जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by महेश सरोदे
31-08-2023
maheshsarode383@gmail.com
मा. साहेब
माझा प्रश्न असा आहे की आजोबांनी गमावलेली मिळकत जर त्याचा नातू स्वखर्चाने दावा दाखल करून वर्षानु वर्षे स्वतःच केस कडे लक्ष्य देऊन जर ती मिळकत प्राप्त करत असेल त्यात त्याच्या काकाचा काही हिस्सा असेल का की जो कोणत्याही प्रकारची मदत न करणारा आहे, अस कोणता निकाल आहे का ह्या विषयी .. खालील विषयी एखादा निकाल..
एकत्र कुटुंबाची परत मिळविलेली मिळकत: एकत्र कुटुंबाची, वाडवडिलांनी गमावलेली मिळकत जर त्याच एकत्र कुटुंबातील सदस्याने, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे सहाय्य न घेता परत मिळविली तर ती त्याची स्वतंत्र मिळकत होते. ह्या विषयी मार्गदर्शन करावे
मिळकत आजोबांची आहे व ती कोणत्या कारणाने त्रयस्थ इसमाकडे कडे गेली होती व आपण प्रयत्न करून जरी मिळवली तरी त्यामध्ये काकांचा जर हिस्सा असेल तर तो हिस्सा काकांना द्यावा लागेल. आपण प्रयत्न केले म्हणून आपली ती स्वकष्टरजीत किंवा स्वतःची मिळकत होणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Yash satish kalyankar
26-08-2023
kalyankaryash25@gmail.com
आमच्या गावात स्मशानभूमीची 4 एकर जागा आहे.ते जागा अतिक्रमण मध्ये करुन घेतली आहे.ते त्या जागे पेरत आहे.आपण ती जागा परत कशी घेऊ शकतो?
स्मशानभूमीची जी जागा आहे त्या जागेची स्मशानभूमी म्हणून सातबारा सदरीत अशी नोंद असणे आवश्यक आहे तसेच आकारबंधालाही ती स्मशानभूमीसाठी राखीव केलेली आहे अशी ही नोंद असणे आवश्यक आहे. कदाचित कोणत्यातरी खाजगी व्यक्तीची ती जागा असेल, अशी जागा जर स्मशानभूमी म्हणून वापरा खाली असेल, आणि ह्या व्यक्तीने त्याच्यावर अतिक्रमण केलेले असेल तर तशी ती जागा आपल्याला मिळणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar netaji hujare
25-08-2023
sagarhujare2018@gmail.com
आम्ही गायरान मघे घर बांधले आहे 18वर्ष झाली पण आज अचानक ति माझ्या मालकीची आहे असे कारखानदार कब्जा घेतला आहे आणि तो कोणत्याही प्रकारची माहिती नोटीस न देता सर्व गायरान मध्ये प्रकार चालू आहे अधिकारी पाठिंबा आहे सदर परिस्थिती वर माहिती पाहिजे
ज्या जागेमध्ये आपले राहते घर आहे त्या जागेचा ताबा कोणताही त्रयस्थ इसम कायदेशीर मार्गाशिवाय घेयू शकत नाही . सन २०१७-२०१८ मध्ये , गरम विकास विभागाचा शासन निर्णय आहे त्यानुसार गायरान जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याचा अधिकार , उपविभागीय अधिकारी यांना आहे . याचा काय उपयोग होतंय का पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prof V D Bhabad
23-08-2023
vaishalivinod96@gmail.com
स्वत:च्या जागेत विनापरवानगी केलेले अनधिकृत बांधकाम नियमीत करता येते का ... येत असल्यास असे बांधकाम नियमीत केलेल्या आदेशाची प्रत कृपया मिळावी ही विनंती
आपण नगरपालिका पेन यांचेकडे अर्ज करा . आपणा अर्ज तपासून , नियमित करता येत असेल तर ते नियमित होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आशुतोष सुर्यकांत जाधव
21-08-2023
ashutosh.jadhav979@gmail.com
मला आमची वंशावळ काडावयाची आहे.माझ्याकडे आजोबा व पंजोबा यांच्या नावा शिवाय काही माहिती नाही.तरी वंशावळ कशी काडता येईल.
वंश्वळ कशी काढावी या प्रश्नाचे उत्तर असे आहे कि - वंशावाली बाबत नातेवाईक , आई - वडील यांना विचार - त्यांचे वडील - आजोबा - पणजोबा - खापर पणजोबा कोण होते ? त्यांची नावे काय ? घर निहाय वंशावालीचे दस्तावैजीकरण(documentation) सरकारी दप्तरी उपलब्ध नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कवडू दौलत गेडाम
18-08-2023
kdgedam721@gmail.com
नमस्कार साहेब वारसाहक्काने मिळालेल्या शेतजमिनीचे बहिणीने भावाच्या हक्कात हक्कसोडपत्र केल्यानंतर बहिणीच्या मुलांचा हक्क असतो काय.
मार्गदर्शन करावे.
नोंदणीकृत दस्त असल्यास , बहिणीच्या मुलांना हक्क सोडलेल्या मिळकतीत कोणताही हक्क नसतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीश बालासाहेब जोशी
15-08-2023
girish.b.joshis@gmail.com
राज्य रस्ता व गाव रस्ता यामध्ये भूसंपादन विभागाने जमीन मालकाकडून जमिनीचे क्षेत्र संपादित करून रस्ते तयार झाले आहेत मात्र सात बारावर रस्ते विभगाचे नाव नोंदविण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे?
संपादित जमिनीचे क.जा.प भूमी अभिलेख खात्याकडून प्राप्त करून , त्या आधारे , रस्ते विभागाचे नाव सादर करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SAMEER MAYEKAR
14-08-2023
SAMEER.MAYEKAR@GMAIL.COM
महोदय
नुकत्याच शासनाने NI No. MAHBIL /2009/37831 ह्या ८ ऑगस्ट २०२३ च्या गव्हर्नमेंट रिसोल्युशन द्वारे प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा पुनर्निश्चित केली. आता माझा प्रश्न खालीलप्रमाणे
१. जर जुन्या प्रमाणभूत क्षेत्राप्रमाणे सातबारा वर जर तुकडा अशी नोंद असेल तर ती नोंद आता नवीन प्रमाणभूत क्षेत्र मर्यादेनुसार दुरुस्त आपोआप होईल का ?
२. जर ती दुरुस्ती आपोआप होणार नसेल तर हि दुरुस्ती कशी करून घ्यावी ?
Question by श्री. उत्तम दळवी
04-08-2023
tenancybranch@gmail.com
देवस्थान इनाम जमिनीत कुळााला विभाजन करण्याबाबत कार्यवाही नियमासह मिळणेबाबत.
जमीन - महसूल माफीचा अधिनियम १८६३ ( १) अन्वये , देवस्थान इनाम जमिनीला लागलेल्या कुळाचे नावे किंमत ठरत नाही . त्यामुळे विभाजनाचा प्रश्न उद्भवत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by firoz
02-08-2023
7firoz8mulla6@gmail.com
khredi detana chatushima chuklya ahet, ata kay karayche? gharedidar dam dati kart ahe, gat putlela nahi.
विक्री दस्तामध्ये नमूद क्षेत्र जेवढे आहे त्याचे सीमांकन , भूमी अभिलेख यांचेकडून करून घ्या . खरेदीदाराने आडकाठी केल्यास कलम १३५ अन्वये , जिल्हाधिकारी यांच्डे कडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by firoz
02-08-2023
7firoz8mulla6@gmail.com
agrahakka kayda va tya chi mahiti milel ka
Question by Vaibhavraj Maruti Mule
31-07-2023
mulevaibhavraj29@gmail.com
सर, जर एखाद्याची शेतजमीन १७ गुंठे आहे आणि ७/१२ सेपरेट आहे आणि ती शेतजमीन आम्हास विकत घ्यायची आहे परंतु प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे तर त्याजमिनीची खरेदी कशी करावी.
जमिनीचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर , अश्या जमिनीची खरेदी खालील परीस्थितीत करता येऊ शकेल .
१. आपण खरेदी करावयाच्या जमिनीचे / भूखंडाचे लगतचे खातेदार आहात .
२, खरेदी करावयाची जमीन , प्रादेशिक योजनेतील बिगर-शेती , जमीन वापर विभागात ( झोन ) मध्ये स्थित आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितीन kanherkar
30-07-2023
nitin.kanherkar@gmail.com
ई पीक पहाणी app खूप दिवस झाले बंद आहे. शेतकऱ्यांना ई पीक upload होत नाही..शेतकऱ्यांच्या कर्ज करण्यासाठी अडचण येत आहे..कृपया करून aap update or चालू करावे..धन्यवाद
Question by Dr. Pravin Shamrao Uike
28-07-2023
pravin_vike@yahoo.co.in
nagar bhumapan zhalelya kshetratiladhikar abhilekhache malki hakkache duheri nond padthati band karnebabatche ( 7/12 ANI nAGAR BHUMAPAN) gr milnebabat
Question by Harshad Raje
27-07-2023
ceaser.casinova@gmail.com
७/१२ च्या इतर अॅवार्ड नमुद आहे, कमी कसे करावेत?
Question by Pravin Jagannath Rajmane
27-07-2023
pravin.j.rajmane@gmail.cok
Amchi ghartil jaga parspar dusrychya navavr city serve madhye lagli ahe. Kontahi kharedi khat kinva vywahr jhala nahi. Ani amcyakde tya adhiche purave ahet ki ti jaga amchi ahe.
नगर भूमापन चौकशी केंव्हा झाली आहे ? आपणास दिवाणी न्यायालयात मालकी हक्क निच्छित करणे बाबतचा दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar patil
26-07-2023
sp109391@gmail.com
सर नोदनी कृत साठे खताची नोद 7/12 वरती घेता येते का
Question by Hemant
26-07-2023
bharanehemant@gmail.com
आमचे गावात किराणा मालाचे दुकान असून गेली 35 वर्ष आम्ही व्यावसाय करीत आहोत. व्यावसाय ज्या जागेत आहे ती मिळकत माझे वडिलांचे नावावर असून निवासी कर नियमित भरत आहोत. आमच्या शेजारी व्यक्तीने ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे की, आम्ही 35 वर्षापासून निवासी जागेत व्यावसाय करीत असून निवासी कर भरत आहे तर 35 वर्षाचा व्यावसाय कर वसूल करावा. निवासी जागेत व्यावसाय करता येत नाही का? व्यावसायिक वापराकरीता ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असते का? आमच्याकडे किराणा व्यावसायासाठीचा अन्न व प्रशासन विभागाचा परवाना नाही. याचा काही समस्या येउ शकते का? आता आम्ही काय केले पाहिजे म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ग्रामपंचायतीकडे जो कर भरत आहात तो कर ग्रामपंच्यात यांनी आकारणी करून निच्छित केला आहे . कर - आकारणी सुधारित करण्याचे अधिकार हे केवळ ग्रामपंच्यात यांना आहेत . जो पर्यंत ग्रामपंचायत यांचेकडून आपणास नोटीस येत नाही तो पर्यंत चिंता नसावी . किराणा माल विक्रीची साठी परवाना आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain Sahil Shaikh
26-07-2023
kaunainshaikh2780@gmail.com
७० वर्ष पूर्वीचि वारस नोंदिला अपिल दाखल करता येइल का?
आत्याला अपत्य नसल्याने,
चार भाऊ असतांना,
फ़क्त एकाच भाऊ च्या एकाच मुलाचे नाव दाखल केले आहे.(तोंडि दत्तक घेतलेले होते.)
मुळ जमींन आत्या च्या पती चि आहे.
जमींन नवीन अविभाज्य शर्ती चि आहे.
Question by सागर बनसोड
26-07-2023
sppbansod019@gmail.com
कोतवााल भरती व नेमणूक नियम, १९५९ या बद्दल पक्का पुरावा मिळेल का ? अर्जाची शेवटची तारीख 4 /8/2023 आहे. कृपया मदत करा
Question by rajendra vartak
24-07-2023
rajendravartak2020@gmail.com
कूल व मालक यांच्या मध्ये जमीनीचे वाटप कसे होते
कुळ वहिवाट संबंध हे दोन प्रकारे तयार होतात.
१. संविदात्मक
२. कायद्याने तयार होणारे
१. संविदात्मक -या मध्ये भाडेपट्टा याद्वारे निर्माण होणारे
२. कायद्याने तयार होणारे - या मध्ये शेतजमीन असेल तर , शेतजमीन , कुलवाहीवाट कायदा नुसार. तर अनिवासी मालमत्ता असेल तर भाडे नियंत्रण कायदा .
साविदात्मक कुलवहिवाट हि भाडेपट्टा कालावधी संपला कि संपुष्ट येते व त्यामुळे संपूर्ण जमीन मालकाकडे जाते . या वाहिवातीमध्ये पत्तेदाराला केवळ , मिळकतीचा ताबा मिळतो व उपभोग घेण्याचा अधिकार निर्माण होतो . त्यामुळे अशी जमीन जर साविदात्मक कालावधी चालू असताना , संपादित झाली असेल तर , शिल्लक राहिलेल्या कालावधी विचारात घेऊन , नुकसान भरपाई रक्कम मालक व पत्तेदार यांचेमध्ये वाटप केली जाते .
जी कुलवहिवाट कायद्याने निर्माण झालेली असते त्याबाबतीत , ६०:४० हे प्रमाण विचारात घेऊन नुकसान भरपाई वाटप केली जाते . मात्र जमिनीचे वाटप कुल व मालक यांच्यात होऊ शकत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कुळ वहिवाट संबंध हे दोन प्रकारे तयार होतात.
१. संविदात्मक
२. कायद्याने तयार होणारे
१. संविदात्मक -या मध्ये भाडेपट्टा याद्वारे निर्माण होणारे
२. कायद्याने तयार होणारे - या मध्ये शेतजमीन असेल तर , शेतजमीन , कुलवाहीवाट कायदा नुसार. तर अनिवासी मालमत्ता असेल तर भाडे नियंत्रण कायदा .
साविदात्मक कुलवहिवाट हि भाडेपट्टा कालावधी संपला कि संपुष्ट येते व त्यामुळे संपूर्ण जमीन मालकाकडे जाते . या वाहिवातीमध्ये पत्तेदाराला केवळ , मिळकतीचा ताबा मिळतो व उपभोग घेण्याचा अधिकार निर्माण होतो . त्यामुळे अशी जमीन जर साविदात्मक कालावधी चालू असताना , संपादित झाली असेल तर , शिल्लक राहिलेल्या कालावधी विचारात घेऊन , नुकसान भरपाई रक्कम मालक व पत्तेदार यांचेमध्ये वाटप केली जाते .
जी कुलवहिवाट कायद्याने निर्माण झालेली असते त्याबाबतीत , ६०:४० हे प्रमाण विचारात घेऊन नुकसान भरपाई वाटप केली जाते . मात्र जमिनीचे वाटप कुल व मालक यांच्यात होऊ शकत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अतुल
22-07-2023
atul.bhalerao74@gmail.com
माझे चुलते अनुसूचित जाती प्रवर्गात असून त्यांनी १९८५ मध्ये १ हेक्टर शेतजमीन खरेदी केली. त्यांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेवून त्यांना दुसरीच जमीन दाखवण्यात आली. नावावर असलेली जमीन पाणथळ असून शेतीयोग्य नाही, करत असलेली जमीन हे सरकारी गायरान असल्याचे समजले. सध्या कसत असलेली जमीन मिळवण्याचा काही सरकारी उपाय आहे का ?
गुरचरण जमीन नवीन कलम २२-अ नुसार खाजगी व्यक्तीला देता येत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vilas misal
21-07-2023
Vilasmisal1992@gmail.com
नमस्कार सर. माझे आजोबा यांनी स्वकष्टाने कमावलेले घर आहे.व ते 1995 मध्ये मयत झाले आहे.त्याना 2 मुल व बायको आहे व या पैकी कायद्याने कुणाचे मालकी हक्क आहे
Question by YOGESH RUDRUKE
21-07-2023
yogeshrudruke@gmail.com
नमस्कार सर माझे 162,164,168 व 170 असे चार गट नंबर आहेत त्यापैकी 162, 164 व 168 या गट नंबर च्या सातबारा उताऱ्यावर खाते क्रमांक 2487 असा आहे व गट नंबर 170 च्या सातबारा उताऱ्यावर खाते क्रमांक 2178 असा आहे. असे दोन खाते क्रमांक (8A) उतारे असू शकतात का?
तसेच ऑनलाईन mahabhumi site वरून चारही गट नंबरचे सातबारा उतारे डाऊनलोड होत आहेत. परंतु आठ अ चे दोन्ही उतारे डाऊनलोड होत नाहीत त्यासाठी काय करावे लागेल ?
दोन खाते असू शकत नाही . एकाच खाते असावयाला पाहिजे . नावात spelling- mistake कदाचित असेल त्यामुळे दोन खाते तयार झाले असतील . तलाठी यांचेशी संपर्क साधून एकाच खाते तयार करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश घोलप
20-07-2023
yogeshgholap50146@gmail.com
सर नमस्कार .
माझे वडील 2022 मध्ये मयत झाले आहेत. त्यांनी साधारण 30 वर्षापूर्वी 20 गुंठे जमीन खरेदी केली होती. त्यांनी त्या जमिनीचे सर्व पैसे समोरील व्यक्तीला अदा केले आहेत. परंतु जमीन खरेदी करताना त्यांनी जमीन खरेदी बाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. माझे वडील मयत झाल्यानंतर समोरील व्यक्तीने जमीन ताब्यात घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तरी योग्य मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
जर आपल्या पिताश्री यांनी , जमीन संपादन/ खरेदी मोबदला बँक धनादेश द्वारे दिला असेल तर आपण सिद्ध करू शकता कि देण्यात आलेला मोबदला हा जमींन खरेदीसाठी दिलेला होता . न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
