जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by vihan c
14-06-2025
vihanchoure09@gmail.com
1948 साली आजोबांनी 30 एकर जमीन खरेदी केली त्यानंतर ती शेत जमीन 1962 साली आपला एकुलता एक मुलगा बाळासाहेब याला साध्या कागदावर खातेबदल करून त्यांचे नावे केली आणि बाळासाहेब यांनी ती जमीन 1984 साली आपली चार मुले यांना पुढील प्रमाणे साध्या कागदावर वाटणी करून दिली Aला 10 एकर ,Bला 10 एकर, Cला 5 एकर आणि Dला 5 एकर साध्या कागदावर वाटणी करून दिली तर ती जमीन बाळासाहेब यांची वडिलोपार्जित असेल का?
कारण C यांनी कोर्ट मध्ये दावा दाखल केला आहे की वडिलोपार्जित जमीन आहे आणि मला समान हक्क मिळावा जमिनीमध्ये .हे योग्य आहे का साहेब.
अंगडी चंद्रण्णा वि. शंकर व अन्य या निकाल पत्रात मा सर्वोच्च न्यायालयाने हे तत्व अधोरेखित केले आहे कि -
कोणतीही मालमत्ता वंशपरंपरेने चालत आलेली (Ancestral Property) म्हणून मान्य होण्यासाठी खालील अटी पूर्ण झाल्या पाहिजेत:
वंशपरंपरेने वारसा – मालमत्ता हिंदू पुरुषाने आपल्या वडील, आजोबा, पणजोबा किंवा तुप्पणजोबा (पित्याचे तीन पिढ्यांपूर्वीचे) यांच्याकडून वारशाने मिळालेली असावी. म्हणजेच, चार पिढ्यांमध्ये पुरुषांच्या वंशातून मालमत्ता उतरलेली असली पाहिजे.
उपरोक्त प्रकरणात आजोबांनी जमीन खरेदी केली आहे . ती मुले हि मालमत्ता हि वडिलोपार्जित मालमत्ता नाही . त्यामुळे, ब जर हयात असेल तर क ला हक्क मिळू शकणार नाही . मात्र ब मयत असेल , तर बाळासाहेब यांनी नोंदणीकृत द्स्ताद्वारे त्यांच्या ४ मुलांच्या नावे जमीन हस्तांतरित केली नसल्याने , क ला वारसाने समान हक्क मिळण्याचा अधिकार आहे .
वाटणी न झालेली मालमत्ता – ही मालमत्ता अविभाजित (joint/undivided) असावी. एकदा ती वैयक्तिक वाटपाद्वारे विभाजित झाली, तर तिचा कौटुंबिक (coparcenary) स्वभाव निघून जातो.
"Blending" नसल्यास – जर एखादी मालमत्ता स्वतःच्या उत्पन्नातून घेतलेली असेल, आणि ती कौटुंबिक मालमत्तेमध्ये विलीन (blended) केल्याचा कोणताही पुरावा नसेल, तर ती स्वतःची संपत्ती (self-acquired property) समजली जाते, आणि ती अनुवंशिक मालमत्ता ठरत नाही.
balasaheb यांच्या वडिलांनी हि मिळकत खरेदी केली आहे . त्यामुळे क ला मिळकतीत हक्क मिळणार नाही . मात्र सध्या कागदावर वाटप केले असल्याने , अ ब क व ड ला झालेले वाटप प्रभावशून्य आहे . बाळासाहेब यांच्या मृत्यनंतर , सर्व ४ मुलांना मिळकतीत समान हिस्सा देणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोपाल राजू राजपूत
13-06-2025
gopalperfect203@gmail.com
शेती ला कुळ लावण्यासाठी कोर्ट च्या याचिकेसाठी काही फीस आहे का
कुल लावणे हि ऐक्छिक गोष्ट नाही . ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhijit Kale
13-06-2025
abhijit9490@yahoo.com
आजोबांच्या मृत्यूनंतर प्रमाणित फेरफार नंबर 1010अ मध्ये थोरल्या मुलाचे ए.कू.मॅ. व इतर दोन भावंडांची व अ. पा. क म्हणून आजीच्या नावाची इतर सामायिक हिस्सेदार कायम म्हणून नोंद आहे.
या फेरफार वर दोन सर्वे नं आहे समजा 100 व 101. 1967 साली आजीचे अ.पा.क म्हणून नोंद कमी झाली व दोन सर्वे नंबर पैकी फक्त एकाच सर्वे नं 100 वर वर थोरल्या भावाचे ए.कू.मॅ. म्हणून नोंद आली परंतु सर्वे नं 101 यावर ए.कू.मॅ. म्हणून नोंद नं आल्यामुळे फक्त एकट्याचेच नाव आले त्यमेळे त्यांनी सर्वे नं 101 ही जमीन पुर्णपणे विकलीकाही शिल्लक नाही. तरी विकलेल्या जमिनीच्या 7 12 वर इतर भावंडांची नावे वारस म्हणून नोंद होऊ शकते का?
sale deed कोर्ट कॅन्सल करेल पण तहसिलदार अपील केल्यानंतर फेरफार अपडेट करून सुर्वे नं 101 ला चुकीच्या फेरफार अपडेट करण्याचा अमल देतील का?
एकाच मुलाने इतर मुलांची जमीन विकली आहे . खरेदी करणारांचा दोष काय आहे ? ७/१२ वर इतर वर्षांची नावे नमूद नाहीत त्यावेळी खरेदी झालेलेई आहे . मात्र जमीन खरेदी करताना ,खरेदीदाराने पेपर नोटीस देणे , title search या गोष्टी केल्या होत्या का ? केल्या असतील तर इतर भावांच्या वर्षांची नावे लागणार नाहीत . मात्र त्यांना जे पैसे एकुम्या याला मिळाले त्याची मागणी हिस्स्याप्रमाणे करता येईल . आणि जर ,खरेदीदाराने पेपर नोटीस देणे , title search या गोष्टी केल्या नसतील तर , इतर वर्षांची नावे दाखल करण्यासाठी , दिवाणी दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय गोस्वामी
12-06-2025
goswamiv99@gmail.com
सोलर कंपनीला 25 वर्ष कराराने भाड्याने जमीन एका कंपनीने घेतलीआहे तशी नोंद 7/12 इतर हक्कात घेण्यात आली आहे. सदर कंपनी ने सब काॅनट्रक्टर नेमले आहेत. त्याची नावे इतर हक्कात घेण्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज सादर केला आहे. सब काॅनट्रक्टर ची नोंद घेता येईल का. मुळ कंपनीने शेतकरी सोबत केलेल्या दस्तात सब काॅनट्रक्टर नेमणे बाबत उल्लेख केला आहे.
Question by Sijauddin mujawar
11-06-2025
sijauddinm786@gmail.com
एकच व्यक्तीची वैयक्तिक दोन खाती असतात का?
Question by पी लांडगे
11-06-2025
landagep24@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडिलांनी माझ्या भावाला मृत्युपत्र करून 5 एकर जमीन दिली. त्यानंतर त्याने फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला असून मी त्यावर आक्षेप घेतला त्यानंतर तहसीलदार साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब , अपर जिल्हा अधिकारी साहेब,अपर आयुक्त यांनी सुरेश चा फेरफार नामंजूर करून त्याला मृत्यूपत्राचे प्रॉबेट दिवाणी न्यायालयात सिद्ध करावे असे नमूद केले.
त्यानंतर मी निकालाची प्रत घेऊन तलाठी कार्यालयात वारसा फेरफार घेण्यासाठी अर्ज केला असून त्यावर त्याने आक्षेप घेतला आणि मंडळ अधिकारी यांनी माझा फेरफार नामंजूर केला आणि कारण असे नमूद केले की प्रकरण दिवाणी न्यायालयात चालू आहे.
पण साहेब कोणताही स्टे ऑर्डर नसताना ही मंडळ अधिकारी यांनी माझा फेरफार नामंजूर केला आहे.
हे योग्य आहे का? कारण अगोदरच १२ वर्ष केस चालू होती.निकाल माझ्या बाजूने लागून ही फेरफार नाही झाला.
यावर काय उपाय आहे.
वास्तविक वशीयतनामा सिद्ध करणे केवळ मुंबई शहरासाठी आवश्यक आहे . इतर शहरांसाठी त्याची आवश्यकता नाही . अप्पर आयुक्त यांनी आपले व इतर वर्षांची नावे दाखल करावीत आस आदेश का केला नाही ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल खंडागळे
05-06-2025
vish007k@gmail.com
माझ्या आजोबांनी जमीन खरेदी केली होती तो सातबारा आमच्या कडे आहे पण त्यावरती फेरफार ची नोंद नाही व आमच्या कडे खरेदी खत पण नाहीये पण आमच्या नावे सातबारा आहे आता या नोंदीची माहिती कशी मिळवता येईल
Question by Minal lokhande
05-06-2025
minallokhande2020@gmail.com
मी सध्या वर्धा जिल्हयात तलाठी म्हणुन काम करत आहे. मला पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने भंडारा जिल्हयात जायचे आहे. त्यासाठी मी आधी कोणाला अर्ज करावा लागेल? वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय की भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय ! तसा शासननिर्णय काय आहे?
पती -पत्नी एकत्रीकरण शासन निर्णय माझ्या माहितीप्रमाणे रद्द झाला आहे . विशेष बाब म्हणून शासनाकडून बदली होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
पती -पत्नी एकत्रीकरण शासन निर्णय माझ्या माहितीप्रमाणे रद्द झाला आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by तुषार परंडवाल
05-06-2025
tusharparandwal@gmail.com
कुळाने पूर्वी परवानगी न घेता जमीन विकली. शर्थभंग झाला.
कु.का .क्र ८४ नुसार कारवाई होऊन जमीन शासनाकडे जमा (सरकारी आकारी पड) झाली.
अशी जमीन लिलाव होऊन कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तिने पुन्हा खरेदी केली. खरेदीनंतर जमिनीचा प्रकार भोगवटादार -२ होऊन इतर हक्कांत नवीन शर्थीने व अविभाज्य शर्थीने असा शेरा ठेवला.
अशी जामीन पुन्हा भोगवटादार -१ होईल का? इतर हक्कांतील नवीन शर्थीने व अविभाज्य शर्थीने असा शेरा निघून जाईल का?
महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि लीजहोल्ड जमिनींचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर) नियम, २०१९
• शासन निर्णय क्रमांक: जमीन-२०१८/प्र.क्र.९०/ज-१
• जारी दिनांक: ८ मार्च २०१९
वरील शासन निर्णया अंतर्गत अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यन्त वाढवली आहे असे कळले होते
वरील शासन निर्णयाचा आधार घेऊन वरील जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ मध्ये रूपांतर करून मिळेल का ?
सन २०१९ चे नियम हे केवळ जमीन महसूल संहितेखाली वाटप केलेल्या जमिनी संदर्भातील आहेत . कुल कायद्याखाली जमिनीसाठी नाहीत . मात्र कुल कायद्याखाली हि शर्थ शिथिल करणे यासाठी शासन निर्णय आहे . तो माझ्याकडे नाही . आपण तो शासन निर्णय शोधून बघा काय उपयोग होतो का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Krushna sunil salunke
05-06-2025
krishnasalunkhe962@gmail.com
अनुसूचित जमातीना सरकारी जमीन मिळण्यासाठी अर्ज कोणाकडे करायचा व नमुना मिळण्यात यांवा
अर्ज जिल्हाधिकारी यांचेकडे करावा . सध्या कागदावर केला तरी चालेल . अर्जासाठी कोणताही विशिष्ट अर्जाचा नमुना दिलेला नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nilkanth Kute
03-06-2025
nilkanth.kute007@gmail.com
रजिस्ट्री पूर्वी नजराना न भरता व जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता खरेदी केल्यामुळे कुळ कायद्याचा भंग म्हणून MRT आणि Highcourt ने खरेदी रद्द करून जमीन शासनजमा चा निकाल दिला आहे. तरी एखाद्या तरतुदी अन्वये नजराना भरून किंवा दंड भरून खरेदी नियमित करता येऊ शकते का?
मा उच्च न्यायालय व महसूल प्राधिकरणाने सखोल अभ्यास करून निर्णय दिल्यानंतर , अजून काही शिल्लक राहत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by p landage
02-06-2025
landagep24@gmail.com
नमस्कार साहेब,
माझ्या आजोबांनी 12 एकर शेत जमीन 1949 रोजी खरेदी केली.त्या खरेदी खतामध्ये विहिरीचा पण उल्लेख केला.
पण सातबारा च्या इतर हक्क मध्ये विहिरीचा उल्लेख नाही.
त्यानंतर ती शेत जमीन 1964 रोजी त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे माझ्या वडिलांना वाटणी करून दिली.पण वाटणी पत्रात विहिरीचा उल्लेख केला नाही.
त्यानंतर माझ्या वडिलांनी आम्हा दोन भावांमध्ये प्रत्येकी 6 एकर जमीन वाटणी करून दिली .पण त्यामध्ये पण विहिरीचा उल्लेख करण्यात आला नाही.विहिरी आमच्या दोघांच्या बांध्याच्या मधोमध आहे.
त्यानंतर मी 2005 साली 3 एकर जमीन विकली असून विकलेल्या क्षेत्रात विहीर गेली आहे.पण मी शेत विकताना खरेदी खतामध्ये त्याला विहिरीत हिस्सा दिला नाही. तर आता मला विहिरीची नोंद 7/12 सदरी इतर हक्क मध्ये लावायची आहे तर मग मी काय करावे.
500 शपथ पत्रावर भाऊ सहमती देत नाही.
भारतीय सुविधाधिकार अधिनियम १८८२ च्या कलम १३(ग) नुसार , हस्तांतरणाच्या विषय वस्तूतील सुविधाधीकार , हस्तांतार्कास त्याच्या अन्य स्थावर मालमत्तेच्या उपभोगासाठी आवश्यक असेल तर , तर अश्या सुविधाधीकारावर हस्तांतार्काचा हक्क असतो . सोप्या भाषेत , आपली विहीर ज्या जागेत आहे ती जागा जरी आपण विकली असेल तरीही आपला त्या विहिरीवर पाणी घेण्याचा हक्क अबाधित आहे . मात्र विहिरीची नोंद आपल्या जागेच्या अधिकार अभिलेखात होणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजाराम शंकर गाराळे
01-06-2025
rajeshgarale9273@gmail.com
महोदय महसूल मंत्रीयांनी शेत रस्त्यासाठी दिलेल्या आदेशाची कारवाई तालुका पातळीवर कोणत्या अधिकाऱ्यामार्फत होणार
Question by d v landage
28-05-2025
dvlandage@gmail.com
1976 साली आजोबांचा मृत्यू झाल्यावर गट नंबर 750 ला वारस फेरफार नुसार 7/12 वर वडिलांचे नाव कब्जेदार सदरी आणि आत्याचे नाव इतर हक्क मध्ये लागले. त्यानंतर 1984 साली ती शेत जमीन वडिलांनी आत्याचे हक्क सोड न घेता विकली.
त्यानंतर मी तिचं विकलेली जमीन 1986 वर्षी खरेदी केली आहे.
तर अजून पण 7/12. च्या इतर हक्क मध्ये आत्याचे नाव आहे..तर आत्या ला त्या जमीन मध्ये तिचा हिस्सा द्यावा लागेल का?
कारण वडिलांनी तर ती जमीन विकली होती.मी माझ्या पैशाने खरेदी केली आहे ना.
आत्याच्या हक्कासह ( हक्क अबाधित ठेवून ) ती जमीन आपल्या पिताश्रींनी विकली होती . मुळातच आत्याचा मिळकतीत हक्क आहे . त्यामुळे आत्याला हिस्सा द्यावाच लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh Ghadage
28-05-2025
mghadage383@gmail.com
माझे राहते घर गट नंबर 539 मधे आहे जमीन खरेदी करताना माझ्या दस्ता मध्ये पूर्व पश्चिम रोड आहे त्याच गटा मध्ये माझ्या घराच्या पश्चिमेला एक शेतकऱ्याने जमीन खरेदी केली त्या मध्ये पूर्व पश्चिम 10*180 फूट रस्त्या मधून येण्या जाण्याच्या हक्क सहित नोंद केली आहे तर तो व्यक्ती आता आम्हाला त्या रोड ने येण्या ज्यापासून अडवत आहे तो बोलत आहे माझा स्वतःचा रोड आहे रोड च्या मधून अंडर ground गटार घेऊन जायचे आहे तर ते आम्हाला अडवत आहे तरी या वर काय करावे .
Question by Yogesh Doltade
25-05-2025
yogeshdoltade@gmail.com
महोदय माझ्या वडीलांचे नावे वडीलार्जित समाईक घरजागा होती. परंतु वडील व चुलते यांनी आपले आपले दिशा दाखवून वाटप केले आहे. वडील निरक्षर असल्याने केव्हाही अचानक त्या जागेची खरेदी केली जाऊ शकते. हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी उपाय?
Question by Sayyad Akhtar
20-05-2025
sayyedakhtar53130@gmail.com
भोगवाटदार वर्ग -2 ची जमीन विनापरवानगी खरेदी केली आहे. शर्तभंग झाला असेल तर त्याला किती अनर्जित रक्कम भरावी लागेल आणि वर्ग एक करण्यासाठी आणखी रक्कम भरावी लागेल का?
वर्ग एक झाल्यावर लगेच विक्री करता येईल का?
जमीन शेती कारासाठीची असेल तर वार्षिक बाजार मूल्याच्या ५०% व जमीन बिगर शेती वापराखाली असेल तर ७५ % अनर्जित रक्कम भरावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by d v landage
20-05-2025
dvlandage@gmail.com
नमस्कार सर
अन्य गट नंबर मध्ये एक विहीर असून त्यामध्ये माझा 6 आणे आणि बाकीच्या दोन शेतकऱ्यांचा प्रत्येकी 5 आणे हिस्सा आहे. विहिरीमध्ये गाळ जास्त जमा झाला असून तो गाळ मला बाहेर काढायचा आहे.पण बाकीचे दोन शेतकरी मला गाळ काढू देत नाहीत ..तर मी आता काय करावे?
Question by संदीप व्ही.मोरे
19-05-2025
moresandip1982@gmail.com
सलोखा योजने अंतर्गत एकाच गटातील जमिनींची अदला बदल होऊ शकते का ?
Question by Jagadevi
10-05-2025
jagadevi6758@gmail.com
अपर विभागीय आयुक्तानी पुर्ननिरिक्षण प्रकरणात स्वत: दिलेल्या आदेशाला, पुर्नविलोकनात बदलण्यासाठी किंवा कायम ठेवण्यासाठी या दोन्ही करिता राज्य शासनाच्या परवानगीची घेण्याची आवश्यकता असते का नाही याबाबत माहिती द्यावी. सदर मंजुरी सर्व सुनावणी झाल्यावर घ्यावी लागते का आधीच घ्यावी लागते. याबाबत माहिती द्यावी.
महसूल संहितेच्या कलम २५८ अन्वये , जिल्हाधिकारी / जमाबंदी आयुक्त यांचेसह त्यांच्यापेक्षा दुय्यम महसूल / भूमापन अधिकार यांना स्वताचे किंवा त्यांच्या पुर्वाधीकार्याचे आदेश , लेखनप्रमाद चुकीच्याशिवाय अन्य कारणांसाठी ( नवीन पुरावा समोर येणे /सकृत दर्शनी दिसणारी चूक /किंवा इतर सबल कारण ) पुनर्विलोकन करता येऊ शकतात व त्यासाठी त्यांना त्यांच्या लगतच्या ज्येष्ठ अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे . आयुक्त यांना अश्या परवानगीची आवश्यकता नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by बाळू येडबा माने
05-05-2025
balumane1988@gmail.com
चुलत पंजोबाला जमीन मिळाली आहे एकत्र कुठुंब पध्दत असताना तरी त्यावर ए.कु.मे.लावलेले नाही तरी ती जमीन त्याच्या भावाला मिळू शकते का?मिळत असल्यास g.r. अथवा परिपत्रक पाठवा.
आपणाला न्यायालयात सिद्ध करावे लागेल कि , एकत्र कुटुंबाची / हिंदू सहदायकी जमीन याचे वाटप न होता , केवळ चुलत पणजोबा यांना वाटपाने केली आहे . अश्या मिळकतीत त्यांच्या भावाचा म्हणजे आपल्या पणजोबांचा व पर्यायाने त्यांच्या वारसांचा हा हक्क आहे . त्यासाठी आपणाला दिवाणी दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad Akhtar
03-05-2025
sayyedakhtar53130@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की एका गटात दोन शेतकरी ची जमीन आहे एका शेतकरी ची जमीन हायवे लगत असल्याने त्याच्या जमिनीचे शासकीय बाजारमूल्य 900 रुपये चौ.मी. आहे. पण दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन हायवे लगत नसताना देखील त्याला तेच बाजारभाव लागत आहे.तरी खरेदी खत करुन घ्यायचे आहे valuation कमी करता येईल का?
जमिंनीचे बाजारमूल्य तक्ते दरवर्षी , मा नोंदणी महानिरीक्षक यांचेकडून प्रसिध्द केले जातात . त्याच्याच आधारे मुद्रांक जिल्हाधिकारी / दुय्यम निबंधक यांचेकडून दस्तऐवज नमूद मिळकतीचे / जमिनीचे मुल्यांकन केले जाते. त्याच्याशिवाय अन्य बाजारभाव विचारात घेता येत नाहीत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अर्णव राजपूत
03-05-2025
mmmrajbtc@gmqil.com
आमच्या वडिलांनी 1994 मध्ये गावाला जमीन घेतली जमिनीच्या पश्चिमेला नदी आहे व पूर्वेला कोड आहे सदर जमीन ही दोन एकर 27 गुंठे सातबारावर आहे ही जमीन घेऊन आम्हाला तर तीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आमचा शेताचा सर्वे नंबर चार आहे तर पूर्वेला वड्याच्या पलीकडे असणाऱ्या शेतकऱ्याचा पाच आहे त्याने शेत मोजणी केली असता त्याच्या मोजणी मध्ये आमच्या शेतामध्ये मोजणी अधिकाऱ्यांनी काही गुंठे जमीन दाखवली आहे. गट नंबर पाचच्या शेतकऱ्याने देखील 1990 मध्ये ती जमीन दुसऱ्या व्यक्तीकडून विकत घेतली होती आणि 1995 मध्ये त्याच्यानंतर दुसऱ्याची जमीन गट चार विकत घेतली ज्यावेळेस वडिलांनी जमीन विकत घेतली त्यावेळेस त्यांनी कोणतीही हरकत किंवा दावा आमच्या जमिनीमध्ये केला नव्हता मात्र जमीन मोजणी नंतर केला आहे या विरोधात आम्ही कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये गेलो आहे मात्र सदरचा शेतकरी आपल्या समाज बांधवांना घेऊन बळाचा वापर करून ताबा सोडण्यास सांगतो कृपया मार्गदर्शन करावे
आपणाला दिवाणी दावा दाखल करून संबंधित व्यक्तीने आपल्या वहिवाटीला अडथळा करू नये म्हणून,मनाई हुकूम, प्राप्त करून घ्यावा लागेल . मात्र भू-मापनामध्ये त्या व्यक्तीची जमीन आपल्या ताब्यात असल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे दावा दाखल करून कितपत उपयोग होईल हे सांगता येऊ शकत नाही . न्यायालय ही भू-मापन विभागाने केलेल्या मोजणीचा आधार घेते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वाल्मिक सुरसे
29-04-2025
sursevalmik@gmail.com
सर, जर दोन गावातील शिव मध्ये नाला असेल, सदरील नाला हा जमिनी अंतर्गत केला असेल तर त्या जागेवर रस्ता बनवू शकता का आणि जर रस्ता करायचा असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागते कृपया मार्गदर्शन करावे.
Question by Sayyad Akhtar
28-04-2025
sayyedakhtar53130@gmail.com
एका माजी सैनिकास 1960 मध्ये 12 एकर वर्ग दोन ची जमीन मिळाली ती जमीन त्याने 1990 मध्ये A व्यक्ती ला 4 एकर,B व्यक्ती ला 4 एकर,C व्यक्ती ला 4 एकर दुय्यम निबंधक कार्यालयातून प्रत्येकाला वेगवेगळे 4-4 एकर चे खरेदीखत करुन दिले. आज 7/12 वर त्यांचे नाव लावायचे असल्यास काय करावे लागेल. माजी सैनिक मयत झाले आहेत व A व्यक्ती ही मयत झाले आहेत. कृपया मागदर्शन करावे.
मुळात जी विक्री करण्यात आलेली आहे त्यास जिल्हाधिकारी यांची विक्रीपरवानगी घेण्यात आली आहे का ? आपणाला हो जो व्यवहार झालेला आहे तो आता नियामानुकुल करून घेणे आहे . प्रथम आपण जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्या . आपणास परवानगी, मिळाल्यानंतर जरी विक्रेते व अ मयत असले तरी , अ च्या वारसांची व ब , क यांचे नाव दाखल होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
