जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by sandeep dattatray dalvi
24-11-2023
SSANDEEPDALVI@GMAIL.COM
आपण स्टॅम्प वेंडर कडून स्टॅम्प खरेदी करतो, त्यावरती अनुच्छेद क्रमांक चार फक्त प्रतिज्ञापत्रासाठी असा शिक्का असलेले स्टॅम्प इतर बँक कामी, हायपोथिकेशन डीड, लोन एग्रीमेंट, अशा कामासाठी वापरू शकतो का? किंवा मोठ्या रकमेच्या हायपोथिकेशन डीड, लोन एग्रीमेंट साठी जर वापरले असतील आणि कर्जदार डिफॉल्टर झाला तर भविष्यात बँकेला कायदेशीर रित्या धोका असू शकतो का? किंवा यामुळे बँक किंवा ग्राहक अडचणीत येऊ शकतो का?
कृपया मार्गदर्शन करावे..
धन्यवाद!
ज्या दोन पक्षकारांमध्ये कोणताही दस्त निष्पादित होणारा असतो त्या पक्षकारांपैकी एका पक्षकाराच्या नावे मुद्रांक कागद खरेदी केलेला असणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या मुद्रांक कागदावर, दुसऱ्या व्यवहारा चा, अनुच्छेद नमूद केलेल्या कारणास्तव, असा निष्पादित केलेला दस्त हा अवैध ठरत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भास्कर दशरथ पिंपळे
21-11-2023
kiranpimpale1997@gmail.com
नमस्कार महोदय, मि भास्कर दशरथ पिंपळे आदिवासी भिल्ल समाजाचा असून मौजे रहिमपुर ता.संगमनेर जि अहमदनगर येथील कायमचा रहिवासी आहे.माझे वडिल कै.दशरथ शिवराम पिंपळे यांनी रहीमपुर येथील सरकारी जमिनवर सन १९७४ पुर्वी पासून २हे२०आर एवढ्या क्षेत्रावर अतिक्रमण करुन वहिति करत होते.व् आज मि करतोय. त्यापैकी २१ आर क्षेत्र सन १९७९ ला नियमित करण्यात आले उर्वरित क्षेत्र १हे९९आर आजही माझ्या ताब्यात आहे ते
माझ्या वडिलांच्या नावावर नियमित करण्यासाठी मि प्रयत्न करतोय कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद
आपले क्षेत्र जे नियमित करण्यात आले ते शेती कारणासाठी नियमित करण्यात आले असेल .आपणाकडे अन्य उर्वरित आपल्या मालकीची जमीन नसेल तर , २ हेक्टर मर्यादेपर्यंत , जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण नियामाकुल करता येते .
मात्र त्यासाठी आपणाकडे , आपले अतिक्रमण आहे याचा कागदोपत्री पुरावा असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by satyjeet shinde
13-11-2023
satyjeet.shinde777@gmail.com
Caste certificate issue karnyache aadhikar kontya department la aahet. thethe konta jababdar Aadhikari asto.
जात -प्रमाणपत्र देण्याचे अधिकार , महसूल विभागाच्या , उपविभागीय अधिकारी यांना आहेत . उप - विभागीय अधिकारी यांना , जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे विनियमन कायदा २००० अन्वये , सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandesh Gajanan Zalke
12-11-2023
sandeshzalke96@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे. कि माझ्या शेतीची अपिल ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे चालू होती व नंतर त्या आपिलीचा निकाल हा माझ्या विरुद्ध लागला व लगेच मी त्याला त्या निर्णयाला अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल दाखल केली व निर्णय हा प्रलंबित आहे व अपिल चालू असताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी त्या प्रकरणात नवीन फेरफार घेतला. या बद्दल सविस्तर माहिती दयावी.
अप्पर जिल्हाधिकारी यांनी , उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशास स्थगिती दिली नसेल तर , नवीन फेरफार अभिलीखीत करणे व प्रमाणित करणे, अवाजवी अथवा गैर नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rohidas sakharam pabale
09-11-2023
yashsurveyors2008@gmail.com
मा. तहसीलदार यांना सात बारा वरील इतर अधिकारातील धरणग्रस्तासाठी राखीव शेरे कमी करण्याचे अधिकार आहे का असल्यास त्याबाबत काही जीआर परिपत्रक आहे का अधिकार नसल्यास असे शेरे कमी केले असल्यास तहसीलदार यांच्यावर काय कारवाई होऊ शकते त्याची तक्रार कोणाकडे करावी
महाराष्ट्र प्रकल्प बाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कलम १२ अन्वये , जिल्हाधिकारी यांचेमार्फत , लाभ क्षेत्रातील जमीन , प्रकल्प बाधीत व्यक्तीसाठी आवश्यक नाही अशी अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करतात . या अधिसूचनेद्वारे , तहसीलदार , अश्या राखीव मालमत्तेच्या , अधिकार अभिलेख पत्रकाच्या इतर अधिकारातील धरन ग्रस्त राखीव शेरे कमी करण्याची कार्यवाही केली जाते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by subhash Pandharinath mali
09-11-2023
spmali1949@gmail.com
bhoodanat prapt jamini babat watap na zalelya jaminichi mahati kothe milel
Question by अजय देवकत्ते
09-11-2023
Devkatteajay@gmail.com
2015 मध्ये शेतजमिनीत 2 गुंठे जागा खरेदी खत करून घेतली आहे. पण त्यावेळी त्याची 7/12 ला नोंद लावून घ्यायची राहीली आहे. आता ती नोंद होऊ शकते का आणि होत असेल तर काय करावे लागेल?
महाराष्ट्र धारण जमिंचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे अधिनियम याच्या उपबंधानुसार , शेतजमिनीची २ गुंठे क्षेत्रापुरती विक्री करता येत नाही . २ गुंठे क्षेत्रासाठी अधिकार अभिलेख पत्री नोंद होऊ शकत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Niwrutti purushottam kawate
31-10-2023
kniwrutti7005@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची चार ठिकणी घर जागा आहे.
माझ्या आजोबांना दोन मुले होती सर्वात मोठे माझे वडील होते.
माझ्या आजोबा मयत झाल्यावर नियमाप्रमाने माझ्या वडिलांचे नाव सर्व घर जागे वर ग्रामपंचायत ला लागली.
पण कालांतराने माझ्या वडिलांचे त्याच्या लहान भावांशी भांडणे होऊ लागली त्यामुळे माझे वडिल दुसरीकडे रहावयास गेले.
पण सन 1984 ला सिटी सर्व्हे झाला त्यावेळेस माझ्या काकांणी माझ्या वडिलांच्या जागी मीच ऐकटा आहे असे सांगितले ऐ कु मे आहे असे सांगितले आणि सिटी सर्व्हे ला त्यांचे नाव लावले.
1) माझ्या वडिलांचे नाव सिटी सर्व्हे ला लावण्यासाठी काय करावे लागेल
2) ग्रामपंचायत आता नगर पंचायत झाली आहे आणि त्या जागेवर अजुनही माझ्या वडिलांचे नाव आहे 8A ला. आणि मी सर्व घरपट्टी पण भरली आहे
3) माझ्याकडे जून्या नोंदीपण आहे ग्रामपंचायत जागेचे माझ्या वडिलांच्या नावे
4) सिटी सर्व्हे ला नाव लावण्यासाठी काय करावे लागेल माझ्याकडे कोर्टाचा वारस दाखला पण आहे
5) त्या सर्व जागा धरण पुनर्वसनात जाणार आहे.
6) ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या सर्व ठिकाणी माझ्या वडिलांचे नाव आहे.
7) सिटी सर्वे ला अधिकार आहे का ग्रामपंचायत ची नोंद कोणाच्या नावे आहे ते पडताळून न बघता
सिटी सर्वे ला कोणाचेही नावे लावावीत.
आपल्या गावाला नगर भूमापन योजना केंव्हा लागू झाली झाली ? चौकशी अधिकारी यांच्या , जमीनिवर कब्जा करण्यास कोण पात्र आहे या निर्णयावर , जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अपील करावे . जर अपील कार्याचा कालावधी संपुष्टात आला असेल तर , आपण विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम या अंतर्गत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून मालकी हक्क जाहीर करून घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Niwrutti purushottam kawate
31-10-2023
kniwrutti7005@gmail.com
सर माझ्या आजोबांची वडिलोपार्जित
शेती महाजनको ने नवीन पॉवर प्लांट साठी 2007 साली अधिग्रहित केली आहे. सर्व मिळुन क्षेञफळ 4 हेक्टर. माझा असा प्रश्न आहे कि
माझ्या आजोबांचे निधन १९९४ या साली झाले आहे आणि इतर वारस सुद्धा लागलेले आहे जेव्हा जमीन संपादित झाली तेंव्हा सर्वे मिळून ५ वारस लागलेले होते.
माझे वडील आणि त्यांचे दोन भाऊ आणि २ बहिणी.
१) माझ्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि मला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट हवे आहे जॉब साठी, तर मला असे विचारायचे आहे कि मला इतर जे वारसदार आहे त्यांचे संमतीपत्र घ्यावे लागेल का प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळवण्या यासाठी ,किंवा इतर दुसरा पर्याय आहे का प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी.
२) कोण कोणते कागदपत्रे लागतात प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी .
३) इतर वारसदार काही हरकत घेऊ शकतात का जर त्यांच्यी संमती जर नाही घेतली तर
४) आणि मला प्रकल्पग्रस्त दाखला कुठे मिळू शकेल कृपया माहिती द्या
५) सर्वे नंबर एकाच असल्यामुळे एकाच सर्टिफिकेट मिळेल कि सर्वाना सर्टिफिकेट मिळेल कारण जमीन संपादित झाली त्यावेळेस सातबारा वरती ऐकून 5 नावे होती.
मला असे सांगण्यात आले आहे कि आता कायदा बदल्या मुले आता इतर वारस दारांचे संमती पात्र लागत नाही असे सांगण्यात आले आहे . ते खरंच आहे का ???
आणि असेल तर मला प्रकल्पग्रस्त चा दाखला मिळू शकतो का
६) माझ्या वडिलांच्या बहिणीचे निधन झालेले आहे तर त्यांचा मुलांचे संमती मला घ्यावी लागेल का कि फक्त मृत्यू दाखला दिला तरी चालेल का ?
सर कुपया लवकरात लवकर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे
नवीन काही नियम आला आहे का या विषयी
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
१. आपली जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी संपादित झालेली आहे त्याबाबतचा अधिकृत पुरावा जसे की संपादन निवाडा, किंवा संपादन संस्थेचे नाव दाखल करण्यासाठी अभिलेखित करून प्रमाणित केलेला फेरफार चा उतारा.
२. सर्व कायदेशीर वारसांचे आपणाला प्रमाणपत्र देण्याबाबतची संमती
३. जी जमीन संपादित झालेली आहे त्यासाठी केवळ एकच प्रमाणपत्र मिळण्यास आपले कुटुंब पात्र आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गजानन भिकनराव काळे रा sawdad तालुका sidhkhed raja जिल्हा बुलढाणा
27-10-2023
dgkale29@gmail.com
अतिवृष्टी झाल्यामुळे शासनाने सिंदखेड राजा तालुका हा अतिवृष्टी ग्रस्त तालुका म्हणून घोषित केला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अनुदान जाहीर केले मी माझे आधार ऑनलाईन केवायसी केले मला vk number 2324RNRHR3986SAW02531690नंबर सुद्धा मिळाला चाळीस दिवस झाले अजून माझ्या खात्यात अनुदान जमा झाले नाही तरी मेहरबान साहेबांना माझी विनंती आहे माझी अडचण लवकरात लवकर दूर करावी व माजी अनुदान मला मिळून द्यावे विनंती
प्रथमता ज्यावेळेस अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे आपल्या शेतीची जी काही नुकसान झालेले आहे त्याचा पंचनामा स्थानिक तलाठी यांनी केलेला आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. जर आपला शेतीचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा स्थानिक तलाठ्यांनी केलेला असेल तर आपण आपल्या तालुक्याच्या तहसीलदार साहेबांना भेटून आपल्याला अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही ही बाब त्यांच्या कानावर घाला. जर यालाही काही प्रतिसाद मिळाला नाही अथवा आपल्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसानीची भरपाईची रक्कम जमा झाली नाही तर आपण आपले सरकार नावाच्या संकेतस्थळावर आपली तक्रार दर्ज करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by NANDADEEP PANDURANG PARAB
24-10-2023
parabnandadeep@gmail.com
Government central employees buy land Do they need the department's permission to buy agricultural land?
As far as I know, permission is not required to buy agricultural land. But you'll need to report property acquisition to the Central Government according to the mandate of Civil Service Rules.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by NANDADEEP PANDURANG PARAB
24-10-2023
parabnandadeep@gmail.com
महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याची लष्कराच्या जवानाला नियम व कायदे काय आहेत
असा जवान मुळात शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजे त्याचेकडे पूर्वीची त्याच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे अथवा तो शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Name
21-10-2023
ravip123@gmail.com
नमस्कार पाणबुडे साहेब,
तालुका देवगड, गाव पोय रे येथील आकार फोड झाल्यानंतर सातबाऱ्यावर परत जुनी नावे आलेली आहेत ( जी सरकारी नोंदणीकृत आणि स्टॅम्प ड्युटी भरून हक्कसोड पत्र केलेली नावे ). ती नावे परत सातबारा वरून वगळण्या संदर्भात चौकशी केली असता असे समजले की 155 चा फॉर्म भरून तहसीलदार साहेबांकडे द्यावा लागेल.
प्रश्न असा आहे की 155 चा फॉर्म सात बारावरील नाव असलेल्या खातेदाराने भरून द्यावा का ?? की तलाठी साहेब तहसीलदार साहेबांकडे परपर संपर्क करून 155 चा फॉर्म भरतील आणि सातबाऱ्यावरील नावे वगळतील.
खातेदाराने 155 चा फॉर्म भरावयाचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतील.
कृपया माहिती द्यावी.
आपला हक्कावर बाधा निर्माण झाली असेल तर आपण हि अर्ज करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh
14-10-2023
maheshsarode383@gmail.com
नमस्कार साहेब
आमचा कोर्टात दावा सुरू होता त्यात निकाल सामनेवाले जिंकले आम्ही तारखेला न गेल्यामुळे, ती मिळकत त्यांनी परस्पर विकली आम्ही त्यांच्या जुन्या निकालाला कोर्टात अपील केलेय, विक्री झाल्याने,आता ती मिळकत तिसऱ्या व्यक्तीच्या नावे आहे तर तर अपील केलेल्या केस मध्ये निकाल आपल्या बाजूने लागल्या नंतर विक्री झालेले खरेदी दस्त आपोआप रद्द होईल की वेगळा दावा करून रद्द करून घ्यावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे.
खरेदीदार जर , प्रामाणिक अथवा सद्भावपूर्ण खरेदीदार असेल तर , विक्री केलेली जमीन आपणास परत मिळणार नाही . आपणास , जमिंनिमधील , आपल्या हिस्स्याचे मोबदला रक्कम व्याजासह परत मिळेल . जर खरेदीदार प्रामाणिक खरेदीदार नसेल तर आपणास जमीन परत मिळेल .
प्रामाणिक खरेदीदार - ज्याने जमीन खरेदी करण्यापूर्वी , जमिनीवर कोणाचा दावा , हक्क / हितसंबंध आहे का याची नोटीस वृत्तपत्रात दिली आहे व कोणतीही हरकत आलेली नसेल तसेच मिळकतीचे मालकी -हक्क बाबत शोध प्रमाणपत्र घेतले आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Trupti
11-10-2023
truptimulmule190@gmail.com
जमीनेचे मुळ मालक वा त्यांचे कोणीही वारस हयात नाही. जमिनीचा ताबा 100 वर्षापासून दुसर्यांकडे आहे, घराची सर्व बिले ताबा असणार्यांच्या नावे आहे मात्र ज्यांचा ताबा आहे त्यांची नावे आखीव पत्रिकेवर नाही. आखीव पत्रिकेवर नाव घेण्यासाठी काय करावे.
आखीव पत्रिका म्हणजे मिळकत पत्रिका आहे . याचा अर्थ म मिळकत ज्या गावात आहे त्या गावाचे , नगराचे भूमापन झाले आहे . नगर भूमापन चौकशी वेळी , ताबा धारकाने त्याच्याकडे असलेले पुरावा सादर का केले नाहीत ? नगर भूमापन चौकशी विरुध्द , जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल संहिते अंतर्गत अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by GANESH Sanjay patil
09-10-2023
st46548@gmail.com
सर नमस्कार ... माझा एक अडचींविषयी प्रश्न पडला आहे.. मी खूप दिवसापासून प्रश्न कायदेशीर उत्तर हवं आहे जेणकरून काही अडचण येणार नाही. माझ्याकडे महाराष्ट्र domicile certificate आहे तर मला दुसऱ्या प्रातचं domicile certificate काढायचं आहे परंतू महाराष्ट्र domicile certificate राहू देऊ का? काय करू ? मला कायदएशिर मदत करावी अशी नम्र विनंती करत आहे..
Question by Sangram
30-09-2023
sangramgarud@gmail.com
कोर्ट ने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी
वडिलोपार्जित जमीन वाटप त्या विषयी सविस्तर माहिती हवी 1985 चा निकाल पण
अंमलबजावणी नाही
Question by Sangram
30-09-2023
sangramgarud@gmail.com
न्यायालयाकडील न्याय निर्णय , वेळोवेळी झालेले नोंदणीकृत दस्त ,फेरफार , ह्याच्या आधारे मालमत्ता पत्रका मधे कोणाचे किती क्षेत्र आहे हे ठरविण्याचे अधिकार नगर भु मापन अधिकारी ह्यांना आहेत का बहिणे वासर नोंद अर्ज केल्या नंतर भावा कडून इतर दस्त नगर भु मापन अधिकारी याना सादर करण्यात आले.
Question by सुभाष गणपत जाधव
30-09-2023
jadhavsubhash146@gmail.com
माझ्या आजोबाच्या नावावर 54/55 आहे पण फॉरेस्ट कडे वर्ग झाली आहै जूने फेरफार आजोबांचा नावाने आहेत, तर आमी अर्ज कुठे करू
Question by Sarang Sharma
26-09-2023
sarang.sharma@gmail.com
आमच्या वडिलांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या स्वकष्टार्जित जागेचे वाटप करून 3 मुलांना 7-12 नवे करून दिले. त्यानंतर 3 भावांनी मिळून त्या जागेचे एकत्रितपणे NA Layout केले. त्यामुळे सर्व प्लॉट ला 3 भावांनी सामायिक नाव 7-12 ला लागले. आता 3 भावांना सर्व प्लॉट चे वाटप करायचे आहे. यासाठी तहसीलदार कडे 100 रुपयांच्या स्टॅम्प वर अर्ज करून वाटप करता येईल का? यासंदर्भात कोणते GR पाहावे?
आणि जर या पद्धतीने होत नसेल तर दुसरा कोणता मार्ग अवलंबता येईल ज्यामध्ये खर्च कमीत कमी येईल?
नगर विकास विभागाने मान्यता दिलेल्या प्रादेशिक योजना व त्या खालील बांधकाम नियमावली अंतर्गत , अभिन्यासास ( lay-out) मंजुरी दिली , तर त्याचे विभाजन अथवा वाटप नियोजन प्राधिकारी ( ग्रामीण भाग - जिल्हाधिकारी ) यांचे परवानगी शिवाय करता येत नाही . बांधकाम नियमावली याच्या अनुषगाने , विभाजन अनुद्नेय होत असेल तरच जिल्हाधिकारी परवानगी देतात . अन्यथा नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Navnath g dharpale
23-09-2023
navnathdharpale85@gmail.com
नमस्कार सर सर्वे क्रमांकाचे फाळणी होऊन दोन गट नंबर तयार झाले 1965 ला त्यानंतर 1970 71 मध्ये दोन्ही गटातील अर्धी अर्धी जमीन एकमेकांना जोडण्यात आली परंतु गट नकाशे 1965 चे तसेच ठेवून त्याखाली विनास स्केलचे नकाशा काढण्यात आला गट बुक ची नक्कल काढले असता त्यामध्ये भू नकाशा पूर्वीप्रमाणे आहे व त्याच्या खाली कच्चा नकाशा हा जागेवरील वहिवाटीनुसार आहे व तो अपडेट नाही तो विनाशकेलचा काढण्यात आलेला आहे दोन्ही गटांच्या आजपर्यंत कोणतीही मोजणी झालेली नाही कृपया मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे अधिनियम अंतर्गत जी एकत्रीकरण योजना झाली आहे , त्यामध्ये कोणताही दोष नाही . मात्र केवळ मंजूर एकत्रीकरण योजनेनुसार , नकाशा तयार करण्यात आलेला नाही . तसेच क्षेत्रामध्ये कोणताही बदल नाही . एकत्रीकरण योजनेनुसार गट नकाशा नाही हि चूक आहे . सदरची चूक हि लेखन प्रमाद चूक आहे . उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३१ अ अन्वये, जिल्हा अधीक्षक भूमिलेख यांचेकडे अर्ज करा .
WRIT PETITION NO. 13506 OF 2018 , Shri Namdeo Narayan Kadam and others Vs State of Maharshtra , ( https://indiankanoon.org/doc/6973320/?type=print) या प्रकरणात मा उच्च न्यायालयाने , न्यायतत्व प्रस्थापित केले आहे , कि गट बुक नकाशातील चूक हि , लेखन प्रमाद चूक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Navnath g dharpale
23-09-2023
navnathdharpale85@gmail.com
नमस्कार सर सर्वे क्रमांकाचे फाळणी होऊन दोन गट नंबर तयार झाले 1965 ला त्यानंतर 1970 71 मध्ये दोन्ही गटातील अर्धी अर्धी जमीन एकमेकांना जोडण्यात आली परंतु गट नकाशे 1965 चे तसेच ठेवून त्याखाली विनास स्केलचे नकाशा काढण्यात आला गट बुक ची नक्कल काढले असता त्यामध्ये भू नकाशा पूर्वीप्रमाणे आहे व त्याच्या खाली कच्चा नकाशा हा जागेवरील वहिवाटीनुसार आहे व तो अपडेट नाही तो विनाशकेलचा काढण्यात आलेला आहे दोन्ही गटांच्या आजपर्यंत कोणतीही मोजणी झालेली नाही कृपया मार्गदर्शन करावे
Question by सागर
20-09-2023
sagarkandekar1990@gmail.com
गावठाण मध्ये 7 CTS प्लॉट असून सर्व गटात माझ्या आजोबांचे मोठे भाऊ यांचे मूळ मालक म्हणून ए.कु.क म्हूणन नाव लावले आहे.आज दोन्ही आजोबा मयत आहे तर आमचे वारस नोंद होऊ शकते का ?
Question by महेश
20-09-2023
maheshsarode383@gmail.com
मा. पाणबुडे साहेब
फेरफार नोंद ही हितसंबंध असलेल्या जमीन धार काला नोटीस न देता प्रमाणित केले असल्यास ती नोंद बेकायदेशीर असते ह्या विषयी उच्च न्यायालयाचा निकाल असेल तर त्याबद्दल सांगावे नम्र विनंती
महसूल संहितेच्या कलम १५०(२) अन्वये , हक्क संपादनाची वर्दी नोटीस सर्व हित्साबंधीतांना देणे बंधनकारक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by amrut shashikantrao advant
19-09-2023
amrutadvant@gmail.com
mazya sheta lagat shiv asun shivechi lambi rundi mala kuthe milu shakel. ki nahi milnar
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
