटुंबाचा सदस्य दाखवून ) जमिन फक्त वडिलांच्या नावावर आहे,संयुक्त कुटुंबाच्या नाही.
मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
कायदेशीर / तांत्रिक दृष्ट्या आपणाला शेतकरी दाखला मिळू शकणार नाही . मात्र कुटुंबातील सदस्य म्हणून शेतकरी दाखला देण्याची पद्धत आहे . आपण अर्ज करून बघा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kiran deshmukh
01-01-2026
kirande85yk@yahoo.com

नमस्कार साहेब माझा असा प्रश्न आहे की
1] जर आजोबांना ते ह्यात असताना मुलगा आणि नातू दोन्ही आहेत. आजोबांची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि त्यांनी कोणतेही मृत्युपत्र न करता वारले असतील तर हिंदू वारस कायद्यानुसार 7 12 वर मुलाचे नाव येते तेव्हाच आजोबा वारल्यानंतर वडिलांच्या बरोबर नातूचा हक्क तयार होतो काय ?
2] नातू याचा हक्क प्रस्थापित होण्यासाठी आजोबांकडे असलेली मालमत्ता ही वडिलाजिॅत किंवा वडिलोपार्जित असावी लागते ?
अलीकडे मुंबई highcourt नागपूर बेंच ने रोहित जोशी judge यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपण ते निकाल पत्र पाठवावे किंवा अवतरण सांगावे
१, प्रश्न क्र १ चे उत्तर - नाही
२. प्रश्न क्र. २ - होय

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kiran yadav
01-01-2026
kiranyada9asl@yahoo.com

नमस्ते panbude साहेब, माझा असा प्रश्न आहे की 1] महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियमातील ' संयुक्त कुटुंब ' ( अविभक्त हिंदू कुटुंब)या संज्ञेचा नेमका अर्थ काय आहे ?
2] संयुक्त कुटुंब अस्तित्वात आहे हे दाखवण्याचे कोणते कोणते कायदेशीर पुरावे आहेत ?
3] वडिलांचे संयुक्त कुटुंब आणि त्यांच्या विवाहीत मुलाचे संयुक्त कुटुंब एकच असते की वेगवेगळे असते ? आणि जर दोन्हींचे संयुक्त कुटुंब वेगळे असेल तर त्यासाठी कोणती कारणे कारणीभूत असतात ?
हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे
१. पंजोबांपासून प्राप्त झालेली मिळकत
२. स्वकष्टाधित मिळकत हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये रूपांतरित करणे
३. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावाने संपत्ती खरेदी करणे

१. पंजोबांपासून प्राप्त झालेली मिळकत- पणजोबांपासून प्राप्त झालेली संपत्ती यामध्ये मुलाचा जन्मताच हक्क असतो . मुलाचे कुटुंब - त्याची पत्नी व मुले हे hindu अविभक्त कुटुंब

२. स्वकष्टाधित मिळकत हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये रूपांतरित करणे- स्वताची स्वकष्टार्जित मिळकत HUF मध्ये रुपांतरीत करणे . यासाठी बक्षीस पत्र / विक्री दस्त करणे . कायद्यानुसार HUF स्वतंत्र व्यक्ती आहे .

३. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावाने संपत्ती खरेदी करणे - HUF नावाने मालमत्ता खरेदी करणे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गाव नकाशा वरील शेत रस्ता अतिक्रमण काढण्याबाबत जीआर

Question by Kiran Shinde
25-12-2025
kiranshi9al@yahoo.com

साहेब , माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांच्या शेतजमीन वर्ग 2 शेतजमिनीवर महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे कर्ज काढले होते. कर्ज काढल्यानंतर सातबारावरील भोगवटादाराचे नाव असा जो option असतो त्या खाली वडिलांच्या नावाला [ ] असा चौकोन करुन त्या खाली महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे नाव लिहले. व वडिलांचे नाव व कर्ज माहिती इतर हक्कात लिहले होते. भोगवटादार नावामध्ये बॅक नाव लिहणे हे कधी कायदेशीर आहे का होते का ? असे केल्याने त्या काळात वडिलांच्या आणि वारसांमध्ये मालकी हक्कात काही फरक पडला असेल का ?
आपण कर्ज काढण्यासाठी जर जमीन गहाण ठेवली असेल व जे गहाणखत केले आहे ते संशर्थ विक्रीद्वारे केलेले गहान असेल तर , आपल्या वडिलांचे नावाला कंस करणे न्यायोचित आहे . मात्र अन्य गहाणखत असेल तर , गाहाण खताची नोंद इतर हक्कात होणे अभिप्रेत आहे . कोणत्या प्रकारे गहाणखत केले आहे ते पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3398
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3