जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Vishal prabhakar kalinkar
21-12-2024
vihankalinkar097@gmail.com
महसुल विभागातील महसूल सेवक (कोतवाल )यांचे तलाठी साझा सोडुन तहसील कार्यालय येथे देखरेख करिता रात्र पाळी करिता 12 तास सेवा संलग्न करण्यात येतात , सदर रात्र पाळीचे संलग्न केलेल्या सेवा नियमबाह्य आहे किंवा कसे याबाबत माहिती देण्यात यावी, तसेच रात्र पाळी करिता सेवा संलग्न करणे बाबत चा शासन परिपत्रक/शासन निर्णय असल्यास त्याची प्रत देण्यात यावी
महसूल सेवक यांची नियुक्ती जर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली करण्यात आली असेल तर , त्यात काही गैर नाही . मात्र केवळ watchman म्हणून नियुक्ती केली असेल तर ते चुकीचे व बेकायदेशीर आहे . तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याखालील नियुक्ती असली तरी हि ते आदेश काढण्याचा अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे CEO म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी यांना आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Manoj Patil
20-12-2024
nathuspatil@gmail.com
मा. प्रधान सचिव, महसूल व वनविभाग (भूसंपादन), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचा ई-मेल पाहिजे.
Question by Aruna Halkare
16-12-2024
arunahalkare52@gmail.com
विभागीय आयुक्तांकडे म. ज. म. अ. १९६६ कलम २५७ चा पुर्ननिरिक्षण अर्ज 18/11/24 ला मंजूर झाला. सदर आदेशानुसार नवीन घेतलेला फेर रद्द करण्याचे आदेश दिले व आधीचा फेर कायम ठेवला. तलाठ्यानी वरील आदेशाची अमंलबजावणी किती दिवसात करायला हवी. याबाबत सविस्तर माहिती द्यावी. त्याला नवीन फेर रद्द करता येतो का नाही याबाबत माहिती द्यावी. आता सातबारा वर आमचे नाव नाही तर वरील आदेशामुळे आम्ही समोरील पक्षास शेती करण्यास रोखुन शकतो का व आम्ही शेती करु शकतो का
मा विभागीय आयुक्त महोदयांनी , फेरफार रद्द केलेला आहे त्यामुळे त्या अगोदरच फेरफार पुनर्जीवित झाला . जर मा विभागीय आयुक्त यांनी , त्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीस , महसूल संहितेच्या कलम २५६(१) अन्वये अथवा मा मंत्री ( महसूल ) यांनी महसूल संहितेच्या कलम २५६(३) अन्वये पुनरीक्षण कार्यवाहीमध्ये मा विभागीय आयुक्त यांच्या स्थगिती दिली असेल त्याखेरीज , आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
मा विभागीय आयुक्त महोदयांनी , फेरफार रद्द केलेला आहे त्यामुळे त्या अगोदरच फेरफार पुनर्जीवित झाला . जर मा विभागीय आयुक्त यांनी , त्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीस , महसूल संहितेच्या कलम २५६(१) अन्वये अथवा मा मंत्री ( महसूल ) यांनी महसूल संहितेच्या कलम २५६(३) अन्वये पुनरीक्षण कार्यवाहीमध्ये मा विभागीय आयुक्त यांच्या स्थगिती दिली असेल त्याखेरीज , आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kedar
16-12-2024
army101guy@gmail.com
अतिक्रमणदाराने खोटी कागदपत्रे सादर करून महावितरण कडून विद्युत कनेक्शन घेतले आहे.
अतिक्रमण केलेल्या मूळ मालकाच्या जागेवरील विद्युत कनेक्शन कसे काढावे किंवा रद्द करावे?मालकाचा 7/12 आहे ,,नियम काय आहेत? कृपया कळकळीची विनंती..
हा उर्जा विभागाशी निगडीत प्रश्न आहे .
तथापि मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो .
जागा जरी आपल्या / अन्य व्यक्तीची मालकीची असली तरीही , त्यावरील संरचना / घर त्या व्यक्तीच्या मालकीचे आहे .
या शिवाय मालकीहक्क बघून विद्युत जोडणी दिली जात नाही . सरसकट सर्वांना दिली जात असावी .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol Pacharne
16-12-2024
pacharne7292@gmail.com
नमस्कार सर प्रश्न-माझे वडील 1996 साली वारले त्यानंतर मी वारसा हक्काने दोन बहिणी व तीन भाऊ अशी वारस नोंद केली व त्यानंतर लगेचच दोन्ही बहींनीचे हक्क सोड पत्र करून
घेतले आता आमच्या पाच मुलांची आई 2024 ला वारली आता दोघी बहीणी आईचा हीस्सा मागतायेत सर ज्या जमीनीचे पुर्वी हक्क सोड झालेले आहे त्याच जमीनीवर वारस नोंद लावता येते का
दोन बहिणींनी कोणाच्या लाभात हक्क सोडून दिले आहेत ?
आईच्या लाभात सोडून दिले असले , तर आईचे मृत्युपश्छात आपल्या बहिणी या , hindu उत्वतराधिकारी अधिनियम १९५६ नुसार वर्ग -१ च्या वारस आहेत . त्यांना हक्क आहे . बहिणींची मागणी आवाजवी नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishnu Pawar
13-12-2024
pawarvishnu@rediffmail.com
सर पूर्वी आपण वेळोवेळी मला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. माझ्या शेताच्या बांधावरून ट्रॅक्टर जाईल असा रस्ता आम्ही आमच्या शेतजमीन हिस्श्यातील जागेतून बनवला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्याने रस्त्यासाठी त्याच्या शेतजमीन हिस्श्यातील जागा दिली नाही व रस्ता रुंद करायला हि जागा देत नाही. मात्र तो रस्ता वापरत आहे, उपभोग घेत आहे. तर रस्त्याच्या अतिरिक्त रुंद जागेसाठी तहसीलदार याना विनंती अर्ज करून दुतर्फा असलेल्या शेतकऱ्याकडून कायदेशीरपणे जागा मोजून ती रस्त्यासाठी संपादन करता येईल का ?
दुतर्फा शेतकरी यांची जागा बांधावरील रस्त्यासाठी संपादन करता येणार नाही . मात्र तहसीलदार यांचेकडे कलम १४३ खाली अर्ज करून , रस्ताच्या रुंदिबाबत ते निर्णय घेयू शकतात . म्हणजे लगतच्या शेतकर्याची प्रत्येकी किती जमीन रस्त्यासाठी वापरावी .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
13-12-2024
pankajkagane@gmail.com
अतिक्रमण काढत असताना चुकून एखाद्या सभ्य माणसाचे घर पाडले गेले तर शासन स्वतःहून नुकसान भरपाई देते की आपल्यालाच नुकसान भरपाई द्या म्हणून शासनास अर्ज करावा लागेल यासंदर्भात मार्गदर्शन करावे.
Question by Vilas misal
12-12-2024
vilasmisal1992@gmail.com
सदर माझा पुणे येथे एका जमिनीवर ताबा आहे तिथे माझे जुन्याकाळी वाडवडील राहत होते पण तिथे कुणाचेही नाव आढळत नाही मी ती जागा ताबा घेऊन वीट बांधकाम केले आहे पण ईतर उर्वरित अर्धा गुंठा जागेत सुद्धा ताबा घेत असता काही लोक विनाकारण आमची ही ईथेच जागा आहे असे सांगुच अडथळा करत आहे त्यांच्याकडेही काहिच कागदपत्र नाही ...काय करता येईल
विलासराव , आपला कोणत्या अधिकारात हक्क आहे ? आपले नाव तरी ७/१२ अथवा मालमत्ता पत्रकाला आहे का ?
नसेल तर आपणही त्या जागेवर अतिक्रमण केले आहे अशे होईल . आपण म्हणता ती जागा आपल्या वाड-वडिलांची आहे . जर ती जागा विना - सर्वेक्षण झालेल्या गावठाणातील ग्राम -पंचायत हद्दीतील असेल तर ग्राम- अभिलेखामध्ये नाव आहे का ? त्याचा तपास करा . आपले/ आपल्या पुर्वाधीकार्यांचे नाव असेल , तर आपण त्या आधारे , इतरांना प्रतिबंध करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Aruna Halkare
10-12-2024
arunahalkare52@gmail.com
विभागीय आयुक्तांकडे म. ज. म. अ. १९६६ कलम २५७ चा पुर्ननिरिक्षण अर्ज 18/11/24 ला मंजूर झाला. सदर आदेशानुसार नवीन घेतलेला फेर रद्द करण्याचे आदेश दिले व आधीचा फेर कायम ठेवला. तलाठ्यानी वरील आदेशाची अमंलबजावणी किती दिवसात करायला हवी. याबाबत सविस्तर माहिती द्यावी. त्याला नवीन फेर रद्द करता येतो का नाही याबाबत माहिती द्यावी.
Question by पंकज कागणे
10-12-2024
pankajkagane@gmail.com
सर एखादी चूक शासनाकडून झालेली आहे तर शासनाकडून जेव्हाच्या तेव्हाच सदरची चूक दुरुस्त करणे आवश्यक आहे की काही कालावधी ठरवून दिलेला आहे मग त्यांनतर सदरची चूक दुरुस्त करता येते असे काही आहे का स्पष्ट दिसून येणारी चूक(सर्वांना दिसणारी) जर दुरुस्त करत नसतील तर नुकसान झालेल्या पिडीत व्यक्तीने काय करावे?
Question by Vishal kalinkar
09-12-2024
vihankalinkar097@gmail.com
नमस्कार सर,महसुल विभागातील महसूल सेवक यांचे तलाठी साझा सोडुन तहसील कार्यालय येथे देखरेख करिता रात्र पाळी करिता 12 तास सेवा संलग्न करण्यात येतात , सदर रात्र पाळीचे संलग्न केलेल्या सेवा नियमबाह्य आहे किंवा कसे याबाबत माहिती देण्यात यावी, तसेच रात्र पाळी करिता सेवा संलग्न करणे बाबत चा शासन परिपत्रक/शासन निर्णय असल्यास त्याची प्रत देण्यात यावी ही विनंती
Question by पंकज कागणे
09-12-2024
pankajkagane@gmail.com
सर एखादे प्रकरण निकाली निघत नसेल खूप उशीर होत असेल मर्यादा ओलांडली असेल तर काय करावे न्याय कोठे मागावा याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम , २०१५ च्या कलम ३ नुसार , सार्वजनिक प्राधिकरणाकडून देण्यात येणारी सेवा अधिसूचित करण्यात आली असेल , तर कलम २ ( ढ) नुसार नियत कालमर्यादेत अशी सेवा मिळण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे .
जर नियत कालमर्यादेत अशी सेवा मिळाली नसेल तर त्याविरुद्ध प्रथम अपील अधिकारी याचेकडे अपील करता येईल .
आपल्याला कोणत्या विभागाकडून सेवा नियत कालमर्यादेत मिळाली नाही ? त्या विभागाच्या अपील प्रधीकार्याकडे अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal kalinkar
09-12-2024
vihankalinkar097@gmail.com
नमस्कार सर,महसुल विभागातील महसूल सेवक यांचे तलाठी साझा सोडुन तहसील कार्यालय येथे देखरेख करिता रात्र पाळी करिता 12 तास सेवा संलग्न करण्यात येतात , सदर रात्र पाळीचे संलग्न केलेल्या सेवा नियमबाह्य आहे किंवा कसे याबाबत माहिती देण्यात यावी, तसेच रात्र पाळी करिता सेवा संलग्न करणे बाबत चा शासन परिपत्रक/शासन निर्णय असल्यास त्याची प्रत देण्यात यावी ही विनंती
Question by anil barhate
08-12-2024
barhateanil21@gmail.com
महोदय, आजोबा 1.4.57 चे तसेच 1948 पासून ते 1970 17 एकर चे संरक्षित कुळ होते 1969 मध्ये 3 एकर चे पैसे भरून कबजेदर सदर नाव लागले व इतर हक्क मध्ये नवी शर्थ व कू. का. क.43 फेर घेतला असा उल्लेख आहे पण त्या फेर नेच इतर हक्क मधून नाव कमी झालेले दिसते त्या बाबत फेर मध्ये काहीही उलेख नाही तसेच 3 एकर 32 म झाले पण उर्वरीत बाकी होते तसेच नाव कमी व्हावा ह्या बाबत काहीही फेर नाही. प्रश्न 1 कु.का.क 43 व नवीन शर्थ हे पूर्ण 7/12 साठी लागू आहे की फक्त माझ्या 3 एकर साठी भोगवटा 2 जमीन आहे तसेच मूळ मालकांनी कौटुंबिक वाटप केले 1980 मध्ये ते वाटप फेर मध्ये ऊलेख आहे की मुंबई कुळ वहिवाट कायदा तरतुदी स बंधनकारक ठेऊन वाटप मूळ मालकाने 1990 मध्ये जमीन त्रयस्थ माणसाला कुळ व प्राधिकरण ह्यांची परवानगी न घेता जमीन विकली प्रश्न 2 मूळ मालकाला सुध्दा जरी कुळ ने काही जमीन खरेदी केली किंवा कुळ हक्क स्वाधीन केला तरी कुळ वहिवाट कायदा तरतुदी लागू असतात का प्रश्न 3 मूळ जमीन मालक प्राधिकरण परवानगी न घेता त्रयस्थ माणसाला विक्री करू शकतो का तसेच ती वैध आहे का प्रश्न 4 कुळ म्हणुन 32 म ने 3 एकर आहे तसेच अधिक 2 एकर ह्या गट मधील वहिवाट आहे पण त्याचे 32 म नाही केलेलं ती जमीन मूळ मालक व त्रयस्थ व्यक्ती कडे आहे मूळ मालकाने विक्री केली काय करता येईल ह्या मध्ये
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ३२ अन्वये , कृषक दिनी ( ०१.०४.१९५७ रोजी ) कुल हा मानीव खरेदीदार झालेला आहे . ३२ ग ची कार्यवाही हि केवळ तांत्रिक बाब - विक्री किंमत निच्छित करण्यापुरती मर्यादित आहे . त्यामुळे मुल मालकाला अश्या जमिनीची विक्री करता येणार नाही . त्रयस्थ व्यक्तीस झालेली विक्री सुरवातीपासून प्रभावहीन व निरर्थक आहे . असा फेरफार सबंधित मंडळ अधिकारी यांनी मंजूर करणे चुकीचे .
कदाचित आपले / पुर्वाधीकार्यांचे नाव, पोकळस्थ फेरफाराने कमी झालेली असेल त्याचा फायदा , कदाचित मुल-मालकाने घेतलेला दिसतोय . जरी फेरफार द्वारे जरी नाव कमी झालेले असले तरीही , असा फेरफार व त्रयस्थ व्यक्तीच्या विक्रीचा व्यवहार रद्द करण्यासाठी मा उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad Akhtar
07-12-2024
sayyedakhtar53130@gmail.com
सर, एका व्यक्ती ने 1990 साली खरेदी खत आधारे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन खरेदी केली आहे.आज 7/12 वर नाव लागत नाही. त्याला ते जमीन विक्री करायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ही विनंती सर
वर्ग-२ ची जमीन हस्तांतरण करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे . झालेले अनधिकृत हस्तांतरण नियमानुकुल करून घ्या . मगच आपले नाव , अधिकार अभिलेख हक्क पत्रकाला लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad Akhtar
07-12-2024
sayyedakhtar53130@gmail.com
सर, एका व्यक्ती ने 1990 साली खरेदी खत आधारे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन खरेदी केली आहे.आज 7/12 वर नाव लागत नाही.
भोगवटादार वर्ग -२ जमीन खरेदी करण्यासाठी , शासनाची परवानगी आवश्यक आहे . मात्र आता झालेली खरेदी आपण नियानुकुल करू शकता . किंवा मुल मालकाला वर्ग-२ च्या जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सांगा . वर्ग -१ मध्ये रूपांतरण झाल्यावर , जो दस्त पूर्वी झाला आहे , त्याचे confirmation-deed निष्पादित करा . आपले नाव ७/१२ ला लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal prabhakar kalinkar
05-12-2024
vihankalinkar097@gmail.com
महसुल विभागातील महसूल सेवक (कोतवाल )यांचे तलाठी साझा सोडुन तहसील कार्यालय येथे देखरेख करिता रात्र पाळी करिता 12 तास सेवा संलग्न करण्यात येतात , सदर रात्र पाळीचे संलग्न केलेल्या सेवा नियमबाह्य आहे किंवा कसे याबाबत माहिती देण्यात यावी, तसेच रात्र पाळी करिता सेवा संलग्न करणे बाबत चा शासन परिपत्रक/शासन निर्णय असल्यास त्याची प्रत देण्यात यावी
Question by शंकर
03-12-2024
ashuamol1986@gmail.com
सर नमस्कार
मृतूपत्र संबधी केस चालू आहे बनावट मृतूपत्र आधारे ७.12 ला नाव लाऊन प्रतिवादी यांनी सामाईक हिस्यातील वाटप पत्र न झालेल्या जमिनीची मन मानेल अश्या चतुर सीमा टाकून त्रयस्थ व्यक्तीला जमिनी विक्री केली आहे ,खरेदीदार कब्जा घेण्यासाठी येत आहेत , जमीन विकली त्यामध्ये आमचे घर व गोठा आहे तर खरेदी दस्त रद्द करता येईल का? ,मूळ केस अजून चालूच आहे ,कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
आपणाला खरेदीखत व मृत्युपत्र हे दोन्ही रद्द करून घ्यावे लागेल . त्यासाठी विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ अंतर्गत , दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल . दावा दाखल करताना ,खरेदी-दारांनी जमिनीचा ताबा घेण्यास , दाव्याचा निकाल लागेल पर्यंत मनाई करण्यात यावी असा अंतरिम आदेश हि घेणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pramod bankar
02-12-2024
bankarpd@gmail.com
Shetjaminicha bandh Samayik Asto Kivha shetjaminichya bandhababt malki lagatchy donhi shetkari yanchi aste ka
मालकीहक्काबाबत , म. ज अ १९६६ च्या कलम १३८ नुसार दोन शेतामधील / भू-खंडामधील , सीमा रेषा याच्या आतील जमीन त्या त्या शेतकऱ्याच्या मालकीची असते . परस्पर संमतीने , वंश -परंपरागत पद्धतीमुळे शेताच्या बांधावरून जाण्याची / त्याचा वापर करण्याची पद्धत असते .
कायदेशीर रित्या शेताचा बांध हा एकत्रित मालकीचा नसतो . सीमा चिन्हामुळे ( baundary- mark) मुले , दोन्ही शेतकर्याची मालकी निच्छित केली जाते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश नारायणजी बडवाईक
30-11-2024
ganeshbadwaik40@gmail.com
मि १२वर्षाच्या आधी जमीन 0.32 आर जमीन खरेदी केली . या जमिनीचा गट १२५ हे.०.५८ / पैकी 0.32 आर जमीन खरेदी केली त्यात सात/बारा १२५/१ व सात/बारा १२५/ २ आहे. परंतु सहधारक पोट हिश्याची करण्या करिता समती पत्रावर सही करुण देत नाही. अशा प्रसंगी मला पोट मोजनी करता येत नाही. याबाबत मला मार्गदर्शन करावे.
आपल्या प्रश्नावरून भू क्र १२५ चे क्षेत्र ०.५८ ( हे - आर ) असल्याचे दिसून येते . भू क्र १२५ पैकी आपण ३२ आर क्षेत्र खरेदी केले त्यामुळे भू क्र १२५ चे १२५/१ क्षेत्र - ०.३२ ( हे-आर) व उर्वरित १२५/२ चे क्षेत्र ०.२६ ( हे आर ) दर्शवण्यात आल्याचे दिसून येते . त्यामुळे स्वतंत्र ७/१२ असल्यामुळे , या पेक्षा कोणता पोट-हिस्सा करावयाचा आहे . मी कथन केल्यापेक्षा आपला प्रश्न वेगळा आहे का ? तसे असल्यास या उत्तराचा संदर्भ देऊन पुन्हा प्रश्न मांडा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain Sahil Shaikh
23-11-2024
kaunainshaikh2780@gmail.com
आदिवासी शेत जमीनची विक्री जनरल व्यक्तीस करता येते का?
अशी परवानगी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत देण्यात येते की मंत्रालयामार्फत देण्यात येते ?
याविषयी माहिती देण्यात यावी ही विनंती.
आदिवासी जमातीतील व्यक्तीच्या मालकीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस शासनाच्या संमतीने व जिल्हाधिकारी यांच्या पूर्व-परवानगीने , म.ज.म.अ १९६६ च्या कलम ३६ अ अन्वये हस्तांतरित करता येऊ शकते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन गव्हाने
18-11-2024
ravindra171282@gmail.com
माननीय सर आपण केलेल्या मार्गदर्शना साठी धन्यवाद
प्रश्न असा आहे की, माझे वडील आणि मी कामा निमित्त शहरा मध्ये रहायला होतो त्या दरम्यान आमच्या गावातील घरा जवल आमचा जूना गोठा होता (गावठान जमीन), त्याची गावातील ग्रामपंचायत ऑफिस मधे नोंद वर्ष 2002 साली लावली होती पन कालांतरने वर्ष 2015 साली किंवा त्यानंतर भूमि अभिलेख विभागाने गावाचा सिटि सर्वे केला त्या दरम्यान आम्ही तेथे उपस्थित नव्हतों त्यामुले चौकशी दरम्यान आमच्या काका ने त्या जमीनी च्या सिटि सर्वे/मिलकत पत्रिके मधे त्यांच नाव वहीवाटदार म्हणून लावल आहे , वर्तमान स्थिति मध्ये काका वारले आहेत आणि मिलकत पत्रिकेवर त्यांच वहिवाटदार म्हणून नाव लागल आहे।
सध्या आमच जून मातीच घर पड़ायाला आले आहे त्यामुले आम्ही आमच्या गोठ्याच्या ठिकाणी गावठान मध्ये घर बांधयला घेत आहोत परंतु सदर मिलकत पत्रिके मधे वारलेले काका वाहिवाटदार आहेत ।
तर अश्या परिस्थिति मधे मिलकत पत्रिके मधे सुधार होवु शकतो का किंवा कुठल्या प्रकारे आम्ही त्या मिलकत पत्रिके मधे आमचे नाव लावू शकतो ।
आपल्या काकांचे नाव धारक म्हणून दाखल असेल . आपण या मिळकत पत्रिकेवरील नोंदिविरुद्ध , म.ज.म.अ. १९६६ च्या कलम २४७ अन्वये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अपील दाखल करू शकता . मात्र गोठा हा केवळ आपल्या वडिलांचे मालकीचा होता याचा पुरावा म्हणजे , ग्रामपंचायत करआकारणी पत्रक किंवा अश्याच प्रकारचा दस्तऐवज असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन संभाजी लांडे
17-11-2024
sachinlande12@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या आजीच्या नावावर एक जमीन आहे, परंतू 7/12 वर आजीच्या नावापुढे आजोबांचे दुसरे नाव(टोपण नाव) लागले आहे..(सखूबाई रामभाऊ ऐवजी सखूबाई सुंद्राजी )..तरी ते दुरुस्ती साठी काय करावे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरुस्तीसाठी , तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन शिवाजी बिरादार
15-11-2024
sachinb6995@gmail.com
सन 1989 साली माझ्या वडीलाने माझ्या natewaikala 1 एकर जमीन विकली होती त्यासाठी खरेदी खत करत असताना चुलत्याने 1 एकर ऐवजी 7 एकर जमीन नावावर करून घेतली आहे, वडील अशिक्षित असल्याने त्यांना ही बाब 4 वर्षाने लक्षात आली. tyanchyashi वडील या विषयवार चर्चा केली असता दोघात वाद सुरू झाला. वडिलांची एक चूक झाली ते न्यायालयात गेले नाहीत. आज रोजी सदर विषय न्यायालयात अपील करता येतो का, व तो झालेला फसवणुकीचा व्यवहार रद्द करता येतो का.
ज्या विक्री द्स्तामुळे , १ एकर ऐवजी ७ एकर अशी चूक झाली आहे , तो विक्री दस्त रद्द करून मिळण्यासाठी , विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ च्या कलम 31 खाली मा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येऊ शकेल . परंतु मुदतीचा कायदा यानुसार विक्री दस्ताची माहिती झाल्यापासून त्याला केवळ ३ वर्षात आह्वणीत करता येऊ शकते . आपणाला विक्रीद्स्त आह्वणीत करण्यास झालेला विलंब मा दिवाणी न्यायालयाने प्रथम माफ करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Manish yashwant shendre
14-11-2024
manishshendre59@gmail.com
माझ्या आईच्या आजीची शेती होती.ती कुळ कसण्यासाठी दिली होती. तथापि आईची आजी तसेच आईची आई वारले आहेत.जमीन मालक विधवा आहे.तसेच कुळयांचे निधन झाले आहे.त्याच्या मृत्यु पत्रानुसार त्याच्या वारसांचे नाव तलाठी यांनी लावलेले आहे. सदरचे शेतीवर माझ्या आजीचे वारस म्हणुन माझ्या आईचे नाव लावत येईल का तसेच इतर अधिकारात कुळाचे नाव लागलेले आहे. कुळाचे नाव कमी करता येईल का?
मी गृहीत धरतो की आपण , कोकण महसूल विभाग, पुणे महसूल विभाग किंवा नाशिक महसूल विभाग अंतर्गत आपले वास्तव्य आहे. हा भाग पूर्वी मुंबई राज्याचा भाग होता. व या भागाला महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम लागू आहे. मूळ जमीन मालकांचे वारस म्हणून आपले नाव विषयांकित जमिनीला , कुळाचे नावे विक्री किंमत निच्छित होत नाही व कुल विक्री किंमत शासन जमा करत नाही तोपर्यंत धारक म्हणून आपले नाव जमिनीच्या अधिकार हक्क पत्रकी लागू शकते.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम यामधील उपबंधांचा विचार करता, कृषकदिनी म्हणजे ०१.०४.१९५७ पूर्वी पासून कुळ जमीन कसत असेल तर उपरोक्त अधिनियमाच्या कलम 32 नुसार कुळ मानव खरेदीदार झालेले आहे. केवळ या अधिनियमाच्या कलम 32 ग नुसार विक्रीची किंमत निश्चित न केल्याच्या कारणास्तव कुळाचे अथवा त्याच्या वारसांची नावे विषयांकित मिळकतीला दाखल नाहीत. सद्यस्थितीतील कुळाच्या वारसांनी महाराष्ट्र शेतजमीन व कुळ वहिवाट अधिनियमाच्या कलम 32 नुसार, विषयांकित मिळकतीची खरेदी किंमत निश्चित करण्यासाठी शेतजमीन न्यायाधीकरनाकडे अर्ज केल्यास कुलाचे नावे खरेदी किंमत निच्छित होऊन व अशी खरेदी किंमत कुलांनी शासनाकडे जमा केल्यास , त्यांची ( कुलाची ) नावे दाखल होतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
