अ.क्र. | विषय | लेखक | दिनांक |
---|---|---|---|
1 |
संस्कार |
पु ल देशपांडे | |
2 |
स्वत:ला रिक्त करून प्रज्ञाशील बना..!तुम्ही पुरेसे कणखर व परिपक्व नाहीत, याचे कारण म्हणजे तुम्ही अनेकदा निराश होता, चिडता आणि कमजोर लोकांवर तोंडसुख घेत, त्यांच्यावर आपला सगळा राग काढता. बरोबर आहे ना? तुमच्यातील उणिवा व अवगुण तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. इतकेच नव्हे, तर सार्मथ्याकडे जाणारा रस्ता तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. साध्या, सोप्या जीवनासाठी नव्हे, तर सार्मथ्यशाली आणि प्रेरणादायी आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. सार्मथ्याकडे जाणार्या तरुण प्रवाशाची पहिली पायरी कोणती असावी? प्रथम हे समजून घ्या की, सर्वसाधारणपणे चार प्रकारची ऊर्जा वा चैतन्ये आपल्या आतच बंदिस्त असतात. हे चैतन्य आपल्याला बाहेर आविष्कृत करता आले पाहिजे. ती चैतन्ये पुढीलप्रमाणे..
|
26-03-2013 | |
3 |
अध्यात्मिक…नामस्मरण अति मोलाचं!*प्रपंच्यातले प्रश्न घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला दासगणू महाराज प्रामुख्याने एकच उपदेश करीत असत तो म्हणजे, “ईश्वरावर श्रद्धा ठेवां आणि नामस्मरण चालू द्या.” चौर्यांशी लक्ष योनीतून मार्ग क्रमण केल्यावर फक्त एकदा नरदेह प्राप्त होतो.तो अतिशय दुर्मिळ व क्षणभंगुर आहे, ईतकच नाही तर नरकाच कोठार हि आहे. पण अखेर याच नरदेहात ईश्वर प्राप्ती होणार आहे, ”ईश्वरप्राप्ती” हेच नरदेहाच अंतिम ध्येय आहे, ज्या अव्यक्तातून आपण आलो आहोत, त्याच अव्यक्तात, पुन्हा समरसून जायचं आहे. एवढ असूनही या जगण्याचं आपल्याला कोण कौतुक! आपण आपल्या या नश्वर देहावर किती प्रेम करतो, त्या देहाला केवढ जपतो. त्याला सुख मिलाव म्हणून किती धडपडतो. हे सर्व चूक आहे अस नाही, पण त्याची आसक्ती हे वाईट. हि आसक्ती मग या देहाला कायकाय करायला भाग पडते.सारी धडपड या देहाच्या सुखाकरिता. आधी आस, मग ध्यास, आणि मग हव्यास, अश्या तर्हेने ती वाढतच जाते.काम, रोध, लोभ, मोह, मत्सर हे षडरिपू या देहावर अधिराज्य गाजवतात आणि या सर्वांवर कडी करणारा ”अहंकार” किंवा”मीपणा ” हा जो ”मी” आहे ना, तोच जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे तो दिसत नाही पण ‘आहे’ तर खरा !….
|