श्री. किरण पानबुडेसाहेब, नमस्कार
मिळकत पत्रिकेला क्षीरसागर यांचे नाव लागले आहे. कर आकारणी पत्रकास नोंद व्हावी असा अर्ज क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतीकडे केला त्या अर्जाबरोबर मिळकत पत्रिकेचा उतारा , फेरफार उतारा व खरेदी पत्राची नक्कल जोडली आहे. पण ग्रामसेवक याआधी तोंडी आम्हाला सांगतात कि बॉडीचा अधिकार आहे. त्यांनी सांगितल्याशिवाय मी नोंद करू शकत नाही. सिटी सेर्वेला तारीख चालू असताना ग्रामपंचायती तर्फे ग्रामसेवक हजर राहून सांगतात कि उताऱ्या शिवाय दुसरा पुरावा आमच्या कडे नाही. त्यानुसार निकाल झाला v आमची नोंद सिटी सेर्वेला झाल्यानंतर मोजणी मागवली त्या दिवशी सरपंच , उप सरपंच व ग्रामसेवक यांनी आम्हाला पुन्हा नोटीस दिली जागेत अतिक्रमण करू नये. नोव्हेंबर मध्ये बॉडीने ठराव केला कि कोर्टात जायचे आहे. परत क्षीरसागर यांनी फेब्रुवारी मध्ये अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायतीने ठराव केला कि कोर्टात जायचं आहे. आज पर्यंत ते कोर्टात गेले नाहीत. आम्ही मा. बीडीओ साहेब व मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब सातारा यांच्याकडे अर्ज केला त्यानुसार सातारा ऑफिस ने त्यांना १. पत्र व ४ स्मरण पत्र पाठवली बीडीओ साहेबाना. बीओडीओ साहेबानी ग्रामपंचायतीत चौकशी साठी विस्तार अधिकारी याना पाठवले परंतु त्यांनाही ग्रामपंचायत चौकशीस सहकार्य करत नाही. म्हणून शेवटी बीडीओ साहेब यांनी वरिष्ठ कार्यालय व या कार्यालयाने वारंवार सूचना व पत्रव्यवहार करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करून या कार्यालयाची दिशाभूल करत आहात म्हणून ग्रामविकास अधिकारी याना १९६४ खाली नोटीस दिली आहे.
1- ग्रामपंचायत आता काय करू शकते ?
2- ग्रामसेवक काय करू शकतात ?
३- आम्ही काय करावे ?
अन्यथा , लोकशाही दिन / आपले सरकार या माध्यमातून आपली तक्रार देऊ शकता