जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by KUNAL JADHAV
Wednesday, June 14, 2023
mr.k1387@gmail.com

अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध MPDA अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येतात. तर, कोणत्या कलमा नुसार वाळू तस्करांविरूद्ध गुन्हा दाखल केला जातो ? MPDA कायद्यात सुधारणा केल्याबाबतची अधिसूचना असल्यास कृपया देण्यात यावी.
खाणी आणि खनिजे ( विकास व विनियमन) अधिनियम 1957 च्या कलम 21 अन्वये अनाधिकृत पणे अथवा विनापरवाना गौण खनिज करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जातो.MPDA कायद्यामध्ये सुधारणा झाल्याची माहिती माझ्याकडे नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pankaj Ade
Wednesday, June 14, 2023
Pankajade07@gmail.com

मी आदीवासी जमातीचा असुन बिगरआदिवासीने माझ्या वडिलांच्या स्वभावाचा फायदा घेत कोणतीही परवानगी न घेता जमिनीची इसारपत्र नोटरी करुन घेतले आणि जमीन ताब्यात घेतली विस वर्षापासून जमीन बिगरआदिवासीच्या ताब्यात आहे विक्री झालेली नाही. वडील मयत झाले. आता मला जमीन ताब्यात घ्यायची आहे तर दाद कोणाकडे मागता येईल. कृपया सविस्तर माहिती द्यावी.
आदिवासी खातेदाराकडून बिगर आदिवासी खातेदाराकडे भोगवट्याचे हस्तांतरण झालेले असल्यास, भोगवटा आदिवासी खातेदाराला पुनर स्थापित करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 अनुसार मूळ अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. पुनर स्थापित करण्याबाबतचे जिल्हाधिकारी यांचे हे अधिकार काही जिल्ह्यांमध्ये उपविभागीय अधिकारी( महसूल) यांना दिलेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये हे अधिकार तहसीलदार यांना दिलेले आहेत. आपल्या वडिलांनी धारण केलेली जमीन जिचा भोगवटा आपल्या वडिलांचा भोळेपणाचा फायदा घेऊन बिगर आदिवासी व्यक्तीने गेले वीस वर्षापासून घेतलेला आहे ती ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यामध्ये उपरोक्त अधिकाराचे प्रत्यापण उपभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यापैकी कोणास केलेली आहे त्याकडे, आपणाला जमीन प्रत्यावर्तीत करून देण्याबाबत अर्ज करावा लागेल. मात्र त्यासाठी आपण आदिवासी समाजाचे आहात त्याबाबतचे जात प्रमाणपत्र व ज्याला पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र दिलेले आहे, असा अभिलेख आपणाकडे असणे आवश्यक आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pankaj Ade
Wednesday, June 14, 2023
pankajade07@gmail.com

बिगर आदिवासीच्या ताब्यातील आदिवासी शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागावी की मा. तहसीलदार साहेब यांचेकडे दाद मागावी. कृपया मार्गदर्शन करावे.
उपरोक्त उत्तरात नमूद केल्याप्रमाणे आदिवासी व्यक्तीच्या भोगवट्याचे हस्तांतरण विनापरवाना बिगर आदिवासी व्यक्तीकडे झालेला असल्यास, भोगवटा परत पुनर्स्थापित करण्याबाबतचा अधिकार हा तहसीलदार/ उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपणाला दिवाणी न्यायालयात जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आपण उपरोक्त ्राधिकार्‍यांकडे अर्ज करावा. अर्जाचे चौकशी ही संक्षिप्त स्वरूपाची आहे त्यामुळे अतिशय लवकर न्याय प्राप्त होतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Anshuman
Wednesday, June 14, 2023
anshumol2007@gmail.com

आमच्या शेजारील व्यक्तीने ओढ्याच्या काठा लगत विहीर खोदण्याचे सुरु केले असून त्याने तिथे असणारी जुनी आंब्याची झाडेही तोडली आहेत. तसेच खोदकामातून निघणारा माल ओढ्यात टाकला आहे. सदर कामासाठी परवानगी आवश्यक असते का? हे काम बेकायदेशीर असेल तर तक्रार करता येईल का? कोणाकडे.?
आपल्या प्रश्नामध्ये तीन उपप्रश्न असल्याचे प्रामुख्याने निष्पन्न होत आहे.
१. विहीर खोदकाम करण्यासाठी सक्षम प्राधिकार्‍याची परवानगी आवश्यक आहे काय?
२.आंब्याची झाडे तोडण्यास परवानगीची आवश्यकता आहे का ?
३. ओढ्यामध्ये अश्या पद्धतीने गाळ/उत्खानांतून निर्माण होणारी माती टाकता येईल का ?


या तिन्ही प्रश्नांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत .
१. महाराष्ट्र भू-जल ( विकास व व्यवस्थापन ) अधिनियम २००९ अन्वये , राज्य शासनास , एखादे क्षेत्र अनुसूचित करता येते . अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित झाल्यावर अश्या क्षेत्र मध्ये विहीर खोदण्यास प्रतिबंध निर्माण होतात . तसेच राज्य शासनास , अनुसूचित क्षेत्राशिवाय गैर अनुसूचित क्षेत्रात विहीर खोद्काम करण्यास प्रतिबंध घालता येतात . आपले तक्रार ठिकाण ज्या क्षेत्रात आहे ते ठिकाण उपरोक्त कायद्याखाली अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं असल्यास अथवा राज्य शासनाने त्यावर निर्बंध घातलेले आहेत का याची खात्री करा .




२.. महाराष्ट्र वृक्षतोड ( नियमन ) अधिनियम १९६४ च्या कलम ३ अन्वये आंब्याचे झाड हे अनुसूचित वृक्ष असल्याने परवानगीची आवश्यकता आहे . विनापरवानगी तोडता येणार नाही .
विना परवानगी अशी झाडे तोडल्यास रु.१०००/- दंड करण्याची तरतूद आहे . तसेच झाडे तोडण्यास वापरण्यात आलेली हत्यारे , वाहने जप्त करण्याची तरतूद आहे .


३. अशी माती टाकता येणार नाही . उपरोक्त कृत्य हे “आगळीक” या भारतीय दंड संहितेच्या कलम ४२५ मधील , व्याख्येमध्ये येऊ शकते . दंड संहितेच्या कलम ४३० किंवा ४३१ अन्वये , जो कोणी पाटबंधारे कामाची खराबी करतो अथवा पाण्याची दिशा /पातळी बदल्ण्याचा प्रयत्न करतो त्यास , पाच वर्षापर्यंत व द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mittal vartak
Monday, June 12, 2023
shilparaut35@gmail.com

मी मित्तल वर्तक तालुका वसई गाव उमळे येथे राहत आहे आमचं गावामध्ये वडिलोपार्जित साधारणता 80 ते 90 वर्षं पूर्वीपासूनचे सामायिक घर आहे त्यामध्ये माझ्या हिस्स्यामध्ये आम्ही वेळोवेळी दुरुस्ती केलेली आहे तसेच आता मी माझा हिस्स्यामध्ये दुरुस्ती करत असताना सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले आहे आणि ते त्यासाठी मी दुय्यम निबंधक येथे रजिस्ट्रेशन सुद्धा केलेले आहे घराची घरपट्टी माझ्या नावावर आहे माझ्या भागासाठी मला सहकारी संस्थेने बोजा चढवण्यासाठी एक पत्र दिलेले आहे आणि त्यानुसार तलाठ्याने त्यावर फेरफार सुद्धा टाकलेला आहे परंतु पंधरा दिवसाचा कालावधी असल्याने तो अजून मंजूर झालेला नाही आणि त्यामध्ये माझ्या घराचं क्षेत्र सुद्धा नमूद केलेला आहे परंतु आता माझ्या आत्याने बोजा चढवण्यासाठी विनाकारण अडाणूक करण्याच्या हेतूने हरकत घेतली आहे तरीही मला बोजा चढवायचा आहे आमच्या सर्व जमीन या सामा सामायिक असल्याने जमिनीवर बरीच नावे आहेत आणि मी बँकेने के कडून लोन घेताना बऱ्याच सहधारकांच्या ज्यामध्ये आत्याचं सुद्धा ना हरकत दाखला सुद्धा घेतलेला आहे तरीही या संदर्भात मार्गदर्शन करावे
आपल्याला कर्ज घेण्यासाठी आपल्या अन्य नातेवाईकांसह आपल्या आत्याने जर ना- हरकत दिलेली असेल तर त्याबाबत बँकेचे कोणतीही हरकत नसेल तर आपली बोजा चढवण्याची नोंद मंजूर करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. मात्र हरकत देऊनही परत आत्या बोजा मंजूर करताना काही आक्षेप घेत असेल, तर त्याबाबत बँकेची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहील. कारण जर कर्जाची फेड झाली नाही व मालमत्ता विकण्याचा किंवा गहाण ठेवलेल्या घराचा भाग विकण्याचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळी बँकेला अडचण येणार आहे . त्यामुळे बँकेचा निर्णय महत्वाचा आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Swapnil Dayaram Fating
Sunday, June 11, 2023
swapnilfating97@gmail.com

अतिक्रम धारकांवर कारवाही न करण्या बाबत GR जि चंद्रपूर
भूमापन क्रमांकाची सनद मिळविण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ च्या कोणत्या नियमानुसार आणि किती फिस आकारली जाते ?
महाराष्ट्र जमीन महसूल( गाव, शहरे व नागरिक सर्वेक्षण) नियम 1969 च्या नियम 10 अन्वये नागरी भागातील जागेचे सर्वेक्षण झाले असल्यास, सनद देण्याची तरतूद आहे. त्या साठी रु. १ /- एवढी फी आकारली जाते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandip Madhukar Gaikwad
Friday, June 09, 2023
gaikwadsandy6768@gmail.com

1950 purviche 7/12 che records have ahet.

Gaikwad navache
जुने सर्व सातबारा उतारे हे त्या त्या तालुक्याच्या अभिलेख कक्षामध्ये जतन करण्यात आलेले आहेत. आपल्याला ज्या जमिनीचे सातबारा उतारे हवे आहेत त्या जमिनीच्या तालुक्याच्या ठिकाणी अभिलेख कक्षाशी आपण संपर्क साधून आपण गायकवाड नावाचे १९५० पूर्वीचे उतारे मिलतील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by विलास मिसाळ
Wednesday, June 07, 2023
vilasmisal1992@gmail.com

स्लम वस्ती मधल्या काही गल्ली(रस्ते) आहे.तेथील लोक जाण्या येण्याच्या रस्त्या वर.नको असलेले बांधाकाम करत आहे.अतीक्रम करण्या साठी काही उपाय असल्यास मार्गदर्शन करावे.
(संबंधी नगर सेवक या कडे दुर्लक्ष करतो कारण त्यांचे वोटिंग फूटते)
झोपडपट्टी प्राधिकरणाच्या सक्षम प्राधीकार्याकडे तक्रार करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Samruddhi Suresh Shinde
Wednesday, June 07, 2023
shindesamruddhi7429@gmail.com

Jaga kadhi nightil update
शासन जाहिरातीद्वारे याला wide publicity देते. त्यामुळे शासनाच्या जाहिरातीकडे लक्ष असू द्यावे.

Reply by MCS Officer | उप जिल्हाधिकारी

Question by Madhukar Pakakle
Tuesday, June 06, 2023
madhukarpakale111@gmail.com

कृपया मार्गदर्शन करावे

सन १९९८ मध्ये मौजे हारगुळ बु ता.जि. लातूर येथील जमीन गट नंबर १६३ प्लॉट नंबर ९४ दिड पानी एन.ए. प्लॉट खरेदी करण्यात आला होता.

परंतु लातुर येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे दीड पानी रजिस्ट्र बंद आहेत म्हणून सांगितले आहे. जर रजिस्ट्र करायची असेल तर काय करावे लागेल मार्गदर्शन करावे ही विनंती.

मधूकर पकाले
मो. 7709477088
रा. लातूर
आपणास दिड पानी म्हणजे दीड गुंठे अशे म्हणायचे आहे का ? जर भू खंड बिनशेती असेल व अभिन्यासातील असेल तर त्याचे नोंदणीवर निर्बंध नाहीत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची 2.64 हे.वडिलोपार्जित जमीन माझे बाबा व काका यांच्यामध्ये 1/2प्रमाणात वाटून घेण्यासाठी आम्ही 22.07.2022 नायब तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता त्यासंबंधी सर्व कागदपत्रे दाखल केली होती परंतु अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळकाढू धोरणामुळे आज दिनांक 02.06.2023 पर्यंत कार्यवाही पूर्ण केली नाही तर या संदर्भात काही नियम व वेळेची मर्यादा किती असायला पाहिजे त्या संबंधी लिखित स्वरूपात काही कायदा असेल तर त्या संबंधी मला माझ्या email वर माहिती द्यावी
जमिनीचे संमतीने वाटप या साठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ च्या तरतुदी लागू आहेत . या कलमानुसार , सह धारकांना ३० दिवसापेक्षा कमी नाही मात्र ६० दिवसा पर्यंतची नोटीस देण्याची तरतूद आहे . नोटीस दिल्यानन्तर , साधारणपणे , सुनावणीस मुदत वाढ दिली नसेल तर , वाटप पत्र आदेश काढण्यासाठी , १५ दिवसाचा कालावधी आवश्यक . साधारणपणे ३ महिन्याच्या कालावधीत प्रकरणावर निर्णय होणे आवश्यक आहे . या शिवाय आपण जमिनीचे कलम ८५ खालील जम्वानीचे संमतीने वाटप हि सेवा , सेवा हमी कायद्या अंतर्गत , अधिसूचित केली आहे का व त्यासाठी किती कालावधी , अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे ? याची पडताळणी करा . जरा जमीन वाटप हे सेवा अधिसूचित असेल तर , निर्धारित वेळेत निर्णय दिला नाही / सेवा दिली नाही म्हणून अपील दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Yogesh Nimodiya
Friday, June 02, 2023
silverrice17@gmail.com

वडिलोपार्जित वारस हक्काने प्राप्त आदिवासी जमिनीतून हक्क सोड पत्र करण्यास मा,जिल्हाधिकारी यांची परवानगी ची आवश्यकता आहे काय।
वारसा हक्काने प्राप्त झालेली जमीन आदिवासी व्यक्तीला कोणत्याही मार्गाने हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी व शासनाची संमती आवश्यकता आहे . मात्र आपणास अश्या जमिनीतील हक्क सोडून द्यायचा असेल तर परवानगीची आवश्यकता नसावी . मात्र याबाबत हक्क सोड पत्र करण्या पूर्वी सबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मत घ्यावे कारण ते आपली नोंद मंजूर करणार आहेत ./ निर्णय घेणार आहेत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kaunain Sahil Shaikh
Friday, June 02, 2023
kaunainshaikh2780@gmail.com

Navin avibhajya shart bhogwatdar warg 2 chi shet jamin bakshis patra karta yete kaay?
करता येईल परवानगी घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by पवन
Thursday, June 01, 2023
4974273@gmail.com

माझी अहमदनगर मध्ये शेती आहे. परंतु मी पुण्यात स्थायिक झालो आहे. कामाच्या व्यापा मुळे माला गावी जाणे शक्य होत नाही. माझ्या शेतजमिनीच्या विकसणा साठी अथवा इतर कामा साठी मी पुण्यात कुलमुखत्यार पत्र नोंदवू शकतो का?

Question by Prakash
Wednesday, May 31, 2023
ppawar2952@gmail.com

आमची वडिलार्जीत 9 एकर शेती असून त्यांचे माझे वडिल व 2 चुलते यांचा समान हिस्सा आहे व 7/12 सदरी समान हिश्शाने नोंद असून वहिवाटही आहे. माझे वडिल व चुलतेही हयात नाहीत आता आम्हा वारसांची 7/12 सदरी नोंद आहे व पुर्वापार जशी वहिवाट आहे तशीच अजून चालू आहे. आमचे अजून वाटणीपत्र झालेले नाही. आता आम्हाला वाटणी पत्र करायचे आहे. परंतू माझ्या धाकट्य़ा चुलत्याच्या हिश्शाच्या 3 एकर जमीनीबाबत चुलत भावाचा व त्याच्या बहिणींचा वाद असून सध्या दिवाणी न्यायालयात दावा चालू आहे. या परिस्थितीमधे आम्हाला वाटणीपत्रासाठी न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही का? कृपया मार्गदर्शन करावे.
जे एकूण क्षेत्र आपल्या आजोबांच्या नावे होते ते निम्मे निम्मे क्षेत्र आपले वडील व आपले चुलते यांच्या नावावर होणे क्रमप्राप्त आहे. चुलत्याच्या मुलांमध्ये त्यांचे हिश्याबाबत वाद चालू असल्यामुळे दिवाणी न्यायालयात जरी दावा चालू असला तरी आपण त्या दोघांशी संवाद साधून व सल्लामसलत करून आपल्या वडिलांचे क्षेत्र व त्यांच्या वडिलांचे क्षेत्र यामध्ये वाटप करून घेण्याबाबत काही मार्ग निघतोय का याचा विचार करा. जर ते तयार होत नसतील तर आपणाला न्यायालयामध्ये जाऊन आपले क्षेत्र हिस्सा निश्चित करून त्याप्रमाणे ताबा मागण्याचा/ दावा करण्याचा पूर्ण अधिकार आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul
Monday, May 29, 2023
jadhav.rahul111@yahoo.in

आमची एकूण 6 एकर वडिलार्जित शेती असून माझ्या अजोबांनी यापैकी 30 गुंठे जमीन गावातील काही लोकांना घरे बांधण्यासाठी 3-3 गुंठे विकली होती त्यांच्या नावाची नोंदही 7/12 सदरी झालेली आहे. आमचे गटा लगत सरकरी जमीन असून त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यातीलच एकजणाने पक्के घर बांधले आहे आम्ही RTI ने त्याची माहिती मागितली असता त्याने आमचे गटातील 3 गुंठे जागा विकत घेतली असल्याचा दस्त ग्रामपंचायतीला देवून त्याच्या घराची नोंद ग्रामपंचायत सदरी केली आहे. परंतू त्याचे नाव 7/12 सदरी नाही. तरीही ग्रामपंचायतीने सदर दस्ताचे आधारे त्याचे घराची नोंद नमूना 8 ला घेतली आहे. जमीन नावावर नसतानाही अशी नोंद घालता येते का? कारण माझे अजोबा हयात नाहीत तसेच या इसमाच्या आजोबांना माझ्या अजोबांनी अथवा माझे वडीलांनी जमीन विकलेली नाही. याबाबत काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.
ज्या दस्ताचे आधारे शेजारच्या अतिक्रमण धारकाने, आपल्या आजोबांकडून तीन गुंठे क्षेत्र खरेदी केल्याचे भासवून तसा दस्त ग्रामपंचायतीला सादर करून त्याचे नाव ग्रामपंचायत अभिलेख सदरी दाखल केलेले आहे, तो दस्त ताब्यात घेऊन अथवा अशा दस्ताची प्रत घेऊन त्याचे अवलोकन करून असा दस्त आपल्या आजोबांनी केलेला आहे का याची पडताळणी करा. जर अशा प्रकारे त्याने खोटा दस्त केलेला असेल तर त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाही करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar Yedage
Sunday, May 28, 2023
yedagesagar@gmail.com

ग्रामपंचायतीची गाळे किंवा जमीन कायमस्वरूपी भाडेपट्टा करण्याची प्रोसेस काय आहे.
2. ग्रामपंचायतिचे गाळे किंवा जमीन कायमस्वरूपी भाडेपट्ट्यावर देण्याचे कोणाला अधिकार आहेत.
ग्रामपंचायतची मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्याचे अधिकार हे त्यासंबंधीत ग्रामपंचायत आहेत. मात्र त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची परवानगी घ्यावी लागते. . ग्रामपंचायतीने भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत ठराव करणे आवश्यक आहे व तो ठराव संबंधित गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेकडे सादर केला जातो व त्यांची परवानगी प्राप्त झाल्यानंतर जी मिळकत आपणाला भाडेपट्ट्याने द्यावयाची आहे त्याबाबतचा भाडेपट्टा करार केला जातो व त्या इसमाला त्या जमिनीचा ताबा दिला जातो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर येडगे
Sunday, May 28, 2023
yedagesagar@gmail.com

नमस्ते सर.

ग्रापंचायतीचे गाळे किंवा जमीन कायमस्वरूपी अल्प भाडे तत्वावर करण्याची कायदेशीर प्रोसेस काय आहे...

भाडे तत्वावर देण्याचे अधिकार कोणाला आहेत..

Question by Sijauddin Ramjan mujawar
Sunday, May 28, 2023
sijauddinm786@gmail.com

देवस्थान जमीन ७/१२ वरील एपू नोंद कमी करने करीता काय करावे? सर कृपया मार्गदर्शन करावे.
देवस्थान जमिनीवरती ज्या लोकांच्या नोंदी असतात त्या नोंदी या वहिवाटदार म्हणून असतात. ज्या लोकांची नावे सातबारा सदरी दाखल असतात ते लोक देवस्थान मिळकतीचे मालक नसतात. वास्तविक वहिवाटदारांची नावे भोगवटादार सदरील दाखल करणे ही पूर्णपणे चुकीची प्रक्रिया आहे. वहिवाटदारांची सातबारा सदरी नावे दाखल करू नयेत. त्यामुळे एक पु नोंद आहे किंवा नाही या बाबी गौण आहेत. देवस्थान जमिनीची मालकी त्या त्या देवस्थानाची म्हणजे त्या देवाची असते. जे वहिवाटदार असतात त्यांना अधिकार केवळ ती जमीन कसवणूक करून किंवा तिचा उपभोग करून त्यामधून जे काही उत्पन्न प्राप्त होते त्यामधून त्या देवस्थानची दिवाबत्ती करणे, त्याची व्यवस्था पाहणे व उरलेल्या उत्पन्नातून स्वतःची उदरनिर्वाह करणे असा असतो. देवस्थानची जमीन कायद्याने सुद्धा हस्तांतरित करता येत नाही. यापूर्वी सन 2014 मध्ये ज्या देवस्थान जमिनीची अशा प्रकारे हस्तांतरने झालेली आहेत ती हस्तांतरण झालेली जमीन शासन जमा करण्याची ही कार्यवाही करण्यात आलेली होती.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.25 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3123
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3