जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by firoz
02-08-2023
7firoz8mulla6@gmail.com
khredi detana chatushima chuklya ahet, ata kay karayche? gharedidar dam dati kart ahe, gat putlela nahi.
विक्री दस्तामध्ये नमूद क्षेत्र जेवढे आहे त्याचे सीमांकन , भूमी अभिलेख यांचेकडून करून घ्या . खरेदीदाराने आडकाठी केल्यास कलम १३५ अन्वये , जिल्हाधिकारी यांच्डे कडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by firoz
02-08-2023
7firoz8mulla6@gmail.com
agrahakka kayda va tya chi mahiti milel ka
Question by Vaibhavraj Maruti Mule
31-07-2023
mulevaibhavraj29@gmail.com
सर, जर एखाद्याची शेतजमीन १७ गुंठे आहे आणि ७/१२ सेपरेट आहे आणि ती शेतजमीन आम्हास विकत घ्यायची आहे परंतु प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे तर त्याजमिनीची खरेदी कशी करावी.
जमिनीचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर , अश्या जमिनीची खरेदी खालील परीस्थितीत करता येऊ शकेल .
१. आपण खरेदी करावयाच्या जमिनीचे / भूखंडाचे लगतचे खातेदार आहात .
२, खरेदी करावयाची जमीन , प्रादेशिक योजनेतील बिगर-शेती , जमीन वापर विभागात ( झोन ) मध्ये स्थित आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितीन kanherkar
30-07-2023
nitin.kanherkar@gmail.com
ई पीक पहाणी app खूप दिवस झाले बंद आहे. शेतकऱ्यांना ई पीक upload होत नाही..शेतकऱ्यांच्या कर्ज करण्यासाठी अडचण येत आहे..कृपया करून aap update or चालू करावे..धन्यवाद
Question by Dr. Pravin Shamrao Uike
28-07-2023
pravin_vike@yahoo.co.in
nagar bhumapan zhalelya kshetratiladhikar abhilekhache malki hakkache duheri nond padthati band karnebabatche ( 7/12 ANI nAGAR BHUMAPAN) gr milnebabat
Question by Harshad Raje
27-07-2023
ceaser.casinova@gmail.com
७/१२ च्या इतर अॅवार्ड नमुद आहे, कमी कसे करावेत?
Question by Pravin Jagannath Rajmane
27-07-2023
pravin.j.rajmane@gmail.cok
Amchi ghartil jaga parspar dusrychya navavr city serve madhye lagli ahe. Kontahi kharedi khat kinva vywahr jhala nahi. Ani amcyakde tya adhiche purave ahet ki ti jaga amchi ahe.
नगर भूमापन चौकशी केंव्हा झाली आहे ? आपणास दिवाणी न्यायालयात मालकी हक्क निच्छित करणे बाबतचा दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar patil
26-07-2023
sp109391@gmail.com
सर नोदनी कृत साठे खताची नोद 7/12 वरती घेता येते का
Question by Hemant
26-07-2023
bharanehemant@gmail.com
आमचे गावात किराणा मालाचे दुकान असून गेली 35 वर्ष आम्ही व्यावसाय करीत आहोत. व्यावसाय ज्या जागेत आहे ती मिळकत माझे वडिलांचे नावावर असून निवासी कर नियमित भरत आहोत. आमच्या शेजारी व्यक्तीने ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे की, आम्ही 35 वर्षापासून निवासी जागेत व्यावसाय करीत असून निवासी कर भरत आहे तर 35 वर्षाचा व्यावसाय कर वसूल करावा. निवासी जागेत व्यावसाय करता येत नाही का? व्यावसायिक वापराकरीता ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असते का? आमच्याकडे किराणा व्यावसायासाठीचा अन्न व प्रशासन विभागाचा परवाना नाही. याचा काही समस्या येउ शकते का? आता आम्ही काय केले पाहिजे म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ग्रामपंचायतीकडे जो कर भरत आहात तो कर ग्रामपंच्यात यांनी आकारणी करून निच्छित केला आहे . कर - आकारणी सुधारित करण्याचे अधिकार हे केवळ ग्रामपंच्यात यांना आहेत . जो पर्यंत ग्रामपंचायत यांचेकडून आपणास नोटीस येत नाही तो पर्यंत चिंता नसावी . किराणा माल विक्रीची साठी परवाना आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain Sahil Shaikh
26-07-2023
kaunainshaikh2780@gmail.com
७० वर्ष पूर्वीचि वारस नोंदिला अपिल दाखल करता येइल का?
आत्याला अपत्य नसल्याने,
चार भाऊ असतांना,
फ़क्त एकाच भाऊ च्या एकाच मुलाचे नाव दाखल केले आहे.(तोंडि दत्तक घेतलेले होते.)
मुळ जमींन आत्या च्या पती चि आहे.
जमींन नवीन अविभाज्य शर्ती चि आहे.
Question by सागर बनसोड
26-07-2023
sppbansod019@gmail.com
कोतवााल भरती व नेमणूक नियम, १९५९ या बद्दल पक्का पुरावा मिळेल का ? अर्जाची शेवटची तारीख 4 /8/2023 आहे. कृपया मदत करा
Question by rajendra vartak
24-07-2023
rajendravartak2020@gmail.com
कूल व मालक यांच्या मध्ये जमीनीचे वाटप कसे होते
कुळ वहिवाट संबंध हे दोन प्रकारे तयार होतात.
१. संविदात्मक
२. कायद्याने तयार होणारे
१. संविदात्मक -या मध्ये भाडेपट्टा याद्वारे निर्माण होणारे
२. कायद्याने तयार होणारे - या मध्ये शेतजमीन असेल तर , शेतजमीन , कुलवाहीवाट कायदा नुसार. तर अनिवासी मालमत्ता असेल तर भाडे नियंत्रण कायदा .
साविदात्मक कुलवहिवाट हि भाडेपट्टा कालावधी संपला कि संपुष्ट येते व त्यामुळे संपूर्ण जमीन मालकाकडे जाते . या वाहिवातीमध्ये पत्तेदाराला केवळ , मिळकतीचा ताबा मिळतो व उपभोग घेण्याचा अधिकार निर्माण होतो . त्यामुळे अशी जमीन जर साविदात्मक कालावधी चालू असताना , संपादित झाली असेल तर , शिल्लक राहिलेल्या कालावधी विचारात घेऊन , नुकसान भरपाई रक्कम मालक व पत्तेदार यांचेमध्ये वाटप केली जाते .
जी कुलवहिवाट कायद्याने निर्माण झालेली असते त्याबाबतीत , ६०:४० हे प्रमाण विचारात घेऊन नुकसान भरपाई वाटप केली जाते . मात्र जमिनीचे वाटप कुल व मालक यांच्यात होऊ शकत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कुळ वहिवाट संबंध हे दोन प्रकारे तयार होतात.
१. संविदात्मक
२. कायद्याने तयार होणारे
१. संविदात्मक -या मध्ये भाडेपट्टा याद्वारे निर्माण होणारे
२. कायद्याने तयार होणारे - या मध्ये शेतजमीन असेल तर , शेतजमीन , कुलवाहीवाट कायदा नुसार. तर अनिवासी मालमत्ता असेल तर भाडे नियंत्रण कायदा .
साविदात्मक कुलवहिवाट हि भाडेपट्टा कालावधी संपला कि संपुष्ट येते व त्यामुळे संपूर्ण जमीन मालकाकडे जाते . या वाहिवातीमध्ये पत्तेदाराला केवळ , मिळकतीचा ताबा मिळतो व उपभोग घेण्याचा अधिकार निर्माण होतो . त्यामुळे अशी जमीन जर साविदात्मक कालावधी चालू असताना , संपादित झाली असेल तर , शिल्लक राहिलेल्या कालावधी विचारात घेऊन , नुकसान भरपाई रक्कम मालक व पत्तेदार यांचेमध्ये वाटप केली जाते .
जी कुलवहिवाट कायद्याने निर्माण झालेली असते त्याबाबतीत , ६०:४० हे प्रमाण विचारात घेऊन नुकसान भरपाई वाटप केली जाते . मात्र जमिनीचे वाटप कुल व मालक यांच्यात होऊ शकत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अतुल
22-07-2023
atul.bhalerao74@gmail.com
माझे चुलते अनुसूचित जाती प्रवर्गात असून त्यांनी १९८५ मध्ये १ हेक्टर शेतजमीन खरेदी केली. त्यांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेवून त्यांना दुसरीच जमीन दाखवण्यात आली. नावावर असलेली जमीन पाणथळ असून शेतीयोग्य नाही, करत असलेली जमीन हे सरकारी गायरान असल्याचे समजले. सध्या कसत असलेली जमीन मिळवण्याचा काही सरकारी उपाय आहे का ?
गुरचरण जमीन नवीन कलम २२-अ नुसार खाजगी व्यक्तीला देता येत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vilas misal
21-07-2023
Vilasmisal1992@gmail.com
नमस्कार सर. माझे आजोबा यांनी स्वकष्टाने कमावलेले घर आहे.व ते 1995 मध्ये मयत झाले आहे.त्याना 2 मुल व बायको आहे व या पैकी कायद्याने कुणाचे मालकी हक्क आहे
Question by YOGESH RUDRUKE
21-07-2023
yogeshrudruke@gmail.com
नमस्कार सर माझे 162,164,168 व 170 असे चार गट नंबर आहेत त्यापैकी 162, 164 व 168 या गट नंबर च्या सातबारा उताऱ्यावर खाते क्रमांक 2487 असा आहे व गट नंबर 170 च्या सातबारा उताऱ्यावर खाते क्रमांक 2178 असा आहे. असे दोन खाते क्रमांक (8A) उतारे असू शकतात का?
तसेच ऑनलाईन mahabhumi site वरून चारही गट नंबरचे सातबारा उतारे डाऊनलोड होत आहेत. परंतु आठ अ चे दोन्ही उतारे डाऊनलोड होत नाहीत त्यासाठी काय करावे लागेल ?
दोन खाते असू शकत नाही . एकाच खाते असावयाला पाहिजे . नावात spelling- mistake कदाचित असेल त्यामुळे दोन खाते तयार झाले असतील . तलाठी यांचेशी संपर्क साधून एकाच खाते तयार करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश घोलप
20-07-2023
yogeshgholap50146@gmail.com
सर नमस्कार .
माझे वडील 2022 मध्ये मयत झाले आहेत. त्यांनी साधारण 30 वर्षापूर्वी 20 गुंठे जमीन खरेदी केली होती. त्यांनी त्या जमिनीचे सर्व पैसे समोरील व्यक्तीला अदा केले आहेत. परंतु जमीन खरेदी करताना त्यांनी जमीन खरेदी बाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. माझे वडील मयत झाल्यानंतर समोरील व्यक्तीने जमीन ताब्यात घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तरी योग्य मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
जर आपल्या पिताश्री यांनी , जमीन संपादन/ खरेदी मोबदला बँक धनादेश द्वारे दिला असेल तर आपण सिद्ध करू शकता कि देण्यात आलेला मोबदला हा जमींन खरेदीसाठी दिलेला होता . न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sameer Shaikh
18-07-2023
sameer440shaikh@gmail.com
माझ्या वडिलांना पुनर्वसन अंतर्गत प्लॉट देण्यात आले होते 1990 मध्ये त्यांनी स्वत: च्या पत्नीला बक्षीस म्हणून तो प्लॉट दिला हस्तातर देत असताना जिल्हाधिकारी यांची परमिशन घेतली नाही पत्नीला पुनर्वसन अंतर्गत प्लॉट देण्यात आल असेल तर परमिशन ची गरज नाही असं शासन निर्णय परिपत्रक किंवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती द्यावी मला नितांत आवश्यकता आहे आहे
पुनर्वसन भूखंड याचे हस्तांतरण मा. जिल्हाधिकारी यांचे परवानगीनेच होते . आपण रीतसर परवानगी घ्यावी . पत्नीचे नाव सह-धारक म्हणून लावता येईल परत्तू पतीच्या जागी पत्नीचे नाव लागणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rohit Lokhande
18-07-2023
lokhanderohit82@gmail.com
साहेब,मौजे उदापूर ता. जुन्नर, पुणे ह्या आमच्या मूळ गावी आमचे वडिलोपार्जित घर आहे व घरालगत मोकळी जागा आहे. सदर घराच्या व जागेच्या मालमत्ता पत्रकावर फक्त आमचे थोरले अजोबा यांचे नाव आहे आणि नावाखाली वडिलोपार्जित अशा उल्लेख आहे. आमचे थोरले अजोबा आता हयात नाहीत. त्यामुळे भूमी अभिलेख शाखेत आमची वारस नोंद करण्यास अडचण येत आहेत. सदर घर व जागेबाबत आमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची कायदेशीर वाटणी झालेली नाही. मालमत्ता पत्रकावर थोरल्या अजोबांच्या नावापुढे ए. कु. मॅ. लावयाचे राहून गेले असेल अशी शकता आहे. तरी ह्याबाबत काय प्रकिया करून वारस नोंद करता येईल. थोरल्या अजोबांच्या नावापुढे ए. कु. मॅ. लावण्यासाठी कुठे अर्ज करावा आणि सोबत कोणते कागद पत्र जोडावे. तसेच भूमी अभिलेख शाखेत असे कोणते दस्त उपलब्ध होईल त्यावरून असे समजेल की इतर वारस असताना फक्त थोरल्या अजोबांचे नाव मालमत्ता पत्रकावर लावण्यात आले आहे. कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
मालमत्ता पत्रक आहे म्हणजे नगर भूमापन झाले आहे . नगर भू मापन चौकशीवेळी , आपल्या मिळकतिच्या मालकी हक्काबाबत चौकशी अधिकारी यांनी घेतलेल्या चौकशीचे कागद पत्र , नगर भूमापन अधिकारी यांचे कार्यालयात मिळतील . त्यावरून आजोबांचे नाव इतर वारसांचे वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दाखल झाले आहे हे कळेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rajiv uttankar
18-07-2023
rajiv_uttankar@yahoo.com
Dear Sir,
Kindly provide me a detailed clarification to the following questions in the context of Maharashtra Public Record Act 2005:
Q.1)Under which category, the following land record documents in falls in?
Enquiry register, Nagar bhumapan nakasha, tippan, Area book, Measurement Map, Gut book Map.
Q.2) For how many years the above mentioned documents shall be preserved by land record office?
Q.3) What is the expiry date till which the above mentioned documents should be preserved?
Under the Public Records Act 2005, the retention Schedule is prepared by the concerned Department and is approved by the Director of Archives, Maharashtra State, Pune. Check with the Land Record Department. I am not aware about the retention period of the documents which you have mentioned .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Under the Public Records Act 2005, the retention Schedule is prepared by the concerned Department and is approved by the Director of Archives, Maharashtra State, Pune. Check with the Land Record Department. I am not aware about the retention period of the documents which you have mentioned .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sanjay ganpati todkar
18-07-2023
sanjay_todkar@yahoo.com
जमिनीच्या ७/१२ उतार्यावर पुरुषां बरोबर स्त्रियांचं मालकी हक्क म्हणून नोंद . कृपया एस-१४/२१६१८१६/प्रक्र ४५८/लं-६, दिनांक १५ september १९९२ circular कृपया email करावे हि विनंती
Question by Madan Patil
15-07-2023
madanpatil1994@gmail.com
सर,आमची जमीन सिंलीगला गेली आहे,परंतु नंतर त्यातून राज्य मार्ग गेला आहे, रोड गेला आहे ती जमीन सिंलिगमध्ये गेली पण भूसंपादन मात्र आमच्या सातबारा उताऱ्यावर केलेले आहे यामध्ये आमची जमीन रोडलगत नाही, रोडलगतची जमीन सिंलिगने इतरांना
मिळाली. या घटनाक्रमात अगोदर सिंलिग आले नंतर रोडचे भूसंपादन झाले , यात ज्यांची रोडलगत जमीन आहे त्यांचे भूसंपादन करायला पाहिजे होते पण तसे केले नाही उलट
रोडलगत नसताना मूळ मालकाचे भूसंपादन केले, तर आता आमच्या सातबारावरील भूसंपादन कमी करण्यासाठी काय करावे लागेल ? किती वेळ लागेल ? होईल का ?कोणत्या अधिकारीकडे हे प्रकरण असते?
कृपया मार्गदर्शन करावे...ही विनंती.
आपल्या प्रश्नावरून , संपादन झालेली जागा ही रोड लगतची नसून अनावधानाने किंवा चुकीने रोड लगत नसलेली म्हणजे आपली जागा संपादन झालेली आहे. ही जर वस्तुस्थिती आपणाला लवकर कळाली असती तर आपण त्या संबंधित भूसंपादन अधिकारी यांना ही सुख निदर्शनास आणून द्याव्याला पाहिजे होते. आता जागा संपादन झालेली आहे निवाडा जाहीर झालेला असेल तर त्यात दुरुस्ती करण्याचे अधिकार कुणालाही नाही. जर संपादित जागेचा ताबा घेतलेला नसेल तर आपण ही चूक भूसंपादन संस्थेला तसेच भूसंपादन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या, आपली जागा ही भूसंपादनातून वगळली जाईल. हा कदाचित संपादनाच्या अनुषंगाने जी संयुक्त मोजणी केली जाते त्या संयुक्त मोजणी मध्ये झालेली ही चूक आहे. ज्यावेळेस संयुक्त मोजणीचे पथक प्रत्यक्ष जागेवर आलं होतं त्यावेळेस आपल्या वतीने जर कोणी उपस्थित असतं तर त्याने ही चूक त्याच वेळेस निदर्शनास आणून देणे आवश्यक होतं.. आपल्या अनुपस्थितीमुळे संपादन संस्थेला व भूसंपादन अधिकारी यांना कुठलीही ही चूक लक्षात आली नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपल्या प्रश्नावरून , संपादन झालेली जागा ही रोड लगतची नसून अनावधानाने किंवा चुकीने रोड लगत नसलेली म्हणजे आपली जागा संपादन झालेली आहे. ही जर वस्तुस्थिती आपणाला लवकर कळाली असती तर आपण त्या संबंधित भूसंपादन अधिकारी यांना ही सुख निदर्शनास आणून द्याव्याला पाहिजे होते. आता जागा संपादन झालेली आहे निवाडा जाहीर झालेला असेल तर त्यात दुरुस्ती करण्याचे अधिकार कुणालाही नाही. जर संपादित जागेचा ताबा घेतलेला नसेल तर आपण ही चूक भूसंपादन संस्थेला तसेच भूसंपादन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या, आपली जागा ही भूसंपादनातून वगळली जाईल. हा कदाचित संपादनाच्या अनुषंगाने जी संयुक्त मोजणी केली जाते त्या संयुक्त मोजणी मध्ये झालेली ही चूक आहे. ज्यावेळेस संयुक्त मोजणीचे पथक प्रत्यक्ष जागेवर आलं होतं त्यावेळेस आपल्या वतीने जर कोणी उपस्थित असतं तर त्याने ही चूक त्याच वेळेस निदर्शनास आणून देणे आवश्यक होतं.. आपल्या अनुपस्थितीमुळे संपादन संस्थेला व भूसंपादन अधिकारी यांना कुठलीही ही चूक लक्षात आली नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपल्या प्रश्नावरून , संपादन झालेली जागा ही रोड लगतची नसून अनावधानाने किंवा चुकीने रोड लगत नसलेली म्हणजे आपली जागा संपादन झालेली आहे. ही जर वस्तुस्थिती आपणाला लवकर कळाली असती तर आपण त्या संबंधित भूसंपादन अधिकारी यांना ही सुख निदर्शनास आणून द्याव्याला पाहिजे होते. आता जागा संपादन झालेली आहे निवाडा जाहीर झालेला असेल तर त्यात दुरुस्ती करण्याचे अधिकार कुणालाही नाही. जर संपादित जागेचा ताबा घेतलेला नसेल तर आपण ही चूक भूसंपादन संस्थेला तसेच भूसंपादन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या, आपली जागा ही भूसंपादनातून वगळली जाईल. हा कदाचित संपादनाच्या अनुषंगाने जी संयुक्त मोजणी केली जाते त्या संयुक्त मोजणी मध्ये झालेली ही चूक आहे. ज्यावेळेस संयुक्त मोजणीचे पथक प्रत्यक्ष जागेवर आलं होतं त्यावेळेस आपल्या वतीने जर कोणी उपस्थित असतं तर त्याने ही चूक त्याच वेळेस निदर्शनास आणून देणे आवश्यक होतं.. आपल्या अनुपस्थितीमुळे संपादन संस्थेला व भूसंपादन अधिकारी यांना कुठलीही ही चूक लक्षात आली नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dilipkumar Kharat
15-07-2023
dkkharat1@gmail.com
राज्यातील काही गावामध्ये अनुसूचित जाती विशेषतः महार जातीच्या सार्वजनिक उपयोगासाठी गावालगत किंवा गावापासून दूर अंतरावर जमिनी आहेत. या जमिनी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. जसे की, म्हारकी, हाराटी, हडुळकी, दळे इत्यादी. या जमिनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जातीच्या वापरात आहेत. त्यापैकी काही जमिनी शेतीसाठी उपयोगात आणल्या जात असून काही या अनेक वर्षांपासून कोणत्याही वापराविना पडून आहेत. या जमिनी तत्कालीन ब्रिटिश शासनाने या जातीला ईनाम म्हणून दिलेल्या आहेत असा समज आहे. अशा जमिनी या त्या समाजातील काही प्रमुख व्यक्तिंच्या नावावर नोंदलेल्या आहेत
या जमिनीचे वाटप त्या जातीच्या सर्व सदस्यांना मालकीहक्काने करणे कायदेशीर होईल काय ?
तसेच या जमिनीबाबतची संपूर्ण माहिती, ती ईनाम म्हणून देण्याचे प्रयोजन, उद्दिष्ट कोणत्या कार्यालयात मिळेल ?
Question by Prabha
14-07-2023
satheprabha@rediffmail.com
गावी आमची वडिलार्जित शेती होती. माझे वडील व 2 चुलते असे वारसा. आम्ही पुण्यात व १ चुलते मुंबई ला असतो. गावी असणाऱ्या मोठ्या काकांचे नाव एकुमा होते त्यांनी सगळी 3३ गुंठे शेत जमीन आम्हाला काही न सांगता विकली. काकाने ती जमीन ज्याला विकली त्यानेही ती तिसऱ्या माणसाला विकली आहे. वकिल म्हणतात दिवाणी न्यायालयात केस करून मूळ दस्त तुमच्या क्षेत्रापुरता रद्द करून घ्यावा. असा आपल्या क्षेत्रापुरता दस्त रद्द करता येतो का? कि पूर्ण व्यवहारच रद्द होतो?
आपणाला दोन बाबींवरती दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. एक म्हणजे अधिकार नसतानाही तुमच्या हिश्याची क्षेत्र तुमच्या चुलत्याने विकलेले आहे. तसेच चुलत्याच्या हिस्स्यांचे क्षेत्र ही प्रथम खरेदी करण्याचा अधिकार आपणाला आहे. आणि अशी तरतूद हिंदू वारसा कायद्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही या दोन मुद्द्यांवर आपल्या चुलत्यांनी जे खरेदी खत त्रयस्थ व्यक्तीसकरून दिलेला आहे ते रद्द करून घ्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amit raut
14-07-2023
shilparaut35@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 54 प्रमाणे न्यायालयात जमीन वाटणीसाठी अर्ज केला असता नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटी किती असते. सातबारा वरती जो आकार लिहिलेला असतो त्याच्याशी काही संबंध असतो का.
न्यायालयाने पारित केलेला आदेश हा, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ च्या कलम २ अन्वये सलेख आहे. न्यायालयाचा आदेश हा मुद्रांक शुल्क आकारणीसाठी पात्र असतो. माननीय न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी मिळकतीचे वाटप केल्यानंतर, वाटपानंतर सर्वात मोठा जो हिस्सा शिल्लक राहतो, त्याच्या बाजार मूल्यावर 2% दराने मुद्रांक शुल्क वसूल केले जाते.
उदाहरणादाखल एखाद्या इसमास ८ एकर जमीन होती, व त्याचे वाटप या व्यक्तीला ४ एकर , ब व्यक्तीला ३ एकर व क या व्यक्तीला १ एकर असे करण्यात आले, या तीन हिश्यांपैकी सर्वात मोठा हिस्सा हा ४ एकर जमिनीचा आहे जो या व्यक्तीला मिळालेला आहे. या ४ एकर जमिनीचे बाजार मूल्य, जे वार्षिक मूल्य दर तक्त्यात( म्हणजे शीघ्र सिद्धगणकामध्ये व बोली भाषेमध्ये रेडी रेकनर रेट) नमूद करण्यात आलेला आहे त्याला बाजार मूल्य असे म्हटले जाते. या उदाहरणांमध्ये अ या व्यक्तीला ४ एकर क्षेत्र मिळाले व तो सर्वात मोठा हिस्सा असल्यामुळे त्यावर २ टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारणी केले जाईल मात्र मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी ही वाटप केलेल्या सर्व व्यक्तींवर म्हणजे या उदाहरणातील, अ, ब व क या तिघांवर आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol
14-07-2023
amolsalunkhe@rediffmail.com
सर सैन्य दलातील व्यक्ती देत असलेल्या त्रासाबाबत प्रश्नाला उत्तर देताना आपण त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी उप विभागीय दंडाधिकारी तथा प्रांत यांचेकडे सादर केला आहे का ? असे विचारले होते. परंतु असा काही प्रस्ताव पोलिसांनी पाठवलेला नाही. पोलिस सदर व्यक्ती बाबत नरमाईची भूमिका घेत आहेत. त्याच्या आलेल्या तक्ररी ठाणे दैनंदिनी मधे नोंद करतात. आपले सरकार पोर्टल वर तक्रार केली की NC घेतात व सदर व्यक्ती सैन्य दलात कर्तव्यावर असलेने पोलिस स्टेशनला हजर होऊ शकत नसल्याने त्याला फोनवर समज देण्यात आली व त्याने मी पुन्हा वाद व. भांडणतंटा करणार नाही असे सांगितले म्हणून तक्रार निकाली काढली असा अहवाल वरिष्ठांना देतात. सदर व्यक्ति आपण सैन्य दलात मेजर असल्याचे सांगतो. पण हवालदार (हाऊसकिपर) या पदावर असल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारातून प्राप्त झाली. पोलिसांच्या सौम्य भूमिकेमुळे तो निर्ढावला आहे.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
