जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सोलर कंपनीला 25 वर्ष कराराने भाड्याने जमीन एका कंपनीने घेतलीआहे तशी नोंद 7/12 इतर हक्कात घेण्यात आली आहे. सदर कंपनी ने सब काॅनट्रक्टर नेमले आहेत. त्याची नावे इतर हक्कात घेण्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज सादर केला आहे. सब काॅनट्रक्टर ची नोंद घेता येईल का. मुळ कंपनीने शेतकरी सोबत केलेल्या दस्तात सब काॅनट्रक्टर नेमणे बाबत उल्लेख केला आहे.
एकच व्यक्तीची वैयक्तिक दोन खाती असतात का?
नमस्कार सर
माझ्या वडिलांनी माझ्या भावाला मृत्युपत्र करून 5 एकर जमीन दिली. त्यानंतर त्याने फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला असून मी त्यावर आक्षेप घेतला त्यानंतर तहसीलदार साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब , अपर जिल्हा अधिकारी साहेब,अपर आयुक्त यांनी सुरेश चा फेरफार नामंजूर करून त्याला मृत्यूपत्राचे प्रॉबेट दिवाणी न्यायालयात सिद्ध करावे असे नमूद केले.
त्यानंतर मी निकालाची प्रत घेऊन तलाठी कार्यालयात वारसा फेरफार घेण्यासाठी अर्ज केला असून त्यावर त्याने आक्षेप घेतला आणि मंडळ अधिकारी यांनी माझा फेरफार नामंजूर केला आणि कारण असे नमूद केले की प्रकरण दिवाणी न्यायालयात चालू आहे.
पण साहेब कोणताही स्टे ऑर्डर नसताना ही मंडळ अधिकारी यांनी माझा फेरफार नामंजूर केला आहे.
हे योग्य आहे का? कारण अगोदरच १२ वर्ष केस चालू होती.निकाल माझ्या बाजूने लागून ही फेरफार नाही झाला.
यावर काय उपाय आहे.
माझ्या आजोबांनी जमीन खरेदी केली होती तो सातबारा आमच्या कडे आहे पण त्यावरती फेरफार ची नोंद नाही व आमच्या कडे खरेदी खत पण नाहीये पण आमच्या नावे सातबारा आहे आता या नोंदीची माहिती कशी मिळवता येईल
तलाठी यांचेकडे जाऊन फेरफार नोंद वही पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी सध्या वर्धा जिल्हयात तलाठी म्हणुन काम करत आहे. मला पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने भंडारा जिल्हयात जायचे आहे. त्यासाठी मी आधी कोणाला अर्ज करावा लागेल? वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय की भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय ! तसा शासननिर्णय काय आहे?
कुळाने पूर्वी परवानगी न घेता जमीन विकली. शर्थभंग झाला.
कु.का .क्र ८४ नुसार कारवाई होऊन जमीन शासनाकडे जमा (सरकारी आकारी पड) झाली.
अशी जमीन लिलाव होऊन कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तिने पुन्हा खरेदी केली. खरेदीनंतर जमिनीचा प्रकार भोगवटादार -२ होऊन इतर हक्कांत नवीन शर्थीने व अविभाज्य शर्थीने असा शेरा ठेवला.
अशी जामीन पुन्हा भोगवटादार -१ होईल का? इतर हक्कांतील नवीन शर्थीने व अविभाज्य शर्थीने असा शेरा निघून जाईल का?

महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि लीजहोल्ड जमिनींचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर) नियम, २०१९
• शासन निर्णय क्रमांक: जमीन-२०१८/प्र.क्र.९०/ज-१
• जारी दिनांक: ८ मार्च २०१९
वरील शासन निर्णया अंतर्गत अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यन्त वाढवली आहे असे कळले होते

वरील शासन निर्णयाचा आधार घेऊन वरील जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ मध्ये रूपांतर करून मिळेल का ?
अनुसूचित जमातीना सरकारी जमीन मिळण्यासाठी अर्ज कोणाकडे करायचा व नमुना मिळण्यात यांवा

Question by Nilkanth Kute
03-06-2025
nilkanth.kute007@gmail.com

रजिस्ट्री पूर्वी नजराना न भरता व जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता खरेदी केल्यामुळे कुळ कायद्याचा भंग म्हणून MRT आणि Highcourt ने खरेदी रद्द करून जमीन शासनजमा चा निकाल दिला आहे. तरी एखाद्या तरतुदी अन्वये नजराना भरून किंवा दंड भरून खरेदी नियमित करता येऊ शकते का?

Question by p landage
02-06-2025
landagep24@gmail.com

नमस्कार साहेब,
माझ्या आजोबांनी 12 एकर शेत जमीन 1949 रोजी खरेदी केली.त्या खरेदी खतामध्ये विहिरीचा पण उल्लेख केला.
पण सातबारा च्या इतर हक्क मध्ये विहिरीचा उल्लेख नाही.
त्यानंतर ती शेत जमीन 1964 रोजी त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे माझ्या वडिलांना वाटणी करून दिली.पण वाटणी पत्रात विहिरीचा उल्लेख केला नाही.
त्यानंतर माझ्या वडिलांनी आम्हा दोन भावांमध्ये प्रत्येकी 6 एकर जमीन वाटणी करून दिली .पण त्यामध्ये पण विहिरीचा उल्लेख करण्यात आला नाही.विहिरी आमच्या दोघांच्या बांध्याच्या मधोमध आहे.
त्यानंतर मी 2005 साली 3 एकर जमीन विकली असून विकलेल्या क्षेत्रात विहीर गेली आहे.पण मी शेत विकताना खरेदी खतामध्ये त्याला विहिरीत हिस्सा दिला नाही. तर आता मला विहिरीची नोंद 7/12 सदरी इतर हक्क मध्ये लावायची आहे तर मग मी काय करावे.
500 शपथ पत्रावर भाऊ सहमती देत नाही.
भारतीय सुविधाधिकार अधिनियम १८८२ च्या कलम १३(ग) नुसार , हस्तांतरणाच्या विषय वस्तूतील सुविधाधीकार , हस्तांतार्कास त्याच्या अन्य स्थावर मालमत्तेच्या उपभोगासाठी आवश्यक असेल तर , तर अश्या सुविधाधीकारावर हस्तांतार्काचा हक्क असतो . सोप्या भाषेत , आपली विहीर ज्या जागेत आहे ती जागा जरी आपण विकली असेल तरीही आपला त्या विहिरीवर पाणी घेण्याचा हक्क अबाधित आहे . मात्र विहिरीची नोंद आपल्या जागेच्या अधिकार अभिलेखात होणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय महसूल मंत्रीयांनी शेत रस्त्यासाठी दिलेल्या आदेशाची कारवाई तालुका पातळीवर कोणत्या अधिकाऱ्यामार्फत होणार
तहसीलदार यांचे मार्फत होणार .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by d v landage
28-05-2025
dvlandage@gmail.com

1976 साली आजोबांचा मृत्यू झाल्यावर गट नंबर 750 ला वारस फेरफार नुसार 7/12 वर वडिलांचे नाव कब्जेदार सदरी आणि आत्याचे नाव इतर हक्क मध्ये लागले. त्यानंतर 1984 साली ती शेत जमीन वडिलांनी आत्याचे हक्क सोड न घेता विकली.
त्यानंतर मी तिचं विकलेली जमीन 1986 वर्षी खरेदी केली आहे.
तर अजून पण 7/12. च्या इतर हक्क मध्ये आत्याचे नाव आहे..तर आत्या ला त्या जमीन मध्ये तिचा हिस्सा द्यावा लागेल का?
कारण वडिलांनी तर ती जमीन विकली होती.मी माझ्या पैशाने खरेदी केली आहे ना.
आत्याच्या हक्कासह ( हक्क अबाधित ठेवून ) ती जमीन आपल्या पिताश्रींनी विकली होती . मुळातच आत्याचा मिळकतीत हक्क आहे . त्यामुळे आत्याला हिस्सा द्यावाच लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh Ghadage
28-05-2025
mghadage383@gmail.com

माझे राहते घर गट नंबर 539 मधे आहे जमीन खरेदी करताना माझ्या दस्ता मध्ये पूर्व पश्चिम रोड आहे त्याच गटा मध्ये माझ्या घराच्या पश्चिमेला एक शेतकऱ्याने जमीन खरेदी केली त्या मध्ये पूर्व पश्चिम 10*180 फूट रस्त्या मधून येण्या जाण्याच्या हक्क सहित नोंद केली आहे तर तो व्यक्ती आता आम्हाला त्या रोड ने येण्या ज्यापासून अडवत आहे तो बोलत आहे माझा स्वतःचा रोड आहे रोड च्या मधून अंडर ground गटार घेऊन जायचे आहे तर ते आम्हाला अडवत आहे तरी या वर काय करावे .

Question by Yogesh Doltade
25-05-2025
yogeshdoltade@gmail.com

महोदय माझ्या वडीलांचे नावे वडीलार्जित समाईक घरजागा होती. परंतु वडील व चुलते यांनी आपले आपले दिशा दाखवून वाटप केले आहे. वडील निरक्षर असल्याने केव्हाही अचानक त्या जागेची खरेदी केली जाऊ शकते. हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी उपाय?
वडिलांनि जागा विकू न देणे यासाठी प्रत्यत्न करणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महसूल विभागातील मानधनावरील कोतवाल कर्मचारी यांची कोणतीही चुक नसतांना त्यांचे वेतन 3-3 महिने खोडसाळ पणे तहसीलदार थांबवितात तर असे 3-3 महिने वेतन थांबविता येते का याबाबत स्वयंस्पष्ट माहिती देऊन जाणूनबुजून कोतवाल यांचे मानधन किती दिवस थांबविता येते किंवा कसे या बाबत काही परिपत्रक असेल तर त्या पत्राची प्रत द्यावी व खोडसाळ पणे मानधन थांबविल्यास तहसीलदार यांचे वर काय कार्यवाही होते /करण्यात येत असलेल्या किंवा होणाऱ्या प्रशासकीय कार्यवाही बाबत ची माहिती द्यावी
भोगवाटदार वर्ग -2 ची जमीन विनापरवानगी खरेदी केली आहे. शर्तभंग झाला असेल तर त्याला किती अनर्जित रक्कम भरावी लागेल आणि वर्ग एक करण्यासाठी आणखी रक्कम भरावी लागेल का?
वर्ग एक झाल्यावर लगेच विक्री करता येईल का?
जमीन शेती कारासाठीची असेल तर वार्षिक बाजार मूल्याच्या ५०% व जमीन बिगर शेती वापराखाली असेल तर ७५ % अनर्जित रक्कम भरावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by d v landage
20-05-2025
dvlandage@gmail.com

नमस्कार सर
अन्य गट नंबर मध्ये एक विहीर असून त्यामध्ये माझा 6 आणे आणि बाकीच्या दोन शेतकऱ्यांचा प्रत्येकी 5 आणे हिस्सा आहे. विहिरीमध्ये गाळ जास्त जमा झाला असून तो गाळ मला बाहेर काढायचा आहे.पण बाकीचे दोन शेतकरी मला गाळ काढू देत नाहीत ..तर मी आता काय करावे?
सलोखा योजने अंतर्गत एकाच गटातील जमिनींची अदला बदल होऊ शकते का ?

Question by Jagadevi
10-05-2025
jagadevi6758@gmail.com

अपर विभागीय आयुक्तानी पुर्ननिरिक्षण प्रकरणात स्वत: दिलेल्या आदेशाला, पुर्नविलोकनात बदलण्यासाठी किंवा कायम ठेवण्यासाठी या दोन्ही करिता राज्य शासनाच्या परवानगीची घेण्याची आवश्यकता असते का नाही याबाबत माहिती द्यावी. सदर मंजुरी सर्व सुनावणी झाल्यावर घ्यावी लागते का आधीच घ्यावी लागते. याबाबत माहिती द्यावी.
महसूल संहितेच्या कलम २५८ अन्वये , जिल्हाधिकारी / जमाबंदी आयुक्त यांचेसह त्यांच्यापेक्षा दुय्यम महसूल / भूमापन अधिकार यांना स्वताचे किंवा त्यांच्या पुर्वाधीकार्याचे आदेश , लेखनप्रमाद चुकीच्याशिवाय अन्य कारणांसाठी ( नवीन पुरावा समोर येणे /सकृत दर्शनी दिसणारी चूक /किंवा इतर सबल कारण ) पुनर्विलोकन करता येऊ शकतात व त्यासाठी त्यांना त्यांच्या लगतच्या ज्येष्ठ अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे . आयुक्त यांना अश्या परवानगीची आवश्यकता नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

चुलत पंजोबाला जमीन मिळाली आहे एकत्र कुठुंब पध्दत असताना तरी त्यावर ए.कु.मे.लावलेले नाही तरी ती जमीन त्याच्या भावाला मिळू शकते का?मिळत असल्यास g.r. अथवा परिपत्रक पाठवा.
आपणाला न्यायालयात सिद्ध करावे लागेल कि , एकत्र कुटुंबाची / हिंदू सहदायकी जमीन याचे वाटप न होता , केवळ चुलत पणजोबा यांना वाटपाने केली आहे . अश्या मिळकतीत त्यांच्या भावाचा म्हणजे आपल्या पणजोबांचा व पर्यायाने त्यांच्या वारसांचा हा हक्क आहे . त्यासाठी आपणाला दिवाणी दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की एका गटात दोन शेतकरी ची जमीन आहे एका शेतकरी ची जमीन हायवे लगत असल्याने त्याच्या जमिनीचे शासकीय बाजारमूल्य 900 रुपये चौ.मी. आहे. पण दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन हायवे लगत नसताना देखील त्याला तेच बाजारभाव लागत आहे.तरी खरेदी खत करुन घ्यायचे आहे valuation कमी करता येईल का?
जमिंनीचे बाजारमूल्य तक्ते दरवर्षी , मा नोंदणी महानिरीक्षक यांचेकडून प्रसिध्द केले जातात . त्याच्याच आधारे मुद्रांक जिल्हाधिकारी / दुय्यम निबंधक यांचेकडून दस्तऐवज नमूद मिळकतीचे / जमिनीचे मुल्यांकन केले जाते. त्याच्याशिवाय अन्य बाजारभाव विचारात घेता येत नाहीत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या वडिलांनी 1994 मध्ये गावाला जमीन घेतली जमिनीच्या पश्चिमेला नदी आहे व पूर्वेला कोड आहे सदर जमीन ही दोन एकर 27 गुंठे सातबारावर आहे ही जमीन घेऊन आम्हाला तर तीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आमचा शेताचा सर्वे नंबर चार आहे तर पूर्वेला वड्याच्या पलीकडे असणाऱ्या शेतकऱ्याचा पाच आहे त्याने शेत मोजणी केली असता त्याच्या मोजणी मध्ये आमच्या शेतामध्ये मोजणी अधिकाऱ्यांनी काही गुंठे जमीन दाखवली आहे. गट नंबर पाचच्या शेतकऱ्याने देखील 1990 मध्ये ती जमीन दुसऱ्या व्यक्तीकडून विकत घेतली होती आणि 1995 मध्ये त्याच्यानंतर दुसऱ्याची जमीन गट चार विकत घेतली ज्यावेळेस वडिलांनी जमीन विकत घेतली त्यावेळेस त्यांनी कोणतीही हरकत किंवा दावा आमच्या जमिनीमध्ये केला नव्हता मात्र जमीन मोजणी नंतर केला आहे या विरोधात आम्ही कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये गेलो आहे मात्र सदरचा शेतकरी आपल्या समाज बांधवांना घेऊन बळाचा वापर करून ताबा सोडण्यास सांगतो कृपया मार्गदर्शन करावे
आपणाला दिवाणी दावा दाखल करून संबंधित व्यक्तीने आपल्या वहिवाटीला अडथळा करू नये म्हणून,मनाई हुकूम, प्राप्त करून घ्यावा लागेल . मात्र भू-मापनामध्ये त्या व्यक्तीची जमीन आपल्या ताब्यात असल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे दावा दाखल करून कितपत उपयोग होईल हे सांगता येऊ शकत नाही . न्यायालय ही भू-मापन विभागाने केलेल्या मोजणीचा आधार घेते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, जर दोन गावातील शिव मध्ये नाला असेल, सदरील नाला हा जमिनी अंतर्गत केला असेल तर त्या जागेवर रस्ता बनवू शकता का आणि जर रस्ता करायचा असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागते कृपया मार्गदर्शन करावे.
एका माजी सैनिकास 1960 मध्ये 12 एकर वर्ग दोन ची जमीन मिळाली ती जमीन त्याने 1990 मध्ये A व्यक्ती ला 4 एकर,B व्यक्ती ला 4 एकर,C व्यक्ती ला 4 एकर दुय्यम निबंधक कार्यालयातून प्रत्येकाला वेगवेगळे 4-4 एकर चे खरेदीखत करुन दिले. आज 7/12 वर त्यांचे नाव लावायचे असल्यास काय करावे लागेल. माजी सैनिक मयत झाले आहेत व A व्यक्ती ही मयत झाले आहेत. कृपया मागदर्शन करावे.
मुळात जी विक्री करण्यात आलेली आहे त्यास जिल्हाधिकारी यांची विक्रीपरवानगी घेण्यात आली आहे का ? आपणाला हो जो व्यवहार झालेला आहे तो आता नियामानुकुल करून घेणे आहे . प्रथम आपण जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्या . आपणास परवानगी, मिळाल्यानंतर जरी विक्रेते व अ मयत असले तरी , अ च्या वारसांची व ब , क यांचे नाव दाखल होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझी रत्नागिरी मध्ये माझ्या वडिलांच्या नावाने जागा आहे आहे पण सदर जागेच्या सातबारा मध्ये माज्या काका आणि आत्या च्या नावा व्यतिरिक्त देखील इतर कुटुंबाची नावे आहे. तर मी माज्या बाबांच्या नावावरील जागा वेगळी कशी करून घेऊ शकतो व स्वतंत्र सातबारा होऊ शकतो का या बद्दल मार्गदर्शन
होय आपण करून घेयू शकता . मात्र ७/१२ स्वतंत्र करताना , तुकडे बंदी कायद्याचा भंग होता कामा नये . मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबात व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ नुसार प्रमाणभूत क्षेत्र निच्छित करण्यात आले आहे. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र वाटपामुळे निर्माण होता कामा नये . एकूण क्षेत्राचे आपल्या कुटुंबातील काका , आत्या व वडील म्हमजेच आपल्या आजोबांचे जे लगत वारस असतील त्यांच्यामध्ये वाटप केल्यामुळे जे क्षेत्र निर्माण होईल ते प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असता कामा नये

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shraddha deshmukh
20-04-2025
shd74325@gmail.com

सर, मला ग्रामपंचायत हद्दीत एका गट नंबर मध्ये 3 गुंठे शेतजमीन खरेदी करायची आहे.तो गट नंबर एकूण 40 गुंठे आहे. ज्या व्यक्तीकडून मी 3 गुंठे जागा खरेदी करणार आहे त्यांची एकूण 11 गुंठे जागा आहे. आनि बाकीची जागा ही इतर व्यक्तींची आहे. 40 गुंठे शेतजमिनीत जाण्यायेण्याचा 8 फुट
रस्ता आहे. ज्या व्यक्तीकडून मी 3 गुंठे जागा खरेदी करणार आहे ते मला 8 फुट रस्ता जाणेयेणे हक्क्सहीत खरेदी खत करवून देणार आहेत. माझा असा प्रश्न आहे की ही 3 गुंठे शेतजमीन मला खरेदी करता येईल का ? आनि खरेदी करून बिनशेती करता येईल का ?
आपल्या प्रश्नावरून आपली जी प्रस्तावित जागा आपणाला खरेदी करावयाची आहे आणि गावठाणात आहे की ग्रामपंचायत हद्दीमध्ये भूमापन क्रमांकाची आहे याचा बोध होत नाही. जर खरेदी करावयाची प्रस्तावित जागा ही गावठाण हद्दीत असेल तर त्याला मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबात व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ या तरतुदींचा कोणतीही बाधा येणार नाही. मात्र जर खरेदी करावयाची जागा ही भूमापन क्रमांकाचा भाग असेल तर निश्चितच त्या क्षेत्राचा जमीन वापर विभाग म्हणजे झोन कोणता आहे ते तपासणे आवश्यक आहे. जर त्याचा झोन बिगर शेती असेल तर , त्यास उपरोक्त अधिनियमाचा कोणताही परिणाम होणार नाही . मात्त्र वरील पैकी दोनीही बाबी मध्ये ख्सेत्र नसेल तर , मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबात व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ तरतुदीनुसार , खरेदी करावयाचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असल्याने , आशया जमिनीचे खरेदीखत नोंदले जाऊ शकणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3332
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3