जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by कवडू दौलत गेडाम
Sunday, August 21, 2022
kdgedam721@gmail.com
नमस्कार सर, कुळ, सिलींग, भूदान भोगटदार वर्ग ०२ च्या जमीनी भोगवटदार ०१ करता येईल का? करता येत असेल तर कोणाकडे अर्ज करावा.
नमस्कार कवडू साहेब
भूदान जमीन हि ज्या कुणाला प्रदान केलेली असते ही त्याच्याकडे बाहेर पट्ट्याने असते. या या मिळकतीवर ग्रामदान मंडळ यांचा मालकीहक्क आहे तद्वतच ते या मिळकतीचे मालक आहेत. त्यामुळे या मिळते तिच्या हस्तांतरणास परवानगीची तरतूद संबंधित कायद्यामध्ये नाही.
कुळ कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या जमिनी या वर्ग दोन म्हणून धारण केलेले असतात. त्याची विक्री किंमत निश्चित होऊन जर दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला गेलेला असेल, तर ती जमीन आपसूकच वर्ग-1 होते. जर अशा जमिनीचे हस्तांतरण करायचे असेल अथवा तिचे रूपांतर वर्ग एकमध्ये करावयाचे असेल तर संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा.
कमाल शेत जमीन मर्यादा धारण कायद्यापेक्षा अतिरिक्त ठरलेल्या जमिनी वाटप केल्यानंतर त्याचा भूधारणा प्रकार हा वर्ग-2 असतो. अशा जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी आपणाला जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अर्ज करावा लागतो व त्या ठिकाणाहून आपणाला परवानगी मिळू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्यामसुंदर खंकरे
Sunday, August 21, 2022
khankaresm5477@gmail.com
25 वर्षे अखंडीत झाले जमीन माझ्या कब्जात आहे, मी जमीन स्वतः कसतो, शेतमाल माझ्या घरी नेतो, पण मूळ मालक आतापर्यंत मला काही बोलला नाही.... शांतीपूर्ण कब्जा आहे... कब्जा आधारे शेत कोणाच्या नावे होईल
श्याम सुंदर साहेब
निश्चित शांत पूर्ण कब्जा तत्वा खाली दिवाणी न्यायालयामार्फत या मिळकतीमध्ये आपणाला मालकी हक्क मिळू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Aniket patil
Thursday, August 18, 2022
ADPATILARVI@GMAIL.COM
काकाच्या नावने असलेले प्रकल्प ग्रस्त पुतण्याच्या नावाने करता येते का
Question by Navanath Patil
Monday, August 15, 2022
9nathpatil21@gmail.com
सर मा तहसीलदार साहेबांनी आमच्या विरुद्ध निकाल दिला आहे, त्याचे आसे म्हणणे आहे की सदर ची जमीन ही महार वतन 6ब ची आसल्याने तूम्ही सक्षम प्राधिकारी ह्यांची पूर्व परवानगी घेतली नसल्याने तुमचा फेरफार रद्द करत आहे . परंतु सर आम्ही खरेदीच्या वेळेस तेव्हाच्या मा तहसीलदार साहेबांना अर्ज केला असता तेव्हा मा तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र दिले की सदरचा गट हा सन 1968 च्या मुंबई हलके गाव नोकरांची वतने रद्द करणेबाबतच्या कायदा वतन इनाम 01/05/1959 खालसा करण्यात आलेली आसल्याने याकामी शासन निर्णय क्रमांक/वतन/1099/प्र.क्र.223/ल-4 दिनांक 09/07/2002 व शासन निर्णय क्रमांक/2002/प्र. क्र.100/ल -4 दिनांक 17/07/2008अन्वये आणि कंसामधे (महार वतन आणि देवस्थान इनाम जमीन वगळून) सदर जमिनीवरील भोगवटदार वर्ग 2 ही अट कमी न hota जमीन वाटप/ खरेदी विक्री करणेस परवानगीची आवश्यकता नाही. असे आम्हास पत्र दिले होते . आणि आता नवीन मा तहसीलदार साहेबांनी महर वतन 6ब ची जमीन आसल्याने तूमचा फेरफार रद्द करत आहे असे म्हंटले आहे, तरी आता मी काय करू सर
Question by अमोल वाघ
Sunday, August 14, 2022
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
मामलेदार न्यायालय १९०६ कलम ५(२) अन्वये अर्जदार यांचे अर्जाची सविस्तर चौकशी होऊन केलेला अडथळा दुर करण्यांसंबंधी निर्णय पारीत झाला आहे. नंतर प्रतिवादी यांनी उपविभागीय अधिकारी यांचेकडे २३(२)रिव्हीजन अर्ज दाखल केलेला होता. त्यांत रिव्हीजन नामंजूर करण्यात आले. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असुन त्यांत फेरबदल करण्यांची आवश्यकता नाही. असा निर्णय निर्णय दिलेला आहे. परंतू त्यांनी परत उपविभागीय अधिकारी यांचेकडे रिव्हु अर्ज दाखल केलेला असुन त्यांचे नोटीस आम्हाला प्राप्त झाले आहे.
१) मामलेदार कोर्ट अॅक्ट नुसार रिव्हीजन अर्जातील निर्णय नंतर रिव्हु दाखल करता येते का?
२) मामलेदार कोर्ट अॅक्ट मध्ये तशी तरतूद आहे का?
Question by Manoj
Sunday, August 14, 2022
sagarkandekar1990@gmail.com
एकाच गटातील आपल्या पोटहिस्सा ची मोजणी करण्याची प्रक्रिया काय आहे ? बरेच जण बोलता की सह हिस्सेदार यांची समती लागते पण सह हिस्सेदार तर कधीच समंती देणार नाही कारण जमीन जास्त त्याच्कडे निगते. कृपया आपला पोट हिस्सा मोजणी करून व आपली जमीन ताब्यात घेण्यासाठी काय करावे?
Question by Sampat raskar
Monday, August 08, 2022
sampatraskar4049@gmail.com
कलम 44अ नुसार रहिवाशी (NA) 200 स्क्वेअर मीटर चा प्लॉट परवानगीशिवाय इंडस्ट्रियल वापरासाठी वापरता येईल का ?
Question by Rahul
Monday, August 08, 2022
jadhav.rahul111@yahoo.com
माझी व माझ्या काकांची जमीन एकाच गटामधे आहे. गट वेगळे करण्यासाठी किंवा जमीनीचे गट वेगवेगळे करण्यासाठी काय प्रक्रिया आहे. आमचे 7/12 सेपरेट करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा १९४७ च्या कलम 31 नुसार, गटर स्कीम योजना अमलात आल्यानंतर, अशा जमिनीचे हस्तांतरण करताना ,जमिनीची विभागणी होत असेल तर अशा जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही . तथापि विद्युत पंप बसवणे वा अन्य कारणासाठी, जमिनीचा तुकडा पडत नसेल म्हणजे( प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र निर्माण होत नसेल) तर जिल्हाधिकारी यांना परवानगी देण्याचे अधिकार आहेत.
मात्र जर हस्तांत्र्नामुळे तुकडा निर्माण होत असेल तर अस्ज्या हस्तांतार्नास परवानगी देण्याची तरतूद नाही तद्वतच असा व्यवहार अनुद्नेय नाही .
मात्र वारसा हक्काने आलेल्या जमिनीच्या विभागणी करताना जर तुकडा पडत असेल तर दोघांपैल्की एकाला , जमीन घ्यावी लागेल व दुसर्याला त्याच्या हिस्स्याची जमिनीचे पैसे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by BALAJI GOPAL DAHIPHALE
Monday, August 08, 2022
BALAJIDAHIPHALE1996@GMAIL.COM
महोदय सर,
ज्याच्या नावे ७/१२ आहे तो मयत झाल्यानंतर कायदेशीर वारस यांच्या नावे ७/१२ आली आहे,हे वारस पत्नी, मुले व मुली आहेत. परंतु हे वारस आप-आपसात कटुता असल्यामुळे वाटणी पत्र केलेले नाही, वकिलांनी वाटणी करतो म्हणून प्रत्येक वारसांनी मा.न्यायलयात 7 Rule 1 CPC या खाली दावा दाखल केलेला आहे, हा दावा दाखल करून 2 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे, पण कोणीही तारखेला जात नाही , म्हणून पुढील प्रश्नवर मार्गदर्शन मिळावे सर.
1) वारस यांची मुले यांच्या नावे जमीन कश्या प्रकारे करता येईल?
2) वारसांच्या समंती विना प्रत्येक जण स्वतः चा हिस्सा कश्या प्रकारे घेवू शकतो ?
३) सर्व वारसांची सामाईक नावे असल्यामुळे प्रत्येक वेळेस शासकीय अनुदान, पिक विमा , शासकीय योजना साठी सहमती देत नसतील तर काय करावे ?
४) अनुदान मागणी साठी तहसीलदार महोदय यांच्याकडे विनंती केली असता तहसीलदार सर सांगतात कि , आपल्या जमिनीवर कोणालाही अनुदान देवू नये म्हणून अर्ज आलेला आहे म्हणून आपणास सहमती विना अनुदान देता येणार नाही.
आपला जो दावा आपण दिवाणी न्यायालयात दाखल केलेला आहे त्याच्या नियमित सुनावणी घेण्यासाठी आपल्या वकिलांमार्फत पाठपुरावा करावा. न्यायालयामार्फत प्रत्येकाचा त्या जमिनीमध्ये असलेला हिस्सा निश्चित केला जाईल. त्यानंतर ते प्रकरण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सरस निरस वाटपासाठी वर्ग करण्यात येईल. सह धारकाची संमति असो अथवा नसो, तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या अधीन राहून तहसीलदार/ उपअधीक्षक भूमी अभिलेख अशा जमिनीचे सरस निरस वाटप करते. व प्रकरण अंतिम हुकूमनामा साठी दिवाणी न्यायालय या कडे वर्ग केले जाईल. दिवाणी न्यायालय मार्फत अशा प्रकरणांमध्ये अंतिम हुकूमनामा काढला जाईल व त्याप्रमाणे जमिनीचा ताबा सहधारकांना देण्यात येईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोळकर
Sunday, August 07, 2022
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आमचे राहते घर पडले आहेत ते आम्हाला मुळासकट बांधायचे आहे आम्हची घरपटी पण आहे , पण ज्यांचे जमीनीत नाव आहे ,पण घरावर अधिकार नाही ,या सर्व सातबारामधील लोकांची आम्हांला ना हरकत घवे लागते का
प्रश्न असा आहे ते घर बांधकाम करण्यासाठी आपणाला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अथवा घर जर नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीत असेल तर त्या त्या नियोजन प्राधिकरणाची परवानगी लागेल. नियोजन अधिकारी आधी तर अभिलेखाची पडताळणी करताना, या व्यक्तीच्या नावावर ती जमीन आहे त्या व्यक्तीची संमती असल्याशिवाय तद्वतच त्या व्यक्तीने अर्ज केला असल्याशिवाय परवानगी देणार नाहीत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयराम हरी पाचपुते
Saturday, August 06, 2022
pachputejh@gmail.com
बिनशेती प्रकारानुसार प्रति चौ मी दर आकारणी चे 23/10/2007 चे परिपत्रक मिळावे हि विनंती
Question by Datta putwad
Friday, August 05, 2022
dattaputwad@gmail.com
dear. sir
In The Court Of :District Judge-2 And ASJ Kandhar Link Court Mukhed
CNR Number. :MHND210002492018
Case Number. :R.C.A./0000032/2018
Nagorao Shyamrao Putwad Versus Pandurang Shyamrao Putwad
Date :03-08-2022
Business : अपीलाथी व त्याचे वकील हजर गैरअपीलाथी व त्याचे वकील हजर युक्तीवाद ऐकला नि १ वर आदेश पारीत केला Order 1 Appeal Is Allowed With Costs 2 The Judgemwent And Decree Passed By 2 Joint CjjD Mukhed In RCS 78/15 Dt 27/7/18 Is Here By Set Aside 3 RCS 78/15 Is Here By Dismissed 4 Decree Be Drawn Up Accordingly
Nature Of Disposal : APPEAL ALLOWED, CROSS OBJECTION ALLOWED
Disposal Date : 03-08-2022
District Judge-2 And ASJ Kandhar Link Court Mukhed नि 1 वर आदेश पारित केला म्हणजे कळत नाही निकाल कोणाच्या बाजूने लागला आहे सांगा निकाल बदल सविस्तर माहिती सागा
Question by Sagar ghotekar
Monday, August 01, 2022
skghotekar11@gmail.com
नमस्कार ,
माझ्या वडिलांनी 1998 साली 40 आर जमीन विकली होती गटाचे रुंदी दोन्ही बाजूला कमी जास्त आहे गटातून विकली जमीन त्या व्यक्तीला आयात आकारात दिलेली आहे पण आज ती व्यक्ती आमच्याकडे गटाच्या रुंदी च्या प्रमाणात जमीन मागत आहे म्हणजे ज्या बाजूला गटाची रुंदी जास्त आहे त्या बाजूला त्या व्यक्तिलाही रुंदी जास्त हवी आहे (त्या प्रमाणात ) असे केले तर माझ्या घरचा काही भाग जातो..
तर कृपया मार्गदर्शन करा
Question by नागेश पांडुरंग हातोलकर
Saturday, July 30, 2022
nageshhatolkar.patil@gmail.com
मला प्लॉट खरेदी करायचा आहे परंतू जो प्लॉट खरेदी करायचा आहे तो NAP36 आहे खरेदी करणाऱ्या प्लॉटचा नमुना 7 व 8 अ सुद्धा आहे मला कृपया nap 34 ले आऊट व nap 36 ले आऊट मध्ये काय फरक आहे हे सांगावे nap 36 ले आऊट वर शासकीय घर बांधणी अग्रीम घेता येईल का कृपया मार्गदर्शन करावे
Question by नागेश पांडुरंग हातोलकर
Saturday, July 30, 2022
nageshhatolkar.patil@gmail.com
मला माझ मालकीची जागा अकृषक करायची आहे नवीन शासन निर्णय नुसार 200 मीटर च्या परिघिय क्षेत्रात तील जागा अकृषक करता येते परंतु गावाची गावठाण हद्द काशी ठरवल जाते या बाबत मार्गदर्शन करावे
गावथानापासून २०० मी च्या आतील जमीन मानीव अक्रीशिक आहे . आपली जागा २०० मी च्या आता आहे का हे तलाठी ठरवतील . आपण बिन शेती धारा भरण्याची तयारी दर्शवा व बिन शेती धारा भरा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol shinde
Friday, July 29, 2022
amolshinde2877@gmail.com
विभागीय चौकशी ज्ञापन दिल्यापासून किती दिवसात पूर्ण करावी नियम कायदा काय आहे
Question by श्रेयस रामचंद्र जोशी
Thursday, July 28, 2022
shreyasrjoshi26@gmail.com
एक महिला, तिला तिच्या नावे जमीन खरेदी करावयाची आहे. ती शेतकरी नाही, तिच्या नावे कुठेच जमिन, सातबारा नाही तर तिला जमीन खरेदी करता येईल का ? तिचे पती शेतकरी आहेत. पतीच्या नावे सातबारा आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
होय
पतीच्या नावे जमीन असल्याव्ने ती संयुक्त कुटुंबातील सदस्य असल्याने तिच्या नावे शेतकरी दाखला मिळू शकेल . त्या आधारे ती शेत जमीन खरेदी करू शकेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वकील चौधरी
Thursday, July 28, 2022
vakilchaudhari123@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न असा आहे की तलाठी स्तरावर कुठलाही फेरफार हरकत नसतांना 30 दिवसांनंतर सुध्दा तलाठी व सर्कल नोंद घेत नाही.काय करावे मार्गदर्शन करावे धन्यवाद.
सदर बाब तहसीलदार /प्रांताधिकारी /जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Supriya
Monday, July 25, 2022
supriya.ranaware11@gmail.com
अपील -२६२१/९३४/प्र .क्र . ६७ Copy required
Question by Eaknath ganesh parwe
Saturday, July 23, 2022
eknathparwe1991@gmail.com
प्रॉपर्टी कार्ड वर, आखीव पत्रिके वर सामुहिक तिघांची नावे आहेत. प्रयाग पारवे 2 मथुरा पारवे 3.सूर्यभान पारवे तर त्या मधील प्रयाग पारवे चा मुलगा सूर्यभान च्या वारसांना हिस्सा देत नाहीत. तर काय करावे लागेल म्हणजे हिस्सा मिळेल.
प्रयाग पारवे चा मुलगा सूर्यभान पारवे च्या मुलाला जमीन कोणत्या कारणामुळे देईल अथवा ते देण्याचे कारण काय याचा खुलासा आपल्या प्रश्नांमध्ये करावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3021 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
राजेश जे वझीरे | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
अजित नथू शेलार | 3 |