आदरणीय सर,सन १९५६ मध्ये एका डोंगराचे रजिस्टर खरेदीखत करून घेतले होते.व त्यात ताब्याबाबत न्यायालयात दावा दाखल करून ताबा घ्यावा.असे नमूद करण्यात आले होते.परंतु ७/१२ सदरी खरेदी घेणाऱ्याचे नाव दाखल झाले.त्यानंतर न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर दावा फेटाळण्यात आला.अशा वेळी इतर हक्कात जे सर्वसाधारण कुळ होते त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ७/१२ च्या कब्जेदार सदरी एकतर्फी आदेशाने नावे ७/१२ च्या कब्जेदार सदरी लावून घेतली.वास्तविक डोंगरावर कोणाचीच वहिवाट नव्हती.अशा वेळी सदरचे बिनकब्जाचे खरेदीखत उपयोगी आहे किंवा नाही?कारण सदर डोंगर आता भूसंपादनात जाणार आहे.खरेदीखताच्या आधारे मोबदला मिळू शकेल?किंवा कसे?कारण आज रोजी ७/१२ सदरील नावास कंस झाला आहे.कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....
१९५६ साली डोंगर जागेबाबत न्यायालयात वाद चालू होता का ?
आपण ज्यावेळेस प्राथमिक भू संपादन ( Preliminary Notification/notice ) सूचना प्राप्त होईल त्यावेळेस आपण आपली हरकत नोंदवा . जेणेकरून नुकसान भरपाई वाटप या वेळेस संबंधित भू संपादन अधिकारी आपली हरकत विचारात घेतील व आपण डोंगराचे मालक असाल तर , आपणास नुकसान भरपाई देतील .
नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपणास आपली मालकी सिद्ध करावी लागेल .