जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

1. हयात पत्र असलेली शेत जमिन खरेदी करता येते का?
2. अशा प्रकारची जमिन कशा प्रकारे 7/12 सदरी नोंद करता येईल.
नमस्कार सर,
https://marathi.indiatimes.com/agriculture/how-to-buy-farm-land-without-name-on-satbara/articleshow/110523657.cms यातील लेखाच्या सत्यतेबाबत मार्गदर्शन मिळावे
महारष्ट्र कुलवहिवाट आणि शेत जमीन अधिनियम १९४८ व त्याखालील नियम यातील उप्बंधानुसार , महाराष्ट्रात शेत-जमीन खरेदी करण्यासाठी , खरेदीदार शेतकरी असणे आवश्यक आहे . खरेदीदार यांचे नावे भारतात कोठेही शेत जमीन असेल तरीही चालू शकते . बिगर - शेती जमिनीसाठी जमीन नावावर असण्याची अट आवश्यक नाही . हिंदू मिताक्षरा सह-दायकि मालमत्ते मध्ये , आपणास हिंदु वारसा कायदा या प्रमाणे जन्मताच हक्क प्राप्त झाला असेल तर , आपण तसे शेतकरी असल्याबद्दल प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडून घेयून , शेतजमीन खरेदी करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सरंजाम जमीन ज्यांचे नावे कुळ म्हणून होती त्यांचा मृत्यू पश्चात वारस नोंद करता येते का?
येत असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे?
फक्त सातारा येथील सरंजाम इनाम अस्तित्वात आहे . याशिवाय अजून कोठे सरंजाम आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

फक्त सातारा येथील सरंजाम इनाम अस्तित्वात आहे . याशिवाय अजून कोठे सरंजाम आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका कंपनीला 129.24 हे.आर जमीन 35 वर्षाकरीता लिजवर कोळसा उत्खन्न प्रकल्पाकरीता प्राप्त झालेली आहे. त्यापैकी 70 हे.आर कोळसा उत्खन्न व उर्वरीत क्षेत्र त्यासंबंधीत उपक्रमाकरीता प्राप्त झालेली आहे. तर उर्वरीत क्षेत्राचा वापर रोड, कर्मचारी यांचे घर ,कार्यालय व इतर बाबी करीता वापर करावयाचा असल्यास त्या क्षेत्राकरीता एन.ए. /अकृषक परवानगी घेणे आवश्यक आहे काय?
सन २०१६ मध्ये , महसूल संहितेच्या प्रकरण III मध्ये सुधारणा करण्यात आली आहे . त्यानुसार आता बिन-शेती परवानगीची आवश्यकता उरलेली नाही . तथापि आपणास कर्मचारी यांची घरे व इतर बाबांसाठी , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम अंतर्गत बांधकाम ( विकास परवानगी ) घ्यावी लागेल . विकास परवानगी मिळाली म्हणजे आपणास बिन-शेती परवानगी मिळाली असा आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vishal
28-05-2024
vapunde@hotmail.com

शेती करण्यासाठी स्वतःच्या जमिनीचे सपाटीकरण केले व त्यामध्ये ३ फूट पेक्षा जास्ती खोदकाम झाले तर त्यासाठी महसूल विभागाची परवानगी लागते का ? लागत असेल तर मला रेफेरेंस GR मिळू शकेल का ?

Question by Akshay Kadam
27-05-2024
kadamakshay6834@gmail.com

आम्ही शेतात राहतो पण गाव नमुना 7 वस्तीपड ची नोंद नाही.
१. वस्तीपडची नोंद करता येते का ?
२. वस्ती पडची नोंद कधी करायची असते ?
३. वस्तीपडची नोंद कधी कधी करता येऊ शकते ?
४. सहसा किती जमीन वस्तीपड म्हणून नोंदवता येते ?
गाव नमुना १२ मध्ये केवळ पिकाची नोंद घेणे अपेक्षित आहे . या पूर्वी अश्या घरांच्या नोंदी घेतलेल्या आहेत . जर कुळाने/ भूमिहीन कामगाराने / कारागाराने स्वताच्या पैस्यातून घर बांधले असेल तरच अश्या घराच्या नोंदी कुल कायद्या अंतर्गत घेतल्या जातात . मात्र या प्रवर्गातील जर व्यक्ती नसेल तर , वस्ती पड अशी नोंद घेता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकत्रीकरण स्कीम व जबाब चुकीचा असल्यास तो रद्द होऊ शकतो का
त्याचा अर्ज कोठे करावा
आता इतक्या दिवसांनी एकतरी कारण योजनेमध्ये , गट बाधनी संदर्भात दिलेला जबाब आता रद्द करता येणार नाही . आपणास हा जबाब , लबाडी , कपात अथवा दबाव आणून घेतला होता हे न्यायालयात सिद्ध करावे लागेल . अप्प्नास त्यासाठी न्यायालयात , असा जबाब रद्द करणेबाबत विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम अंतर्गत दावा दाखल करावा लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by parag yengantiwar
22-05-2024
yparag123@gmail.com

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब दिनांक २२ सप्टेंबर, २०१४ नुसार वडार समाजाला 200 ब्रास च्या आंत दगड काढता येतो का

Question by Sachin
20-05-2024
venkateshaerprise22222@gmail.com

Amache panjobache jamin, tyamadhe tyana 3 mule hote, te varalya nantr tya 3 mulane jamin vatun ghetali, jamin vatun ghetana tya 3 bhavani jamin hi gatavr vatal keli, jami sagali ek sarkhi navati, kharab bhari ashi hoti, tyamule tevha ti vatap karat asatana tyani tya jaminiche gat tayar kele , kharab jaminicha, madham jaminacha ani changali jaminach, tr gat kartana, kharab jaminich gat kela tya gatat tyani jast jamil dili ani changalya jaminichya gatat kami jamin dili, ase vatap zale pan kagat partri nondi kartana, hyacha ulekh kela nahi ani sagal shetr saman saman lavale ahe, ajun tyat jamin vatal patr tayar kartana disha nusar vegale ahe ani real madhe jamin vatal vegali keleli ahe, aaj 25 years peksha jast diwas zale he asech sagal hot ani te konala mahit pan navat, tr ata tya 3 bhavache mule partekala ahet, tyatil eka bhavachya mulani kuthun tri te vatani che pepar kadale ahet 1979 che ahet te ase mantayt pan te khare ahet ka khote he pan konala mahit nahit, pan ata te bakichya bhavachya maulana mantayt ki sagal shetr saman vatun gheych, ani jas tya vatap patrat ahe tashech gheyche, 25 years peksha jast diwas zale je te aap apale parampara gat milalel shetr jamin kart ahe v development keli ahe tya madhe tr ata kase sodanar kon hya 2 mudya vishay mahiti milavi.
Muda no. 1. Gatavr vatani zaleli, halaki bhari tyanisar jamin kami jast vaparat ahe pan kagadpatri kas ky nahi tr ata
Muda no 2. Vatani zaleli shetr vegale ahe real madhe ani tich kagadpatri disha vegalya ahet
आपल्या या जमिनीचे वाटप होऊन , तिघांचे नावावर क्षेत्र दाखल होऊन , ७/१२ स्वतंत्र झाले आहेत का ? जर ७/१२ स्वतंत्र झाले असतील तर , आपणास , जमिनीच्या उत्पादकतेच्या आधारे , जमिनीचे सरस-निरस वाटप करून मिळावे म्हणून न्यायालयात दावा दाखल करावा लागेल . जर एकत्रित तिघांची नावे दाखल असतील तर , आपण जमिनीचे सरस निरस वाटप करून मिळावे म्हणून दिवाणी संहितेच्या कलम ५४ अन्वये दावा दाखल करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, मागील प्रश्नांना अपना कडून मार्गदर्शन मिळाले मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.
Sir, माझा प्रश्न असा आहे माझ्या शेता लागत आमच्या शेजारच्या शेता मधे 1972 साली तीन गुंठे क्षेत्रामध्ये बक्षीस पत्र करून ग्रामपंचायतने पाणी पिने साठी विहिर काढली आता त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता. शेतीसाठी अमाचे शेजारी करतात. विहिरीचा आमच्या लगतची बाजू पूर्ण ढासळत असून आमच्या शेतीचे नुकसान होत आहे. शेजारी विहिरीचे बधकामा करून घेण्यास सांगितले असता . ते टाळा टाळा करत आहे. Sir कृपया
विहीर हि ग्रामपंच्यातीच्या मालकीची आहे . आता त्याचा कोण वापर करत आहे हा गौण प्रश्न आहे . त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ग्रामपंच्यातीची आहे . विहीर बांधकाम करणे तुमच्या शेजार्याचे कर्तव्य नाही . त्यामुळे त्याचा निष्काळजीपणा आहे असे म्हणता येणार नाही . Res Ipsa Loquitur हे तत्व वापरता येणार नाही . त्यामुळे न्यायालयात दावा दाखल करून हि , आपल्या शेजार्याचा निष्काळजीपणा सिद्ध करता येणार नाही . जास्त शेतीचे नुकसान होत असेल तर , आपणच विहीर दुरुस्त करून घ्यावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सखाराम रावजी मुऱ्हेकर आणि सतीश पांडुरंग असोलकर यांनी सामाईक मध्ये 1.21 हे.आर क्षेत्र खरेदी केली सबब खरेदी खताच्या दोन वर्षाने त्यांनी कलम 85/2 अंतर्गत मा.महसूल नायब तहसिलदर साहेब यांचे कडे वाटणी करिता अर्ज केला सबब वाटणी अर्ज नायब तहसीलदरांनी मंजूर करून आदेश पारित केला तलाठी यांनी फेरफार घेतला त्यावर मंडळ अधिकारी यांनी दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या कुटुंबातील आहे वाटणी प्रमाणे मोजणी केली नाही असा शेरा मारून फेरफार ना मंजूर केला आता पुढे काय करावे
नायब तहसीलदार यांनी कलम ८५ खाली वाटप केल्यानंतर , मंडळ अधिकारी यांना नोंद रद्द करता येणार नाही . आपण मंडळ अधिकारी यांचे कृती विरुद्ध , जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करा . तसेच आपण आपले सरकार या माध्यमावर आपली तक्रार दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कोर्टाच्या निर्णयानुसार जुन्या सातबारावर 2 हे.22.आर जमिनीचा आदेश आहे परंतु सध्या सातबारावर 2 हे.21 आर.जमिन आहे म्हणजे एक गुंठा कमी आहे.तर ती एक गुंठा जमिन घेण्यासाठी काय करावे.कृपया मार्गदर्शन करावे
कोर्टाच्या आदेशापेक्षा , जुने अभिलेख याची पडताळणी करून आपल्या भूखंडाचे क्षेत्र किती आहे याची खात्री करून घ्या. जर एक गुंठ क्षेत्र जास्तीचे असेल तर , क्षेत्र दुरुस्तीसाठी मा . जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

7/12 वर वारस म्हणून नाव असून त्या वारसांना न विचारता शेती ठेक्याणे दिल्यास कोणती ॲक्शन घेता येते
ज्यांना ठेक्याने दिली आहे त्यांचेविरुद्ध फौजदारी / दिवाणी कार्यवाही /कारवाई आपण सुरु करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Prathamesh Budhale
04-05-2024
budhalep56@gmail.com

I want a government resolution from 1902, GR No. 8030/17.11.1092, about disforestation of forest land
शंभर रुपयांच्या स्टॅम्प वरती वाटप पत्र होते का ? व त्याकरिता मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे आहे का ?

तसेच वाटप पत्र करण्याकरता दुसरा कुठला मार्ग आहे का?
रु १००/- वर वाटप पत्र होत नाही . मुद्रांक अधिनियम अंतर्गत अनुसुची मधील अनुच्छेद ४६ नुसार मुद्रांक शुल्क आवश्यक आहे . अन्यथा शेती स्वरुपाची मिळकत असेल तर , तहसीलदार यांचेकडून महसूल संहिता १९६६ च्या ८५ अन्वये वाटप लारून घ्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 149 नुसार खातेवाटप करू शकतो का???

हो असेल तर कोणाकडे अर्ज करावा लागेल?
कलम १४९ अंतर्गत हक्क संपादनाच्या नोंदी अधिकार अबिलेखात करण्याबाबतचे उपबंध आहेत . खातेफोड केवळ कलम ८५ खाली , सह-ध्राकांमध्ये होउ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी जमीन गहान त्याला पैसे परत नाही केले आणि जमींन त्याच्या नावानी zali तर् मी त्याना दिलेले पैसे परत करीन तर् मला जमीन परत् मीडेल काय?
आपले गहन कोणत्या स्वरूपाचे आहे त्यवर अवलंबून आहे . जर संपती गहाण ठेवून , ताबा दिला असेल व तसी करारामध्ये शर्थ नमूद केली असेल कि कर्ज रक्कम व व्याज परतफेड केल्यावर , पुन्हा संपती गहानकारकडे हस्तांतरित करावी लागेल तरच , आपणास आपली मालमत्ता परत मिळेल . मात्र हि सर्व प्रक्रिया ऋणमोचनाच्या अगोदर होणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
ग्रामपंचायत गावठाण मधील मिळकतीस मूळ मालकाची १०० रुपये स्टॅम्प पेपर वर अंगठा घेउन मिळकत हस्तांतरित केली आहे. अशा प्रकारे मिळकत हस्तांतरित करता येते का त्याबाबत सदरची नोंद बेकायदेशीर आहे रद्द करावी म्हणून ग्रामपंचायत व पंचायत समिती मध्ये अर्ज देऊन हि कार्यवाही करत नाहीत. याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
अश्या प्रकारे रु १००/- च्या मुद्रांकावर्ती मालमत्ता हस्रांतरित होत नाही . आपण गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा . तेथेही काही झाले नाही तर न्यायालयात जावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1) G.R.P.& S.D. No.1586/34-D, Dated 17.5.1951
2) G.R.GAD No. Mis. 31/76-Desk-xoodl, Dated 25.8.1977
3) जा.बि.सा.पू.वि.क. डीएमसी. 1087/9698/608-32. Dated 2.1.1989
वरीप्रमाणे शासन निर्णयाची प्रत मिळावी

Ref 4: Govemment Resolution No. Mis.2010/PRA.KRA.300/Videshi-2 Mantralaya, Mumbai-32, Dated 5/10/2010

Question by ravi katariya
01-05-2024
adsumdirector@gmail.com

i want land rates for valuation of kagal hatkanangale kolhapur.
नमस्कार सर
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची चार ठिकणी घर जागा आहे.
माझ्या आजोबांना दोन मुले होती सर्वात मोठे माझे वडील होते.
माझ्या आजोबा मयत झाल्‍यावर नियमाप्रमाने माझ्‍या वडिलांचे नाव सर्व घर जागे वर ग्रामपंचायत ला लागली.
पण कालांतराने माझ्या वडिलांचे त्याच्या लहान भावांशी भांडणे होऊ लागली त्यामुळे माझे वडिल दुसरीकडे रहावयास गेले.
पण सन 1984 ला सिटी सर्व्हे झाला त्यावेळेस माझ्या काकांणी माझ्या वडिलांच्या जागी मीच ऐकटा आहे असे सांगितले ऐ कु मे आहे असे सांगितले आणि सिटी सर्व्हे ला त्यांचे नाव लावले.
1) माझ्या वडिलांचे नाव सिटी सर्व्हे ला लावण्यासाठी काय करावे लागेल
2) ग्रामपंचायत आता नगर पंचायत झाली आहे आणि त्या जागेवर अजुनही माझ्या वडिलांचे नाव आहे 8A ला. आणि मी सर्व घरपट्टी पण भरली आहे
3) माझ्याकडे जून्या नोंदीपण आहे ग्रामपंचायत जागेचे माझ्या वडिलांच्या नावे
4) सिटी सर्व्हे ला नाव लावण्यासाठी काय करावे लागेल माझ्याकडे कोर्टाचा वारस दाखला पण आहे
5) त्या सर्व जागा धरण पुनर्वसनात जाणार आहे.
6) ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या सर्व ठिकाणी माझ्या वडिलांचे नाव आहे.
सर्व मालमत्ता ( चार घरे व अन्य काही असेल तर ) आपल्या आजोबांचे होते . त्यामुळे त्यवर आपले वडील व आपले चुलते यांचा सम समान अधिकार आहे . आपापसात एकत्र बसून वाटप करून घेणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kedar
29-04-2024
army101guy@gmail.com

प्लॉट वाटप केलेल्या वाढीव गावठाणाचा(वर्ग 2) सिटी सर्वे झालेला नाही.नकाशा उपलब्ध होत नाही.गट हा ग्रामपंचायत क्षेत्रात आहे .घरठान उतारा ही उपलब्ध आहे.तसेच 7/12 ला पण नाव आहे . काही लोक म्हणतात वैयक्तिक प्लॉटची मोजणी होत नाही तर संपूर्ण गटाची मोजणी करावी लागेल.
# जर माजी सैनिकाला या वाटप केलेल्या गटातील वैयक्तिक प्लॉटची सिटी सर्वे मोजणी करायची आहे तर काय करावे लागेल?
# पोलीस प्रोटेक्शन कसे मिळवावे आणि यावरील अतिक्रमण काढण्यासाठी काय करावे लागेल?
या आधी प्रांत साहेबानी वर्ग 2 मध्ये 7/12 नाव लावले असून आदेशामध्ये तहसीलदारांना जागेचा कब्जा देण्याबाबत लिहिलेले आहे पण अजून अंमलबजावणी झालेली नाही. सिटी सर्वे मोजणी व कब्जा यासाठी काय करावे लागेल ?
मुंबई सरकारी ठराव L.N.D. 4746/63771 ता 21/09/1955 काय आहे?

Question by kAILAS mORE
28-04-2024
kailasbright@gmail.com

माझी जमीन दोन शेतकऱ्यांच्या मध्ये आहे उजव्या बाजूला माझा गट नंबर आहे आणि डाव्या बाजूला पण माझा गट नंबर आहे ती दोन्ही जमीनी माझ्या नावे आहेत पण माझ्या शेताच्या मध्ये दुसऱ्याची जमीन आहे आणि ती सरकार इनाम जमीन आहे आता मूळ शेतकरी त्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या नातेवाईकांनी त्याची जमीन सातबारा उतारा मध्ये फेरफार करून विकण्याच्या तयारीत आहे तरी एक बाजूचा शेतकरी म्हणून मला काय करता येईल ????एक कायद्याची तरतूद अशी आहे काय की ती जमीन फक्त मलाच विकावी लागेल
शेजार च्या शेतकर्यास जमीन विकावी असा कोणताही कायदा नाही . केवळ हिंदू वारसा कायदा या मध्ये , वंश-परंपरागत पद्धतीने आलेली जमीन , हि अन्य वारसाला प्राथम्याने विक्री करण्याचे बंधन आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४२ ब अंतर्गत वाणिज्य व रहिवास वापरासाठी सनद मिळणे कामी अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज दाखल करताना कागदपत्रांमध्ये सक्षम प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आलेली बांधकाम परवानगी मागीतली. बांधकाम परवानगी नाही. परंतु सदर सक्षम नियोजित प्राधिकरण यांच्याकडून म्हणजे नगरपरिषदेकडून महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीचे बांधकाम आहे असे पत्र तसेच विकास नियंत्रण नियमावली नुसार झोन दाखला मध्ये वाणिज्य व रहिवास वापरास सनद मिळण्यास सक्षम प्राधिकरणाची हरकत नाही असे पत्र दिले आहे. या प्रकरणामध्ये बांधकाम हे नगरपरिषद कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीचे आहे त्याचा पुरावा नगरपरिषदेकडून १९५२ चे घराचे असेसमेंट उतारा दिला आहे तर बांधकाम परवानगी आवश्यक आहे का ? या बाबत मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती‌.
आपल्या जमिनीचा शेत-सारा वसूल करण्यात येत आहे . आता वेगळ्याने ४२ प्रमाणपत्र /सनद घेण्याची आवश्यकता नाही . स्थानिक प्राधिकरणाने , आपले बांधकाम अनधिकृत आहे म्हणून आपणास नोटीस दिली आहे का ? दिली असेल व जुने बांधकाम आपणास चालू ठेवायचे असेल तरच , ते नियमानुकुल करावे लागेल . अन्यथा या सर्व गोष्टी अनावश्यक वाटतात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.32 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3326
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3