जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Vishnu Pawar
13-07-2023
pawarvishnu@rediffmail.com
सर, कुळकायद्याची सर्व्हे नंबर ६४/१/अ ची कोशिंबे येथील आमच्या शेतजमीन संबंधीचे ३२म सर्टिफिकेट तलाठ्याकडे नोंद करून दहा वर्ष झाली. तरीसुद्धा मूळ मालक व आता त्यांचे वारसांची नावे सातबारावर लावली जात आहेत. सदर शेतजमीन खूप वर्षांपासून आमचे वाडवडिल कसत होते. शेतजमीन आमच्या कब्जात आहे व आम्ही ती अजूनहि कसत आहोत. पण आम्हाला सरकारी योजनेचा लाभ होत नाही. मूळ मालकांची नावे सातबारा मधून काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल?
तहसीलदार यांचेकडे अर्ज करून हि बाब त्यांचे निदर्शनास आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर येडगे
13-07-2023
yedagesagar@gmail.com
मा. महोदय,
माहिती अधिकार अंतर्गत द्वितीय अपील मा.राज्य माहिती आयोग यांना काय काय अधिकार आहेत....
उदा. एखाद्या शेतकऱ्याची जमीन शासन बऱ्याच वर्षा पासून अनलिगली वापर करत आहे...हे माहिती अधिकार अंतर्गत सिद्ध होत असेल तर तो शेतकरी मा.राज्य माहिती आयोग यांच्या कडे कशा प्रकारे दाद मागू शकेल...म्हणजे जमीन वापरली म्हणून नुकसान भरपाई किंव्हा त्या जागेचा मोबदला मागू शकेल का.....
Question by sagar patil
12-07-2023
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की आमच्या आजोबांचे चुलते त्यांना कोणी वारस नसल्यामुळे आमचे आजोबा त्यांच्या हीशाची सर्व जमीन खरेदी खताने 1960 ला विकत घेण्यासाठी गेले असता आमच्या आजोबांना त्यावेळेस सांगण्यात आले की तुमचे चुलते भूमिहीन होत असल्यामुळे खरेदीखत करता येणार नाही पुढे 1962 ला ते चुलते मयत झाले तर आजही सातबारा वरती त्यांचेच नाव आहे व ती जमीन तेव्हापासून आमच्याकडेच आहे तर त्या सातबारा वरती आमची नावे लावण्यासाठी काय करावे लागेल (आजोबांना पाच भाऊ आहेत)
Question by sagar patil
12-07-2023
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की सातबाराच्या इतर अधिकारामध्ये XYZ व्यक्तीने रक्कम रुपये 325 दिनांक 1992 रोजी कोर्ट अवॉर्ड करून घेतले असे नमूद केले आहे तर कोर्ट अवॉर्ड करून घेणे म्हणजे काय
हा जो तपशील किंवा आपण त्याला शेरा असे म्हणू, जो सातबाराच्या इतर हक्कात नोंदवण्यात आलेला आहे त्याच्या खाली कोणता फेरफार क्रमांक नमूद केला आहे का हे पहा. जर त्याखाली फेरफार क्रमांक नमूद असेल तर तो फेरफार चा तपशील काय आहे ते पहा त्या तपशिलावर कदाचित नक्की याचा अर्थ काय आहे आणि कोर्ट अवार्ड केले म्हणजे काय याबाबत आपल्याला बोध होईल. जर त्याच्या खाली कोणताही फेरफार नोंद क्रमांक नसेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1960 च्या कलम 155 खाली मेहरबान मामलेदार साहेबांना विनंती करा की हा असा पोकळीस्थ जो काही शेरा आहे तो काढून टाका.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amit raut
12-07-2023
shilparaut35@gmail.com
आमचे 40 पेक्षा अधिक छोटे छोटे सातबारे आहेत आणि सातबारावर एकूण 70 ते 80 लोकांची नावे आहेत फॅमिली ट्री प्रमाणे यामध्ये महत्त्वाचे भागीदार हे तीन असून 70 ते 80 जण हे त्यांचे वारसदार आहेत तरीही कलम 85 अन्वये एखाद्या सहधारकाने जर आपल्या हिस्सासाठी मागणी केली असता दुसरा सहा धारक ज्याचा हिस्सा एक पर्सेंट एवढाच असेल तर त्यांनी हरकत घेतली तर कलम 85 द्वारे वाटप करण्यात अडचण येऊ शकते का किंवा तहसीलदार त्यावर निर्णय देऊन कलम 85 द्वारे वाटप करू शकतात का. सर्व जमिनी 50 ते 60 वर्षांपूर्वीच तोंडी वाटपाने प्रत्येकांच्या कब्जेवापरात आहेत
Question by Anil Jadhav
12-07-2023
Anilashok354@gmail.com
सर आपले खूप खूप अभिनंदन आपण व्यक्तिशः लक्ष देऊन लोकांचे शंका चे निरसन करता , आपल्याला चांगले आरोग्य लाभो
सर माझे आजोबा 1948 मध्ये संरक्षित कुळ होते नंतर ते कमी झाले आणि पुन्हा ते 1957 मध्ये संरक्षित कूळ झाले आणि त्या नंतर 7/12 सदरी १९५६ पासून 1969 पर्यंत संरक्षित कूळ म्हणुन इतर हक्क मध्ये आणि पीक पेरा सदारी नाव होते 1970 मध्ये 3 एकर चे पैसे भरून कब्जेदर सदरी नाव लागले व उर्वरित 10 एकर मूळ मालकाचे नाव लागले तत्पूर्वी 1960 मध्ये आजोब नी 1960 मध्ये पूर्ण जमीन खरेदी साठी अर्ज केला होता पण मूळ मालक अपक असल्यामुळे खरेदी तहकूब असा फेर होता. 1970 नंतर 1989 व 1993 मध्ये मूळ मालकाने जमीन आजोबा व वारस ह्यांना न विचारता ती तिसऱ्या व्यक्तीला विकली आणि 7/12 ला कूळ कायदा कलम 43 /1 आणि आजोबांनी जमीन कब्जा रक्कम भरून जेव्हा 3 एकर घेतली होती तो फेर 47 हा 7/12 ल व इतर हक्क मध्ये नवीन शर्त 47 म्हणून होता तरी तिसऱ्या व्यक्तीने मूळ मालक कडून जमीन घेतली आणि आमचा कूळ हक्क डावलला गेला असे वाटते
1) ४३(१) आणि नवीन शर्त ४७ असताना कूळ व वारस आणी सरकारी परवानगी न घेता झालेला व्यवहार हा कायदेशीर आहे का आणि नसेल तर व्यवहार रद्द करून आम्हाला जमीन मागणी करता येईल का आणि कुठे दाद मागावी लागेल
२ १९६० चा जमीन खरेदी अर्ज असताना व्यवहार झाला आहे तर तो कायदेशीर आहे का
३ एक मूळ मालक १० एकर मधील २ एकर च मालक असून विधवा स्री आहे आज रोजी जमिनी मध्ये कट्या आहेत तर ती जमीन आम्हाला हवी असेल तर काय करणे योग्य
Question by Sagar Jadhav
08-07-2023
sagajadh1206@gmail.com
१. डिजिटल सातबारा मध्ये विहीर नोंद कशी करावी?
२. ई पीक पाहणी आपलिकेशन मधून कायम पड मध्ये विहीर नोंद केली तर ती कुसुम सोलर योजने साठी ग्राह्य धरली जाईल का?
Question by sushant vartak
07-07-2023
sushantvartak1980@yahoo.co.in
आमची वसई येथे वडिलोपार्जित छोटे छोटे जमिनीचे 43तुकडे सातबारे असून आमच्या कुटुंबाची ती सामाईक जमीन आहे. प्रत्येक सातबारा मध्ये साधारणता 80 ते 100 नावे असून त्याचे मुख्य हिस्सेदार हे काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी चार हे आहेत म्हणजेच 80 ते 100 जण हे या चार जणांचे वारस आहेत. सर्व जमिनीची पन्नास वर्षांपूर्वीच तोंडी वाटप झालेला असून त्यानुसार प्रत्येक कुटुंबाच्या तसेच व्यक्तीच्या कब्जेवापरात आहे काही सातबारांमध्ये समांतर तर काही ठिकाणी विषमरीत्या जमीन तोंडी वाटप झालेले असून त्यां जमिनीचे बांध सुद्धा घातलेले आहेत आणि सदर जमिनीचे फोड होताना 1966 साली झालेल्या आकारफोड आकारबंद मध्ये ह्या तुकड्यांची नोंद आहे परंतु सातबारा व त्याची विभागणी झालेली नाही तरीही सातबारे मध्ये वरील चार भावांच्या वारसांमध्ये म्हणजेच त्यांच्या नावाच्या समोर आपण क्षेत्र कब्जेवापर तसेच आकार फोड किंवा कब्जे वापराप्रमाणे जुने नकाशे त्यानुसार आपण क्षेत्र आणू शकतो का सदर जमीन हि कलाम ८५ नुसार वाटणी करण्यात काही जणांचे सहकार्य मिळत नाही तसेच दिवाणी न्यायालया मार्फत करण्यासाठी वेळ लागू शकतो तरीही आम्ही सद्य स्थितीत नावासमोर क्षेत्र आणू शकतो का.
सर्व सह-धारकांची संमती असती तर हा प्रश्न सहज सुटू शकेल . मात्र ज्या जमिनीचे १९६६ ला वाटप झाले आहे व केवळ सध्याच्या वहिवाटीच्या आधारे प्रत्येक जन आपला हक्क सांगत आहे . अन्य कोणताही उपाय यामध्ये मला दिसून येत नाही . एक तर सह धारकांची संख्या खूप आहे व झालेला कालवधी , प्रत्येकांने आपल्या मिळकतीत केलेली गुंतवणूक पाहता , दिवाणी न्यायालय हाच एक मार्ग आहे . अन्यथा सध्या ज्या प्रमाणे कब्जा आहे व सम - विषम वाटप याचा विचार न करता , तहसीलदार यांचेकडून कलम ८५ खाली वाटप करून घेणे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sushant vartak
05-07-2023
sushantvartak1980@yahoo.co.in
जर नोंदणीकृत हक्क सोडपत्र केला असेल तर तलाठ्याला फेरफार टाकण्यासाठी नोंदणीकृत हक्क सोडची झेरॉक्स प्रत आणि अर्ज दिल्यानंतर तलाठी फेरफार टाकू शकतात का की प्रतिज्ञापत्रकाचे गरज असते
सुशांत वर्तक वसई पालघर
हक्क सोड पत्राचे इंडेक्स II ची प्रत तलाठी याजकडे येते . त्यामुळे छाया प्रत , सही करून दिलेली चालू शकते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीश भोसले
05-07-2023
Girish.bhosale84@gmail.com
RTS अपिल चा full form काय आहे?
Question by Amol
04-07-2023
amolsalunkhe@rediffmail.com
सैन्य दलात काम करणारी व्यक्ती सुट्टी वर असताना सैन्य दलात असल्याचा गैरफायदा घेऊन अनेकांना मारहाण करणे जिवेमारण्याच्या धमक्या देणे, हल्ला करणे शेतीचे नुकसान करणे असे करीत आहे. त्याच्या अनेक लेखी तक्रारी पोलिसांकडे आल्याने त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांचेकडे ०१ मार्च २०२३ रोजी पाठविण्यात आला आहे. मात्र अजूनही त्यावर कारवाई करण्यात आली नाही. प्रस्ताव आल्यापासून किती दिवसात ही कारवाई करतात.यासाठी काही नियमावली आहे का? या संदर्भात काय करावे लागेल.
आपण कथन केलेले प्रकरण अथवा संन्य दलातील व्यक्तीचा गुन्हा / कृत्य या साठी भारतीय दंड संहिता या खाली गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे . त्याचे कृत्य प्रतिबंधात्मक कार्यवाही खाली येऊ शकत नाही . त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी उप विभागीय दंडाधिकारी तथा प्रांत यांचेकडे सादर केला आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर येडगे
02-07-2023
yedagesagar@gmail.com
मा.महोदय,
आमची वडिलोपार्जित जमीन आहे .आमच्या आजोबांचे जमिनीचे एकूण सहा गट नं. आहेत.
आजोबा मयत झाले नंतर सहा गटांवर समाईक नावे दाखल झाली आहे. त्यातील चार गटाचे वाटप मोठे जुलत्याना जादा जमीन म्हणजे 11 एकर व आम्हाला कमी जमीन म्हणजे 7.5 एकर वाटप 1994 साली मा. तहसीलदार सहेबान मार्फत झाले आहे.
आता राहिलेल्या दोन गटात नावे समायक आहे...चुलता म्हणतो की राहिलेले गटात समान हक्क पाहिजे.
मग आदोगरचे जे चार गट कमी जादा वाटप झाले आहे ते रद्द होऊन नव्याने सर्व गट समान वाटप होऊ शकते का....?
आणि एकूण सहा गटाचे वाटप पत्र करायचे होते तिथे चार गटाचे वाटप पत्र केले आहे. मग अपूर्ण वाटप पत्र केले आहे.असा दावा करता येईल का...
तहसीलदार यांनी केलेले वाटप आता आह्वानीत करता येणार नाही . आपण या विषम वाटपाच्या विरुद्ध , दिवाणी न्याय्यालयात जाने योग्य राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर दिलीप चौधरी
02-07-2023
sagarchaudhari770@gmail.com
मा. महोदय आपमी वडीलांचे नांवे शेती होती. ती शेती कालांतराने विकण्यात आलेली आलेली आहे तरी पुनच्छ वडीलांचे नांव शेती घेता येऊ शकते
Question by Sijauddin Ramjan mujawar
02-07-2023
sijauddinm786@gmail.com
सर , सव्हे न 7/12 सदरी 1971 पुर्वी गुणाकार बुक, शेत पुस्तक, आकारफोड ,फाळणी नकाशा या दस्तऐवज मध्ये आमचे थोरले आजोबा व ईतर तीन्ही आजोबाची नोंद दिसून येते . 1972 साली गट न. 7/12 सदरी आमचे थोरले आजोबाचीच नोंद दिसून येते.आम्ही उपसंचालक भुमी अभिलेख, पुणे . या विभागात एकत्रीकरण चुक दुरुस्ती साठी 2019 रोजी अर्ज केलेला असता. त्यांनी जुने 7/12 सदरी एकूप अशी नोंद नसलेने तुम्ही महसूल खात्याशी एकूप नोंद साठी अर्ज दाखल करावा . असा निकाली समज दिलेला आहे. महसूल विभागात कसा अर्ज करावा ? भुमी अभिलेखने दिलेला निकाल बरोबर आहे का?
Question by गिरीश भोसले
30-06-2023
Girish.bhosale84@gmail.com
तलाठी अथवा मंडल अधिकारी सुट्टी च्या दिवशी दुसरा अथवा चौथा शनिवार या दिवशी फेरफार प्रमाणित करु शकतात का?
Question by गिरीश भोसले
30-06-2023
Girish.bhosale84@gmail.com
खरेदीखतामध्ये मिळकत 1/अ नमुद आहे परंतु फेरफार होताना भोगवटादाराचे नाव १/ब मध्ये दाखल झाले व काही कालावधी नंतर त्या भोगवटादाराने 1/अ मध्ये सुध्दा नाव नवीन फेरफार नुसार सामाविष्ट केले. सध्या एका खरेदीखतानुसार दोन फेरफार झाले असून दोन सात बारा उतारा मध्ये नावे आहेत. तर तहसीलदार यांचाकडे १५५ कलम खाली अर्ज करावा लागेल का? कलम 247 खाली उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपिल दाखल करावे लागेल..
Question by Jai Daga
26-06-2023
jai_daga@yahoo.co.in
मा. महोदय, आमची खोपोली ईथे ३ एकर जागा आहे । जागेचे डिटेल्स गाँव - गणेश नगर ( ९४५२९५५), तालुक़ा - खालापुर, जिल्हा - रायगड , गट क्रमांक (सर्वे) -३०३.
या जागा पैकी २ एकर जागा माझ्या आई इन्दू डागा यांची आहें आणि एक एकर A यांची आहें । दोन इश्यू आहें
१)A यान्नी आदिवासी यानना रस्ता पाहिजे असा सांगुण माझ्या आई च्या जागेतुन मोठा रस्ता बँधला ते ही माझ्या आईची परवानगी न घेता । याची कम्प्लेंट साठी आणि जेवढ़ी जागा रोड मध्ये गेली त्याच्या कंपनसेशन साठी काय करवायी करता येईल कारण अIमच्या कढ़े ग्रामपंचयत किव्वा ट्राइबल डिपार्टमेंट इथूँ काहीही लेटर नाही ।
२. हे ७/१२ वेगला करण्या साठी फ़ास्ट ट्रैक प्रोसेस काय आहे आणि किति दिवसात होतो।
प्लीज़ आम्हाला गाइड आणि हेल्प करा कारण माझी आई एक सीनियर सिटीजन आहें आणि खालापुर किव्वा ग्रामपंचायत ऑफिस कोणिही मदद करत नाही ।
मला विश्वास आहें की अम्हाला आपला सहकार्य भेटेल ।
धन्यवाद जय डागा
१. आपल्या जागेतून आपल्या परवानगीशिवाय कोणीही रस्ता करू शकत नाही . शासनाच्या कोणत्या प्राधिकरणाने रस्ता तयार केला आहे ? याची आपणास माहिती आहे का ? कि रस्ता खाजगी आहे ? शासनाने / ग्राम पंचायतीने रस्ता तयार केला असेल तर आपणास त्या बाबत नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे . त्यासाठी प्रथम शासन / ग्राम पंचायतीला नुकसान भरपाई देण्याबाबत नोटीस द्या . जर त्याचा काही उपयोग झाला नाही तर , आपणास न्यायालयाट जावे लागेल .
२. ७/१२ आपली आई व A यांचे मध्ये स्वतंत्र करावयाचा असल्यास , उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा . मोजणी करून , आपला ७/ १२ स्वतंत्र होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Àditya
25-06-2023
adityak80@yahoo.com
माझ्या आजोबांची वडिलार्जित हिश्शाची जमीन त्यांच्या निधनानंतर माझ्या आजीच्या व आईच्या नावे वारसाहक्काने आली. आजीचे नाव भोगवटादार सदरी होते व आईचे नाव इतर हक्कात. परंतू आईच्या चुलत भावाने कर्ज मिळवून देतो असे सांगून आजीचा अंगठा घेऊन सगळी जमीन खरेदी घेतली. आजीला व आईला याबाबत समजले तेव्हा आम्ही प्रांताकडे अपील केले असता सदर विक्री घरखर्च व लोकांची देणी देण्यासाठी कौटुंबिक गरजेसाठी केली असल्याचे व एकुमॅ ला तो अधिकार असल्याचे सांगून अपील फेटाळले. जिल्हाधिकारी यांनीही तोच आदेश कायम ठेवला आहे. व नोंद रद्द करणेसाठी न्यायालयात खरेदी खत रद्द करुन घेण्यासाठी सांगितले आहे.
परंतू ७/१२ वर कुठेही एकुमॅ नाही .क्षरेदी दस्तामधे एकुमॅ म्हणून विक्री नाही. खरेदी फेरफार वर एकुमॅ नाही. आईचे नाव आजही 7/12 सदरी इतर हक्कात आहे. तरीही चुकिचे निष्कर्ष काढून अन्याय कारक निकाल दिला आहे काय करावे ?
प्रांत अधिकारी यांचे निष्कर्ष चुकीचे व सदोष आहेत . आपल्या आजी ला जरी तिचे नाव एकु म्या म्हणून दाखल असले तरी . तिला विकण्याचा हक्क आहे कि नाही ठरवण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे . महसूल न्यायासानास नाही . आपण जिल्हाधिकारी यांचे सदोष आदेश अप्पर आयुक्त यांचेकडे अह्वणीत करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anshuman
25-06-2023
anshumol2007@gmail.com
सर, आमची 6 एकर वडिलार्जित जमीन असून माझे वडिल व २ काका प्रत्येकी २ एकर वहिवाट आहे. आमचे वाटपपत्र झाले नाही. आम्ही दोन्ही घरे तिथे रहात नसल्याने आमची शेती तिथे स्थायिक मोठ्या चुलत भावाला कसायला दिली आहे. शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून त्याने आम्हाला न सांगता आमच्या दोघांच्या हिश्श्याच्या मधे विहीर काढली आहे. या वर्षी आम्ही आमचा हिस्सा एका इसमाला वाट्याने दिला आहे. तो भाऊ वाटेकरीला त्रास देतो आहे. तसेच विहीर मी काढली ती माझी एकट्याची आहे. तुमची जमीन मलाच विकायची असे म्हणतो. विहिरीची नोंद ७/१२ वर सामाईकात करता येईल का? त्यासाठी काय करावे?
आपल्या जागेच्या वाटणी झालेली नाही मात्र विहीर खोदण्याचा खर्च ज्याने केला , त्याची ती विहीर आहे . खर्चाचा भार सोसण्यास आपण तयार असेल तर ताशे आपले चुलत्यांना विचारून पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर येडगे
24-06-2023
yedagesagar@gmail.com
मा. महोदय,
ग्रामपंचायत मालकीच्या खुल्या जाग्याची मा.सीईओ साहेबांची भाडे तत्वावर करणे करिता परवानगी मिळाली आहे,
आत्ता कायदेशीर नोंदणी कुत भाडे तत्वावर करणे करिता काय प्रोसेस आहे.....
भाडेपट्टा दस्त तयार करून , आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन ते नोंदणीकृत करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar patil
23-06-2023
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की आम्ही 2018 ला वहिवाटीचा रस्ता खुला करून द्यावा असा मामलेदार कोर्ट 1906 ची कलम पाच नुसार तहसीलदारांकडे अर्ज केला आहे 2018 पासून आमचा व जबाबदार यांच्या तारखा चालू आहेत विषय असा झाला आहे की आत्तापर्यंत तीन तहसीलदारांनी स्थळ पाणी केली आहे स्थळपाणीत आम्हाला कोणताही पर्याय रस्ता नाही असा पंचनामा तयार होतो परंतु ते तहसीलदार बदलल्यानंतर आमचे प्रतिवादी अगोदरचे स्थळ पाहणी आम्हाला मान्य नाही व नवीन स्थळ पाहणी व्हावी म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करतात व नवीन साहेबांन कडून स्थळ पाहणी करून घेतात मला म्हणायचे आहे की अगोदर केलेल्या स्थळ पाहणीस पंचनाम्यास कोणतेही मूल्य असते का नाही किंवा अगोदरच्या पंचनाम्यास काय कायदेशीर अधिकार असतो का नाही कृपया मार्गदर्शन करावे
मामलतदार न्यायालय अधिनियम नुसार रस्ता मागणी अर्जावरची चौकशी हि संक्षिप्त व अर्धा न्यायिक स्वरुपाची आहे . जास्तीत जास्त एखादे महिन्याच्या कालावधीत अश्या अर्जावर निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे . ३ तहसीलदार यांचे कालावधी असे पर्यंत अशी चौकशी पुढे ढकलता येणार नाही .
ज्या वेळी स्थळ पाहणी पंचनामा झाला असेल व त्यावर विरोधी पश्काराची स्वाक्षरी असेल तर त्यांनी परत नवीन तहसीलदार यांचेपुढे असा स्थळ -पंचनामा नाकारता येणार नाही . या शिवाय अशे कि नोटीस देऊन हि , स्थळ पाहिनिसाठी उनुप्स्थित असतील तर , त्यांना असा हि पंचनामा नाकारता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Usha Patil
22-06-2023
chaitu9289@gmail.com
महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक आरपीए- २००६/प्र.क्र १(४)/र-१, दिनांक : १७/०४/२००६ माहिती मिळावी
कृपया महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर दिनांकानुसार शोध घ्यावा. तात्काळ संदर्भासाठी पुढे लिंक दिली आहे. धन्यवाद.
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
Reply by MCS Officer | उप जिल्हाधिकारी
Question by suvarna
22-06-2023
suvarnaramesh40@gmail.com
महोदय,
माझी वारस हक्कासंबंधीची केस जिल्हाधिकारी यांचेकडे चालू असून, माझा भाउ प्रतिवादी आहे. सदर केस प्रलंबित ठेवण्याचे हेतूने माझ्या भावाच्या मुलाने जो आर्मी मधे नोकरी करतो त्याने आर्मीच्या कमांडर तर्फे एक पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे की, सदर व्यक्ती हा आर्मी मधे काम करीत असून आम्ही त्याला विशेष कामगिरी दिली असले मुळे तो सुनावणी साठी येउ शकत नाही तर आपण 2 महिन्यांनतरची तारीख द्यावी. परंतू केस मधे तो प्रतिवादी नाही. भावाने त्याला कुलमुखत्यार नेमले आहे, पण सदर व्यक्तिला व आर्मी विभागाला अशी कोणतीही नोटीस पाठवली नसताना आर्मी असे पत्र देउन सुनावणी 2 महिन्याने घ्या असे सांगू शकते का? याबाबत काय नियम आहे का? आर्मी असा हस्तक्षेप करु शकते का? कृपया मार्गदर्शन करावे.
पीठासीन अधिकारी यांनी, आपल्या बंधूंनी त्याच्या मुलाला जो आर्मी मध्ये नोकरी करतो त्याला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत जे प्राधिकार पत्र दिलेले आहे ते मान्य करावयाला नको होते. आपण पीठासीन अधिकारी यांच्याकडे या नियुक्तीला आक्षेप घेऊन अन्य व्यक्तीस , जी सुनावणी कामे कायम हजर राहू शकेल, त्याला नियुक्त करण्याबाबतचे आदेश पारित करण्याबाबत पाठपुरावा करा. जर आपली विंनती मान्य केली नाही तर त्या विरुद्ध अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amar Mapari
20-06-2023
amarmapari@gmail.com
क्र: भूमापन -१०८६/६८/४९६६/ ल-१, दिनांक ४ नोव्हेंबर १९८७ महसुल व वनविभाग,शासन GR मिळणेबाबद
कृपया महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर दिनांकानुसार शोध घ्यावा. तात्काळ संदर्भासाठी पुढे लिंक दिली आहे. धन्यवाद.
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions७
Reply by MCS Officer | उप जिल्हाधिकारी
Question by सुभाष पाटील
19-06-2023
subhashpatil7867@gmail.com
जय हिंद सर
मी माजी सैनिक आहे
माझ्या वडिलांनी मला 2002 मध्ये 26 गुंठे पैकी 1 गुंठा जागेचा खरेदीखत करून दिले कारण मला घरकुल मंजूर झाले होते माजी सैनिक कल्याण योजनेतून तरी सदरील जागेचा फेरफार ही करण्यात आला पण 2012 मध्ये वडील मयत झाल्यावर भावानी वाटणीपञ करताना त्या जागेला वाटणी मध्ये परस्परात करुन त्या नावाला कमी करण्यात आले अणि सदरील जागेवर माझे 2 प्रशस्त घर आहे अणि 2020 पर्यंत नमुना नंबर 8 सुद्धा आहे पण भावाने आणि त्याच्या मुलाने काही बनावट बाँड च्या माध्यमातून त्यांनी ग्रामपंचायत मध्ये नोंद केली अणि सतत मारून अणि उचलून नेण्याची धमकी देत आहे माझ्याकडे सत्य खरेदी खत अणि त्या संबंधित सातबारा आणि फेरफार सुद्धा आहे
1)तरी 1 गुंठा पुन्हा सातबारा वर आणण्यासाठी काय करता येईल
2)आणि माझे घर पुन्हा मला कशे मिळतील
आपण आपल्या भावासमवेत जे वाटणी पत्र झाले ते कोणत्या पद्धतीने झाले? त्या वाटणी पत्राला आपण संमती दिली का?? जर आपली संमती नसेल व आपल्या बंधूंनी त्याचे वाटप करून अन्य बंधूच्या नावावर वाटपास केल्याचे दाखवलेले असेल, तर असे वाटप पत्र आपण आव्हानित करा. मात्र जे वाटप झाले त्याला जर आपण संमती दिलेली असेल तर जागा केवळ त्या व्यक्तीच्या नावे राहील मात्र त्यावरील घरावरचा हक्क किंवा प्रशस्त बंगल्यांवरचा हक्क हा आपलाच राहणार आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
