मा.सर.....आमच्या 7/12 मध्ये तिन व्यक्तिंची नावे आहेत.
तिन्हीं व्यक्तींच्या नावे 2 हेक्टर समाईक क्षेत्र असुन त्याचा 8अ हा तिघांच्या नावे 2हेक्टर जमिनीचे क्षेत्र समाईक दाखवत आहे.....
मला व्यक्ती नं.ऐकाच्या नावे 80आर क्षेत्र...व्यक्ती नं.2 च्या नावे 80आर व व्यक्ती नं.3च्या नावे 40आर आशी वाटनी पत्र करायचे आहे...तिन्ही व्यक्ती एकाच घरातले आहेत.....वाटणीपत्र कसे...व कोठे करावे....कमी खर्चात....
सर crpc 133 अंतर्गत अर्जामध्ये स्वतःचे नाव नमूद न करता अर्ज sdm ला पाठविल्यास ते त्या public nuisance वर कारवाई करू शकतात का ते पण नगर पंचायतीच्या विरुद्ध
नमस्कार सर, वीस (20) वषॉपुवी सदरील कब्जेदाराकडुन व त्याच्या मालकी हक्कामध्ये असलेली दोन(2) एकर जमिन खरेदी खत करुन विकत घेतली होती परंतु आता पुविच्या मुळ मालकाने महसुली विभागात अपिल करुन आमच्या नावे असलेला फेरफार कमी केला व त्याच्या नावे फेरफार मंजुर करुन घेतला व आता जमिनीवर हक्क मागतो तर त्याच्यावर काय कायॅवाही करावी, व न्याय कुठे मागावा ,याबद्दल सर योग्य मागॅदशॅन करावे .
सर, आमचे मुंबई हायकोर्टमध्ये 1951 ला अपिल होते तो निकाल आमुच्यासारखा झाला आहे व सर्वे नंबर ला तिघाची नाव समान क्षेत्राला आहेत प्रत्येकी एक चतुर्थ अंश 135 गुंठे प्रत्येकाला आहे परंतू सर्वे नंबर नंतर एकत्रीकरण ज्यावेळी झाले त्यावेळी ' ' एका भावाला182 आर दुसऱ्याला132 आणि तिसऱ्या भावाला99आर नुसते आहे, एकत्रीकरण मध्ये कोणतेही जाब जबाब नाहीत तीच चुक गट नंबर तीन पडले त्यातही झाले, परंतु भुमिअभिलेख मध्ये विचारले असता ते साहेब म्हणतात की ही पहिल्यावहिवाटीनुसार मोजणी झाली आहे, गट नकाशाही चुकीच्या क्षेत्रानुसार झाला आहे मग क्षेत्र परत सर्वे नंबर सारखे होन्यासाठी काय करावे लागेल साहेब मार्गदर्शन करा | प्लिज.6
समान क्षेत्र करण्यासाठी , क्षेत्राची विक्री आपापसात करा
सर नमस्कार.
आजोबांची शेतजमीन आहे,भुमिअभिलेख एकत्रीकरनाचा सन 1971 ला शेजारचा खातेदाराचा व आजोबांचा काही संबध नसतांना देखील एकत्रीकरणने दोघांचे सातबारे सामाईक करुन दिले आहेत,सातबारा वेगळे करणेकामी भुमिअभिलेख कार्यालय,तहसिलदार सो.तहसिल कार्यालयाला भरपुर अर्ज करुन देखील दाद मिळाली नाही,तरी यावर आत्ता पुढे काय पाऊल टाकावे याचे आपन योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती...
धन्यवाद,,,
नमस्कार सर..
2015-16 मध्ये केळीगव्हाण (ता.बदनापूर) गावातील नदीमध्ये जलयुक्त शिवार, सामाजिक संस्थेच्या आणि लोकवर्गणी निधीतून खोलीकरण आणि रुंदीकरनाचे अर्धवट काम झाले होते
त्यामुळे आमचा नदीतीरावरील वडिलोपार्जित शेतरस्ता विस्थापित झाला तो नदीतीरावरुन पूर्ण करून देऊ अस आम्हाला सांगण्यात आलं पण आजपर्यंत 3 वर्षात तो बनवला नाही त्यासाठी तहसील ला नोव्हेंबर -2018 मध्ये ३५ शेतकऱ्यांच्या सातबारा नंबर आणि तलाठी पंचनामा प्रत सह त्रकार दिल्यावर आमचा अर्ज मजूर करून तहसील ने फक्त खाजगी सामाजिक संस्थांना रस्ता पुर्ववत करण्याची नोटीस दिली पण आजपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी काही उपाययोजना झाली नाही..
लोकवर्गणीतून जमा झाालेल्या निधीतील जवळपास पाच लाख रुपयांची रक्कम कार्यकारी समितीकडे शेष आहे. नदीला जुलै ते जानेवारी पर्या्यं्त पाणी असते,आम्हाला पर्यायी रस्ताही नाही. दोन वर्षेपासून पाण्यातून अवजारे नेऊन शेती पिकावतो आहे..
बदनापूर तहसीलला जानेवारी पासून सतत पाठपुरावा करतोय पण काहीच कार्यवाही होत नाहीय.. आम्ही काय करावे कोणाकडे दाद मागावी??
कृपया मदत करावी,सल्ला दयावा.
सर, माझ्या आजोबाच्या नावाने एकून १४ एकर पैकी ७ एकर इतकी जमीन पाझर तलावासाठी संपादन झाली आहे.ग्रामपंचायत आणि निवृत्ती बाबू पुदाले अशी संयुक्त पणे संपादन अहवालात नमूद आहे. तरी आमची पूर्ण जमीन वर्ग झाल्यामुळे आमची जमीन शिल्लक असून उर्वरित ७ एकर जमिनीचा ७/१२ तयार झाला नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवालाची नक्कल मागणी केली असता ती भूमी अभिलेख आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध नाही असे सांगतात तरी यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाकडे हि नक्कल मिळेल माहिती द्यावी.
सर पाझर तलाव मध्ये गाळ पेरा करण्याचा हक्क कुणाला असतो मूळ मालकाला की लगतच्या/ गटातील शेतकर्याला?
नमस्कार सर...मी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमातील वडीलोपार्जित जागा सूमारे 30ते35 वर्षे पासून वापरत आहे.नेहमी ग्रामपंचायतला कर भरणा चा आग्रह करूनही त्यानी गावपातळीवरील राजकारणामुळे कर घेतला नाही व जागा नावाने पण केली नाही.मी ती जागा शेती वापराच्या साहित्य व जनावर ठेवण्यासाठी मा.तहसिलदार साहेबांना शासनाने निर्धारीत रक्कम भरून जागा मिळण्यासाठी निवेदन सुद्धा दिले पण 2002च्या शासन निर्णयानूसार जागा देता येत नाही म्हणून मला नकार दिला तरी मी काय करू की जेनेकरून मला ती जागा मिळेल.2001पासून मी ती जागा वापरतो याचा स्टम्प पेपर पुरावा सुद्धा आहे.. व मी त्या जागेवर कच्चा स्वरुपात बांधकाम पण केलय व आता गावपातळीवरील राजकारणी विरोधक ग्रामपंचायतीच्या साहाय्याने अतिक्रमण हटाओ च्या नोटीस देऊन धमकावत आहे तरी मी काय करू साहेब मार्ग सांगावा ही विनंती...
सर शेती साठी नदी मध्ये विहीर खोदण्यासाठी नियम,gr, मार्गदर्शक सूचना आहेत का?
नमस्कार साहेब,
जर 'अ ' हा व्यक्ती शेतकरी नाही परंतु 'अ ' या व्यक्तीचे वडीलांच्या नावे थोडी शेतजमिन आहे आणि ते दुसरया ईसमांकरवी शेती करतात. तर ' अ ' हा व्यक्ती स्वतःच्या नावे शेतजमिन खरेदी करू शकतो का ?
मात्र जर वडिलांची जमीन स्वकष्टार्जित असेल तर , अ या व्यक्तीचा त्या जमीनीत जन्मताच अधिकार निर्माण होत नाही . त्यामुळे ती व्यक्ती शेतकरी होऊ शकत नाही . सबब त्यास जमीनखरेदी करता येणार नाही
साहेब,आमच्या वडिलांना कुळकायद्याने जमीन मिळाली आहे.वडिलांच्या नंतर आम्हा भावंडांची नावे लागली आहेत. पण सादर जमिनीची अजून विक्री करून मिळालेली नाही . सादर कुळकायद्याची जमीन विक्री करून मिळण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल?
कृपया या बाबतीत आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे ही आपणास आमची विनंती आहे
आभार
१. वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटपात कमीत कमी किती गुंठे जमिनीचा ७/१२ उतारा बानू शकतो? माझ्या नावे ८ गुंठे जागा येत आहे
२. जमिनी मोजणी अर्जा सोबत कोणती कागद पत्रे जोडावी लागतात ?
भात शेती / एकपिकी - १५ गुंठे
बागायती - ५ गुंठे
उपरोक्त जमीन प्रकारानुसार , या पेक्षा जमीन कमी उरणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक .
८ गुंठे जागेवंगे स्वरूप काय आहे ?
वर्ग2शेत जमिनीचे रजिस्टर willdeed करणेस permission लागते काय
माझा प्रश्न - गट नं.238 ही जमीन नवीन अविभाज्य शर्तीची असून 'सक्षम अधिकाराच्या परवानगी शिवाय हस्तांतरणस बंदी' हा शेरा इत्तर हक्कात आहे.पूर्वी ही जमीन पुंजा नावाचं व्यक्तीची होती.पुंजा हा 1952 साली मयत झाला व त्याच्या दोन वारस मुलाचे नाव मोगल पुंजा आणि दादा पुंजा यांचे नाव 7 / 12 दिसू लागले.दादा पुंजा हा 1972 साली मयत होऊन त्याच्या 3 मुले ,2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.2000 साली मोगल हा मयत होऊन त्याच्या 2 मुले व 2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.आज मितील ह्या दोन्ही परिवारात कटुता असून त्याची वाटणी झालेली नाही व ही सर्व जमीन सामायिक क्षेत्र म्हणून 9 जणांचे नाव 7 / 12 ला आहे.माझा स्वतःचा गट 237 हा गट या 238 गट शेजारी असून मी हा गट विकत घेऊ इच्छितो व आज ती सर्व जमीन माझाकडे कासण्यासाठी असून कब्जा आमचाच आहे तर...
1.सामाईक वारसा पैकी दादा पुंजा चे 6 वारसा मला त्याचा 1/2 (अर्धा ) हिस्सा विकू इच्छिता तर मी ती जमीन खरेदी करू शकतो का?.
2.जिल्हाधिकारी 1/2 (अर्धा ) जमीन विक्री ची परवानगी देतील का?.
3.मागील 20 वर्षी पासून सदर जमीन कसतोय पण पिकपहानी मालकाची आहे तर मी पीक पाहनि कशी लावू अथवा सिद्ध करू शकतो.
4.आणेवारी करून घेण्या साठी काय करावे लागेल?
आपले उत्तर -
दादा पुंजयाची जमीन आपण परवानगीने खरेदी करी शकता ( तुकडे बंदी कायदा अधीन ) .
जिल्हाधिकारी परवानगी देतील
आपण पीक पाहणी लावली तर याचा अर्थ असा होतो कि मूळ मालक जमीन कसत नाही . त्यामुळे जमीन सरकार जमा होऊ शकते .
प्रश्न सर -
१.हे सर्व वारस एक मेक्याचे रक्ताचे नातेवाईक आहेत, जर मी त्यांना नोटिस न बजावत 1/2 क्षेत्र खरेदि केले तर ते (इतर वारस) न्यायालयात माझे 'हिंदू उत्तराधिकार अधिनियम , कलम 22 ' प्रमाणे खरेदी खत रद्द करण्याचा व तो 1/2 आम्ही घेण्यास तयार होतो असा दावा टाकू शकता का?
नमस्कार सर ,तलाठी व मंडळ अधिकारी ला पत्र लिहायचे आहे .न्यायालयात चालू असलेला दावा वादी ने न चालविल्याने रद्द करण्यात आला आहे तर सात बारा वरती असलेली दाव्याची नोंद रद्द करण्याकरिता.
सर 1980 साली शासनाने प्लॉट करून जागा वाटप केल्या होत्या लोकांना राहण्यासाठी परंतु खुली जागा होती म्हणून एक प्लॉट वर 1987 साली ग्रामपंचायतीने राहण्यासाठी ती जागा आम्हाला दिली होती राहण्यासाठी.पण ती जागा सिटी सर्व्हे ला (7/12) दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर आहे.आम्हाला माहिती पण नाही ती व्यक्ती कोण आहे उताऱ्यावर च नाव फक्त माहिती आहे तरी आम्हाला दुसरीकडे कुठेच जागा नाहीये व या जागेचा 7/12 वर आमचं नावं नोंद करायचे आहे त्यासाठी काय करावं लागेल योग्य ते मार्गदर्शन करावे???
परंतु या जागेवर आपले अतिक्रमण नियमानुकूल करता येईल
महार वतन जमिनीची शर्तभंग झाली असल्यास नियमित करण्यासाठी काय करावे लागेल
नमस्कार,
देऊळ, ट्रस्ट, देवस्थान, मंदिराच्या जागांना कुळ लागतात का ? कुळ लागली असतील पण त्यांना काढायची असतील तर काय करावे लागेल ?
मात्र त्याचे नावे विक्री होऊ शकत नाही
देवस्थान जमीन स्वतः कसण्यासाठी अशी जमीन काढून घेऊ शकते
mi X kadun jamin vikat ghetli, sale deed register kele. X ya navane 7/12 hota. pan mazya navavar 7/12 zala nahi, jamin ni.sa.pra. aslyache karan denyat aale. aata X sahkary karat nahi, tar aata mazya kade kay paryay aahet ?
जमीन कोणत्या गावी/ तालुक्यात/ जिल्ह्यात आहे .
तलाठ्यांनी वसुली रकम जवळ ठेवण्याची मर्यादा बाबत शासनादेश असल्यास कृपया माहीती द्यावी
सातबारा वरती जर नाव वर्णाक्षरे ने चुकीची असतील तर कुठे तक्रार करावी?
साहेब नमस्कार
माझा प्रश्न आहे की माझ्या वडिलांनी माझ्या आत्याला २००४ साली निबंधकाकडे जाऊन रजिस्टर मृतुपत्र केले आहे,ते मृतुपत्र माझ्या नावावर आहे हे मला माहित नव्हते,आत्या २०१७ साली मयत झाली तेव्हा मला कळले ,मृत्यूपत्र तलाठी यांच्याकडे नोंदीला दिले तलाठी यांनी नोंद घाली आहे ,पण ७/१२ वर नोंद घालत असताना वारसांना कळले त्यांनी कोर्टात दावा दाखल केले आहे आणि मी मृतुपत्र पहिले असता मृत्यूपत्र करताना मृतुपत्रा मध्ये काही चुका झाल्या आहेत त्या म्हणजे १) दोन साक्षीदार आमच्या गावाचे आहेत पण त्यांचे पत्ते चुकीच्या गावाचे टाकले आहेत
२) साक्षीदार व मृतुपत्र करणारी माझी आत्या यांची दस्ताला ओळखीसाठी कोणतीही कागदपत्रे जोडली नाहीत
3) मृतुपत्र करतेवेळी आत्याचे ७५ वय झाले होते,मृतूपत्राला डॉक्टरांचा मेडिकल आणि फिजिकल फिटनेस दाखला जोडला नाही,
3) आत्याने माझे नावे मृतुपत्र करण्याचे कारण आत्याला मुल बाल नाही,व आत्याची मृतुपत्रातील इच्छा मरेपर्यंत सांभाळ सेवा चाकारी करणार म्हणून केले होते ,परंतु आत्या तिच्या सासरी असल्याने मी तिचा सांभाळ, सेवा दवाखाना केली नाही ,मृतुपत्र रजिस्टर आहे, परंतु आत्याच्या वारसदाराना मृतु पत्राबद्द्दल माहित झाले असल्याने त्यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे,हे मृतुपत्र कोर्टात चालेल का ,मी पुढील कायदेशीर कार्यवाही काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती
मी लहान असताना आजोबांनी काही जमीन माझ्या नवे केली आहे परंतु त्या वेळी ती जमीन टोपण नावाने सातबाऱ्यावर नोंदवली गेली... सध्या सर्व शासकीय कागदपत्रे माझ्या चालू नावावर आहेत फक्त सातबारा टोपण नावे आहे तर ते नाव दुरुस्ती कशी करावी
Bhogwatdar warg 2 jamin vidharbha prane sampurna rajyat warg 1honyachi kiti shakyata आहे
मा. श्री. पाणबुडे सर , तक्रार रजिस्टर भरल्यानंतर किती दिवसा मद्ये निकाल दिला पाहिजे , निकाल देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असेल तर कायकरावे संबधीत अधिकारी पुढची तारीख देत नाही व निकालही देत नाही कृपया आपले मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती.
मात्र शास्नानाने परिपत्रकाद्वारे ती मुदत कमी केली आहे
३ मानण्यात निकाल देणे आवश्यक आहे
खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
सर मला ज़िला अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कलाम ३१ अ निर्यणाया निकाल विरुद्ध अपील करावयाचे आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती .
अम्हला देवास्तन ची 30 अकर जमिन खरेदी ची 2008 मधे धर्मदय आयुक्त ची परवानगी मिढली होती पण ट्रस्टी ने पुर्ण रकम घेऊण फक्त 25 अकर च जमिन खृरेदी करुण दिली 5अकर जमिन खरीदी चे आश्वासन दिले होता पण खरीदी करुण दिली नाही तया मुडे 5 अकर साथी अम्ही कोर्ट मधे केस केली आहे आम्हला 5 अकर जमिनिची खरीदी ची ऑर्डर मिढल काय?आज 07/1/2019 कोर्ट-कचहरी चालू आहे
विश्वस्तांना ३० एकर जमिनीचे पैसे मिळाले बाबत आपण सिद्ध करू शकला तर , आपणास उर्वरित जमीन विश्वस्तांनी विक्री करून द्यावी या बाबत न्यायालय आदेश देऊ शकेल
खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
श्री पाणबुडे सर
आमच्या गावात सरकारी जमिनीवर चाळी बांधकाम करून विक्री करतात तर ह्यासाठी कुठे तक्रार करावी, तसेच मोठ्या प्रमाणात डोंगर खोदून माती विकतात,,
चाली बांधकामास नियोजन अधिकाऱ्यांची विकास परवानगी नसेल तर , त्या नियोजन अधिकारी यांचेकडे तक्रार करा
नियोजन अधिकारी - बांधकाम नगर पालिका क्षेत्रात असेल तर - मुख्याधिकारी
महानगर पालिका - पालिका आयुक्त
गावठाण - ग्रामपंचायत
अन्य ग्रामीण भाग -जिल्हा प्रादेशिक योजना - जिल्हाधिकारी
सर
माझे वडील महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये रोजंदारी वर कामाला होते त्यांना पगार महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट देत होते १९८७ ला त्यांना कामावरून काढले त्यानंतर वडिलांनी कामगार कोर्ट मध्ये केस केली त्या चा निर्णय वडिलांच्या बाजूने लागला परंतु स्टेट ट्रान्सपोर्ट ने अपील केले तेथे सुद्धा खालील कोर्ट चा निर्णय कायम केला ह्या सगळ्या मध्ये वडिलांचे वय ६० वर्षे झाले त्या मुळे स्टेट ट्रान्सपोर्ट ने तुम्हाला तुम्ही वया मुळे कामावर हजार होऊ शकत नाही असे सांगून अत्यल्प मोबदला दिला बाकी कोणत्या हि सुविधा दिल्या नाहीत तरी त्यांना इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि पेन्शन मिळणे साठी काय करावे हे मार्ग दर्शन करावे हि विनंती कोर्ट ने असे सांगितले कि स्टेट ट्रान्सपोर्ट पगार देत असलेने सदर कर्मचारी हा तुमचा कामगार आहे कॉन्ट्रॅक्टर चा नाही
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांनी व मोठ्या भावाने 2008 साली 2आर जागा व त्यातील घर नोदणीकृत करारनामा करून दिले घेणारा माणूस बाहेर राज्यातील असून तो मयत आहे त्याचे कोणी वारसदार नाही 7/12 व घर वडिलांच्या नावे अजुन आहेत गावातील ज्या व्यकतीने हा व्यवहार केला आहे तोच आजपर्यंत घराचे भाडे घेत आहे तर ते घर आम्ही परत घेऊ शकतो का कायदेशीर माग॔दश॔न करावे.
माझे वडील महसूल मंडळ अधिकारी या पदाने माहे ऑगस्ट २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. सदर त्यांना विभागीय चौकशीचे ज्ञापन माहे जुलै २०१८ दिले होते आणि माहे नोवेंबर २०१८ निकाल निर्दोष म्हणून दिला आहे. पण विभागीय चौकशी आरोपपत्रातील काही आरोप हे खोटी माहितीच्या आधारे टाकण्यात आले होते. खोटी माहिती देणाऱ्या शासकीय कर्मचारी विरुध्द तक्रार देऊ शकतो? शक्य असल्यास कोणाकडे करावी? कृपया मार्गदर्शन करावे.
आपण जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करू शकता . मात्र संबंधित कर्मचाऱ्याने खोटी माहिती दिली होती हे आपणास सिद्ध करावे लागेल
प्रश्न - महोदय , माझ्या मालकीच्या जमीन च्या इतर हक्कात स.सा. कुळ असलेल्या व्यक्ती ची नावे चौकशी करून (केस चालवून) व माझ्या बाजून निकाल देत कुळ असलेल्या व्यक्तीची नवे इतर हक्कतून कमी करण्याचा आदेश मा.तहसीलदार यांनी केला आहे व त्याची प्रत गाव तलाठी याच्या कडे पोहचली आहे तरीही ;
१.नियमाप्रमाणे तलाठी याना किती दिवसात नोंद घालणे बंधनकारक आहे.
२.तसेच ज्या इतर हक्कातील व्यक्तीची नावे आदेशानुसार कमी होणार आहे त्यांना वरीष्ठ अधिकाऱ्यां कडे अपील करण्याची किती दिवसाची मुदत असते?
२. अपील करण्याची मुदत ६० दिवस आहे
तहसीलदार यांनी दिलेल्या निकालानुसार २४ .११ ७० चा ३२ म निरर्थक ठरवून ३१ .७ .१९८९ रोजी ३२ म प्रमाणपत्र माझे आजोबांचे नावे करण्यात आले ७/१२ वर आमचे नावाची नोंद होन्याचे दरम्यान नोव्हेंबर १९८९ मध्ये एकत्रीकरण झाले त्यामुळे सदर जमीन आमचे नावे न होता यापूर्वीचे मालकाचे नावेच राहिली त्यामध्ये यापूर्वीचे मालकाचे लगतची जमीन एकत्र होऊन जमिनीचे क्षेत्र बदलून जास्त झाले व जमीन त्याचेच नावे राहिली . सदर प्रकरणात एकूण दोन गट नंबर (६८७ , ८०४ ) होते. गट ८०४ मध्ये ३२ म नुसार आमचे क्षेत्र ३० आर व विरोधकाचे २१ आर एकूण ५१ आर व गट न ६८७ मध्ये ४ आर आमचे व विरोधकांचे २ आर एकूण ६ आर . त्यापैकी एक गट ६८७ मधील ६ आर पैकी ३ आर जमीन वारसाने विक्री केली व विक्री चे परवानगीसाठी जुना २४ .११ .७० चा ३२ म जोडला . मला असे विचारायचे आहे कि गट न ८०४ मधील ३० आर आमचे क्षेत्र असल्याने त्याची नोंद आमचे नावे ७/१२ वर घेण्यासाठी ३२ म व एकत्रीकरण (९)(३ )(९ )(४ ) देऊन अर्ज तलाठी यांचेकडे देणे योग्य आहे का व गट ६८७ बाबत विक्री चा फेरफार रद्द करणेस मा उपजिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज देणे योग्य आहे का
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा , कलम ३२ अथवा ३३ अन्वये जमाबंदी आयुक्त किंवा शास्नानाने गटवार योजना बदल करणे आवश्यक
1. maharashtra land revenue code 1966 chya kalam 247 kon kontya adhikariyan kade appeal karta yete ? 2. Saksham pradhikari chi name list milawi?
श्री. मोहन बाबुराव आसबे,
सर, प्रथम आपले सर्वांचे या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन..
माझ्या आजोबांचे नांव १९५६-५७ पासून कुळ म्हणून दाखल आहे. आजोबा २००३ साली मयत झाले आहेत. आजोबा अशिक्षित असल्याने सदर जमीन कुळ म्हणून खरेदी करुन घेऊ शकले नाहीत. त्याच मिळकतीतील अर्ध्या हिश्याची जमीन ३२ग ने खरेदी करण्यात आलेली आहे. उर्वरित अर्ध्या हिश्याचे जमीन मालक १९५६ साली मयत झाले आहेत. त्यांना कोणीही वारस नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे आमचा जमीन मालकाशी कधीच संपर्क झाला नाही. सदर जमीन वारसाने आम्हीच कसत आहोत. त्याचा शेतसारा नियमित मालकाचे नांवे भरल्याचे आमचेकडे पावत्या आहेत. सध्या सदर जमीन ३२ ग ने खरेदी मिळणेसाठी कुळाचे वारस म्हणून आम्ही तहसिलदार यांचेकडे दावा दाखला केला होता. सदर प्रकरणाचे निकाली आदेशामध्ये - अर्जदार यांचे पुर्वाधिकारी त्यानंतर अर्जदार हे दावा मिळकतीमध्ये दिनांक ०१/०४/१९५७ रोजी कृषक दिनापुर्वीपासून कुळ म्हणून कब्जा वहीवाट करत आहेत. त्यामुळे दावा मिळकत ही अर्जदार यांना कुळ कायदा कलम ३२ व ३२ ग प्रमाणे विकत घेणेचा हक्क व अधिकार आहे.
या दाव्यात इकडून चौकशीची तारीख ०९/०१/२०१७ रोजीची नेमून नोटीसा काढण्यात आल्या. तदनंतर यामध्ये दि. २३/०१/२०१७, दिनांक २४/०४/२०१७ अशा तारखा देवून उभय पक्षकारांना पुरावा करणेची संधी देणेत आली तथापि प्रतिवादी / जमीन मालक यांना अर्जदार यांनी दिलेल्या पत्यावर नोटीस लागू झालेली नाही. तदनंतर जमीन मालकांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून दैनिक लोकमत या वृत्तपत्रातून दि. ०३/०३/२०१७ व दैनिक पुढारी वृत्तपत्रातून दि. ०४/०३/२०१७ या तारखेची जाहीर नोटीस देणेत आली. परंतु प्रतिवादी / जमीन मालक तर्फे कोणीही प्रतिनिधी अगर समक्ष हजर राहीलेले नाहीत. त्यानंतर पुन्हा दि २३/०५/२०१७ रोजी नोटीस काढून ती गा. का. तलाठी यांचेमार्फत पंचनामे व्दारे दावा जमीनीस चिकटविणेत आली.
प्रस्तुत प्रकरणातील वादी यांनी जमीन मालकाचा पुर्ण पत्ता दिलेला नाही. त्यामुहे त्यांना नोटीस पाठविली असता त्यांना नोटीस लागु न होता ती परत आलेली आहे. नैसर्गिक न्यायाचे दृष्टीने जमीन मालक यांना नोटीस लागु करुन त्यांचे म्हणणे घेणे आवश्यक आहे. तशी कार्यवाही वादी यांनी केलेची दिसून येत नाही. त्याचप्रमाणे कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये जमीनीची किंमत ठरवायची झालेस कुळाने मालकांस खंड दिल्याचे पुरावे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे कुळ व जमीन मालक यांचेतील नाते स्पष्ट होत नाही. केवळ वादी यांनी दाखल केलेल्या दाव्यावरुन जमीन मालक यांना कोणतीही संधी न देता जमीनीची किंमत ठरविल्यास मुळ जमीन मालक यांचेवर अन्याय केल्यासारखे होईल. अशा परिस्थितीत वादी कुळ यांचा उक्त जमीनीची किंमत ठरवून मिळणेबाबतचा अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते. सबब मी तहसिदार मला असले मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ३२ ग अन्वये खालील आदेश पारीत करीत आहे. आदेश - अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करणेत येत आहे. सदर निकालाची समज उभय पक्षकार व गा.का. तलाठी यांना देणेत यावी. सदर आदेश दिनांक ०२/११/२०१७ रोजी झालेला आहे.
सदर आदेशावर मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपिल करण्यात आले होते. सदर अपिलाचा निर्णयामध्ये - अपिल अंशत: मान्य करणेत आले आहे. व फेरतपासामध्ये सखोल चौकशी करुन ३ महिन्याचे आत अंतिम निकाल देणेबाबत. आदेशित केले आहे. त्यानंतर फेरतपासणीमध्ये जमीन मालक अगर त्यांचे प्रतिनिधी कोणीही उपस्थित झालेले नाहीत. सदर ३ महिन्यांचा कालावधी उलटून ४-५ महिने झालेले आहेत अजूनही तारखेस बोलविणेत येत आहे. शेवटच्या तारखेत तोंडी खंड भरलेच्या पावत्या, कुळ व जमीन मालक यांचे नाते स्पष्ट होण्यासाठी केलेले करार पत्र सादर करण्यात सांगण्यात आलेले आहे. परंतु आमचेकडे खंड भरलेच्या पावत्या किंवा कुळ व जमीन मालक यांचेतील करार पत्र उपलब्ध नाही.
तरी सदर जमीन ३२ग ने खरेदी करुन मिळण्यासाठी मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.
1) नमस्कार सर 19 डिसेंबर 2018 चा समांतर आरक्षणाचा GR काय आहे?? 2) मी OBC प्रकल्पग्रस्त असून मी गुणवत्तेनुसार (जास्त) मार्क असेल तर मी OPEN प्रकल्पग्रस्ताचे मेरीट मारू शकतो किंवा Open प्रकल्पग्रस्तांमध्ये समावेश होईल का?? 3) तसेच मला OBC प्रकल्पग्रस्तामधून गुणवत्तेनुसार सध्याचे (48%किंवा 32%) pure general प्रवेश करता येईल का??? याची कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती
श्री. मोहन बाबुराव आसबे,
सर, प्रथम आपले सर्वांचे या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन..
माझ्या आजोबांचे नांव १९५६-५७ पासून कुळ म्हणून दाखल आहे. आजोबा २००३ साली मयत झाले आहेत. आजोबा अशिक्षित असल्याने सदर जमीन कुळ म्हणून खरेदी करुन घेऊ शकले नाहीत. त्याच मिळकतीतील अर्ध्या हिश्याची जमीन ३२ग ने खरेदी करण्यात आलेली आहे. उर्वरित अर्ध्या हिश्याचे जमीन मालक १९५६ साली मयत झाले आहेत. त्यांना कोणीही वारस नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे आमचा जमीन मालकाशी कधीच संपर्क झाला नाही. सदर जमीन वारसाने आम्हीच कसत आहोत. त्याचा शेतसारा नियमित मालकाचे नांवे भरल्याचे आमचेकडे पावत्या आहेत. सध्या सदर जमीन ३२ ग ने खरेदी मिळणेसाठी कुळाचे वारस म्हणून आम्ही तहसिलदार यांचेकडे दावा दाखला केला होता. सदर प्रकरणाचे निकाली आदेशामध्ये - अर्जदार यांचे पुर्वाधिकारी त्यानंतर अर्जदार हे दावा मिळकतीमध्ये दिनांक ०१/०४/१९५७ रोजी कृषक दिनापुर्वीपासून कुळ म्हणून कब्जा वहीवाट करत आहेत. त्यामुळे दावा मिळकत ही अर्जदार यांना कुळ कायदा कलम ३२ व ३२ ग प्रमाणे विकत घेणेचा हक्क व अधिकार आहे.
या दाव्यात इकडून चौकशीची तारीख ०९/०१/२०१७ रोजीची नेमून नोटीसा काढण्यात आल्या. तदनंतर यामध्ये दि. २३/०१/२०१७, दिनांक २४/०४/२०१७ अशा तारखा देवून उभय पक्षकारांना पुरावा करणेची संधी देणेत आली तथापि प्रतिवादी / जमीन मालक यांना अर्जदार यांनी दिलेल्या पत्यावर नोटीस लागू झालेली नाही. तदनंतर जमीन मालकांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून दैनिक लोकमत या वृत्तपत्रातून दि. ०३/०३/२०१७ व दैनिक पुढारी वृत्तपत्रातून दि. ०४/०३/२०१७ या तारखेची जाहीर नोटीस देणेत आली. परंतु प्रतिवादी / जमीन मालक तर्फे कोणीही प्रतिनिधी अगर समक्ष हजर राहीलेले नाहीत. त्यानंतर पुन्हा दि २३/०५/२०१७ रोजी नोटीस काढून ती गा. का. तलाठी यांचेमार्फत पंचनामे व्दारे दावा जमीनीस चिकटविणेत आली.
प्रस्तुत प्रकरणातील वादी यांनी जमीन मालकाचा पुर्ण पत्ता दिलेला नाही. त्यामुहे त्यांना नोटीस पाठविली असता त्यांना नोटीस लागु न होता ती परत आलेली आहे. नैसर्गिक न्यायाचे दृष्टीने जमीन मालक यांना नोटीस लागु करुन त्यांचे म्हणणे घेणे आवश्यक आहे. तशी कार्यवाही वादी यांनी केलेची दिसून येत नाही. त्याचप्रमाणे कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये जमीनीची किंमत ठरवायची झालेस कुळाने मालकांस खंड दिल्याचे पुरावे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे कुळ व जमीन मालक यांचेतील नाते स्पष्ट होत नाही. केवळ वादी यांनी दाखल केलेल्या दाव्यावरुन जमीन मालक यांना कोणतीही संधी न देता जमीनीची किंमत ठरविल्यास मुळ जमीन मालक यांचेवर अन्याय केल्यासारखे होईल. अशा परिस्थितीत वादी कुळ यांचा उक्त जमीनीची किंमत ठरवून मिळणेबाबतचा अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते. सबब मी तहसिदार मला असले मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ३२ ग अन्वये खालील आदेश पारीत करीत आहे. आदेश - अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करणेत येत आहे. सदर निकालाची समज उभय पक्षकार व गा.का. तलाठी यांना देणेत यावी. सदर आदेश दिनांक ०२/११/२०१७ रोजी झालेला आहे.
सदर आदेशावर मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपिल करण्यात आले होते. सदर अपिलाचा निर्णयामध्ये - अपिल अंशत: मान्य करणेत आले आहे. व फेरतपासामध्ये सखोल चौकशी करुन ३ महिन्याचे आत अंतिम निकाल देणेबाबत. आदेशित केले आहे. त्यानंतर फेरतपासणीमध्ये जमीन मालक अगर त्यांचे प्रतिनिधी कोणीही उपस्थित झालेले नाहीत. सदर ३ महिन्यांचा कालावधी उलटून ४-५ महिने झालेले आहेत अजूनही तारखेस बोलविणेत येत आहे. शेवटच्या तारखेत तोंडी खंड भरलेच्या पावत्या, कुळ व जमीन मालक यांचे नाते स्पष्ट होण्यासाठी केलेले करार पत्र सादर करण्यात सांगण्यात आलेले आहे. परंतु आमचेकडे खंड भरलेच्या पावत्या किंवा कुळ व जमीन मालक यांचेतील करार पत्र उपलब्ध नाही.
तरी सदर जमीन ३२ग ने खरेदी करुन मिळण्यासाठी मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.
प्रतिवादींचा पत्ता देणे वादी ची जबाबदारी आहे . मात्र जर पत्ता उपलब्ध नसेल तर , वर्तमान पत्रातील नोटीस पुरेशी आहे . तहसीलदार सुनावणी प्रक्रिया सुरु करत नसतील तर , प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या .
आमची ७ एकर जमीन वडिलोपार्जित आहे आमच्या हिस्साला आलेल्या जमिनीवर आजीचे नाव लागले होते ते आता कमी केले असून वारसा नोंदणी नुसार आता काकांची नावे लागली आहे परंतु आदिच समान खातेवाटप झाले असून त्या नंतर आजीचे नाव चुकून लागले होते आमच्या ७/१२ वरून त्यांचे नाव कमी कारण्यास ते तयार आहे पण त्यासाठी काय करावे या साठी मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती
काका पूर्वीचे वाटपाप्रमाणे , जमीन नावावर करून देण्यास तयार असल्यास , पुन्हा पूर्वी सारखेच वाटप करा .
अथवा काकांचे नाव , या पूर्वी वाटप होऊन हि लागले तो फेरफार आव्हानात करा .
श्री पाणबुडे सर,, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इंडिया ,, ने संपादित केलेली जमीन तालुका अंबरनाथ ,जिल्हा ठाणे, येथे असून त्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशररित्या चाळी बांधणे तसेच विक्री चालू आहे,, ह्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा खूप नुकसान होत आहे तरी हे बेकायदेशीर बांधकाम थांबावे ह्या करिता काय करावे.
2) बाजूच्या सरकारी जागेवर बेकायदेशीर बांधलेल्या चाळींचा सांडपाणी शेतात येत आहे व थोड्या दिवसांनी विहीर पण घाण होईल आत्ता काय करावे मार्गदर्शन करावे विनंती,
२. बेकायदेशीर चाली बाबत नियोजन प्राधिकरणाकडे अर्ज करा . सरकारी जागेवर अतिक्रमण आहे , तहसीलदार यांचेकडे तक्रार दाखल करा
३. सांडपाण्याबाबत , प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांचेकडे अर्ज करा
Maze vadil mayat asun aamhi jya jagevar ghar bandhun rahato te Ghar 8-A vadilanchya navavar ahe, Light bill tyanchyach navavar ahe.Gavacha city survey karyanvit navta to 2015 la karyanvit zala va tya nanatar documents property card,sanad milali parantu tyvar vadilanche naav vahivatdar mhanun yet ahe.Purviche documents kadlyanantar samazale ki hi jaga vadilani vikat ghetali hoti parantu kharedi 1985 la stamp paper var karun ghetali hoti va to ajun hi karar patra ahe amchyakade.kaydeshir navavar karayala kaay marg ahet. City survey type - A Type ahe, Satbara var - Jyachykadun ghetale te hi mayat ahet va tyachya varasache nave ahet, City survey record la- Dharak - jyanchyakadun getali tyanche nav ahe va vahivatdar-Vadilanche nav ahe(Donhi Mayat Ahet) Please suggest
१९८५ साली स्टॅम्प पेपर वर गावठाण प्लॉट वडिलांनी खरेदी केला आहे आणि आता वडील व देणारे दोघेही मयत आहेत आणि प्रॉपर्टी कार्ड वर धारक वर देणाऱ्याचे नाव आहे आणि भोगवटादार म्हणून वडिलांचे नाव आहे. आता स्टॅम्प पेपर रजिस्टर करू शकतो का ?
जर आपला दस्त नोंदणीकृत नसेल तर , आता तो नोंदणीकृत करता येणार नाही
नमस्कार सर
बक्षीस पत्रास हरकत घेऊ शकतो का ?
कशाप्रकारे घेऊ शकतो ?
जर बक्षीस पत्राचे आधारे फेरफार नोंद अभिलिखित करण्यात अली असेल तर , संबंधित तलाठी यांचेकडे हरकत घ्या .
जर बक्षीस पत्राचे आधारे फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर , दिवाणी न्यायालयात , बक्षीस पत्र आव्हानात करा
सर डोमीसाईल चा दाखला 2007 मध्ये काढलेला आहे किती दिवस चालणार त्याची मुदत किती असते
आपण पूर्वी घेतलेला आदिवासी दाखला २००७ चा आहे . आपण मध्यंतरीच्या कालावधीत , महाराष्ट्र राज्याबाहेर वास्तव्यास असल्यास , आपण अधिवास दाखला मिळण्यास पात्र होऊ शकत नाही . आपले मागील १५ वर्षे वास्तव्य , महाराष्ट्रात होते याची पडताळणीकरण्यासाठी , दरवर्षी अधिवास प्रमाणपत्र (आवश्यकतेप्रमाणे) काढणे आवश्यक .
सर रजिस्टर पॉवर ऑफ attorny द्वारे जमीन हस्तांतरित होऊ शकते बरोबर आहे का
2) court/ मॅजिस्ट्रेट याना search वॉरंट काढण्याचा अधिकार असतो तसा तहसीलदार यांना हा अधिकार असतो का? ते पण मॅजिस्ट्रेट च असतात ना
namaskar sir 1.maza question asa hai ki civil courtane opposite party la permanant injunction dilela hai tari samoril party plantiff chya property (land)
var atikram karat asel tar karave? 2.civil court madhe ya baddal kay procedure hai ka?
मनाई हुकुमाचे विरुद्ध , जर विरोधी पक्ष , मिळकतीत अतिक्रमण असेल तर , हि बाब न्यायालयाचे निदर्शनास आणून द्या . न्यायालयाचा अवमान आहे .
माननीय सर माझा प्रश्न असा आहे .माझे वडील व चुलते यांनी 1987साली जमिनी विकून टाकली .माझे आजोबा मयत झाले त्या नंतर माझी आज्जी 3आत्या वडील व चुलते यांची नावे 7/12पाहीजे होती .पण असे झाले नाही. झालेले व्यवहार रद्द करता येऊ शकते का .आज्जी आज रोजी ह्यात आहे.कुल मुखतयार आज्जी आणि आत्या यांचे करून मला दावा करता येतो का?मी नातू आहे. 7/12 खरेदीदाराचे नाव आहे