जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Kiran H
20-04-2024
kiranhulawale@gmail.com
मी एक जमीन विकत घेतली आहे, पण मोजणी मध्ये ती जमीन मूळ मालकाच्या वहिवाटीच्या बाजूला निघते आहे, मोजणी मध्ये जिथे जमीन निघती आहे तेथे २४ वर्षा पासून एक कंपनीने रस्ता बनवलेला आहे, ती कंपनी वाले मोजणी मान्य करत नाहीये तर मी काय करावे .
आपण आपल्या जागेवरील अतिक्रमण कंपनीने काढावे या साठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Yedage
20-04-2024
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर,
भुमी अभिलेख मधील रेकॉर्ड जसे की सन 1800 कालीन सर्वे नंबर नकाशे सद्या तालुका भुमी अभिलेख कार्यालय मधे जीर्ण होऊन फाटले आहे.....तर त्याची copy संचालक भुमी अभिलेख पुणे (महाराष्ट्र राज्य) येथे मिळू शकेल का.....
Question by भानुदास प्रभाकर बंडेवाड
15-04-2024
matoshrimultiservices80@gmail.com
जुना शिव पांदण गाडी वाट हि गटांची हद्द समाप्त तसेच शेत गट क्रमानकामधून सदरील रस्ता जात नाही याबाबत शासन निर्णय तसेच सविस्तर मार्गदर्शन व्हावे
Question by Madhav Bhaskar Pawar
02-04-2024
madhavpawar.1996@gmail.com
विषय: शेतं जमीनीचा सात बारा उताऱ्यावरील क्षेत्र दुरूस्ती करणे बाबत.
महोदय,
मी माधव भास्कर पवार, पिता: भास्कर रावसाहेब पवार, रा.हावरगा, ता.जळकोट, जि.लातूर, येथील रहिवासी असून माझ्या वडिलोपार्जित पूर्वजांची असलेल्या शेत जमीनीचे सात बारा उताऱ्यावर एकूण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असल्याची नोंदणी करण्यात गेली आहे.
माझ्या आजोबांचे वडील म्हणजेच माधव दाजीबा रा. हावरगा, ता. जळकोट, जि. लातूर यांच्या नावे सन 1961 या साली सात बारा उताऱ्यावर, जुने पाहणी पत्रक (सन 1955 पासून ते 1957 या सालापर्यंत) तसेच वहितीचा तपशील (सन 1953 ते 1954), खासरा पत्रक, खासरा पाहणी पत्रक, क. ड. ई. पत्रक, इत्यादी. नुसार सर्वे नं. 17, हिस्सा (आ) (2) मध्ये शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 5.0 एकर 34.0 आर येवढं आहे.
सन 1961 या सालापासून ते 1980 या सालापर्यंत माधव दाजीबा यांच्या नावे सर्वे नं.17, हिस्सा (आ ) (2) मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे सात बारा उताऱ्यावर एकूण क्षेत्र 5.0 एकर 34.0 आर येवढं आहे.
सन 1980-1981 मध्ये सर्वे नं. 17 हिस्सा (आ) (2) मध्ये असलेली शेतं जमीन ही (भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 2) आणि (भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 6) या दोन उपविभागात विभागली गेली आहे.
सन 1981 या साली माधव दाजीबा यांच्या नावावर असलेल्या भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 2 मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे सात बारा उताऱ्यावरील एकूण क्षेत्र हे 1.0 हेक्टर 07 आर येवढं दर्शिविण्यात आले आहे तर भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 6 मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे सात बारा उताऱ्यावरील एकूण क्षेत्र हे 98.0 आर येवढं दर्शिविण्यात आले आहे.
वास्तविक पाहता भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 2 मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे सात बारा उताऱ्यावरील एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 36 आर येवढं असायलाच पाहिजेत, पण असं न करता 1.0 हेक्टर 07 आर येवढंच दर्शिविण्यात गेलं आहे, म्हणजेच शेतं जमीनीच्या एकूण क्षेत्रापेक्षा सात बारा उताऱ्यावर 29.0 आर येवढं कमी क्षेत्र दर्शिविण्यात गेले आहे.
सन 1961 साली सर्वे नं. 17 हिस्सा आ (2) च्या सात बारा उताऱ्यावर फेरफार नं. 31 हा चूकीचा फेरफार नं. दर्शिविला गेला आहे.
तहसिल कार्यालय जळकोट, येथून फेरफार नं. 31 ची प्रत मिळविली असून, त्या वरुन असे लक्षात येते की, फेरफार नं.31 चा आणि माधव दाजीबा यांच्या नावे असलेली शेत जमीनीचा काहीही संबंध नाही, म्हणून फेरफार नं. 31 हा चूकीचा दर्शिविला गेला आहे. हा फेरफार 1961 साली फक्त एकदाच आणि एकाच वेळेस आढळून आला आहे.
कालांतराने भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 2 मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 07 आर हे गट क्रमांक 104 मध्ये दर्शिवले आहे तर भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 6 मध्ये असलेल्या शेत जमीनीचे एकूण क्षेत्र 98.0 आर हे गट क्रमांक 101 मध्ये दर्शिवले आहे.
वारसा हक्काद्वारे गट क्रमांक 101(क्षेत्र 98.0 आर) आणि गट क्रमांक 104 (1.0 हेक्टर 07 आर) मध्ये असलेली शेतं जमीन माधव दाजीबा यांचा मुलगा रावसाहेब माधव पवार, रा. हावरगा, ता. जळकोट, जि. लातूर यांच्या नावे केली गेली आहे.
त्याचप्रमाणे वारसा हक्काद्वारे रावसाहेब माधव पवार यांचा मुलगा भास्कर रावसाहेब पवार यांच्या नावे गट क्रमांक 104 मध्ये असलेली शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 07 आर नावे केली गेली आहे.
तर गट क्रमांक 101 मध्ये असलेली शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 98.0 आर हे रावसाहेब माधव पवार यांचा नातू व भास्कर रावसाहेब पवार यांचा मुलगा म्हणजेच माधव भास्कर पवार यांच्या नावे करण्यात आली आहे.
सन 2023-2024 या चालू वर्षात, माधव भास्कर पवार यांच्या नावे असलेली गट क्रमांक 101 मध्ये एकूण शेतं जमीनीचे क्षेत्र 98.0 आर येवढं आहे आणि भास्कर रावसाहेब पवार यांच्या नावे असलेली गट क्रमांक 104 मधील शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 07 आर येवढेच आहे.
वास्तविक पाहता, या चालू वर्षात भास्कर रावसाहेब पवार यांच्या नावे असलेली गट क्रमांक 104 मध्ये शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 36 आर असायला पाहिजे आहे पण भास्कर रावसाहेब पवार यांच्या नावे असलेली गट क्रमांक 104 मधील शेतं जमीनीचे क्षेत्र हे फक्त 1.0 हेक्टर 07 आर येवढंच आहे, म्हणजेच एकूण शेतं जमीनीच्या क्षेत्रापेक्षा 29.0 आर येवढं कमी क्षेत्र दर्शविले गेलं आहे.
तरी आपणांस सर्वांना हात जोडून विनंती आहे की, सर्वे नं. 17 हिस्सा (आ) (2) मध्ये सात बारा उताऱ्यावरील शेतं जमीनीचे क्षेत्र कमी दर्शविल्याचे कारण सांगून, शेतं जमीनीचे क्षेत्र पूर्वस्थितीत बरोबर करण्यास सविस्तर माहिती देण्यात यावी हि कळकळीची विनंती, मी तुम्हा सर्वांकडून आशा करतो की, तुम्ही मला नक्कीच मदत कराल.
अर्जदार
माधव भास्कर पवार
(9975157114)
अर्जदाराशी असलेले नाते:
वडीलांचे नाव: भास्कर रावसाहेब पवार
आजोबांचे नाव: रावसाहेब माधव पवार
आजोबांच्या वडीलांचे नाव: माधव दाजीबा
भूमापन क्र १७ ची पोट हिस्सा मोजणी होऊन दोन उपविभागांचे क्षेत्र दर्शवण्यात आले होते का ? कि तलाठी यांनी दोन उपविभागांचे ७/१२ तयार केले होते. आपण जे फेर्फाराने क्षेत्र कमी दाखवले आहे त्याविरीद्ध अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rupesh Vitthal Bhale
22-03-2024
bhale.rv@gov.in
Please provide me circular dt.26/5/2014 & 10/5/2006
Question by sunil aran
21-03-2024
sunilaran2121@gmail.com
7/12 nahi ahe property details kashi shodaychi
Question by दिग्विजय जाधव
21-03-2024
fbdigvijay@gmail.com
माझ्या वडिलांनी 2001 मध्ये पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दी मध्ये 7 गुंठे जागा विकत घेतली. तुकडेबंदी लागू असल्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांनी सात बारा नोंद रद्द केली. सध्या ती जागा सक्षम प्राधिकरण PMRDA च्या हद्दीत गेली आहे. PMRDA च्या गुंठेवारी नियमितीकरण / अनधिकृत विकास अधिनियम अंतर्गत ती जागा नियमित करून घ्यायची आहे. त्यासाठी सात बारा वर नाव पाहिजे म्हणुन सांगितले जात आहे. शासकीय मोजणी पण करता येत नाही. ज्या ठिकाणी जागा आहे तो संपूर्ण गट 2.34.00 हेक्टर चा आहे व 1.54.00 हेक्टर अजून मालकाच्या वारसदारांच्या नावाने आहे. ज्यांच्या कडून खरेदी झाली ते मयत झाले आहे. वडिलांनी जागा खरेदी केल्यानंतर 1-2 गुंठयाचे बऱ्याच जणांचे नाव सात बारा वर आले आहे. 2001 नंतर तलाठी साहेब तसेच मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार अर्ज देऊन तसेच विचारून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. 2001 पासून ते 2024 आत्ता पर्यन्त अजून नाव लागले नाही. कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
तुमची जागा , निवासी , औद्योगिक किंवा वाणिज्य वापर विभागात गेली असेल तर आपली फेरफार नोंद मंजूर होऊ शकते व आपले नाव ७/१२ ला लागू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol
15-03-2024
amolsalunkhe@rediffmail.com
माझ्या मामाची गावी जमीन आहे. आईचे नाव इतर हक्कात आहे. मी अनेकदा शेतीच्या कामाकरिता मामा बरोबर जात असतो. त्याच गटातील एका व्यक्तीने मामाच्या क्षेत्रात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्याचा राग धरुन त्याने CPC 6 J नुसार दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र माझं ७/१२ वर. नाव नसताना माझा जमिनीशी काहीही संबंध नसतानाही त्याने मलाही न्यायालयाची नोटीस पाठविली आहे. अशी बेकायदेशीर दावा. दाखल करता येतो का? कोर्ट नोटीस पाठविण्याआधी काही बघत न ही का? याबाबत काय करावे मार्गदर्शन करावे.
कोणी कोणाला नोटीस कशी द्यावी व का द्यावी या बाबत आपण काहीच करू शकत नाही . आपणास कोर्टाचे समन्स आले असेल तर, कोर्टात हजार राहून , आपले म्हणणे दाखल करावे लागेल . त्याने वकिलामार्फत नोटीस दिली असेल तर , त्याला उत्तर द्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandesh Godve
14-03-2024
sa1419@gmail.com
आम्ही सरकारी मोजणी केली त्यामध्ये असे कळले कि बाजूच्या शेतकऱ्याने आमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. पण ते आम्हाला ताबा देण्यास नकार देत आहे. पुढे काय करावे ? विस्तृत माहिती कुठे मिळेल ?
महसूल संहितेच्या कलम १३६ प्रमाणे हद्द निच्छित करून मिळणे करिता , जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करा . हद्द निच्छित जिल्हाधिकारी यांनी करून दिली व त्यामध्ये हे निच्छित झाले कि आपल्या शेजारच्या शेतकर्याने , आपल्या जागेत अतिक्रमण केले आहे तर आपण महसूल संहितेच्या कलम १३८ खाली आपल्या जागेतून त्याला काढून टाकण्यासाठी , जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा.
महसूल संहिता – “महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६” असा वाचावा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Chaitanya Londhe
13-03-2024
chaitanyalondhe01@gmail.com
सर नमस्कार,
बोगस मोजणी नकाशा वरून बिगर शेती परवानगी केली असेल व ईतर शासकीय परवानगी घेऊन त्या जमिनीवर व्यवसाय चालू असेल तर तक्रार कोठे करायची व कोणते कलम व दंड नुसार कारवाई करण्याची माहीती मिळावी, ही नम्र विनंती
बिगर शेती आदेश च्या अटी व शर्ती चे भंग केल्यास कोणते नियम लागू होतात. ही माहिती मिळावी ही विनंती
रित सर आपली फी देण्यास तयार आहे. कृपया माहीती मिळावी
दिलीप लोंढे, पूणे
9822067943
Question by Vikrant Shinde
06-03-2024
vcshinde09@gmail.com
Is Maharashtra rehabilitation act 1976 is applicable for project affected persons of Dhom dam Satara ?please anwer
Question by LALASAHEB BHIMRAO FATAK
04-03-2024
LALAFATAK@GMAIL.COM
सर्व्हे क्रं ६० गट ३ मधील जमीन तहसील कार्यालयात १९५९-६० पासुन १९७१-७२ पर्यंत १६ एकर २५ आर आहे एकत्रीकरणानंतर भूमी अभिलेख कार्यालयाच्या आकारबंध मधील नोंद ही PHS रजिस्टर प्रमाणे १७ एकर ३५ आर केली गेली हीच भूमी अभिलेख कार्यालयाची चुक तहसील कार्यालयाच्या क पत्रक तसेच एकत्रीकरणापूर्वीच्या ७-१२ मध्ये नोंदीमध्ये पुराव्यानिशी दिसून येत आहे, याकारणाने इतर गटामधील ३ शेतकरी यांचे क्षेत्र कमी झाले आहे. मा.तहसीलदार,मंडळ अधिकारी तसेच तलाठी साहेब, तसेच एकूणच कर्मचारी क पत्रक, आकारबंध, एकत्रीकरण यावर कुठलाच अभ्यास न करता भूमी अभिलेख कार्यालयाची ही चुक बाधीत शेतकरी यांच्यावर थोपवत आहेत, तसेच आजतागायतच्या हस्तलिखित १९७१ पासुन २०१७ पर्यंतच्या सर्व ७-१२ या बरोबर आहेत आणि ऑनलाईन प्रमाणे क्षेत्र जुळवणी चुकीची झाली आहे असे का ? याबाबत काय सल्ला दयाल ही विनंती.
एकत्रीकरण योजनेत क्षेत्र कमी जास्त होत असते . जमिनीच्या मगदुराप्रमाणे ( उत्पादकता ) जमिनीचे वाटप एकत्रीकरण योजनेत होते. त्यामुळे त्याला चूक म्हणता येणार नाही . मात्र जर जमीन एकाच उत्पादकतेची असेल तर , योजने दुरुस्तीसाठी , अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mallikarjun Ambi
04-03-2024
mallikarjunambi@rediffmail.com
Mul phalni shet nakash tayar karnare adhikari yanche nav taril v sal .tasech mul bhumi abhilek dastayeaj kontya prakare milvavyat te kothe surshit astat dhanyawad
Question by sagar patil
26-02-2024
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की xyz व्यक्तीची 3 एकर जमीन त्यास वारसाने प्राप्त झालेली त्याचे वडील 40 वर्षे झाली मृत्यू पाहून त्याला एक बहीण असून त्याने त्या बहिणीचा वारस सातबारा सदरी लावलेला नाही मग विषय असा आहे की एक्स वाय झेड व्यक्तीची जमीन आम्ही नोंदणी कृत खरेदी खताने तीन वर्ष झाली खरेदी करून खरेदी करत असताना त्या व्यक्तीने आपणास बहीण नसल्याची खोटी माहिती दिली व खरेदी करून दिले आज तीन वर्षे झाली 7 12 सदरी खरेदी घेणाऱ्याचे नाव आहे तर आता कोर्टाकडून देणाऱ्याला बहिणीच्या वतीने नोटीस आल्या की माझ्या हिशाची जमीन मला मिळावी तर त्या देणाऱ्या व्यक्तीने आम्हाला बहिणीची व त्याची कोर्ट केस कोर्टात पंधरा वर्षे झाले चालू आहे अशी कोणतीही कल्पना खरेदी वेळी दिलेली नव्हती तर सर यामध्ये घेणाऱ्याला कोणत्या परिणामाला सामोरे जावे लागेल किंवा या गोष्टीचा घेणाऱ्या वर कोणता परिणाम होतो खरेदी करताना बहिणीचे सात बारा मध्ये नाव नव्हते कृपया मार्गदर्शन करावे
आपण जमीन खरेदी करताना , वर्तमान पत्रात नोटीस दिली होती का ? तसेच मालकी हक्क चौकशी वाकीलानामार्फात केली होती का ? या दोन्ही गोष्टी केल्या असतील तर , अडचण येण्याचे काही कारण नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Harun Yunus Shah
24-02-2024
harunshah445@gmail.com
Reconveyance Deed केव्हा उपयोगी पडतो? तो का केला जातो? सदर डीड न केल्यास भविष्यात काही अडचणी उद्भवतात का?भविष्यात डीड न झालेली जमीन कोणी खरेदी केल्यास नविन मालकास काही अडचणी येतात का? या विषयी मार्गदर्शन व्हावे
प्रत्यंतर-पत्र दस्त म्हणजे reconveyance deed हे ज्यावेळी कर्ज रक्कम व त्यावरील व्याजाची परत फेट केली जाते , त्यावेळी कर्ज रक्कमेची हमी म्हणून जी स्थावर संपदा गहाणकाराने गहान्दाराकडे हस्तांतरित केली होती ती परत गहानकारकडे हस्तांतरित करणे . मात्र अशी संपदा परत हस्तांतरित करताना , मुद्रांक शुल्क अधिनियमाप्रमाणे आवश्यक मुद्रांक शुल्क जमा करणे आवश्यक आहे . अशी मालमत्ता हस्तांतर करून घेणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
प्रत्यंतर-पत्र दस्त म्हणजे reconveyance deed हे ज्यावेळी कर्ज रक्कम व त्यावरील व्याजाची परत फेट केली जाते , त्यावेळी कर्ज रक्कमेची हमी म्हणून जी स्थावर संपदा गहाणकाराने गहान्दाराकडे हस्तांतरित केली होती ती परत गहानकारकडे हस्तांतरित करणे . मात्र अशी संपदा परत हस्तांतरित करताना , मुद्रांक शुल्क अधिनियमाप्रमाणे आवश्यक मुद्रांक शुल्क जमा करणे आवश्यक आहे . अशी मालमत्ता हस्तांतर करून घेणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pradip Bhagwant Sant
19-02-2024
dipgayu@gmail.com
नमस्कार साहेब ,
माझी वडिलोपार्जित जमीन धरणाखाली संपादित करण्यात आली . सदर जमिनीची नुकसानभरपाई आम्ही घेतली नाही आणि पर्यायी जमिनीची मागणी केली होती . या जमिनीच्या भू संपादनाची रक्कम महसूल ठेव म्हणून आमच्या नावे शासकीय कोषागारात जमा करण्यात आली . ती रक्कम तशीच पडून आहे . आम्ही पर्यायी जमिनीची मागणी केली असता नुकसानभरपाई च्या ६५% रक्कम जमा न केल्याने मला पर्यायी जमिनीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे .
माझा प्रश्न खालील प्रमाणे -
जर का नुकसानभरपाई ची रक्कम आम्ही स्वीकारलेली नाही तर ६५% रक्कम कुठल्या नियमानुसार मागत आहेत . सर्व रक्कम तर शासकीय कोषागारात जमा आहे . असे असताना मला पर्यायी जमिनीसाठी अपात्र घोषित करण्याचा निर्णय योग्य आहे का ? याबाबत कुठे दाद मागावी ?
आपण पुनर्वसन संचालक तथा विभागीय आयुक्त यांचेकडे दाद मागू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran Khalate
19-02-2024
drkirankhalate@gmail.com
कलम 85 जमीन वाटप माहिती पाहिजे
जी जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे आहे व ज्यांच्यामध्ये , मालकी हक्काबाबत वाद नाही . अश्या व्यक्ती जिल्हाधिकारी / तहसीलदार यांचेकडे , मिळकतीचे सरस निरस वाटप करून मिळावे म्हणून अर्ज करू शकतात . तहसीलदार महसूल संहितेच्या कलम ८५ खाली असे वाटप करण्यास सक्षम आहेत .
तपशीलवार कार्य-पद्धतीसाठी कलम ८५ व महाराष्ट्र जमीन महसूल ( शेत-जमिनीचे वाटप ) नियम १९६९ चे वाचंन करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by KRUSHNA SOMNATH SHINDE
18-02-2024
krushnasomnathshinde@gmail.com
1. शेतकऱ्याला स्वतः च्या शेतात स्व खर्चाने विहीर खोदायची असल्यास व सदर क्षेत्र प्रतिबंधित नसल्यास विहीर खोदण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे का? असेल तर ते सक्षम अधिकारी कोणते व त्याची प्रक्रिया व अटी शर्ती काय आहेत?
2.MRGS मधून एखाद्या शेतकऱ्यास विहीर मंजूर झाली असेल व त्याची स्वतः ची शेतजमीन असेल तर ती खोदण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे का? असेल तर ते सक्षम प्राधिकरण कोणते ? व प्रक्रिया काय आहे?
Question by Rahul jadhav
18-02-2024
jadhav.rahul111@yahoo.in
आमची गावी वडिलार्जित शेती असून माझे वडील व त्यांच्ये २ भाऊ असे वारस. आम्ही वडिलांचे नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झालो. तोंडी वाटणीप्रमाणे आम्ही आपापले क्षेत्र वहिवाटीत आहोत. माझ्या वडिलांचे क्षेत्र वडिलांच्या मोठ्या भावाचा मुलगा माझा चुलत भाऊ खंडाने कसत होता. शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून आम्ही विहीर काढली. भाऊ स्थानिक असल्याने वडिलांनी आमच्या व छोट्या चुलत्यांच्या हिश्शाचे पैसे दिले व विहीर खोदण्याची व बांधकाम करुन घेण्याची जबाबदारी चुलत भावाकडे दिली. माझ्या वडिलांचे २०१८ मध्ये निधन झाले व चुलत भावाचे २०२० ला निधन झाले. भावाचा मुलगा आता आमचे क्षेत्र वहिवाटीत नाही. मात्र विहीरीत आमचा हिस्सा नाही म्हणून पाणी घेऊ देत नाही. व ही विहीर आम्ही एकट्याने काढली असल्याचे सांगतो. माझ्या वडिलांनी भावाला वहिरीसाठी पैसै दिल्याचे लेखी नाही. भावाने विहीर बांधण्याकरिता contractor शी केलेले agreement स्वत: चे नावावर केले आहे. ते दाखवून विहिरीवर एकट्याचाच हक्क त्याचा मुलगा सांगत आहे. आम्ही काय करावे? कुठे दाद मागावी? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आपण माम्लेत्दार अधिनियामानातर्गत तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Yedage
15-02-2024
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर...
माझा प्रश्न असा आहे की... रजिस्टर ऑफिसात एकूण किती प्रकार चे खरेदी खत केले जाते.....
जसे की,...खरेदी खत.... बक्षिस पत्र ....कायम खुश खरेदी खत.....साठे खत....
आणि प्रत्येकाची व्हॅल्यू कितपत असते....
आपण मोघम प्रश्न विचारला आहे . विशिष्ट असा प्रश्न विचारा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Yedage
15-02-2024
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर,
गाव गट नकाशा वरती आमच्या शेत जमिनीचा गट नकाशा नाही....परंतु भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता N.J किंवा N लार्ज वरून गट नकाशा चे रेकॉर्ड सापडले असे का.....आणि N.J किंव्हा N
लार्जं म्हणजे काय
Question by ravi ghule
15-02-2024
ravikiranghule@gmail.com
i want to cerculer no. 1.LNQ-1094/166/P.K.439/A-2, 20 oct 1995
2.-LNQ-1098/166/P.K.28/A-2, 25 March 1998
3- sankiran-02/2010/P.K.29/A-2, 16 Feb 2010
4- sankiran-02/2010/P.K.29/A-2, 14 Sept 2012
Question by SOMMU ANAND RAMTEKE
14-02-2024
sommu_ram@rediffmail.com
Respected Sir's,
My grandfather demised in the month of October, 2023. My grandfather has 4 daughters and one adopted son (which he adopted illegally without proper legal documents). We have made application in the month of October, 2023 to Talathi office for adding names of four daughters (and not adopted son) in 7/12 Extracts who are legal heirs/biological daughters of my late grandfather and grandmother who demised intestate but the concerned Talathi is purposely trying to delay the matter and has not yet added names of all 4 daughters in 7/12 extracts inspite of making proper application to the talathi office. Same application has been made by adopted son in talathi office to add his name in 7/12 extracts. We came to know that the adopted son bribed the talathi office so as to not to add names of 4 daughters name in 7/12 extracts. The adopted son sold 1 acres of land for Rs.10 lakhs to two unknown persons in the year 2023 when my grandfather was alive without taking NOC from 4 daughters and kept all the money in his bank account and didnt share any part of money to all 4 daughters Inspite of repeated follow ups through mobile phone, personal meeting at talathi office our greviances are not been heard by the Talati office. We are helpless as the talathi office is purposely delaying the matter and not adding names of all 4 daughter's who are legal heirs of my late grandfather. The Talathi office is neither providing any reasons nor providing any information with regard to delay in adding names of 4 daughter in 7/12 extract. Thus the matter is still pending before the talathi office without any justifiable reasons. She informed on whatsapp that without succession certificate she cant do the needful. She has not given anything in writing to apply for succession certificate. We approached Tahsildar office. Tahsildar informed to Talathi but she says she will give reply after 2 days as she is busy in election duty and purposely try to delay the matter.
Kindly advise.
Regards,
Adv. Sommu Ramteke
The adopted son sold the land means his name was mutated to the property . You need to challenge the mutation entry by which adopted son's name was mutated before the Sub- Divisional Officer under section 247 of Maharashtra Land Revenue Code 1966
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nikhil Poladiya
13-02-2024
nikhil.poladiya@gmail.com
Agricultural land (CTS NO. 698B/3) , situated in Mulund west under BMC - T WARD.It is used for residential purpose since 1991 , after obtaining collector interim permission . In order to convert this agricultural land to non agricultural (NA) for residential use in official records - what is the basis for calculation of conversion tax , premium , nazrana , any other payment required for above conversion and the actual amount payable for above change of land use.Please share the logic of calculation and the amount as well . Thanks in advance .
Pl read section 47A of Maharashtra Land Revenue Code 1966 .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Hariprasad Madhukar Patil Patil
13-02-2024
hariprasadpatil@rediffmail.com
सर मी माझे शेत दिनांक 05/05/2023 रोजी माझ्या शेतीची सरकारी मोजणी झाली असून ,माझ्या कडून आर्थिक टंचाई मुळे मला ताबा घेता आला नाही, आता शेजारील शेतकऱ्याने ताबा देण्यास विरोध केला आहे. व हद्द कायमची खून पण नष्ट केली आहे.
या परिस्तीत मला माझ्या शेतावर ताबा घेणे आहे
तरी मला वाद न होता ताबा कसा मिळणार ही सांगण्याची विनंती करावी
धन्यवाद
आपली व आपले शेजारील शेतकरी यांचे शेताची हद्द निच्छित झाली असेल , त्यावेळी कलम १३८ अन्वये , हद्दीच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचा जमीन धारण करण्याचा हक्क कोणत्या क्षेत्रापर्यंत आहे हे निच्छित होते . लगतच्या शेतकर्याने अतिक्रमण केले असेल तर , आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा . असा अनधिकृत ताबा काढून देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3326 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
राजेश जे वझीरे | 10 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
MCS Officer | 3 |